:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२४८१ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
जर आपल्याला सुख मिळवायचे असेल तर देवाला आपलेसे करून घ्या देवाला आपलेसे केल्यावाचून सुख जीवाला मिळणारच नाही. एक देव सोडला तर बाकी सर्व पदार्थ माईक आहेत म्हणजे दुःख देणारे आहेत त्यांच्या आधी आणि अंति सुख देण्याचे अवसानच नाही. अविनाश अशा गोविंदालाच आपलेसे करून घ्यावे आणि आपल्या मनाला त्याचेच वेड लावावे. तुकाराम महाराज म्हणतात जो देवाला आपलासा करून घेतो त्याला एकदाच मरण येते पुन्हा त्याला जन्म येत नाही आणि त्याची उत्तम किर्ती मागे उरते.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.१२/०६/२०२६
वार-शुक्रवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -::::::::::::::::
#✍ज्ञानेश्वरी📖 #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #🙏भक्ती सुविचार📝 #🙏आई माझी काळुबाई #🌻आध्यात्म 🙏