mahesh m. shirkar
745 views • 6 days ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*२८ मे इ.स.१६६४*
सिंहगडावरील निकामी हल्ल्यानंतर हताश होउन जसवंतसिंह वेढा उठवून औरंगाबादला परतला. नोवेम्बर १६६३ पासून तो सिंहगड किल्ल्यास वेढा घालून बसला होता. ५ एप्रिल १६६३ रोजी सुमारे २ वर्षे लालमहालात ठाण मांडून बसलेल्या शास्ताखान उर्फ़ शाहिस्तेखानावर शिवरायांचा आकस्मिक छापा घातला. 'चैत्र शुद्ध अष्टमी' म्हणजेच रामनवमीच्या आदल्या दिवशी आणि मुस्लिम लोकांच्या रोज्याच्या ६ व्या दिवशी धक्कादायक असा छापा. खान कसाबसा पसार मात्र खानाची ३ बोटे कापली. जिवाच्या भीतीने खान तिकडून जो पळाला तो थेट औरंगाबादला जाउन थांबला. मात्र त्याने जसवंतसिंह यांस सिंहगड किल्ल्या जिंकायची आज्ञा केली होती.
*२८ मे इ.स.१६७४*
छत्रपती शिवाजी महाराज यांची राज्याभिषेकाच्या १० दिवस आधी मुंज करण्यात आली.
*२८ मे इ.स.१६६४*
महाराजा जसवंतसिंहाने सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या आपल्या सर्व सैन्याला परत निघण्याचा आदेश देऊन तळ सोडला.
*२८ मे इ.स.१६६८*
छत्रपती शिवाजी महाराजांचा व फिरंग्यांचा कुडाळ येथे तह झाला
*२८ मे इ.स.१६८७*
गोवळकोंड्याचा वेढा चालू असताना 'शेख निजाम' नावाचा एक सरदार औरंगजेबास येऊन मिळाला. बादशहाने लगेच त्यास ६००० मनसब व 'मुकरबखान' किताब दिला.
*२८ मे इ.स.१७०१*
दख्खन स्वारीवर असलेल्या औरंगजेबाने पन्हाळगड - पावनखिंड जिंकला. आता तो निघाला विशाळगड जिंकायला.
औरंगजेबाने अखेर तह करून विशाळगड २७ मे १७०२ रोजी ताब्यात घेतला. पन्हाळगड - पावनखिंड जिंकून विशाळगड ताब्यात घ्यायला त्याला बरोबर १ वर्ष लागले #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩शिवराय #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
20 likes
9 shares