⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳
📜 १३ नोव्हेंबर इ.स.१६६७
(मार्गशीर्ष शुद्ध अष्टमी, शके १५८१, संवत्सर प्लवंग, वार बुधवार)
महाराजांचा डिचोलीस मुक्काम!
बारदेशचा सोक्षमोक्ष लावायचाच हा एकमेव विचार करून महाराज डिचोली येथे मुक्कामास राहीले. कारण पोर्तुगीज रामाजी शेणवी कोठारी हा वकील तहाची याचिका घेऊन येणार असल्याचा महाराजांना निरोप आला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १३ नोव्हेंबर इ.स.१६६८
(कार्तिक वद्य पंचमी शके १५९० संवत्सर किलक वार शुक्रवार)
गोव्यात श्रीसप्तकोटीश्वराचे देवालय बांधण्यास शुभारंभ.
महाराज वेंगुर्ल्यावरून भतग्राम महालातील नारवे या गावी गेले. नारवे येथील श्रीसप्तकोटीश्वराचे देवालय प्राचीन काळापासून विख्यात होते. कोकणच्या ६ प्रमुख दैवतांमध्ये श्रीसप्तकोटीश्वराची गणना होत होती. पंचगंगेच्या तीरावरील श्रीसप्तकोटीश्वर कदंब राजाचे कुळदैवत होते. यावनी काळात या शिवमंदिराची दुर्दशा झाली त्यावेळी, विजयनगरच्या बुक्करायाने त्याचा जीर्णोद्धार केला होता. त्यानंतर पोर्तुगीज अंमलात पुन्हा हे मंदीर ऊद्धवस्त करण्यात आले. श्रीसप्तकोटीश्वराचे शिवलिंग पोर्तुगिजांनी एका विहिरीच्या काठाला बसविलेले होते. त्यावर पाय ठेवून क्रिस्ती लोक पाणी ओढीत! पुढे भतग्रामच्या देसायाने ते गुप्तपणे काढून नेले व नारवे येथे त्याची स्थापना केली. महाराज श्रीसप्तकोटीश्वराच्या दर्शनार्थ गेले आणि या देवालयाचा जीर्णोद्धार करण्याची आंतरिक प्रेरणा त्यांना झाली. लगेच त्यांनी देवालयाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले. *श्रीसप्तकोटीश्वराच्या महाद्वारावर यावेळी खोदलेला शिलालेख अजुनही कायम आहे तो असा:- "श्रीसप्तकोटीश्वर शके १५९०, किलकाब्दे कार्तिक क्रृष्ण पंचम्या सोमे श्रीशिवराज्ञा देवालयस्य प्रारंभ:" यावरून शके १५९०, च्या (कार्तिक वद्य पंचमीला म्हणजे शुक्रवार)*
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १३ नोव्हेंबर इ.स.१६७३
मुंबईकर सूरतकरांना १३ नोव्हेंबर १६७३ ला लिहितात:
"सिद्दीने तक्रारी केल्या असताना सुभेदाराचे आमच्याबद्दल इतके मन आहे हे वाचून आनंद झाला.
आता बंदरांत असलेल्या बादशहाच्या दोन गलबतांना आम्ही चांगले वागविले हे पाहून बादशाहाविषयी आमचे मनांत पूज्यबुध्दी आहे हे त्याला दिसून येईल ... फ्रेचांनी जर इतक्या तोफा आणि इतके शिसें ( गोळे ) राजापूरला पाठविले असतील, तर छत्रपती शिवाजी महाराजांना सिद्दाविरुध्द चांगले आरमार सज्ज करणस बरे पडेल. कारण त्याने आमच्याकडे मागणी केली परंतु आमच्याजवळ पुष्कळ तोफा असूनही आम्ही तुमच्या सूरतेतील हितसंबंधाकडे लक्ष देऊन तोफा दिल्या नाहीत."
सूरतकरांनी १३ नोव्हेंबर १६७४ ला उत्तर लिहिले जे:'
"शिवाजीच्या तोफांच्या मागणीबद्दल कळविण्यांत आले. त्यावर आमचे मत असे आहे की, अशा कृत्याने बादशहाला घुस्सा येईल. फ्रेंचानी नुकताच त्यास दारुगोळा पुरविल्याबद्दल दरबाराकडे तक्रारी गेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना बेटावरुन अन्नसामुग्री मिळते याचाच त्यांना संताप येतो. मग त्याला युध्दसामुग्री पुरविली तर त्यांना वैषम्य वाटणारच. बरे मुंबईच्या रक्षणाच्या दृष्टीने मोठ्या तोफा फक्त १३ च आहेत. त्या व पितळी तोफाही तेथे आवश्यक आहेत... छत्रपती शिवाजी महाराजांना आपण धान्य पुरवितो अशी बहादुरखानाने व इतर अधिकाऱ्यांनी तक्रार केली आहे....पितळी तोफांचा समुद्रावर चांगला मारा होतो. त्यांना खर्च मोठा लागत असला तथापि छत्रपती शिवाजी महाराज किंवा दुसरा कोणी त्यांचा मालक होणे आम्हांला लाज आणणारे आहे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १३ नोव्हेंबर इ.स.१६८१
पालीजवळ छत्रपती शंभुराजे व अकबराची भेट!
छत्रपती संभाजी महाराज किल्ले पन्हाळ्याहून किल्ले रायगडास सप्टेंबरच्या अखेरीस आले. २ आॅक्टोबरपासून नवरात्र होते. १२, आॅक्टोबरला दसरा-विजयादशमी होती. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज अकबराची भेट घेण्यास मोकळे झाले. नंतर "कार्तिक शुध्द १३ वार रविवार, म्हणजेच १३ नोव्हेंबर इ.स.१६८१ पातशहापुरी (पाली जवळ) छत्रपती संभाजी महाराज व अकबराची भेटी जाहली. अगदी सेनासमुदायाने लष्कर व हशमदेखील समागमे होते. अकबरासमागमे दुर्गादास होता. बहुत सन्मान केला". पाली जवळ छत्रपती संभाजी महाराज व अकबराची भेट झाली
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १३ नोव्हेंबर इ.स.१६९९
राजाराम महाराजांसोबत मराठे सुरतेच्या रोखाने जात असल्याची खबर मोगल सरदारास भेटताच बेदरबख्त, चिन किलीज खान, झुल्फिकारखान, नस्त्रतजंग हे त्यांच्या पाठलागावर दौडत आले व परिंदयाजवळ बेदरबख्ताने यास गाठले. थोडी चकमक होऊन मराठे अहमदनगरच्या दिशेने वळाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १३ नोव्हेंबर इ.स.१७८०
महाराजा रणजितसिंग यांचा जन्म
ज्यावेळी सारा भारत मुघल फौजांनी आपल्या टाचेखाली चिरडला होता त्यावेळी त्यांचा मुकाबला करून स्वत:चं स्वतंत्र अस्तित्व दाखवण्याची हिम्मत भारतात ज्या हिम्मतवान राजांनी केली त्यात अग्रेसर होते आपल्या महाराष्ट्राचे राजे शिवछत्रपती ज्यांच्या मराठा साम्राज्याची दहशत दिल्लीत औरंगझेबाने देखील घेतलेली होती आणि दुसरे होते पंजाब प्रांतातील शीख साम्राज्याचे संस्थापक महाराजा रणजीतसिंग.
महाराजा रणजितसिंग यांचे नाव आज इतिहासात राजा शिवछत्रपतीं इतकेच आदराने घेतले जाते. तरीही त्यांच्या जीवनचरित्राबद्दल किंवा त्यांनी केलेल्या कार्याबद्दल पंजाबएतर लोकांना फारशी माहीत नाही.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
#🙂Positive Thought #🚩शिवराय #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू