फॉलो करा
Vaibhav Mhatre
@v30061997m
2,415
पोस्ट
1,705
फॉलोअर्स
Vaibhav Mhatre
2K जणांनी पाहिले
#इतिहास छत्रपतींचा ⛳ #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष ⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳ #२_फेब्रुवारी_१६६१ मुघल सरदार कारतलबखान हा मोठ्या फौजेनिशी कोकणातील नागोठणे, चौल, पेण ही ठाणी काबीज करण्यासाठी शाहीस्तेखानाच्या हुकुमावरून निघाल्याची बातमी छत्रपती शिवरायांना मिळाली.कारतलबखान हा उंबरखिंडीतून नागोठण्याला उतरणार होता.खानासोबत माहूरची प्रख्यात देशमुखीन "सावित्रीबाई उदाराम उर्फ पंडीता रायबागन" ही शूर स्त्री देखील होती. महाराज मावळ्यांना घेऊन आधीच उंबर खिंडीत जाऊन खिंड अडवून उभे राहीले. खान आला पण त्याने शिवरायांचा परत जायचा आदेश धुडकावून लावला. मग मराठ्यांनी मुघलांवर हल्ला चढवला, मुघलांची भयंकर लंगडतोड चालू झाली. त्यांना त्या घोर जंगलात लढताही येईना व पळताही येईना, या अरण्याचे नाव "तुंगारण्य". अखेर खान शरण आला, त्याचा प्रचंड पराभव झाला. प्रचंड दौलत व सैन्य वाया घालवून कारतलबखान कसाबसा जीव वाचवून पुण्यात परतला.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇 #२_फेब्रुवारी_१६८२ छत्रपति शिवरायांच्या मृत्यूनंतर दख्खन स्वारीवर आलेल्या औरंगजेबाची पहिली चढाई. नाशिक जवळील 'रामशेज' किल्ल्यावर जोरदार हल्ला. मात्र मराठा किल्लेदार 'रंभाजी पवार' यांनी किल्ला १-२ महिने नव्हे तर तब्बल ६ वर्षे नेटाने लढवला. अखेर १६८८ मध्ये हा किल्ला सुद्धा फितुरी करून मुघलांनी जिंकला...🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभूराजे ⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳
Vaibhav Mhatre
625 जणांनी पाहिले
#इतिहास छत्रपतींचा ⛳ #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष ⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳ #१_फेब्रुवारी_१६७६ छत्रपती शिवरायांनी पाली गावचा तंटा मिटवला. 🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇 #१_फेब्रुवारी_१६८९ मराठा साम्राज्याच्या इतिहासातील अत्यंत काळा दिवस. स्वराज्याचे दुसरे छत्रपती, शिवरायांचा छावा व आऊसाहेब जिजाऊंचा शंभूबाळ, म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज दक्षिण कोकणातील "संगमेश्वर" येथे मुघलांकडून कैद झाले. आणि इथूनच सुरूवात झाली ती शंभूराजांवर अमानुष अत्याचाराची. औरंगजेबने अत्यंत निर्दयी आणि क्रूरपणे संभाजीराजांचे हाल केले व पुढे ११ मार्च १६८९ रोजी त्यांची हत्या केली. 🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇 #१_फेब्रुवारी_१६८९ धुरंदर "संताजी घोरपडे" यांचे वडील "मालोजी घोरपडे" हे संभाजीराजेंना पकडताना झालेल्या वादात मुघलांकडून मारले गेले. सरसेनापती "हंबीरराव मोहीते" यांच्या निधनानंतर संभाजीराजेंनी "मालोजी घोरपडे" यांना सरसेनापतीपद दिले होते. 🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇 #जय_जिजाऊ जय_शिवराय जय_शंभूराजे ⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳
Vaibhav Mhatre
711 जणांनी पाहिले
#इतिहास छत्रपतींचा 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #३१_जानेवारी_१६६१ मुघल सरदार कारतलबखान हा मोठ्या फौजेनिशी कोकणातील नागोठणे, चौल, पेण ही ठाणी काबीज करण्यासाठी शाहिस्तेखानच्या हुकुमावरून निघाल्याची बातमी शिवरायांना मिळाली. शिवराय आधिच उंबरखिंडीत जावून खिंड अडवून उभे राहिले होते 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #३१_जानेवारी_१६६३ शिवाजी महाराजांनी शामराजपंतांना पत्र पाठवले. स्वराज्यात असलेला बुलंद बांका गड म्हणजे कोंढाणा गड. शाहिस्तेखानाने गडावर फितुरी माजवून गड ताब्यात घेण्याची योजना आखली आहे अशी बातमी शिवरायांना लागली. कोंढाणा हातचा जाणे म्हणजे पुणे प्रांतच गमावून बसण्यासारखे होते. शिवराय अस्वस्थ झाले नि त्यांनी शामराजपंतांना गडाबाबत काळजी व धैर्य निर्माण करण्यासाठी पत्र पाठवले. शिवरायांनी तातडीने केलेल्या हालचालीमुळे कोंढाणा शाहिस्तेखानाच्या घशात जाऊ शकला नाही. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩 #३१_जानेवारी_१६८९ छत्रपती संभाजी राजेंचा संगमेश्वर चा मुक्काम लवकरच हलणार होता, पण काही अशुभ संकेत होण्याची चाहूल येसुबाई राणी सरकार यांच्या मनाला लागून होती. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #३१_जानेवारी_१६७० राजगडावर कोंढाणा घेण्यासाठीच्या हालचाली वाढल्या, जो कोंढाणा पुरंदरच्या तहात मुघलांच्या ताब्यात गेला तो कोंढाणा तानाजी मालुसरे स्वराज्यात पुन्हा आणण्यासाठी मावळ्यांची फौज उभी करत होते, लवकरच कोंढाणा घेतल्याची गोड बातमी राजांना कळणार होती. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभुराजे 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Vaibhav Mhatre
635 जणांनी पाहिले
#इतिहास छत्रपतींचा 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #३०_जानेवारी_१६४२ शहाजी राजे कर्नाटकास जातात. माहुलीच्या पराभवानंतर शाहजी राजे रणदुल्लाखान सोबत विजापुरास गेले, त्यांना आदिलशाहकरिता काम करायला मिळणार होते पण कडक जाचाखाली. लगेच त्यांना रणदुल्लाखान बरोबर कर्नाटकात पाठवले गेले, त्यांना कर्नाटकात पाठवल्यानंतरचे पहिले पत्र ३० जानेवारी १६४२ सालचे आहे व ते आदिलशाहने शहाजीराजांना लिहीले आहे. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩 #३०_जानेवारी_१६८० शिवाजी महाराजांच्या फौजा खांदेरी उंदेरी बेटावर तटबंदीचे काम अहोरात्र करत होत्या, इंग्रजांच्या तोफा आग् ओतत होत्या, आम्ही बेट देणार नाही असे बेटावरील मराठे इंग्रजांना व सिद्धीला ठणकावून सांगत होते. अखेर बेटावरील मराठ्यांच्या मदतीला दौलतखान आरमारासह पोहोचला यामुळे इंग्रजांना माघार घ्यावी लागली. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩 #३०_जानेवारी_१६८१ संभाजी महाराज यांनी बुऱ्हाणपूर शहराच्या तटबंदीबाहेरील बहादूरपुरा व इतर सतरा पूरे यातून अलोट संपत्ती मिळविली. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩 #३०_जानेवारी_१६८९ छत्रपती संभाजी राजांचा आणि कवी कलशांचा मुक्काम रत्नागिरी च्या कसबा संगमेश्वरी पडला तो सरदेसाई यांच्या वाड्यामध्ये , मोजक्या सैन्यासोबतचा हा मुक्काम काही दिवसात हलणार होता. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #३०_जानेवारी_१७१५ कान्होजी आणि सिद्दी यांमध्ये तह:- सातारकर छत्रपतींची कोकणची जहागीर मोगलांपासून सुरक्षित राखण्याची जबाबदारी छत्रपती पहिले राजाराम यांनी सिधोजी घोरपडे यांचेवर सोपविली होती, परंतु हे जोखमीचे काम घोरपडे पार पाडू शकले नाही आणि पुढे ही जवाबदारी कान्होजींवर आली. मोगलांच्या जुलमापासून मुक्त केलेल्या कोकणातील जहागिरीला राजमुद्रेची संमती मिळाली, म्हणून कान्होजी आंग्रे यांचे समाधान झाले; तर आपले हितसंबंध राखण्यासाठी आपला एक कर्तबगार प्रतिनिधी आपण कोकणासाठी मिळविला, असे समाधान शाहू छत्रपतींना झाले. ३० जानेवारी १७१५ मध्ये कान्होजी आणि सिद्दी यांमध्ये तह झाला त्यात १. मामलत तळे व गोरेगाव, गोवेळ व निजामपूर या महलांवर आंग्रे यांना एक हजार रुपये कर मिळाला. तळेपैकी ८००, गोरेगाव ६००, गोवळ १०००, तर्फ निजामपूर १७५ मिळून रुपये २५७५ पैकी १००० रूपये कान्होजींना मिळाले. २. तर्फ नागोठणे, अष्टमी पाली, आश्रेधार पेटा व अंतोणे यांतील निम्मा वसूल कान्होजींनी घेण्याचे ठरले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभुराजे 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 less
Vaibhav Mhatre
648 जणांनी पाहिले
#इतिहास छत्रपतींचा 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #३०_जानेवारी_१६४२ शहाजी राजे कर्नाटकास जातात. माहुलीच्या पराभवानंतर शाहजी राजे रणदुल्लाखान सोबत विजापुरास गेले, त्यांना आदिलशाहकरिता काम करायला मिळणार होते पण कडक जाचाखाली. लगेच त्यांना रणदुल्लाखान बरोबर कर्नाटकात पाठवले गेले, त्यांना कर्नाटकात पाठवल्यानंतरचे पहिले पत्र ३० जानेवारी १६४२ सालचे आहे व ते आदिलशाहने शहाजीराजांना लिहीले आहे. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩 #३०_जानेवारी_१६८० शिवाजी महाराजांच्या फौजा खांदेरी उंदेरी बेटावर तटबंदीचे काम अहोरात्र करत होत्या, इंग्रजांच्या तोफा आग् ओतत होत्या, आम्ही बेट देणार नाही असे बेटावरील मराठे इंग्रजांना व सिद्धीला ठणकावून सांगत होते. अखेर बेटावरील मराठ्यांच्या मदतीला दौलतखान आरमारासह पोहोचला यामुळे इंग्रजांना माघार घ्यावी लागली. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩 #३०_जानेवारी_१६८१ संभाजी महाराज यांनी बुऱ्हाणपूर शहराच्या तटबंदीबाहेरील बहादूरपुरा व इतर सतरा पूरे यातून अलोट संपत्ती मिळविली. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩 #३०_जानेवारी_१६८९ छत्रपती संभाजी राजांचा आणि कवी कलशांचा मुक्काम रत्नागिरी च्या कसबा संगमेश्वरी पडला तो सरदेसाई यांच्या वाड्यामध्ये , मोजक्या सैन्यासोबतचा हा मुक्काम काही दिवसात हलणार होता. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #३०_जानेवारी_१७१५ कान्होजी आणि सिद्दी यांमध्ये तह:- सातारकर छत्रपतींची कोकणची जहागीर मोगलांपासून सुरक्षित राखण्याची जबाबदारी छत्रपती पहिले राजाराम यांनी सिधोजी घोरपडे यांचेवर सोपविली होती, परंतु हे जोखमीचे काम घोरपडे पार पाडू शकले नाही आणि पुढे ही जवाबदारी कान्होजींवर आली. मोगलांच्या जुलमापासून मुक्त केलेल्या कोकणातील जहागिरीला राजमुद्रेची संमती मिळाली, म्हणून कान्होजी आंग्रे यांचे समाधान झाले; तर आपले हितसंबंध राखण्यासाठी आपला एक कर्तबगार प्रतिनिधी आपण कोकणासाठी मिळविला, असे समाधान शाहू छत्रपतींना झाले. ३० जानेवारी १७१५ मध्ये कान्होजी आणि सिद्दी यांमध्ये तह झाला त्यात १. मामलत तळे व गोरेगाव, गोवेळ व निजामपूर या महलांवर आंग्रे यांना एक हजार रुपये कर मिळाला. तळेपैकी ८००, गोरेगाव ६००, गोवळ १०००, तर्फ निजामपूर १७५ मिळून रुपये २५७५ पैकी १००० रूपये कान्होजींना मिळाले. २. तर्फ नागोठणे, अष्टमी पाली, आश्रेधार पेटा व अंतोणे यांतील निम्मा वसूल कान्होजींनी घेण्याचे ठरले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभुराजे 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 less
Vaibhav Mhatre
574 जणांनी पाहिले
#इतिहास छत्रपतींचा 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२८_जानेवारी_१६४५ शिवरायांचा निकाल उभ्या दक्खन देशातील लोकांनी पाहिला 'हिंदवी स्वराज्य स्थापन होण्यापुर्वीच स्वराज्याचा कडक नियम काय आहे हे लोकांना कळले. बालशिवबा संतापले ! त्याना ते सहनच झालं नाही. पुण्यातील खेड-शिवापुराजवळच्या रांझाच्या पाटलाने बदअमल केला ! बदअमल म्हणजे एका परस्त्रीवर बलात्कार केला ! त्या पाटलाचे नाव बाबाजी भिकाजी गुजर आणि शिवबांना हें समजलें ! परस्त्रीला केवळ आई मानणाऱ्या शिवबाच्या मुलखांत पाटलासारख्या एका जबाबदार अधिकाऱ्यांने हा रावणशाही गुन्हा केलेला समजतांच शिवबा संतापले, स्वराज्याच्या जन्माआधीच जर असे हलकट चाळे आपले अधिकारी करतील तर स्वराज्य निर्माण झाल्यावर मग काय काय करतील ? स्त्री ही मराठ्यांच्या देव्हाऱ्यातील देवता आहे मग ती कोणत्याही जातिधर्माची असो, आमच्या मुजऱ्याचा पहिला मान स्त्रीजातीला आहे, ती आई आहे ! शिवबानी ताबडतोब ढालाईत हशम रांझ्यावर रवाना केले, हुकूम केला, बाबाजी पाटलाला जेरबंद करा ! पाटील गिरफ्तार झाला, लोकांना लाल महालातल्या न्यायी सदरेची ओळख पटली, पाटलाला शिवबाच्या पुढे हाजीर करण्यांत आलें शिवबाराजांनी गुन्ह्याची रीतसर चौकशी केली, गुन्हा शाबीत झाला आणि शिवबाने कडकडून हुकूम सोडला , 'कोपरांपासून पाटलाचे दोन्ही हात आणि गुडघ्यापासून दोन्ही पाय तोडून टाका , याची पाटीलकी जप्त करा !!' तो दिवस होता.. २८ जानेवारी १६४५☝️ यावेळी शिवबाराजांचे वय होते फक्त १५ वर्षे☝️ 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२८_जानेवारी_१६८१ छत्रपती संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूरावर छापा टाकला. उत्तरेकडील आग्रा व दिल्ली ही शहरे म्हणजे मुघलांची सर्वात वैभवसंपन्न नगरे, होय राजांनी राज्याभिषेकानंतर अवघ्या १२ दिवसात हा छापा टाकला. रायगड ते बुऱ्हाणपूर हे अंतर त्यांनी अवघ्या ५ ते ६ दिवसात कापून, छापा टाकून मोठी दौलत स्वराज्यात आणली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२८_जानेवारी_१८५१ दुसरे बाजीराव पेशवे यांचे कानपूर जवळ बिठूर उर्फ ब्रम्हावर्त येथे निधन. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभुराजे 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Vaibhav Mhatre
8.3K जणांनी पाहिले
#इतिहास छत्रपतींचा 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२८_जानेवारी_१६४५ शिवरायांचा निकाल उभ्या दक्खन देशातील लोकांनी पाहिला 'हिंदवी स्वराज्य स्थापन होण्यापुर्वीच स्वराज्याचा कडक नियम काय आहे हे लोकांना कळले. बालशिवबा संतापले ! त्याना ते सहनच झालं नाही. पुण्यातील खेड-शिवापुराजवळच्या रांझाच्या पाटलाने बदअमल केला ! बदअमल म्हणजे एका परस्त्रीवर बलात्कार केला ! त्या पाटलाचे नाव बाबाजी भिकाजी गुजर आणि शिवबांना हें समजलें ! परस्त्रीला केवळ आई मानणाऱ्या शिवबाच्या मुलखांत पाटलासारख्या एका जबाबदार अधिकाऱ्यांने हा रावणशाही गुन्हा केलेला समजतांच शिवबा संतापले, स्वराज्याच्या जन्माआधीच जर असे हलकट चाळे आपले अधिकारी करतील तर स्वराज्य निर्माण झाल्यावर मग काय काय करतील ? स्त्री ही मराठ्यांच्या देव्हाऱ्यातील देवता आहे मग ती कोणत्याही जातिधर्माची असो, आमच्या मुजऱ्याचा पहिला मान स्त्रीजातीला आहे, ती आई आहे ! शिवबानी ताबडतोब ढालाईत हशम रांझ्यावर रवाना केले, हुकूम केला, बाबाजी पाटलाला जेरबंद करा ! पाटील गिरफ्तार झाला, लोकांना लाल महालातल्या न्यायी सदरेची ओळख पटली, पाटलाला शिवबाच्या पुढे हाजीर करण्यांत आलें शिवबाराजांनी गुन्ह्याची रीतसर चौकशी केली, गुन्हा शाबीत झाला आणि शिवबाने कडकडून हुकूम सोडला , 'कोपरांपासून पाटलाचे दोन्ही हात आणि गुडघ्यापासून दोन्ही पाय तोडून टाका , याची पाटीलकी जप्त करा !!' तो दिवस होता.. २८ जानेवारी १६४५☝️ यावेळी शिवबाराजांचे वय होते फक्त १५ वर्षे☝️ 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२८_जानेवारी_१६८१ छत्रपती संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूरावर छापा टाकला. उत्तरेकडील आग्रा व दिल्ली ही शहरे म्हणजे मुघलांची सर्वात वैभवसंपन्न नगरे, होय राजांनी राज्याभिषेकानंतर अवघ्या १२ दिवसात हा छापा टाकला. रायगड ते बुऱ्हाणपूर हे अंतर त्यांनी अवघ्या ५ ते ६ दिवसात कापून, छापा टाकून मोठी दौलत स्वराज्यात आणली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२८_जानेवारी_१८५१ दुसरे बाजीराव पेशवे यांचे कानपूर जवळ बिठूर उर्फ ब्रम्हावर्त येथे निधन. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभुराजे 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
See other profiles for amazing content