ShareChatUser
683 views
चापोली येथील संजीवनी महाविद्यालयास एसक्यूएएएफ मूल्यांकनात “अ+” दर्जा प्राप्त
----------
सर्वस्तरातून महाविद्यालयावर शुभेच्छांचा वर्षाव
---------
चाकुरः- चापोली येथील संजीवनी महाविद्यालयास महाराष्ट्र शासनाच्या एसक्यूएएएफ अंतर्गत “अ+” दर्जा देण्यात आला. या यशाबद्धल महाविद्यालयावर सर्वस्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
महाराष्ट्राच्या शासनाच्या वतीने राज्यातील कनिष्ट महाविद्यालय व माध्यमिक शाळांची तपासणी करण्यासाठी ‘शाळा गुणवत्ता मुल्यांकन व आश्वासन आराखडा’ (एसक्यूएएएफ) राबवण्यात आला होता. या आराखड्यात शासनाकडून विविध निकष ठेवण्यात आले होते. संस्थेचे मा. सचिव तथा माजी बांधकाम व आरोग्य सभापती, महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित व दक्षिण अमेरिकेतील विद्यापीठाने डी.लिट. ही सन्मानाची पदवी देवून गौरवान्वीत केलेले स्व. डॉ. नारायणराव दौलतराव चाटे दादा यांनी उभारलेल्या संस्थेची आज यशस्वीपणे वाटचाल सुरु आहे. प्राचार्य डॉ. धनंजय नारायणराव चाटे व संस्था सचिव तथा चापोलीचे लोकनियुक्त सरपंच डॉ. भालचंद्र नारायणराव चाटे यांच्या काटेकोर नियोजनाने महाविद्यालयाने ही प्रगती साधलेली आहे.
संजीवनी महाविद्यालयाने अभ्याक्रम नियोजनाची अंमलबजावणी कशी केली आहे व त्याचे उपयोजन कसे करण्यात आले आहे याचा विचार विद्यार्थी, संस्था, निकास व गुणवत्ता याआधारे केला जातो. त्याबरोबरच अध्ययन, अध्यापनाचेही मूल्यमापन एसक्यूएएएफ करण्यात आले. विद्यार्थी विकास होण्यासाठी वक्तृत्व स्पर्धा, क्रीडास्पर्धा सांकृतिक कार्यक्रम व शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन महाविद्यालयाकडून सातत्याने केले जाते.
संजीवनी महाविद्यालयाची सुसज्ज इमारत उभारण्यात असून ग्रंथालय, क्रिडा विभाग, सुसज्ज प्रयोगशाळा अतिशय देखण्या स्वरूपात उभारण्यात आला आहे. पर्यावरणपूरक कार्यक्रम, जलसंवर्धन उपक्रम राबविल्याने महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांत जागृती निर्माण झाली आहे. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने परिसरातील गावे दत्तक घेण्यात येतात, त्या गावात जलसुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन,पशुसंवर्धन, महिला सबलीकरण, सांडपाणी व्यवस्थापन, आरोग्य शिबिरांचे आयोजन करून सर्वांगीण स्वरूपाची जनजागृती व सामाजिक प्रबोधन करण्याचे कार्य केले जाते. कोविड काळातही महाविद्यालयाने प्रबोधन व सहकार्य व्यापक स्वरूपात राबविले.
सौर उर्जेचा वापर केल्यामुळे होणारी विजेची बचत व दुर्गम भागात विजेबाबत स्वावलंबी होण्याचा एक पर्यायी मार्ग म्हणून त्याची उपयुक्तता आहे. या प्रकल्पाची निर्मिती महाविद्यालयाने केली आहे. आज सर्वच ठिकाणी भेडसावणारी समस्या म्हणजे घनकचरा व्यवस्थापन होय, याबाबतीतही विशेष प्रकल्पाची उभारणी महाविद्यालयाने केली आहे.
जलसुरक्षा व पाण्याचा वापर जपून करण्यासाठी पाणी आडवा पाणी जिरवा या तंत्राबरोबरच बोअर पुनर्भरण प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. महाविद्याल परिसरातील हवा शुद्ध व खेळती राहण्यासाठी ग्रीन अॉडिटची आवश्यकता असते याची उपयुक्तता सद्यस्थितीत अधिक असल्याने महाविद्यालयात वृक्षारोपण व वृक्षांचे संगोपन केले आहे. त्याबरोबर चापोली परिसरातील पालकांनाही संवाद साधण्यासाठी पालकमेळावा आयोजित केला जातो. संजीवनी महाविद्यालयास याअगोदर स्वामी रामानंद तीर्थ मराठावाडा विद्यापीठ नांदेड चा ग्रामीण भागातील 'उत्कृष्ट महाविद्यालय' हा पुरस्कार ही मिळालेला आहे.
क्रीडा क्षेत्रात नावलौकिक –
संजीवनी कनिष्ट महाविद्यालयाच्या संघांनी आजपर्यंत जिल्हा स्तरावर खो-खो सर्धेत २० वेळा प्रथम तर कबड्डी संघाने २२ वेळेस प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. विभागीय स्पर्धेत खो-खो स्पर्धेत दोन वेळा प्रथम तर १५ वेळेस द्वितीय क्रमांक पटकावला. तर कबड्डी स्पर्धेत १८ वेळेस प्रथम क्रमांक पटकावला. राज्य स्तरीय कबड्डी स्पर्धेत २ वेळेस द्बितीय क्रमांक तर 5 वेळेस तृतीय क्रमांक मिळवला. भालाफेक स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच कुस्ती स्पर्धेत दोन मल्ल राज्यात प्रथम आलेले आहेत. तसेच राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम क्रमांक ही मिळवत संजीवनी महाविद्यालयाचे नाव देशपातळीवर झळकले आहे.
महाविद्यालयाच्या एसक्यूएएएफ मूल्यांकनासाठी प्राचार्य डॉ. धनंजय नारायणराव चाटे व संस्था सचिव तथा चापोलीचे लोकनियुक्त सरपंच डॉ. भालचंद्र नारायणराव चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य रमेश गुट्टे, प्रा. महेंद्र वळसंगीकर, प्रा. विजयकुमार गुळवे, प्रा. एन.डी. नलवाड, प्रा. डॉ. फुलचंद चाटे, प्रा. माधव कागणे, प्रा. केंद्रे बी. बी. प्रा. अमोल केंद्रे, प्रा. नितीन आवस्कर, प्रा. राचमाळे, प्रा. विजकुमार चव्हाण, प्रा. डोंगरे एस.एन., प्रा. मनोज मुंढे, प्रा. एन.एन. निलापल्ले, प्रा. गोविंद फड, प्रा. आर.एम. कराड, प्रा. जी.टी. मदने, प्रा. सौ. श्रीमंगले एस. एस., प्रा. सौ. एस.जे. कांबळे, प्रा. सौ. एस.बी. बनसोडे, प्रा.सौ. आर.एन. जुल्फे, प्रा. वामनराव कराड, प्रा. ए.के. केंद्रे, प्रा. पी.बी. डीगोळे, प्रा. बी.एस. घुले, प्रा. आर.डी. मोरे, प्रा. याह्या खान, प्रा. सौ जे. मद्दे सह महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. महाविद्यालयाच्या या यशाबद्धल सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. #📝मराठवाडा अपडेट्स
16 likes
12 shares