नागपूर ब्रेकिंग न्यूज

❍͜ғͥғɪᴄͣɪͫ͢͢͢ʟ🇲ιѕѕ 𝐀@𝐬𝐡𝐚𝄟⃝❤️🚩
14.6K views
6 hours ago
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी केंद्र सरकारने नवीन नियम लागू केला असून, आता पुढील हप्ता मिळवण्यासाठी 'फार्मर आयडी' (शेतकरी ओळखपत्र) अनिवार्य करण्यात आलेय. मार्च २०२६ मध्ये २२ वा हप्ता वितरित झाल्यानंतर, आता जून-जुलै दरम्यान २३ वा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थानसह १४ राज्यांमध्ये 'शेतकरी नोंदणी' प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि बनावट लाभार्थ्यांना रोखण्यासाठी सरकारने हे डिजिटल प्रोफाईल सक्तीचे केलेय. ज्या शेतकऱ्यांकडे ही आयडी नसेल, त्यांचे पैसे रखडू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधार कार्ड आणि जमिनीच्या कागदपत्रांसह 'AgriStack' पोर्टलवर त्वरित नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आलेय. #पीएम किसान योजना #📄सरकारी योजना #सरकारी योजना📣🎯 #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #ब्रेकिंग न्यूज
❍͜ғͥғɪᴄͣɪͫ͢͢͢ʟ🇲ιѕѕ 𝐀@𝐬𝐡𝐚𝄟⃝❤️🚩
21.9K views
14 days ago
#😠पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला!💪 अशी मनोविकृति अशोक खरात 😡 यक्ति खरोखर घातक नाशिक मधील मीरगावी गावकारी ना I am World God अस बोलयाचा माज नाहीं ऐकल् तर कोप होई देवचा .. लोक चा शेत् जमीनि खोटी कट करस्थान करूँ बलकवली आहे. गाववाली याल बहिष्कार केला. भोंदू विकृत बाबा अशोक खरात बाबा बायांना आपल्या कॅबिनमध्ये घ्यायचा आणि त्यांना गुं-गीचे औषध पाजून टेबलवर झोपायचा... आणि आपलं ज्योतिषी नावाचं ह-त्यार बाहेर काढुन बायांना मंत्रमुग्ध करून टाकायचा.... एका ३५ वर्षीय महिलेने केलेल्या तक्रारीनंतर नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांनी त्याला अटक केली असून, या प्रकरणात अत्यंत धक्कादायक माहिती समोर येत आहे. एका ३५ वर्षीय विवाहित महिलेला गुं-गीचे औषध देऊन तिच्यावर वारंवार अ,त्या,चार केल्याचा आरोप खरातवर आहे. ही पीडित महिला कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी ज्योतिष आणि अंकशास्त्राच्या बहाण्याने त्याच्या संपर्कात आली होती. खरातने महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ शूट करून त्यांना ब्लॅ-क-मेल केल्याचा संशय आहे. पोलिसांनी त्याच्याकडून एक पेनड्राइव्ह जप्त केला असून त्यात ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले आहेत. खरात आपल्या कॅनडा कॉर्नर येथील ऑफिसमध्ये महिलांना बोलावून त्यांच्याकडून अघोरी प्रथा करून घ्यायचा. काही अहवालांनुसार, तो महिलांना स्वतःची ल,घ,वी पिण्यास भाग पाडायचा आणि अ,श्लील कृत्ये करायचा. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता राज्य सरकारने विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे. याचे नेतृत्व वरिष्ठ पोलीस अधिकारी तेजस्विनी सातपुते करत आहेत. पोलिसांनी खरातच्या फार्म हाऊसवर छापा टाकला असता तिथे पि,स्तूल आणि जिवंत काडतुसे सापडली आहेत. तसेच, त्याच्याकडे सुमारे २०० कोटी रुपयांची मालमत्ता असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. स्वयंघोषित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात याच्या अटकेनंतर दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. प्रकरणावर आता खरातच्या दरबारात चालणाऱ्या अघोरी प्रकारांवर बोट ठेवले आहे. खरात हा केवळ भोंदू नसून तो एक 'विकृत' प्रवृत्तीचा माणूस आहे, भोंदू नाही, 'विकृत बाबा आहे' "ज्या माणसाने केवळ पैशांसाठी फसवणूक केली असती, तर त्याला भोंदू म्हणता आले असते. मात्र, ज्याने शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केले आहे, त्याला भोंदू म्हणणे हा त्या शब्दाचा अपमान आहे. खरात हा महाराष्ट्राचा सर्वात 'विकृत बाबा' आहे. खरातच्या दरबारात केवळ सामान्य नागरिकच नाही, तर बडे राजकारणीदेखील हजेरी लावत असल्याचा अनेक नेत्यांची हेलिकॉप्टर खरातच्या भेटीसाठी येत असत, . खरातकडे सापडलेले 'ओशनो जल' आणि व्हायग्रा यांसारख्या गोष्टी त्याच्या कामाचे स्वरूप स्पष्ट करतात, असा दावा त्यांनी केला आहे. राजकीय वरदहस्तामुळेच इतकी वर्षे हे पाप सुरू होते, असेही त्या म्हणाल्या. तपासात काय समोर आले? SIT विशेष तपास IPS तेजस्विनी सातपुते याचा नेतृत्वतपथकाने केलेल्या कारवाईत आतापर्यंत खरातच्या ताब्यातून १०० पेक्षा अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले आहेत. तसेच, त्याच्या आश्रमातून पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि कोट्यवधींच्या मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. तांत्रिक विधीच्या नावाखाली महिलांना विवस्त्र करून त्यांचे शोषण करणे आणि त्यांचे चित्रीकरण करणे, असा हा गंभीर प्रकार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. #ashokkharat #crimenews #viralnews अशोक खरात सध्या पोलीस कोठडीत असून त्याची चौकशी सुरू आहे. न्यायालयाने त्याला २४ मार्च २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या रॅकेटमध्ये अजून कोणाचे हात गुंतले आहेत का, याचा तपास SIT करत आहे. या छि-नाल बाबाबद्दल आपल्याला काय वाटते आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. #📼ट्रेंडिंग व्हिडिओ😲 #trending #ब्रेकिंग न्यूज #🔴आजचे ताजे अपडेट्स📰
❍͜ғͥғɪᴄͣɪͫ͢͢͢ʟ🇲ιѕѕ 𝐀@𝐬𝐡𝐚𝄟⃝❤️🚩
133.8K views
22 days ago
#😭VIDEO: हरीश रानाचा जगाला शेवटचा निरोप😔 💔 १३ वर्षांची प्रतीक्षा… आणि अखेरचा निरोप “सगळ्यांना माफ करत… सगळ्यांची माफी मागत आता जा… ठीक आहे!” गाझियाबादमधील हरीश राणा यांना अखेरचा निरोप देताना त्यांच्या आई-वडिलांच्या तोंडून निघालेले हे शब्द ऐकून उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले. सुमारे १३ वर्षांपूर्वी झालेल्या एका भीषण अपघाताने हरीशचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. एकेकाळचा तंदुरुस्त बॉडीबिल्डर असलेला हरीश अशा अवस्थेत पोहोचला की तो डोळे मिचकावण्याव्यतिरिक्त शरीराचा एकही अवयव हलवू शकत नव्हता. या १३ वर्षांत देशभरात त्याच्यावर अनेक ठिकाणी उपचार करण्याचा प्रयत्न झाला. डॉक्टरांनी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण त्याला पूर्णपणे बरे करता आले नाही. तरीही त्याच्या आई-वडिलांनी आशा कधीच सोडली नाही. तब्बल १३ वर्षे त्यांनी प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण आपल्या मुलाची सेवा करत घालवला. आता हरीशला दिल्लीतील एम्स रुग्णालयात आणण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर त्याचा लाइफ सपोर्ट काढण्यात येणार आहे. १३ वर्षे आशेची लढाई लढल्यानंतर आज एक कुटुंब अश्रूंनी आणि प्रार्थनांनी आपल्या लेकराला अखेरचा निरोप देत आहे. 💔 #ब्रेकिंग न्यूज #दुःखद #📼ट्रेंडिंग व्हिडिओ😲 #trending
❍͜ғͥғɪᴄͣɪͫ͢͢͢ʟ🇲ιѕѕ 𝐀@𝐬𝐡𝐚𝄟⃝❤️🚩
23K views
23 days ago
#😮केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ रुग्णालयात दाखल🔴 पुणे शहराचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना प्रकृतीच्या कारणास्तव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीविषयीची माहिती त्यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना दिली आहे. आज त्यांच्यावर नियोजित शस्त्रक्रिया होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी भावना कार्यकर्ते व नागरिकांकडून व्यक्त होत आहे. #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #ब्रेकिंग न्यूज #ताज्या बातम्या .
❍͜ғͥғɪᴄͣɪͫ͢͢͢ʟ🇲ιѕѕ 𝐀@𝐬𝐡𝐚𝄟⃝❤️🚩
10.6K views
24 days ago
सर्वसामान्यांना दैनंदिन व्यवहारांत येणारी सुट्ट्या पैशांची अडचण दूर करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललेय. आता निवडक एटीएममधून १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटा काढणे शक्य होणार असून, यासाठी आरबीआयने 'स्मॉल व्हॅल्यू डिस्पेंसर' या विशेष यंत्रांचा पायलट प्रोजेक्ट सुरू केलाय. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत या योजनेची माहिती दिली. सध्या मुंबईसारख्या शहरांत याची चाचणी सुरू असून, यश मिळाल्यास ही सुविधा देशभर राबवण्यात येईल. देशात लहान नोटांचा पुरेसा साठा उपलब्ध असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत त्यांचे छपाई प्रमाणही वाढवण्यात आलेय. या निर्णयामुळे ग्रामीण भाग आणि छोट्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, सुट्ट्या पैशांसाठी होणारी ओढाताण थांबण्यास मदत होईल. #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #📄सरकारी योजना #ब्रेकिंग न्यूज #ताज्या बातम्या .
❍͜ғͥғɪᴄͣɪͫ͢͢͢ʟ🇲ιѕѕ 𝐀@𝐬𝐡𝐚𝄟⃝❤️🚩
26.4K views
25 days ago
#🙆‍♂️राज्यात अनेक ठिकाणी गॅस सिलिंडरचा तुटवडा आखाती युद्धाने देशभरात गॅसचा मोठा तुटवडा, ESMA कायद्याची अंमलबजावणी मुंबई - आखाती युद्धामुळे जगावरच युद्धाचे ढग घोंगावत आहेत. त्यात महाराष्ट्र राज्यात एलपीजी गॅस आणि औद्योगिक कमर्शियल गॅस याचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. यामुळे अनेक उद्योग आणि हॉटेल इंडस्ट्री अडचणीत आली आहे. साधारण दहा दिवसापासून अमेरिका, इजराइल, आणि इराण या राष्ट्रात भयंकर युद्ध सुरू आहे. दिवस-रात्र चालू असणाऱ्या युद्धामुळे कच्च्या तेलाचा आणि एलपीजी, क्रूड ऑइल आणि इतर नैसर्गिक वायूंचा पुरवठा जवळपास ठप्प झाला आहे. त्यामुळे युद्ध जरी आखातात असले तरी त्याचे चटके आता आपल्या देशात जाणवायला सुरुवात झाली आहे. युद्धाचे परिणाम संपूर्ण देशाला बसत आहेत, प्रामुख्याने दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता या शहरात गॅसचा मोठा तुटवडा जाणू लागला आहे. गॅसच्या तुटवड्यामुळे गॅस सिलेंडरचा वापर असणारे व्यवसाय ज्यात प्रामुख्याने औद्योगिक कारखाने, मोठ्या हॉटेल इंडस्ट्रीज यांना याचा फटका बसला आहे. युद्ध जर असेच सुरू राहिले तर मोठी अडचण निर्माण होणार आहे. दरम्यान केंद्र सरकारने या गॅस तुटी वर पर्याय म्हणून एस्मा (ESMA) म्हणजेच आवश्यक सेवा पुरवठा अधिनियम कायद्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. या कायद्यामुळे देशभरात अत्यावश्यक वस्तूची साठवनुक आणि काळाबाजार करण्यावर प्रतिबंध लागणार आहे. या एस्मा कायद्याच्या लागू करण्याबरोबरच केंद्र सरकारने देशात तेल शुद्धीकरण आणि पेट्रोल केमिकल च्या रिफायनरी असणाऱ्या कंपन्यांना अधिक प्रमाणात एलपीजी गॅसचे उत्पादन करण्याचे निर्देश दिले आहेत. एस्मा कायदा- (आवश्यक सेवा पुरवठा अधिनियम) भारतीय संसदेने 1968 ला मंजूर केला होता. या कायद्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत अत्यावश्यक वस्तूचा पुरवठा आणि त्याची साठवणूक, काळाबाजार होऊ नये यासाठी हा कायदा अस्तित्वात आला. #ब्रेकिंग न्यूज #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #ताज्या बातम्या . #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स
❍͜ғͥғɪᴄͣɪͫ͢͢͢ʟ🇲ιѕѕ 𝐀@𝐬𝐡𝐚𝄟⃝❤️🚩
37.5K views
27 days ago
#😱गॅस पुरवठा ठप्प! हॉटेल्स बंद❌ #😱गॅस पुरवठा ठप्प! हॉटेल्स बंद❌ देशभरात गॅसचा हाहाकार: केंद्र सरकारचा धडक निर्णय, 'एस्मा' (ESMA) कायदा लागू, हॉटेल व्यावसायिक हवालदिल ​सध्या संपूर्ण देशभरात गॅसचा अभूतपूर्व असा मोठा तुटवडा निर्माण झाला असून, यामुळे सर्वसामान्यांसह व्यावसायिक वर्गामध्ये मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. या अत्यंत गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेत केंद्र सरकार ने एक अतिशय मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. देशातील गॅस पुरवठ्यातील ही अचानक आलेली अडचण आणि नागरिकांची वाढती गैरसोय लक्षात घेऊन प्रशासनाकडून तातडीने पावले उचलण्यात आली आहेत. याच पार्श्वभूमीवर देशभरात ESMA कायदा लागू करण्यात आला आहे. आता या कठोर कायद्याच्या अंमलबजावणीनंतर नक्की काय होणार आणि ही निर्माण झालेली गॅस टंचाईची परिस्थिती कशी आटोक्यात येणार, याकडे संपूर्ण देशाचे आणि व्यावसायिक वर्गाचे लक्ष लागून राहिले आहे. ​उपलब्ध माहितीनुसार, केवळ संपूर्ण देशभरातच नाही तर आपल्या राज्यातही या समस्येने आता उग्र रूप धारण केले आहे. विशेषतः गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण राज्यामध्ये एलपीजी आणि त्यासोबतच कमर्शियल गॅस चा प्रचंड तुटवडा जाणवण्यास सुरुवात झाली आहे. अचानक गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्याने अनेक ठिकाणी ग्राहकांना आणि व्यावसायिकांना गॅस एजन्सीमधून रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. घरगुती वापराच्या गॅससोबतच व्यावसायिक वापरासाठी लागणाऱ्या गॅसची मोठी टंचाई निर्माण झाल्याने सर्वत्र गोंधळाचे आणि चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. ​या गॅस तुटवड्याचा सर्वात मोठा आणि थेट फटका राज्यातील हॉटेल इंडस्ट्री ला बसला आहे. हॉटेल व्यवसायाचा संपूर्ण गाडा आणि रोजचे कामकाज हे प्रामुख्याने कमर्शियल गॅस वरच अवलंबून असते. मात्र सलग दोन दिवसांपासून गॅस सिलिंडर वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सचे दैनंदिन कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. सद्यस्थिती इतकी बिकट झाली आहे की, राज्यातील मोठी आणि विस्तारलेली हॉटेल इंडस्ट्री आता अक्षरशः बंद होण्याच्या मार्गावर येऊन ठेपली आहे. जर लवकरात लवकर गॅस पुरवठा सुरळीत झाला नाही, तर हॉटेल चालकांवर मोठे आर्थिक संकट कोसळेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकार ने लागू केलेल्या या नव्या निर्णयामुळे आता गॅस वितरणातील सर्व अडथळे दूर होऊन अत्यावश्यक सेवा म्हणून गॅस पुरवठा पुन्हा वेगाने सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे. ​पत्रकाराचे मत: गॅस ही आजच्या काळात सर्वसामान्यांची आणि व्यावसायिकांची अत्यंत प्राथमिक गरज बनली आहे. प्रशासनाने आणि केंद्र सरकार ने कठोर कायदा लागू करून योग्य पाऊल उचलले असले तरी, केवळ कागदोपत्री कायदे लागू करून हा प्रश्न सुटणार नाही. प्रत्यक्ष तळागाळात गॅसचा पुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी आणि हॉटेल इंडस्ट्री ला दिलासा देण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे. ​⚠️महत्त्वाची नोंद - कोणतीही फेक बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहिती इनबॉक्स करा. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास नक्की मेसेज मध्ये संपर्क साधा ! - YFC #ब्रेकिंग न्यूज #ताज्या बातम्या . #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #चालू घडामोडी