Follow
Vaibhav Mhatre
@v30061997m
2,532
Posts
1,917
Followers
Vaibhav Mhatre
620 views
17 hours ago
#इतिहास छत्रपतींचा 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१२_ऑगस्ट_१६५७ शिवरायांनी तत्कालिन बारा मावळ आणि भोर तालुक्यातील खेडेबारे हा मुलुख जिंकला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१२_ऑगस्ट_१६८३ अंजदिव बेटाच्या मालकीवरून पोर्तुगीज आणि मराठे संबंध बिघडत गेले होते. औरंगजेबानेही अकबर प्रकरणावरून पोर्तुगीजाना संभाजीराजेंच्या विरोधात चिथावणी दिली होती. संभाजीराजेंनी आपण डिचोलीला जाणार असल्याचे सांगून आपले सैन्य चेऊलला वेढा देण्यासाठी पाठवले होते. त्यामुळे पोर्तुगीज मराठे युद्धाला सुरुवात झाली होती. या पार्श्वभूमीवर पोर्तुगीज विजरईलाही संभाजीराजेंना जिवंत पकडण्याची इच्छा झाली. गोव्याजवळील भतग्रामातील नारवे येथे पंचगंगा नदीवर गोकुळाष्टमी ला यात्रा भरत असे. नदीच्या उत्तर किनाऱ्यावरील नारवे संभाजीराजेंच्या ताब्यात तर दक्षिण किनाऱ्यावरील दिवाडी बेट पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. या यात्रेदरम्यान हजारो लोक नदीत स्नान करण्यासाठी येत असत. संभाजीराजे सुद्धा या नदीत स्नान करण्यासाठी येणार आहेत अशी बातमी विजरईला मिळाली. त्यानुसार अचानक छापा घालून त्यांना पकडण्याचा विचार विजरईचा होता. पण बहुधा संभाजीराजेंनी हा बेत रद्द केला त्यामुळे पोर्तुगीजांचा हा बेत फसला गेला. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩 #१२_ऑगस्ट_१७६५ प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजानी मीर जाफरला बंगलचा नवाब बनवले होते, नंतर त्याच्या जागी मीर कासीमची नेमणूक केली गेली. पण इंग्रज आणि कासीमचे संबंध बिघडले गेल्याने त्यांच्यात लढाई झाली, त्यात मीर कासीमने १५० इंग्रजाची कत्तल केली. नंतरच्या काळात बक्सर येथे झालेल्या लढाईत मुघल बादशाह, शुजाउद्दोला आणि मीर कासीम यांच्या फौजांचा पराभव झाला आणि इंग्रजाची बंगाल आणि बिहारवर पकड मजबूत झाली. कोरा येथे झालेल्या लढाईत इंग्रजानी मल्हारराव होळकर यांचाही पराभव केला. याच सुमारास रॉबर्ट क्लाइव्ह यांची कंपनी सरकारच्या गव्हर्नर पदी निवड झाली, त्याने आपले कसब पणाला लावून हतबल झालेल्या मुघल बादशहा आणि शुजाउद्दोला याची बनारस येथे भेट घेतली आणि त्यांच्याकडून बंगाल आणि बिहार प्रांताचे दिवाणी हक्क मिळवले. त्याबदल्यात इंग्रजानी बादशहाला दरवर्षी २६ लाख रुपये तनखा देण्याचे ठरले. बादशहा आणि शुजाउद्दोला यांनी आपण इंग्रजाशी कधीही युद्ध करणार नाही असेही लिहून दिले. बादशहकडून इंग्रजानी बंगालचे दिवाणी हक्क मिळवले ती तारीख होती १२ ऑगस्ट १७६५. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩🏇🚩 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभुराजे 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Vaibhav Mhatre
590 views
1 days ago
#इतिहास छत्रपतींचा 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #११_ऑगस्ट_१६७८ शिवरायांनी त्यांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजे यांची एक वर्षानंतर तंजावर येथे गुप्त भेट घेतली. हे स्वराज्य व्हावे हि तो श्रीं ची इच्छा हेच विचार मनात ठेऊन शिवरायांनी भगवा रोवत जाण्याची वाटचाल सुरूच ठेवली. आता लक्ष दक्षिणेकडे, आपले स्वराज्य दक्षिणेत हि वाढवले पाहिजे म्हणून छत्रपती श्री शिवरायांनी आपले बंधू व्यंकोजी राजे यांची भेट घेतली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #११_ऑगस्ट_१८०३ शके १७२५ श्रावण व .नवमी फिरंगी दि.११ ऑगस्ट इ.स.१८०३ रोजी इंग्रजी लोकांनी अहमदनगर चा किल्ला लांच देऊन घेतला. ख्रिस्ती शकाच्या एकोणिसाव्या शतकातील पहिल्या दशकापासून मराठी राज्यास उतरती कळा लागून राहिली होती. शिंदे-होळकर आदी मराठे सरदारांचा पराभव करण्याकडे इंग्रज वळले होते. अहमदनगर चा किल्ला शिंदे यांच्या ताब्यात होता. इंग्रजांची राजनीती मोठी धूर्त पणाची होती. श्रावण व.५ रोजी वेढया चे काम सुरू झाल्यावर जनरल वेलस्ली याने जाहीरनामा प्रसिद्ध केला की शिंदे-भोसले यांच्याविरुद्ध आमना सामना होणार आहे, प्रजेविरुद्ध नाही. जणू प्रजा आणि शिंदे-भोसले वेगळेच होते! दुसऱ्या दिवशी वेढ्याचे काम जोरात सुरू झाले. किल्ल्यावर शिंदे यांच्याकडील पायदळांतील काही लोक होते. थोडे घोडेस्वार असून किल्ल्याचे रक्षण करणारे नेहमीचे शिपाई पण होते.या सर्वांनी किल्ला सोडण्यास नकार दिल्यावर इंग्रजांनी किल्ल्याच्या तटास वेढा दिला. तट आणि बुरुज उंच असल्याने त्यांचे काही चालले नाही. परंतु निकाराचा प्रयत्न करून आणि मराठ्यांच्या गोळीबारास तोंड देऊन इंग्रज भिंतीवरून शहरात आत घुसले. तेव्हा इंग्रजांचे नेतृत्व वेलस्ली हा इंग्रज करत होता. किल्ल्याची तट व्यवस्था मजबूत असल्या कारणाने किल्ला मिळवणं त्याला शक्य नव्हतं म्हणून त्याने भिंगार गावा जवळ असलेल्या देशमुखाला इंग्रजांनी वश करून घेतले आणि त्याला चार हजार रुपये लांचं देऊ केली.त्याबरोबर हल्ला कोठे करावा याचे ज्ञान इंग्रजांना मिळाले श्रावण व. नवमी रोजी सहजा सहजी नगरचा किल्ला शत्रूच्या हातात पडला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #११_ऑगस्ट_१९०८ भारतातील सर्वात तरूण वयाचे तसेच सशस्त्र क्रांतीत बाँबचा उपयोग करणारे पहिले क्रांतिकारक शहीद खुदीराम बोस यांना विनम्र अभिवादन. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभुराजे 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Vaibhav Mhatre
596 views
2 days ago
#इतिहास छत्रपतींचा 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩🏇🚩 #१०_ऑगस्ट_१६६० "छत्रपती शिवराय" किल्ले पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटल्यावर त्यांच्या पाठलागावर "सिद्दी जौहर" स्वराज्यात शिरला होता. त्याला जशास तसे उत्तर देण्यासाठी महाराजांनी मावळ्यांना काही सूचना देऊन मावळ्यांची एक तुकडी सिद्दी जौहरचा सामना करण्यासाठी पाठवली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१०_ऑगस्ट_१६६६ "छत्रपती शिवराय" आग्रा कैदेत असताना त्यांनी आजपासून आजारपणाचे सोंग घेतले. त्यांच्या या व्यूहरचनेची औरंगजेब बादशहाला कसलीही कल्पना नव्हती. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१०_आॕगस्ट_१७४९ चावंड किल्ल्याचा हवालदार संताजी मोहिते याच्या सनदेत किल्ला मुघलांकडून घेतल्याचा उल्लेख आहे आणि सुटलेल्या जिनसाची मोठी यादी जोडली आहे. यात भांडी, घरगुती, वस्तू, हत्यारे, पाळीव प्राणी यांची नोंद आहे. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१०_ऑगस्ट_१७५५ थोरल्या माधवरावाचा धाकटा भाऊ नारायणराव याचा जन्म. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१०_ऑगस्ट_१७६० सदाशिवराव भाऊसाहेबांनी दिल्ली काबीज करून दिनांक १० ऑगस्ट सन १७६० रोजी परागंदा झालेल्या बादशहाच्या पुत्र शहजादा जवानबख्त याला वलीअहद म्हणजे युवराज बनवले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभुराजे 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Vaibhav Mhatre
991 views
3 days ago
#इतिहास छत्रपतींचा 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #९_ऑगस्ट_१६५४ शिवाजीराजांनी निळोपंताना पुरंदरसाठी इनामपत्र दिले. हे पत्र खालील प्रमाणे मसरूल हजरत अखंडित लक्ष्मी राजमान्य नीळकंठराऊ प्रती राजेश्री सिवाजी राजे दंडवत ।। उपरी ।। तुम्ही राजेश्री बाबाजी नाईकाबराबरी पत्र पाठविले ते पावोन लिहिल्याप्रमाणे सविस्तर वर्तमान कळो आले व कित्येक मुखवचने नाईक माइले हाती सांगोन पाठविले तिही सविस्तर सांगितले व नाईक बोलिले की आम्ही त्यांसी तह केला आहे की जैसे काही राऊ गोसावी साहेबांसी वर्तत होते तैसेची हेही साहेबांसी वर्ततील व साहेब जैसे राजश्री राऊ गोसावी यांचे चालवत होते तैसेच यांचेही चालवावे ऐसा निश्चय करून आपण आलो असो म्हणऊन बोलिले ।। तरी जे काही बाबाजी नाईक तुम्हासी निश्चय केला तोच आमचा निश्चय आहे ।। जैसे काही राऊ गोसावी आम्हासी वर्तत होते तैसेच तुम्हीही आम्हास वर्तत जाणे व आम्ही जैसे काही राऊ गोसावी यांचे चालवित होतो तैसेच तुमचे चालऊन ।। एविशई आम्हास श्रीची व राजश्री साहेबांच्या पायांची व सौभाग्यवती मातोश्री साहेबांच्या पायांची आण असे व ये विशयी श्रीचा दवणा पाठविला असे तो घेणे व जोपर्यंत तुम्ही आम्हासी इमान वर्ताल तोपर्यंत आम्हीही तुम्हासी इमाने वर्तोन ।। तुम्हापासून इमानात अंतर पडिलिया आमचाही इमान नाही ।।छ ६ सौवाल सु।। खमस खमसैन अलफ ।। हे पत्र पुरंदरचा किल्लेदार महादजी नीळकंठराव ह्यांच्या मृत्यूनंतर लिहिलेले दिसते. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #९_ऑगस्ट_१९४२ #ऑगस्ट_क्रांती_दिन इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्यांना आठवण्याचा दिवस म्हणजे #९_ऑगस्ट अर्थात #क्रांती_दिन! स्वातंत्र्यलढ्याची मशाल पेटवत देशातून इंग्रजी राजवटीला नेस्तनाबूत करण्याची हाक देणाऱ्या तमाम क्रांतिवीरांना अभिवादन करण्याचा हा दिवस, पण स्वातंत्र्याचा उपभोग घेण्यात दंग असलेल्या आजच्या पिढीसाठी हा दिवस ‘अनोळखी’ झाला आहे. दीडशे वर्षे भारतावर राज्य करणाऱ्या इंग्रजांना देशातून हुसकावून लावण्यासाठी #९_ऑगस्ट_१९४२ रोजी क्रांतीची ठिणगी पडली होती. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी त्या क्रांतिलढ्याची आठवण म्हणून ९ ऑगस्ट ‘क्रांती दिन’ पाळला जातो. #जय_हिंद🇮🇳 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभुराजे 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Vaibhav Mhatre
685 views
4 days ago
#इतिहास छत्रपतींचा 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #८_ऑगस्ट_१६४८ शिवाजीराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या फत्तेखानाचा प्रचंड पराभव केला होता. सुभानमंगळ, पुरंदर गड, बेलसर आणि सासवड या ठिकाणी राजांनी आपली गनिमी काव्याची कुशल करामत वापरून शाही फौजा पार उधळून लावल्या होत्या. सह्याद्रीच्या आणि शिवाजीराजांच्या मनगटातील बळ उफाळून आलं होतं अन् त्यामुळेच आता कैदेतले शहाजीराजे जास्तच धोक्यात अडकले होते. कोणत्याही क्षणी संतापाच्या भरात शहाजीराजांचा शिरच्छेद होऊ शकत होता, नाही का ? पण शिवाजीराजांनी एका बाजूने येणाऱ्या आदिलशाही फौजेशी झुंज मांडण्याची तयारी चालविली होती अन् त्याचवेळी शहाजीराजांच्या सुटकेकरताही त्यांनी बुद्धीबळाचा डाव मांडला होता. राजांचा डाव अचूक ठरला. दिल्लीच्या शहाजहाननं विजापुरावरती असं प्रचंड दडपण आणलं की शहाजीराजांना सोडा नाहीतर मुघली फौजा विजापुरावर चाल करून येतील! वास्तविक दिल्लीचे मोगल हे काही शिवाजीराजांचे मित्र नव्हते पण राजकारणात कधीच कुणी कुणाचा कायमचा मित्रही नसतो आणि शत्रूही नसतो. उद्दिष्ट कायम असतं. हे शिवाजीराजांचं वयाच्या अठराव्या वर्षीचं कृष्णकारस्थान होतं. अचूक ठरलं. त्यातच भर पडली फत्तेखानाच्या पराभवाची. चिमूटभर मावळी फौजेनं आपल्या फौजेची उडविलेली दाणादाण भयंकरच होती. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #८_आॅगस्ट_१६७६ छत्रपती शिवरायांच्या सूचनेवरून "किल्ले महीपतगड" वर हवालदार "दसमाजी नरसाळा" यांस तर "किल्ले सज्जनगड" वर हवालदार "जिजोजी काटकर" यांस कारभाराविषयी पत्र. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #८_ऑगस्ट_१६८३ संभाजीराजांनी पोर्तुगीजांवरची मोहिम आखली आणि पोर्तुगीजांच्या चौलला वेढा घातला. चौलच्या वेढ्याला प्रतिउत्तर म्हणून आणि संभाजीराजांचे लक्ष चौलवरून हटवण्यासाठी पोर्तुगीजांनी फोंड्यावर हल्ला केला. चौलच्या वेढ्याचे काम निळोपंत पेशवे यांच्याकडे होते त्यांनी ते स्थळ हस्तगत करण्याचे पुष्कळ प्रयत्न केले पण ते व्यर्थ गेले असता चौलच्या तटावर मराठ्यांनी निकराचा हल्ला केला, त्या प्रसंगात पोर्तुगीझांनी पुष्कळ मराठे कापून काढले. जवळच कोरलाइचा किल्लाही पोर्तुगीझांच्या ताब्यात होता त्यावरसुद्धा मराठयानी छापा घातला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #८_ऑगस्ट_१९४२ भारताला स्वातंत्र्य मिळणे हे केवळ भारतासाठीच नाही तर जगाच्या शांतीसाठी गरजेचे आहे. ८ ऑगस्ट इ.स.१९४२ या दिवशी रात्री दहा वाजता प्रसिद्ध असा "चले जाव" ठराव पास झाला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभुराजे 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Vaibhav Mhatre
668 views
5 days ago
#इतिहास छत्रपतींचा 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #७_ऑगस्ट_१६७५ आजच्या दिवशी कोल्हापुर स्वराज्यात दाखल झाले. कोल्हापूर परिसरावर विजापूरच्या आदिलशहाची अनेक वर्षे सत्ता होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी मार्च, १६७३ मध्ये पन्हाळागड जिंकून स्वराज्यात आणला, तसेच १६७५ मध्ये कोल्हापूर परिसर खर्‍या अर्थाने जिंकून आपल्या अखत्यारीत आणला. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩 #७_ऑगस्ट_१६७९ किल्ले खांदेरी-उंदेरी वर शिवरायांच्या आदेशावरून गोड्या पाण्याचे झरे खोदुन तेथे विहीरी बांधण्याचे काम चालू झाले. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩 #७_ऑगस्ट_१७९० पानिपतच्या लढाईनंतर उत्तरेत मराठ्यांचा जम बसवण्याची महत्वपूर्ण कामगिरी केली ती सरदार महादजी शिंदे यांनी. दिल्ली काबीज करण्याच्या उद्देशाने महादजींनी आपली फौज एकत्र करून दिल्लीवर आक्रमण केले. दिल्ली यावेळी अफगाण व रोहिल्यांच्या ताब्यात होती.महादजींनी दिल्ली ताब्यात घेतली व इंग्रजांच्या आश्रयाला गेलेल्या शहाआलम ला परत आणून त्याला दिल्लीच्या गादीवर बसवले. पण महादजींचे हे वर्चस्व बादशहाचे काही सरदार व राजपुताना मानवले नाही, त्यांनी एकत्र येऊन 29 जुलै ला लालसोटच्या लढाईत महादजींचा पराभव केला. यानंतर पानिपतचा सूत्रधार नजीबखानाचा नातू गुलाम कादिर आणि इस्माईल बेग यांनी बादशहा शहाआलम ला पदच्युत करून त्याचे डोळे काढले व त्याच्या जागी बिदर बख्तला गादीवर बसवले. महादजींनी हार न मानता पुन्हा सैन्य जमवून दिल्लीवर हल्ला करून दिल्ली ताब्यात घेतली आणि गुलाम कादरला कैद करून ठार मारले आणि पुन्हा अंध शहाआलम ला गादीवर बसवले.शहाआलम ने खुश होऊन संपूर्ण राज्यात गोवधबंदी जाहीर केली व मथुरा व वृंदावन ही पवित्र स्थळे महादजींना देण्यासंबंधीचे फर्मान काढले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #७_ऑगस्ट_१९१४ रवींद्रनाथ टागोर यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन. रवींद्रनाथ टागोर हे थोर साहित्यिक, कवी, नाटककार , संगीतकार व चित्रकार होते, त्यांचे साहित्यक्षेत्रातील नोबेल या उच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांचे बंगाली साहित्यावर विशेष प्रभुत्व होते. तसेच शांतिनिकेतनची उभारणी करणारे, सृजन साहित्यिक म्हणून ते ओळखले जात. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभुराजे 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Vaibhav Mhatre
748 views
6 days ago
#इतिहास छत्रपतींचा 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩 #६_आॅगस्ट_१६४८ छत्रपती शिवरायांनी "किल्ले पुरंदर" वर हल्ला केला किल्ले पुरंदर स्वराज्यात दाखल. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩 ६_ऑगस्ट_१६५७ छत्रपती शिवाजी महाराजांनी अहमदनगर च्या मुघल छावणीवर हल्ला चढविला. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩 ६_ऑगस्ट_१६५९ ठाण्याच्या पोर्तुगिझ गवर्नरने गोवा येथील प्रमुख गवर्नरला 'मराठ्यांच्या आरमाराबद्दल सावधान' असण्याबद्दलचे पत्र लिहिले. शिवरायांनी १६५७ पासून कल्याण-भिवंडी परिसरात आरमार बनवण्याचा उद्योग सुरु केला होता. यात लढाउ तसेच व्यापारी जहाजे सुद्धा होती. त्यामुळे सतर्क होवून पोर्तुगिझ गवर्नरने हे पत्र लिहिले. सदर पत्राचा मराठी अनुवाद- "शहाजीचा मुलगा (शिवाजी) याने आदिलशाहीच्या ताब्यामधील वसई ते चेउल मधला बराच भूभाग जिंकला असून त्याने स्वतःची लढण्याची ताकद वाढवली आहे. त्याने कल्याण, भिवंडी, पनवेल ह्या वसईच्या आसपासच्या बंदरांमध्ये काही लढाउ जहाजे बनवली आहेत. आम्हाला आता सतर्क रहायला हवे. ही जहाजे बंदरामधून खुल्या समुद्रात बाहेर येणार नाहीत यासाठी योग्य ती पावले उचलण्याचे आदेश आम्ही पोर्तुगिझ कप्तानाला दिले आहेत." 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩 ६_ऑगस्ट_१६७७ दक्षिण दिग्विजय मोहिमेत छत्रपती शिवाजी महाराज तुंदुमगुर्ती ला आले. या मुक्कामात महाराजाना भेटण्यासाठी तेवेनापट्टणमचे डच अधिकारी आले होते. डच मंडळींना पायदळाचे सैनिक महाराजांच्या नाजूक अल्कटिव्ह असणाऱ्या तोरणपट्टानी सजवलेल्या महाराजांच्या तंबूत घेऊन गेले.डच मंडळी तंबूत बसल्यावर शिवराय तंबूत आले. त्यांच्यासोबत जनार्दन व रघुनाथ पंडित होते. शिवराय आपल्या आसनावर बसल्यावर जनार्दन पंडित त्यांच्यासमोर तर रघुनाथ पंडित महाराजांच्या जवळ उजवीकडे बसले. शिवराय जेंव्हा तंबूत आले तेंव्हा तंबूत असणारे सारे उठून उभे राहिले. महाराजानी यावेळी सोनेरी नक्षीकाम केलेली वस्त्रे परिधान केली होती. त्यांच्या उजव्या हातात मुठीला सोन्याचा वर्ख लावलेला पट्टा होता. भेटीत महाराजांनी डचाना कौल दिला व त्यांचा अधिकारी निकोलस क्लेमेंट यांच्याशी मैत्रीपूर्ण बोलनी केली. यावेळी डचानी महाराजाना चंदेरी कपडा, ८ रुंद तलवारी, ३३ पौंड चंदन, २ पेट्या गुलाबपाणी, ३ हरणाची कातडी, ४८ पौंड लवंग, जायफळ, १ चांदीचा पानपुडा, ३ छोट्या सोनसाखळ्या या भेटवस्तू दिल्या. महाराजांनी डचानाही भेटवस्तू देऊन निरोप दिला. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभुराजे 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Vaibhav Mhatre
843 views
7 days ago
#इतिहास छत्रपतींचा 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #५_ऑगस्ट_१६५२ १२ मावळची सुरूवात जिथून होते त्या रोहीड खोऱ्यातील "खोपडे देशमुख" हे पहिल्यापासून स्वराज्यासाठी ईमाने इतबारे सेवा देणारे घराणे. पण त्याच "खोपडे देशमुख" घराण्यात नेहमीच भाऊबंदकीचा वाद व्हायचा पण शिवरायांच्या मध्यस्तीने व सामंजस्याने हा वाद पूर्णपणे मिटवला गेला. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩 #५_ऑगस्ट_१६७७ छत्रपती शिवरायांनी आदिलशाही ताब्यातील एलवनसुर हे ठाणे व किल्ला जिंकून स्वराज्यात दाखल करून घेतला. एलवनसुर हा भाग व्यंकोजी राजे यांच्या जहागिरीतील एक महत्त्वाचे ठाणे होते. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩 #५_ऑगस्ट_१६८९ नागपंचमी दिवशी जिंजीच्या दरबारात संताजीराव घोरपडे यांना सरसेनापती पद मिळाले. रणझुंजार सरसेनापती संताजीराव घोरपडे यांना मानाचा मुजरा. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभुराजे 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Vaibhav Mhatre
891 views
8 days ago
#इतिहास छत्रपतींचा 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #४_ऑगस्ट_१६६८ शिवरायांनी कोकणातील जैतापूर जिंकले. शिवरायांनी आग्रा येथून सुटका करून घेतल्यानंतर मोगलांशी तह केला व आपले लक्ष पोर्तुगीज राज्यावर केंद्रीत केले. धर्मांध पोर्तुगीजांना धडा शिकविण्यासाठी महाराजांनी आपली मोहिम‌ उघडली व त्यात जैतापूरवर हल्ला करून ते जिंकुन घेतले. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩 #४_ऑगस्ट_१७३० भाऊसाहेब अर्थात सदाशिवरावांचा जन्म. भाद्रपद शुद्ध द्वितीया शालिवाहन शक १६५२, साधारणनाम संवत्सर, दि. ४ ऑगस्ट १७३० रोजी चिमाजीअप्पांना पहिलाच पुत्र झाला. शनिवारवाड्यावर चौघडा वाजू लागला. पुण्यात साखरा वाटल्या गेल्या. सदाशिवचा जन्म झाल्यानंतर त्यांची आई रखमाबाईंची तब्येत ढासळली. औषधोपचार चालु झाले मात्र त्याचा उपयोग न होऊन ३१ ऑगस्ट १७३० रोजी रखमाबाई निधन पावल्या. सदाशिवराव त्यावेळी केवळ २७ दिवसांचे होते. इस १७४० मधे चुलत बंधु नानासाहेबांना पेशवाई मिळाल्यानंतर भाऊंचे सातार्याच्या दरबारात काही वर्षे वास्तव्य होते. या काळात त्यांना राजकारणाचा बराच अनुभव मिळाला. १७४६ मधील कर्नाटक मोहिम, १७४७ मधे तिथेच झालेली आजर्याची लढाई, बहादूरभेंड्याचा किल्ला जिंकणे, तुंगभद्रा किनारी जाऊन बंडखोर नवाब व देसायांना जरब बसवणे इत्यादी मोहिमा त्यांच्या नावावर होत्या. त्याचबरोबर सावनूरच्या नवाबांकडून भाऊंनी ३६ परगणे काबीज करून मराठा साम्राज्याला जोडले. १७५० मधे सांगोल्याला यमाजी शिवदेवाचे बंड मोडले. त्याच वर्षी छत्रपती राजारामांनी (दुसरे) त्यांना मराठा राज्याची कायमची मुखत्यारी दिली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #४_ऑगस्ट_१७३३ कान्होजी आंग्रेंचे बाजीरावाना पत्र प्रतिनिधी जोपर्यंत कोकणात आहेत तोपर्यंत काहीही होणार नाही हे सगळ्यांना कळून चुकलं होतं. खुद्द सरखेल सेखोजी आंग्रे ४ ऑगस्ट १७३३ रोजी बाजीरावांना कळवतात, “प्रतिनिधीचा विचार घालमेलीचा व शामलाचे (सिद्दी) ममतेचा पहिल्यापासून आहे तो आपणास अवगतच आहे. या कोकणच्या मानसुब्यास दोन्ही गोष्टी कार्याच्या नाहीत. आपणाजवळ (पेशव्यांजवळ) आम्ही (आंग्रे) स्वच्छंदे अथवा आपले आज्ञेने वर्तणूक करू. तैसी त्याजपासी होणे दुरापास्त. प्रतिनिधी उठोन जातील ते कळणार(ही) नाही, आपले बेत, गोद्विजांचा उच्छेद केल्याचे श्रय आपल्या पदरी पडेल. आपले पदरी आम्हासारिखे असता अगाध काय आहे? प्रतिनिधीकडील वेध चुकलियावरी अंजनवेलीस मोर्चे देतो. गोवळकोट घेतो. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभुराजे 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Vaibhav Mhatre
722 views
9 days ago
#इतिहास छत्रपतींचा 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #३_ऑगस्ट_१६७७ छत्रपती शिवाजी महाराज दक्षिणेत वृद्धाचलम् येथे मुक्कामी आले. इथून महाराजांनी परतीचा प्रवास सुरु केला. वृद्धाचलम, कावेरीपट्टम, चिदंबरम तसेच शहाजीराजे यांच्या जुन्या जहागिरीचा प्रदेश बाळापुर, बंगरूळ, शिरें, होसकोट जिंकून घेतला. अरणीला वेढा घालून अरणी जिंकली, त्यासोबतच चिकबाळापूर, दोडडबाळापूर, देवरायानदुर्ग, तुमकुर, चित्रदुर्ग, कल्याणदुर्ग, रायदुर्ग, हंपी, कनकगिरी, कोप्पळ, लक्ष्मेश्वर, गदग हा भागही जिंकून घेतला. महाराजांना वेल्लोरशिवाय जास्त विरोध कुठेच झाला नाही व हे सर्व करत करत महाराज पन्हाळ्यावर परतले मार्च १६७८ साली. त्यानंतर लगेच वेल्लोर किल्ला मराठ्यांनी जिंकला ज्याचा वेढा तब्बल एक वर्ष सुरु होता. व्यंकोजी राजांनी महाराजांनी बळकावलेल्या प्रदेशावर हल्ला करून तो मिळवण्याचा प्रयत्न देखील केला पण त्यात त्यांचा पराभव झाला. अश्याप्रकारे तब्बल दीड वर्ष चाललेल्या कर्नाटक मोहिमेची यशस्वी सांगता झाली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #३_ऑगस्ट_१९०० स्वातंत्र्यपूर्व काळात पत्री सरकार म्हनजेच प्रतिसरकार स्थापन करून इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान असलेले ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म. महाराष्ट्रात (प्रामुख्याने सातारा, सांगली भागात) स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे, तसेच पत्री सरकार किंवा प्रतिसरकार हा समांतर शासनाचा एकमेवाद्वितीय प्रयोग राबवणारे लढवय्ये राजकीय कार्यकर्ते म्हणजे "क्रांतिसिंह नाना पाटील" होत. महाराष्ट्रातील एक देशभक्त, झुंझार नेते आणि क्रांतिसिंह म्हणून ते ओळखले जात. 🙏क्रांतीसूर्य नाना पाटील यांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन 🙏 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभुराजे 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩