आमच्या राज्यातले सगळे परप्रांतीय आपापल्या राज्यात पाठवून द्यावेत... म्हणजे आमच्या जमिनीवरली पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टिममधली गर्दी, घाण कमी होईल आणि आम्ही वैयक्तिक वाहनं वापरणं बंद करू.
आणि आम्हाला पेट्रोल डिझेल इतर इंधनाची गरज कमी लागेल.
आमच्या राज्यात पिकणाऱ्या सर्व प्रकारच्या अन्नधान्यात , भाजीपाला फळफळावळीत आम्ही आमचं भागवून घेऊ.
म्हणजे आम्हाला बाहेरून अन्न धान्य मागवण्याची गरज कमी लागेल आणि आमची फॉरेन करन्सी save होईल.
आमच्या सूर्यप्रकाशात , वाऱ्यात आम्ही आमच्या पुरती वीज निर्माण करू... म्हणजे पुन्हा आम्ही इंधन वाचवू.
आमची कपॅसिटी मोठी आहे त्यामुळे आम्ही घेतलेलं जास्तीचं उत्पादन विकू... त्या पैशातून आम्ही आमचं इंधन, टेक्नॉलॉजी इत्यादी गोष्टी विकत घेऊ.
इथली परप्रांतीय गर्दी कमी करा म्हणजे
आमची हवा
आमचं पाणी
आमची जमीन
आमचे आकाश
आमचा सूर्यप्रकाश
आमची सोलार पॉवर
आमची विंड पॉवर
आमचे भूगर्भातली संपत्ती ..... सगळं फक्त आमचं राहील.
त्याचा उपभोग फक्त आम्ही घेऊ. त्याचा सांभाळही आम्ही करू... आणि सर्वात महत्वाचं आमच्या या संपत्तीचा आम्ही सन्मान करू.
घेऊन जावं त्यांच्या राज्यांनी त्यांना..... कारण आज आमचे मूलभूत रिसोर्सेस पणाला लागलेत.
आमचं राज्य आम्हाला पुरेसं आहे. एक पेट्रोल डिझेल सोडलं तर आम्हाला कोणत्याही गोष्टीसाठी इतर राज्यांवरही अवलंबून राहण्याची गरज नाही.
त्याचंमुळे आमच्या राज्यातून इतर राज्यात आमची लोक फार कमी प्रमाणात पोटपाण्यासाठी जातात. आणि गेले तरी ते तिथे तिथले होऊन जातात. त्यांना आम्ही पुन्हा राज्यात सामावून घेऊ.
या परप्रांतियांमुळे आमच्या राज्यातल्या सगळ्याचं मूलभूत गोष्टींची झपाट्याने झीज होत आहे. आणि सर्व प्रकारच्या प्रदूषणात वाढ सुद्धा. आणि अतिक्रमणं सुद्धा.
त्यांना सन्मानाने त्यांच्या राज्यांनी परत घेऊन जावं.
जिथे ते त्यांना कोणीही म्हणणार नाही की
मराठी बोला.
स्थानिकांच्या आहार पद्धतीचा (मांसाहाराचा) सन्मान करा.
शिस्तीत रहा,
घाण करू नका,
कायदा सुव्यवस्था राखा.
धार्मिक अवडंबर माजवू नका.
महिलांना सुरक्षित ठेवा.
बालकांवर अत्याचार करू नका.
परिसरात घाण करू नका.
स्थानिकांना वागण्याबोलण्यात मान द्या आणि मान घ्या.
या सर्व नियम अटीमधून त्यांची सुटका होईल. कायमची.
आणि
मग त्यानंतर आम्हीही आमच्या
राज्याच्या सेक्युलरतेचा,
आमच्या भाषिक,
आमच्या आहारविषयक,
आमच्या सांस्कृतिक अस्मितांचा सन्मान अबाधित ठेवू शकू...
आमची डिग्निटी पणाला लागली आहे.
तुम्ही म्हणाल की तीही माणसं आहेत... त्यांचेही मानवी हक्क आहेत. त्याची सोय लावणं ही समस्या आधी सोडवायला हवी.
मला समस्या कशी आणि कोणी सोडवावी यांत रस नाही... कारण इथून सुरुवात होते समस्येकडे दुर्लक्ष करून चालवून घेण्याच्या वृत्तीची....
कारण आता गर्दी असलेल्या बोटीतून माणसं पडू लागलीत.
त्यात माझ्या राज्याचीही माणसं आहेत.
ते असलं मरण डिझर्व करत नाही.
आमचं अस्तित्व पणाला लागलं आहे.
आणि तिथे आम्ही तडजोड करणार नाही.
#1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #🏛️राजकारण #🔺भाजपा #👌हृदयस्पर्शी फोटो