mahesh m. shirkar
596 views 4 days ago
*शिवविचार प्रतिष्ठान* ८ ऑगस्ट इ.स.१६४८ पुरंदरावर स्वराज्याची पहिली लढाई. पुरंदर खळत-बैलसर येथे स्वराज्याची पाहिली मोठी लढाई. आदिलशाही सरदार फत्तेखानाच्या एकुण ६०००च्या फौजेचा शिवरायांनकडून सपशेल पराभव. फत्तेखानाच्या ३००० फौजेविरुद्ध खुद्द छत्रपती शिवराय चालून गेले. ह्या लढाईमध्ये फत्तेखान जबर जखमी होउन पसार झाला. ही लढाई खळत-बैलसर येथे झाली. तर पुरंदर-सासवड येथे आदिलशाही सरदार हैबतराव याच्याशी लढताना 'बाजी पासलकर' यांना वीरमरण आले. *८ ऑगस्ट इ.स.१६८३* चौलच्या वेध्याचे काम निळोपंत पेशवे यांच्याकडे होते त्यांनी ते स्थळ हस्तगत करण्याचे पुष्कळ प्रयत्न केले पण ते व्यर्थ गेले असता चौलच्या तटावर मराठ्यांनी निकराचा हल्ला केला, त्या प्रसंगात पोर्तुगीझांनी पुष्कळ मराठे कापून काढले. जवळच कोरलाइचा किल्लाही पोर्तुगीझांच्या ताब्यात होता त्यावरसुद्धा मारात्र्ह्यांनी छापा घातला. पुष्कळ मराठे धारातीर्थ पडले पण स्थळ हाती आले नाही. #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕
14 likes
11 shares

More like this