🆔Official_Sagar 💞💤👑
2K views 4 days ago
छत्रपतींच्या स्वराज्य उभारणीच्या चळवळीमध्ये संत तुकाराम महाराज यांनी शिवाजी राजे यांना पाठवलेले अभंग खूपच महत्त्वाचे ठरतात. राजमाता जिजाऊ यांनी शहाजीराजे यांच्या मार्गदर्शनाने शिवछत्रपतींच्या नावे उभारलेली स्वराज्याची गुढी व तत्कालिन घडामोडीत संत तुकाराम महाराज यांच्या गाथेतील अभंग हे या कार्यासाठी निश्चिचत मार्गदर्शक अन् प्रेरणादायी असे होते. पराविया नारी माउलीसमान । मानिलिया धन काय वेचे ।। न करितां परनिंदा द्रव्य अभिलाष । काय तुमचे यास वेचे सांगा ।। बैसलिये ठायी म्हणता रामराम । काय होय श्रम ऐसें सांगा ।। संताचे वचनी मानिता विश्वास । काय तुमचें यास वेचे सांगा ।। खरें बोलता कोण लागती सायास । काय वेचे यास ऐसे सांगा । तुका म्हणे देव जोडे याचसाटी । आणीक ते आटी न लगे काही ।। परस्त्रीते म्हणता माता । चित्त लाजविते चित्ता ।। काय बोलोनिया तोडें । मनामाजी कानकोडें ।। धर्मधारिष्टगोष्टी सांगे । उष्ट्या हाते नुडवी काग।। जे जे कर्म वसे अंगी । ते ते आठवे प्रसंगी ।। बोले तैसा चाले । तुका म्हणे तो अमोल ।। छत्रपती शिवाजी महाराज यांनी संत तुकाराम महाराज यांना आणण्यासाठी अबदागिरी घोडा, कारकून पाठवले होते. त्यावेळी संत तुकाराम महाराज यांनी शिवाजी महाराज यांना पाठवलेले हे अभंग.. शिवाजी महाराज यांना पाठवलेले हे अभंग स्वराज्य स्थापनेच्या कालावधीतील म्हणजे १६४५ ते १६५० सालचे असावेत असे तज्ज्ञांचे मत आहे. पण तत्कालिन परिस्थितीचा विचार करता राजमाता जिजाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्य स्थापनेसाठी ते निश्चितच मार्गदर्शक ठरले आहेत. शिवछत्रपतींच्या सैनिकांस पाईकीचे अभंग संत तुकाराम महाराजांनीं दिलें व शिवरायांना निष्ठावंत माणसें लाभलीं म्हणून स्वराज्य स्थापतां आलें. 🙇🙏🚩 😊🚩✍️ #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏 #🚩मी शिवबा भक्त #🚩शिवरायांचे भक्त
22 likes
16 shares

More like this