शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩

958 Posts • 961K views
mahesh m. shirkar
509 views 14 days ago
भृशैबलान्वयसिन्धुसुधाकर:, प्रथितकीर्तिरूदारपराक्रम :। अभवदर्थकलासु विशारदो जगति शाहनृप: क्षितिवासात:॥ "विविध सामर्थ्याचा प्रचंड समन्वय झालेला, पृथ्वीवर साक्षात इंद्रच असणारा शाह (शाहजी) नावाचा,किर्ती संपन्न व उदार आणि पराक्रमांची शर्थ करणारा तसेच अर्थ कारण व विविध कलांमध्ये पारंगत असणारा , अशा विविध गुणांचा संगम झालेला हा नृप थोर गुण सागरा वरील चंद्रा प्रमाणे शोभत होता." छत्रपती संभाजी महाराजांनी शहाजी महाराजांचे केलेले वर्णन... महाबली शहाजी महाराज यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन... 🙏🚩 #दिनविशेष #श्रीशंभूछत्रपतीराज्याभिषेकसोहळा #राजधानीरायगड 🚩 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩
9 likes
15 shares
mahesh m. shirkar
790 views 16 days ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *१६ मार्च इ.स.१६७३* छत्रपती शिवाजी महाराज ९ मार्च रोजी रायगडाहून निघाले ते पाचाडास आऊसाहेबांचे दर्शन, पोलादपूरास कविंद्र परमानंद यांचे दर्शन घेऊन प्रतापगडमार्गे पन्हाळगड बघण्यासाठी निघाले. कोंडाजी फर्जंदाने नूकताच काबीच केलेला पन्हाळगड गडावरील मंडळिंनी त्यांना येताना लांबूनच पाहिले व त्यांच्या दर्शनासाठी व स्वागतासाठी गडावर गडबड उडाली. गडावर दत्ताजी पंत वाकेनिवीस होते. इतर सर्व मंडळी होती. त्यांची धांदल उडून गेली. महाराज गडावर पोचले. आनंदाचे उधाण आले. दत्ताजी पंतांनी अक्षरशः सोन्याची फुले महाराजांवर उधळून त्यांचे स्वागत केले. दक्षिण दरवाजावरील भालदारांनी ललकार्‍या दिल्या. गडावरचे झाडून सारे स्त्रीपुरूष त्यांचे उत्साहाने स्वागत करीत होते व दर्शन घेत होते. नंतर महाराजांनी संबंध गडाचे अति प्रेमभराने दर्शन घेतले. कोंडाजी फर्जंदाचे व गड जिंकणार्‍या सर्व चित्त्यांचे त्यांनी मनःपूर्वक कौतूक केले. त्यांना सर्वांना खूप खूप धनदौलत देऊन त्यांची पाठ थोपटली. त्यांची धाडसी करामत पाहून महाराजांना धन्य धन्य वाटले अन् असा मायावंत राजा मायभवानीने आपल्याला दिला म्हणून त्यांही सर्वांस धन्य धन्य वाटले. *१६ मार्च इ.स.१६७४* छत्रपती शिवरायांच्या पत्नी *“काशीबाई साहेब”* यांचा किल्ले रायगडावर देहवास. *१६ मार्च इ.स.१६८१* छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर छत्रपती संभाजी महाराज गादीवर आले तेंव्हा नोव्हेंबर १६८० मध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी सिद्दीचा बंदोबस्त करण्यासाठी आपला वकील इंग्रजांकडे मुंबईस पाठवला होता शिवाय सिद्दीच्या मुंबईमधील हलचालीवर ही लक्ष ठेवण्याची तरदूत छत्रपती संभाजी महाराजांनी केली होती. इंग्रजांनी सिद्दीस मदत करायचे थांबवावे तसे न केल्यास छत्रपती संभाजी महाराज मुंबईवर स्वारी करतील असा निरोप छत्रपती संभाजी महाराजांच्या वकीलाने इंग्रजांना दिला यावेळी सिद्दी आपल्या आरमारासह सूरतेस गेला होता तेंव्हा इंग्रजांना सिद्दीच्या भानगडीतून थोडा दिलासा वाटला होता. पण १६८१ च्या सुमारास सिद्दिने मुंबईस जाणारी मराठ्यांची २ गलबते आणि ४ माणसे पकडली. चौल येथे ३००० सैन्यासह मराठा दाखल होता त्याने गलबतांची रास्त मागणी केली तेंव्हा इंग्रजांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या भीतीने ती गलबते सिद्दीकडून घेऊन मराठ्यांकडे पाठवली.. छत्रपती संभाजी महाराजांचा आरमारातील दरारा दर्शवणारी ही घटना झालेली इतिहासात नोंद असलेली तारीख आहे १६ मार्च १६८१. #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩छत्रपति शिवाजी महाराज #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
8 likes
14 shares
mahesh m. shirkar
867 views 18 days ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *१४ मार्च इ.स.१६४९* छत्रपती शिवरायांनी शहाजीराज्यांच्या सुटकेसाठी शाहजहानचा मुलगा आणि दख्खनचा सुभेदार शहजादा मुराद यास पत्र पाठविले. छत्रपती शिवाजी राजांच्या दख्खनेमधल्या कारवायांच्या बदल्यात अफझलखानाने शहाजीराजांना २५ - २८ जुलै १६४८ च्या दरम्यान जिंजी येथे अटक केली होती. ह्या पत्राने विजापुरच्या आदिलशहा वर दबाव पडून २ महिन्यानंतर महाराज शहाजीराजांची सुटका झाली. मात्र त्या बदल्यात शिवरायांना सिंहगड विजापुरला परत द्यावा लागला. *१४ मार्च इ.स.१६६५* छत्रपती शिवराय भिवगडावर मुक्कामी होते. #🚩छत्रपति शिवाजी महाराज #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
11 likes
11 shares