*🚩२० जानेवारी इ.स. १६७५ छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांची डुमगावची वखार लुटली..!🚩* #🙏शिवदिनविशेष📜
*🚩शिवविचार प्रतिष्ठान २० जानेवारी इ.स.१६९६ सरसेनापती संताजी घोरपडे नावाचे वादळ हा काळ होता १६९६ मोगल सरदार हिंमतखान बहादूर हा खरोखरच नावाप्रमाणे धाडसी आणि पराक्रमी होता. त्याच्याजवळ सैन्य थोडे असल्याने आतापर्यंत त्याने संताजींवर आक्रमण केले नव्हते. पण आता खुद्द संताजीच त्याच्यावर चालून गेले. मोठ्या धैर्याने त्याने संताजींशी लढायचे ठरविले. आपले सैन्य घेऊन तो बसावापट्टणच्या गढीतून बाहेर पडला आणि त्याने संताजींवर चाल केली. सरसेनापती संताजींनी आपल्या सैन्याच्या दोन तुकड्या केल्या होत्या. एक तुकडी त्याने बसावापट्टणजवळच्या जंगली प्रदेशात लपवून ठेवली होती आणि दुसऱ्या तुकडीचे स्वतः सरसेनापती संताजी नेतृत्व करून लढत होते. लढाई घनघोर सुरु झाली. खान शौर्याने लढत होता. उभय पक्षी अनेक सैनिक रणांगणी पडले. एवढ्यात संताजींनी माघार घेतली. रण टाकून संताजी पाठमोरे पळायला लागले. हिंमतखानला काही सुचेना त्याला त्याचाच डोळ्यावर विश्वास बसत नव्हता हाच तो सरसेनापती संताजी ज्याने बादशहाच्या शामियान्यावरील सोन्याचे कळस मारिले. हाच तो संताजी ज्याने दस्तूरखुद्द छत्रपती संभाजी राजेंना कैद करणाऱ्या त्या मुक्करबखानास जायबंदी केलं. हाच तो संताजी ज्याचा भीम पराक्रमाने महाराष्ट्रच काय तर अवघे तामिळनाडू ढवळून निघाले, हाच तो संताजी ज्याचा मर्दुमकीमुळे मोगलांची दोड्डेरीकडे लांच्छनास्पद माघार घ्यावी लागली तो संताजी आज रणांगण सोडून पळतोय हिंमतखानाने तडक संताजींचा पाठलाग सुरु केला. मोठ्या जोमाने तो संताजींचा पाठलाग करू लागला कारण वाघाला मैदान सोडून पळताना पाहिलंचं होतं कुणी तेव्हा? पाठलाग करत संताजी आले त्या जंगलात जिथे त्यांची पहिली तुकडी दबा धरून बसली होती. खान व त्यांचे सैन्य आपल्या कह्यात आल्याबरोबर. संताजी एकाएकी थांबले व पलटी खाऊन त्यांनी लढाईस सुरवात केली. त्याच वेळी जंगलात दबा धरून बसलेले मराठी सैन्य अचानक पुढे येऊन त्याने खानास त्याच्या सैन्यासह, घेरले. संताजींचे अनेक बंदूकधारी जंगलातील झाडावर दबा धरून बसलेले. आणि नेमबाजीमध्ये ते चांगलेच तरबेज होते. कचाट्यात सापडलेल्या हिंमतखानच्या सैन्याची चांगलीच लांडगेतोड मराठ्यांनी केली. सर्व बाजूंनी वेढला जाऊनही खान पराक्रमाने लढला. ऐन लढाईत त्याच्या कपाळाला मोठी गोळी लागली. व तो जबर जखमी होऊन हौद्यात कोसळला. आता मोगल सेनेचे नीतिधैर्य पूर्ण नष्ट होऊन तिचा पुरा पाडव झाला. या लढाईत मोगलांचे एकूण ५०० सैनिक ठार झाले. काही मोगल सैनिकांनी जखमी हिंमतखान बहादुरास आपल्या ठाण्यात नेले. तेथे तो त्याचं दिवशी मरण पावला खुद्द सरसेनापती संताजींना ह्या लढाईत बाणाच्या दोन जखमा झाल्याचा उल्लेख आहे ही लढाई झाली २० जानेवारी १६९६ छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलेला गनिमी कावा सरसेनापती संताजींनी पुरेपुर लक्षात ठेवाला. त्याचा वापर केला. आणि राज्याभिषेकानंतर अभिषेकासाठी झालेला खर्च वसूल करण्यासाठी बहादूर खानच्या पेडगावच्या छावणीवर हल्ला करून जसा कावा साधला होता अगदी तसाच डाव इथे संताजींनी साधला.*
*🚩~✾꯭𝅦𝅦𝆭 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे✾꯭𝅦𝅦𝆭~🚩* #🙏शिवदिनविशेष📜
*🚩आजचे ऐतिहासिक शिवदिनविशेष🚩*
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
*🚩२० फेब्रुवारी इ.स.१६६० शिवरायांनी खारेपाटण जिंकले.*
*🚩२० फेब्रुवारी इ.स.१७०७ (काही ठिकाणी ३ मार्च १७०७ अशी तारीख आहे) रोजी औरंगजेबाचा मृत्यू झाला औरंगजेब शिवराज्य संपवायला आला आणि स्वताची कबर त्याला खोदावी लागली.महाराज म्हणायचे "माझे छोटे-मोठे ३६० किल्ले आज दिमतीला आहेत,एक गड एक वर्ष जरी लढला तरी सर्व स्वराज्य जिंकायला ३६० वर्ष लागतील मग इतक्या वर्ष आलमगीर तरी जगेल काय" ? अन ते खरे झाले, आलमगीराला याच भूमीत देह त्यागावा लागला. आपण जेवडे औरंगजेबाचे मोठेपण मान्य करू तेवडे महाराज मोठे होतात. औरंगजेब म्हणायचा माझे शहजादे वजीर सरदार अमीर-उमराव सैन्य याच्या पेक्षा एकटे छत्रपती संभाजी राजे माझ्याकडे असते तर मी कधीच झालो असतो आलमगीर पुऱ्या दुनयेचा" महाराजांच्या वेळी राजकीय युद्धे होती हे आपण समजून घेतले कि खरे शिवचरित्र समजायला सुरवात होते.मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध महाराणी ताराबाईंच नेतृत्वाखाली मराठ्यांनी जिंकले. औरंगजेबाच्या पाच लाख सेनासागराशी तब्बल सात वर्षे यशस्वी झुंज देऊन महाराष्ट्र गिळायला आलेल्या औरंगजेबाचे थडगे महाराष्ट्राच्या महाराणीने याच महाराष्ट्रात बांधले*
*🚩~✾꯭𝅦𝅦𝆭 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे✾꯭𝅦𝅦𝆭~🚩* #🙏शिवदिनविशेष📜
*🚩शिवविचार प्रतिष्ठान १९ जानेवारी इ.स.१५९७ महाराणा प्रताप यांचा स्मृतिदिन (जन्म ९ मे १५४०) राणा प्रतापसिंह गुहिलोत ह्या राजपूत वंशातील एक अत्यंत पराक्रमी राजा. उदयसिंहाचा पुत्र. प्रतापसिंह गुहिलोत ह्या नावाने हा राजस्थानात प्रसिद्ध आहे. उदयसिंहाने जगमल ह्या आपल्या आवडत्या पुत्रास गादीचा वारस नेमले होते; परंतु प्रतापसिंहांच्या मामाने इतर सरदारांच्या मदतीने जगमलास दूर करून प्रताप यांना १ मार्च १५७२ रोजी महाराणा केले. ते महाराणा झाले त्यावेळी राजधानी चितोड शत्रूच्या हातात गेली होती. अनेक राजपूत अधिपतींनी अकबराचे स्वामित्व पतकरले होते व काहींनी आपल्या मुली त्यास देऊन शरीरसंबंध जोडला होता; पण राणाप्रताप यांनी त्याच्यापुढे मान लवविली नाही. त्याने चितोड अकबराच्या हातून स्वतंत्र करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि आपले वास्तव्य अकबराच्या सैन्याच्या दृष्टिक्षेपापासून दूर ठिकाणी केले. प्रजेला अरवलीच्या डोंगराळ भागात, जेथे अकबराचा उपद्रव पोहोचणार नाही, अशा ठिकाणी वस्ती करण्यास लावले. तेथेच त्याने काही भागात शेती केली. मेवाडचा मैदानी प्रदेश ओसाड करून टाकला आणि आपली राजधानी गोगुंड येथे नेली. सर्व डोंगरभागांतून अभेद्य असे किल्ले बांधले व ते शस्त्रास्त्रांनी सुसज्ज केले. अकबराचे स्वामित्व न पतकरल्यामुळे त्यास मोगलांशी अखेरपर्यंत झगडा करावा लागला. अकबराने मानसिंह आणि आसफखान यांच्याबरोबर मोठी सेना देऊन त्याच्यावर पाठविले. २१ जून १५७६ रोजी हळदीघाटच्या घनघोर लढाईत प्रतापसिंहाचा पराजय झाला, तरी तो तीतून निसटला आणि राजस्थानच्या दऱ्याखोऱ्यांतून त्याने मोगलांशी गनिमी काव्याने संघर्ष चालू ठेवला. त्यांच्या रसदा तोडल्या, खजिने लुटले. अकबर स्वतः त्याच्यावर चालून गेला पण त्याला प्रताप यांना न जिंकताच परत फिरावे लागले. त्याची पाठ वळताच प्रतापानी आपले गेलेले सर्व किल्ले परत मिळविले. यानंतर त्याने पुढे १२ वर्षे शांततेने राज्य केले. ह्यावेळी अकबर हा पंजाब व दक्षिण भारत ह्या दोन ठिकाणी आपली सत्ता स्थिर करण्याच्या बेतात होता. त्यामुळे त्याने पुढे प्रतापकडे लक्ष दिले नसावे. राणाप्रतापास परचक्राची फार चिंता होती. म्हणून त्याने आपल्या सरदारांकडून तुर्कांपासून आपल्या देशाचे रक्षण करण्याचे प्रथम वचन घेऊन नंतर आपल्या अमरसिंह ह्या पुत्राच्या हाती राज्य सोपविले व प्राण सोडला. अकबरानेही त्याची मुक्तकंठाने स्तुती केली आहे. कर्नल टॉड म्हणतो, महाराणा प्रताप यांचे नाव अजूनही पूज्य मानले जाते आणि पुढेही एखाद्या नवीन जुलमी राजसत्तेकडून राजपुतांत शिल्लक असलेली देशाभिमानाची ठिणगी विझेपर्यंत ते नाव पूज्यच मानले जाईल.’*
*🚩~✾꯭𝅦𝅦𝆭 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे✾꯭𝅦𝅦𝆭~🚩* #🙏शिवदिनविशेष📜
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬
*🚩आजचे ऐतिहासिक शिवदिनविशेष🚩*
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬
*🚩१९ जानेवारी १५९७ महाराणा प्रतापसिंह पुण्यतिथी दिन भारतीय इतिहासात: प्रातःस्मरणीय महाराणा प्रतापसिंहाचे नाव, राष्ट्र, संकती, स्वाभिमान आणि स्वतंत्र याचे प्राणपणाने रक्षण करणाऱ्या नरर्विराच्या परंपरेत असुर्यचंद्र तळपत राहिले.*
*🚩१९ जानेवारी १६७५शिवरायांनी बुन्हाणपूर मागोमाग धरणगाव ही जिंकून घेतले आणि रायगडावर जाण्यास निघाले.*
*🚩१९ जानेवारी १६८२ छत्रपती संभाजीराजांनी किल्ले जंजिऱ्याची मोहीम हाती घेतल्यापासून तोफांची तुफान सरबत्ती करून देखील जंजिऱ्याच्या घेऱ्यात मराठ्यांना प्रवेश मिळत नव्हता. यासंबंधी मुंबईकर इंग्रजांनी सुरतकर इंग्रजांना*
*🚩१९ जानेवारी १६८२ रोजी पत्र पाठवले त्यामधील नोंदीनुसार "सिद्दी जोपर्यंत तह करत नाही, तोपर्यंत संभाजीस शांतता मिळणार नाही" असा उल्लेख होता.*
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬▬▬
*~🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩~*
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬▬▬ #🙏शिवदिनविशेष📜
*🚩१९ जानेवारी इ.स. १६८२ छत्रपती संभाजी महाराजांचे दंडाराजपुरीवर प्रखर हल्ले..!🚩* #🙏शिवदिनविशेष📜
उबदार व्हावे संपूर्ण जीवन,
आपल्या लोकांच्या प्रेमाने |
चमकावे तेज सूर्यासारखे,
मेहनत प्रयत्न अन कर्माने ||
उंची लाभावी यशाची अशी,
जशी पतंगाची गगनभरारी |
गोडवा पसरवा आयुष्यात,
जशी तिळगूळाची न्याहारी ||
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला..!
मकरसंक्रांतीच्या तुम्हाला आणि तुमच्या
परिवाराला मन:पुर्वक शुभेच्छा...!! #मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा
*🚩शिवविचार प्रतिष्ठान ११ जानेवारी इ.स.१६६६ मुघल सरदार दिलेरखानाने छत्रपती शिवरायांना जीवे मारण्याचा कट रचल्याची खबर शिवरायांना गुप्तहेरामार्फत मिळाली. छत्रपती शिवराय मिर्झाराजे जयसिंगाची छावणी सोडून पन्हाळ्याकडे रवाना. ११ जानेवारी इ.स.१६८० रायगड जिल्ह्यामधील खांदेरी किल्ला बांधून पूर्ण. आज रोजी महाराजांकड़े ताब्यात आला. ११ जानेवारी इ.स.१६८८मातबरखानाने पट्टा गड जिंकला १६८८ साली मातबरखानाने बागलाणातील अनेक गड घेण्यास सुरवात केली होती. पट्टागडा संबंधी मातबरखान औरंगजेबाकडे अर्ज पाठवतो त्यात तो म्हणतो सेवकाने काही दिवसांपासून १००० कोळी, भिल्ल, व मावळे यांचे पथक सैन्यात घेतले आहे. मराठांच्या ताब्यात असलेले पट्टा व इतर किल्ल्यालगतच्या जमीनदारांना रकमा पुरवण्यात आल्या आहेत. ११ जानेवारी १६८८ ला खानाने काही पथके किल्ला घेण्याच्या मार्गावर धाडली. मध्यरात्रीच्या सुमारास किल्ल्याच्या तटाला दोर लावून किल्ला जिंकून घेतला. भगूरचा ठाणेदार गोविंदसिंग याची किल्ल्यावर नेमणूक करण्यात आली. मोगलांनी १६८८ ते ८९ या कालावधीत मराठांचे औंढा, त्रिंबकगड, कवनी, त्रिंगलवाडी, मदनगड, मोरदंत किल्ले फितुरीने घेतले मात्र पट्टागड त्यांनी जिंकून घेतला. ११ जानेवारी इ.स.१७१७ छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक येसाजी दाभाडे यांचे थोरले पुत्र खंडेराव दाभाडे होते. इ.स.१७०५ ते १७१७ मध्ये खंडेराव दाभाडे यांनी गुजरात प्रांतात धडक मारुन बडोदे पर्यंतचा प्रदेश काबिज केला. छत्रपती शाहू महाराजांनी ११ जानेवारी १७१७ मध्ये खडेराव दाभाडे यांची मराठा साम्राज्याचे सरसेनापती म्हणून नियुक्ती केली. सेनापती खडेराव दाभाडे यांना वतन म्हणून मिळालेल्या तळेगावाला नंतर तळेगाव दाभाडे या नावाने ओळखले जाऊ लागले.*
*🚩~✾꯭𝅦𝅦𝆭 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे✾꯭𝅦𝅦𝆭~🚩* #🙏शिवदिनविशेष📜
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬
*🚩आजचे ऐतिहासिक शिवदिनविशेष🚩*
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬
*🚩११ जानेवारी १६६६ मुघल सरदार दिलेरखानाने छत्रपती शिवरायांना जीवे मारण्याचा कट रचल्याची खबर शिवरायांना गुप्तहेरामार्फत मिळाली.*
*🚩११ जानेवारी १६८० रायगड जिल्ह्यातील 'खांदेरी किल्ल्याची बांधणी पूर्ण. इ.स.१६७९ च्या ऑगस्ट महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी मायनाक भंडार्याला येथे पाठवून बेटावर किल्ला बांधावयास काढला. मायनाक भंडारी तटबंदी बांधत असताना ईस्ट इंडिया कंपनीच्या मुंबईतील वखारकरांती थांबवण्याचे आटोकाट प्रयत्न केले. कॅप्टन विलियम मिचिन, रिचर्ड केग्वीन, जॉन ब्रैडबरी, फ्रान्सिस थॉर्प नाविक अधिकार्याना खांदेरीवर पाठवून ते बेट मराठ्यांकडून काबीज करण्याचे मोठे प्रयत्न इंग्रजांनी केले. रिव्हेंज आणि हंटर नावाच्या दोन फ्रीगेटी त्यांनी पाठवल्या होत्या. गेप आडनावाच्या माणसाकडून काही गुराबा भाड्याने घेऊन त्यावर काही तोफा कशातरी बांधून त्यांनी इंग्रजी आरमार पाठवण्याचा प्रयत केला. मायनाक भंडार्याच्या मदतीला नंतर दौलतखानाचा आरमारी ताफा आला. आलिबाग- थळच्या । किनार्यालगत असलेल्या या आरमाराने इंग्रजी आरमारातल्या त्रुटी हेरल्या. मराठ्यांच्या होड्या थळच्या किनार्यावरून सामानसुमान घेऊन खांदेरी बेटावर निघत. त्यांना प्रतिबंध करण्यासाठी किनारा आणि बेट यांमध्ये नाविक मोर्चेब उभारण्याचे इंग्रजांनी ठरवले होते पण त्यांच्या मोठ्या जहाजांना या खाडीमध्ये ठिय्या देऊन राहण्याचे काम जमले नाही. वार्यामुळे त्यांच्या होड्या किनार्याकडे फेकल्या जात आणि त्या दगडांवर आपटून फुटण्याची भीती असल्याने इंग्रजांना ती जहाजे खो पाण्यात न्यावी लागली. छोट्या गुराबा त्यांनी आणल्या असता डव्ह नावाच्या त्यांच्या गुराबेवर पाठीमागे तोफ नसल्याने ती त्रुटी हेरून मराठा आरमाराने पाठीमागून चक्राकार हल्ला चढवून ती गुराब पकडली आणि त्यावरच्या इंग्रजांना कैद करून सागरगडावर डांबले. या घटनेद्वारे सागराची भरती-ओहोटी, खोल-उथळ पाणी, मतलय वा इत्यादींचे स्थानिक ज्ञान मराठ्यांना इंग्रजांपेक्षा अधिक असल्याचे दिसले. संगमेश्वरी नावाच्या वेगळ्या आराखड्याच्या मराठा होड्यांनी या युद्धा कमाल केली. मराठे रातोरात या चिंचोळ्या होड्या वल्हवत बेटावर सामान पोहचते करीत, खास मराठा बनावटीच्या या होड्यांनी इंग्रज आरमाराला आश्चर्यकारकरित्या चकवले.*
*🚩११ जानेवारी इ.स.१६८८ &मातबरखानाने पट्टा गड जिंकला १६८८ साली मातबरखानाने बागलाणातील अनेक गड घेण्यास सुरवात केली होती*
*🚩११ जानेवारी १६८८ ला खानाने काही पथके किल्ला घेण्याच्या मार्गावर धाडली. मध्यरात्रीच्या सुमारास किल्ल्याच्या तटाला दोर लावून किल्ला जिंकून घेतला. भगूरचा ठाणेदार गोविंदसिंग यांची किल्ल्यावर नेमणूक करण्यात आली. मोगलांनी १६८८ ते ८९ या कालावधीत मराठांचे आँढा, त्रिंबकगड, कवनी,त्रिंगलवाडी,मदनगड, मोरदंत किल्ले फितुरीने घेतले मात्र पट्टागड त्यांनी जिंकून घेतला.*
*🚩~✾꯭𝅦𝅦𝆭 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे✾꯭𝅦𝅦𝆭~🚩* #🙏शिवदिनविशेष📜










