🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
परमार्थ जास्त दुःख आहे की संसारात प्रश्न अवघड आहे कारण की कुठल्याही बाजूने उत्तर दिल तरी समाधान मानायचे की नाही मानायचे खूप मोठी गोष्ट आहे,
परमार्थाच्या दृष्टीने भगवंताच्या नजरेने जर पाहिलं तर दुःख कुठेच नाही ना संसारात न परमार्थात कारण संसार म्हणजे भगवंताचा सार परमार्थाचा अर्थ म्हणजे परमतत्व व दोघांमध्येही सुख आणि दुःख दोन्ही गोष्टी नाहीत,
आता आपण पुढे पाहू दुःख होते ते आपल्या जीव रूपी मनाला
मग तो संसारात दुःख भोगत तर असतो, पण तिथे तो दोन हात करतो, तो भांडतो टेन्शन घेतो, ओरडतो शब्दाला शब्द देऊन हे सर्व करतो, संसारात सर्वांची मन सारखीच असतात भांडणारी?????
परमार्थात मन नावाचा प्रकार उरत नाही, आत्मज्ञान नंतर पण जेव्हा तो परमार्थ ला सुरुवात करतो, त्यावेळेला अतिशय त्याला दुःख वाटेला येते, जितके संसारात दुःख भोगलेले नसतात इतके दुःख परमार्थ येतात, जेव्हा तो परमार्थ करायला सुरुवात करतो, पूर्ण जीवन त्याचे पालटून जाते, कारण की भगवंत सद्गुरु त्याला घडवत असतात, प्रत्येक गोष्टीतून त्याच्या अंतरंगातून चांगले वाईट गुण काढत असतात, जसे एखाद्या मातीला रगडले जाते माठ तयार करण्यासाठी,
माझ्या मते परमार्थात जास्त दुःख असते, कारण की सर्व नातेगोते सर्व सुटून जातात, पूर्ण जीवन पालटुन जाते, भगवंत त्याला एकटा करतो, त्याचे सर्व सुख दुःख चांगले वाईट ज्ञान अज्ञान विकार द्वेष मत्सर अहंकार हेवे दावे, अहंकार सर्व काढून टाकतो, त्याचे नाम सत्संग त्याचे जात पात हे सर्व काढून घेतो, त्याचा संसार उध्वस्त होतो, आणि देव त्याला त्याचा करून घेतो ते दुःख असते पण त्याला त्याचे दुःख वाटत नाही, त्याच्यासाठी ते दुःख दुःख नसून भगवंत भेटण्याचा आनंद असतो, विश्वरूप होण्याच्या आनंद असतो, भगवंत त्याच्या हृदयात वस्तीला येत असतो,
पूर्ण होण्याचा आंनद असतो,
संसारात तो अपूर्ण असतो व येथे परमार्थात पूर्ण होण्याचा आनंद असतो,
भगवंत सर्व काढून घेतो पण भरभरून देतो ही तितकेच त्याला पूजनीय वंदनीय बनवतो,
संसारात दुःख येतात म्हणून आपण परमार्थ कडे वळतो आणि परमार्थ कडे वळण्यासाठी संसारात दुःख येतात?? ज्या दिवशी समजले ना त्या दिवशी तुम्हाला दुःख दुःख वाटणार नाही,
व परमार्थात दुःख दुःख नसते तर आनंद आहे परमानंद आहे गोविंद आहे, नारायण आहे,
कुंती बरोबर साक्षात भगवंत सोबत असून सुद्धा भगवंताकडे दुःख मागितले याचे कारण हेच की सदैव तू स्मरणात राहावा आपल्या वाटेलाही दुःख यासाठी येते की सदैव भगवंताचे स्मरण राहावे, हे वाईट नव्हे, आपल्या जीवनाचे सोने व्हावे म्हणून
म्हणून एक लक्षात ठेवा परमार्थात जर दुःख असते तर चांगली लोक जे भक्ति करतात ते परमार्थकडे वळलेच नसते,
परमार्थ आनंद आहे, परमार्थात जीवनाचा अर्थ आहे परमार्थात सुखदुःख नसतात दुःख आले तरी ते सुखच आहे, परमार्थात अंतरंग वैश्विक होते, म्हणुन दुःख हे समुद्रावरच्या लाटा वाटतात, त्याला इतका आनंद असतो भक्तीचा,
तू देव मी साधक यात त्याला आनंद असतो, तिथे त्याला कोणीच लागत नाही तू माझा आणि मी तुझा बस हेच जीवन असते त्याचे.
🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
#🙏🏻आध्यात्मिकता😇 #🙏🏻हनुमान जी के भजन #🙏कर्म क्या है❓ #🙏गीता ज्ञान🛕 #🙏गुरु महिमा😇