⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳
📜 २ नोव्हेंबर इ.स.१६७७
छत्रपती शिवाजी महाराजांनी तंजावर चे ठाणे जिंकले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 २ नोव्हेंबर १६८३
पोर्तुगीजांनी गोव्याच्या किल्ले फोंडा वर दोन दिवसांपूर्वी हल्ला केला होता. "किल्लेदार त्र्यंबकजी इंगळे" यांनी त्यास चोख प्रत्युत्तर दिले, आणि आज त्यांच्या मदतीला दस्तुरखुद "छत्रपती संभाजीराजे" ८०० घोडेस्वार आणि मोठे पायदळ घेऊन किल्ले फोंडामध्ये दाखल झाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
#📜इतिहास शिवरायांचा #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #वेड इतिहासाचे #मायबाप छत्रपती
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
📜 २ नोव्हेंबर इ.स.१६८९
राजाराम महाराज जिंजीस नोव्हेंबर १६८९ त आले आणि त्यांनी जिंजीचा कारभार हाती घेतला. त्यांनी जिंजीस मराठ्यांची कर्नाटकांतील राजधानी निर्माण केली. कर वसूल करणे, नव्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका करणे, ठाणी व किल्ले यांचा बंदोबस्त राखणे, नवे लष्कर उभारणे, मोगलांशी लढण्यासाठी कर्नाटकांतील हिंदू नायकांचे सहकार्य मिळविणे आणि राज्यकारभार आणि मोगलांशी युद्ध करण्यासाठी पैसा मिळविणे यासारखी कार्ये आता जिंजीमध्ये सुरू झाली. राजाराम महाराजांजवळ द्रव्यसंग्रह नव्हता. गिरजोजी यादवाने महाराष्ट्रातून बोचके बांधून बरोबर आणलेले जडजवाहीर अडीच लाखांचे होते. शिवाय हरजी राजे महाडीक ह्यांच्या पत्नीने नवऱ्याचा व तिचा धनसंचय होता तोही तिने राजाराम महाराजांस दिला. जिंजीच्या अधिकाऱ्यांनी व लष्कराने राजाराम महाराजांची हुकूमत मानली. जिंजीस मराठी राज्याचा कारभार चालू झाला. पण पैशाशिवाय फौज उभी राहणार नाही. तेव्हा महाराजांस मोठी अडचण पडली ती पैशांची. अडचण निवारण्याचे उद्योग राजाराम महाराजांस जिंजीस सांभाळून आणणारे प्रल्हादपंत यांनी केले. कर्नाटकातील राजे, पाळेगार वगैरेना मुघली राजवट नको होती. कारण मोगल बादशहाच्या हुकूमाने मुसलमान लोक हिंदूची मंदिरे पाडू लागले ते त्यांना नको होते. त्यांनी राजाराम महाराजांच्या हिंदवी स्वराज्यास सुरुवातीस भरघोस पाठिंबा दिला. परंतु द्रव्याची टंचाई दिवसेंदिवस अधिक भासू लागली. मार्टीनच्या रोजनिशीत खालीलप्रमाणे प्रयत्न करून द्रव्य मिळविण्याच्या नोंदी सापडतात. द्रव्य मिळविण्यासाठी राजाराम महाराजांच्या प्रधान मंडळाने अनेक प्रयत्न केले. जिंजीत आल्यावर एक हुकूम काढून सर्व नोकर-चाकरांस व सरदारांस, पाळेगारांना फर्माविले की, त्यांनी राजाराम महाराजांचे दर्शन घ्यावे व दर्शनाच्यावेळी राजाच्या चरणी मोठा नजराणा ठेवावा. शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ संताजी भोसले यांनी राजाराम महाराजांस एक हजार पगोडे नजर केले. फ्रेंच आणि डच यांनी प्रत्येकी चौदाशे पगोड्यांचा ऐवज नजराणा म्हणून दिला. इंग्रजांनी मात्र ६०० पगोडे किमतीचा नजराणा दिला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २ नोव्हेंबर इ.स.१७६३
मराठे आणि निजाम यांच्यामधल्या राक्षसभुवन येथील लढाईवरुन पेशवे माधवराव यांचे पुण्यात आगमन. निजामशाहीत त्याचे वर्चस्व वाढू नये म्हणून व त्याच वेळी निजामशाहीत चंचूप्रवेश करणार्या फ्रेंचांचे वर्चस्व कमी करण्यासाठी बाळाजीने शक्य तेवढी खटपट केलेली दिसते. सिंदखेड येथे मराठे व निजाम अलीचे युद्ध होऊन निजामाच्या पराभवाने मराठ्यांना २५ लक्ष उत्पन्नाचा प्रदेश मिळाला. यावेळी निजाम अली व फ्रेंच सेनापती यांच्यात वितुष्ट येऊन त्याचे पुन्हा एकदा हत्याकांडात रूपांतर झालेले दिसते; पण यानंतर फ्रेंच सेनापती निजामाच्या राजकारणातून कायमचा बाहेर पडला. इ.स.१७५९ मध्ये सदाशिवराव भाऊने काढलेल्या मोहिमेत निजामाचा उद्गीरच्या लढाईत पराभव होऊन मराठ्यांना अंबड, फुलमडी, नांदेड इ. साठ लाखांचा प्रदेश आणि अशेरी, मुल्हेर, दौलताबाद हे किल्ले आणि बर्हाणपूर, विजापूर एवढे प्रदेश मिळाले. तसेच निजाम अलीने एलिचपूर येथे व सलाबतजंगाने हैदराबादेस रहावे असे ठरले. यानंतर पानिपतचा पराभव व नानासाहेबांचा मृत्यू या घटना घडल्या. मराठेशाहीची धुरा माधवराव पेशव्याच्या खांद्यावर आली. या काळातील निजाम अलीची पुण्यावर चढाई ( १७६१ ) , त्याची राघोबाशी हातमिळवणी व माधवराव पेशव्यांची लढाई, पुण्याची जाळपोळ व त्यानंतर उभयपक्षांच्या चढाओढीची राक्षसभुवनाच्या लढाईत झालेली परिणिती अशा परस्परविरोधी घटना घडल्या. राक्षसभुवनाच्या ( १७६३ ) तहाने पानिपतचे अपयश काहीसे धुऊन निघाले आणि १७५१ – ६० मध्ये मिळविलेला निजामी राज्याचा मुलुख परत मिळाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २ नोव्हेंबर इ.स.१७८२
इ.स.१७८१ साली वाडीकर सावंत आणि कोल्हापूरचे छत्रपती यांचे संबंध बिघडताच पोर्तुगिजांना आपले घोडे पुढे दामटण्यास संधी मिळाली. खेम सावंत तीसरा याने कोल्हापुरच्या छत्रपतिंशी लढण्याकरिता पोर्तुगिजांकडे सैन्याची आणि दारुगोळ्यांची मदत मागितली. या मागणीनुसार पोर्तुगिजांनी सावंतांच्या मदतीस सैन्य रवाना केले. परंतु ह्या सैन्याने सावंतांना मदत करण्याऐवजी डिचोलीस जाऊन तेथील किल्ल्यावर हल्ला करून तो घेतला. डिचोलीचा किल्ला हस्तगत झाल्यावर पोर्तुगीज सैन्याने साखळी वर चाल केली. सावंतांच्या सैन्याने पोर्तुगिजांचा तीव्रपणे प्रतिकार केला. अखेर १४ तासांच्या प्रतिकारानंतर साखळीचा कोट पडला. यावेळी वाडीकर सावंत आणि कोल्हापूरचे छत्रपती यांच्यात युद्ध चालू असल्याने सावंतांना पोर्तुगिजांचा समाचार घेता आला नाही. परंतु १ वर्षाने त्यांनी गुळेली हे गाव परत घेऊन दि. २ नोव्हेंबर इ.स.१७८२या दिवशी साखळीचा कोटास वेढा घातला. कोट पडला, परंतु पोर्तुगीज सैन्याला कुमक आल्याने त्याने तो फिरून काबीज केला. साखळीच्या कोटास वेढा घातला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २ नोव्हेंबर इ.स.१७८४
अफ्रासिवाबखानाने मीरबक्षी पद ऑक्टोबर १७८३ च्या सुरवातीस स्विकारले आणि पुढील वर्षी बरोबर तेरा महिन्यांनी २ नोव्हेंबर १७८४ रोजी त्याचा खून झाला, ह्या काळात बादशाही राज्यकारभाराची स्थिती न सुधारता ती अधिक खालावली. म्हणून महादजी शिंद्यास दिल्लीचा कारभार हाती घेणे भाग पडले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀