स्वातंत्र्यसैनिक बळीरामजी सोनटक्के यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप
बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना... राज्याच्या सहकार मंत्र्यांसह मान्यवरांची उपस्थिती... कार्याचा गौरव...
चाकूर : चाकूरचे भूमिपुत्र मराठवाडा मुक्ती संग्रामातील धाडसी व सशस्त्र लढ्याचे अग्रणी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बळीरामजी बापूराव सोनटक्के (वय १०१) यांच्या पार्थिवाची अंतिम यात्रा सोमवारी (दि. ४) त्यांच्या जय भवानी गल्ली येथील घरापासून सकाळी नऊ वाजता निघाली. त्यांचावर सकाळी ११ वाजता शासकीय इतमामात स्वातंत्र सैनिक बळीरामजी सोनटक्के नगर येथील माय मंदिरात लिंगायत धर्माच्या रितीरिवाजानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करून बंदुकीच्या एक्केविस गोळ्या झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली.
स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची आठवण यावेळी उपस्थित मान्यवरांनी कृतज्ञतेने केली. सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष विठ्ठलराव माकणे, सोसायटीचे चेअरमन गोविंदराव माकणे, बालाजी पाटील चाकूरकर, लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने तहसीलदार नरसिंग जाधव, ह.भ.प.मोहन महाराज खुर्दळीकर यांनी सोनटक्के यांच्या कार्याला उजाळा देत भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. चाकूर शहरातील व्यापाऱ्यांनी अंत्यसंस्कार होईपर्यंत बाजारपेठ बंद ठेवून श्रद्धांजली अर्पण केली तर ओम साई प्रसाद अन्नछत्राच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करून महाप्रसाद देण्यात आला.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भातलवंडे, नायब तहसीलदार दिगंबर स्वामी, पोलीस निरीक्षक बालाजी भंडे, माजी नगराध्यक्ष कपिल माकणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे, अनिल वाडकर, भाजयुमो प्रदेश सचिव ॲड.युवराज पाटील चाकूरकर, भाजपा तालुकाध्यक्ष सिद्धेश्वर पवार, व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष विनोद निला, अखिल भारतीय छावा संघटनेचे मच्छिंद्र चिंचोले, नगरसेवक भागवत फुले, नगरसेविका हिरकण लाटे, नगरसेविका सुजाता रेड्डी, लिंगायत महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश पटणे, तालुकाध्यक्ष सुभाष शंकरे, अहमदपूर तालुकाध्यक्ष शिवकुमार होळदांडगे, संजय पाटील, महादेव देवशेट्टे, यांच्यासह विविध खात्यातील अधिकारी कर्मचारी, राजकिय, सामाजीक, व्यापार, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील मंडळी, नातेवाईक, नागरीक मान्यवर उपस्थित होते. चाकूर तालुक्यासह लातूर जिल्हा आणि मराठवाडा परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकाला अखेरचा निरोप दिला. त्यांच्या निधनाने स्वातंत्र्य संग्रामातील एक जाज्वल्य अध्याय काळाच्या पडद्याआड गेला असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
#📝मराठवाडा अपडेट्स