Follow
ShareChatUser
@2628525989
2,186
Posts
1,484
Followers
ShareChatUser
696 views
4 days ago
स्वातंत्र्यसैनिक बळीरामजी सोनटक्के यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना... राज्याच्या सहकार मंत्र्यांसह मान्यवरांची उपस्थिती... कार्याचा गौरव... चाकूर : चाकूरचे भूमिपुत्र मराठवाडा मुक्ती संग्रामातील धाडसी व सशस्त्र लढ्याचे अग्रणी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बळीरामजी बापूराव सोनटक्के (वय १०१) यांच्या पार्थिवाची अंतिम यात्रा सोमवारी (दि. ४) त्यांच्या जय भवानी गल्ली येथील घरापासून सकाळी नऊ वाजता निघाली. त्यांचावर सकाळी ११ वाजता शासकीय इतमामात स्वातंत्र सैनिक बळीरामजी सोनटक्के नगर येथील माय मंदिरात लिंगायत धर्माच्या रितीरिवाजानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करून बंदुकीच्या एक्केविस गोळ्या झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली. स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची आठवण यावेळी उपस्थित मान्यवरांनी कृतज्ञतेने केली. सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष विठ्ठलराव माकणे, सोसायटीचे चेअरमन गोविंदराव माकणे, बालाजी पाटील चाकूरकर, लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने तहसीलदार नरसिंग जाधव, ह.भ.प.मोहन महाराज खुर्दळीकर यांनी सोनटक्के यांच्या कार्याला उजाळा देत भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. चाकूर शहरातील व्यापाऱ्यांनी अंत्यसंस्कार होईपर्यंत बाजारपेठ बंद ठेवून श्रद्धांजली अर्पण केली तर ओम साई प्रसाद अन्नछत्राच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करून महाप्रसाद देण्यात आला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भातलवंडे, नायब तहसीलदार दिगंबर स्वामी, पोलीस निरीक्षक बालाजी भंडे, माजी नगराध्यक्ष कपिल माकणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे, अनिल वाडकर, भाजयुमो प्रदेश सचिव ॲड.युवराज पाटील चाकूरकर, भाजपा तालुकाध्यक्ष सिद्धेश्वर पवार, व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष विनोद निला, अखिल भारतीय छावा संघटनेचे मच्छिंद्र चिंचोले, नगरसेवक भागवत फुले, नगरसेविका हिरकण लाटे, नगरसेविका सुजाता रेड्डी, लिंगायत महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश पटणे, तालुकाध्यक्ष सुभाष शंकरे, अहमदपूर तालुकाध्यक्ष शिवकुमार होळदांडगे, संजय पाटील, महादेव देवशेट्टे, यांच्यासह विविध खात्यातील अधिकारी कर्मचारी, राजकिय, सामाजीक, व्यापार, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील मंडळी‌, नातेवाईक, नागरीक मान्यवर उपस्थित होते. चाकूर तालुक्यासह लातूर जिल्हा आणि मराठवाडा परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकाला अखेरचा निरोप दिला. त्यांच्या निधनाने स्वातंत्र्य संग्रामातील एक जाज्वल्य अध्याय काळाच्या पडद्याआड गेला असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. #📝मराठवाडा अपडेट्स
ShareChatUser
619 views
5 days ago
मराठवाडा मुक्ती संग्रामातील सशस्त्र क्रांतिकारक बळीरामजी सोनटक्के यांचे निधन चाकूर : लातूर जिल्ह्यातील चाकूर येथील मराठवाडा मुक्ती संग्रामातील धाडसी व सशस्त्र लढ्याचे अग्रणी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बळीरामजी बापूराव सोनटक्के (वय १०१) यांचे रविवारी (दि.३) दुपारी १ वाजता चाकूर येथील त्यांच्या स्वगृही वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी (दि. ४) सकाळी १० वाजता शासकीय विश्राम गृह शेजारी, चाकूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. निजामाच्या जुलमी राजवटीविरुद्ध पेटून उठलेल्या चाकूर परिसरातील तरुणांमध्ये सोनटक्के हे अग्रस्थानी होते. अवघ्या २२ व्या वर्षी त्यांनी स्वातंत्र्यासाठी शस्त्र हाती घेत सशस्त्र लढ्यात सक्रिय सहभाग नोंदविला. सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी पोलिस ठाण्यातील शस्त्रसाठा हस्तगत करून स्वातंत्र्यलढ्याला बळ दिले. रजाकारांच्या अत्याचारांना त्यांनी कडवे प्रत्युत्तर देत जनतेच्या संरक्षणासाठी अनेक लढे उभे केले. कारावास, साखळदंड व छळ सहन करूनही त्यांच्या देशभक्तीची जाज्वल्य ज्योत कधीच विझली नाही. अहमदपूर व बिदर येथील तुरुंगवासादरम्यानही त्यांनी स्वातंत्र्याची प्रेरणा जिवंत ठेवली. त्यांच्या विरोधात साक्ष देण्यास कोणी पुढे न येणे हे त्यांच्या लोकमान्यतेचे द्योतक होते. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षात त्यांनी आपल्या लढ्याच्या आठवणी सांगत नव्या पिढीसमोर इतिहास जिवंत केला होता. त्यांच्या निधनाने चाकूर तालुक्यासह संपूर्ण मराठवाड्यात शोककळा पसरली असून, त्यांच्या जाण्याने इतिहासाचा एक जिवंत साक्षीदार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. #📝मराठवाडा अपडेट्स
ShareChatUser
639 views
15 days ago
*जानवळ मध्ये गोठ्याला आग लागून सात जनावरे भस्मसात, शेतकऱ्याचे दहा लाखाचे आर्थिक नुकसान* *सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांनी सहानभूती दाखवत केली १ लाख मदत* चाकूर : तालुक्यातील जानवळ येथील एका शेतकऱ्याच्या गोठ्याला आग लागून त्या गोठ्यातील सात जनावरे भस्मसात झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली असून त्या शेतकऱ्याचे दहा लाख रुपयाचे आर्थिक नुकसान झाले आहे.यामुळे शेतकरी पूर्णपणे हतबल झाला आहे. दरम्यान राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी शेतकऱ्याप्रति सहानुभूती दाखवीत वैयक्तिक १ लाख रुपयाची आर्थिक मदत केली आहे. जानवळ येथील शेतकरी ज्ञानोबा भोजने यांचे गावापासून दीड ते दोन किलोमीटर अंतरावर गट नंबर ३५९ मध्ये अडीच एकर जमीन आहे. यामध्ये त्यांनी जनावरे बांधण्यासाठी व शेतीचे अवजारे ठेवण्यासाठी गोठा बांधला होता. गुरुवारी २३ एप्रिल दुपारी १ वाजून ४० मिनिटाला तळपत्या उन्हात गोट्याला अचानक आग लागून ३ जर्सी गायी, २ वासरे व २ गोरे तसेच २१ कट्टे सोयाबीन, विद्युत वायराचे बंडल, जनावरांचा कडबा व शेतीचे आवजारे जळून खाक झाले आहे. यामध्ये एक गोरे जवळपास ७० ते ८० टक्के भाजल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती ज्ञानोबा भोजने यांचा मुलगा शिवशंकर भोजने यांनी दिली. यामध्ये शेतकऱ्यांचे दहा लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी घटनास्थळाला भेट देत पाहणी केली असून भोजने या शेतकऱ्याला वैयक्तिक १ लाख रुपये मदत करून प्रशासनातील अधिकारी यांना सदरील शेतकऱ्याला योजनेच्या माध्यमातून शासनाकडून गोठा व दुधाळ जनावरे देण्यात यावे असे सांगितले. यावेळी तहसीलदार नरसिंग जाधव, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, जिल्हा परिषद कृषी सभापती कविताताई गोरे, रणजित पाटील, सरपंच भागवत कुसंगे, दत्ता पवार, प्रा यादव कर्डीले, उमेश कर्डीले, पशुसंवर्धन अधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते. #📝मराठवाडा अपडेट्स
ShareChatUser
2.4K views
19 days ago
चाकूर हादरलेः दोन चिमुकले बेपत्ता, एकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ चाकूरः- चाकूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन अल्पवयीन मुले बेपत्ता होऊन त्यापैकी एकाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास युद्धपातळीवर सुरू केला असून दुसऱ्या मुलाचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत. जुने महादेव मंदिर गल्लीतील साइचरण दिनेश स्वामी (१० वर्षे) आणि देवंश मंगेश स्वामी (७ वर्षे) ही दोन मुले १९ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजेपासून बेपत्ता होती.शोधमोहीम सुरू असताना दुपारी २:१० वाजेच्या सुमारास चाकूर-उजळंब रोडवरील एका मोकळ्या जागेत ७ वर्षीय देवंश स्वामी याचा मृतदेह आढळून आला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. सध्या स्थानिक गुन्हे शाखा आणि चाकूर पोलिसांची एकूण ४ पथके दुसऱ्या मुलाच्या (साइचरण स्वामी) शोधासाठी तैनात करण्यात आली आहेत. तपासासाठी फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकाचीही मदत घेतली जात आहे. पोलिसांचे आवाहन: “नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. परिसरात कोणतीही संशयास्पद माहिती आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा.” #📝मराठवाडा अपडेट्स
ShareChatUser
747 views
1 months ago
धिरज देशमुख यांचा वाढदिवस चाकुर शहरात विविध सामाजिक उपक्रमांने साजरा युवक कॉग्रेस व शहर कॉग्रेच्या वतीने चाकुरः-लातूर ग्रामीणचे माजी आमदार तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त दि. ६ एप्रिल रोजी विविध ठिकाणी समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करुन वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. लातुर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मा.आ.धिरज देशमुख यांच्या वाढदिवस निमित्त चाकुर काँग्रेस व युवक काँग्रेसच्या विविध सामाजिक उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला.ग्रामीण रूग्णालयातील रूग्णांना फळ वाटप,पंचक्रोशीतील नवसाला पावणारे हाकानीबाबा दर्गावर चादर अर्पण,जयभवानी मंदिर येथे अभिषेक अशा विविध उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला. चाकुर येथील सरकारी दवाखान्यात रुग्णांना फळवाटप करण्यात आले.उन्हाळ्यात ग्रामीण रूग्णालयात रूग्ण उपचार घेण्यासाठी आले असता.रूग्णांना केळी,सफरचंद,बिस्कीट पुडा,पिण्याच्या पाण्याची बाटली देण्यात आली.चाकुर शहरापासुन जवळ असलेल्या हाकानी बाबा बेटावरील जवळपास २५० पायऱ्यां भर उन्हात चढून चांदर व नारळ फोडून दिर्घआयुष्यासाठी प्रार्थना [दुवा] करण्यात आली.संध्याकाळी चाकुर शहरातील जयभवानी मंदिर येथे अभिषेक करून दिर्घआयुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली.दिवसभर सामाजिक उपक्रम घेऊन धिरज देशमुख यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निलेश देशमुख, काँग्रेसचे शहराध्यक्ष पप्पुभाई शेख,सोशल मिडिया प्रमुख सलीमभाई तांबोळी,माजी सरपंच गंगाधर केराळे, शदर जाधव, भरत बजगीरे रेड्डी, वैभव धोंडगे,समीर शेख, गजानन सावंत, यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.रूग्णांना फळ वाटप करताना वैद्यकिय अधिक्षक जितेन जैस्वाल व वैद्यकिय अधिकारी डॉ.कदम व कर्मचारी उपस्थित होते. #📝मराठवाडा अपडेट्स
ShareChatUser
653 views
1 months ago
AI indicator
सभापती – उपसभापती व गटविकास अधिकारी यांच्या मध्यस्थीने सोडले नागरिकांनी उपोषण चाकूर – तालुक्यातील तीवघाळ येथील नागरिकांनी चाकुर पंचायत समिती येथे घरकुल आवास योजनेचे बिल इंजिनिअर टाकत नसल्या कारणाने आज तीवघाळ येथील नागरिकांनी उपोषण सुरू केले होते.. आज त्या उपोषण स्थळी चाकूर पंचायत सभापती प्रतिनिधी मच्छिंद्र नागरगोजे, उपसभापती भुजंग शिंदे ,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष वांगवाड यांनी मध्यस्थी करत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व तात्काळ घरकुलाचे आवास योजनेचे बिल टाकण्याची कारवाई केली जाईल व लवकरच लाभार्थ्यांना घरकुल योजनेचे बिल पडतील असे आश्वासन उपोषण कर्त्याना दिले. त्यानंतरच त्यांनी उपोषण सोडले. यावेळी पंचायत समिती सदस्या प्रतिनिधी .डॉ.नरेंद्र हाके, पंचायत समिती सदस्य,गजानन होनराव, संतोष कलवले, पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी प्रतीक केदार, बाळासाहेब शिंदे सह विविध प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. #📝मराठवाडा अपडेट्स
ShareChatUser
929 views
1 months ago
*सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्या पुढाकारातून अहमदपूर चाकूर तालुक्याच्या स्मशानभूमी विकासासाठी २ कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर:* *लवकरच कामे मार्गी लागणार* चाकूर:- महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अहमदपूर आणि चाकूर विधानसभा मतदारसंघातील २४ ते २५ गावांना तेथील स्मशानभूमीच्या संरक्षणभिंत ,शेड बांधकाम किंवा अन्य सुशोभिकरणासाठी २ कोटी कोटी ६० लाख रुपये मंजूर करण्यात आले असून लवकरच या कामाच्या प्रशासकीय, तांत्रिक मान्यता होऊन कार्यारंभ आदेश प्राप्त होऊन लवकरच या कामांना गती मिळणार आहे अशी माहिती सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की अहमदपूर आणि चाकूर तालुक्यात विविध स्मशान भूमीसाठी निधी मिळावा यासाठी सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून अहमदपूर आणि चाकूर तालुक्यातील जवळपास २४ते २५ गावांना २ कोटी ६०लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून यामध्ये अहमदपूर तालुक्यातील आनंदवाडीतांडा , वळसंगी, सताळा, शिरूर ताजबंद, तेलगाव, बेंबडेवाडी, अंधोरी, काळेगाव, उमरगा कोर्ट, शिवनखेड खुर्द, कुमठा, किनगाव तसेच चाकूर तालुक्यातील बनसावरगाव, कबनसांगवी, चापोली, रोहिणा, आष्टा,बोथी,शिरनाळ, अंबुलगा, नागेशवाडी, गांजुरवाडी, जानवळ, हिपळनेर, अजनसोंडा, गावात प्रत्येकी दहा लक्ष रुपयाचा निधी स्मशानभूमी संरक्षण भिंत शेड बांधकाम व सुशोभीकरणासाठी मंजूर करण्यात आला आहे. चाकूर आणि अहमदपूर तालुक्यातील स्मशानभूमीसाठी हा निधी मंजूर केल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचे आभार मानले आहेत. *चौकट* *अहमदपूर आणि चाकूर विधानसभा मतदारसंघातील स्मशानभूमीसाठी निधी देणे गरजेचे होते. यासाठी पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्याशी सातत्याने पाठवापुरावा करून अहमदपूर आणि चाकूर विधानसभा मतदारसंघासाठी तबल २ कोटी ६० लक्ष रुपयाच्या स्मशानभूमी विकासासाठी निधी मंजूर केला असून लवकरच ही कामे मार्गी लागणार आहेत. निधी मंजूर केल्याबद्दलया बद्दल शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचे मनस्वी आभार* *ना. बाबासाहेब पाटील* *सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य* #📝मराठवाडा अपडेट्स
ShareChatUser
1.2K views
1 months ago
चाकुर ईदसाठी सज्ज ; नगरपंचायत प्रशासनाच्या नियोजनाला वेग नगराध्यक्षा करीम गुळवे यांच्या मार्गदर्शनाखाली ईदगाह परिसरात मूलभूत सुविधा चाकुरः-पवित्र रमजान ईद (ईद उल फित्र) सणाच्या पार्श्वभूमीवर चाकुर शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्यासाठी येणाऱ्या मुस्लिम बांधवांसाठी नगरपंचायतीकडून सर्वंकष तयारी पूर्णत्वाकडे जात आहे. नगराध्यक्ष करीम गुळवे यांच्या मार्गदर्शनाखाली ईदगाह परिसरात मूलभूत सुविधा उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. गुरुवार, दि. 19 मार्च रोजी नगराध्यक्षांनी ईदगाह कमिटी, पोलीस प्रशासन, नगरपंचायत अधिकारी तसेच वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करत तयारीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी स्वच्छता, पिण्याचे शुद्ध पाणी, अखंडित वीजपुरवठा, तसेच भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस बंदोबस्त व वाहतूक नियोजन यावर विशेष भर देण्यात आला. ईदच्या दिवशी परिसरात विशेष साफसफाई मोहीम राबविण्यात येणार असून, उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मंडप टाकले जात असून, पार्किंग व्यवस्था, रुग्णवाहिका व वैद्यकीय पथकाचीही सज्जता ठेवण्यात आली आहे. तसेच शहरात सुरळीत पाणीपुरवठा व वीज सेवा कायम ठेवण्यासाठी संबंधित विभागांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत."ईद हा बंधुभाव, शांतता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा सण आहे. सर्वांनी परस्पर सहकार्याने व सलोखा राखत हा सण आनंदात साजरा करावा," असे आवाहन नगराध्यक्षांनी केले. प्रशासनाच्या काटेकोर नियोजनामुळे यंदाची ईद अधिक सुरक्षित आणि सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.यावेळी सभापती मुज्जमिल सय्यद,माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक नितीन रेड्डी,महंमद सय्यद,बिलाल पठाण,मतीन गुळवे,अझहर शेख विनोद गवई,जाकीर गुळवे,सह आदि जण उपस्थित होते. #📝मराठवाडा अपडेट्स
ShareChatUser
791 views
1 months ago
चाकुरमध्ये रंगली 'दावत-ए-इफ्तार'!नगरसेवक नितीन रेड्डी यांनी जोपासली सामाजिक सलोख्याची परंपरा सहकार मंञी बाबासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती चाकुरः-पवित्र रमजान महिन्यानिमित्त चाकुर शहरातील प्रभाग क्रमांक एक मध्ये अशरफ मज्जिद जवळ झरी रोड येथे नगरसेवक नितीन रेड्डी यांच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी दावत -ए- इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्यांचे सहकार मंञी ना.बाबासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये इफ्तार पार्टी पार पडली.यावेळी नितीन रेड्डी यांच्या वतीने मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.नगरसेवक नितीन रेड्डु यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामुळे सामाजिक ऐक्य व बंधुभावाचा सुंदर संदेश परिसरात पसरला.रमजान महिन्यात मुस्लिम समाजातील बांधव दिवसभर कडक उपवास (रोजा) पाळतात आणि सूर्यास्तानंतर इफ्तारद्वारे तो सोडतात. या पार्श्वभूमीवर चाकुर येथील अशरफ मज्जिद जवळ झरी रोड समोर शुक्रवारी दि. १३ मार्च रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार कार्यक्रमात मोठ्या उत्साहात मुस्लिम बांधवांनी सहभाग घेतला.कार्यक्रमाच्या वेळी नितीन रेड्डी यांनी उपस्थित मुस्लिम बांधवांचे प्रेमपूर्वक स्वागत केले. धर्म, जात किंवा पंथ न पाहता समाजात परस्पर स्नेह, जिव्हाळा आणि आपुलकी वाढविणे हीच खरी मानवतेची सेवा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. समाजात सलोखा, ऐक्य आणि परस्पर आदर वाढावा, हा या उपक्रमामागचा मुख्य हेतू असून अशा सामाजिक आणि मानवतावादी कार्यात आम्ही पुढेही कायम सहभागी राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले.चाकूर नगरीचे माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक नितीन गुणाजी रेड्डी व नगरसेविका सौ.सुजाताताई नितिन रेड्डी यांच्या तर्फे प्रभाग क्रमांक एक मध्ये दावत ए इफ्तार पार्टी चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, चाकुर नगरपंचायत चे नगराध्यक्ष करीम गुळवे ,उपनगराध्यक्ष साईप्रसाद हिपाळे, माजी नगराध्यक्ष मिलिंद महालिंगे,अनिल वाडकर, इलियास सय्यद,राम कसबे महम्मद सय्यद,नरसिंग गोलावर,शिवदर्शन स्वामी,मधुकर कांबळे,माजी नगरसेवक चांद मासुलदार,बाबुभाई दापकेवाले,बाबुभाई बुलंनभाई,नितीन डांगे,रफीक कोतवाल अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक माता भगिनी उपस्थित होत्या. *चौकट* *दावत-ए- इफ्तारमधून सामाजिक एकोपा व बंधुभावाचा संदेश-सहकार मंञी बाबासाहेब पाटील* *रमजान या पवित्र महिन्यात उपवास करून अल्लाहची उपासना केली जाते. या पवित्र काळात हिंदू-मुस्लिम असा कोणताही भेदभाव न ठेवता सर्वजण एकत्र येतात.चाकुर शहरात दावत-ए-इफ्तारचे आयोजन सातत्याने केले जात असून त्यातून, सामाजिक एकोपा आणि बंधुभाव अधिक दृढ होत असल्याचे प्रतिपादन सहकार मंञी बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केले. दावत-ए-इफ्तारच्या माध्यमातून समाजात एकोप्याचा आणि बंधुभावाचा संदेश दिला जातो. रमजान महिन्यात चाकुर येथे इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते* . *हिंदू-मुस्लिम बांधव गुण्यागोविंदाने एकत्र नांदण्याची ही परंपरा पिढ्यानपिढ्या सुरु असून हा सामाजिक एकोपा अधिक वृद्धिंगत व्हावा, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.* #📝मराठवाडा अपडेट्स
ShareChatUser
1.3K views
1 months ago
AI indicator
चाकुर शहरातील मतदारांनी बीएलओ यांच्याशी संपर्क करून मॕपिंग प्रक्रिया पुर्ण करून घ्यावी नगराध्यक्ष करीम गुळवे यांचे चाकुरकरांना आवाहन चाकुरः-केंद्र आणि राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदार यादी अचूक आणि अद्यावत रहावी यासाठी २००२ मधील मतदार यादीशी सध्याच्या मतदारांचे नाव मॅपिंग करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्या अनुषंगाने चाकुर शहरातील मतदारांनी आपल्या प्रभागातील बीएलओ यांच्याशी संपर्क करून आवश्यक कागदपत्रांसह तात्काळ मॅपिंग प्रक्रिया पुर्ण करून घ्यावी असे आवाहन चाकुर नगराध्यक्षा करीम गुळवे यांनी केले आहे. चाकुर शहरातील सर्व प्रभागात बीएलओ (बुथ लेव्हल ऑफिसर) यांची नियुक्ती प्रशासनाने केलेली आहे. मतदार याद्या अचुक आणि अद्यावत करण्याच्या उद्देशाने एसआयआर प्रक्रियेंतर्गत सन २००२ मधील मतदार यादीशी आजच्या मतदारांची माहिती मॅपिंग करण्यात येत आहे. अनेकदा मतदारांच्या यादीत पत्ता बदल, नावातील चुका, प्रभागातील बदल यामुळे मतदारांना ऐन मतदानाच्या दिवशी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. सध्या एसआयआर प्रक्रियेंतर्गत आवश्यक सर्व कागदपत्रांच्या अनुषंगाने मॅपिंग प्रक्रिया करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे नागरीकांनी आवश्यक सर्व कागदपत्रांसह आपल्या प्रभागातील बीएलओ यांच्याशी संपर्क करून मॅपिंग करून घ्यावे असे आवाहन नगराध्यक्षा करीम गुळवे यांनी केले आहे #📝मराठवाडा अपडेट्स