*🚩शिवविचार प्रतिष्ठान ३ फेब्रुवारी इ.स.१६६१ छत्रपती शिवरायांनी उंबरखिंडीत कारतलब खानाचा पराभव करून राजगडावरुन कोकणाकडे प्रस्थान केले. ३ फेब्रुवारी इ.स.१६८९ मुघल सरदार मुकर्रबखान कोकणातील संगमेश्वरला पोचला व स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभूराजे त्याच्या कैदेत आले.३ फेब्रुवारी इ.स.१८३२ नरवीर उमाजीस न्यायाधीश जेम्स टेलर याने दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत वयाच्या ४१ व्या वर्षी देशासाठी सर्वप्रथम नरवीर उमाजी नाईक हसत हसत फासावर चढले. अशा या उमाजीचे प्रेत इतरांना दहशत बसावे म्हणून कचेरीच्या बाहेर पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकावून ठेवले होते. गुलामीच्या जोखडातून मातृभूमीला मुक्त करण्यासाठी संघर्ष करणा-या या आद्य क्रांतीवीराला त्रिवार मुजरा."*
*🚩~✾꯭𝅦𝅦𝆭 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे✾꯭𝅦𝅦𝆭~🚩* #🙏शिवदिनविशेष📜
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
*🚩आजचे ऐतिहासिक शिवदिनविशेष🚩*
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
*🚩२ फेब्रुवारी इ.स.१६८२ छत्रपति शिवरायांच्या मृत्यूनंतर दख्खन स्वारीवर आलेल्या औरंगजेबाची पहिली चढाई. नाशिक जवळील रामशेज किल्ल्यावर जोरदार हल्ला.मात्र मराठा किल्लेदार रंभाजी पवार यांनी किल्ला १-२ महिने नव्हे तर तब्बल ६ वर्षे नेटाने लढवला. अखेर १६८८ मध्ये हा किल्ला सुद्धा फितुरी करून मुघलांनी जिंकला.*
*२ फेब्रुवारी इ.स.१६५२ स्वराज्य संकल्पक शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊसाहेब यांचे सुपुत्र व छत्रपती शिवाजी महाराज यांचे जेष्ठ बंधू संभाजीराजे यांचे*
*🚩२ फेब्रुवारी सन १६५२ रोजीचे एक दुर्मिळ पत्र. छत्रपती संभाजी राजे हे शहाजीराजे सोबतच असे. पत्रातून व्यक्तिचा स्वभाव, धोरणं समजण्यास बहुमोल मदत होते. न्यायी स्वभाव हा भोसले घराण्याच्या अनुवंशिकतेनेच येतो असे पत्र वाचल्यावर समजते.न्यायनिवाडा कसा करावा हे या पत्रातून शिकता येते.*
*🚩२ फ़ेब्रुवारी इ.स.१६६१ शिवरायांनी उंबरखिंडित कारतलबखानाचा पराभव केला.*
*🚩~✾꯭𝅦𝅦𝆭 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे✾꯭𝅦𝅦𝆭~🚩* #🙏शिवदिनविशेष📜
*🚩शिवविचार प्रतिष्ठान २ फेब्रुवारी इ.स.१६६१मुघल सरदार कारतलबखान हा मोठ्या फौजेनिशी कोकणातील नागोठणे चौल पेण ही ठाणी काबीज करण्यासाठी शाहीस्तेखानाच्या हुकुमावरून निघाल्याची बातमी छत्रपती शिवरायांनामिळाली कारतलबखान हा उंबरखिंडीतून नागोठण्याला उतरणार होता खानासोबत माहूरची प्रख्यात देशमुखीन "सावित्रीबाई उदारामउर्फ पंडीता रायबागन" ही शूर स्त्री देखील होती महाराज मावळ्यांना घेऊन आधीच उंबर खिंडीत जाऊन खिंड अडवून उभे राहीले. खान आला पण त्याने शिवरायांचा परत जायचा आदेश धुडकावून लावला मग मराठ्यांनी मुघलांवर हल्ला चढवला मुघलांची भयंकर लंगडतोड चालू झालीत्यांना त्या घोर जंगलात लढताही येईना व पळताही येईना, या अरण्याचे नाव "तुंगारण्य". अखेर खान शरण आला, त्याचा प्रचंड पराभव झाला. प्रचंड दौलत व सैन्य वाया घालवून कारतलबखान कसाबसा जीव वाचवून पुण्यात परतला. २ फेब्रुवारी इ.स.१६८२ छत्रपति शिवरायांच्या मृत्यूनंतर दख्खन स्वारीवर आलेल्या औरंगजेबाची पहिली चढाई. नाशिक जवळील 'रामशेज' किल्ल्यावर जोरदार हल्ला. मात्र मराठा किल्लेदारांनी किल्ला १-२ महिने नव्हे तर तब्बल ६ वर्षे नेटाने लढवला. अखेर १६८८ मध्ये हा किल्ला सुद्धा फितुरी करून मुघलांनी जिंकला...*
*🚩~✾꯭𝅦𝅦𝆭 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे✾꯭𝅦𝅦𝆭~🚩* #🙏शिवदिनविशेष📜
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
*🚩आजचे ऐतिहासिक शिवदिनविशेष🚩*
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
*🚩३० जानेवारी इ.स.१६४२ शहाजी राजे कर्नाटकास जातात माहुलीच्या पराभवानंतर शाहजी राजे रणदुल्लाखान सोबत विजापुरास गेले. त्यांना आदिलशाहकरिता काम करायला मिळणार होते पण कडक जाचाखाली. लगेच त्यांना रणदुल्लाखान बरोबर कर्नाटकात पाठवले गेले. शाहजी राजाच्या कर्नाटकातील कार्याची अजून फारशी माहिती उपलब्ध नाही. त्यांना कर्नाटकात पाठवल्यानंतरचे पहिले पत्र*
*🚩३० जानेवारी १६४२ सालचे आहे व ते आदिलशाहने शाहजीराजांना लिहीले आहे.*
*🚩३० जानेवारी इ.स.१६८० इंग्रज सैन्याने शिवरायांपुढे शरणागती पत्करली.*
*🚩३० जानेवारी इ.स.१६८१ छत्रपती शंभूराजांनी "बुन्हाणपूर शहराच्या तटबंदीबाहेरील बहादूरपुरा व इतर १७ पुरे अलोट संपत्ती मिळवली. यावेळी बु-हाणपूरचा सुभेदार खानजमान याने मराठ्यांना प्रतिकार न करताच बुन्हाणपूराचे दरवाजे बंद करून घेतले.*
*🚩~✾꯭𝅦𝅦𝆭 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे✾꯭𝅦𝅦𝆭~🚩* #🙏शिवदिनविशेष📜
*🚩शिवविचार प्रतिष्ठान ३० जानेवारी इ.स.१६४२ महाराज शहाजी राजे कर्नाटकास जातातमाहुलीच्या पराभवानंतर शाहजी राजे रणदुल्लाखान सोबत विजापुरास गेले. त्यांना आदिलशाहकरिता काम करायला मिळणार होते पण कडक जाचाखाली. लगेच त्यांना रणदुल्लाखान बरोबर कर्नाटकात पाठवले गेले. शाहजी राजाच्या कर्नाटकातील कार्याची अजून फारशी माहिती उपलब्ध नाही. त्यांना कर्नाटकात पाठवल्यानंतरचे पहिले पत्र ३० जानेवारी १६४२ सालचे आहे व ते आदिलशाहने शाहजी राजांना लिहीले आहे. ३० जानेवारी इ.स.१६८० इंग्रज सैन्याने छत्रपती शिवरायांपुढे शरणागती पत्करली. ३० जानेवारी इ.स.१६८१ छत्रपती शंभूराजांनी "बुऱ्हाणपूर" शहराच्या तटबंदीबाहेरील बहादूरपुरा व इतर १७ पुरे अलोट संपत्ती मिळवली. यावेळी बुऱ्हाणपूरचा सुभेदार खानजमान याने मराठ्यांना प्रतिकार न करताच बुऱ्हाणपूराचे दरवाजे बंद करून घेतले. ३० जानेवारी इ.स.१७१५ कान्होजी आणि सिद्दी यांमध्ये तह सातारकर छत्रपतींची कोकणची जहागीर मोगलांपासून सुरक्षित राखण्याची जबाबदारी छत्रपती पहिले राजाराम यांनी सिधोजी घोरपडे यांचेवर सोपविली होती, परंतु हे जोखमीचे काम घोरपडे पार पाडू शकले नाही आणि पुढे ही जवाबदारी कान्होजींवर आली. मोगलांच्या जुलमापासून मुक्त केलेल्या कोकणातील जहागिरीला राजमुद्रेची संमती मिळाली, म्हणून कान्होजी आंग्रे यांचे समाधान झाले; तर आपले हितसंबंध राखण्यासाठी आपला एक कर्तबगार प्रतिनिधी आपण कोकणासाठी मिळविला, असे समाधान शाहू छत्रपतींना झाले. १७१३ मध्ये कान्होजींना जो प्रदेश दिला गेला त्यात सिद्दीचा काही प्रदेश दिला गेला होता यामुळे कान्होजी आणि जंजिरेकर सिद्दी यांचे युद्ध झाले. सिद्दीचे परिपत्य करण्यासाठी कान्होजींना इ. स. १७१३ ते १७१५ पर्यंत खूप परिश्रम करावे लागले. अखेर ३० जानेवारी १७१५ मध्ये कान्होजी आणि सिद्दी यांमध्ये तह झाला त्यात १. मामलत तळे व गोरेगाव, गोवेळ व निजामपूर या महलांवर आंग्रे यांना एक हजार रुपये कर मिळाला. तळेपैकी ८००, गोरेगाव ६००, गोवळ १०००, तर्फ निजामपूर १७५ मिळून रुपये २५७५ पैकी १००० रूपये कान्होजींना मिळाले. २. तर्फ नागोठणे, अष्टमी पाली, आश्रेधार पेटा व अंतोणे यांतील निम्मा वसूल कान्होजींनी घेण्याचे ठरले. या तहाने आपली सत्ता कमी झाली हे शल्य जंजीरेकराचे मनात सलत राहिले आणि त्याने कान्होजींचा पराभव करण्यासाठी मुंबईकर इंग्रजांची मदत घेण्याचा उपक्रम केला, इंग्रजांनी मदत केली देखील परंतु कान्होजी पुढे त्या दोघांचे काही चालले नाही.सुरतपासून दक्षिणेकडे गोव्यापर्यंत त्यांचे अनिर्बंध वर्चस्व होते.*
*🚩~✾꯭𝅦𝅦𝆭 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे✾꯭𝅦𝅦𝆭~🚩* #🙏शिवदिनविशेष📜
*🚩२७ जानेवारी इ.स. १६५८ छत्रपती शिवाजी महाराजांनी "माहुलीचा किल्ला उर्फ भंडारगड" पुन्हा जिंकून स्वराज्यात आणला.🚩* #🙏शिवदिनविशेष📜











