कोजागिरी पूर्णिमा 2022 🙏🌚

गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची
807 views
4 months ago
:::::-----::::::-----:::::-----::::: ।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।। :::::----::::::------:,:::::-----:::: ::- अभंग क्र.२२८८ -: **************************** या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात- हे जगजेठी तुम्हाला शरण आलेल्या भक्तांकडे तुम्ही पाठ फिरऊ नका एवढी माझी विनंती तुम्ही ऐका. हे हरी तुम्हाला जे भक्त आळवित असतील त्यांना तुम्ही पटकन उत्तर द्यावे एवढीच माझी विज्ञापना म्हणजे विनंती आहे. हे नारायणा जे गांजलेले आहेत दुःखाने त्रस्त झालेले आहेत त्यांच्याकडे तुम्ही धावत जावे ही तुम्हाला विनंती आहे. हे केशवा दमलेल्या भागलेल्या लोकांचा तु विसावा हो एवढी माझी विनंती तुम्ही ऐका. हे अनंता तुला अंकित झालेल्या दासांचा योगाक्षेमाचा भार तु आपल्या माथ्यावर वागावा एवढी विनंती माझी ऐका. तुकाराम महाराज म्हणतात हे केशवा तु आम्हाला म्हणजेच तुला शरण आलेल्या, तुला आळवणाऱ्या, दुःखाने त्रस्त असणाऱ्या, दमलेल्या, भागलेल्या तुझ्या अंकित दासांना कधीही विसरू नये एवढी माझी विनंती ऐक. :::::::::::::::::::::::::::::::::: आपला दास:- ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे आळंदी देवाची दि.३०/११/२०२५ वार-रविवार :::::---::::::------:::::::-----::::: ::::::::::- -:::::::::::::::: #🙏भक्ती सुविचार📝 #🙏सोमवार भक्ती स्पेशल🌟 #🌕कोजागीरी पोर्णिमा🥛 #🌻आध्यात्म 🙏
गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची
984 views
4 months ago
:::::-----::::::-----:::::-----::::: ।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।। :::::----::::::------:,:::::-----:::: ::- अभंग क्र.२२८७ -: **************************** या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात- पाण्यावाचून मासा जसा तळमळतो तसाच प्रकार माझ्या जीवाचा होत आहे. एखाद्या कंजूस मनुष्याने पुष्कळ धन जमविले आणि ते भूमीत पुरून ठेवले व काही दिवसांनी त्याला जर सापडले नाही तर त्याचे मन जसे चरफडत असते, मातेचा वियोग बाळाला जर झाला तर ते बाळ जसे तळमळते तसाच प्रकार माझा झाला आहे माझा हा कळवळा तुम्ही जाणून घ्यावा देवा. देवा मी तुम्हाला किती प्रकार सांगू हे सगळे प्रकार सांगण्याचे कारण एकच की तुम्ही मला तुमचे पाय दाखवा. आहो देवा तुमची मला भेट होणार की नाही या चिंतेने माझे अंतकरण करपून गेले आहे तुम्हाला माझा विसर का पडला हे मला काही कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्ही माझ्या विषयी तर सर्व काही जाणत आहात तरीही माझ्याविषयी तुम्ही कृपावंत व्हावे. :::::::::::::::::::::::::::::::::: आपला दास:- ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे आळंदी देवाची दि.२९/११/२०२५ वार-शनिवार :::::---::::::------:::::::-----::::: ::::::::::- -:::::::::::::::: #🙏भक्ती सुविचार📝 #🙏सोमवार भक्ती स्पेशल🌟 #🌕कोजागीरी पोर्णिमा🥛 #🌻आध्यात्म 🙏
गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची
1.4K views
4 months ago
:::::-----::::::-----:::::-----::::: ।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।। :::::----::::::------:,:::::-----:::: ::- अभंग क्र.२२८६ -: **************************** या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात- लहान मूल आपल्या आईजवळ तहान व भूक लागली की सांगते परंतु तहान भुकेचे उपाय करताना किती कष्ट करावे लागतात हे ते लहान मुल जाणते काय? त्याप्रमाणे देवा तु माझे पालन-पोषण, माझे सर्व ओझे सर्व योगक्षेमाचे भार घ्यावे. हे नारायणा मी सर्वतोपरी अपराधी आहे हे तुला माहित आहे त्यामुळे तु माझे गुणदोष कशाला मनात आणशील? देवा मी तुझी सेवा कधीही केली नाही मी दीन आहे मी पातकांची राशी आहे हे तर तुला माहित आहे मग आता तु माझ्या विषयी काय विचार करतो आहेस? देवा ज्याकाळी माझे चित्त तुझ्या पायाला अनुसरले त्याच वेळी माझा असा निर्धार पक्का झाला की माझे आता हितच झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्ही पुष्कळ भक्तांना तारले आहेत आता माझ्या विषयी थोडी चिंता तुमच्या मनात असू द्यावी. :::::::::::::::::::::::::::::::::: आपला दास:- ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे आळंदी देवाची दि.२८/११/२०२५ वार-शुक्रवार :::::---::::::------:::::::-----::::: ::::::::::- -:::::::::::::::: #🌻आध्यात्म 🙏 #🙏सोमवार भक्ती स्पेशल🌟 #🌕कोजागीरी पोर्णिमा🥛 #🙏भक्ती सुविचार📝
गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची
956 views
4 months ago
:::::-----::::::-----:::::-----::::: ।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।। :::::----::::::------:,:::::-----:::: ::- अभंग क्र.२२८५ -: **************************** या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात- सर्व परमार्थिक संपत्तीचे बिढार असलेले हरीचे सुकुमार पावले मी माझ्या चित्तात धारण केले आहे. मी माझ्या कंठामध्ये अमृतवल्ली प्रमाणे असलेले हरिचे नाम धारण करेल त्यामुळे माझे सर्व अंग शितल होईल. सर्व लावण्याचे उगमस्थान असे हरीचे सुंदर व साजिरे श्रीमुख आहे ते मी पाहिन. मी लहान मुलाप्रमाणे हरीचा अंग संग करेल आणि त्याच्या कडावर बसेन जोपर्यंत मला त्याच्या कडा वरून खाली उतरावेसे वाटत नाही तोपर्यंत त्याच्या कडेवर बसून राहिल. तुकाराम महाराज म्हणतात हा विठोबा आपण त्याला जसे करू तसे तो होतो म्हणूनच तर माझ्या मनाने त्याचा ध्यास धरला आहे. :::::::::::::::::::::::::::::::::: आपला दास:- ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे आळंदी देवाची दि.२७/११/२०२५ वार-गुरुवार :::::---::::::------:::::::-----::::: ::::::::::- -:::::::::::::::: #🙏भक्ती सुविचार📝 #🙏सोमवार भक्ती स्पेशल🌟 #🌕कोजागीरी पोर्णिमा🥛 #🌻आध्यात्म 🙏
गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची
1.5K views
4 months ago
:::::-----::::::-----:::::-----::::: ।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।। :::::----::::::------:,:::::-----:::: ::- अभंग क्र.२२८४ -: **************************** या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात- हरिकथा संतांच्या मुखाने ऐकली तर ती केव्हाही वाया जाणार नाही एवढेच काय आपण स्वतः जरी हरिकथा केली तरीही ती वाया जाणार नाही. व देवळात जाऊन देवाची पूजा केली तर ती काही वाया जात नाही. तीर्थ केले किंवा कोणत्याही प्रकारचे व्रत केले तर ते वाया जात नाही. संतांचे दर्शन घेतले आणि शुद्ध आचरण ठेवले तर ते वाया जात नाही. तुकाराम महाराज म्हणतात मी आता तुम्हाला जी काही सर्व कर्म सांगितले आहे ती करत असताना भक्ती भाव असो किंवा नसो परंतु चांगले कर्म करण्याचा सायास केला की ते वाया जात नाही. :::::::::::::::::::::::::::::::::: आपला दास:- ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे आळंदी देवाची दि.२६/११/२०२५ वार-बुधवार :::::---::::::------:::::::-----::::: ::::::::::- -:::::::::::::::: #🌻आध्यात्म 🙏 #🙏सोमवार भक्ती स्पेशल🌟 #🌕कोजागीरी पोर्णिमा🥛 #🙏भक्ती सुविचार📝
गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची
1.1K views
4 months ago
:::::-----::::::-----:::::-----::::: ।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।। :::::----::::::------:,:::::-----:::: ::- अभंग क्र.२२८३ -: **************************** या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात- पुण्य म्हणजे पर उपकार आणि पाप म्हणजे परपीडा आणि पाप व पुण्य यांना दुसरा कोणताही जोडा नाही. सत्य वागणे म्हणजेच धर्म आणि असत्या प्रमाणे वागणे म्हणजे अधर्म व अकर्म आहे आणि धर्म व अधर्म यांचे खरे वर्म सत्य आणि असत्य वागणे हेच आहे दुसरे कोणतेही नाही. नामाचे स्मरण जो करतो त्याला गती मिळते व जो नामाला विन्मुख असतो त्याची अधोगती होते. संतांचा संग करणे म्हणजेच स्वर्ग वासाची प्राप्ती करून घेणे आणि संतांच्या संगती विषयी उदास राहणे व अनात्म पदार्थांशी तादात्म्य ठेवणे म्हणजेच नरक वासाची प्राप्ती करून घेणे होय. तुकाराम महाराज म्हणतात आता मी सर्वांना हिताच्या व अहिताच्या गोष्टी उघडपणे सांगितल्या आहेत त्यामुळे आता ज्याला जसे वागायचे असेल त्याने तसे वागावे. :::::::::::::::::::::::::::::::::: आपला दास:- ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे आळंदी देवाची दि.२५/११/२०२५ वार-मंगळवार :::::---::::::------:::::::-----::::: ::::::::::- -:::::::::::::::: #🙏भक्ती सुविचार📝 #🙏सोमवार भक्ती स्पेशल🌟 #🌕कोजागीरी पोर्णिमा🥛 #🌻आध्यात्म 🙏