🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
.........हे परममेश्वरा हे देवा तू कसा आहेस हे देवा तुम्ही आनंदीत तर आहेत् ना, तुला कधी दुःख वाटतं का, तु कधी आजारी पडतोस का - तुलाही कधी रडायला येतं का,
.........कारण लोक फक्त तुझ्याकडे फक्त मागायला येतात म्हणून तुलाही वाईट वाटतं का,
..........थोडेच लोक असतील की निरपेक्ष तुला भेटायला मंदिरात येत असतील, निरपेक्ष प्रेम करत असतील, तुझं नामस्मरण करत असतील,
..........आतापर्यंत तर मी असंच बघितले की काही मागायचं असेल काही संकल्प असतील उपास कशासाठी करायचा पोथी पारायण का वाचायचे काहीतरी मागणी असते तरच लोक करतात, म्हणून तुला पण वाईट वाटतं का रे देवा-
..........हो नक्कीच वाटत असणार मला असे वाटते, तू कोणाला सांगणार, तू सर्व सहन करत असतो, सर्व तुझी लेकर आहेत, म्हणुन माफ कसरत असतो, तू तर विधाता आहेस तुला तर सर्व माहित आहे,
.......…देवा सर्वांना असेच सतत माफ करत रहा, कारण की मनुष्यप्राणी हा स्वार्थीच आहे, तो फक्त त्याचा भल्याचे पाहत असतो, तो गरज असेल तरच तो माणसांनाही भेटायला जातो, फोन करतो बोलतो गरज संपली की तू कोण आणि मी कोण मनुष्यप्राणी वेळ नुसार वागतो देवा,
...........त्याला वेळ नाही देवा, असा मनुष्य प्राणी आहे, हे परमेश्वरा त्याला काही घेणं देणं नाही कोणाचं मन दुखू दे कोणाचं काही असू दे देवा दुःख संकट आलं की मग फोन करायचा समोरच्याला भेटायचं आणि आनंदीत असलो की तू आणि मी कोण असेच करतात,
............देवा तुमच्याशी असे वागतात तर मनुष्या शी का नाही वागणार असे, वाईट वाटते देवा असं कसं हा मनुष्य प्राणी बनला इतर प्राणी तरी बरे त्यांना तरी समजते,
............दुःख संकट आले काही प्रॉब्लेम जीवनात निर्माण झाले की सर्व देव आठवतात इतर वेळेला आपण सर्व विसरात जीवन जगत असतो, असे न करता आपण इतर वेळेलाही तितकेच आपण परमेश्वराला प्राधान्य पहिले स्थान दिले पाहिजे तरच आपले जीवन सर्वांग सुंदर होईल,
............नी स्वार्थ देवावर प्रेम करा नामस्मरण करा एवढंच सांगेन सदैव स्वार्थ पाहूनच आपल्या भल्याचा विचार करूनच आपण सर्व गोष्टी करत असतो, कोणतेही कार्य निरपेक्ष करा भगवंत सर्व पाहत आहे त्याला सर्व कळतं,
.........तुमची परिस्थिती कशी असू दे मनस्थिती मात्र सारखी सदैव चांगली ठेवा, विचार करा जेव्हा आपले काम असते तेव्हा आपण नको नको ते कसमे वादे करतो देवाला आणि नंतर पुन्हा विसरतो,
..........देवा याच्यापुढे मी असं करणार नाही, असं चांगलाच वागीन मी हेच करणार तेच करणार नाही वाईट याच्यापुढे असं होणार नाही, पण पूर्ण बघा तुम्ही विचार करा जर आपलं चांगलं होतं, सर्व वेल सेटल चालू झालं की,
..........पहा तुम्ही पुन्हा तसेच होता आणि पुन्हा परिस्थिती निर्माण होत असते, असे न करता वारंवार परिस्थिती चांगली येवो की वाईट येऊ देवाला धरून रहा, या जगात तुमचे देवाशिवाय कोणी नाही हे त्रिवार सत्य आहे,
.........देवाचे गरजे पोटी आठवण काढू नका, सदैव देवाला स्मरणात ठेवा काम झाले की विसरणे हे सर्वात मोठे चुकीचे आहे, असे न करता सदैव त्याच्या स्मरणात रहा चांगले असू दे किंवा वाईट असो आता हे सर्व करणारे तुम्हीच, म्हणुन तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे निर्माते.
🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
#🙏कर्म क्या है❓ #🙏🏻हनुमान जी के भजन #🙏गुरु महिमा😇 #🙏गीता ज्ञान🛕 #🙏🏻आध्यात्मिकता😇