Amar kokate Patil
5K views 13 days ago
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #११_जुलै_१६५९ अफजलखानाशी लढावयास शिवाजीराजे प्रतापगडावर आले. स्वराज्याच्या भूमीवरती(१२ मावळ प्रांतात) युद्ध होऊ नये म्हणुन स्वराज्याच्या सरहद्दीवरती जाउन लढायची शिवरायांची रणनीती होती. शिवाय अफझलखानाच्या अवजड फौजेशी लढाईसाठी जावळी ही अतिशय योग्य रणभूमी आहे हे राजांना खुप आधी पासून पक्के ठावुक होते. त्यासाठीच तर त्यांनी २ वर्षात भोरप्याच्या डोंगरामधून प्रतापगड बांधून काढला होता. त्यात प्रतापगड हा मुळातच भयाण सह्याद्रीच्या एकदम बेचक्यातील ही जागा. प्रतापगड ला जाण्याची एकच वाट रणतोंडीची वाट ज्या वाटेवरून जाताना तोंड रडल्यासारखंच होणार अशी ही वाट. इतकी नैसर्गिक अनुकलता शिवासुत्रासाठी (गनिमीकाव्यासाठी) पुरेशी होती. खानाने सर्वदूर धुमाकूळ मांडला असतानाच महाराज दिनांक ११ जुलै १६५९ रोजी राजगडाहून जावळीस (प्रतापगडावर) पोहचले. महाराज जावळीस पोचले ते अफझलखानाला किंवा मृत्यूच्या भीतीने नाही तर राजगड ते प्रतापगड यादरम्यान असणाऱ्या शेतकरी कष्टकरी मावळ्यांचा मुलुख अफझलखानाच्या तावडीतून वाचवा म्हणून राजे मृत्यूच्या दोन पावले जवळच आले. मुळात जावळीचा प्रदेश खडतर त्यावेळी प्रतापगडाला यायला एकच वाट अस्तित्वात होती ती म्हणजे रणतोंडीची वाट ज्या वाटेहून येताना तोंड रडल्याशिवाय राहणारचं नाही, अशी ती वाट शत्रूला अतिशय भयानक वाटणारा पण मावळ्यांचा जोडीदार सह्याद्री इथे थोडा जास्तच राकट होता न इथेच महाराजांच्या युद्धनीतीने खानाचा निःपात करता येणार होता. ज्याला दुनियेने गनिमी कावा म्हणून संबोधले परंतू आपण त्यास शिवसूत्र मानले. कमीत कमी फौजेनिशी दुष्मनाच्या जास्तीतजास्त फौजेचा अत्यंत कमीतकमी वेळेत संपूर्ण पराभव. (जिथे मराठ्यांचा कावा तिथे इतरांनी वाका कारण दुसरा पर्यायच नाहीये...) 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
74 likes
46 shares

More like this