🆔Official_Sagar 💞💤👑
546 views • 7 hours ago
🚩 प्रजाहितदक्ष श्री राजा शिवछत्रपती.
शिवाजीराजे लोकांना देत असलेली चांगली वागणूक व ते दाखवित असलेला प्रामाणिकपणा यामुळे सगळेचजण त्याच्याकडे प्रेमाने व विश्वासाने पाहतात.
प्रजाजन त्यांच्यावर फार प्रेम करतात. कोणतेही बक्षीस अथवा शिक्षेमध्ये ते अतिशय निःपक्षपाती असत या बाबतीत त्यानी जीवनामध्ये कोणत्याही व्यक्तीला अपवाद केले नाही.
कोनत्याही गुणाला बक्षिसाशिवाय अथवा गुन्ह्याला शिक्षेशिवाय सोडले नाही त्याचे शौर्य व चांगल्या वागणुकीमुळे त्यांवर सर्व माणसे प्रेम करतात.
न्यायव्यवस्थेत कुठल्याही न्यायाधीशाशी चर्चा न करता आपल्या प्रजेला सुखी ठेवत, त्यांच्या या प्रसिद्धीमुळे ते सगळ्या हिंदुस्थानात दरारा बसवणारे तसेच प्रजेची काळजी घेणार सर्वश्रेष्ठ राजे म्हणून ओळखले जात.
हे वर्णन इ.स.१६९५ साली लिहिलेल्या युरोपिअन पहिला शिवचरित्रकार कास्मो- द- ग्वार्द यांने लिहिलेल्या शिवचरित्रातील आहे.
शिवछत्रपतींच्या आज्ञापत्रातील पुढील वर्णन हे जनहितार्थ महाराज किती जागृत होते याचे उत्तम उदाहरण आहे.
‘‘असेल तोवरी धुंदी करून चाराल.
नाहीसे जाले म्हणजे मग काही पडत्या पावसात
मिळणार नाही.
उपास पडतील, घोडी मरायास लागतील.म्हणजे घोडी तुम्हीच मारिली ऐसे होईल व रयतेस तसविस देऊ लागाल,ऐशास लोक जातील,
कोणी कुणब्याचे येथील दाणे आणिल, कोण्ही भाकर, कोण्ही गवत, कोण्ही फाटे, कोण्ही भाजी,
कोण्ही पाले ऐसे करू लागलेत म्हणजे जे कुणबी घर धरून जीव मात्र घेऊन राहिले आहेत तेही जाऊ लागतील.
कितेक उपाशी मराया लागतील म्हणजे त्याला ऐसे होईल की मोगल मुलकात आले त्याहुन अधिक तुम्ही.
ऐसा तळतळाट होईल.’’
शिवछत्रपतींच्या काळात परकीय सत्ताना भारतभूमी ग्रासली होती स्थानिक रयत या परकीयांच्या अरेरावीला कंटाळली होती अशा रयतेला स्वतःच्या भूमीपुत्राचे राज्य मिळाले ते शिवस्वराज्याचे होय.
भारतीय धर्म जर आज अस्तित्वात आहे तर तो शिवछत्रपतींच्या मुळेच होय. म्लेंच्छनी बाटवलेल्या स्वकीयांना परत भारतीय धर्मात आणण्याचे धोरण तत्कालीन राजांमध्ये फक्त शिवरायांनी केले.
युरोपिअन धर्मवाद्यांना चाप लावण्याचे काम महाराजांनीच केले.
१७व्या शतकात स्रियांवर प्रचंड बंधने होती ,पराजित राजांच्या स्त्रियांवर जेते राजे मालकी हक्क गाजवायचे आपल्या बटीक म्हणून जनाण्यात कोंडायचे पण याला मराठा राज्य अपवाद होते कारण इथला राजाच शिवाजी मुळी स्त्रियांचा आदर करणारा परस्त्रीला कोणताही त्रास न देता तिच्या राज्यात सुखरूप परत पाठवणार होता त्यामुळे शत्रूही शिवछत्रपतींचे स्त्री विषयी धोरण पाहून अवाक राहत.
जसा स्त्रीचा सन्मान तसाच स्वतःच्या भाषेचा आदर करणारा हा राजा होता. #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏 #🚩मी शिवबा भक्त #🚩शिवरायांचे भक्त
14 likes
3 shares