❤🚩शिवभक्त🚩❤
8K views • 12 days ago
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल*
*इतिहास शिवरायांचा*
**********************************
*शिव दिनविशेष*
🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩
*२९ जुलै इ.स.१६५७*
*२२ जुलै रोजी महंमद सुलताने व मीर जुम्ल्याने संयुक्त हल्ला करुन आदिलशाही सैन्याला हरवले. २९ जुलै रोजी कल्याणी किल्यात मुघलांना प्रवेश मिळाला पण पुढले ३ दिवस किल्लेदार दिलावरखानाने बालेकिल्यातून निकराचा लढा दिला. अखेर नाईलाजाने त्याने किल्ला सोडला. कल्याणी सारखा भक्कम आधार गेल्यावर आदिलशहाने तह करण्याची तयारी दाखवली.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२९ जुलै इ.स.१६७९*
*मुंबईकर इंग्रजांनी सुरतकर इंग्रजांना पाठविलेल्या पत्राची नोंद!*
*"दिलेरखान विजापुरला ढिला पडला पण तोही काटशह देण्यात पटाईत होता. त्याने युवराज शंभुराजेंना घेऊन मराठ्यांच्या मुलुखात किल्ले पन्हाळ्याला वेढा घालण्याचा बेत केला. दिलेरखान आणि युवराज शंभुराजे यांनी पावसाळा संपताच विजापुरचे वजिरास चालून येण्यास भाग पाडून किल्ले पन्हाळ्याखाली युद्ध देण्याची तयारी चालविली. "छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सरहद्दीवर १२ हजार घोडेस्वार आणून ठेवले आहेत व पावसाळा संपताच उभयपक्षी हालचालींना सुरूवात होईल असे मुंबईकर इंग्रजांनी सुरतकर इंग्रजांना कळविले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२९ जुलै इ.स.१६८७*
*कर्नाटकांत १६८६ नंतर हरजी महाडिकांना मुघलांविरुद्ध लढा द्यावा लागला कारण मोगलांच्या तुकड्या त्या प्रदेशात उतरू लागल्या तेव्हा मराठ्यांनीही त्या प्रदेशांत बराच मुलूख काबीज केला. सरदार गोपाळ दादाजी व विठ्ठल पल्लवी यास हरजीराजे यांनी मुघलांचा पाठलाग करण्याची आज्ञा दिली. [बेंद्रे, संभाजी, पृ. ५२८.] पण त्यांची शक्ती अपुरी पडू नये म्हणून संभाजी महाराजांनी ऑक्टोबर-नोव्हेंबर १६८६ मध्ये केशव त्रिमल आणि संताजी घोरपडे यांना तिकडे जाण्याची आज्ञा केली. या आज्ञेनुसार ते दोघे फेब्रुवारी १६८७ मध्ये १२००० सैन्यासह कर्नाटकांत पोहोचले. इ. स. १६८७ च्या सुरुवातीस औरंगजेबाने कुतुबशाही जिंकल्यानंतर कुत्बशाहीचे कर्नाटकांतील मुलूख व किल्ले घेण्यासाठी सरदार रवाना केले होते. १७ एप्रिल १६८७ पर्यंत मुघली सैन्याने बाळापुरमपर्यंत कूच केले. त्यास छत्रपती संभाजी महाराजांच्या मराठे सैनिकांकडून प्रतिकार झाला नसावा. कुत्बशाहीतील महत्त्वाचा किल्ला कोंडापिली हा मुघलांनी फितुरीने काबीज केल्याची बातमी २९ जुलैला मद्रासला पोचली होती. [फोर्ट सेंट जॉर्ज कन्सलटेशन, २९ जुलै १६८७.]*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२९ जुलै इ.स.१६९२*
*सरसेनापती संताजीराव घोरपडे यांच्या कामगिरीवर खुश होऊन छत्रपती राजाराम महाराजांनी रामचंद्र नीलकंठच्या मार्फत त्यांना ‘मिरज’ ची देशमुखी दिली.*
*छत्रपती राजाराम महाराज जिंजीला गेले असता इकडे गनिमांनी खूप धामधूम घातली होती, त्यावेळी दख्खन प्रातांची पूर्ण जबाबदारी सरसेनापती संताजीराव घोरपडे यांच्यावर होती, संताजीरावांनी छत्रपती राजाराम महाराजांचा विश्वास खरा ठरवत मोगलांना पळो की सळो करुन सोडले होते, शेख निजाम, सर्जाखान, रणमस्तखान , जानसरखान असे उमदे वजीर त्यांनी धुळीस मिळविले, जागोजागी गनिमास कोट घालून नेस्तनाबूद केले आणि देश वाचवला, राज्य संरक्षणाच्या प्रसगांस असाधारण श्रम केले, औरंग्यास दहशत लावली, पुढेही कित्येक स्वामिकार्यात राहून त्यांनी खूप मोलाचे कार्य केले, यासाठी छत्रपती राजाराम महाराजांनी २९ जुलै इ.स.१६९२ रोजी सरसेनापती संताजीराव घोरपडे यांस मिरजची देशमुखी दिली.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
⛳ *जय गडकोट*⛳
*!! हर हर महादेव !!*
🚩आम्ही_शिवपाईक_बारा_मावळचे🚩
*श्री मंगेश चंद्रकांत वीर*
( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख )
मा श्री महेंद्र तानाजी देवघरे*
( अध्यक्ष पुणे जिल्हा )
मा श्री योगेशजी सुदामराव शेलार
(प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल)
महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏 शिवराय स्टेटस #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩जय भवानी जय शिवाजी🚩
27 likes
45 shares