Follow
Chhaya Bharat
@chhaya_voice
711
Posts
523
Followers
Chhaya Bharat
826 views
17 hours ago
🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ जीवनात आपल्याला कसलेही प्रॉब्लेम आले किंवा कुठलीही समस्या असली तर आपले सद्गुरु जे असतील त्यांचे स्मरण करा. आपण देवाला न सांगता सद्गुरुंना सांगा कारण की सद्गुरु देवाचे कनेक्ट असतात, अंतरंगातून आपण सद्गुरू जवळ आपल्या समस्या मांडा त्यांना सांगा सद्गुरु देवा असं असं प्रॉब्लेम अशी समस्या आहे यातून बाहेर काढा सद्गुरूंना हाक मारा ते नक्कीच तुमचे जीवनातली समस्या काढतील कारण संत आणि भगवंत म्हणजे सद्गुरूंचा काला, देवाला सांगण्यासाठी तुम्हाला माध्यम लागते आणि ते माध्यम म्हणजे सद्गुरु असतात आणि तुमचा प्रॉब्लेम तुमची समस्या लवकरात लवकर सुटून जाते, जरी आपल्या अंतरंगात देव असला तो ऐकत जरी असला तरी आपण त्याच्यापासून लांब असतो, सद्गुरू स्वयं देव नारायण सद्गुरु साक्षात देव असतो, असं का म्हटलं गेलं गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः गुरुदेव देवाशी इतके कनेक्ट असतात इतके कनेक्ट असतात की तुमची समस्या सहज निघून जाते, कारण की सद्गुरु 24 तास भगवंताशी ऑनलाइन असतात आणि साधारण माणसं ऑफलाइन असतात, एवढेच लक्षात घ्या साधारण माणसाची रेंज पोहोचत नाही, सद्गुरु कोणतीही गोष्ट सहज ती तुमची सोडवू शकता, मग ते काही असू दे, सद्गुरु वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी गुरु आपल्या जीवनातील न्यू आहेत, हे आपल्याला माहित नाही गुरु का आहेत???? या माझ्या पृथ्वीतलावर तुमच्यासाठी सर्वांसाठी साधारण माणसांसाठी आपल्यासाठी सद्गुरू असतात एवढे लक्षात ठेवा, आपण नको ते भलते करतो आपण शोधा शोध करतो, तुम्ही जीवनात कोणतेही गुरु करा तुम्हाला जे योग्य वाटेल ते जसे आपले कुलदैवत असते, ती आपल्या कुळाचा सांभाळ करते जसे आपण कोणत्यातरी देवाला मानतो, तसेच तुम्ही सद्गुरूंचा अनुग्रह घेऊन आपण सद्गुरु केला पाहिजे जेणेकरून आपण आपल्या समस्या आपल्या जीवनातले गणित आपले सर्व सहस्ते सोडवून देतील सद्गुरुं असो सहज अंतरंगातून विषय स्पुरला म्हणून लिहिले आणि हे परम सत्य आहे. मी आतापर्यंत जो ही अभ्यास केलेला आहे ते सर्व जे मोठे झालेत त्यांनी सर्वांनी सद्गुरूंनाच पूजले आहे जे ही माझ्या वाचनात आलेले ग्रँथ आहे जे मी ग्रंथ वाचले त्या ग्रंथांमध्ये सद्गुरूंची स्तुती आणि सद्गुरूंना महत्त्व दिलेले आहे, मग आपले सद्गुरू कसे असू देत साधे भोळे अनाडी काही असू देत न शिकलेले, सद्गुरु आपला दात आहे आपल्या जीवनाचे जीवन आहे सद्गुरू हा देव आहे सद्गुरु हा देव आहे. 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ #🙏कर्म क्या है❓ #🙏🏻हनुमान जी के भजन #🙏🏻आध्यात्मिकता😇 #🙏गुरु महिमा😇 #🙏गीता ज्ञान🛕
Chhaya Bharat
513 views
9 days ago
🕉️ बुद्धीच्या पलीकडे देवच अनंत आहे त्या देवाला पाहिले तो निराकाराला पाहिले ज्याला आकार नाही इतके ते सूक्ष्म आहे, आपल्यासमोर असून डोळ्यांना दिसत नाही, इतकं ते दिव्यत्व जवळ आहे, इतकं तेजस्वी आहे, स्वयंप्रकाशित आहे अंतच नाही, व्यापक की अख्ख ब्रम्हांड त्याच्यात् समावला आहे, ते ब्रम्हांड अनंतच आहे जसा तो अनंत आहे, त्याच्यातच पोटात हे सर्व आहे शब्दांचा स्वर सूक्ष्म रूपाने ते वास करतात, साधुसंत देव देवता असतात अशी काही शक्ती आहे दिव्य जे आपल्या स्वरूपात आपल्याला त्या आकाशात आपले स्वरूप आपल्याला दिसत असते, सर्वांना वाटतं हे नाही ते नाही, म्हणजे देव देवता नसतील कोणी पाहिलं स्वर्ग नसेल कोणी पाहिला देव देवतांना कोणी पाहिले चमत्कार कुठे होतात हे, नाही ते नाही सर्व लोक असे करत असतात???? पण असे काही गुपित रहस्य आहेत ते आजही आहेत आणि अखंड राहणार पण ते कोणालाच दिसणार नाही, असूनही दिसणार नाही असं बुद्धीच्या पलीकडे आहे, सर्व काही आहे पण बुद्धीच्या पलीकडे आहे ते इतकं सूक्ष्म आहे ते असूनही कोणाला जाणवत नाही, ते सर्व देह बुद्धीच्या पलीकडे आहे ते अनुभवायला येणे म्हणजे खूप कठीण आहे, ते दिसणे फार कठीण आहे ते सर्वांना दिसणार नाही समजणे उमजणे फार कठीण आहे, खऱ्या साधकाला जो सद्गुरु प्रेम करतो त्याला नक्कीच अनुभवायला येतात असं काही नाही की अनुभवायला येत नाही, मौन तत्व सुद्धा आपल्याशी स्ववाद साधते पण देहाच्या पलीकडे एक समजणं पण फार कठीण आहे, भले मोठे जे पहाड असतात तेथे सुद्धा आत मध्ये देवता वास करतात मी असे अनुभवला आहे म्हणून मांडलेला आहे, असे काही आहे बुद्धीच्या पलीकडे आपण खाली असतो पृथ्वीवर पण असतो ब्रम्हांडात हे स्वतः दिव्या दृष्टीने आपण पाहतो, हरी अनंत हरी कथा अनंत परमेश्वर अनंत तिची माया ही अनंत इतके अनंत आहे की त्याचा अंतच नाही इतकं गोड आहे,आकाश प्रेम अनंत आनंद आहे त्याचा कधीच अंत होणार नाही ते परमात्म्याच हे सर्व बुद्धीच्या पलीकडे अनुभूती अनुभव आहेत, मला जे दिसले जे अनुभवले अनंत तेच मांडले🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🕉️🚩🚩🚩🚩🚩🚩 #🙏गुरु महिमा😇 #🙏🏻हनुमान जी के भजन #🙏गीता ज्ञान🛕 #🙏🏻आध्यात्मिकता😇 #🙏कर्म क्या है❓
Chhaya Bharat
579 views
12 days ago
🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ परमार्थ जास्त दुःख आहे की संसारात प्रश्न अवघड आहे कारण की कुठल्याही बाजूने उत्तर दिल तरी समाधान मानायचे की नाही मानायचे खूप मोठी गोष्ट आहे, परमार्थाच्या दृष्टीने भगवंताच्या नजरेने जर पाहिलं तर दुःख कुठेच नाही ना संसारात न परमार्थात कारण संसार म्हणजे भगवंताचा सार परमार्थाचा अर्थ म्हणजे परमतत्व व दोघांमध्येही सुख आणि दुःख दोन्ही गोष्टी नाहीत, आता आपण पुढे पाहू दुःख होते ते आपल्या जीव रूपी मनाला मग तो संसारात दुःख भोगत तर असतो, पण तिथे तो दोन हात करतो, तो भांडतो टेन्शन घेतो, ओरडतो शब्दाला शब्द देऊन हे सर्व करतो, संसारात सर्वांची मन सारखीच असतात भांडणारी????? परमार्थात मन नावाचा प्रकार उरत नाही, आत्मज्ञान नंतर पण जेव्हा तो परमार्थ ला सुरुवात करतो, त्यावेळेला अतिशय त्याला दुःख वाटेला येते, जितके संसारात दुःख भोगलेले नसतात इतके दुःख परमार्थ येतात, जेव्हा तो परमार्थ करायला सुरुवात करतो, पूर्ण जीवन त्याचे पालटून जाते, कारण की भगवंत सद्गुरु त्याला घडवत असतात, प्रत्येक गोष्टीतून त्याच्या अंतरंगातून चांगले वाईट गुण काढत असतात, जसे एखाद्या मातीला रगडले जाते माठ तयार करण्यासाठी, माझ्या मते परमार्थात जास्त दुःख असते, कारण की सर्व नातेगोते सर्व सुटून जातात, पूर्ण जीवन पालटुन जाते, भगवंत त्याला एकटा करतो, त्याचे सर्व सुख दुःख चांगले वाईट ज्ञान अज्ञान विकार द्वेष मत्सर अहंकार हेवे दावे, अहंकार सर्व काढून टाकतो, त्याचे नाम सत्संग त्याचे जात पात हे सर्व काढून घेतो, त्याचा संसार उध्वस्त होतो, आणि देव त्याला त्याचा करून घेतो ते दुःख असते पण त्याला त्याचे दुःख वाटत नाही, त्याच्यासाठी ते दुःख दुःख नसून भगवंत भेटण्याचा आनंद असतो, विश्वरूप होण्याच्या आनंद असतो, भगवंत त्याच्या हृदयात वस्तीला येत असतो, पूर्ण होण्याचा आंनद असतो, संसारात तो अपूर्ण असतो व येथे परमार्थात पूर्ण होण्याचा आनंद असतो, भगवंत सर्व काढून घेतो पण भरभरून देतो ही तितकेच त्याला पूजनीय वंदनीय बनवतो, संसारात दुःख येतात म्हणून आपण परमार्थ कडे वळतो आणि परमार्थ कडे वळण्यासाठी संसारात दुःख येतात?? ज्या दिवशी समजले ना त्या दिवशी तुम्हाला दुःख दुःख वाटणार नाही, व परमार्थात दुःख दुःख नसते तर आनंद आहे परमानंद आहे गोविंद आहे, नारायण आहे, कुंती बरोबर साक्षात भगवंत सोबत असून सुद्धा भगवंताकडे दुःख मागितले याचे कारण हेच की सदैव तू स्मरणात राहावा आपल्या वाटेलाही दुःख यासाठी येते की सदैव भगवंताचे स्मरण राहावे, हे वाईट नव्हे, आपल्या जीवनाचे सोने व्हावे म्हणून म्हणून एक लक्षात ठेवा परमार्थात जर दुःख असते तर चांगली लोक जे भक्ति करतात ते परमार्थकडे वळलेच नसते, परमार्थ आनंद आहे, परमार्थात जीवनाचा अर्थ आहे परमार्थात सुखदुःख नसतात दुःख आले तरी ते सुखच आहे, परमार्थात अंतरंग वैश्विक होते, म्हणुन दुःख हे समुद्रावरच्या लाटा वाटतात, त्याला इतका आनंद असतो भक्तीचा, तू देव मी साधक यात त्याला आनंद असतो, तिथे त्याला कोणीच लागत नाही तू माझा आणि मी तुझा बस हेच जीवन असते त्याचे. 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ #🙏🏻आध्यात्मिकता😇 #🙏🏻हनुमान जी के भजन #🙏कर्म क्या है❓ #🙏गीता ज्ञान🛕 #🙏गुरु महिमा😇
Chhaya Bharat
473 views
13 days ago
🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ ​जग रूठे तो रूठे, तुम मत रूठना प्रभु... ​यह संसार तो है बस एक मेला है, भीड़ में भी यहाँ मन रहता है अकेला। टूट जाएं सारे धागे, छूट जाएं सब नाते, बस तेरे चरणों से मेरा तार न टूटे प्रभु। हे नारायण जग रूठे तो रूठे, तुम मत रूठना प्रभु। ​भूल-चूक से अगर मुझसे कोई गलती हो जाए, मेरी किसी नादानी से अगर तू नाराज हो जाए। माफ़ करना मेरे नारायण, ओ मेरे तारणहार, मुझसे कभी तेरा ये दरबार न छूटे प्रभु। जग रूठे तो रूठे, तुम मत रूठना प्रभु। ​दुनिया की तालियों की मुझे चाह नहीं है, तेरे सिवा मेरी कोई और राह नहीं है। लाख आंधियां आएं, लाख तूफान उठें, मेरे मन से तेरा ये विश्वास न टूटे प्रभु। जग रूठे तो रूठे, तुम मत रूठना प्रभु। ​सुख में चाहे मैं तेरा नाम लूँ या ना लूँ, दुख में बस तेरा ही तो मैं आंचल का सहारा लूँ। अंत समय जब आए, ये साँसें जब थम जाएं, इन होंठों से बस तेरा ही नाम फूटे प्रभु। जग रूठे तो रूठे, तुम मत रूठना प्रभु। मेरे नारायण 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ #🙏गीता ज्ञान🛕 #🙏🏻हनुमान जी के भजन #🙏गुरु महिमा😇 #🙏कर्म क्या है❓ #🙏🏻आध्यात्मिकता😇
Chhaya Bharat
569 views
13 days ago
उत्तर -ती एक परीक्षा आहे म्हणून स्वीकार करिन जसे वर्षभर अभ्यास केला आता परीक्षा आह जसे अंबा वरुन खाली पडला आता जमिनीत जाऊन मोठ झाड़ होणार आहे परमार्थ करताना जगातले कोणतेही दुःख जर आले तर ती देवाची कृपा समजून त्या कडे पहिल तर ,जीवन उज्वल होईल भगवंत कोणालाही सहज मोठ करत नाही???त्याला चारही बाजूने ठोकुन पाहतो पक्का भक्त आहे का कच्चा वरवर भक्ति करतो का पूर्ण श्रद्धाने सुख व दुःखत साधा कामगार याचा पगार साहेब केव्हा वाढवतात जेव्हा तो इतर कामगार पेक्षा ज्यास्त मेहनत करतो ....संकट काळी पळ काढत नाही ...पगार नाही दिलात तरीही प्रमानिकपने काम करतो परमार्थ हा परम तत्वाने भरलेला आहे, सोन्यासरखा मार्ग आहे पण सोन्याला जसे अग्नीत जावेच लागते व त्याचे हळूहळू अलंकार बनतात व नंतर शोभुन दिसतात कोणत्याही सुंदर वस्तुला सुंदर फुलाला ,सुंदर फळाला लगेच लोक निवडून घेतात तसेच परमर्थात देवता ही उत्तम सर्वोत्तम भक्ताला निवडून घेतात व त्याला सुख व दुखातून ट्रेनिग देतात ......... सर्वांगाने मजबूत झाला की त्याला उत्तम ज्ञानाचा वर्षाव करतात...... इतक देतात की तो साधक सर्व सुखी सर्व भूति सम्पूर्ण होईजे .....देवा सर्वांच भल कर हेच ब्रीद वाक्य त्यांच् जीवन होते व तो भक्त सर्वाना सांगतो की बाबा रे सुख दुःख सोबत आपला भगवंत आपल्याच सोबत असतो ...... दुखात तर तो 100% आपल्या सोबत असतो पण आपन देवाची मदत मागत नाही आपन माणसांच्या मदतीची वाट पाहतो...... दुखांत तर देवाची खरी ओळख होते ---संकट काळात जगातले सर्वच लांब पळतात फक्त तुमचा देव तुमच्या सोबत अखण्ड उभा असतो विश्वास ज्या साधकाचा देवावर जितका टक्के तितका देव त्याला प्रचिती देतो ..... परमार्थ शुद्ध भावाने साध्य होतो , परमार्थ भक्तीच्या सामर्थ्याने फुलतो, परमार्थ सुष्म ज्ञानने अंकुरित होतो परमार्थ गुरुच्या कृपेने विश्वाकार होतो परमार्थ देवाच्या सानिध्यत पूर्णत्वस जातो ....... देव व भक्त मुळात एकच आहेत हे ज्याला जीवंत पनी स्वानुभूतिला आले तोच खरा भक्त संत होतो..... 🙏🏻🙏🏻🙏🏻🇮🇳🇮🇳🌸🌸🌼🌼🌼🌼 जय सनातन संस्कृति #🙏कर्म क्या है❓ #🙏🏻हनुमान जी के भजन #🙏🏻आध्यात्मिकता😇 #🙏गुरु महिमा😇 #🙏गीता ज्ञान🛕
Chhaya Bharat
582 views
13 days ago
माझे उत्तर परमार्थ करताना जर दुःख निर्माण झाली तर न डगमगता न भीती बागळता आपण पूर्ण श्रद्धा ठेवून परमार्थ करावा, किती दुःख निर्माण झाले तरी परमार्थ सोडायचा नाही कारण की परमार्थ करणे हाच आपल्या जीवनाचे सार आहे सुखदुःख काय हे तर जीवनातले पार्ट आहेत, म्हणून दुःख आले तरी माझे आणि सुख आले तरी माझे पण परमार्थ कधीही सोडायचा नाही दुःख आले तर आपल्याला शिकायला मिळते आपली भक्ती वाढते, परमार्थात करत असताना जेव्हा दुःख आले तर मनात गपचूप रडून घेतो, देवाला सांगतो आणि पुन्हा तो उठून उभा राहतो आणि पुन्हा तो सुरुवात करत असतो हे असे त्याचे जीवनात चालू असते, पक्का साधक जोपर्यंत त्याला परमार्थाचा परमअर्थ कळत नाही, तोपर्यंत तो परमार्थाला सोडत नाही, जोपर्यंत त्याला परमार्थातला परमेश्वर कळत नाही तोपर्यंत तो भगवंताशी एकनिष्ठ राहून भक्ती करत असतो मग सुख येऊ दे की दुःख येऊ दे, त्याला काहीही फरक पड़त नाही, हा खरा साधक खरा साधक परमार्थ करत असताना दुःख जरी आले तरी तो कोणाला दोष देत नाही, तर तो दोष सहन करत असतो, त्याची सहनशीलता वाढते तो सहन करत असतो, परमार्थ हा साधकाला मजबूत बनवत असतो खरा साधक बनवत असतो परमार्थ त्याला घडवत असतो दोन्ही बाजूंनी संसार आणि परमार्थ. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩🕉️ #🙏गुरु महिमा😇 #🙏🏻हनुमान जी के भजन #🙏गीता ज्ञान🛕 #🙏🏻आध्यात्मिकता😇 #🙏कर्म क्या है❓
Chhaya Bharat
590 views
15 days ago
🕉️ जो अखंड जागृत आहे जागा आहे त्याला पाहण्यासाठी जगा ज्याला कधी झोपच नाही असं कोण आहे ते फक्त आत्म तत्वच असू शकते, ज्याला ना झोप ना जाग आहे या दोन्हींच्या पलीकडे तो आहे "आत्मा" जसे अंधाराला प्रकाश माहित नाही व प्रकाशाला अंधार माहित नाही तसेच आत्मतत्त्वाला जाग आणि झोप माहित नाही तो द्रष्टा व साक्षी आहे तो नित्य अखंड आहे तो तुमच्या आतच आहे, हे जाणण्यासाठी तुम्हाला ज्ञानाची गरज आहे तुम्हाला भक्तीची गरज आहे तुम्हाला नामस्मरणाची गरज आहे तुम्हाला सत्संगाची गरज आहे तुम्हाला सद्गुरूंची गरज आहे तुम्हाला ध्यानाची गरज आहे, तत्वाला तुमचे शब्द कळत नाही, तुमचे भाव कळतात तरीही शब्द फार महत्त्वाचे आहेत कारण शब्द हे ब्रह्म आहेत शब्दां द्वारे तुमचे भाव प्रकट होतात, तुमच्याकडे सुख दुःख नाहीत तुमच्याकडे यश अपयश नाही तुमच्याकडे पाप पुण्य नाही हे सर्व तुम्हाला जीवाला जडलेले भाग आहेत तुम्ही ते एक आत्मा आहात व आत्म्याला काहीही टच होत नाही, ना सुख दुख ना यश अपयश काहीही नाही आत्मा हा सर्वांच्या पलीकडे आहे याच्या आड फक्त येते ते म्हणजे अज्ञान, तुमच्या अज्ञान दूर झाले की नारायण साक्षात तिथे उभाच आहे तुमचा देह भाव गेला की तुम्ही आत्मस्वरूपच आहात मी देह म्हणता घडे ब्रह्म कोटी हत्य आपण मी देह हे समजून जगत असतो, म्हणून सर्व काही तुमच्या जीवाला मनाला चिटकूनच राहते म्हणून एवढे लक्षात ठेवा नामस्मरण करा सद्गुरूंकडे जा व सत्य स्वरूपाचे ज्ञान जाणून घ्या आता हे करायचं की नाही करायचे तुमच्या हातात आहे कारण की तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे निर्माते. 🕉️ #🙏🏻आध्यात्मिकता😇 #🙏🏻हनुमान जी के भजन #🙏कर्म क्या है❓ #🙏गीता ज्ञान🛕 #🙏गुरु महिमा😇
Chhaya Bharat
628 views
15 days ago
अंधाराला घाबरू नका दिवा लावा अपयशाला घाबरू नका अजून मजबूत बना सुख दुःखाचे डोंगर येतील व जातील तुम्ही घाबरू नका तुम्ही मार्ग काढत राहा परिस्थिती निर्माण झाली आहे टेन्शन घेऊ नका विश्वास ठेवा आज परिस्थिती आहे, उद्या नसणारा उद्या कसे होईल चिंता करत बसू नका आज चांगले करा उद्या चिंता करण्याची गरज पडणार नाही मृत्यू हा निश्चितच आहे घाबरू नका भगवंताला अनुभवा मृत्यूची भीती राहणार नाही, मला वाईट विचार आलेच नाही पाहिजे हा विचार करत बसण्यापेक्षा देवाचे नामस्मरण करत रहा सतत भक्ती कशी करू हा विचार करत बसू नका, सतत देवाच्या स्मरणात रहा हीच खरी भक्ती आहे, मला गुरु योग्य मिळेल की नाही हा विचार करत बसू नका तुम्ही सतत देवाचे नामस्मरण करत रहा तुम्हाला योग्य ते गुरु बरोबर मिळतील. माझे कसे होईल हे चिंता करत बसू नका तुमचे जीवन देवाच्या चरणी सद्गुरूंच्या चरणी अर्पण करा, स्वताला वाईट वाईट बोलत बसु नका चांगले ते सत्कर्म करत चला कोणी आपल्या विषयी वाईट बोलत असेल तर बोलू दया, तुम्ही तुमचा चांगला मार्ग सोडू नका, कधी कधी चांगल्या व्यक्तिला ही दोष लावला जातो, म्हणुन तुम्ही खचू जावू नका, तुम्हला प्रमाण देण्याची गरज नाही, तुमचे नित्य चांगले वागणे सोडू नका, यश्ववि व्हावे असे वाटत असेल नित्य श्रम व पर्यन्त विश्वास सोडू नका नक्कीच यश्ववि व्हाल, जीवन युक्ति ने जगावे जसे पाऊस आला की छत्री उघड़तो जसे ठंडी आली स्वेटर घालतो उन्हाळ्या आला की पंखा लावतो, तसेच जीवनही युक्तीने जगावे परिस्थिती निर्माण झाली की त्या परिस्थितीनुसार माणसाने जगण्याची कला शिकवूण घ्यावी, अजून एक उदाहरण देते जसे की घरात पाणी आणि बाहेर पाणी तर घरातले पाणी काढून कुठे फेकणार??? अशा परिस्थितीत तुम्ही काय करणार??? काहीतरी युक्ति लावणार ना?? तुम्ही तसेच जीवन जगत असताना युक्त शोधायची पटापट लोळत बसायचं नाही. आपल्याकडे बुद्धी नावाची गोष्ट भगवंताने गॉड गिफ्ट दिलेले आहे या बुद्धीचा उपयोग कधी करणार. बुद्धीचा वापर करा जीवन सर्वांग सुंदर बनवा. 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ #🙏गीता ज्ञान🛕 #🙏🏻हनुमान जी के भजन #🙏गुरु महिमा😇 #🙏कर्म क्या है❓ #🙏🏻आध्यात्मिकता😇