🆔Official_Sagar 💞💤👑
533 views 17 hours ago
८ ऑगस्ट १६४८ रोजी, छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेच्या वेळी सुरुवातीच्या टप्प्यात झालेली खळद मध्ये मोठी पहिली बेलसर पुरंदरची लढाई...🚩 छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला मैदानी लढाईतील विजय आणि युद्धकौशल्याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे फत्तेखानावर मिळवलेला विजय. तीन फळीमध्ये लढले गेलेले हे युद्ध समजून घेण्यासाठी आधी थोड्या इतिहासात जावे लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचे कार्य सुरू करत असताना १६४६ मध्ये आदिलशाहाच्या ताब्यात असलेला चाकण किल्ला घेतला परत आदिलशाहच्याच ताब्यात असलेला कोंढाणा १६४७ मध्ये घेतला आणि राजकारण करत पुरंदर किल्ला ही घेतला. स्वराज्याचे हे उपक्रम सुरू होते आणि याची बातमी आदिलशाहास मिळत होती त्यात या कार्यास शहाजीराजेंची शिवाजी महाराजांना मदत आहे याकारणाने आदिलशाहाने शहाजीराजे यांना अटक केली आणि शिवाजी महाराजांवर दबाव टाकण्यास आदिलशाहने फत्तेखान या सरदारास शिवरायांवर स्वारीस पाठवले.. स्वराज्याचे निशाण-स्वराज्य उभारणीचा महाराज शहाजीराजांचा मनसुबा फसला आणि ते विजापूरच्या आदिलशाहची चाकरी करू लागले. बंगळुर हे शहाजीराजांचे जहागिरीचे ठिकाण. जिजाऊसाहेब आणि शहाजीराजांनी बंगळुरात काही मसलत करून बालशिवबाला महाराष्ट्रात पुणे मुक्कामी पाठविण्याचे योजिले. शहाजीराजांनी बाल शिवबाला आपले काही निष्ठावान सरदार, हत्ती, घोडे खजिना व 'भगवा झेंडा' दिला. बाल शिवबा जिजाऊसाहेबांसमवेत बंगळुरहून पुण्याकडे निघाले. पुण्याच्या कसबा गणपतीला वंदन करून आई तुळजाभवानीला साक्ष ठेवून बालशिवबाने मावळच्या दऱ्याखोऱ्यात स्वराज्याचा यज्ञ पेटविला. मुरुंबदेवाचा डोंगर (राजगड), तोरणा, कोंढाणा इ. समिधा यज्ञात पडल्या. आणि अलि आदिलशहाची झोप उडाली. प्रथम त्याने कपटाने शहाजीराजांना जिंजी जवळ पकडून अटकेत टाकले आणि आपल्या फत्तेखान नावाच्या सरदाराला प्रचंड फौजेनिशी स्वराज्यावर सोडले. सुभानमंगळ ताब्यात घेऊन फत्तेखान सासवड जवळील खळद बेलसर या गावाजवळ तळ देऊन बसला. नुकतेच शिवाजीराजे पुरंदर किल्ल्यावरून युद्धाचे डावपेच आखू लागले. महाराजांच्या हुकमावरून मावळ्यांची एक तुकडी सुभानमंगळावर तुटून पडली. सुभानमंगळ फत्ते झाला. फत्तेखानाच्या सरदारांचा दारुण पराभव झाला. सुभानमंगळ वर भगवा झेंडा फडकला. स्वराज्यासाठी लढली गेलेली ही पहिली लढाई, ती तारिख होती ८ ऑगस्ट १६४८... शहाजीराजे यांच्या कैदेमुळे शिवाजी महाराज यांनी काही प्रतिकारार्थ हालचाल करण्याआधीच आदिलशाहने शिवरायांवर फत्तेखानास पाठवले याचा अर्थ असा आहे की आदिलशाहने शिवाजी महाराजांचे राजकीय अस्तित्व मान्य केले होते.. #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏 #🚩शिवरायांचे भक्त #🚩मी शिवबा भक्त
14 likes
1 comment 12 shares

More like this