शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩

852 Posts • 974K views
mahesh m. shirkar
542 views 1 days ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *१८ ऑगस्ट इ.स.१७००* महापराक्रमी महायोद्धा थोरले बाजीराव पेशवे यांची जयंती. असा धुरंदर की ज्याचा कधीही पराजय झाला नाही, ज्यांनी आपल्या कुशल युद्धनेतृत्वाने छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या मराठा साम्राज्याच्या सीमा उत्तर भारतात विस्तारल्या. वयाच्या अवघ्या २०व्या वर्षी पेशवा झालेल्या या वीराने ४० वर्षाच्या आयुष्यात अतुलनीय पराक्रम गाजवला. *१८ ऑगस्ट इ.स.१६६६* आग्रा कैदेतून निसटल्याबरोबर पुर्वनियोजीत व्यूहरचनेनुसार काही गुप्तहेर, निवडक मावळे आग्रा किल्ल्याच्या थोडसं दुरवर एका कुंभारवाड्यात दबा धरुन बसले होते. तेथेच मोठी शेकोटी करुन त्याचा धुर बघत त्या दिशेला शिवराय व मावळे एकत्र जमा होऊन तडक घोड्यांच्या टापा वळाल्या त्या थेट मथुरा मध्ये येऊन पोहोचल्या. *१८ ऑगस्ट इ.स.१६८३* मराठ्यांचा बिमोड करण्यासाठी बादशहाने रहूल्लाखान यास निराकाठच्या प्रदेशाकडे व बरामदखान यास आष्टीकडे रवाना केले. #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 #🙏शिवदिनविशेष📜 #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🗿शिवकालीन पुराणवस्तू
9 shares
mahesh m. shirkar
1K views 1 days ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *१७ ऑगस्ट इ.स.१६६०* विजापूरचा आदिलशाह छत्रपती शिवराय व सिद्दी जौहरचा (गद्दारीच्या संशयाने) नायनाट करण्यासाठी पन्हाळ्याच्या रोखाने ससैन्य निघाला. *१७ ऑगस्ट इ.स.१६६६* "छत्रपती शिवराय" हे ९ वर्षाच्या बाळ शंभूराजेंना घेऊन तब्बल २,६०,००० मुघल सैनिकांच्या अजगर विळख्यातून वेशांतर करून आग्र्याच्या कैदेतून पसार झाले. छत्रपती शिवरायांबरोबर छत्रपती संभाजी राजांची आग्र्याहून सुटका (औरंगजेबाच्या मगरमिठीतून बाहेर ) मोंगल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने छत्रपती शिवरायांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले. त्यावेळी संभाजीराजे ९ वर्षाचे होते. छत्रपती शिवराय आग्र्याच्या कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ छ.संभाजीराजांना सोसली नसती आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते. त्यामुळे शिवरायांनी त्यांना मोरोपंत पेशव्यांच्या मेहुण्याच्या घरी मथुरेला ठेवले. मोगली सैनिकांचा संभाजीराजांच्या मागचा ससेमिरा थांबवण्याच्या उद्देशाने छत्रपती शिवरायांनी संभाजीराजांचे निधन झाल्याची अफवा पसरवून दिली. ते स्वराज्यात पोहोचल्यानंतर काही काळाने संभाजीराजे सुखरूपपणे स्वराज्यात येऊन पोहोचले. ( तारखेबाबत संभ्रम आहे पण बहुतांश ठिकणी हीच आढळते ) #🚩छत्रपति शिवाजी महाराज #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕
8 shares
mahesh m. shirkar
638 views 5 days ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *१३ ऑगस्ट इ.स.१६५७* छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहाजीराजांच्या सुटके करिता परत दिलेला. सिंहगड विजापुरच्या आदिलशाहीच्या कब्जात होता. ऐन स्वराज्याच्या छाताडावर उभा असलेला सिंहगड स्वराज्यात असणे अत्यंत गरजेचे होते. पावसाचा फायदा घेऊन राजांनी फौजा पाठवुन सिंहगडावर आकस्मात चढाई करून सिंहगड स्वराज्यात सामील करून घेतला. #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏शिवदिनविशेष📜 #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩
4 shares