Follow
Dr Rutuja (Hemangi) @Youth India Hroup
@315794121
1,092
Posts
3,117
Followers
Dr Rutuja (Hemangi) @Youth India Hroup
583 views
ठाणे पुर्व चेंदणी कोळीवाडा येथे फास्ट फूड सेंटर किंवा इतर खाद्य व्यवसायासाठी रस्त्यालगतची जागा भाडयाने द्यायची आहे.... या जागेवर चायनीज हाॅटेलचा धंदा मजबूत नफ्यात जोरदार चालू होता... कोणाला फुड सेंटर - स्टाॅल चालू करायचे असेल तर संपर्क करा-😊👍 whatsApp 9821215879 #🙂Positive Thought
Dr Rutuja (Hemangi) @Youth India Hroup
1.3K views
*आजचे ऐतिहासिक शिवकालीन दिनविशेष.* **************************** 📜 १६ नोव्हेंबर इ.स.१६७७ (मार्गशीर्ष शुद्ध द्वितीया शके १५९९ संवत्सर पिंगळ वार शुक्रवार) व्यंकोजीराजे यांच्या फौजेबरोबर मराठ्यांची चकमक! किल्ले जिंजीचा सुभा संताजी भोसले व हंबीरराव मोहीते यांच्यासह रघुनाथपंतांच्या ताब्यात देऊन महाराज ४००० घोडेस्वारांसह ते ऑक्टोबर इ.स.१६७७ च्या शेवटी जिंजीहून निघाले. त्यांच्या सोबत आनंदराव व मानाजी मोरे हेही होते. आपला मुलुख महाराजांनी‌ बळकावल्यामुळे व्यंकोजीराजे चिडून जाणे स्वाभाविक होते. त्यांनी मदुरेचा नायक व अन्य पाळेगार यांच्याशी संगनमत करून महाराजांची पाठ फिरताच आपला मुलुख परत मिळविण्याचे ठरविले.त्याप्रमाणे महाराज‌ निघून जाताच ४००० स्वार व १०००० पायदळ जमवून त्यांनी युद्धाची तयारी चालविली. यावेळी हंबीरराव मोहीते व संताजी भोसले ६००० स्वार व ६००० पायदळासह वालगुंडपुरास होते. व्यंकोजीराजे यांचे सैन्य त्यांच्या वर चालून आले. दोन्ही सैन्य समोरासमोर आली तरी लढाईस तोंड लागेना. कारण कित्येक दिवस व्यंकोजीराजे यांच्या सैन्याच्या तळावरून गिधाडांचा कळप रोज जात असे. या अपशकुनाला भिऊन व्यंकोजीराजे युद्ध टाळीत होते. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १६ नोव्हेंबर इ.स‌.१६७९ ऑगस्ट १६७९ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पावसाळ्याचा फायदा घेऊन इंग्रज व सिद्दीच्या समुद्री हालचालींना पायबंद घालण्यासाठी मुंबईजवळील खांदेरी बेट ताब्यात घेऊन त्यावर बांधकाम सुरू केले.या कामी इंग्रजानी विरोध करत खांदेरीची नाकेबंदी केली. याचबरोबर आपल्या भांडणाचा फायदा घेऊन सिद्दीने हे बेट ताब्यात घेऊ नये ही काळजीही ते घेत होते. पण नोव्हेंबर महिन्यात सिद्दी २ मोठ्या नौका ३ डोलकाठयांची ५ फ्रिगेट्स २ गुराब आणि २५ गलबतांचे आरमार घेऊन मुंबईजवळ दाखल झाला.आपल्या बरोबर त्याने लगेच खांदेरीची बातमी मिळवली की खांदेरीवर ३०० सैनिक २०० कामकरी व फक्त १२ तोफा आहेत. सिद्दीचा मुख्य हेतू खांदेरीवर हल्ला करून ते ताब्यात घेणे व त्याच्या साहाय्याने शिवाजी महाराजांच्या मुलखात लुटालूट करणे हा असल्याने त्याने गलबतामधून खांदेरीवर तोफांचा मारा सुरू केला. खांदेरीवरील मराठ्यांनीही त्याला चोख प्रत्युत्तर दिले. त्याचबरोबर सिद्दीने खांदेरीवर हल्ला करण्यासाठी इंग्रजांशीही बोलणे लावले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 १६ नोव्हेंबर इ.स.१७१३ कान्होजी आंग्रे आणि शाहू राजे (पहिले) यांच्यामध्ये १६ नोव्हेंबर १७१३ रोजी तह झाला. सातारकर छत्रपतींची कोकणची जहागीर मोगलांपासून सुरक्षित राखण्याची जबाबदारी छत्रपती पहिले राजाराम यांनी सिधोजी घोरपडे यांचेवर सोपविली होती, परंतु हे जोखमीचे काम घोरपडे पार पाडू शकले नाही आणि पुढे ही जवाबदारी कान्होजींवर आली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १६ नोव्हेंबर इ.स.१८५२ महात्मा फुले यांनी अस्पृश्यांनाही शाळेत प्रवेश देण्यास सुरुवात केले हे लक्षात येताच लहुजींनी महार,मातंग वस्तीमध्ये जाऊन तेथील मुलांना फुलेंच्या शाळेत पाठविण्यासही प्रयत्न सुरु केले. अस्पृश्य समाजासाठी शैक्षणिक कार्य केल्याबद्दल शिक्षण खात्याने १६ नोव्हेंबर १८५२ रोजी फुलेंचा सत्कार केला, त्या समारंभास लहूजी वस्ताद जातीने हजर होते. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १६ नोव्हेंबर इ.स.१९१५ गदर पार्टीचे सदस्य आणि लाहोर कटातील क्रांतिकारक विष्णू गणेश पिंगळे यांच्यासह ७ जणांना फाशी देण्यात आले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 || हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.|| #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜 #🚩शिवराय #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🙂Positive Thought
Dr Rutuja (Hemangi) @Youth India Hroup
952 views
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 📜 १३ नोव्हेंबर इ.स.१६६७ (मार्गशीर्ष शुद्ध अष्टमी, शके १५८१, संवत्सर प्लवंग, वार बुधवार) महाराजांचा डिचोलीस मुक्काम! बारदेशचा सोक्षमोक्ष लावायचाच हा एकमेव विचार करून महाराज डिचोली येथे मुक्कामास राहीले. कारण पोर्तुगीज रामाजी शेणवी कोठारी हा वकील तहाची याचिका घेऊन येणार असल्याचा महाराजांना निरोप आला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १३ नोव्हेंबर इ.स.१६६८ (कार्तिक वद्य पंचमी शके १५९० संवत्सर किलक वार शुक्रवार) गोव्यात श्रीसप्तकोटीश्वराचे देवालय बांधण्यास शुभारंभ. महाराज वेंगुर्ल्यावरून भतग्राम महालातील नारवे या गावी गेले. नारवे येथील श्रीसप्तकोटीश्वराचे देवालय प्राचीन काळापासून विख्यात होते. कोकणच्या ६ प्रमुख दैवतांमध्ये श्रीसप्तकोटीश्वराची गणना होत होती. पंचगंगेच्या तीरावरील श्रीसप्तकोटीश्वर कदंब राजाचे कुळदैवत होते. यावनी काळात या शिवमंदिराची दुर्दशा झाली त्यावेळी, विजयनगरच्या बुक्करायाने त्याचा जीर्णोद्धार केला होता. त्यानंतर पोर्तुगीज अंमलात पुन्हा हे मंदीर ऊद्धवस्त करण्यात आले. श्रीसप्तकोटीश्वराचे शिवलिंग पोर्तुगिजांनी एका विहिरीच्या काठाला बसविलेले होते. त्यावर पाय ठेवून क्रिस्ती लोक पाणी ओढीत! पुढे भतग्रामच्या देसायाने ते गुप्तपणे काढून नेले व नारवे येथे त्याची स्थापना केली. महाराज श्रीसप्तकोटीश्वराच्या दर्शनार्थ गेले आणि या देवालयाचा जीर्णोद्धार करण्याची आंतरिक प्रेरणा त्यांना झाली. लगेच त्यांनी देवालयाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले. *श्रीसप्तकोटीश्वराच्या महाद्वारावर यावेळी खोदलेला शिलालेख अजुनही कायम आहे तो असा:- "श्रीसप्तकोटीश्वर शके १५९०, किलकाब्दे कार्तिक क्रृष्ण पंचम्या सोमे श्रीशिवराज्ञा देवालयस्य प्रारंभ:" यावरून शके १५९०, च्या (कार्तिक वद्य पंचमीला म्हणजे शुक्रवार)* 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १३ नोव्हेंबर इ.स.१६७३ मुंबईकर सूरतकरांना १३ नोव्हेंबर १६७३ ला लिहितात: "सिद्दीने तक्रारी केल्या असताना सुभेदाराचे आमच्याबद्दल इतके मन आहे हे वाचून आनंद झाला. आता बंदरांत असलेल्या बादशहाच्या दोन गलबतांना आम्ही चांगले वागविले हे पाहून बादशाहाविषयी आमचे मनांत पूज्यबुध्दी आहे हे त्याला दिसून येईल ... फ्रेचांनी जर इतक्या तोफा आणि इतके शिसें ( गोळे ) राजापूरला पाठविले असतील, तर छत्रपती शिवाजी महाराजांना सिद्दाविरुध्द चांगले आरमार सज्ज करणस बरे पडेल. कारण त्याने आमच्याकडे मागणी केली परंतु आमच्याजवळ पुष्कळ तोफा असूनही आम्ही तुमच्या सूरतेतील हितसंबंधाकडे लक्ष देऊन तोफा दिल्या नाहीत." सूरतकरांनी १३ नोव्हेंबर १६७४ ला उत्तर लिहिले जे:' "शिवाजीच्या तोफांच्या मागणीबद्दल कळविण्यांत आले. त्यावर आमचे मत असे आहे की, अशा कृत्याने बादशहाला घुस्सा येईल. फ्रेंचानी नुकताच त्यास दारुगोळा पुरविल्याबद्दल दरबाराकडे तक्रारी गेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना बेटावरुन अन्नसामुग्री मिळते याचाच त्यांना संताप येतो. मग त्याला युध्दसामुग्री पुरविली तर त्यांना वैषम्य वाटणारच. बरे मुंबईच्या रक्षणाच्या दृष्टीने मोठ्या तोफा फक्त १३ च आहेत. त्या व पितळी तोफाही तेथे आवश्यक आहेत... छत्रपती शिवाजी महाराजांना आपण धान्य पुरवितो अशी बहादुरखानाने व इतर अधिकाऱ्यांनी तक्रार केली आहे....पितळी तोफांचा समुद्रावर चांगला मारा होतो. त्यांना खर्च मोठा लागत असला तथापि छत्रपती शिवाजी महाराज किंवा दुसरा कोणी त्यांचा मालक होणे आम्हांला लाज आणणारे आहे. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १३ नोव्हेंबर इ.स.१६८१ पालीजवळ छत्रपती शंभुराजे व अकबराची भेट! छत्रपती संभाजी महाराज किल्ले पन्हाळ्याहून किल्ले रायगडास सप्टेंबरच्या अखेरीस आले. २ आॅक्टोबरपासून नवरात्र होते. १२, आॅक्टोबरला दसरा-विजयादशमी होती. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज अकबराची भेट घेण्यास मोकळे झाले. नंतर "कार्तिक शुध्द १३ वार रविवार, म्हणजेच १३ नोव्हेंबर इ.स.१६८१ पातशहापुरी (पाली जवळ) छत्रपती संभाजी महाराज व अकबराची भेटी जाहली. अगदी सेनासमुदायाने लष्कर व हशमदेखील समागमे होते. अकबरासमागमे दुर्गादास होता. बहुत सन्मान केला". पाली जवळ छत्रपती संभाजी महाराज व अकबराची भेट झाली 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १३ नोव्हेंबर इ.स.१६९९ राजाराम महाराजांसोबत मराठे सुरतेच्या रोखाने जात असल्याची खबर मोगल सरदारास भेटताच बेदरबख्त, चिन किलीज खान, झुल्फिकारखान, नस्त्रतजंग हे त्यांच्या पाठलागावर दौडत आले व परिंदयाजवळ बेदरबख्ताने यास गाठले. थोडी चकमक होऊन मराठे अहमदनगरच्या दिशेने वळाले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १३ नोव्हेंबर इ.स.१७८० महाराजा रणजितसिंग यांचा जन्म ज्यावेळी सारा भारत मुघल फौजांनी आपल्या टाचेखाली चिरडला होता त्यावेळी त्यांचा मुकाबला करून स्वत:चं स्वतंत्र अस्तित्व दाखवण्याची हिम्मत भारतात ज्या हिम्मतवान राजांनी केली त्यात अग्रेसर होते आपल्या महाराष्ट्राचे राजे शिवछत्रपती ज्यांच्या मराठा साम्राज्याची दहशत दिल्लीत औरंगझेबाने देखील घेतलेली होती आणि दुसरे होते पंजाब प्रांतातील शीख साम्राज्याचे संस्थापक महाराजा रणजीतसिंग. महाराजा रणजितसिंग यांचे नाव आज इतिहासात राजा शिवछत्रपतीं इतकेच आदराने घेतले जाते. तरीही त्यांच्या जीवनचरित्राबद्दल किंवा त्यांनी केलेल्या कार्याबद्दल पंजाबएतर लोकांना फारशी माहीत नाही. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀ #🙂Positive Thought #🚩शिवराय #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू
See other profiles for amazing content