#💐संत महंत🙏 #✍️भक्ती संदेश #🌻आध्यात्म 🙏 "गुरु" हा फ़क़्त ''बिज" पेरण्याचे काम करतो. उत्तम निरंतर "साधनां" करून बिजाला खत-पाणी साधकाला स्वतःलाच द्यावे लागते व कैवल्य-ज्ञानाची स्वानूभूती प्राप्त करून घ्यावी लागते. तरच सदेह मुक्ती आहे. नाही तर, लक्ष-८४ चा फेरा निश्चित आहे... 🌹
नामसंकीर्तनाच्याद्वारे देवाची संगती केली, तर तो जीव देवस्वरूप होतो; पण प्रपंचिकाच्या संगतीने मात्र अध:पतन होते.
प्रपंच व परमार्थ या सद्गति व अधोगतीच्या दोन वाटा आहेत, या मार्गाने जे जीव जातील ते आपल्या मार्गाप्रमाणे पाप-पुण्याचा संचय करत जातील.
आम्ही दोन्ही मार्ग लोकांना दाखवितो, ज्याला जो मार्ग योग्य वाटतो, त्या मार्गाने तो जातो.
तुकाराम माहाराज म्हणतात:- 👇
ज्या जीवाला ज्या मार्गाची उपजतच गोडी असेल,ओढ असेल तोच स्विकारला जातो. माझा उपदेश हा केवळ बीज पेरल्यासारखा समजावा.
🚩🚩 तुकाराम तुकाराम 🚩🚩