🆔Official_Sagar 💞💤👑
2K views 2 months ago
🚩 आजचे ऐतिहासिक दिनविशेष 🚩 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 ९ जून १६५९ शिवरायांनी सिद्दीवर स्वारी करून विजय मिळविला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 ९ जून १६८० दक्षिणेचा सुभेदार नेमलेला खान खानजहान बहाद्दूर औरंगाबादला पोहचला व त्याने लगेच मराठ्यांच्या ताब्यात असलेल्या हनुवंतगडास ( अहिवंतगड ) वेढा घातला. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩 ९ जून १६८२ छत्रपती संभाजी महाराजांनी गुजरात सीमेवरील "खंबायत" व "रामनगर" जिंकले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 ९ जून १६९६ छत्रपति राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांना तामिळनाडू येथील जिंजी किल्ल्यावर पुत्ररत्न झाले. मुलाचे नाव 'शिवाजी' ठेविले. ताराबाईंचे लग्न छत्रपती राजाराम महाराजांशी १६८३-८४ च्या सुमारास झाले. २५ मार्च १६८९ रोजी मोगलांनी रायगडास वेढा घातला असता त्या छत्रपती राजाराम महाराज यांच्यासह रायगडावरून निसटून गेल्या. छत्रपती राजाराम महाराज जिंजीला गेल्यानंतर ताराबाई, राजसबाई व अंबिकाबाई या विशाळगड येथे राहिल्या. रामचंद्रपंत अमात्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विशाळगड येथे लष्करी व मुलकी व्यवहाराची माहिती घेतली.सन १६९४ साली त्या तिघी जिंजीला पोहचल्या. ९ जून १६९६ रोजी ताराबाईंना शिवाजी पुत्ररत्न झाले. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩 ९ जून १७०० दख्खन स्वारीवर असलेल्या औरंगजेबाने सज्जनगड जिंकला. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩 ९ जून १७०० परळी किल्ला मोगलांना प्राप्त. २ महिने निकराचा संग्राम होऊन बादशहाचे पुष्कळ लोक जाया झाले. इकडे गडावर राजाराम मरण पावल्याची खबर आली तेव्हा गडावर ‘परशुराम त्रिंबक’ कारभार पाहत होते. राजारामांच्या मृत्यूची वार्ता ऐकून परळीच्या किल्लेदारास न विचारता परशुराम त्रिंबकने बादशहास शरणचिट्ठी लिहिली त्यामुळे धान्यसामग्री संपल्यामुळे आजच्या दिवशी ९ जुन रोजी परळीचा किल्ला मोगलांना प्राप्त झाला. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩 ९ जून १७१८ पूर्ण ताकदीनिशी इंग्रज आंग्र्याँच्या विजयदुर्ग येथील आरमारावर चालून गेले. बरेचसे आरमार आंग्र्यान्नी पावसाळ्यासाठी नांगरुन ठेवले होते. तरीसुद्धा उत्कृष्ट संरक्षण क्षमता आणि सागराचा वापर ह्यामुळे इंग्रज ९ दिवस प्रयत्न करून पराभूत होउन मुंबईला परत गेले. #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏 #🚩मी शिवबा भक्त #🚩शिवरायांचे भक्त
17 likes
18 shares

More like this