#📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #⛳शिवसंस्कृती ⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳ 📜 २१ सप्टेंबर इ.स.१६६५ पुरंदरच्या तहाच्या वाटाघाटी सुरू असतानाच छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहाचा तळकोकणाचा भाग आपल्या ताब्यात घेण्याची मोहीम त्यांनी सुरू केली. मुघलांनी महाराजांची कोंडी केल्याचे पाहून आदिलशहानेही आपला सरदार इखलासखान याला सैन्यासह कोकणात पाठवले. महाराजाना ही बातमी कळताच तेही राजगडावरून कोकणात गेले. इखलासखानाने यावेळी महाराजांच्याकडून राजापूर,दाभोळ,वेंगुर्ले,कुडाळ हा भाग जिंकून घेतला. पण महाराजांनीही थोडी माघार घेऊन राजापूर परत जिंकून घेतले. महाराजांचे व आदिलशाहीचे युद्ध कोकणात सुरू असतानाच पुरंदरच्या पायथ्याशी छावणीत असलेल्या मिर्झाराजे जयसिंह यांना सिंहगड पाहण्याची इच्छा झाली. त्यानुसार मिर्झाराजे सिंहगडावर गेले. नुकताच तहानुसार ताब्यात आलेला सिंहगड पाहून त्याची योग्य ती व्यवस्था लावून त्यांनी एक रात्र गडावर मुक्काम केला. व दुसऱ्या दिवशी ते परत आपल्या छावणीत परतले. अनेक आठवणी आणि मराठ्यांच्या पराक्रमाची, गौरवाची साक्ष देणाऱ्या सिंहगडाला मिर्झाराजे जयसिंहानी भेट दिली. 📜 २१ सप्टेंबर इ.स.१६८४ छत्रपती संभाजीराजे पोर्तुगीजांच्यावर चालुन गेल्याची संधी साधून मुघलांनी थेट मराठ्यांच्या राजधानीच्या परिसरात हल्ले केले. रामसेजच्या वेढ्यात अपयशी ठरलेला शहाबुद्दीन खान पुण्याच्या आसपास होता,त्याने माणकोजी नावाच्या सरदाराला बरोबर घेऊन देवघाट उरतरुन रायगडाच्या परिसरातील निजामपूर वर हल्ला केला आणि