सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
818 views
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳
📜 २२ जुलै इ.स.१६६६
राजियांनी राजगडाहून आग्राकडे निघताना बरोबर बराच खजिना घेतला होता. राजांना कैद केल्यावर ह्या कैदेतून ते आग्रातील अमीर उमराव बडी मंडळी यांना भेटीदाखल अनेक वस्तू पाठवू लागले. शहरात राजेविषयी चांगले मत तयार झाले. दखनीराजा चांगला दिलदार असल्याचा बोलबाला होऊ लागला. याच सुमारास औरंगजेबाने आपल्या लवाजम्यासह आग्रा शहराबाहेर जाऊन शिकार करण्याचे ठरविले. औरंगजेब दिनांक २२ जुलैपासून आग्रा शहराबाहेर राहिला. त्यामुळे आग्यातील कारभार थंड पडला होता. छत्रपती शिवाजीराजांच्या डेऱ्याभोवतीचा पहारादेखील ढिला पडला होता. शाहीदरबार काही दिवस बंद असल्याने आग्रा शहरात सुटीचे वातावरण होते. यावेळी राजे मिठाईचे पेटारे भरून आग्रातील अमीर उमरावांकडे घरपोच करीत होते. प्रथमतः फुलादखाना कडून हे पेटारे तपासले जात होते. त्याला व त्यांच्या
पहारेवाल्यांनाही महाराजांनी मिठाई दिली असणार असे पेटारे सतत जाऊ लागले. काही दिवस लोटल्यावर राजांच्या मनात आले की, आपल्या बरोबर राहत असलेले एक थोर सत्पुरुष कवींद्र परमानंद नेवासकर यांचा सत्कार करण्याचे ठरविले. हा सत्कार समारंभ दिनांक २२ जुलै १६६६ च्या सुमारास झाला असावा, कारण ह्याचा उल्लेख दिनांक २२ जुलैच्या राजस्थानी पत्रात आहे. दिनांक २२ जुलै रविवारी छत्रपती शिवाजीराजे यांनी राहत्या हवेलीच्या बागेत परमानंदांची यथोचित पूजा केली. त्यांना एक हत्ती व हौबासह एक हत्तीण, दोन उत्तम घोडे व वस्त्रालंकार दिले. त्यांच्यासाठी ठेवून घेतलेले चाळीस स्वार त्यांच्या बरोबर
दिले; आपल्याजवळील मौल्यवान कापड चोपड बांधून राजियांनी कवींद्रापाशी दिले. कवींद्राना परवाना मिळालेला होता. त्याप्रमाणे ते राजांचा निरोप घेऊन निघाले. व आग्रा शहराच्या पश्चिमेकडे सुमारे २३ मैलांवर असलेल्या फत्तेपूर-शिक्री या गावी पोहचले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🙏शिवदिनविशेष📜 #🚩 छत्रपती शिवाजी महाराज गाणी🎶 #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 #🙏 प्रेरणादायक बॅनर
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtu.be/HH7NV-i9UaA
📜 २२ जुलै इ.स.१६७५
(श्रावण शुद्ध एकादशी, शके १५९७, संवत्सर राक्षस, वार गुरुवार)
महाराज बहादुरखानाच्या डोळ्यात धूळ फेकण्यात यशस्वी!
किल्ले पुरंदरला बहादुरखानाच्या वकिलांना परत पाठविले असले तरी महाराजांनी बहादुरखानाशी तहाची बोलणी सुरूच ठेवलेली होती असे दिसते. अखेरीस महाराजांनी मोगलांपासून घेतलेला मुलुख व १७ किल्ले मोगलांना परत करावेत दख्खनची सरदेसाईपणाची वृत्ती महाराजांना मिळावी, जुन्नरचा मोगली सुभेदार कल्याण-भिवंडीला यावा अशी तहाची कलमे ठरली. (युवराज शंभुराजेंचे पंच हजारी मनसबदारीचे कलम बाद झाले.) या तहावर महाराजांच्या वकिलाने बहादुरखानाची सही घेतली. बहादुरखानाने मोठ्या आनंदाने तहाचे वृत्त औरंगजेब बादशहाकडे रवाना केले. औरंगजेब बादशहा यावेळी वायव्य सरहद्दीवर होता. छत्रपती शिवाजी महाराजांशी यशस्वी तह घडवून आणल्याबद्दल औरंगजेब बादशहा बहादुरखानावर प्रसंन्न झाला. बहादुरखानाची बढती करण्यात येऊन तो आता सप्त हजारी मनसबदार झाला. औरंगजेब बादशहाने त्याला एक हत्तीही बक्षिस दिला. त्याचे भाऊ व मुले यांचाही औरंगजेब बादशहाने गौरव केला. बहादुरखानही या सन्मानामुळे खुष झाला. त्याने या निमित्ताने बहादुरगड येथे प्रचंड उत्सव साजरा केला. मेजवान्या, बैठकी यांची एकच रेलचेल उडाली. या आनंदोत्सवात बहादुरखानाने ३० हत्ती, ५०० घोडे, २००० वस्त्रे, तरवारी व अन्य शस्त्रे देणगी दाखल आपल्या सरदार, आधिकारी व सेवक वर्गाला दिल्या. परंतु हा भ्रमाचा भोपळा लवकरच फुटला. पहिल्या पंधरवड्यात बहादुरखानाने महाराजांकडे कबूल केलेले १७ किल्ले ताब्यात देण्याबद्दल मागणी केली. परंतु महाराजांनी ते साफ नाकारून बहादुरखानाच्या तोंडाला पाने पुसली. महाराजांनी तहाची वाटाघाट, आदिलशाही मुलुखात बिनधास्तपणे स्वारी काढता यावी एवढ्यासाठीच बहादुरखानाच्या डोळ्यात धूळ फेकण्याच्या द्रुष्टीने सुरू ठेवली होती हे आता मोगलांच्या लक्षात आले. अशाप्रकारे महाराज बहादुरखानाच्या डोळ्यात धूळ फेकण्यात यशस्वी झाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २२ जुलै इ.स.१६७८
दक्षिण दिग्विजय मोहिमेत छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंजी किल्ला ताब्यात घेतला व त्याची व्यवस्था लावून महाराजांनी त्याच भागातील आणखी एक बळकट दुर्ग वेल्लोरला वेढा दिला. वेल्लोरचा भुईकोट किल्ला विजयनगर साम्राज्याचा या भागातील सरदार चिन्नबोमी नायक याने बांधला होता. किल्ल्याला दुहेरी तटबंदी व जवळपास ७५ फूट रुंदीच्या खंदकाचे सरंक्षण होते. बलदंड वेल्लोर लवकर जिंकणे सहजासहजी शक्य नाही हे ओळखून महाराजांनी वेढ्याचे काम नरहरी रुद्र यांच्याकडे सोपवले व ते शेरखान पठाणाचा बंदोबस्त करण्यासाठी गेले. पुढे दक्षिण मोहीम आटोपून महाराज रायगडावर परतले तरीही वेल्लोरचा वेढा चिवट मराठ्यांनी रघुनाथपंत व सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली जवळपास वर्षभर सुरूच ठेवला होता. शेवटी किल्ल्यात पसरलेल्या रोगराईला कंटाळून व विजापुरावरून मदत मिळण्याची शक्यता नसल्याने किल्लेदार अब्दुलाखान याने ५० हजार होन घेऊन वेल्लोर किल्ला रघुनाथपंतांच्या हवाली केला. वेल्लोर किल्ला स्वराज्यात आला.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇
📜 २२ जुलै इ.स.१६८३
(श्रावण शुद्ध ९, नवमी, शके १६०५, रुधिरोद्रारी संवत्सर, वार रविवार)
छत्रपती संभाजी महाराजांचा चौलवर हल्ला!
पोर्तुगीज विसेरेईने छत्रपती संभाजी महाराजांचे वकिल येसाजी गंभीर यांना नजर कैदेत टाकल्याने छत्रपती संभाजी महाराज व पोर्तुगीज यांच्यातील युद्ध चांगलेच भडकले. २ हजार घोडदळ व ६ हजार पायदळ, बरोबर घेऊन छत्रपती संभाजी महाराजांनी पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेल्या चौलच्या ठाण्यास वेढा घातला. छत्रपती संभाजी महाराज वेढा घालून स्वस्थ बसले नाहीत. चौलच्या तटबंदी वर मराठी सैन्याकडून अविरत होणारे तोफांचे हल्ले, आक्रमणे याचा प्रतिकार करता करता चौल तटबंदीच्या आतील पोर्तुगीज शिबंदी मेटाकुटीस आली. तेव्हा अक्षरशः शहरातील भिक्षू व नागरिक लढावयास आले. राठ्यांच्या प्रबळ हल्ल्यापुढे रडकुंडीस आलेल्या पोर्तुगिजांनी ""मेरी वर्जिन आणि सेंट स्टिफन यांची करुणा भाकण्यास सुरुवात केली. इतका प्रखर हल्ला करून छत्रपती संभाजी महाराजांनी पोर्तुगिजांचा नक्शा उतरविला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २२ जुलै इ.स.१७३२
धार संस्थानचा उगम झाला
धार संस्थान ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील मध्य प्रदेश राज्यातील एक संस्थान. क्षेत्रफळ ४,६०८ किमी. लोकसंख्या सु. २,५०,००० (१९४१). वार्षिक उत्पन्न सु. १६·५ लाख. २२ जुलै १७३२ रोजी थोरल्या बाजीराव पेशव्याने आनंदराव पवाराला धार आणि आसपासच्या परगण्यांचा हक्क दिला. त्यातून संस्थानाचा उगम झाला. अनेक लढायांतून मर्दुमकी गाजवणारा याचा पुत्र यशवंतराव पानिपतला कामी आला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २२ जुलै इ.स.१७४२
दि.२२ जुलै इ.स.१७४२ श्रावण शु. द्वितीया शके १६६४ दुन्दूभिनाम संवत्सरी, गुरुवारी गोपिकाबाईंच्या पोटी पुत्र जन्माला आले.नानासाहेब पेशवे यांचे पहिलेच पुत्र. शनिवारवाडा आनंदाच्या चांदण्यात न्हाऊन निघत होता.सर्वात जास्त आनंद झाला होता तो म्हणजे राधाबाईंना..! राधाबाईंनी त्यांच्या पणतू चे बारशाच्या वेळेस "विश्वास" असे ठेवले. राधाबाईंच्या मुलाची व नानासाहेबांच्या वडिलांची, बाजीरावांची आठवण म्हणून मुलाचे नाव विश्वासराव (विश्वनाथ) ठेवण्यात आले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 २२ जुलै इ.स.१८४४
१८४४ चा गडकरी उठाव
उठावाची पहीली ठिणगी ही २२ जुलै १८४४ रोजी किल्ले भुदरगड येथे पडली. भुदरगडच्या गडकऱ्यांनी मामलेदाराला गडावर घेण्याचे नाकारले. त्यातून बंडास सुरूवात झाली. पाठोपाठ गडहिंग्लज जवळील सामानगडारील गडकऱ्यांनी बंडाचे निशाण उभारले. गडाचे दरवाजे बंद करून त्यांनी सरकारी अधिकारी लोकांना गडावर येण्यास मज्जाव केला. या बंडाचे नेतृत्व रामजी जाधव, दौलतराव घोरपडे, बापुजी बाजीराव सुभेदार, गोविंद फडणीस, गणेश मुजुमदार, यशवंत फडणीस, मुंजाप्पा कदम, जोतिबा आयरे या लोकांनी केले. या बंडाची बातमी समजताच कोल्हापुराहुन रताजीराव हिम्मतबहाद्दर चव्हाण व हणमंतराव सरलष्कर हे सामान गडावर चालुन गेले. गडकर्यांनी या दोघांचा पराभव केला. यामुळे गडकरी लोकांचा उत्साह वाढला. सभोवतालच्या परिसरातील लोकांनी गडकरी लोकांस मिळण्यास सुरूवात केली. दारूगोळा जमा केला. व ते प्रतिकाराचे तयारीत होते.
यावेळ पोलिटिकल एजंट रीव्हीज् याने गडकरी लोकांस शरण आणण्याचा प्रयत्न केला. पण त्यास गडकऱ्यांनी दाद दिली नाही. उलट बोलणी करणेस पाठवलेल्या लोकांस गडावर डांबून ठेवले. ही योजना फसलेमुळे रीव्हजने गडकरी लोकांत फूट पाडण्याचा प्रयत्न केला व जे गडकरी शरण येतील त्यांना अभय मिळेल आणि त्यांचे तक्रारींचा विचार केला जाईल असे सांगूनही पाहीले. परतुं या सर्वाचा काहीही उपयोग झाला नाही.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २२ जुलै इ.स.१८५७
इ.स.१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध - झाशीची राणी पुन्हा राज्यकर्त्या झाल्या.
इ.स. १८५७ चा उठाव हा संपूर्ण हिंदुस्थानात झाला. त्याप्रमाणे ५ जून, १८५७ ला झाशीतही शिपायांचा उद्रेक झाला. केवळ ३५ शिपायांनी इंग्रजांना पळवून लावले. या परिस्थितीत इंग्रजांच्या परवानगीची वाट न पाहता राणी लक्ष्मीबाई किल्ल्यावर राहण्यास गेल्या. पुढे २२ जुलै, इ.स. १८५७ ला ब्रिटिशांनी राणींना झाशीची अधिकारसूत्रे हाती घेण्यास सांगितले. राणी पुन्हा राज्यकर्त्या झाल्या होत्या, परंतु अतिशय बिकट परिस्थितीत त्यांच्या हाती राज्यकारभार आला होता. मनुष्यबळ नव्हते आणि खजिनाही रिकामाच होता. प्रजेच्या मनात असुरक्षित भविष्याबद्दल भीती होती. परंतु तरीही लक्ष्मीबाईंनी खंबीरपणाने परिस्थिती हाताळली. जुन्या विश्र्वासातील लोकांना परत बोलावून त्यांना काही अधिकाराची पदे दिली. दिवाण लक्ष्मणरावांना प्रधानमंत्री, तर प्रत्यक्ष वडिलांना - मारोपंत तांब्यांना - खजिनदार केले. लक्ष्मणरावांचा भाऊ, मुलगा तसेच मुन्सफ, भोलानाथ, आणि नामांकित गोलंदाज खुदाबक्ष यांना फौजेचे व शस्त्रास्त्रांच्या जोडणीचे काम दिले. बंडखोर ठाकुरांना धोरणीपणाने आपल्या बाजूस वळविले; राज्याच्या सल्लागार मंडळात सामील करून घेतले. ब्रिटिशांनी निकामी केलेल्या २२ तोफा पुन्हा सुरू करून तोफगोळ्यांची निर्मितीही सुरू केली. इंग्रजांविरुद्ध बंड करणाऱ्या विद्रोही शिपायांना आपल्या सैन्यात सामील करून घेतले. परकीयांविरुद्ध लढण्याची तयारी करीत असतानाच राणींनी प्रजेचा स्वाभिमान, निष्ठा वाढवण्याचा व आनंद जपण्याचा प्रयत्न केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
20 likes
24 shares