फॉलो करें
Chhaya Bharat
@chhaya_voice
673
पोस्ट
484
फॉलोअर्स
Chhaya Bharat
13.2K ने देखा
उगवतीचे रंग ‘ लाभले आम्हास भाग्य...’ ‘ जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी..’ असे प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राने आपल्या आईचा आणि मातृभूमीचा गौरव करताना म्हटले आहे. त्यात आपल्या मातृभाषेचा समावेश करायला हरकत नाही. ज्ञानेश्वर माउलींनी तर म्हटलेच आहे- माझा मऱ्हाटाची बोलू कवतुके परी अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके, मेळवीन. मराठी भाषेतील थोर लेखक, कवी, नाटककार कुसुमाग्रज उर्फ वि वा शिरवाडकर यांचा जन्म दिवस मराठी भाषा दिन म्हणून जगभर साजरा होतो. जगाच्या कान्याकोपऱ्यात जिथे कुठे मराठी माणूस असेल तो अभिमानाने हा दिवस साजरा करतो. मराठीची आठवण करतो, मायभूमीची आठवण करतो. ही मराठी माती इतकी पवित्र आहे की कुसुमाग्रज म्हणतात माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा हिच्या संगाने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा. मराठी भाषेतील अभंग असो वा ओवी, तिला सुभाषिताचे मोल प्राप्त झाले आहे. रत्नजडीत अभंग, ओवी अमृताची सखी चारी वर्णातुनी फिरे, सरस्वतीची पालखी. या आमच्या मायमराठीला हजारो वर्षांचा इतिहास आहे. या अर्थाने माझी मराठी ऐतिहासिक आहे, अक्षर आहे, अभिजात आहे. आई जसे आपल्या बालकाचे पालनपोषण करते, तसे या मराठीने तुमचे आमचे पोषण केले आहे. हजारो वर्षांपासून. ते स्तन्य पाजून तिने आपल्याला बळ प्रदान केले आहे. आपले सांस्कृतिक वैभव वाढवले आहे. तिच्या अंगाखांद्यावर खेळतच आपण मोठे झालो आहोत. मग तिला कसे विसरता येईल... माधव ज्युलियन यांच्या शब्दात सांगायचे झाले तर मराठी असे आमुची मायबोली, जरी आज ही राजभाषा नसे. नसो आज ऐश्वर्य या माऊलीला, यशाची पुढे दिव्य आशा असे. हिचे पुत्र आम्ही, हिचे पांग फेडू, वसे आमुच्या हृन्मंदिरी. जगन्मान्यता हीस अर्पू प्रतापे, हिला बैसवू वैभवाच्या शिरी. ही नैतिक जबाबदारी आज तुमच्या आमच्यावर आहे. कारण आम्ही तिचे वारस आहोत. संस्कृत भाषेतून उगम पावलेली, प्राकृतापासून विकसित झालेली ही मराठी. सातवाहन राजांच्या काळापासून वापरात आली, यादव राजांच्या काळात ती भरभराटीस आली. अनेक संत, कवी, लेखकांनी तिला सुंदर लेणे चढवले. त्यातून ती अधिकच श्रीमंत, ऐश्वर्यसंपन्न होत गेली. विवेकसिंधू हा मराठी भाषेतील आद्य ग्रंथ मुकुंदराज यांनी लिहिला. म्हणून ते आद्य कवी. त्यानंतर ज्ञानेश्वरांनी संस्कृतमधील ज्ञान भांडार मराठीत आणून सर्वसामान्यांसाठी खुले केले. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेवपासष्टी, हरिपाठ आदी ग्रंथ लिहून मराठी भाषेला इतके सामर्थ्य प्राप्त करून दिले की खरोखरच ती ‘ अमृतातेही पैजा ‘ जिंकेल. आणि खरोखरीच इतकी सुंदर भाषा त्यांनी वापरली की ओवी असावी तर ज्ञानेशाची असे म्हटले जाऊ लागले. अखिल विश्वासाठी इतके सुंदर पसायदान ज्ञानेश्वर माउलींनी मराठीत मागितले की ते मराठीचे एक अभिमानाचे अक्षर आणि अमर लेणे झाले. पुढे संत एकनाथ, समर्थ रामदास, संत तुकाराम, संत नामदेव आदी संतानी नानाविध ग्रंथ लिहून मराठीला आणखी समृद्ध केले. शिवरायांच्या नेतृत्वाखाली ‘ मराठी पाऊल पुढे पडले.’ आणि मायमराठीला राजाश्रय लाभला, लोकाश्रय लाभला. मराठी भाषेला मराठी मातीचा गंध लाभला. अंगावर रोमांच उभे करणारे शूरवीरांचे पोवाडे लिहिले गेले, लावण्या लिहिल्या गेल्या. संत कवी, पंत कवी यांनी मराठीला समृद्ध केले. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळक, स्वा सावरकर, आगरकर, म. फुले, न्या. रानडे, लोकहितवादी, साने गुरुजी, विनोबा भावे आदींच्या साहित्याने मराठी भाषेला अधिक श्रीमंत केले. खान्देशच्या मातीत जन्मलेल्या बहिणाबाई, बालकवी आदींच्या कवितांनी तर रसिकांच्या मनावर कायमचे गारुड केले. अशिक्षित असलेल्या बहिणाबाई अहिराणीत जीवनाचे तत्त्वज्ञान सांगून गेल्या, तर बालकवींनी आपल्या कवितांमधून रंगांची आणि निसर्ग सौंदर्याची उधळण केली. आचार्य अत्रे, पु ल देशपांडे, राम गणेश गडकरी, वि वा शिरवाडकर, वि स खांडेकर, गो नि दांडेकर, ना सी फडके, मंगेश पाडगावकर, बा भ बोरकर, भा रा तांबे आदी कवी आणि लेखकांनी अक्षर मराठी साहित्य निर्मिती केली. मराठीतील वाल्मिकी म्हटल्या जाणाऱ्या ग दि माडगुळकर यांनी अक्षर अमर गीतरामायण लिहिले. केवढी थोर साहित्यिकांची मांदियाळी आहे मराठीत ! नावे तरी किती घ्यावीत ! अशा या वेगवेगळ्या कवी आणि लेखकांनी मराठी भाषेला समृद्ध केले आहे. तरी आज अशी वेळ का येते की आम्हाला म्हणावे लागते की मराठी भाषा जगवली पाहिजे, वाढवली पाहिजे ? त्याचे कारण आम्ही तिचे पुत्र आहोत, तिचे वारस आहोत, तिचे पांग आम्हाला फेडायचे आहेत हे आम्ही कुठेतरी विसरतो. वर्षभरातून एकदा मराठी दिवस आला की आम्हाला मराठीचा अभिमान उरी दाटून येतो. पण पुन्हा वर्षभर गायब ! आमच्या मुलांना आम्ही अट्टाहासाने इंग्रजी शाळेत घालतो. मराठी शाळा ओस पडत चालल्या आहेत. इंग्रजी भाषा म्हणून शिकणे आजच्या काळासाठी आवश्यक आहेच याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. पण यासाठी मातृभाषेचा बळी द्यायला हवा का याचा विचार आपण करणार आहोत की नाही ? मावशीसाठी आईचा बळी द्यायचा का ? आम्ही आमच्या मुलांना आता ‘ चिऊ काऊ ‘ नाही शिकवत. आमचा काऊ म्हणजे आता गाय. चिऊ म्हणजे sparrow. भू भू म्हणजे कुत्रा नाही. आता डॉगी म्हटले जाते. ‘ आई ‘ म्हणुनी कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी. पण ती हाक आता नाही येत कानी. जिकडे तिकडे ‘ मम्मी शब्द कानावर पडतो. इंग्रजीत प्रेताला मम्मी म्हणतात. मम्मी म्हणताना ओठ मिटले जातात तर आई म्हणताना तोंड उघडले जाते. आ होतो. केवढा मोठा फरक ! ‘ टी व्ही वरच्या साबणाच्या एका जाहिरातीत एक छोटी मुलगी आपल्या आईला ‘ मम्मी ‘ म्हणून हाक मारते. आणि मग ‘ किती सुंदर आहे. She is so talented.’ मम्मी सुद्धा, रॉक स्टार सुद्धा असे इंग्रजाळलेले उद्गार कानी येतात. मोबाईलवर मराठी टाइप करताना मराठीचे जे काही खून पडतात ते तर भयानकच ! ऱ्हस्व, दीर्घ तर अजून पुढचा भाग...! त्याबद्दल मी इथे जास्त बोलत नाही. म्हणून आमच्या मुलांना आवर्जून मराठी शाळेत टाकले पाहिजे. त्यांना सुदर मराठी पुस्तके वाचायला दिली पाहिजेत. त्यांची गोडी लावली पाहिजे. आधी आपण पालकांनी लावली पाहिजे. मराठी पुस्तके विकत घेऊन वाचली पाहिजेत. मराठी बोला, मराठी चाला, मराठी खा, मराठी प्या, मराठी झोपा, मराठी जागा, मी मराठी, बाणा मराठी, जात मराठी, पंथ मराठी, धर्म मराठी असे अंतर्बाह्य मराठीमय व्हा. आता होळी येते आहे. तेव्हा असा ‘ असा अवघा रंग एक झाला..’ पाहिजे. ती खरी होळी. असे जेव्हा होईल तेव्हा मराठी जगेल, वाचेल, वाढेल. फक्त मराठी दिन साजरा करून नाही भागणार. सुरेश भटांच्या ओळींनी शेवट करू या लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी. #🙏गीता ज्ञान🛕 #🙏🏻हनुमान जी के भजन #🙏🏻आध्यात्मिकता😇 #🙏गुरु महिमा😇 #🙏कर्म क्या है❓
Chhaya Bharat
573 ने देखा
माझी मराठी प - पहिला प ओठावर येणारा म्हणजे परमेश्वर ठ - ठ हा हॄदया पर्यंत पोहचणारा ठ ठासुन भरला विठ्ठल जितका वेळ विठ्ठल बोलाल तितके रोग बरे होतात, हॄदयातला रक्त प्रवाह चांगला होतो, अशी गोड आपली मराठी भाषा आहे, अमृता हुनी गोड म - मनामनात रुजनारी रा - राहते हॄदयात घर करून ठी - ठिकाण मराठी चे विश्वात गुंजते स्वरांत नांदते शब्दातुन बाहेर पड़ते, कर्ण तृप्त होतात, कंठ दाटून येतो, हॄदयात भगवंत विराजमान होतो अंतरंग विशाल होते, अशी माझी मराठी गोड वाणी अमृता हुनी गोड अमृता हुनी गोड 🙏🏻🙏🏻🙏🏻🕉️🕉️🕉️🚩🚩🚩 #🙏कर्म क्या है❓ #🙏गुरु महिमा😇 #🙏🏻हनुमान जी के भजन #🙏🏻आध्यात्मिकता😇 #🙏गीता ज्ञान🛕
Chhaya Bharat
583 ने देखा
🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ ........आज आपण आपले जे संत आहेत जे कीर्तनकार आहेत त्यांचे विषयी मी विषय मांडण्याचा प्रयत्न करत आहे, जे मला समजलेले आहे ते एके काळी आम्ही असेच होतो, आम्ही नेहमी विचार करायचो का हे पैसे घेतात फुकट ज्ञान वाटले पाहिजे, .........कशाला एवढे पैसे घेता असंच आम्ही विचार करत होतो, पण ज्या वेळेला आम्ही धर्माचा अभ्यास केला आम्ही बघितले की जे संत आहेत जे ज्ञान देतायेत एक मिशन चालवायचे आहे, एक संस्था चालवायची आहे, .........जसे घर चालवायला पैसे लागतात तसेच संस्था चालवायला सुद्धा पैसे लागतात, आणि ते पैसे मागत नाहीत जे लोकांना साधकांना अनुभव येतात ते प्रेमाने त्यांना पैसे देतात, आम्हाला असेच वाटायचे काय कीर्तनकार पैसे घेतात मग लक्षात आले जाण्याचं खर्च लागतो, ......... एवढे लोक आलेले असतात, सर्व मंडप टाकायला माईक स्पीकर सगळ्या गोष्टी लागतात जाण्याचं खर्च एवढे लोक येतात त्यांना नको पैसे त्यांचा संसार नाहीये त्यांना मुलं बाळ नाहीये, एवढा वेळ द्यावा लागतो तर ते फुकट कार्य करतील त्यांचं घर प्रपंच कसा चालेल, ......... आपण साधा वेळ देऊ शकत नाही, आपण साधं प्रवचनाला जाऊ शकत नाही, ते लोक पूर्ण अभ्यास करतात चिंतन करताना संपूर्ण वेळ देतात, त्यांना प्रपंच चालवायला काही नको का???? आपण आपले मानसिकता का अशी बनवून ठेवले आहे की फुकट दिले पाहिजे म्हणून साधं घर चालवायला किती पैसे लागतात विचार करा आपल्याकडे पाहुणे येतात आपण त्या लेडीजला साडी घेतो बरोबर ना सगळ्यांना कपडे करतो ना सगळ्यांना नाहीतर एकाला तरी करतो, मग विचार करा पाहुणे आले तर आपण त्यांना पाहुणचार करतो साडी घेतो, ......... तसेच साधुसंत येती घरा अरे संतांचा आपल्या घरी पाय लागणे अहोभाग्य संत हे साक्षात भगवंत असतात, त्याला खाली हात पाठवायचं ज्याच्याकडे जे आहे, ना मी तर म्हणते ते द्या ते काय तुम्हाला म्हणत नाहीत, स्वतःहून मागत नाही मला पाच लाख पाहिजे दहा लाख पाहिजे तुमच्याकडे जेवढी ऐपत असते ना ते तुम्ही देतात, दिल्यानंतर नक्कीच कमी पडत नाही द्या त्यामध्येच "या" शब्दही मी नेहमी सांगत असते तुम्ही जे देणार ते रिटर्न येणार हजार पटीने, देणाऱ्याने पैसे दिले आणि आपण ते बोलून महापाप करतो, ते पापीचे भागीदारी बनतो हेच लोकांना समजत नाही, आम्ही तो अभ्यास केला आहे जेव्हा जेव्हा आपल्या एखादा संत कडे खूप लोक जमा होतात पब्लिक जमा होते, त्या त्या वेळेला काही काही मिशन असतात, यांचा धर्म वाढू नये लोक जागृत होऊ नये म्हणून असे गुपित काही सिक्रेट असतात, .........बाहेरुन पैसा पुरवला जातो, आपल्याच लोकांना टार्गेट करून व्हिडिओ बनवायला लावतात, मी कोणाला एकाला बोलत नाही, आणि ते व्हिडिओ बनवतात निगेटिव्ह प्रचार करण्यासाठी असेच किती किती मोठे संप्रदाय नष्ट झाले आहेत, अशा या लोकांमुळे कारण की लोक जाणं बंद करतात, ......... थोडा विचार करा आपण साधे सत्संगाला जाऊ शकत नाही?????? आपण साधे पाच माणसं गोळा करू शकत नाही?????? आज साधू संतांकडे लाखो पब्लिक जमा होते का होते हा विचार करा पंडित मिश्रा कडे किती पब्लिक असते दहा-बारा लाख लोक सहज येतात, ..........बागेश्वर धाम कडे कसले पब्लिक असते आपल्याला ते कधी जमलं का तुम्ही करून दाखवा एवढे लोक जमा जसे बोलतातना तसं कार्य करा समाजाला सुखी करण्यासाठी करू शकता का????? .......... साधुसंत होणे सोपे नाही संपूर्ण त्याग करावा लागतो त्याच्या मागे, आपल्याला साधं घर सांभाळता येत नाही?????? एवढ्या लोकांचे मानसिकता सांभाळणे सोपी गोष्ट नाहीये, ......... खरं सांगू आपलेच लोक पुढे येतात बोलायला का महादेवाच्या पिंडीवर दूध चढवतात अंधश्रद्धा आहे, ते नका करू हे नका करू, अंधश्रद्धा आहे अंधश्रद्धा च्या नावाखाली आपल्या धर्मावर वार केला जातो, ........ ब्राह्मणांना टार्गेट केला जातो पोटभरू बोलतात अरे ब्राह्मण आहेत म्हणून आज संस्कृत संस्कार टिकून आहे, त्यांचे पण आपल्या धर्मासाठी खूप योगदान आहे, व लोकांना बोलायला काही लागत नाही, अभ्यास करत नाही उचलली जीभ लावली टाळूला का त्यांचा प्रपंच नाहीये नको त्यांना पैसे ......... मला असे वाटते जे असे बोलतात ना त्यांनी समाजाला सुखी करावं त्यांनी कामधंदे सोडावे आणि समाजाला सुखी करण्यासाठी बाहेर पडावं आहे का हिम्मत बाहेर पडा आणि करा समाजाला सुखी तुम्हीही निरपेक्ष करा एकही रुपया घेऊ नका????? ......... नाहीतर काम करून सेवा करा तुमचा जॉब सांभाळा तुमचं घरदार सांभाळा आणि समाजसेवा ही करा असेही करता येईल पण करा नक्कीच करा पब्लिकला जमा करा आणि धर्माचं ज्ञान द्या धर्म काय आहे म्हणून हे तरी सांगता येईल का धर्म काय आहे?????? .......... जे जे चांगले संत आहेत जे जे कीर्तनकार आहेत जे जे चांगले साधुसंत आहेत आम्ही सर्वांच्या बाजूने नक्कीच बोलणार कारण की ते आहेत म्हणून आपला धर्म टिकलेला आहे, ...….. आणि समाजाला एकच सांगेन चांगल्या कार्याला पैसे द्या भरभरून तुम्हाला रिटन येईल परमेश्वर तुमचे काहीच ठेवत नाही, हजार पटीने रिटर्न देतो देणार ते रिटर्न येणार एक कोय पेरली हजार आंबे झाडाला लागतात आणि निसर्गाचा नियम आहे, ..........तुमच्याकडे जे आहे ना ते दया, तुमच्याकडे शक्ती आहे चांगले शरीर प्रकृती आहे जा सेवा द्या तुमच्याकडे पैसा आहे पैसा द्या आणि काहीच नसेल तर एक चांगली प्रार्थना करा तेही करता येत नसेल तर साधे एक स्माईल करा पण द्यायला शिका जो देतो ना तो देव असतो, ........ देवांनो साधुसंतांचा भरपूर त्याग असतो, आणि ते तुम्हाला सदैव सुखी व्हावे यासाठी ज्ञान देत असतात जर तुम्ही त्यांना प्रेमापोटी त्यांना काही पैसे दिले गाडी दिली बंगला दिला तर काही अशा समाजाच्या लोकांना सांगेल की आपलं का पोटात दुखते जाऊदे ना त्यांना अनुभव आला ते सुखी झाले आणि त्या अनुभवाने त्यांनी साधुसंतांना गाडी दिली पैसा दिला तर आपण का बोलून पाप करा नका पाप करू एवढे सांगेन, ......... आणि ज्याच्याकडे आहे तोच देणार ज्याच्याकडे नाही तो कसा पैसे देणार मग लक्षात ठेवा आमचे सर्व संत साधू काही मागत नाही, लोक त्यांना देतात प्रेमाने देणाऱ्याला काही फरक पडत नाही, पण पाहणाऱ्याला मात्र पोटात दुखते, ......... कृपया विनंती आहे आता कुठेतरी आपल्या सनातन धर्म जागृत होत आहे, तर आपल्या धर्माला लागून आपण सर्वांनी आपल्या साधू संत कीर्तनकार प्रवचनकार आपले संप्रदाय या सर्वांच्या बाजूने एक व्हा एकनिष्ठ राहा तरच आपला धर्म टिकेल नाहीतर काफीर व्हायला वेळ लागणार नाही, ......... आपला सनातन हिंदू धर्म खूप ग्रेट आहे, आपल्या सर्व कणाकणात देव सांगितलेला आहे, मग तो देव सर्वत्र आहे तो झाड फुल पान दगड पोथी पारायण उपास कुठला तोडगा अघोरी - संतानी तर भूतात पण देव सांगितला इतका महान आपला सनातन धर्म आहे, आपल्या धर्मात प्रत्येक गोष्ट पुजायला शिकवते इतका महान आपला सनातन धर्म आहे, ........ सर्व भूतमात्रात देवच आहे देवच भरून उरला आहे सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होईजे, मला एक सांगा आपल्या घरात एखाद्या व्यक्ती आपला अपंग आहे किंवा आपला मुलगा एखादा बदमाश आहे तर आपण त्याला घरातून बाहेर काढतो देतो का???? ......... एखादी गोष्ट इकडे तिकडे घडली तर कशाला बोंबाबोंब करायला हवी, आपले शरीर आपले दात आपले तोड़ आपलेच डोळे सर्व आपलेच आहेत चांगले जगायला शिका चांगले जगू या आपल्या लोकांना आपल्या धर्माला सपोर्ट करूया सर्व साधुसंत आपलेच आहेत, ........ अशा काही मिशनरी आहेत आपल्या साधू संत यांना बदनाम करण्यासाठी काहीतरी शोधतच राहतात, नेहमी टार्गेट असतो, अभ्यास करा आपल्या धर्माचा अशा असे व्हिडिओ ऐका की आपल्या धर्माला नष्ट व्हावा म्हणून काय काय षडयंत्र केले जातात, आता तरी सावध व्हा, तुम्ही जे पाहिलं तेच बोलतात असे करू नका खोलवर जा अभ्यास करा, असो लिखाण फार मोठे झाले त्याबद्दल माफी असावी, 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ #🙏गीता ज्ञान🛕 #🙏🏻आध्यात्मिकता😇 #🙏गुरु महिमा😇 #🙏🏻हनुमान जी के भजन #🙏कर्म क्या है❓
Chhaya Bharat
623 ने देखा
🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ पूर्वी होऊन गेलेले महाभारत आता सध्या आपल्या आत मना मनात चालू आहे, आपल्या आतच श्री कृष्ण भगवान,पांडव विदुर धृतराष्ट्र, दुर्योधन, कर्ण हे सर्व आपल्या आताच आहेत कुठे बाहेर युद्ध नाही तर आपल्या मनात युद्ध चालू असते सतत, आपला आत्मा म्हणजे श्री कृष्ण भगवंत आहेत, जो सदैव सत्य धर्माच्या बाजूने उभा आहे त्याच्या सोबत भगवंत अखंड उभे आहेत, सदैव आतून मार्ग दर्शन करतात, आतला आवाज म्हणजे विदुर विदुर चांगली विवेक शील बुद्धि म्हणजे विदुर वाईट बुद्धि म्हणजे कौरव नेहमी चुकीचे मार्ग पोषित करणे आपल्याला एखाद्या गोष्टि विषयी असलेला मोह म्हणजे धृतराष्ट्र कारण धृतराष्ट्राला आपल्या मुलाप्रती खूप मोह होता, आणि हा मोहात आपल्या धोतराष्ट्र आहे, हे लक्षात ठेवा मग मोह कोणत्या गोष्टीचा ठेवायचा, व कोणत्या गोष्टीचा ठेवायचा नाही हे माणसाला समजले पाहिजे, आंधळेपणाने केलेला मोह म्हणजे धृतराष्ट्र, आपल्याला माहित असते हे चुकीचे आहे तरीही आपण डोळे झाक करतो हा आंधळा विश्वास म्हणजे धृतराष्ट्र, दुर्योधन म्हणजे आपल्यातला अहंकार आणि लोभ संपत्तीचा लोभ मग लोभ कसलाही असो, लोभ दुर्योधनालाही लोभच होता, की सुई टोका एवढी मी जमीन पांडवांना देणार नाही हा लोभच होता, शकुनी मामा म्हणजे आपली कपटी बुद्धी आपल्या अहंकाराला घोषित करण्यासाठी चुकीचा मार्ग दाखवते म्हणजे शकुनी मामा बुद्धि ने खूप हुशार होता, पण त्याची बुद्धि नेहमी चुकीच्या मार्गाला लावली, पांडव म्हणजे धर्माच्या बाजूने आणि जिथे धर्म आहे जिथे सत्य आहे तिथे भगवंत साक्षात उभे आहेत, म्हणून महाभारत आपल्यालाही शिकवते की आपण कोणाच्या बाजूने उभे राहावे, आपण धर्म च्या बाजूने उभे राहावे की अधर्माच्या बाजूने उभे रहावे, जर आपण अधर्माच्या बाजूने उभे राहिलो तर आपला विनाश निश्चित आहे, कर्ण किती दानशूर होता खूप हुशार धनुर्धारि होता, पण तो कोणत्या बाजूने उभा राहिला हे फार महत्त्वाचे आहे, तसेच आपली बुद्धी कोणत्या बाजूने उभी करतो चांगले किंवा वाईट आपली निवड काय आहे धर्म की अधर्म - जर तुमची बुद्धी धर्माच्या बाजूने असेल तर तुम्ही पांडवांच्या बाजूने आहात जर बुद्धी लोभ किंवा वाईट बाजूने असेल तर तुम्ही कर कौरवाच्या बाजूने उभे आहात, कर्ण ने एवढा हुशार असून पण संगत चुकीची धरली म्हणून शेवटी काय झाले सर्व तुम्हाला माहितच आहे, विचार करा महाभारत मध्ये सर्वे हुशार ज्ञानी बुद्धिवंत असून पण चांगले आणि वाईट सत्कर्म दुष्कर्म समजले नाही, तर तुम्ही आम्ही काय????? महाभारत आपल्याला शिकवते धर्म अधर्म काय संगत कोणाची करायची भगवंत कृष्ण कोणाच्या बाजूने उभे राहतात, कर्म किती निष्ठेने करावे अर्जुनाला भगवंताने सर्व काही गीतेत् ज्ञान देऊन टाकले भक्ती कशी करावी कर्म कसे करावे संन्यास म्हणजे का- 18 अध्याय सांगून आपले जीवनातले गणित सोडवलेले आहे भगवंतांनी गीतेत - संगत फार महत्त्वाची आहे, संगतीचे महत्त्व खूप आहे म्हणून आपण संगत कोणाची करायची सु बुद्धीची का कु बुद्धी ची धर्माची की अधर्माची सत्कर्माची की दुष्कर्माची निवड आपली आहे???? आपल्याला काय निवडायचे आहे धर्म की अधर्म - चांगले का वाईट आपल्याला कोणाच्या बाजूने उभे राहायचे आहे सत्कर्म का दुष्कर्म हे सर्व ठरणारे तुम्हीच आहात म्हणून तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे निर्माते. 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ #🙏🏻हनुमान जी के भजन #🙏🏻आध्यात्मिकता😇 #🙏कर्म क्या है❓ #🙏गुरु महिमा😇 #🙏गीता ज्ञान🛕
Chhaya Bharat
556 ने देखा
*शिवाजी* महाराज नावाचा अर्थ शि - शिष फक्त आई जगदंबे पुढे झुकनार वा - वाघासारखे दहाड़नारे जी - जिथे जिथे पाऊल टाकतील तिथे तिथे स्वराज्य निर्माण करतील असे आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज होते आई तुळजाभवानी की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय #🙏कर्म क्या है❓ #🙏🏻आध्यात्मिकता😇 #🙏🏻हनुमान जी के भजन #🙏गुरु महिमा😇 #🙏गीता ज्ञान🛕
Chhaya Bharat
535 ने देखा
🚩 ​सह्याद्रीचा सिंह ​नभी गर्जतो महाराष्ट्र माझा, नसा-नसात ज्याच्या शिवबाचा राजा | मूर्ती लहान पण कीर्ती महान, स्वराज्याचे स्वप्न ज्यांनी केले साकार | ​सह्याद्रीच्या कडा-कपारीत, घुमतो आजही तोच हुंकार | अन्यायाविरुद्ध पेटली मशाल, असा माझा राजा, रयतेचा प्रतिपाळ | ​कपाळी टिळक, हाती भवानी तलवार, शत्रूला नमवे जो वारंवार | गड-किल्ले ज्याचे सांगाती, असा छत्रपती झाला या माती | ​होते मावळे सोबतीला, प्राणांची आहुती देणारे, स्वराज्यासाठी रक्ताचे पाणी करणारे | धन्य ती जिजाऊ, धन्य तो शिवराय, ज्यांच्या चरणी नतमस्तक सारा महाराष्ट्र पाय | ​छत्रपती शिवाजी महाराज की जय! 🚩 ​ #🙏🏻हनुमान जी के भजन #🙏गुरु महिमा😇 #🙏कर्म क्या है❓ #🙏🏻आध्यात्मिकता😇 #🙏गीता ज्ञान🛕
Chhaya Bharat
593 ने देखा
🕉️ गुरूंचे संरक्षण ज्याला मिळाले तो निर्भय झाला समजावे त्याचे जीवन मंगलमय प्रकाशमय झाले समजावे, ज्याने सद्गुरू चरणासी स्वतःला सोपवून दिलं सर्व ऐश्वर्य त्याला मिळाले, असे सद्भाग्य त्याला प्राप्त होते. 🕉️ विजय हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे सत्य और शाश्वत जीवन प्राप्त करण्यासाठीच आपण जन्म घेतलेला आहे, अज्ञानी लोकांना हे कधीच समजणार नाही. 🕉️ जेव्हा तुम्ही सत्य धर्म कार्यासाठी कार्य करत असता त्यावेळेला धर्म तुमचं रक्षण करत असते, सत्य धर्माचे जेव्हा तुम्ही कार्यकर्ता तेव्हा परमेश्वर सर्व साधु संत आपल्याला भरभरून फुलांचा वर्षा करत असतात, व आशीर्वाद देतात. 🕉️ आपण अज्ञानाच्या कारणाने जन्म आणि मृत्यू समजतो कृष्ण भगवंत गीतेत सांगतात की अर्जुना आत्मा अजर अमर अखंड आहे या शरीरात तो वास करतो या शरीरातून आपण भगवंताला अनुभवू शकतो आणि मृत्यू वरती विजय पाऊं शकतो, मग भगवंत कणाकणात आहे हे प्रत्येयाला येईल. 🕉️ #🙏कर्म क्या है❓ #🙏🏻हनुमान जी के भजन #🙏गुरु महिमा😇 #🙏गीता ज्ञान🛕 #🙏🏻आध्यात्मिकता😇
Chhaya Bharat
601 ने देखा
🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ गुरूंना जो शरण गेला त्याचे जीवन सर्व मंगल होईल गुरुकृपा सर्वात मोठे आपल्यासाठी गिफ्ट आहे गुरु जर प्रसन्न झाले तर आपली नया सहज पाडून जाते हृदयात प्रेम प्रगट व्हायला लागते परमेश परमेश्वर सर्वत्र आहे तो श्वास येते आणि जाते त्याच्या आत तो आहे प्रत्येक प्राणात विश्वास मध्ये तो बसलेला आहे, सुख शांती अमृत सहज प्राप्त होऊन जाईल, आपल्याला माहित नाही पण गुरूंना सदैव आपले स्मरण असते, गुरु ही आपले देवता भगवंत आहेत, जर आपण गुरूंच्या आज्ञा चे पालन केले तर तीच आपली खरी भक्ती आहे, धन्य हाय जे त्यांना हा रस्ता भेटला, गुरु सनातन ब्रह्मच आहेत, त्यांची करुणा अपरंपार आहे जर केले समर्पण तर शिष्य ला सर्व प्राप्त झाले, 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ #🙏गीता ज्ञान🛕 #🙏🏻हनुमान जी के भजन #🙏🏻आध्यात्मिकता😇 #🙏गुरु महिमा😇 #🙏कर्म क्या है❓
See other profiles for amazing content