❤ Ricky ❤
925 views
8 days ago
🚧 मुंबई-गोवा महामार्गाचे काम अद्याप अपूर्ण असताना खारपाडा येथे टोल वसुली सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेली 31 मेची डेडलाईन पूर्ण होऊ शकली नाही. रायगड जिल्ह्यातील माणगाव-इंदापूर बायपास, उड्डाणपूल आणि सर्व्हिस रस्त्यांची अनेक कामे अद्याप रखडलेली आहेत. 15 वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकल्पामुळे कोकणवासीयांना यंदाचाही पावसाळा अर्धवट आणि धोकादायक महामार्गावरून प्रवास करत काढावा लागणार आहे. महामार्ग पूर्ण होण्याआधी टोल वसुली सुरू करणे योग्य आहे का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. #🤘टाईमपास😝 #🤪राजकीय टोलेबाजी😜 #🤪राजकारण जोक्स🤪 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎