🆔Official_Sagar 💞💤👑
694 views • 3 months ago
१२ मे १६७०...मराठा साम्राज्याची साक्ष देणारा “शिवनेरी किल्ला” हा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो अनेक ऐतिहासिक घटनांची साक्ष देणारा हा किल्ला आहे...🚩
१३४७ ते १४८५ या काळात हा किल्ला बहामनी सुलतानांच्या ताब्यात होता व बहामनी राजवटी नंतर तिच्या जागी अहमदनगरची निजामशाही आली व किल्ले शिवनेरी निजामशाहीच्या ताब्यात आला...
काजी निजामा करहर दुई उर्फ मुखलिसखान १६४७ ते १६६७ पर्यत याने वेगवेगळ्या मोहिमांच्या मध्ये सहभाग घेतला होता व बक्षी, वाकनीस, तोफखान्याचा अधिकारी या वेगवेगळ्या पदावर देखील काम केले १२ मे रोजी शिवाजी महाराजांनी खिलतीची वस्त्रे घ्यावीत म्हणून समजूत घालण्यास आकिलखान व मुल्तफखान याच्या बरोबरीने मुखलिसखान हाही आला होता मार्च १६६७ मध्ये शहजादा मुअज्जम याची दक्षिण सुभ्यांवर औरंगजेबाने नेमणूक केली व त्याच्या बरोबर मुखलिसखान याची शिवनेरीच्या किल्ल्यावर नेमणूक केली १६७० पर्यंत हा शिवनेरीवर नेमणुकीस होता...
१६८० च्या अखबार मध्ये मुखलिसखान मरण पावला असा उल्लेख आहे मुखलिसखान हा मोगल किताब असून या नावाचे बरेच मोगल सरदार सापडतात...♥️🔥 #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏 #🚩शिवरायांचे भक्त #🚩मी शिवबा भक्त
19 likes
7 shares