#🥳होर्मुजच्या सामुद्रधुनीतून भारताला जाण्यास परवानगी🔴 : काहीसा दिलासा! होर्मुझ सामुद्रधुनी पार करत 'एलपीजी'चे आणखी एक जहाज भारतात पोहोचले.................
पश्चिम आशियातील युद्धामुळे भारताला गॅसच्या झळा सोसाव्या लागत आहे. देशात गॅस टंचाई जाणवत असून, याचा थेट फटका व्यावसायिकांना बसू लागला आहे. आखातातून होणार गॅस पुरवठा कधीपर्यंत सुरळीत होणार, याची प्रतिक्षा असताना काही दिलासा देणारी घटना गुरुवारी घडली.
एलपीजी घेऊन निघालेले जहाज होर्मुझ सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार करून भारतात पोहोचले आहे.
अपोलो ओशन असेल गॅस घेऊन आलेल्या जहाजाचे नाव आहे. ते आता न्यू मंगळुरू पोर्टवर पोहोचले आहेत.