छोटा भीम सैनिक💙💙💙💙

• 3 views
*#डॉ_बाबासाहेब_आंबेडकरांचे_विविध_दर्शन..* *बाबासाहेब आंबेडकरांचे नाव प्रथम मी १९३२ साली माझ्या जन्मस्थळी साठगाव खेड्यात वडिलांच्या तोंडून ऐकले. दिवाळीच्या दिवशी महारपुऱ्यात सभा आयोजित केली होती. त्याप्रसंगी त्यांनी बाबासाहेबांविषयी माहिती दिली. ऐकणारे गरीब, अशिक्षित, काबाडकष्ट करणारे लोक अशा तन्हेने सण साजरा करण्याची प्रथा सुरू करत होते. भारतामधला सर्वात मागासलेला चांदा (चंद्रपूर) जिल्हा त्यावेळी निबिड जंगलांनी व हिंस्र वन्य प्राण्यांनी व्यापलेला होता. अस्पृश्यांची परिस्थिती सर्वात हलाखीची होती. सभेला आलेली मंडळी मलीन व अपुऱ्या कपडचात कसंबसं अंग झाकून बसली होती. स्त्रियांना वस्त्रं जेमतेमच. मी लंगोटीतच होतो. त्यावेळी गुरं राखणे हा माझा धंदा झाला होता. बाबासाहेबांचा उपदेश माझे वडील मारोतराव सर्वांना पटवून सांगत होते.* *'मेलेल्या गाईबैलांचे मांस खाऊ नका. पाडव्याच्या सणाला टोपली घेऊन कुणबीपुऱ्यात उरलेले अन्न मागण्यास जाऊ नका. मुला-मुलींना शाळेत पाठवा, अशी बाबासाहेबांची शिकवण आहे.' वडिलांचे चार शब्द बोलून झाल्यावर माझे आजोबा बुधाजी म्हणाले, 'आणखी कोणीतरी पुढे या न् बोला.' कोणीच उभा राहिला नाही म्हणून ते माझ्याकडे पाहून म्हणाले, 'नामदेव, बोल रे काहीतरी. चारचौघात उभा तर राहून पाहा!' मी हिमत करून पुढे झालो व बोलू लागलो. 'आपण सर्वांनी बाबासाहेब सांगतात तसे वागले पाहिजे.' सर्वांनी शाबासकी दिली. माझी हिमत वाढली.* *१९३३ मधे माझे नाव 'कोल्हारी' गावी प्रायमरी शाळेत टाकले. तो गाव माझ्या गावापासून ३ मैल लांब आहे. शाळेच्या आत बसता येत नव्हते. कोणा स्पृश्यास माझा हात लागला तर त्याला स्नान करावे लागे. नंतर १९३६ ला उमरेड ह्या शहरातील जोगीठाणा प्रायमरी शाळेत नाव टाकले व राहण्यासाठी गावाबाहेरील पडीक जागेमधे वडिलांनी झोपडे बांधून दिले. तिथे मी आजी सगुणाबाई, भाऊ अंकुश व बहीण रुक्मिणी यांसह राहू लागलो. १९३८ मध्ये चवथा व १९४२ ला आठवा वर्ग पास झाल्यावर समाधान लाभले. 'पब्लिक हायस्कूल' मधे शिकत असताना जुलै १८,१९,२० ला १९४२ साली नागपूरला 'अखिल भारतीय डिप्रेड क्लासेस कॉन्फरन्स' करिता बाबासाहेब आले होते. त्यावेळी त्यांचे दर्शन झाले. पण त्याकरिता मी आधीच उमरेडमधे सव्वा रुपयाचे प्रवेशतिकीट घेतले होते. ते पैसे मी शेतात २ पैसे रोजाने काम करून शिल्लक ठेवले होते. तिकीट तर घेतले प्रवेशाचे; पण नागपूरला जावे कसे? माझ्याजवळ फक्त १० पैसेच उरले होते, साठगाववरून नागपूरला जवळपास ५० मैल पायीच गेलो,* *नागपूरला बाबुराव मेश्राम शाहिरांकडे राहिलो. त्यांच्याच कृपेने माझा बाबासाहेबांच्या नागपूरमधील परिषदेच्या जवळच्या विश्रामगृहात समता सैनिक दलातर्फे अंगरक्षक असलेल्या तुकडीत समावेश झाला. त्यावेळी मला किती धन्यता बाटली म्हणून सांगू! परिषदेचे अध्यक्ष* *बाबासाहेबांऐवजी रावबहादूर एन. शिवराज होते. बाबासाहेबांना व्हाईसरॉयच्या कौन्सिलमध्ये सदस्य म्हणून घेतले होते, त्यामुळे बाबासाहेबांनीच श्री. एन. शिवराजचे नाव सुचविले होते. ही सभा नागपूरच्या इतिहासामधील सर्वात मोठी सभा होती. स्वागताच्या वेळी बाबासाहेबांना उद्देशून श्री. बाबूराव मेश्रामांनी गीत गायले, त्यावेळी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरकी जय' चा व टाळ्यांचा गजर होत होता.* *'आंबेडकर, क्या कहूँ शान और शौकत तेरी।* *और बस गई है भीमराव, दिलमें सूरत तेरी.....'* *ह्याच अधिवेशनात डिप्रेस्ड क्लासेसचे नामांतर 'ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन' असे झाले. स्त्रियांच्या अधिवेशनाची अध्यक्षा श्रीमती डोंगरे व समता सैनिक दलाचे अध्यक्ष पंजाबचे 'गोपालसिंग' होते.* *त्यादिवशी बाबासाहेब फार आनंदात होते. ३० हजारांपेक्षा जास्त स्त्रिया हजर होत्या. अस्पृश्यांच्या सर्व जातींना एकत्र, एका सूत्रात बांधण्याकरिता शेडयूल्ड कास्ट फेडरेशन समर्थ होईल अशी आशा बाबासाहेब व्यक्त करत होते. अधिवेशन आटोपल्यावर संध्याकाळी लाला जयनारायणनी आयोजित केलेल्या स्वागत पार्टीला जावयास बाबासाहेब निघाले. सोबत बरीच कार्यकर्ती मंडळी होती. समता सैनिक दलाचे स्वयंसेवक होते. आम्ही बाबासाहेबांना रस्ता मोकळा करून देत होतो. मंडपाबाहेर आल्यावर आम्हाला दिसले की ३-४ स्त्रिया फाटक्या कपड्यांत असलेल्या, थकलेल्या नजरेने वाट पहात उभ्या होत्या. बाबासाहेब आंबेडकर सर्वांपुढे असल्यामुळे त्यांनी त्यांनाच विचारले, 'आंबेडकर कोठे आहेत?' बाबासाहेबांना फार नवल वाटले. त्यांनी सांगितले की, 'मीच आंबेडकर आहे. आपले काय काम आहे?'* *तेव्हा त्या माउल्या अति आनंदाने पुढे आल्या व आपल्या फाटक्या लुगडयाच्या ओट्यातून झेंडूच्या फुलांचे हार काढून बाबासाहेबांच्या गळ्यात टाकू लागल्या. त्यांच्या मानाने बाबासाहेब फार उंच होते. म्हणून बाबांनी मान खाली बाकविली व सर्व बायांनी त्यांच्या गळ्यात हार टाकले. त्या बाया बाबासाहेबांस सांगू लागल्या, 'आम्ही गरीब दुबळ्या, आमच्याजवळ मंडपाच्या आत जाण्याची तिकीट घेवाले पैसे नोयते बापा, मनून आमी तुमची वाट पाहात उभ्या होतो. कवातरी तुमी बाहार यालय, तवाच दर्शन घेऊ. आमी तुमाले पायले नोयते, आमच्याजवळ तुमचा फोटूबी नाई, तं मग वळखावं तं कायच्या भरोश्यावर? मनून चूक झाली बापा, तुमालेच पुसलो आंबेडकर कोण हाय मनून.'* *हे त्यांचे अगाध प्रेम पाहून बाबासाहेबांनी त्यांना विचारले, 'मग हे हार कसे घेतले? तुमच्याजवळ तर पैसे नव्हते.' तेव्हा त्या भोळ्याभाबड्या ग्रामीण बाया बाबांना सांगू लागल्या. एक म्हणाली, 'आज मी गवताचा भारा आणला खेडपातून, तो विकला य त्या पैशातून हार घेतला.' दुसरीने सांगितले, 'मी काट्यांची मोळी आणली, ती विकली व त्या पैशाचा हार घेतला.' त्यांचे ते निर्मळ प्रेम पाहून बाबासाहेब आंबेडकरांच्या भावना उचंबळून आल्या. त्यांचे डोळे अश्रृंनी दाटले व ते द्रवलेल्या कंठाने त्या माउल्यांना सांगू लागले, 'माझी आई मी लहान असतानाच वारली. ती कशी होती ते मला आठवत नाही, ती तुमच्यासारखीच दयाळू असली पाहिजे. म्हणून माउल्यांनो, मी ठामपणे सांगतो, जसा मी शिकून मोठा झालो, तसाच तुमच्या लेकरांनासुद्धा मोठा करीन व तुम्हाला सुखाचे दिवस दाखवीन. तसे करण्यात जर मी यशस्वी झालो नाही तर मी आपल्या डोक्यात बंदुकीची गोळी घालून घेईन.'* *बाबासाहेबांना त्यादिवशी बरेच पुष्पहार मिळाले होते, फार मोठमोठे व निरनिराळ्या फुलांचे, गुलाब, झेंडू, मोगरा इत्यादी हजारो हार बाबांच्या गळ्यात पडले होते. परंतु त्या गरीब बायांच्या हारांमुळे बाबासाहेबांचे हृदय द्रवले. आम्हाला फार नवल वाटले त्यांचे अश्रू पाहून. त्यांचे अंतःकरण फार कोमल होते. कार्यकर्त्यांना ताबडतोब बोलावून बाबासाहेबांनी आदेश दिला, की 'कोणालाही मंडपाबाहेर राहू देऊ नये. ज्यांची भाषण ऐकायची इच्छा आहे त्यांच्याजवळ पैसे असोत वा नसोत, त्यांना आतमध्ये प्रवेश द्यावा.'* *मुक्तीदाता विशेषांक* *लेखक डॉ ना मा. निमगडे* *संदर्भ डॉ बाबासाहेब* *आंबेडकरांच्या आठवणी* #🙏 प्रेरणादायक बॅनर #💙 भीमसैनिक 💙 #🙂Positive Thought #bhimsenik #💪बुद्धांची तत्वे📜
18 likes
13 shares
*तू धरलास हात वादळाचा अन संसार झाला माझ्या भीमाचा हा साज आज आमच्या जिंदगीचा आहे रमाई तुझ्या त्यागाचा* *४ एप्रिल १९०६ रोजी रमाई आणि बाबासाहेबांचा विवाह सोहळा भायखळा भाजी मार्केट मध्ये पार पडला. सुभेदार रामजी आंबेडकर हे आपल्या भीमराव नामक मुलासाठी वधू पाहत होते. सुभेदारांना भायखळा मार्केटजवळ राहणाऱ्या वलंगकरांकडे लग्नाची मुलगी असल्याचे समजले. सुभेदारांना रमा पसंत पडली त्यांनी रमाच्या हाती साखरेची पुडी दिली. रमाई व भीमरावांचे लग्न भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये इ.स. १९०६ या वर्षी झाले. विवाहप्रसंगी बाबासाहेबांचे वय १४ वर्षे तर रमाईचे वय ९ वर्षे होते. त्यावेळी बालविवाहाची प्रथा समाजात रूढ होती. लग्नात लग्न मंडप तसेच पंचपक्वान्नाच जेवण, झगमग रोशनाई नव्हती. अतिशय साध्या पद्धतीने हे लग्न पार पडले.* #🙏 प्रेरणादायक बॅनर #💙 भीमसैनिक 💙 #💪बुद्धांची तत्वे📜 #bhimsenik #🙂Positive Thought
21 likes
10 shares
बाबासाहेबांना अपेक्षित बौद्ध धम्म.... बुद्ध, बोलणाऱ्यास बोलताना परिणामाचा विचार करुन बोलण्याचा सल्ला देतो. तो म्हणतो- आपल्या सद्सद्विवेक बुद्धीचा (प्रज्ञेचा) वापर करुन योग्य परिणामाचा विचार करुन बोला. मुर्खाचे सत्य बोलाल, तर तुमच्या हातून अकुशल कर्म घडेल आणि तुम्ही दुःखी व्हाल. शहाण्याचे सत्य बोलाल, तर तुमच्या हातून कुशल कर्म घडेल आणि तुम्ही सुखी व्हाल. समाजात सुख, संमृद्धी, शांतता नांदण्यास मुसाबादा वेरमणी ह्या शील पालनाची प्रत्येक माणसास गरज आहे, असे बुद्ध सांगतो. सुरामेश्यमज्ज पमाद‌ठ्ठाना वेरमणी : 'व्यसनाधिनता' ही आज प्रत्येक देशातील समाजाची गंभीर समस्या बनली आहे. व्यसनाधिन माणूस स्वतः ही सुखाने जगत नाही आणि दुसऱ्यालाही सुखाने जगू देत नाही. अशा माणसाच्या घरात नेहमी कलह व भांडण असते. असा माणूस पहिल्या चारही शीलांचा भंग करु शकतो. हा प्रमादी म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीचाही असू शकतो. बुद्धाने ह्या शिलाद्वारे जो उपदेश केला आहे तो नीट समजून घेणे आवश्यक ठरते. चारही शीलांत नसलेला एक शब्द 'पमाद' (प्रमाद) ह्या शीलात आहे. त्याचे इथे विशेष महत्व आहे. सुरा ही धान्याचा अर्क, तर मेरय ही फळाचा अर्क. ह्या दोन्हीचा उपयोग औषध म्हणून अणि व्यसनासाठी मादक पदार्थ म्हणून केला जातो. वैद्याच्या सल्ल्याने रोग्याने, रोग निवारक औषध म्हणून वैद्याने सूचविलेल्या प्रमाणात, योग्य वेळी घेतले तर हे कुशल कर्म ठरेल; याला बुद्ध विरोध करीत नाही. परंतु निरोगी माणसाने, वैद्याचा सल्ला न घेता गरज नसताना प्रमाणाबाहेर हा अर्क (दारु) ढोसून घेतला तर तो प्रमादास (गुन्ह्यास) कारणीभूत ठरेल. म्हणजे हे त्या माणसाने केलेले अकुशल कर्म ठरेल. याला बुद्ध विरोध करतात. 'धम्मपदात' एक गाथा आहे' "अप्पमादो अमत पदं, पमादो मच्चूनो पदं।" अर्थ- अप्रमादी असणे (गुन्हेगार नसणे) हा (आदर्श) जीवनाकडे नेणारा मार्ग आहे, तर प्रमादी (गुन्हेगार) असणे हा मृत्युकडे (विनाशाकडे) नेणारा मार्ग आहे. पंचशीलांचे पालन करणारी व्यक्ती ही, गुन्हेगार प्रवृत्तीपासून मुक्त असते. जगातील प्रत्येक समाजाचे शासन, सुव्यवस्थेसाठी अनेक योजना राबवत असते. आणि त्यादृष्टीने लोकशिक्षणाची व्यवस्था करते. चीनमध्ये इ.स.च्या पहिल्या शतकापासून बुद्ध तत्वज्ञानाचा समावेश सार्वजनिक शिक्षणात केला जात आहे. पंचशील हे व्यक्तीच्या जीवनाचे मापदंड, प्रमाणक Standard आहे, असे बाबासाहेब 'बुद्ध आणि त्याचा धम्म' मध्ये सांगतात. पंचशील पालनाने व्यक्ती सदवर्तनी व आदर्श बनते. धम्माचा प्रारंभ याचसाठी शीलपालनाने, माणसाला सदाचारी बनविण्यासाठी केला पाहिजे, असे बाबासाहेब सांगतात. बुद्धाची अन्य शिकवण : समता : माणसामाणसात, त्याच्या व्यक्तीमत्व विकासासाठी बुद्ध भेदभाव मान्य करीत नाही. स्त्री-पुरुष असमानता मान्य करीत नाही. मात्र स्त्री सुरक्षिततेची काळजी घेतो. उपासक वा भिक्खू होण्यास कोणतेही धंद्याचे वा जातीचे बंधन मान्य करीत नाही. त्यापूर्वी विशिष्ट जातीच्या पुरुषांनाच सन्यास घेण्याचा अधिकार होता. त्याला बुद्धाने नाकारले. बुद्ध सर्वांना समान लेखतो आणि प्रत्येकाला व्यक्तीमत्व विकासाची व प्रगतीची संधी बहाल करतो. स्त्रीयांना सुद्धा प्रव्रज्येचा अधिकार देतो. कम्मसिद्धांत : बुद्ध सांगतो पेराल तसे उगवेल, कुशलकर्म- चांगले काम, हितकारक काम कराल, तर त्याचे चांगलेच फळ मिळेल. तुमचा मुक्तीदाता, कुणी बाहेरचा परमेश्वर वा अन्य नाही. तुम्हालाच तुमचा उद्धार करावयाचा आहे. 'अत्ताही अत्तनो नाथो।' तुम्ही स्वतःच स्वतःचे स्वामी आहात. यासाठी तसे कुशल कर्म करा. स्वतःला विकसित करा. विकासाची इच्छा बाळगा (Desire to develop) हे तत्व म्हणजेच बुद्धाचा कम्म सिद्धांत होय. चित्त आहे, आत्मा नाही : प्रत्येकाला मन म्हणजेच चित्त आहे. चित्त हे निरंतर प्रवाही आहे. चित्त चंचल आहे. ते मनोविकाराने म्हणजे लोभ (Greed) मोह, (Attraction) आणि विचिकित्सा, अज्ञान (Stupidity, Illusion) यांनी विचलित होते. माणसावर नियंत्रण ठेवणारे असे एखादे, आत्मा नावाचे (Sole) स्थीर तत्व शरीरात किंवा अन्य कुठेही नाही, असे बुद्ध मानतो. गॉलिलिओ, न्यूटन, आईन्स्टाईन, आणि स्टीफन हॉकींग्ज अशा अनेक महान शास्त्रज्ञांनी आत्मा, परमात्मा, पृथ्वी व सृष्टीची निर्मिती, तिची संरचना आणि निसर्गाचे कार्य याबद्दल जे हल्लीच्या युगात संशोधनांती सांगितले तेच बुद्धाने काय म्हणावे ? अडीच हजार वर्षापूर्वी भारतीयांना सांगितले. पण ऐकतो कोण? याला भारतीयांचे ध्यान : चित्ताला/मनाला कुशल कर्मावर स्थिर करणे म्हणजे चांगल्या वा हितकारक कामात मनाला गुंतवून ठेवणे, अशी ही चित्ताची एकाग्रता, हे ध्यान आहे. चित्ताला वाईट (अकुशल) अहित कारक विचारात, कामात प्रवेश करु देऊ न देणे, मनात वाईट विचार आला तर मनाला त्यापासून परावृत्त करणे हे ही ध्यान आहे. मनात चांगला विचार आला तर मनाला त्यात गुंतवून ठेवणे हे ही ध्यान आहे. हे सारे माणसाच्या आयुष्यभर चालले पाहिजे. ध्यान विकसित करण्यास अनेक माणसे मार्गदर्शकाकडून सराव करुन घेतात. दीर्घ कालीन ध्यान ही समाधी असते. कुशल कर्मावरुन कधीही विचलीत न होणारे मन/चित्त हे स्थीर चित्त असते. असा माणूस 'सम्म समाधीस' (सम्यक समाधीस) पात्र ठरतो. हे कार्य कठीण आहे. सम्म समाधी प्राप्त माणसाच्या मनातील सर्व विकारांचा नाश झालेला असतो. ही स्थिती 'निर्वाणास' (दुःख मुक्तीस) पोषक असते. चित्ताची सततची ही जागृतावस्था म्हणजेच अर्हतत्व. लोभ, राग, द्वेष, मोह यांचा कसलाही प्रभाव होऊ न देणारे चित्त, हे अर्हताचे चित्त असते, असे बुद्ध सांगतो. क्षण भंगुरता : जगात स्थीर असे काहीही नाही. जगात सतत परिवर्तन होत असते. म्हणजे जगातील सारं काही अनित्य आहे, क्षणभंगूर आहे म्हणून जगातील कोणत्याही गोष्टीचा लोभ नसावा ही बुद्धाची शिकवण आहे. याचा 'प्रतित्य समुत्पादाशी' संबंध आहे. कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नाही. प्रत्येक घटनेमागे कारण असतेच. ह्या कार्यकारण भावालाच 'प्रतित्य समुत्पाद' म्हणतात. हे प्रथमतः बुद्धाने जगाला सांगितले. म्हणून जगातल्या वैज्ञानिक संशोधन कार्याचा प्रारंभबुद्धापासून होतो, असे म्हटले जाते. शीलपालन, समानता, बुद्धाचा कर्मसिद्धांत, आत्मा परमात्म्यावरील अविश्वास सम्मसमाधी, अनित्यता, प्रतित्य समुत्पाद सांगणारा बुद्धाचा धम्म व्यक्तिला सदाचारी, कार्य करण्यास सक्षम आणि जबाबदार बनवून त्याच्यात आत्मविश्वास जागवितो. व्यक्तिला निर्भय बनवितो. खऱ्या अर्थाने संपूर्णपणे स्वतंत्र बनवितो. म्हणून धम्म, बहुजन हिताय, बहुजन सुखाय असतो... मुक्तीदाता बुद्ध पौर्णिमा विशेषांक संदर्भ ग्रंथ : १. The seeker's Glossary of Buddhism, Sutra Translation committee of US and Canada. २. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मदिक्षेचा अविस्मरणीय इतिहास वामनराव गोडबोले. सुप्रिया प्रकाशन, अलंकार चित्रपट गृह, नार्थ अंबाझरी, ३. नागपूर-१० बुद्ध आणि त्याचा धम्म. The Buddha and this Dhamma, Dr. B. R. ४. Ambedkar बाबासाहेब आंबेडकर साहित्य आणि भाषणे खंड-११ बौद्ध पूजापाठ - डॉ. बी. आर. आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर साहित्य आणि भाषणे खंड-१६, पृष्ठ क्र. -७२३ ते ७४२. ५. Buddhism as an Education, Ven. Master Chin-king. #bhimsenik #🪷बुद्धांची तत्वे📜 #💙 भीमसैनिक 💙 #🙂Positive Thought #🙏 प्रेरणादायक बॅनर
76 likes
84 shares