Follow
Chhaya Bharat
@chhaya_voice
735
Posts
549
Followers
Chhaya Bharat
528 views
2 days ago
​भाव मनातील ओलावा आणि शब्दांतील गोडवा ​🕉️🪷🕉️🪷🕉️🪷🕉️ ​भाव हा केवळ मनात असून चालत नाही, तर तो साक्षात प्रकट झाला पाहिजे. जेव्हा आपले भाव बाह्य जगात व्यक्त होतात, तेव्हाच आपले जीवन खऱ्या अर्थाने सुखी होते, एक साधे उदाहरण घेऊया—समोर जेवणाचे ताट वाढलेले आहे, पण जोपर्यंत आपण घास उचलून खाणार नाही, तोपर्यंत पोट भरेल का? नक्कीच नाही, तसेच, भावना मनात दाबून न ठेवता त्या समोरच्या व्यक्तीपाशी व्यक्त करणे आवश्यक आहे. तरच समोरच्याला खरा आनंद मिळतो. "माझ्या मनात आहे ना प्रेम," असे म्हणून चालत नाही; ते शब्दांत आणि वागणुकीत उतरावे लागते, ​तुमची वागणूक आणि तुमचे बोलणे हेच तुमच्या मनातील भावाचा आरसा असतात. मनात भावनांचे काहूर असूनही जर शब्द अबोल असतील, तर त्याचा अर्थ दुसऱ्याला कसा उमजणार? उदाहरण देते ​जर पत्नीने मनापासून छान जेवण बनवले असेल, तर ते मनातल्या मनात 'छान झाले' असे म्हणून चालणार नाही. तिला प्रेमाने सांगा, "खूप छान जेवण बनवले आहे, धन्यवाद दया, ​पतीने जर आपली आवड जपत आपल्याला कुठे फिरायला नेले, किंवा आपल्यासाठी काही खरेदी केली, एखादी वस्तू भेट दिली, तर त्यांनाही मनापासून 'धन्यवाद' म्हणा, ​जेव्हा तुम्ही व्यक्त होता, तेव्हाच तुमचे आंतरिक प्रेम आणि ओलावा दुसऱ्याला समजतो. भगवंताच्या बाबतीत आपण म्हणतो की भगवंताला मनातले कळते, पण संसारात मात्र शब्दांना खूप महत्त्व आहे. भगवंताला तुमचे भाव शब्दांद्वारे किंवा मौनातूनही कळतील, परंतु आपले पती, पत्नी, नातेवाईक किंवा शेजारी यांना तुमचे मन वाचता येत नाही. त्यांच्यासाठी तुम्हाला शब्दांचा आधार घ्यावाच लागतो. ​विचारांची शक्ती प्रचंड आहे, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपल्या मनातील विचारांची स्पंदने समोरच्या व्यक्तीपर्यंत चांगल्या किंवा वाईट स्वरूपात पोहोचतच असतात. त्याचा परिणाम प्रत्यक्ष व्यवहारावर होत असतो. म्हणून मनात नेहमी शुभ विचार ठेवा आणि ते तितक्याच चांगल्या पद्धतीने व्यक्त करायला शिका, ​व्यक्त होण्यात एक विलक्षण आनंद आहे. कशाला भावना मनात कोंडून ठेवायच्या? चला, मोकळेपणाने व्यक्त होऊया, सर्वांना आनंद देऊया आणि आपला संसार अन् परमार्थ दोन्ही सुखी करूया, आता तुम्हीच ठरवा तुमच्या भावना व्यक्त करायच्या की नाही करायच्या ​आता —आपल्या परिवाराला आनंदी ठेवायचे की नाही? हे लक्षात ठेवा, कारण तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे निर्माते. ​🕉️🪷🕉️🪷🕉️🪷🕉️ #🙏कर्म क्या है❓ #🙏🏻हनुमान जी के भजन #🙏गीता ज्ञान🛕 #🙏🏻आध्यात्मिकता😇 #🙏गुरु महिमा😇
Chhaya Bharat
554 views
3 days ago
🕉️ तुम्ही साक्षात परमेश्वराचे अंश आहात, म्हणून स्वतःला कमी लेखू नका, तुम्ही सर्व काही करू शकता, तुम्ही संसारही आनंदाने करू शकता व भगवंताला ही तुम्ही पाहू शकता, म्हणून मी करू शकत नाही मला वेळ मिळत नाही, हे सर्व बाजूला ठेवा तुम्ही साक्षात परमेश्वर चे अंश आहात, तुम्हाला अशक्य असे काहीच नाही, म्हणून तुम्ही करत चला परमेश्वरावर विश्वास ठेवा माझ्यात् चैतन्य शक्ती आहे आणि ती सर्व काहीही करायला तत्पर आहे हाच विश्वास ठेवा, तुम्ही करू शकता तुम्ही करू शकता तुम्ही करू शकता विश्वास ठेवा. 🕉️ #🙏🏻आध्यात्मिकता😇 #🙏🏻हनुमान जी के भजन #🙏गुरु महिमा😇 #🙏गीता ज्ञान🛕 #🙏कर्म क्या है❓
Chhaya Bharat
544 views
3 days ago
🕉️ गुरूंच्या प्रभावाने आपली अंतर शक्ती जागृत होते, आपल्यात दिव्यप्रेम प्रगट होते, आपली वाणी गदगद होऊन जाते, ती भगवंताचे गुणगान गाते ती बोलते ती सर्वत्र अपार सुखाची उधळण करते, आपले चित्त प्रेमाने प्रत्येक क्षणी विरघळत राहते, प्रेमाने तो वारंवार रडतो कधी हसतो कधी लाज सोडून उंच स्वरात गातो नाचतो असा हा सद्गुरूंचा दास भगवंताचा पण भक्त होऊन तिन्ही लोकांना पवित्र करतो अलौकिक वंदनीय असतो, तो जिथे जातो तिथे स्थान पवित्र होते, तो जिथे राहतो तेथील तीर्थ स्थान होते, असे तो सर्वांना भगवंताच्या गुणगान सांगुण सर्वांना सुखी करत असतो ते सुखच वाटत असतो आनंदच वाटत असतो. 🕉️ #🙏गीता ज्ञान🛕 #🙏🏻हनुमान जी के भजन #🙏कर्म क्या है❓ #🙏गुरु महिमा😇 #🙏🏻आध्यात्मिकता😇
Chhaya Bharat
558 views
3 days ago
🕉️🪷🕉️🪷🕉️🪷🕉️ हा ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग आहे अतिशय गुह्य आत्मज्ञानावरती आहे त्याचा भावार्थ पाहूया, 🕉️ डोळांची पाहा डोळा शून्याचा शेवट । नीळ बिंदू नीट लखलखीत ॥१ ॥ विसावो आले पातले चैतन्य तेथे। पाहे पा निरुते अनुभवे ॥२ ॥ पार्वतीलागी आदिनाथे दाविले । ज्ञानदेवा फावले निवृत्तिकृपे ॥३ ॥ ​अभंग भावार्थ ​१. डोळांची पाहा डोळा शून्याचा शेवट । नीळ बिंदू नीट लखलखीत ॥ ​भावार्थ: ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपल्या अंतरचक्षूंनी ज्ञानाच्या डोळ्यांनी त्या शून्या पलीकडच्या शून्याला पाहा, जेव्हा मनातील सर्व विचार थांबतात, तेव्हा त्या शून्यावस्थेच्या शेवटी एक अत्यंत तेजस्वी, लखलखीत असा 'नीळ बिंदू' निळा प्रकाशबिंदू दर्शन देतो, हा बिंदू म्हणजे आत्मस्वरूपाचेच एक प्रतीक आहे, ​२. विसावो आले पातले चैतन्य तेथे । पाहे पा निरुते अनुभवे ॥ ​भावार्थ: त्या नीळ बिंदूच्या ठिकाणी पोहोचल्यावर मनाला खरा विसावा "शांती" मिळते तिथे केवळ 'चैतन्य' परमात्मा उरते. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की, हे केवळ सांगण्याचे शब्द नाहीत, तर तू स्वत अंतर्मुख होऊन याचा अनुभव घेऊन पाहा, ही स्थिती अनुभवातूनच उमजणारी आहे, ​३. पार्वतीलागी आदिनाथे दाविले । ज्ञानदेवा फावले निवृत्तिकृपे ॥ ​भावार्थ: हे आत्मज्ञानाचे आणि निळ्या बिंदूचे गुपित सर्वात आधी आदिनाथ भगवान शंकर यांनी माता पार्वतीला सांगितले होते, तेच महान गुपित आणि तोच आत्मानुभव आज मला ज्ञानदेवांना माझे सद्गुरू निवृत्तीनाथ यांच्या कृपेमुळे सहज प्राप्त झाले आहे, ​ 🪷 ​हा अभंग 'साधनेचा' परमोच्च बिंदू दर्शवतो. जेव्हा साधक ध्यान लावतो, तेव्हा त्याला शून्यावस्थेत एक दिव्य प्रकाश दिसतो, ज्याला 'नीळ बिंदू' म्हणतात. ही अवस्था प्राप्त झाल्यावर मानवाचे मन पूर्णपणे शांत होऊन त्याला ईश्वरस्वरूपाची प्रचिती येते. ही अनुभूती गुरुविना प्राप्त होत नाही, हेच ज्ञानेश्वर महाराज अधोरेखित करतात. 🕉️🪷🕉️🪷🕉️🪷🕉️ #🙏गुरु महिमा😇 #🙏🏻हनुमान जी के भजन #🙏🏻आध्यात्मिकता😇 #🙏कर्म क्या है❓ #🙏गीता ज्ञान🛕
Chhaya Bharat
554 views
5 days ago
🕉️🪷🕉️🪷🕉️🪷🕉️ भगवंत तीन अंगाने आहे, एक म्हणजे सगुण रुपाने तो सर्वत्र नटलेला आहे, झाड फळ फुल पशु पक्षी मनुष्य प्राणी संपूर्ण ब्रह्मांड याच्याने नटलेला आहे, दुसरं त्याचे रूप प्रत्येकाच्या हृदयात गुप्तरूपाने तो बीज रुपाने आहे, व सर्व पशु पक्षी प्राणी झाड फुल फळ गुप्त रूपाने आहे, हे कधीही कुणाला समजणार नाही, तिसरे म्हणजे त्याचं निज स्वरूप चार भुजा पिवळे पितांबर नेसलेले हातात चक्र गदा शंख असा तो सुंदर गोजीर रूप प्रेमळ हास्य शेष नागावर झोपलेला साक्षात लक्ष्मी पायाजवळ बसलेले असं सुंदर गोड रूप असा भगवंत तीन स्वरूपात खूपच गोड आहे, आनंद वाटतो भगवंताच स्मरण जरी केलं तरी डोळ्यातून अश्रू सहज येतात कारण की त्याच्या शिवाय जीवनात काहीच नाही, 🕉️🪷🕉️🪷🕉️🪷🕉️ #🙏कर्म क्या है❓ #🙏🏻हनुमान जी के भजन #🙏गीता ज्ञान🛕 #🙏🏻आध्यात्मिकता😇 #🙏गुरु महिमा😇
Chhaya Bharat
539 views
5 days ago
🕉️🪷🕉️🪷🕉️🪷🕉️ ​॥ भाव भक्तीचा विसावा ॥ ​निरंतर राहू दे हृदयात तुझी भक्ती, तुझ्याच नामस्मरणाने मिळो मजला शक्ती, ​हे परमेश्वरा, तूच सुखाचा सागर, तुझ्या चरणी अर्पिते - हा जीवनाचे अत्तर. ​हे नारायणा, तूच विश्वाचा नियंता, मी सदैव तुझ्या भक्तित लीन राहु तू सदैव माझ्या सोबत रहा, ​हे सद्गुरुराया, तुझा हात सदा शिरावर असू दे, अंधाऱ्या वाटेवर तुझ्या मार्गदर्शनाचा प्रकाश दिसू दे. ​हेच मागणे देवा, नको कसलीही आस नको, सदा वसो हृदयात तुझी भक्ती आणि प्रेम, हे सद्गुरुराया! ​ ​नारायण - जो सर्वांचा आधार आहे, ​सद्गुरु जो अज्ञानाचा अंधकार दूर करून प्रकाशाकडे नेतो. ​निरंतर कधीही न संपणारे, अखंड. 🕉️🪷🕉️🪷🕉️🪷🕉️ ​ #🙏🏻आध्यात्मिकता😇 #🙏🏻हनुमान जी के भजन #🙏गीता ज्ञान🛕 #🙏कर्म क्या है❓
Chhaya Bharat
552 views
5 days ago
🕉️🪷🕉️🪷🕉️🪷🕉️ ​क्रोध क्षमाशक्ती ​माणसाचा क्रोध हा क्षणिक असतो, पण त्याचे परिणाम दीर्घकाळ टिकणारे असतात. रागाच्या भरात आपण दुसऱ्याला घाबरवू शकतो, त्यांच्यावर दरारा निर्माण करू शकतो, पण तिथे 'आदर' नसतो, फक्त 'भीती' असते. भीतीपोटी झुकलेली मान कधीही मनातून झुकलेली नसते, ​याउलट क्षमा हे वीरांचे लक्षण आहे. जेव्हा आपण एखाद्याला मनापासून क्षमा करतो, तेव्हा आपण केवळ समोरच्या व्यक्तीचा राग सोडून देत नाही, तर त्यांच्या मनात स्वतःबद्दल कायमचे स्थान निर्माण करतो. ​हृदय जिंकणे सामर्थ्याने शरीर जिंकता येते, पण प्रेमाने आणि क्षमेने समोरच्याचे हृदय जिंकता येते. जिथे क्षमा असते, तिथे शत्रुत्वाचे रूपांतर मैत्रीत होते. 🕉️🪷🕉️🪷🕉️🪷🕉️ ​ #🙏गुरु महिमा😇 #🙏कर्म क्या है❓ #🙏🏻हनुमान जी के भजन #🙏गीता ज्ञान🛕 #🙏🏻आध्यात्मिकता😇
Chhaya Bharat
538 views
5 days ago
🕉️🪷🕉️🪷🕉️🪷🕉️ ​सत्संगाचे माहात्म्य जिथे ईश्वराचा वास असतो ​सत्संग म्हणजे केवळ एकत्र बसणे नव्हे, तर 'सत्याचा संग' करणे होय. जेव्हा काही सात्त्विक मने एकत्र येऊन ईश्वराचे नामस्मरण किंवा चांगल्या विचारांची देवाणघेवाण करतात, तेव्हा तिथले वातावरण चैतन्याने भरून जाते ​देवदेवतांचा निवास असतो, की जिथे शुद्ध भावनेने सत्संग चालतो, तिथे प्रत्यक्ष देवदेवता सुद्धा अदृश्य रूपाने येऊन बसतात. कारण देवालाही भक्तांच्या प्रेमाची आणि शुद्ध विचारांची ओढ असते. ​मनाची शुद्धी ज्याप्रमाणे अग्नीच्या संपर्कात आल्यावर लोखंडाची घाण जळून जाते, त्याचप्रमाणे सत्संगात आल्यावर माणसाच्या मनातील विकार काम, क्रोध, लोभ गळून पडतात, आणि तिथे भक्तीचा उदय होतो, ​रागाच्या शस्त्राने माणसे तोडण्यापेक्षा, क्षमेच्या मायेने माणसे जोडणे जास्त महत्त्वाचे आहे. आणि हीच जोडलेली माणसे जेव्हा सत्संगात एकत्र येतात, तेव्हा तिथे प्रत्यक्ष वैकुंठ अवतरते. ​ 🕉️🪷🕉️🪷🕉️🪷🕉️ #🙏🏻आध्यात्मिकता😇 #🙏गीता ज्ञान🛕 #🙏कर्म क्या है❓ #🙏🏻हनुमान जी के भजन #🙏गुरु महिमा😇
Chhaya Bharat
521 views
8 days ago
मृत्यु -1 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ .......राजा परीक्षित जो होता अभिमन्यूचा मुलगा त्याला मरण्या अगोदर सात दिवस मिळाले होते, की सात दिवसात मरणार आहे, जसे समजले म्हणून त्या सात दिवसात परीक्षेत राजाने खूप काही तयारी केली, ........की मी सात दिवसात काय केले पाहिजे, त्यांनी पहिले आपला संसाराचा त्याग करून आपल्या मुलाला राज गादीवर बसवले, ते सात दिवस सर्व संत ऋषी यांना भेटले, गंगा नदीच्या तट वर बसले, ........आणि सर्व त्यांना प्रश्न विचारले..... की मी या सात दिवसात असे काय केले पाहिजे, जेणेकरून मला मुक्ती मिळेल, विचार करा परीक्षित राजाला एवढा प्रश्न पडला, आणि सात दिवसात पूर्ण आपली तयारी करून घेतली मोक्ष प्राप्त करण्याची, .........याच्यावर एक विचार करा की आपण कसली तयारी करतो, मृत्यूच्या अगोदर हा कधी आपल्याला प्रश्न पडला आहे का???? की आपण मृत्यूच्या अगोदर आपणही तयारी केली पाहिजे???? परीक्षीत राजाला तर सात दिवसा अगोदर त्यांचा मृत्यू समजला, ........आपल्याला तर कधीच समजत नाही, मग आपण कशी तयारी केली पाहिजे??? यावर आपण नक्कीच विचार करावा चिंतन करावे, आपण किती बेसावद पणे जीवन जगतो, आपल्याला आपली कसलेही पडलेले नाही, ........एक दिवस माझाही मृत्यू होईल आणि त्यासाठी मी काय तयारी केली पाहिजे???? सर्वांनी नक्की हा विचार करावा आपल्या भल्यासाठी आपल्याला अनमोल जीवन भेटले आहे यासाठी हे जीवन व्यर्थ जाऊ नये विनाकारण, ........सावंत सुखी विचार करा परीक्षेत राजाला साथ दिवसाच्या वेळ मिळाला आपल्याला कोणी वेळ देणार आहे विचार करा परीक्षीत राजा तर साक्षात भगवंताचा प्रसाद होते, म्हणून जन्माला आला आहात तर मृत्यू निश्चितच आहे, पण ते जीवन जगताना आपल्याला सुद्धा कुठेतरी जायचंय आपल्या गावी त्याच्या आधीच तयारी करा, .....…..आता आपण सुद्धा परीक्षीत राजासारखी तयारी करायची की नाही करायची मृत्यु अगोदर मृत्यूच्या अगोदर हे तुम्हीच ठरवा कारण की तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे निर्माते. 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ #🙏🏻हनुमान जी के भजन #🙏गीता ज्ञान🛕 #🙏गुरु महिमा😇 #🙏कर्म क्या है❓ #🙏🏻आध्यात्मिकता😇
Chhaya Bharat
466 views
12 days ago
​'हरिपाठ' या शब्दचा अर्थ ​ह — हरिनामाचा ध्यास लागता, मिळतो मनाला विसावा रि — रिकामी होते "मन" लाभे भक्तीचा पान्हा पा — पावन होई देह विठ्ठल चरणी लीन ठ — ठसुन भरला विठ्ठल हरिपाठात जन होई तल्लीन... असा हरिपाठचा अर्थ गोड ​हरिपाठ भवात म्हणुया ​विठू माऊलीच्या गजरात, दुमदुमतो हा हरिपाठ मुक्तीची ही सोपी वाट दावी भक्तीचा हा गजर ​अभंगांच्या ओळींतून पांडुरंग भेटतो अभंग अमृताच्या या शब्दांनी दु:ख सारा हा मिटतो ​ज्ञानेश्वरांच्या हरिपाठातुन मनामनात हा रुजतो हरिपाठाच्या या गोड अभंगातुन माणूस देवाशी जुडतो. 🕉️ #🙏कर्म क्या है❓ #🙏🏻हनुमान जी के भजन #🙏🏻आध्यात्मिकता😇 #🙏गुरु महिमा😇 #🙏गीता ज्ञान🛕