फॉलो करा
ShareChatUser
@2628525989
2,181
पोस्ट
1,466
फॉलोअर्स
ShareChatUser
625 जणांनी पाहिले
चाकूर परिसरात वादळी वारा आणि जोरदार पावसाची हजेरी यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान ! चाकूरः-चाकूर परिसरात वादळी वारा आणि जोरदार पावसाने हजेरी लावली यामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली आहेत तसेच या अवकाळी पावसामुळे शहरातील तसेच ग्रामीण भागातील वीजही गुल झाली होती.रविवारी दिनांक २२ फेब्रुवारी रोजी ही संध्याकाळी उशिरा अकरा वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती.तसेच सोमवारी दिंनाक २३ फेब्रुवारीला शहरात आणि परिसरात सांयकाळी साडे चार-पाचच्या सुमारास झालेल्या पावसामुळे व प्रचंड वाऱ्यामुळे शेतातील रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तसेच वैरणीचेही नुकसान झाले आहे.या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील शेतातील ज्वारी,गहू ,हरभरा सह आंबा,द्राक्षे फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.कांही शेतकऱ्यांनी गव्हाचे पीक काढून ठेवले होते मात्र अवकाळी पावसामुळे गहू भिजला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.चाकूर शहरातील विठ्ठल डाके,पंडित मोरे सह इतर शेतकरी यांचे रब्बी हंगामातील पीक पावसामुळे खराब झाले आहे.तसेच डोंगरज ,शेळगाव शेत शिवारात ही वादळी पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.घरणी,गांजुर शेत शिवारातही अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली होती.घरणी येथील रब्बीची ज्वारी जमीनदोस्त झाली आहे तसेच शिरीष आणि आकाश शिंदे यांच्या सह इतर शेतकऱ्यांचे कापुन ठेवलेल्या गव्हाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.गांजुर गावात तसेच शेतशिवारात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडल्याने शेतातील रब्बी हंगामातील पिंकाचे मोठे नुकसान झाले आहे.एकंदरीत तालुक्यातील अनेक गावातील शेतशिवारात रब्बी हंगामातील पिके अवकाळी पावसामुळे बाधित झाली आहेत.या अवकाळी पावसामुळे शेतातील पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. #📝मराठवाडा अपडेट्स
ShareChatUser
680 जणांनी पाहिले
चाकुर नगरपंचायत सभापतीच्या निवडी जाहीर,सभापतीच्या निवडी बिनविरोध पाणीपुरवठा सभापती मौलाना मुजम्मील सय्यद यांची निवड चाकुर ता.प्रः-चाकुर नगरपंचायत विषय समिती सभापतीपदाची निवड प्रक्रीया पीठासन अधिकारी तथा तहसिलदार नरसिंग जाधव, नगरपंचायत मुख्याधिकारी प्रतिक लंबे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.बैठकीला नगराध्यक्ष करीम गुळवे उपस्थित होते.यामध्ये पाच सभापतीच्या निवडीसाठी चाकुर नगरपंचायत सभागृहात विषय समितीच्या निवडीसाठी चार जागासाठी प्रत्येकी एक अर्ज आल्यामुळे पाणी पुरवठा,महिला व बालकल्याण,स्वच्छता व आरोग्य,नियोजन व विकास या समितीच्या निवडी बिनविरोध जाहीर करण्यात आल्या.सभापती निवडीसाठी एकच अर्ज आल्यामुळे विषय समितीच्या सभापतीच्या निवडी जाहीर करण्यात आले.प्राप्त झालेल्या नामनिर्देशन पत्राची छाननी पिठासीन अधिकारी तथा तहसिलदार नरसिग जाधव यांनी करुन सर्व नामनिर्देशन पत्र छाननी अंती वैध असल्याचे सांगितले. यानंतर पिठासीन अधिकारी नरसिंग जाधव यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दुपारी १२.३० ते १२.४५ पर्यंत वेळ दिला. मुदतीमध्ये कोणत्याही उमेदवाराने उमेदवारी मागे घेतली नाही त्यामुळे आरोग्य व स्वच्छता समिती, पाणी पुरवठा समिती, नियोजन व विकास समिती आणि महिला व बालकल्याण समिती करिता प्रत्येकी एक अर्ज आल्याने सदस्यांची निवड बिनविरोध करण्यात आली. प्रत्येकी एकच वैध नामनिर्देशन पत्र शिल्लक राहिल्यामुळे त्या समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याचे पिठसिन अधिकारी व तहसिलदार नरसिंग जाधव यांनी जाहीर केले.सभापतीच्या निवडी बिनविरोध झाल्या. विषय समितीच्या सभापतीची निवड पिठासन अधिकारी तथा तहसिलदार नरसिंग जाधव यांनी घोषित केली. स्थायी समितीच्या सदस्य संख्या ६ आहे. नगर पंचायतीचे अध्यक्ष हे स्थायी समितीचे पदसिद्ध सभापती असल्याने व ५ विषय समितीचे सभापती हे स्थायी समितीचे सदस्य असल्याने स्थायी समितीचे एकूण सदस्य संख्या ६ होते. त्याप्रमाणे स्थायी समितीच्या सदस्याचे नावे खालील प्रमाणे असल्याचे सभागृहात जाहीर करण्यात आले.नियोजन व विकास समिती सभापतीचे हिप्पाळे साईप्रसाद शिवराज,सार्वजनिक बांधकाम समिती सभापती अभिमन्यु लक्ष्मणराव धोंडगे, स्वच्छता व आरोग्य सामिती सभापती सौ.पाटील गोदावरी राजकुमार ,पाणी पुरवठा समिती सभापती मौलाना मुज्जमिल मुस्तफा,महिला व बालकल्याण समिती सौ.कसबे शुभांगी रामेश्वर,उपसभापती सौ.गंगुबाई नरसिंग गोलावार यांची निवड झाली.सभापती पदाच्या निवडी जाहीर होताच फटाक्यांची अतिषबाजी करुन कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष करीम गुळवे,प्रथम नगराध्यक्ष नगराध्यक्ष मिलिंद महालिंगे, माजी उपनगराध्यक्ष विलासराव पाटील चाकुरकर,माजी पाणी पुरवठा सभापती नगरसेवक भागवत फुले,नगरसेवक नितीन रेड्डी,सौ.हिरकनबाई लाटे,सौ.सय्यद शबाना,सौ.कांबळे वैशाली,सौ.ज्योतीताई स्वामी, सौ.सुजाता रेड्डी,माजी नगरसेवक सय्यद इलियास,पपन कांबळे,सजंय पाटील,राम कसबे,सय्यद महंमद,निवडीच्या वेळी उपस्थित होते. *चौकट* *नगराध्यक्ष करीम गुळवे यांनी केला नुतन सभापतीचा सत्कार* *नगरपंचात चाकुरच्या विषय समितीच्या सभापतीच्या निवडी जाहीर झाल्यानंतर चाकुर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष करीम गुळवे यांनी सर्वच नुतन सभापतीचा शाल,हार,श्रीफळ,देऊन सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी प्रथम नगराध्यक्ष मिंलीद महालिंगे उपस्थित होते* #📝मराठवाडा अपडेट्स
ShareChatUser
701 जणांनी पाहिले
रेनबो नॅशनल स्कूल चे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे चाकूरः-दरवर्षीप्रमाणे रेनबो नॅशनल स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मुख्याध्यापक किशोर पाटील तसेच उद्घाटक म्हणून महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय सेवाभावी संस्था चाकूर चे अध्यक्ष व्यंकटराव झांबरे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा प्रबंधक महेश मोरे कलकोटीचे माजी सरपंच प्रभाकर जहागीरदार, ज्ञानेश्वर भोसले, गजेंद्र बेजगमवर, शाळेचे पर्यवेक्षक युवराज झांबरे, शाळेचे मुख्याध्यापक परमेश्वर झांबरे हे व्यासपीठावर होते. कार्यक्रमाची सुरुवात जोरदार श्री गणेशाच्या गीताने झाली.कार्यक्रमांमध्ये विविध पारंपरिक तसेच देशभक्तीपर गीतावर मुलांनी नृत्य सादर केली यामध्ये आरुष दाडगे, मनस्वी जाधव, श्रेया टमके , आराध्या डावरे, अदिती पवार, अंकित कातळे, नागवंश भालेराव, प्रज्वल किनीकर, अखिलेश शिंदे, व्यंकटेश पाटील, आरोही गायकवाड, सुमित डिगोळे, कपिल शेवाळे, शिवम ततापुरे, वेदांत जाधव आदी विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. तसेच प्रमुख पाहुण्यांनी शाळेचे एसओएफ परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे सत्कार केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सविता कांबळे, प्रतिक्षा पवार, अर्चना सावळे, सानिया दापकेवल्ले , मुक्ता सूर्यवंशी, तबसूम पठाण, जयश्री येत्तेवाड, इंदुमती वंगाले, वनिता ताकबीडवे यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक परमेश्वर झांबरे यांनी केले तर सूत्रसंचालनाची धुरा रोहिणी मोरे व पूजा माने यांनी सांभाळली कार्यक्रमाचे आभार राधा जगताप यांनी मांडले. #📝मराठवाडा अपडेट्स
ShareChatUser
687 जणांनी पाहिले
चापोली येथील संजीवनी महाविद्यालयास एसक्यूएएएफ मूल्यांकनात “अ+” दर्जा प्राप्त ---------- सर्वस्तरातून महाविद्यालयावर शुभेच्छांचा वर्षाव --------- चाकुरः- चापोली येथील संजीवनी महाविद्यालयास महाराष्ट्र शासनाच्या एसक्यूएएएफ अंतर्गत “अ+” दर्जा देण्यात आला. या यशाबद्धल महाविद्यालयावर सर्वस्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्राच्या शासनाच्या वतीने राज्यातील कनिष्ट महाविद्यालय व माध्यमिक शाळांची तपासणी करण्यासाठी ‘शाळा गुणवत्ता मुल्यांकन व आश्वासन आराखडा’ (एसक्यूएएएफ) राबवण्यात आला होता. या आराखड्यात शासनाकडून विविध निकष ठेवण्यात आले होते. संस्थेचे मा. सचिव तथा माजी बांधकाम व आरोग्य सभापती, महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित व दक्षिण अमेरिकेतील विद्यापीठाने डी.लिट. ही सन्मानाची पदवी देवून गौरवान्वीत केलेले स्व. डॉ. नारायणराव दौलतराव चाटे दादा यांनी उभारलेल्या संस्थेची आज यशस्वीपणे वाटचाल सुरु आहे. प्राचार्य डॉ. धनंजय नारायणराव चाटे व संस्था सचिव तथा चापोलीचे लोकनियुक्त सरपंच डॉ. भालचंद्र नारायणराव चाटे यांच्या काटेकोर नियोजनाने महाविद्यालयाने ही प्रगती साधलेली आहे. संजीवनी महाविद्यालयाने अभ्याक्रम नियोजनाची अंमलबजावणी कशी केली आहे व त्याचे उपयोजन कसे करण्यात आले आहे याचा विचार विद्यार्थी, संस्था, निकास व गुणवत्ता याआधारे केला जातो. त्याबरोबरच अध्ययन, अध्यापनाचेही मूल्यमापन एसक्यूएएएफ करण्यात आले. विद्यार्थी विकास होण्यासाठी वक्तृत्व स्पर्धा, क्रीडास्पर्धा सांकृतिक कार्यक्रम व शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन महाविद्यालयाकडून सातत्याने केले जाते. संजीवनी महाविद्यालयाची सुसज्ज इमारत उभारण्यात असून ग्रंथालय, क्रिडा विभाग, सुसज्ज प्रयोगशाळा अतिशय देखण्या स्वरूपात उभारण्यात आला आहे. पर्यावरणपूरक कार्यक्रम, जलसंवर्धन उपक्रम राबविल्याने महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांत जागृती निर्माण झाली आहे. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने परिसरातील गावे दत्तक घेण्यात येतात, त्या गावात जलसुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन,पशुसंवर्धन, महिला सबलीकरण, सांडपाणी व्यवस्थापन, आरोग्य शिबिरांचे आयोजन करून सर्वांगीण स्वरूपाची जनजागृती व सामाजिक प्रबोधन करण्याचे कार्य केले जाते. कोविड काळातही महाविद्यालयाने प्रबोधन व सहकार्य व्यापक स्वरूपात राबविले. सौर उर्जेचा वापर केल्यामुळे होणारी विजेची बचत व दुर्गम भागात विजेबाबत स्वावलंबी होण्याचा एक पर्यायी मार्ग म्हणून त्याची उपयुक्तता आहे. या प्रकल्पाची निर्मिती महाविद्यालयाने केली आहे. आज सर्वच ठिकाणी भेडसावणारी समस्या म्हणजे घनकचरा व्यवस्थापन होय, याबाबतीतही विशेष प्रकल्पाची उभारणी महाविद्यालयाने केली आहे. जलसुरक्षा व पाण्याचा वापर जपून करण्यासाठी पाणी आडवा पाणी जिरवा या तंत्राबरोबरच बोअर पुनर्भरण प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. महाविद्याल परिसरातील हवा शुद्ध व खेळती राहण्यासाठी ग्रीन अॉडिटची आवश्यकता असते याची उपयुक्तता सद्यस्थितीत अधिक असल्याने महाविद्यालयात वृक्षारोपण व वृक्षांचे संगोपन केले आहे. त्याबरोबर चापोली परिसरातील पालकांनाही संवाद साधण्यासाठी पालकमेळावा आयोजित केला जातो. संजीवनी महाविद्यालयास याअगोदर स्वामी रामानंद तीर्थ मराठावाडा विद्यापीठ नांदेड चा ग्रामीण भागातील 'उत्कृष्ट महाविद्यालय' हा पुरस्कार ही मिळालेला आहे. क्रीडा क्षेत्रात नावलौकिक – संजीवनी कनिष्ट महाविद्यालयाच्या संघांनी आजपर्यंत जिल्हा स्तरावर खो-खो सर्धेत २० वेळा प्रथम तर कबड्डी संघाने २२ वेळेस प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. विभागीय स्पर्धेत खो-खो स्पर्धेत दोन वेळा प्रथम तर १५ वेळेस द्वितीय क्रमांक पटकावला. तर कबड्डी स्पर्धेत १८ वेळेस प्रथम क्रमांक पटकावला. राज्य स्तरीय कबड्डी स्पर्धेत २ वेळेस द्बितीय क्रमांक तर 5 वेळेस तृतीय क्रमांक मिळवला. भालाफेक स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच कुस्ती स्पर्धेत दोन मल्ल राज्यात प्रथम आलेले आहेत. तसेच राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम क्रमांक ही मिळवत संजीवनी महाविद्यालयाचे नाव देशपातळीवर झळकले आहे. महाविद्यालयाच्या एसक्यूएएएफ मूल्यांकनासाठी प्राचार्य डॉ. धनंजय नारायणराव चाटे व संस्था सचिव तथा चापोलीचे लोकनियुक्त सरपंच डॉ. भालचंद्र नारायणराव चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य रमेश गुट्टे, प्रा. महेंद्र वळसंगीकर, प्रा. विजयकुमार गुळवे, प्रा. एन.डी. नलवाड, प्रा. डॉ. फुलचंद चाटे, प्रा. माधव कागणे, प्रा. केंद्रे बी. बी. प्रा. अमोल केंद्रे, प्रा. नितीन आवस्कर, प्रा. राचमाळे, प्रा. विजकुमार चव्हाण, प्रा. डोंगरे एस.एन., प्रा. मनोज मुंढे, प्रा. एन.एन. निलापल्ले, प्रा. गोविंद फड, प्रा. आर.एम. कराड, प्रा. जी.टी. मदने, प्रा. सौ. श्रीमंगले एस. एस., प्रा. सौ. एस.जे. कांबळे, प्रा. सौ. एस.बी. बनसोडे, प्रा.सौ. आर.एन. जुल्फे, प्रा. वामनराव कराड, प्रा. ए.के. केंद्रे, प्रा. पी.बी. डीगोळे, प्रा. बी.एस. घुले, प्रा. आर.डी. मोरे, प्रा. याह्या खान, प्रा. सौ जे. मद्दे सह महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. महाविद्यालयाच्या या यशाबद्धल सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. #📝मराठवाडा अपडेट्स
ShareChatUser
683 जणांनी पाहिले
*स्वागत करूया रमजानचे* चाकुरः-एखाद्याचे आगमन हे सहसहा आनंददायी असते आणि त्याच्या स्वागताची तयारीही मोठ्या प्रमाणावर केली जाते. आता कोण येणार आणि त्याची तयारी कशी करणार हा वेगळा विषय आहे. सध्या आपण रमजानबद्दल बोलत आहोत आणि त्याचे आगमन केवळ मुस्लिमांसाठीच नाही तर मुस्लिम समाजाव्यतिरिक्त जगातील प्रत्येकासाठी एक अतिशय चांगली आणि धन्य करणारी बातमी आहे! अरबी कॅलेंडर प्रमाणे बारा महिन्यांच्या यादीत रमजान हा नववा महिना. रमजान महिना म्हणजे कुराण, धर्मपरायणता, संयम, करुणा, दया, प्रेम आणि आपुलकी, परोपकार, मानवजातीची सेवा, अल्लाहच्या मार्गात स्थिरता, एकात्मता आणि एकतेच्या भावनेच्या प्रकटीकरणाचा महिना. अल्लाह आणि त्याच्या प्रेषितांचा, अंतहीन गुणगान गाण्याचा महिना. या महिन्याची बरकत प्राप्त करण्यासाठी, काही गुणांची आवश्यकता असते. ते गुण विकसित करण्यासाठी आपणा स्वतःला तयार व्हावे लागेल. आपल्याला माहित आहे की रमजानमध्ये कुरआनचे अवतरण झाले, रोजे अनिवार्य झाले, बदरची लढाई झाली, कदरची रात्र साजरी झाली, मक्का जिंकला गेला, त्यामुळे या महिन्याला विशेष महत्त्व दिले जाते. मग या महिन्यात जकात, इनफाक आणि सदखा यांचे मोठ्या प्रमाणावर दान केले जाते. रमजान महिन्यात उपासनेची पातळी मोठ्या प्रमाणात वाढलेली असते. या महिन्याचे आपण योग्य सन्मानाने स्वागत करणे महत्त्वाचे आहे. रमजानच्या आगमनापूर्वी, त्यासाठी आपण आंतरिक आणि बाह्यस्व तयार होऊया. रमजान कुरआनच्या अवतरणाचा महिना आहे. त्यामुळे या महिन्यात जास्तीत जास्त कुरआनचे पठण करण्याचे नियोजन करावे. केवळ अरबी भाषेत कुरआनचे पठण न करता त्याचा आपल्या मात्रभाषेतील अनुवाद वाचावा, तो समजून घ्यावा, तो आचरणात आणावा व इतरांनाही तो समजून सांगावा. दृढ निश्चय करावे की, खोटे बोलणार नाही, भांडण करणार नाही, कोणाला त्रास देणार नाही, शिवीगाळ करणार नाही. कोणी भांडायला आला, शिवीगाळ करू लागला तर उत्तरादाखल एवढेच म्हणावे 'बाबारे! माझा रोजा आहे!' कोणाशी हुज्जत घालू नये. शेजाऱ्यांची काळजी घ्यावी. त्यांचे मन दुखवू नये. शेजाऱ्यांना त्रास देऊ नये. इफ्तारच्या वेळी त्यांना विसरू नये. रात्री तरावीहच्या नमाज नंतर विनाकारण बाहेर फिरू नये. रात्री उशिरापर्यंत जागरण केल्याने पहाटे सहरीला जागे होणे कठीण जाते. रात्री वेळेवर झोपण्याचे व पहाटे लवकर जागे होण्याचे नियोजन करावे. त्यामुळे तहाज्जुदची नमाज पठण करणे सुलभ होईल. हा बरकत देणारा महिना आहे. या महिन्यात उपजीविका वाढविली जाते. चला तर मग, रमजानचे स्वागत करण्यासाठी आपण सारे सज्ज होऊ या! हाफीज मौलाना अब्दुल मतीन गुळवे चाकुर 9049907291 #📝मराठवाडा अपडेट्स
ShareChatUser
758 जणांनी पाहिले
चाकुरच्या यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळेत रंगला कलाविष्कार सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या बहारदार नृत्यांने प्रेक्षक व पालकांची मने जिकंली चाकुरः-शैक्षणिक गुणवत्तेसह विविध क्षेत्रात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी अविरत अग्रेसर असणारी यशवंतराव चव्हाण प्राथमिक चाकुर या प्रशाळेत प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून १७ फेब्रुवारी रोजी कलाविष्कार या सांस्कृतिक कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. सदर सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या अंगीकृत असलेल्या विविध कलागुणांतून एकापेक्षा एक सरस व बहारदार नृत्यांचे सादरीकरण करुन प्रेक्षक, पालक व उपस्थितांची मने जिंकली.. या नेत्रदिपक सांस्कृतिक कार्यक्रमाने चाकुरकर मंत्रमुग्ध झाले असून कार्यक्रमास पालक व प्रेक्षकांचा उंदड प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांचे जबरदस्त नृत्य पाहुन प्रेक्षक भारावून चिमुकल्यांचे जोरदार टाळ्यांच्या गजरात कौतुक करत होते. तर प्रेक्षकांनी चिमुकल्यावर बक्षीस देऊन प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे उद्घाटक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा चाकुर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष करीम गुळवे यांच्या शुभ हस्ते पार पडले. प्रमुख पाहुणे संस्थेचे सचिव शेख साहेबअली,डॉ.एन.जी.मिर्झा,अजमआली सय्यद,बाबा गुळवे,जाकीर गुळवे,आखिल गुळवे,सह आदि उपस्थित होते.कार्यक्रमांचे शिवाजी पवार यांनी केले. शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणी,स्वच्छता,लाईटची सोय करावी व शाळेतील शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात येत आहे. पालकांनी आपल्या पाल्याच्या सर्वांगिण प्रगती कडे लक्ष द्यावे .नगराध्यक्ष करीम गुळवे म्हणाले शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांना दरवर्षी गणवेश वाटप केला जातो.विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्यापक शेख एम.बी, शिक्षक शेख टी.व्हि,शेख के, बी,कानडे एस.सी,शेटे जी.वी,पवार एस.एम,पठाण जे.एम,केंद्रे पि,यु,शेख आय.एम,शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.सांस्कृतिक विभाग प्रमुख ताहेर शेख यांनी विद्यार्थ्यांकडून तयारी करुन घेतली. सुञसंचलन काशीम शेख यांनी केले.तर आभार जावेद पठाण यांनी मानले. *चौकट* *विद्यार्थ्यांनी सादर केले नृत्याविष्कार* *सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश वंदना गिताने करण्यात आली. त्यानंतर विद्याथ्र्यांनी रंगीलो मारो ढोल, शेतकरी गीत, सामी-सामी, लावणीसह जलवा हे देशभक्तीपर गित, नारीशक्ती, शिवाजी महाराज, मल्हार मल्हार, देवीचा गोंधळ, गवळण, चंद्रा लावणी,कोळीगीत, फनी साँग, जन्म बाईचा, झुमकावाली अशा एकाहून एक सरस देशभक्तीपर गिते, लावणी, हिंदी व मराठी गीतांवर विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य सादर करीत उपस्थित नागरिक व पालकांची मने जिंकली. कार्यक्रमाचा समारोप 'वंदे मातरम्' गीताने करण्यात आला* *चौकट* *विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती कडे वैयक्तिक लक्ष-करीम गुळवे नगराध्यक्ष न.पं.चाकुर* *गोर-गरीब मध्यम वर्गीय विद्यार्थी शिक्षण घेत असल्यामुळे विद्यार्थीच्या अध्ययन करण्यावर शाळेतील शिक्षकांकडे लक्ष देऊन राहतात.* *गुणवत्ता वाढीसाठी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षेत सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.शाळेत विविध सामाजिक उपक्रम घेण्यास सुरुवात केली.विविध महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी साजरी केली.विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तैयारी करण्यासाठी शिक्षकांच्या माध्यमातून अतरिक्त क्लास घेण्यात येतात.घरोघरी शिक्षक विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावे म्हणून शाळेत दर वर्षी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.शाळेच्या गुणवत्ता वाढी सोबतच स्पर्धा परीक्षा,सांस्कृतिक कार्यक्रम,असे माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वागिण विकास करण्यावर लक्ष दिले आहे.येणाऱ्या काळात विविध कार्यक्रम आयोजित करण्यांचा मनोदय नगराध्यक्ष करीम गुळवे यांनी व्यक्त केला* #📝मराठवाडा अपडेट्स
ShareChatUser
663 जणांनी पाहिले
चाकूरमध्ये पंचायत समिती लिपिकांचे असहकार आंदोलनाचा प्रारंभ,२१ कर्मचारी आंदोलनात सहभागी; २३ फेब्रुवारीपासून बेमुदत कामबंदचा इशारा! चाकूरः-महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतील लिपिक संवर्गाच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी चाकूर येथील पंचायत समिती लिपिकांनी आजपासून असहकार आंदोलनास सुरुवात केली आहे. चाकूर तालुक्यातील एकूण २१ लिपिक कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. लिपिक संवर्ग हा प्रशासनाचा कणा मानला जातो. चौथ्या वेतन आयोगापासून वेतनश्रेणीत असलेली तफावत दूर करून सुधारीत वेतनश्रेणी लागू करावी, पदोन्नती स्तर कमी करून पदनामात बदल करावा, जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करावी, तसेच १ नोव्हेंबर २००५ पूर्वी अनुकंपा नियुक्तीसाठी प्रतीक्षायादीत असलेल्या सर्वांना न्याय द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात दि. १६ ते १७ फेब्रुवारी २०२६ कार्यालयात उपस्थित राहून स्वाक्षरी करणे व काळी फीत लावून निषेध नोंदवणे, १८ फेब्रुवारी २०२६ कार्यालयात उपस्थिती लावून कार्यालयासमोर शांततापूर्ण मार्गाने घोषणाबाजी करणे, २० फेब्रुवारी २०२६ शासनाला दिलेल्या निवेदनाचा पाठपुरावा करणे, दि. २३ फेब्रुवारी २०२६ पासून मागण्यांची दखल न घेतल्यास बेमुदत संपूर्ण कामबंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. लिपिक बांधवांनी हे आंदोलन सनदशीर मार्गाने करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले असून, शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या असहकार आंदोलनात मुख्य मार्गदर्शक माधवराव वागलगावे,व्यंकटराव घोडके,अध्यक्ष संग्राम भुरे,उपाध्यक्ष संतोष मुदमे,सचिव अतुल गायकवाड,सहसचिव सदाशिव भिसे,गिरीधर तिकटे, मंगेश बिराजदार,राजेंद्र नरवाडे,भागवत गडदे,अमोल कराड,ए.एच.कल्याणे,ए.एस.भणगे आदी कर्मचारी सहभागी होते. #📝मराठवाडा अपडेट्स
ShareChatUser
659 जणांनी पाहिले
जगत् जागृती विद्यामंदिर चाकूर येथे ... *वार्षिक बक्षीस वितरण आणि इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न* चाकूर:-जगत् जागृती शिक्षण प्रसारक मंडळ चाकूर द्वारा संचलित जगत् जागृती विद्यामंदिर चाकूर येथे वार्षिक बक्षीस वितरण समारंभ आणि इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष अर्जुन मद्रेवार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे कोषाध्यक्ष धोंडीराम तोंडारे संस्थेचे सन्माननीय संचालक विठ्ठलराव सोनटक्के शिवप्रसाद शेटे, विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय नारागुडे, पर्यवेक्षक प्रदीप ऊस्तुर्गे हे उपस्थित होते. या बक्षीस वितरण समारंभामध्ये परीक्षा विभागाच्या वतीने प्रत्येक इयत्तेतील प्रथम व द्वितीय विद्यार्थ्यांना बक्षीस वितरित करण्यात आले. त्याचप्रमाणे क्रीडा विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.याप्रसंगी स्काऊट गाईडच्या राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. गुरुतेग बहादुर सिंग साहेब जी यांच्या 350 व्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक प्राप्त केल्याबद्दल सिंधीकुमटे सायली या विद्यार्थिनीचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.एनसीसी विभागाच्या वतीने बेस्ट सी.एच. एम. म्हणून बन आर्यन गोविंद यास पारितोषिक प्रदान करण्यात आले. विद्यालयातील आदर्श विद्यार्थिनी म्हणून मधुरा बिडवे हिचा रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. शंभर टक्के उपस्थिती असलेल्या इयत्ता सहावी क या वर्गाचा अर्जुन मद्रेवार यांच्यावतीने भागवत मद्रेवार यांच्या स्मरणार्थ 1000 रुपये रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला. आणि विद्यालयातील इयत्ता नववी ब वर्गाचा आदर्श वर्ग म्हणून वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित गौरव करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संजय नारागुडे यांनी केले. तर विद्यार्थ्यांमधून सुमित सूर्यवंशी , अबुजर शेख, जाधव प्रतीक ,गौरवी शेटे, कार्तिकी नरवटे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजकुमार कदम यांनी केले तर आभार बिपिन जिरगे आणि शंकर कदम यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी भोजनाची व्यवस्था केली होती. सहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. #📝मराठवाडा अपडेट्स
See other profiles for amazing content