शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩

907 Posts • 961K views
mahesh m. shirkar
573 views 13 hours ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *२१ एप्रिल इ.स. १६५६* छत्रपती शिवरायांकडे मुरारबाजी देशपांडे हे रत्न आले. *२१ एप्रिल इ.स.१६६८* छत्रपती शिवरायांनी विठोजी हैबतराव यास अभय दिले. *२१ एप्रिल इ.स.१७००* अजिंक्यतारा गडावरच्या मुठभर मराठ्यांच्या मदतीने प्रयागजींनी तब्बल साडेचार महिने औरंगजेबाशी झुंज दिली आणि अखेर गडावरचा दाणागोटा, दारुगोळा संपला, तेव्हा गडावरच्या मराठ्यानी २१ एप्रिल रोजी शरणागती पत्करली. नंतर त्याने आपला सरदार फत्ते-उल-खान याला सज्जनगड जिंकण्यास पाठवले. #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू
16 likes
3 shares
mahesh m. shirkar
858 views 6 days ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *१५ एप्रिल इ.स.१६७३* स्वराज्याचे सरनौबत प्रतापराव गुजर यांनी बहलोलखान पठाण विरुद्ध मोठी लढाई जिंकली. प्रतापराव गुजरांनी बहलोल खान पठाणास धर्मवाट देऊन विजापूरच्या दिशेने परत सोडून दिले. आणि इथूनच सुरूवात झाली एका नव्या वादळाची. राजांनी प्रतापराव गुजरांना चांगलेच फ़ैलावर घेतले. "सरसेनापती असूनही हा कोणता न्याय केलात ? हाती आलेल्या गनीमास धर्मवाट दिलीत ? गनीमास धुळीस मिळवल्याशिवाय आम्हास तोंड दाखवू नका". होय, राजांचे शब्द म्हणजे अंगार होते. एखाद्या निखार्‍याप्रमाणे ते शब्द रावाच्या कानांमध्ये घुसले. प्रतापरावाचा विजयाचा उन्माद क्षणात मावळला आणि बहलोलखानाला पराभूत करण्यास नव्या जोमाने योजना आखू लागले *१५ एप्रिल इ.स.१६८०* कारवार बंदरातील धान्य संभाजी महाराजांनी आणविले *१५ एप्रिल इ.स.१६८०* महाराजांच्या मृत्युनंतर शंभूराजांनी राजापूर, कुडाळकडील ‘कामावीसदारास’ पत्रे धन घेऊन पन्हाळ्यावर बोलावले तसेच कारवारच्या बंदरात धान्य होते ते त्यांनी आपणाकडे आणले. *१५ एप्रिल इ.स.१६८३* छत्रपती संभाजी राजांनी स्वत: १००० घोडदळ व २००० पायदळ घेऊन ‘तारापूर’ वर हल्ला केला आणि ते शहर जाळले. याशिवाय मराठ्यांनी दमण पासून वसई पर्यंत असलेल्या डहाणू, आसेरीम, सैबाना आणि इतर काही गावावर हल्ले केले. त्यांनी काही गावे लुटली, काही जाळली, होड्या व पाडाव हस्तगत केले आणि २ पोर्तुगीज पाद्री कैद केले. #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩छत्रपति शिवाजी महाराज #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩
14 likes
13 shares
mahesh m. shirkar
871 views 7 days ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *१४ एप्रिल इ.स.१६६४* जसवंत सिंह राठोड याने सिंहगडावर सुलतालढवा केला. हा एकमेळाने केलेला हल्ला मराठ्यांनी उधळून लावला. जसवंत सिंहाची पाठ मराठी चित्त्यांनी फोडून काढली. *१४ एप्रिल इ.स.१६६५* इतिहास प्रसिद्ध पुरंदरच्या वेढ्यामध्ये दिलेरखान, फतेलष्कर, अब्दुल्ला व महेली या मोगलांनी ३ तोफांच्या सहाय्याने वज्रगड/वज्रमाळ जिंकला. वज्रगड किल्ला पुरंदर किल्ल्याशेजारीच त्याचा धाकटा भाऊ होऊन उभा आहे. ३१ मार्च रोजी पुरंदरचा वेढा सुरु झाला होता *१४ एप्रिल इ.स.१७३६* चिमाजीअप्पांनी मोघल बादशहाचा हस्तक जंजिरा येथील सिद्दीसाताचा पराभव करुन मराठी सत्तेचा दरारा बसविला. *१४ एप्रिल इ.स.१८९१* #डॉ._बाबासाहेब_आंबेडकर_जयंती भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म वडील रामजी व माता भीमाबाई यांच्या पोटी १४ एप्रिल इ.स.१८९१ रोजी झाला. #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜 #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
16 likes
12 shares