🆔Official_Sagar 💞💤👑
5K views • 1 days ago
🚩 आजचे ऐतिहासिक दिनविशेष 🚩
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
७ ऑगस्ट १६७५
आजच्या दिवशी कोल्हापुर स्वराज्यात दाखल झाले.
कोल्हापूर परिसरावर विजापूरच्या आदिलशहाची अनेक वर्षे सत्ता होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी मार्च,
१६७३ मध्ये पन्हाळागड जिंकून स्वराज्यात आणला, तसेच १६७५ मध्ये कोल्हापूर परिसर खर्या अर्थाने जिंकून आपल्या अखत्यारीत आणला.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
७ ऑगस्ट १६७९
किल्ले खांदेरी-उंदेरी वर शिवरायांच्या आदेशावरून गोड्या पाण्याचे झरे खोदुन तेथे विहीरी बांधण्याचे काम चालू झाले.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
७ ऑगस्ट १७९०
पानिपतच्या लढाईनंतर उत्तरेत मराठ्यांचा जम बसवण्याची महत्वपूर्ण कामगिरी केली ती सरदार महादजी शिंदे यांनी. दिल्ली काबीज करण्याच्या उद्देशाने महादजींनी आपली फौज एकत्र करून दिल्लीवर आक्रमण केले. दिल्ली यावेळी अफगाण व रोहिल्यांच्या ताब्यात होती.महादजींनी दिल्ली ताब्यात घेतली व इंग्रजांच्या आश्रयाला गेलेल्या शहाआलम ला परत आणून त्याला दिल्लीच्या गादीवर बसवले.
पण महादजींचे हे वर्चस्व बादशहाचे काही सरदार व राजपुताना मानवले नाही, त्यांनी एकत्र येऊन २९ जुलै ला लालसोटच्या लढाईत महादजींचा पराभव केला.
यानंतर पानिपतचा सूत्रधार नजीबखानाचा नातू गुलाम कादिर आणि इस्माईल बेग यांनी बादशहा शहाआलम ला पदच्युत करून त्याचे डोळे काढले व त्याच्या जागी बिदर बख्तला गादीवर बसवले.
महादजींनी हार न मानता पुन्हा सैन्य जमवून दिल्लीवर हल्ला करून दिल्ली ताब्यात घेतली आणि गुलाम कादरला कैद करून ठार मारले आणि पुन्हा अंध शहाआलम ला गादीवर बसवले.शहाआलम ने खुश होऊन संपूर्ण राज्यात गोवधबंदी जाहीर केली व मथुरा व वृंदावन ही पवित्र स्थळे महादजींना देण्यासंबंधीचे फर्मान काढले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
७ ऑगस्ट १९१४
रवींद्रनाथ टागोर यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.
रवींद्रनाथ टागोर हे थोर साहित्यिक, कवी, नाटककार , संगीतकार व चित्रकार होते,
त्यांचे साहित्यक्षेत्रातील नोबेल या उच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांचे बंगाली साहित्यावर विशेष प्रभुत्व होते. तसेच शांतिनिकेतनची उभारणी करणारे,
सृजन साहित्यिक म्हणून ते ओळखले जात. #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩शिवरायांचे भक्त #🚩मी शिवबा भक्त #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏
39 likes
81 shares