Vaibhav Mhatre
749 views 22 hours ago
#इतिहास छत्रपतींचा 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 #१३_जुलै_१६६० "बांदल सेना शौर्य दिन" "छत्रपती शिवराय" पन्हाळगडावरून विशाळगडाकडे निघाले असताना वाटेत गजापूरच्या खिंडीत भयंकर रणसंग्राम घडला. "हिरडस मावळ" मधील "रायाजी बांदल" हे शिवरायांसोबत ३०० मावळे घेऊन विशाळगडाकडे निघाले. आणि रायाजी बांदल यांचे पिता "बाजी बांदल" हे ३०० मावळे घेऊन स्वता खिंडीत गनिमीला रोखण्यासाठी सज्ज झाले. सिद्दी मसूद आणि त्याची फौज खिंडीत आली व सर्वत्र एकच कापाकापी सुरू झाली. या रणसंग्रामात "बाजी बांदल" आणि त्यांचे साथीदार धारातिर्थी पडले. गजापूरची खिंड पावन झाली. त्यामध्ये बाजीप्रभू देशपांडे हे सुद्धा होते. ते "बांदल" याच्याकडे कारकून म्हणून काम करत असत. या युद्धात धारातिर्थी पडलेल्या बाजी बांदल आणि त्यांच्या पराक्रमी सेनेचा स्वता छत्रपती शिवरायांनी "बांदल सेना" असा उल्लेख केला होता. पुढे महीन्याभरात स्वता छत्रपती शिवराय हे भोर तालुक्यातील "पिसावरे" या "बांदल" यांच्या गावी जाऊन "बाजी बांदल" यांच्या मातोश्री "दिपाही बांदल" यांचं सांत्वन केले. तसेच "बाजी बांदल" यांचे पुत्र "रायाजी बांदल" यांना स्वराज्यातील मानाचं पहिल पान(मानाची तलवार) देऊन त्यांना सरदारकी दीली. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभूराजे 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
25 likes
19 shares

More like this