Amar kokate Patil
3K views • 7 days ago
#🙏शिवदिनविशेष📜 🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🏇🚩🏇🚩🏇🚩
#१३_ऑगस्ट_१६५७
विजापूरच्या आदिलशहाने थोरले महाराज
साहेब शहाजीराजे भोसले यांना कैद केले होते.
त्यांच्या सुटकेच्या बदल्यात मराठ्यांना किल्ले सिंहगड आदिलशहाला द्यावा लागला होता.
ऐन स्वराज्याच्या छाताडावर उभा असलेला सिंहगड स्वराज्यात असणे अत्यंत गरजेचे होते. पावसाचा फायदा घेऊन राजांनी फौजा पाठवुन सिंहगडावर आकस्मात चढाई करून सिंहगड स्वराज्यात सामील करून घेतला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१३_ऑगस्ट_१६६६
औरंगजेब बादशहाने छत्रपती शिवरायांना
आग्रा येथे नजरकैदेत ठेवल्यामुळे कुंवर रामसिंग हे घाबरले आणि त्यांनी छत्रपती शिवरायांची भेट घेण्याचे नाकारले.
आग्र्याला येऊन शिवाजी महाराजाना जवळजवळ २ महिने झाले होते.
कैदेतून सुटकेच्या कामी मदत करण्यासाठी महाराजाना मुघल सरदारांच्यावर बराच खर्च करावा लागे. जवळचे पैसे संपल्यावर महाराजानी रामसिंहाकडून कर्ज घेतले. हा पैसा मुगल सरदारांवर खर्च करत महाराजानी पुन्हा त्यांच्यामार्फत औरंगजेबाला पत्र लिहिणे सुरू केले. पण औरंगजेब अत्यंत कपटी आणि धूर्त होता. महाराजांच्या अर्जावर त्याने कोणताही विचार केला नाही. याच दरम्यान आग्र्यातील सामान्य जनतेत शिवाजी महाराजांच्या बद्दल सहानुभूती वाढत होती, या कारणाने औरंगजेब मनातून धास्तावला होता. महाराजांचा एकदाचा काय तो निकाल लावण्याचे ठरवून त्याने अतिशय गुप्तपणे हालचाली करण्यास प्रारंभ केला. त्यानुसार महाराजाना विठ्ठलदासाच्या हवेलीत नेऊन ठार करण्याचे त्याने निश्चित केले. आपला बेत अतिशय गुप्त रहावा या हेतूने औरंगजेबाने महाराजांच्या निवासस्थानभोवतीची गस्त अत्यंत कडक केली पण महाराजांच्या सुदैवाने ही गुप्त बातमी महाराजांच्यापर्यंत पोहीचलीच. महाराजांच्या छावनीभोवतीची गस्त अतिशय कडक करण्यात आली.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१३_ऑगस्ट_१७९५
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन 🚩
पुरूषप्रधान व्यवस्थेत स्वच्छ आणि शिस्तबध्द कारभार करणार्या त्या रणरागिनी होत्या, प्रचंड आत्मविश्वास, धाडस ,
दूरदृष्टी, त्यागी वृत्ती असे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत. अहिल्याबाईंचा महेश्वर येथे १३ ऑगस्ट १७९५ ला वृद्धापकाळाने निधन झाले.
🙏 "अशा थोर ,कर्तबगार, पराक्रमी "पुण्यश्लोक अहिल्यादेवीस आमचे विनम्र अभिवादन
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
49 shares