:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२२८८ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
हे जगजेठी तुम्हाला शरण आलेल्या भक्तांकडे तुम्ही पाठ फिरऊ नका एवढी माझी विनंती तुम्ही ऐका. हे हरी तुम्हाला जे भक्त आळवित असतील त्यांना तुम्ही पटकन उत्तर द्यावे एवढीच माझी विज्ञापना म्हणजे विनंती आहे. हे नारायणा जे गांजलेले आहेत दुःखाने त्रस्त झालेले आहेत त्यांच्याकडे तुम्ही धावत जावे ही तुम्हाला विनंती आहे. हे केशवा दमलेल्या भागलेल्या लोकांचा तु विसावा हो एवढी माझी विनंती तुम्ही ऐका. हे अनंता तुला अंकित झालेल्या दासांचा योगाक्षेमाचा भार तु आपल्या माथ्यावर वागावा एवढी विनंती माझी ऐका. तुकाराम महाराज म्हणतात हे केशवा तु आम्हाला म्हणजेच तुला शरण आलेल्या, तुला आळवणाऱ्या, दुःखाने त्रस्त असणाऱ्या, दमलेल्या, भागलेल्या तुझ्या अंकित दासांना कधीही विसरू नये एवढी माझी विनंती ऐक.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.३०/११/२०२५
वार-रविवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -::::::::::::::::
#🙏भक्ती सुविचार📝 #🙏सोमवार भक्ती स्पेशल🌟 #🌕कोजागीरी पोर्णिमा🥛 #🌻आध्यात्म 🙏