फॉलो करा
Vaibhav Mhatre
@v30061997m
2,444
पोस्ट
1,726
फॉलोअर्स
Vaibhav Mhatre
533 जणांनी पाहिले
#इतिहास छत्रपतींचा 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२२_फेब्रुवारी_१६६५ शिवरायांनी कर्नाटकातील "कारवार" जिंकले. राजे शिवरायांचा कारवारच्या खाडीच्या तोंडाशी मुक्काम होता, येथे शेरखानने इंग्रज व तेथील सर्व व्यापाऱ्यांकडून मोठी रक्कम जमवून ती नजराण्याच्या स्वरूपात शिवरायांच्या समोर रूजू केली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२२_फेब्रुवारी_१६८४ केग्विनने इंग्लडच्या राजाला पत्र केग्विनने २२ फेब्रुवारी १६८४ रोजी पुन्हा इंग्लडच्या राजाला पत्र पाठवून संभाजीराजांनी आपल्या सरहद्दीवर ३०००० सैन्य मुंबईपासून तीन मैलांवर असणार्‍या पलतात (Paltata पलते) या बेटावर उतरवून ते बेट व्यापण्याचा प्रयत्न केल्याचे कळवले होते. केग्विन हा सातत्याने चार्ल्स राजाला संभाजी महाराजांच्या शक्तीची व आक्रमक धोरणाची कल्पना यासाठी देत होता की जेणे करुन संभाजी महाराजांशी तह करुन सलोखा निर्माण व्हावा. त्याप्रमाणे एप्रिल १६८४ पूर्वी केग्विनने तहाच्या बोलणीसाठी कॅप्टन गॅरी, थाॅमस विल्किन्स, राम शेणवी यांना तहाच्या बोलणीसाठी संभाजी महाराजांच्याकडे पाठवले त्यांनी बिरवाडी येथे राजांची भेट घेतली व गर्व्हनर केग्विनला पत्र पाठवून उभयंतामध्ये होणार्‍या तहाच्या अटींना संमती दर्शवली होती. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२२_फेब्रुवारी_१७३९ सन १७३९ च्या सुरुवातीला मराठ्यांनी धारावी माहीम काबीज केल्यानंतर खंडोजी माणकर व तुबाजीपंत यांजवर धारावी काबीज करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. चिमाजीअप्पांनी तुबाजीस मुर्ध्यावर मोर्चा बसविण्यास आज्ञा केली. तुबाजीपंतांचा मुर्ध्यावर दिनांक २२ फेब्रुवारी सन १७३९ मोर्चा कायम झाला. इतक्यात पोर्तुगीजांनी त्यावर हल्ला केला. तुबाजीपंताच्या फौजेने पोर्तुगीजांचा हल्ला निकराने परतविला इतकेच नाही तर दिनांक २६ फेब्रुवारी सन १७३९ रोजी गायमुखावर तुबाजीपंतांनी मोर्चा बसविला. धारावी किल्यात पाण्याची सोय नाही. गायमुख मराठ्यांनी काबीज केल्याने पोर्तुगीजांचे पाणी तुटले, पोर्तुगीजांनी पुन्हा गायमुखावर हल्ला केला तोही मराठ्यांनी परतवून लावला. दिनांक २७ फेब्रुवारी सन १७३९ रोजी चिमाजीअप्पांनी शत्रूच्या आरमारावर गायमुख येधून हल्ला करण्यास हुकूम दिला. त्यानुसार रामजी महादेव, तुबाजीपंत व आंग्रे यांनी मारा सुरू केला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२२_फेब्रुवारी_१८७९ वासुदेव बळवंतांनी पुणे, नगर, नाशिक या टापूत पायी प्रवास करून लोकांची विपन्नावस्था पाहिली. या दुष्काळास, दारिद्र्यास परकीय सरकार जबाबदार आहे, त्याची हकालपट्टी करून आपल्या लोकांचे शासन स्थापन केले पाहिजे, असा प्रचार त्यांनी सुरू केला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभूराजे 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Vaibhav Mhatre
1.3K जणांनी पाहिले
#इतिहास छत्रपतींचा 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२२_फेब्रुवारी_१६६५ शिवरायांनी कर्नाटकातील "कारवार" जिंकले. राजे शिवरायांचा कारवारच्या खाडीच्या तोंडाशी मुक्काम होता, येथे शेरखानने इंग्रज व तेथील सर्व व्यापाऱ्यांकडून मोठी रक्कम जमवून ती नजराण्याच्या स्वरूपात शिवरायांच्या समोर रूजू केली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२२_फेब्रुवारी_१६८४ केग्विनने इंग्लडच्या राजाला पत्र केग्विनने २२ फेब्रुवारी १६८४ रोजी पुन्हा इंग्लडच्या राजाला पत्र पाठवून संभाजीराजांनी आपल्या सरहद्दीवर ३०००० सैन्य मुंबईपासून तीन मैलांवर असणार्‍या पलतात (Paltata पलते) या बेटावर उतरवून ते बेट व्यापण्याचा प्रयत्न केल्याचे कळवले होते. केग्विन हा सातत्याने चार्ल्स राजाला संभाजी महाराजांच्या शक्तीची व आक्रमक धोरणाची कल्पना यासाठी देत होता की जेणे करुन संभाजी महाराजांशी तह करुन सलोखा निर्माण व्हावा. त्याप्रमाणे एप्रिल १६८४ पूर्वी केग्विनने तहाच्या बोलणीसाठी कॅप्टन गॅरी, थाॅमस विल्किन्स, राम शेणवी यांना तहाच्या बोलणीसाठी संभाजी महाराजांच्याकडे पाठवले त्यांनी बिरवाडी येथे राजांची भेट घेतली व गर्व्हनर केग्विनला पत्र पाठवून उभयंतामध्ये होणार्‍या तहाच्या अटींना संमती दर्शवली होती. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२२_फेब्रुवारी_१७३९ सन १७३९ च्या सुरुवातीला मराठ्यांनी धारावी माहीम काबीज केल्यानंतर खंडोजी माणकर व तुबाजीपंत यांजवर धारावी काबीज करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. चिमाजीअप्पांनी तुबाजीस मुर्ध्यावर मोर्चा बसविण्यास आज्ञा केली. तुबाजीपंतांचा मुर्ध्यावर दिनांक २२ फेब्रुवारी सन १७३९ मोर्चा कायम झाला. इतक्यात पोर्तुगीजांनी त्यावर हल्ला केला. तुबाजीपंताच्या फौजेने पोर्तुगीजांचा हल्ला निकराने परतविला इतकेच नाही तर दिनांक २६ फेब्रुवारी सन १७३९ रोजी गायमुखावर तुबाजीपंतांनी मोर्चा बसविला. धारावी किल्यात पाण्याची सोय नाही. गायमुख मराठ्यांनी काबीज केल्याने पोर्तुगीजांचे पाणी तुटले, पोर्तुगीजांनी पुन्हा गायमुखावर हल्ला केला तोही मराठ्यांनी परतवून लावला. दिनांक २७ फेब्रुवारी सन १७३९ रोजी चिमाजीअप्पांनी शत्रूच्या आरमारावर गायमुख येधून हल्ला करण्यास हुकूम दिला. त्यानुसार रामजी महादेव, तुबाजीपंत व आंग्रे यांनी मारा सुरू केला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२२_फेब्रुवारी_१८७९ वासुदेव बळवंतांनी पुणे, नगर, नाशिक या टापूत पायी प्रवास करून लोकांची विपन्नावस्था पाहिली. या दुष्काळास, दारिद्र्यास परकीय सरकार जबाबदार आहे, त्याची हकालपट्टी करून आपल्या लोकांचे शासन स्थापन केले पाहिजे, असा प्रचार त्यांनी सुरू केला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभूराजे 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Vaibhav Mhatre
17.1K जणांनी पाहिले
#इतिहास छत्रपतींचा 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२१_फेब्रुवारी_१६६० मराठ्यांनी अकोला जिंकले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२१_फेब्रुवारी_१६६२ इग्लंडच्या राजाचे रॉयल वॉरंट✍️ शिवछत्रपतींना आरमार अत्यंत प्रतिकूल परिस्थीत समुद्रात उतरवायचे होते, फिरंगी व वलंदेज, इंग्रज, किलाताब ऐशा सत्तावीस पादशाह्या व जमिनी वरील मोहिमा संभाळून हि सर्व 'लगबग' करावी लागणार होती व भारतीयांकडे आरमार बांधणी चे ज्ञान नव्हते या करता आरमार बांधणे सुरूंग लावणे इत्यादी कामांसाठी महाराजांनी काही इंग्रज व पोर्तुगीज माणसे नोकरीवर ठेवली होती. भारतीयांना हे फिरंगी सहज ज्ञान देत नसत. इग्लंडच्या राजाने तर २१ फेब्रुवारी १६६२ या तारखेचे एक रॉयल वॉरंटही काढले होते की "इंग्रज भारतीय जहाजे चालवतात तिथल्या रहिवाशांना जहाजे बांधण्यास व चालविण्यास शिकवितात त्यांना ताबडतोब इंग्लंडला पाठवून द्यावे" 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२१_फेब्रुवारी_१६६५ कारवार येथील इंग्रजांच्या वखारीत छत्रपती शिवराय महाराज छापा घालणार असल्याची खबर इंग्रजांच्या हेरांनी बातमी कळवली की, खुद्द शिवाजी राजा ४००० मराठ्यांसह अंकोल्यात आला असून उद्या (दि.२२ फेब्रुवारी) तो कारवारवर येणार आहे. त्याच रात्री सुभेदार बहलोल खानाचा एक नायब सरदार शेरखान (खान महंमदाचा मुलगा. या खान महंमदाचा अफजलखानाच्या कागाळीवरून बड्या साहेबिणीने विजापूरच्या मक्का दरवाज्यात दि.१०/११/१६५७ ला भर रस्त्यावर ठार मारले होते, कारण त्याने औरंगजेबाला वेढ्यातून सोडून दिले होते. यात खान महंमदाने विजापूरच्या रक्षणाचा विचार केला होता.) हा कारवारात येऊन पोहोचला त्याच्या जवळ फौजही नव्हती. तो बहलोलखानाच्या आईला मक्केस जाण्यासाठी गलबत ठरवून देण्याकरीता कारवारला आला होता अन् त्याला शिवाजी महाराजांच्या छाप्याची खबर मिळाली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२१_फेब्रुवारी_१८२९ कित्तूरची राणी चन्नम्मा यांचा मृत्यू. (जन्म : २३ आॅक्टोबर १७७८) झाशीचे राणी प्रमाणेच तिचेही दत्तक विधान नाकारनणेत आले, त्यानंतर लढाईस तोंड फुटले ब्रिटीश फौजा कित्तूर वर चालून आल्या, परंतु त्यांचा पराभव झाला संगोली रायान्णा या सेनापतीचे सहाय्याने ब्रिटिशाना तीनेच झुंजविले परंतु अखेर बैलहोंगल येथे तिला कैद करणेत आले व बैलहोंगल किल्ल्यातच तिला कैदेत ठेवणेत आले तेथेच तिचा मृत्यू झाला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभुराजे 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Vaibhav Mhatre
567 जणांनी पाहिले
#इतिहास छत्रपतींचा 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२१_फेब्रुवारी_१६६० मराठ्यांनी अकोला जिंकले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२१_फेब्रुवारी_१६६२ इग्लंडच्या राजाचे रॉयल वॉरंट✍️ शिवछत्रपतींना आरमार अत्यंत प्रतिकूल परिस्थीत समुद्रात उतरवायचे होते, फिरंगी व वलंदेज, इंग्रज, किलाताब ऐशा सत्तावीस पादशाह्या व जमिनी वरील मोहिमा संभाळून हि सर्व 'लगबग' करावी लागणार होती व भारतीयांकडे आरमार बांधणी चे ज्ञान नव्हते या करता आरमार बांधणे सुरूंग लावणे इत्यादी कामांसाठी महाराजांनी काही इंग्रज व पोर्तुगीज माणसे नोकरीवर ठेवली होती. भारतीयांना हे फिरंगी सहज ज्ञान देत नसत. इग्लंडच्या राजाने तर २१ फेब्रुवारी १६६२ या तारखेचे एक रॉयल वॉरंटही काढले होते की "इंग्रज भारतीय जहाजे चालवतात तिथल्या रहिवाशांना जहाजे बांधण्यास व चालविण्यास शिकवितात त्यांना ताबडतोब इंग्लंडला पाठवून द्यावे" 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२१_फेब्रुवारी_१६६५ कारवार येथील इंग्रजांच्या वखारीत छत्रपती शिवराय महाराज छापा घालणार असल्याची खबर इंग्रजांच्या हेरांनी बातमी कळवली की, खुद्द शिवाजी राजा ४००० मराठ्यांसह अंकोल्यात आला असून उद्या (दि.२२ फेब्रुवारी) तो कारवारवर येणार आहे. त्याच रात्री सुभेदार बहलोल खानाचा एक नायब सरदार शेरखान (खान महंमदाचा मुलगा. या खान महंमदाचा अफजलखानाच्या कागाळीवरून बड्या साहेबिणीने विजापूरच्या मक्का दरवाज्यात दि.१०/११/१६५७ ला भर रस्त्यावर ठार मारले होते, कारण त्याने औरंगजेबाला वेढ्यातून सोडून दिले होते. यात खान महंमदाने विजापूरच्या रक्षणाचा विचार केला होता.) हा कारवारात येऊन पोहोचला त्याच्या जवळ फौजही नव्हती. तो बहलोलखानाच्या आईला मक्केस जाण्यासाठी गलबत ठरवून देण्याकरीता कारवारला आला होता अन् त्याला शिवाजी महाराजांच्या छाप्याची खबर मिळाली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२१_फेब्रुवारी_१८२९ कित्तूरची राणी चन्नम्मा यांचा मृत्यू. (जन्म : २३ आॅक्टोबर १७७८) झाशीचे राणी प्रमाणेच तिचेही दत्तक विधान नाकारनणेत आले, त्यानंतर लढाईस तोंड फुटले ब्रिटीश फौजा कित्तूर वर चालून आल्या, परंतु त्यांचा पराभव झाला संगोली रायान्णा या सेनापतीचे सहाय्याने ब्रिटिशाना तीनेच झुंजविले परंतु अखेर बैलहोंगल येथे तिला कैद करणेत आले व बैलहोंगल किल्ल्यातच तिला कैदेत ठेवणेत आले तेथेच तिचा मृत्यू झाला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभुराजे 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Vaibhav Mhatre
668 जणांनी पाहिले
#इतिहास छत्रपतींचा 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२०_फेब्रुवारी_१६६० छत्रपती शिवाजी महाराजांनी खारेपाटण जिंकले. प्राचिन काळी व्यापारी गलबते विजयदुर्गाजवळ वाघोटन खाडीत शिरत व तेथून खारेपाटण ‘‘बलिपत्तन’’ गावापर्यंत येत. येथे जहाजातून माल उतरवून तो बावडा, फोंडा घाटामार्गे देशावर पाठविला जात असे. अशा या प्राचिन बंदराचे, राजधानीचे रक्षण करण्यासाठी खारेपाटणचा किल्ला बांधण्यात आला. इ.स १६६० मध्ये शिवाजी महाराजांनी राजापूर पाठोपाठ खारेपाटण किल्ला जिंकून घेतला. राजापूर येथे अटक करण्यात आलेल्या इंग्रज अधिकारी गिफर्ड यास खारेपाटण किल्ल्यातील अंधार कोठडीत ठेवण्यात आले. शिवाजी महाराजानंतर इतर सागरी व खाडीवरील किल्ल्यांप्रमाणे या किल्ल्याचा ताबा कान्होजींकडे गेला, त्यानंतर तुळाजी आंग्रे याच्याकडे खारेपाटण किल्ल्याचा ताबा असताना, इ.स १८ डिसेंबर १७५५ रोजी पेशवे, इंग्रज यांच्या संयुक्त फौजांनी किल्ल्यावर हल्ला करुन तो जिंकून घेतला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२०_फेब्रुवारी_१६६० ( फाल्गुन वद्य चतुर्थी, शके १५८१, संवत्सर विकारी, सोमवार ) शाहिस्त्या नगरमध्ये! मराठ्यांना संपवण्याच्या विचाराने निघालेला शाहिस्त्या नगरला पोहोचला व तेथे त्याने छावणी टाकली. त्याची छावणी म्हणजे एक शहरच होते. महाराज त्यावेळी अफझल वधानंतर आदिलशाही मुलखात प्रचंड दरारा राखून होते. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२०_फेब्रुवारी_१८०२ दौलतराव शिंदेंनी इंग्रजांचा तह स्विकारला नाही इंग्रज वकील कॉलिन्स हा उज्जैन येथे २० फेब्रुवारी १८०२ रोजी पोहोचला आणि मे महिन्यापर्यंत कॉलिन्सचा मुक्काम उज्जैन येथे होता, बडोद्याच्या गायकवाड प्रमाणेच दौलतराव शिंदे यांवरही तैनाती फौजेचा तह करावा म्हणून दडपण वाढत होते, यावेळी कॉलिन्सने दौलतराव शिंदें समोर एक चार कलमी मसुदा मांडला होता पण दौलतरावाने कॉलींस च्या बोलण्याकडे मुळीच लक्ष दिले नाही. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२०_फेब्रुवारी_१८१८ #इंग्रज_आणि_सिंहगड:- नोव्हेंबर १८१७ मध्ये पुणे जिंकल्यावर इंग्रजांनी धडाधड मराठ्यांचे किल्ले घेण्याचा सपाटा लावला. सिंहगड आणि आसपासच्या किल्ल्यांचा ताबा घ्यायची जबाबदारी ब्रीगेडीअर जनरल थिओडोर प्रिट्झलरवर सोपवण्यात आली. ह्या कामगिरीसाठी मद्रास आणि मुंबई रेजिमेंटचे एकूण ४१०० सैनिक त्याला देण्यात आले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभुराजे 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Vaibhav Mhatre
638 जणांनी पाहिले
#इतिहास छत्रपतींचा 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१९_फेब्रुवारी_१६३०⚔ #समस्त_हिंदू_बांधवांच्या_दैवताचा_जन्मदिन #श्री_शिवछत्रपती_महाराज_जन्मदिवस #किल्ले_शिवनेरी, (जुन्नर-पुणे), महाराष्ट्र. (तिथी प्रमाणे - फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ )🚩 शहाजीराजे भोसले यांच्या पत्नी राजमाता जिजाऊ यांच्या पोटी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर इ.स. १९ फेब्रुवारी १६३० साली "बाळ शिवबा राजांचा जन्म झाला." भीमाशंकराच्या जठात अन नाणेघाटाच्या ओठात वसलेल्या किल्ले शिवनेरीवर उष्:काल झाला, शिवरायांचा जन्म झाला, पुत्र जिजाऊसाहेबांना झाला, पुत्र शहाजीराजेंना झाला, पुत्र सहयाद्रीला झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र भारतवर्षाला झाला....! १९ फेब्रुवारी १६३० रोजी एका मराठा वतनदाराच्या घरात शिवाजी नामक एक पुत्र जन्मला❤️ ही गोष्ट तत्कालीन कालखंडात खास नोंद व्हावी किंवा अगदीच कृष्ण रामासारखा अवतारी पुरुष जन्माला यावा इतकीही खास नाही🙌 पण ह्या देवमाणसाने अवघ्या पन्नास वर्षांच्या आयुष्यात जो काही कर्तृत्ववान तेजस्वी आणि ओजस्वी असा इतिहास घडवला😍 त्या इतिहासाने आजही जनसामान्यात प्रेरणा निर्माण होते🚩 आजही त्यांचे नाव घेता अंगावर काटा उभा राहतो🚩 आजही त्याचा त्याग, निष्ठा अन् स्वातंत्र्यप्रेम पाहून डोळ्यात अश्रू उभे राहतात🚩 आणि आजही त्याच्या गडकोटांची उंची पाहताना उर फुलतो🔥 छाती दोन इंच फुगते 🚩मुजरा राजं मुजरा 🚩 ✍️ शिवछत्रपतींच्या जन्म तारखेवर वादविवाद होते परंतु महाराष्ट्र सरकारने २००१ साली इतिहासकारांची समिती बनवुन संशोधन करत १९ फेब्रुवारी १६३० ही तारीख शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस म्हणून जाहीर केली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभुराजे 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Vaibhav Mhatre
603 जणांनी पाहिले
#इतिहास छत्रपतींचा 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१७_फेब्रुवारी_१६६३ छत्रपती श्री शिवरायांनी "केळशी" जिंकून स्वराज्यात सामील करून घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांची दाभोळ मोहिमेची तयारी चालू असताना त्यांची व याकूतबाबांची भेट झाली होती असे सांगितले जाते. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१७_फेब्रुवारी_१६८९ छत्रपती संभाजी महाराजांना नेत्रहीन करण्यात आले. इश्वरदास म्हणतो की, बादशहाच्या दरबारात उभे केल्यानंतर इखलासखान व हमीदुद्दीनखान या सरदारांनी छत्रपती संभाजी महाराजांना खडी ताजीम देण्यास वारंवार सुचविले, पण या बाणेदार महाराजांनी बादशहा समोर यत्किंचितही मान झुकविली नाही. बादशहाने छत्रपती संभाजी महाराजांना पाहीले. "आपल्याला गेली ८ वर्षे भुंड्या डोक्याने, किमाँश न घालता रानोमाळ, सह्याद्रीच्या डोंगररांगात भटकायला लावणारा हाच का तो शिवाचा बच्चा "संभाजी" कशासच बधत नाहीत, हे पाहून किमान शंभूराजे पळून जाऊ नये म्हणून बादशहाने आज्ञेनूसार शंभूराजांचे डोळे तप्त सळईने बाहेर काढले गेले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१७_फेब्रुवारी_१७७३ कोल्हापूरच्या कर्तबगार महाराणी "जिजाबाई" यांचे "किल्ले पन्हाळा" येथे निधन झाले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१७_फेब्रुवारी_१७३८ पोर्तुगीजांनी धारावी जिंकला १५ फेब्रुवारी रोजी कडदीन आणि पेद्रु द मेल यांनी संयुक्तपणे सुमारे ३०० ग्रेनेडियर्स आणि १४४० एतद्देशीय सैनिकांसह धारावीवर मोहीम काढली. पारसीक कडे जाण्याचा देखावा करून ते दिनांक १७ फेब्रुवारी सन १७३८ रोजी धारावीवर आदळले. तुफान रणकंदन झाले. मराठ्यांनी, नाईकमंडळींनी पराक्रमाची पराकाष्ठा केली. ठाण्याहून येऊन खंडोजी माणकर यांचे सैन्याने निकराचा लढा दिला परंतु अखेर पोर्तुगीजांनी धारावी घेतली. "यावेळी मराठ्यांची पाचसातशे माणसे मेली. पाचशे कैद झाली. पोर्तुगीजांकडील बारा सैनिक व सरदार मॅसेडो ठार झाले." अशी नोंद आहे. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१७_फेब्रुवारी_१७७३ नारायणराव पेशव्यांच्या नंतर "रघुनाथराव" पेशवे झाले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१७_फेब्रुवारी_१७३९ मराठ्यांनी चिमाजी अप्पांच्या नेतृत्त्वाखाली खुद्द वसईवर चाल केली. चालून येत असलेली फौज पाहून पोर्तुगीजांनी आपली शिबंदी वसईच्या किल्ल्यात घेतली व वसईचा वेढा सुरू झाला. मराठ्यांनी शिताफीने पूर्ण किल्ल्याभोवती घेरा घातला व किल्ल्याची पूर्ण नाकेबंदी करून टाकली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१७_फेब्रुवारी_१८८१ सामाजिक क्रान्तिचे प्रणेते क्रांतिगुरु लहुजी साळवे यांचा मृत्यू. (वाकडेवाडी, संगमपूल, पुणे) 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१७_फेब्रुवारी_१८८३ क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा मृत्यू. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभुराजे 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Vaibhav Mhatre
1.1K जणांनी पाहिले
#इतिहास छत्रपतींचा 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१७_फेब्रुवारी_१६६३ छत्रपती श्री शिवरायांनी "केळशी" जिंकून स्वराज्यात सामील करून घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांची दाभोळ मोहिमेची तयारी चालू असताना त्यांची व याकूतबाबांची भेट झाली होती असे सांगितले जाते. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१७_फेब्रुवारी_१६८९ छत्रपती संभाजी महाराजांना नेत्रहीन करण्यात आले. इश्वरदास म्हणतो की, बादशहाच्या दरबारात उभे केल्यानंतर इखलासखान व हमीदुद्दीनखान या सरदारांनी छत्रपती संभाजी महाराजांना खडी ताजीम देण्यास वारंवार सुचविले, पण या बाणेदार महाराजांनी बादशहा समोर यत्किंचितही मान झुकविली नाही. बादशहाने छत्रपती संभाजी महाराजांना पाहीले. "आपल्याला गेली ८ वर्षे भुंड्या डोक्याने, किमाँश न घालता रानोमाळ, सह्याद्रीच्या डोंगररांगात भटकायला लावणारा हाच का तो शिवाचा बच्चा "संभाजी" कशासच बधत नाहीत, हे पाहून किमान शंभूराजे पळून जाऊ नये म्हणून बादशहाने आज्ञेनूसार शंभूराजांचे डोळे तप्त सळईने बाहेर काढले गेले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१७_फेब्रुवारी_१७७३ कोल्हापूरच्या कर्तबगार महाराणी "जिजाबाई" यांचे "किल्ले पन्हाळा" येथे निधन झाले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१७_फेब्रुवारी_१७३८ पोर्तुगीजांनी धारावी जिंकला १५ फेब्रुवारी रोजी कडदीन आणि पेद्रु द मेल यांनी संयुक्तपणे सुमारे ३०० ग्रेनेडियर्स आणि १४४० एतद्देशीय सैनिकांसह धारावीवर मोहीम काढली. पारसीक कडे जाण्याचा देखावा करून ते दिनांक १७ फेब्रुवारी सन १७३८ रोजी धारावीवर आदळले. तुफान रणकंदन झाले. मराठ्यांनी, नाईकमंडळींनी पराक्रमाची पराकाष्ठा केली. ठाण्याहून येऊन खंडोजी माणकर यांचे सैन्याने निकराचा लढा दिला परंतु अखेर पोर्तुगीजांनी धारावी घेतली. "यावेळी मराठ्यांची पाचसातशे माणसे मेली. पाचशे कैद झाली. पोर्तुगीजांकडील बारा सैनिक व सरदार मॅसेडो ठार झाले." अशी नोंद आहे. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१७_फेब्रुवारी_१७७३ नारायणराव पेशव्यांच्या नंतर "रघुनाथराव" पेशवे झाले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१७_फेब्रुवारी_१७३९ मराठ्यांनी चिमाजी अप्पांच्या नेतृत्त्वाखाली खुद्द वसईवर चाल केली. चालून येत असलेली फौज पाहून पोर्तुगीजांनी आपली शिबंदी वसईच्या किल्ल्यात घेतली व वसईचा वेढा सुरू झाला. मराठ्यांनी शिताफीने पूर्ण किल्ल्याभोवती घेरा घातला व किल्ल्याची पूर्ण नाकेबंदी करून टाकली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१७_फेब्रुवारी_१८८१ सामाजिक क्रान्तिचे प्रणेते क्रांतिगुरु लहुजी साळवे यांचा मृत्यू. (वाकडेवाडी, संगमपूल, पुणे) 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१७_फेब्रुवारी_१८८३ क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा मृत्यू. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभुराजे 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
See other profiles for amazing content