फॉलो करा
मराठीचे शिलेदार (राहुल पाटील)
@rahul7385363088
89,684
पोस्ट
23,095
फॉलोअर्स
मराठीचे शिलेदार (राहुल पाटील)
451 जणांनी पाहिले
रायगडच्या शेतकऱ्यास "वालीच" नाही; ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर प्रतिनिधी अलिबाग बिनधास्त न्यूज नेटवर्क अलिबाग: रायगड जिल्ह्यातील शेतकरी संकटात आहे . त्यास निसर्गाचा लहरीपणा , , क्रुषी खात्याच्या मार्गदर्शनाचा अभाव , मजुरांचा तुटवडा , वाढते मजुरीचे दर ' ' महागडी कीटकनाशक औषधे तसेच शासनाचे दुर्लक्ष ही कारणे जाणवतात. चालू वर्षी पावसाचे आगमान वेळेपूर्वी ( मे महिन्यातच ) झाले . शिवा य तो भरपूर पडला. अतिव्रुष्टी, वादळी वारे , महापूर ही संकटे असूनही पिकांची वाढ चांगल्या प्रकारे झाली म्हणून रायगडचा शेतकरी खूश होता , त्याने गौरी -गणपतीचा सणआनंदाने साजरा केला. शेतातील *कणसे* जोमदार भरल्यामुळे नवरात्रही उत्साहात साजरी केली . मोठ्या प्रमाणात धान्य घरात येईल म्हणून वर्षभरातील खार्चाचे नियोजन करीत होता (घर दुरुस्ती, लग्नकार्य , बैलजोडी खरेदी इ .)) . पण .कोजागिरी पौर्णिमेच्या आसपास पर्जन्य व्रुष्टी झाली. सोसाट्याचे वारेही वाहू लागले , शेतात पाणीचपाणी झाले. परिपक्व कणसे शेतात झोपवली. पाऊस थांबण्याचे नाव घेत नव्हता. कणसे पाण्यात राहिल्यामुळे पेंढा कुजला. कणसातील भातही काळेठिक्कूर पडून कवडीमोलाचे झाले . *छाप्याचे* प्रमाणही वाढले. .काही ठिकाणी भाताला कोंब आले. शेतकरी धास्तावला.. लाणी - बांधणीचा हंगाम , मजुरांचा तुटवडा शिवाय अव्वाच्या सव्वा मजुरी यामुळे काहींनी शेती कापलीच नाही . अशा परिस्थितीत शेतकऱ्याच्या पदरात गतवर्षाच्या तुलनेने ५० टक्केही धान्य पडले नाही . * भिजके भात *या सदराखाली धान्य खरेदी केंद्रावरही त्या भाताच्या खरेदीस नकार मिळत होता . या सँकटाला तोंड कसे द्यावे , , वर्षभराच्या "पोटगी" चा प्रश्न कसा सोडवावा ( कारण शासनमान्य धान्य दुकानात काहीनाच मोफत धान्य मिळते . ) शेतीची वर्षभरातील मशागत कशी करावयाची , हा यक्षप्रश्न शेतकऱ्यापुढे उभा राहिला आहे . *शासनाचा नन्नाचा पाढा* कोजागिरी पौर्णिमेनंतर सतत पडलेला पाऊस नुकसानकारक ठरल्यामुळे शेतकरी हताश झाला. शासनाकडून नुकसान भरपाई मिळेल या आशेमुळे महसूल विभागाकडून शेतकरी असल्याचा अधिक्रुत परवाना मिळविला , क्रुषिअधिका-यासमक्ष "पंचनामे" केले गेले " , समजुतीसाठी " (?) "फोटो"सेशनही केले गेले . पंचनामे नुकसानग्रस्त शेताच्या फोटोसह . ग्राम पंचायत अधिकारीमार्फत क्रुषी अधिकारी कार्यालयाकडे पाठविण्याचा *सोपकार "[केला गेला . तालुका क्रुषी कार्यालयात पंचनाम्याच्या कागदपत्रांचे ढीग साठले. "बिचारा" शेतकरी नुकसान भरपाईची वाट पाहू लागला. संबंधित कार्यालयाचे उँबरठे झिजवू लागला . पण व्यर्थ ! शासनाने रायगड च्या शेतकऱ्यास पाने पुसली *क्रुषी अधिका-यांची पाठ* शेतकरी शेती करतो. तोंती ' नेहमीच तोट्यात असते. म्हणून खर्चाची तोंड मिळवणी करण्यासाठी तो फलोतूपादनाकडे वळला आहे . त्याने आंबा लागवडीस प्राधान्य दिले आंबा कलमाँची . चांगल्या प्रकारे निगा राखल्यामुळे ती कलमे बहरून मोहोर येऊ लागला . पण दुर्दैव असे की अलिकडे ३ -४ वर्षे भरपूर मोहोर येतो पण काही दिवसांनी तो करपतो . अगदी कोळसा होतो . (याबाबत क्रुषी विभागाकडून सःशोधन होणे गरजेचे आहे .) महागडी कीटकनाशक औषधे खरेदी करून फवारणी केली जाते . परंतु ३ - ४ वेळा फवारणी करूनही फळधारणा होत नाही . याबाबत शासनाचे क्रुषी खातेही गप्प आहे . ३ - ४ वेळा फवारणी करूनही फळधारणा होत नाही , याबाबत शेतकऱ्यास शास्त्रीय कारणे कळण्यासाठी गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात जिल्हा अधिक्षक क्रुषी अधिकारी श्रीमती वंदना शिंदे यांना त्यांच्या कार्यालयात भेटून **मी* चर्चा केली. तसेच शास्त्रीय कारणे शेतकऱ्यांना कळण्यासाठी शिबिर वाघोली (ता, आलिबाग) येथे आयोजित करण्याबाबत विनंती केली. लगेचच क्रुषी अधिक्षक म्हणाल्या " पुढील आठवड्यात शिबिर वाघोली येथे आयोजिले जाईल " . पण वर्ष उलटून गेले तरी शिबिराला *मुहुर्तच* मिळत नाही . * संकटग्रस्त शेतक-याच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करणे हे जिल्हा अधिक्षक क्रुषी अधिक्षक कार्यालयाचे काम आहे . . पण - - - - ? * *आंबा लागवडीला प्राधान्य* शेतीपूरक व्यवसाय म्हणून रायगडचा शेतकरी आंबा लागवडीकडे वळला आहे . तोंडली , कारळी , शिराळी , दुदी तसेच पाँढरा कांदा लागवडीकडेही तो झुकला आहे . फळ लागवड व भाजीपाला दूषित हवामानास बळी पडत आहे.आंबा पिकाचे फारच नुकसान होत आहे , साधारणतः नोव्हेंबर -डिसेंबरमध्ये आंबा मोहोरताच शेतकरी आनंदित होतो . पण लगेचच तो करपतो. जपणुकीसाठी तो हजारो रुपये मूल्याची महागडी औषधे खरेदी करतो. मजूर (आदिवासी ) शोधतो. त्यांची महागडी मजुरी आदा करतो.चहा ,*पाणी* , नाष्टा इ. ची व्यवस्था करतो. आणि तीन -तीन फवारण्या करून घेतो. व जानेवारी - फेब्रुवारी मध्ये मोहोर करपलेला - ( अक्शरशं*कोळसा* झालेला ) मोहोर त्याच्या द्रुष्टीस पडतो . बिचा-या शेतकऱ्याचे हजारो रुपये पाण्यात जातात .काय वाटत असेल त्या शेतक-याला ? गेली तीन -चार वर्षे हा प्रकार घडतो आहे अनेकवेळा फवारणी करुनही *मोहोर* करपतो.यावर *तज्ञ* क्रुषी अधिका-यांकडून मार्गदर्शन मिळण्यासाठी . गतवर्षी साधारणतः फेब्रुवारी महिन्यात *मी* जिल्हा अधिक्षक क्रुषी अधिकारी श्रीमती वंंदना शिंदे यांना त्यांच्या कार्यालयात भेटलो. सर्व परिस्थिती विदित केल्यानंतर त्या क्रुषी अअधिकारी म्हणाल्या " ,*या बाबत संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीला मी *वाघोली* ( ता. अलिबाग) येथे येते .शिबिर आयोजित करून सर्व शंकंचे निरसन केले जाईल " . पण वर्ष उलटून गेले तरी त्या अधिका-यास *मुहूर्त* मिळालेला नाही . बदलत्या हवामानावर मात कशी करावी , .आधुनिक पद्धतीने भातशेती कशी करावी , फलोत्पादन कसे वाढावावे , तरुण मुले शेती व्यवसायाकडे कशी आकर्षित होतील , याबाबत जिल्हा अधिक्षक क्रुषी अधिकारी व त्यांचे सहकारी सदैव जाग्रुत राहिल्यास रायगडचा शेतकरी शेतीत नक्की क्रांती करील पण - - - - ?
मराठीचे शिलेदार (राहुल पाटील)
522 जणांनी पाहिले
शेतकऱ्यांच्या हितासाठी आ. मुनगंटीवार यांचा यशस्वी पाठपुरावा अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा आ.मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री व केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मानले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि केंद्रीय मंत्री गिरिराजजी सिंह यांचे आभार जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर चंद्रपूर : शेतकऱ्यांच्या अडचणींप्रती कायम संवेदनशील भूमिका घेणारे राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आ. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे कापूस खरेदीसाठीची अंतिम मुदत २७ फेब्रुवारीवरून १५ मार्च २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे कापूस काढणीस उशीर झाल्याने एमएसपीचा लाभ घेण्यापासून वंचित राहण्याची भीती असलेल्या शेतकऱ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री ना.गिरिराजजी सिंह यांच्याकडे पत्र व दूरध्वनीद्वारे केलेल्या प्रभावी पाठपुराव्यामुळे हा निर्णय शक्य झाला असून, याबद्दल आ. मुनगंटीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांचे आभार मानले आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी यापूर्वीच कापूस खरेदीची अंतिम मुदत वाढविण्याची मागणी मुख्यमंत्री तसेच भारतीय कपास निगम (सीसीआय) मुंबईचे चेअरमन श्री. ललितकुमार गुप्ता यांच्याकडे केली होती. राज्यातील विविध भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतजमिनीत ओलावा कायम राहिल्याने कापूस वेचणी व काढणीला मोठा विलंब झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यासह विदर्भातील अनेक भागांत शेतकऱ्यांच्या घरी अद्याप कापूस पोहोचलेला नसल्याने एमएसपी अंतर्गत विक्री करण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. यासंदर्भात आ. मुनगंटीवार यांनी आग्रही मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आ. मुनगंटीवार यांना निवेदन सादर करून समस्या मांडल्या होत्या. त्या निवेदनाची तातडीने दखल घेत आ. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र पाठवत तसेच केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराजजी सिंह यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत मुदतवाढीची मागणी लावून धरली. त्यांच्या या पाठपुराव्यामुळे अखेर कापूस खरेदीसाठी १५ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, सीसीआयमार्फत सुरू असलेल्या खरेदी प्रक्रियेत एकही शेतकरी वंचित राहू नये यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना देण्याची मागणीही आ. मुनगंटीवार यांनी केली आहे. वाढीव मुदतीच्या कालावधीत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करून एमएसपीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही आ. मुनगंटीवार यांनी केले आहे. राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून, आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या संवेदनशील व प्रभावी नेतृत्वामुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
मराठीचे शिलेदार (राहुल पाटील)
395 जणांनी पाहिले
सावित्रीबाई फुले विद्यालय पवनी येथे राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा थोर भारतीय शास्त्रज्ञ डॉ.सी.व्ही.रमन यांनी आजच्या दिवशी रमन इफेक्ट चा शोध लावला पवनी शहर प्रतिनिधी बिनधास्त न्यूज मिडीया भंडारा/पवनी: (दि २८) येथील सावित्रीबाई फुले विद्यालय पवनी येथे राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.डाॅ.रमन यांच्या प्रतिमेचे पुजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.यावेळी शालेय विद्यार्थांनी विविध प्रकारच्या वैज्ञानिक प्रयोग सादर केले.तसेच वैज्ञानिक कुतुहल जाणुन घेतले.राज्य पुरस्कृत शिक्षक अशोक गिरी यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी मार्गदर्शन केले.सुत्रसंचालन विज्ञान शिक्षिका विना जिभकाटे यांनी केले तर आभार प्रदर्शन विज्ञान व गणित शिक्षिका मानसी ठवकर यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक वृंद व विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले. थोर भारतीय शास्त्रज्ञ डॉ.सी.व्ही.रमन यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी रमन इफेक्ट चा शोध लावला.त्यामुळे समुद्राचे पाणी निळे का दिसते.हे सत्य उलगडले.तसेच प्रकाशाचे परावर्तन या शोधामुळे त्यांना भारत सरकारने विज्ञान क्षेत्रातील नोबेल पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला.तसेच नोबेल पुरस्कार मिळवणारे ते आशिया खंडातील पहिले भारतीय होते.त्यांच्या वैज्ञानिक गौरवार्थ दरवर्षी संपूर्ण भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो.
मराठीचे शिलेदार (राहुल पाटील)
437 जणांनी पाहिले
मिश्रा भारत वैभव पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून कार्यरत नागपूर: (दि २८) भारत वैभव पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते मनोज मिश्रा यांच्या वाढदिवसानिमित्त एक विशेष कार्यक्रम आज (१ मार्च) रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम मुंबईत दुपारी १२ वाजता. धनराज महाल बिल्डिंग, गेट ऑफ इंडिया, कार्यालय क्रमांक २ जवळ, मुंबई येथे आयोजित केला जाणार आहे. त्यासाठी पक्षातील सर्वांनी व अधिकारी व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहून शुभेच्छा द्याव्यात. असे आवाहन नागपुरातील कोराडी येथील जितेंद्र चौबे यांनी केले आहे. याप्रसंगी अशोक पाल, सुमन पांडे, अजय मिश्रा, लाल शर्मा, रमेश पांडे, कृष्णकुमार पांडे, जितेंद्र चौबे, सुनीता यादव, देवेंद्र गौतम आणि धीरज मारबते उपस्थितीत राहतील. असे भारत वैभव पार्टीचे सरचिटणीस राजरतन सिंह यांनी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.
मराठीचे शिलेदार (राहुल पाटील)
418 जणांनी पाहिले
दोन शब्द कृतज्ञतेचे, आभारीय शब्दसुमनांचे.... आज सकाळीच आ. राहुल दादांचा फोन संदेश "तुमचा फोटो पाठवा "वाचण्यात थोड्या वेळाने आला, पण मनाला सुखावून गेला.. का कुणास ठाऊक माहीत नाही.. परंतु मनोकामना पूर्ण होत राही.. कल्पवृक्षचं जणू हा शिलेदार समूह, त्यास अजून तरी तोड नाही...खुपदा मनी वसे ते स्वप्नी दिसे.. सत्यात प्रत्यक्ष अवतरलेले असे...माझ्या बाबतीत तरी घडत गेले आहे. आणि माझी मनिषा पूर्ण झाली आहे. असेच इतरांच्या बाबतीत ही घडत असावे यात तिळमात्र शंका नाही. असे माझे वैयक्तिक मत आहे. या सप्ताहात माझ्या या पूर्वी "धाक तो धाक" या वास्तववादी काव्य रचनेलाही ' सर्वोत्कृष्ट रचना' म्हणून सर्वोत्कृष्ट रचनेचे स्थान देऊन सन्मानित करण्यात आले आहे. आणि काल माझ्या 'बोलू या मराठी' या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त बालकाव्यास आजची सर्वोत्कृष्ट रचना या सदरात सन्मानित करण्यात आले आहे. आदरणीय राहुल दादांची दूरदृष्टी आणि मराठी भाषेविषयी असलेले अतोनात प्रेम, भाषा विकास व संवर्धन, अभिजात दर्जा मिळवण्यासाठी घेतलेले अथक परिश्रम त्यांच्या कार्यातून दिसून येते. त्यांच्या समवेत असलेले सर्व शिलेदार समूहातील सह प्रशासक टीम सदस्य यांचीही तळमळ मोलाची आहे. या सिंधूत माझ्यासारख्या बिंदूला माय मराठीची गोडी निर्माण करून सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली. आज मी कविवर्य म्हणून माझा जो नामोलेख होतो ते केवळ आणि केवळ शिलेदार समूहामुळेचं. त्याबद्द्ल मराठीचे शिलेदार समूहाचे मुख्य प्रशासक, आधारस्तंभ, कल्पवृक्ष, आदरणीय राहुल दादा, सचिव आदरणीय पल्लवीताई पाटील, मुख्य परीक्षक आ. सविताताई ठाकरे. आ. तारकाताई रुकमोडे , आ, स्वातीताई मराडे, आ. वृंदाताई करमरकर, आ.शर्मिलाताई देशमुख, आ. प्रतीमाताई नंदेश्वर, आ. विष्णू दादा संकपाळ, अशोक लांडगे सर, संग्राम कुमठेकर दादा, अरविंद उरकुडे सर यासह सर्व संकलक, परीक्षक, सहपरिक्षक, सह प्रशासक आपणा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. तसेच काव्य लिखाणासाठी प्रेरक प्रतिक्रिया देऊन लिखाणास प्रोत्साहित करून बळ वाढवणाऱ्या शिलेदार समूहातील सर्व ताई दादांचे मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद देऊन सदैव शिलेदार समूहाच्या ऋणात राहणे पसंत करतो. अशीच प्रेरणा पाठीशी राहावी व माय मराठीची सेवा करण्याची संधी उपलब्ध व्हावी. या मनोकामनेसह ईश्वर चरणी प्रार्थना करतो व माझे लांबलेले मनोगत पूर्णविराम देतो. *बी एस गायकवाड* *पालम, परभणी* *सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
मराठीचे शिलेदार (राहुल पाटील)
377 जणांनी पाहिले
आभारीय मनोगत; प्रसिद्ध कवी डॉ संजय पाचभाई, नागपूर ➿➿➿➿💥🫟💥➿➿➿➿ माझ्या 'अभिमान मराठी' या त्रिवेणी काव्याला सर्वोत्कृष्ट येण्याचा मान दिल्याबद्दल आदरणीय राहुल सर, परीक्षक मंडळ आणि समूहातील माझे सहकारी यांचे मनःपूर्वक धन्यवाद. दिनांक २७ फेब्रुवारी २०२३ हा दिवस माझ्यासाठी सोनियाचा दिवस होता. या दिवशी मराठीचे शिलेदार समूहाचे कविसम्मेलन होते आणि त्यात मला अध्यक्ष पदाचा सन्मान मिळाला होता त्याबद्दल आजन्म मी राहुल सरांचा आणि त्यांच्या संपादकीय चमूचा ऋणी आहो.अन् बरोबर तीन वर्षानी त्याच दिवशी माझ्या त्रिवेणी काव्याला सर्वोत्कृष्ट स्थान मिळाले हा दुग्ध शर्करा योग आहे. काळ हेच औषध असते असे म्हणतात हे खरे असेलही पण ज्याचे जळते त्यालाच कळते हे मात्र खरे आहे. २८|२|२३ माझ्या आयुष्याचा खडतर प्रवास सुरू झाला याच दिवशी न्यायालयाची पहिली तारीख आणि माझ्या पत्नीचा सगळ्यात पहिले बयान न्यायालयात नोंदणार होता. माझा मुलगा, पत्नी आणि मी तिघेही कविसम्मेलनाला उपस्थित होतो. पण आमची मानसिक अवस्था आम्हालाच माहीत होती. मी तब्बल अठरा मिनिटे भाषण दिले सगळ्यांनी टाळ्या वाजवून कौतुक केले. दुःखातही चेहर्‍यावर आनंद व्यक्त करण्याची कला मला अवगत आहे अगदी त्या सर्कशीतील विदुषकासारखी....!! "आनंदी दिसलो तरी ती जखम अजून ओली आहे कधी कधी वारे वाहते आठवणींचे तेव्हा कळते वेदनांची किती खोली आहे." संपूर्ण 'मराठीचे शिलेदार समूह' त्यावेळी माझ्या पाठीशी उभा राहिला त्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. मला त्रिवेणी, हायकू आणि बाल काव्य लिहायला अवघड जाते म्हणून मी सहसा त्या समूहात डोकावत नाही. कमी शब्दात पूर्ण भाव व्यक्त करणे हे त्रिवेणी आणि हायकू याची खासियत आहे आणि बाल काव्यात तर स्वतः लहान मुल होऊन लिहावे लागते तिथे कल्पना विश्वाला खूप कमी जागा असते आणि समजा कल्पना मांडल्या तर त्या अवांतर वाटतात बाकी काव्यात कल्पनेच्या विश्वात मी मस्त धुडगूस घालतो, तीन चार रचना तर सहज लिहितो, मला माहिती असते त्यातील एखादीच रचना ठिकठाक असते पण काय करू लिहितो. त्याचे कारण असे की जे सुचते ते तसेच लिहितो शब्दांच्या प्रसव कळांना मी थांबवत नाही नाहीतर भावनांचा गर्भपात व्हायची भीती असते. आणि ज्यावेळी काहीच शब्द सुचत नाही तेव्हा होणारा त्रास मी अनुभवला आहे,त्यामुळे मी वाटते ते जसेच्या तसे लिहितो. असो सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद करून आपले आभारीय मनोगत थांबवतो. ➿➿➿➿📗💥📗➿➿➿➿ डॉ. संजय भानुदास पाचभाई ता. जि नागपूर सदस्य, मराठीचे शिलेदार समूह
See other profiles for amazing content