Follow
Dr Amol Melage
@amolmelage
2,285
Posts
28,328
Followers
Dr Amol Melage
2.2K views
13 hours ago
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩७ऑगस्ट१६७५ आजच्या दिवशी कोल्हापुर स्वराज्यात दाखल झाले. कोल्हापूर परिसरावर विजापूरच्या आदिलशहाची अनेक वर्षे सत्ता होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी मार्च, १६७३ मध्ये पन्हाळागड जिंकून स्वराज्यात आणला, तसेच १६७५ मध्ये कोल्हापूर परिसर खर्‍या अर्थाने जिंकून आपल्या अखत्यारीत आणला. ७ऑगस्ट१६७९ किल्ले खांदेरी-उंदेरी वर शिवरायांच्या आदेशावरून गोड्या पाण्याचे झरे खोदुन तेथे विहीरी बांधण्याचे काम चालू झाले. ७ऑगस्ट१७९० पानिपतच्या लढाईनंतर उत्तरेत मराठ्यांचा जम बसवण्याची महत्वपूर्ण कामगिरी केली ती सरदार महादजी शिंदे यांनी. दिल्ली काबीज करण्याच्या उद्देशाने महादजींनी आपली फौज एकत्र करून दिल्लीवर आक्रमण केले. दिल्ली यावेळी अफगाण व रोहिल्यांच्या ताब्यात होती.महादजींनी दिल्ली ताब्यात घेतली व इंग्रजांच्या आश्रयाला गेलेल्या शहाआलम ला परत आणून त्याला दिल्लीच्या गादीवर बसवले. पण महादजींचे हे वर्चस्व बादशहाचे काही सरदार व राजपुताना मानवले नाही, त्यांनी एकत्र येऊन २९ जुलै ला लालसोटच्या लढाईत महादजींचा पराभव केला. यानंतर पानिपतचा सूत्रधार नजीबखानाचा नातू गुलाम कादिर आणि इस्माईल बेग यांनी बादशहा शहाआलम ला पदच्युत करून त्याचे डोळे काढले व त्याच्या जागी बिदर बख्तला गादीवर बसवले. महादजींनी हार न मानता पुन्हा सैन्य जमवून दिल्लीवर हल्ला करून दिल्ली ताब्यात घेतली आणि गुलाम कादरला कैद करून ठार मारले आणि पुन्हा अंध शहाआलम ला गादीवर बसवले.शहाआलम ने खुश होऊन संपूर्ण राज्यात गोवधबंदी जाहीर केली व मथुरा व वृंदावन ही पवित्र स्थळे महादजींना देण्यासंबंधीचे फर्मान काढले. ७ऑगस्ट१९१४ रवींद्रनाथ टागोर यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन. रवींद्रनाथ टागोर हे थोर साहित्यिक, कवी, नाटककार , संगीतकार व चित्रकार होते, त्यांचे साहित्यक्षेत्रातील नोबेल या उच्च#📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
Dr Amol Melage
3.3K views
1 days ago
#🙏शिवदिनविशेष📜 🚩आजचे ऐतिहासिक दिनविशेष 🚩६आॅगस्ट१६४८ किल्ले पुरंदर स्वराज्यात दाखल. ६ऑगस्ट१६५७ छत्रपती शिवाजी महाराजांनी अहमदनगर च्या मुघल छावणीवर हल्ला चढविला. ६ऑगस्ट१६५९ ठाण्याच्या पोर्तुगिझ गवर्नरने गोवा येथील प्रमुख गवर्नरला 'मराठ्यांच्या आरमाराबद्दल सावधान' असण्याबद्दलचे पत्र लिहिले. शिवरायांनी १६५७ पासून कल्याण-भिवंडी परिसरात आरमार बनवण्याचा उद्योग सुरु केला होता. यात लढाउ तसेच व्यापारी जहाजे सुद्धा होती. त्यामुळे सतर्क होवून पोर्तुगिझ गवर्नरने हे पत्र लिहिले. सदर पत्राचा मराठी अनुवाद- "शहाजीचा मुलगा (शिवाजी) याने आदिलशाहीच्या ताब्यामधील वसई ते चेउल मधला बराच भूभाग जिंकला असून त्याने स्वतःची लढण्याची ताकद वाढवली आहे. त्याने कल्याण, भिवंडी, पनवेल ह्या वसईच्या आसपासच्या बंदरांमध्ये काही लढाउ जहाजे बनवली आहेत. आम्हाला आता सतर्क रहायला हवे. ही जहाजे बंदरामधून खुल्या समुद्रात बाहेर येणार नाहीत यासाठी योग्य ती पावले उचलण्याचे आदेश आम्ही पोर्तुगिझ कप्तानाला दिले आहेत." ६ऑगस्ट१६७७ दक्षिण दिग्विजय मोहिमेत छत्रपती शिवाजी महाराज तुंदुमगुर्ती ला आले. या मुक्कामात महाराजाना भेटण्यासाठी तेवेनापट्टणमचे डच अधिकारी आले होते. डच मंडळींना पायदळाचे सैनिक महाराजांच्या नाजूक अल्कटिव्ह असणाऱ्या तोरणपट्टानी सजवलेल्या महाराजांच्या तंबूत घेऊन गेले.डच मंडळी तंबूत बसल्यावर शिवराय तंबूत आले. त्यांच्यासोबत जनार्दन व रघुनाथ पंडित होते. शिवराय आपल्या आसनावर बसल्यावर जनार्दन पंडित त्यांच्यासमोर तर रघुनाथ पंडित महाराजांच्या जवळ उजवीकडे बसले. शिवराय जेंव्हा तंबूत आले तेंव्हा तंबूत असणारे सारे उठून उभे राहिले. महाराजानी यावेळी सोनेरी नक्षीकाम केलेली वस्त्रे परिधान केली होती. त्यांच्या उजव्या हातात मुठीला सोन्याचा वर्ख लावलेला पट्टा होता. भेटीत महाराजांनी डचा#📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
Dr Amol Melage
2.7K views
2 days ago
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 आजचे ऐतिहासिक दिनविशेष 🚩 ५ ऑगस्ट १६५२ १२ मावळची सुरूवात जिथून होते त्या रोहीड खोऱ्यातील "खोपडे देशमुख" हे पहिल्यापासून स्वराज्यासाठी ईमाने इतबारे सेवा देणारे घराणे. पण त्याच "खोपडे देशमुख" घराण्यात नेहमीच भाऊबंदकीचा वाद व्हायचा पण शिवरायांच्या मध्यस्तीने व सामंजस्याने हा वाद पूर्णपणे मिटवला गेला. 🚩 ५ ऑगस्ट १६७७ छत्रपती शिवरायांनी आदिलशाही ताब्यातील एलवनसुर हे ठाणे व किल्ला जिंकून स्वराज्यात दाखल करून घेतला. एलवनसुर हा भाग व्यंकोजी राजे यांच्या जहागिरीतील एक महत्त्वाचे ठाणे होते. 🚩 ५ ऑगस्ट १६८९ नागपंचमी दिवशी जिंजीच्या दरबारात संताजीराव घोरपडे यांना सरसेनापती पद मिळाले. रणझुंजार सरसेनापती संताजीराव घोरपडे यांना मानाचा मुजरा.#📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
Dr Amol Melage
3.4K views
4 days ago
#🙏शिवदिनविशेष📜 *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *३ ऑगस्ट इ.स.१३४७* *दिल्लीचा सुलतान मुहम्मद तुघलख याच्या कारकिर्दीत दक्षिणेत* *जाफरखान उर्फ अल्लाउद्दीन हसन याने बंड करून गुलबर्गा इथे ३ ऑगस्ट १३४७ ला बहामनी राज्याची स्थापना केली. या बहामनी राज्यात १३४७ ते १५३८ या काळात एकूण १८ सुलतान होऊन गेले. बहामनी राज्यातील १४ वा सुलतान शिहाबुद्दीन महमूद याच्या कारकिर्दीच्या दरम्यान बहामनी सत्तेचा कर्तबगार वजीर महंमद गवान याची हत्या झाल्यानंतर बहामनी सत्तेचे वेगवेगळे सुभेदार जसे युसुफ आदिलखान (आदिलशाही), फतहुल्लाह इमाद (इमादशाही), कुत्ब उल्मुख (कुतुबशाही), अमीर कासीम बरीद (बरीदशाही) व मलिक अहमद बहिरी (निजामशाही) यांनी बहामनी सत्तेतून बाहेर पडत आपली स्वतंत्र राज्ये स्थापन केली. यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यस्थापनेच्या कामी महत्वाचा अडसर राहिला तो विजापूरच्या आदिलशाहीचा.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *३ आगस्ट इ.स.१६६४* *(श्रावण वद्य षष्ठी, शके १५८६, संवत्सर क्रोधी, वार बुधवार)* *महाराजांच्या आरमाराने पोर्तुगीज व मोगली आरमाराचा समाचार घेण्यासाठी १० गलबतांचा ताफा रवाना !* *छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा आरमाराने हेरांनी आणलेल्या माहितीवरून पोर्तुगीज व मोगली आरमाराचा समाचार घेण्यासाठी १०, दहा गलबतांचा ताफा रवाना केला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *३ ऑगस्ट इ.स‌१६७७* *छत्रपती शिवाजी महाराज दक्षिणेत वृद्धाचलम् येथे मुक्कामी आले.* *इथून महाराजांनी परतीचा प्रवास सुरु केला. वृद्धाचलम, कावेरीपट्टम, चिदंबरम तसेच शहाजीराजे यांच्या जुन्या जहागिरीचा प्रदेश बाळापुर, बंगरूळ, शिरें, होसकोट जिंकून घेतला. अरणीला वेढा घालून अरणी जिंकली, त्यासोबतच चिकबाळापूर, दोडडबाळापूर, देवरायानदुर्ग, #📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
Dr Amol Melage
3.3K views
7 days ago
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 आजचे ऐतिहासिक दिनविशेष 🚩 ३१ जुलै १६५७ रघुनाथपंत दंडा-राजपुरी मोहिमेवर रवाना! दंडा-राजपुरीचा किल्ला हा अरबी समुद्रकिनार्यावर आहे. किनार्यालगतच दंडा व राजपुरी अशी दोन गावे आहेत, या किल्ल्याच्या जवळच खाडीमधे एका बेटावर जंजिरा किल्ला आहे, तो किल्ला वर्षानुवर्षे सिद्दीच्या ताब्यात होता व तो स्वराज्याला उपद्रव देत होता तसेच, स्वराज्याच्या रक्षणासाठी समुद्रावरही सत्ता प्रस्थापित करणे आवश्यक होते म्हणुन मग १६५७ मधे ऐन पावसाळ्यात शिवाजीराजांनी सिद्दीनवर मोहिम काढली व त्याप्रमाणे रघुनाथ बल्लाळ सबनीस यांना नियुक्त केले. रघुनाथराव दंडा राजपुरीवर चालुन गेले ती तिथी होती शके १५७९, श्रावण शुद्ध १, शुक्रवार दि. ३१ जुलै १६५७. ३१ जुलै १६५७ मुघलांनी विजापूरच्या आदिलशहाच्या ताब्यात असलेला "कल्याणी किल्ला" जिंकून घेतला. ३१ जुलै १६७७ "दक्षिण दिग्विजय मोहीम" छत्रपती शिवाजी महाराज दक्षिणेतील "तुंदुमगुती"ला आले, तिथून त्यांनी "वृद्धाचलम"ला शिवशंकराचे दर्शन घेतले. ३१ जुलै १६८१ औरंगजेबाने अजमिरहून आजमशहास शहजादा अकबर याच्यावर रवाना केले. ३१ जुलै १६८३ मराठयांनी युद्धाची तयारी करून दि.३१ जुलै इ.स.१६८३ रोजी मराठयांनी चेउलवर जोराचा हल्ला केला व त्यास वेढा घातला काही महिने निकाराचा लढा झाला. पण मराठ्यांना ते जिंकून घेण्यात यश आले नाही. चौलचा वेढा उठवण्यास मराठ्यांस भाग पाडण्यासाठी गोव्याचा व्हाइसरॉय कोंदी द ऑलव्होर याने १७ ऑक्टोबर रोजी फोंडयावर स्वारी केली. पोर्तुगीज हल्ल्याची तयारी करत असताना त्यावेळेस छत्रपती शंभुराजे तातडीने राजापूर वरून फोंडयास आले ३१ जुलै १८९७ द्वितीय छत्रपती राजाराम महाराज यांचा जन्मदिवस लोकराजा ही पदवी मिळालेल्या कर्तुत्ववान पित्याचे हे पुत्र. म्हणजेचं राजर्षी शाहू महाराज यांचे ज्येष्ठ चिरंजीव छत्रपती रा#📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
Dr Amol Melage
5.4K views
10 days ago
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष २८_जुलै_१६६९ शिवाजीराजांनी वाईच्या देशमुखास कौलनामा दिला. २८_जुलै_१६८२ फ्रान्सिको ताव्होरा, आल्वोरचा काउंट हा सन १६८१ पासून १६८६ पर्यंत गोव्याचा मुख्य गव्हर्नर असून संभाजीराजे कदाचित गोवा हस्तगत करून आपला उठाव करतील या भीतीने शक्य तितक्या उपायांनी गोव्याचा बचाव करण्याच्या तयारीत होता. आजच्या दिवशी संभाजी राजांना पत्र पाठवून नुकत्याच झालेल्या पुत्राच्या ( शाहू ) गोष्टीचे अभिनंदन केले. मराठ्यांच्या वकीलामार्फत शंभूराजाना पुत्र झाल्याचे जेव्हा विजरईला समजले तेव्हा त्याने शंभूराजांना पत्र लिहून त्यांचे अभिनंदन केले व नवीन जन्मलेल्या पुत्रास ( शाहूस ) एक दागिना नजर केला. २८_जुलै_१६८२ संभाजी राजांनी येसाजी गंभीरराव बरोबर विजरईला दुसरे पत्र लिहून कळवले कि, 'डिचोली व कुडाळ यांच्या परिसरात आपण २ दारूचे ( तोफांची दारू ) कारखाने उभारले असून कर्नाटकात व मलबारमध्ये तोफा, गंधक हे सामान विकत घेण्याची परवानगी मिळाली आहे तरी त्यास पोर्तुगीज आरमाराकडून अडथळा निर्माण होऊ नये. यानंतर, आजच्या दिवशी विजरईने पत्र लिहून महाराजांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. २८_जुलै_१७८७ लालसोटची लढाई :- २८ जुलै ते ३० जुलै १७८७.#📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती