नित्य श्री ज्ञानेश्वरी

गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची
649 views
5 days ago
:::::-----::::::-----:::::-----::::: ।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।। :::::----::::::------:,:::::-----:::: ::- अभंग क्र.२४८१ -: **************************** या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात- जर आपल्याला सुख मिळवायचे असेल तर देवाला आपलेसे करून घ्या देवाला आपलेसे केल्यावाचून सुख जीवाला मिळणारच नाही. एक देव सोडला तर बाकी सर्व पदार्थ माईक आहेत म्हणजे दुःख देणारे आहेत त्यांच्या आधी आणि अंति सुख देण्याचे अवसानच नाही. अविनाश अशा गोविंदालाच आपलेसे करून घ्यावे आणि आपल्या मनाला त्याचेच वेड लावावे. तुकाराम महाराज म्हणतात जो देवाला आपलासा करून घेतो त्याला एकदाच मरण येते पुन्हा त्याला जन्म येत नाही आणि त्याची उत्तम किर्ती मागे उरते. :::::::::::::::::::::::::::::::::: आपला दास:- ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे आळंदी देवाची दि.१०/०८/२०२६ वार-सोमवार :::::---::::::------:::::::-----::::: ::::::::::- -:::::::::::::::: #🌻आध्यात्म 🙏 #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #🙏भक्ती सुविचार📝 #😇भक्तांचा शनिदेव #✍ज्ञानेश्वरी📖
गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची
689 views
7 days ago
:::::-----::::::-----:::::-----::::: ।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।। :::::----::::::------:,:::::-----:::: ::- अभंग क्र.२५३८ -: **************************** या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात- लोकांनो मी संसार सोडला त्यामुळे तुम्ही माझ्यावर विविध आरोप का ठेवता खरे तर हे माझ्या पूर्व संचितामुळेच ओढावले आहे. हरीविषयी माझ्या अंतःकरणामध्ये भक्ती प्रेम गोडी बसली त्यामुळे अंतःकरणात आनंद निर्माण झाला. माझ्या ज्ञानदृष्टीवर अज्ञानाचा पडदा पडला होता तो त्या विठ्ठलाने दूर केला त्यामुळेच सर्व जगच मला ब्रम्हानंदाने भरलेले दिसत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, "या गोपाळाने मला वासनेपेक्षा वेगळे करुन ठेवले त्यामुळे माझी गोपाळावर आवड बसली आहे." :::::::::::::::::::::::::::::::::: आपला दास:- ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे आळंदी देवाची दि.०८/०८/२०२६ वार-शनिवार :::::---::::::------:::::::-----::::: ::::::::::- -:::::::::::::::: #🌻आध्यात्म 🙏 #✍ज्ञानेश्वरी📖 #🙏भक्ती सुविचार📝 #😇भक्तांचा शनिदेव #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏
गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची
1.5K views
18 days ago
:::::-----::::::-----:::::-----::::: ।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।। :::::----::::::------:,:::::-----:::: ::- अभंग क्र.२५२७ -: **************************** या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात- माझी विठाई ही शकुनवंती आहे जो जी इच्छा करेल ते त्याला तात्काळ देते. राजहंस पक्षी जसा दूध आणि पाणी वेगवेगळे करतो तसेच माझी विठाई खरा आणि खोटा यांचा निवडा करते. जर भाग्यच चांगले नसेल तर चांगले फळ तरी कसे मिळेल आणि अंतकरणात जर काम क्रोधाचे मलमूत्र असेल तरीदेखील चांगले फळ कसे प्राप्त होईल. तुकाराम महाराज म्हणतात ज्याचे पूर्वसंचितच वाईट आहेत ते संचितच त्यांना दरिद्र करून ठेवते. :::::::::::::::::::::::::::::::::: आपला दास:- ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे आळंदी देवाची दि.२८/०७/२०२६ वार-मंगळवार :::::---::::::------:::::::-----::::: ::::::::::- -:::::::::::::::: #✍ज्ञानेश्वरी📖 #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #🌻आध्यात्म 🙏 #😇भक्तांचा शनिदेव #🙏भक्ती सुविचार📝