🆔Official_Sagar 💞💤👑
538 views • 4 hours ago
🙇🚩 ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाच्या प्रयोगाची १९६९ साली महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्रात आलेली बातमी/ जाहिरात! 😊
काही नाटकं इतिहास मांडतात. काही नाटकं इतिहास घडवतात. या दोन्ही गोष्टी ज्या नाटकाने प्रत्यक्षात आणल्या ते नाटक म्हणजे ‘रायगडाला जेव्हा जाग येते’. वसंत कानेटकर लिखित, मास्टर दत्ताराम दिग्दर्शित, डॉ.काशिनाथ घाणेकर, मास्टर दत्ताराम, सुधा करमरकर अभिनीत ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाने ऐतिहासिक नाटकांची व्याख्याच बदलली वसंत कानेटकर हे मराठी नाट्यसृष्टीतील अग्रणी नाटककार, त्यांची अनेक नाटके गाजली. परंतु छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यातील नाते केवळ इतिहासाच्या नजरेतून नव्हे तर पिता-पुत्रांच्या दृष्टिकोनातून मांडण्याचा धाडसी प्रयत्न वसंत कानेटकर यांनी या नाटकातून केला. या नाटकाला नाव कसे मिळाले याचा एक किस्सा सांगितला जातो. वसंत कानेटकर यांचे नाटकाचे लिखाण पूर्ण झाले. मा.दत्ताराम हे नाटक दिग्दर्शित करणार हे निश्चित होते, पण कानेटकरांना मनाजोगते नाव सुचत नव्हते. स्वराज्य संग्राम, सह्याद्रीचा अभिषेक , राज्याभिषेक अशी काही नावे वसंत कानेटकरांच्या मनात घोळत होती. एकदा कानेटकर आणि मास्टर दत्ताराम चहाच्या टपरीवर चहा पिताना नाटकाच्या बद्दल गप्पा मारत होते. त्यावेळी मा. दत्ताराम कानेटकरांना म्हणाले, “तुमच्या शब्दात उभा महाराष्ट्र खडबडून जागा करण्याची ताकद आहे.” हे वाक्य कानेटकरांच्या डोक्यात फिरत राहिले आणि आणि त्यातून त्यांना नाव सुचले, “रायगडाला जेव्हा जाग येते.” २६ ऑक्टोबर १९६२ रोजी गिरगावातील भारतीय विद्या भवन इथे ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ नाटकाचा पहिला प्रयोग पार पडला. या नाटकाचं निर्मितीमूल्य भरजरी होतं. प्रयोगाआधी गिरगावमध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यामुळे रसिकांच्या मनात नाटकाविषयी कुतूहल निर्माण झाले.
छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती एक विचार सातासमुद्रापार #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏 #🚩शिवरायांचे भक्त #🚩मी शिवबा भक्त
12 likes
4 shares