#🙏श्री गुरुदेव दत्त💐 माहिती अणि दत्त जन्म कथा🌹💐
मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो. पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपांत आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यांना दैत्य म्हटले जात असे. देवगणांनी त्या आसुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळया रूपांत दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला. त्यानंतर दैत्य नष्ट झाले. तो दिवस `दत्तजयंती’ म्हणून साजरा करतात.
💐🌹दत्तजयंतीचे महत्त्व🌹💐
दत्तजयंतीला दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्ततत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ मिळण्यास मदत होते.
जन्मोत्सव साजरा करणे
दत्तजयंती साजरी करण्यासंबंधाने शास्त्रोक्त असा विशिष्ट विधी आढळून येत नाही. या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. यालाच गुरुचरित्रसप्ताह असे म्हणतात. दत्तमंदिरामध्ये भजन, कीर्तनादी कार्यक्रम आयोजीत केले जातात. दत्तगुरूंची पूजा, धूप, दीप व आरती करून सुंठवड्याचा प्रसाद वाटप करतात. दत्ताच्या हातातील कमंडलू व जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे. शंख व चक्र विष्णूचे आणि त्रिशूळ व डमरू शंकराचे प्रतीक आहे.
महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रांत या उत्सवाला विशेष महत्त्व असते.
दत्तश्रीगुरूंचे करुया ध्यान वंदू चरण प्रेमभावे. ब्रह्मा विष्णू महेश एकत्र आले ....
मन हे न्हाले भक्ती डोही । अनुसया उदरी धन्य अवतार ।।
केलासे उद्धार विश्वाचा या । माहुरगडावरी सदा कदा वास ।।
दर्शन भक्तास देई सदा । चैतन्य झोळी विराजे काखेत ।।
गाईच्या सेवेत मन रमे । चोविस गुरूचा लावियला शोध ।।
घेतलासे बोध विविधगुणी ।
*दत्तजन्म कथा*
दत्तात्रय हा शब्द 'दत्त' व 'आत्रेय' अशा दोन शब्दांनी बनला आहे. 'दत्त' या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत, अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा. आणि 'अत्रेय' म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा. श्री दत्तात्रयाच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत. मात्र या सगळ्या कथांमधून श्रीदत्त हे अत्रीऋषी व माता अनुसूया यांचा पुत्र व विष्णूचा अवतार आहे, असाच बोध होतो.
अत्रीऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी ऋक्ष कुलपर्वतावर घोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले. अत्रीऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा-विष्णु-महेश हे तिन्ही देव प्रकट झाले. आणि त्यांनी अत्रीऋषींना तपाचे कारण विचारले. अत्रीऋषींनी त्यांना विनवले की, आपण माझ्या उदरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा. तिन्ही देवांनी त्यांची विनंती मान्य केली. देवत्रयीच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे तीन पुत्र अनुसयेच्या उदरी जन्मला आली.
श्रीदत्तजन्माची एक कथा ब्राह्मणपुराणात आहे. अत्रीऋषींनी ब्रह्मा-विष्णु-महेश यांची पुत्रप्राप्तीसाठी आराधना केली. ते संतुष्ट झाल्यावर त्यांनी देवांना विनवले की, आपण माझ्या घरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा आणि मला एक रूपवती कन्याही प्राप्त व्हावी. देवांच्या आशीर्वादाने दत्रात्रेय, सोम, दुर्वास हे तीन पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या अत्रीऋषींना प्राप्त झाली.
याचबरोबर दत्तात्रेयांच्या जन्माची आणखी एक कथा प्रसिद्ध आहे. ती अशी की, राहूने सूर्याला ग्रस्त केले असता सर्व पृथ्वी अंध:कारमय झाली. अत्रीने सूर्याला राहूच्या मगरमिठीतून सोडवले आणि पुन्हा पृथ्वी प्रकाशमान केली. अत्रीच्या या महत्कार्यामुळे संतुष्ट झालेल्या शिव व विष्णु यांनी अनुक्रमे दुर्वास आणि दत्त यांच्या रूपाने अत्रीच्या घरी जन्म घेतला.
भारतात शैव, वैष्णव आणि शाक्त हे तीन प्रमुख पंथ आहेत. ती सुमारे हजार ते बाराशे वर्षांपासून श्री दत्तात्रयाची उपासना करत आहेत. संपूर्ण भारतात विशेषत: महाराष्ट्रात श्रीदत्त आराधणेची उज्ज्वल परंपरा आहे. महानुभाव संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय व दत्त संप्रदाय ही पाच संप्रदाय श्री दत्तप्रभुची उपासना करताना दिसतात.
श्री दत्त संप्रदायातील साधक 'अवधूतचिंतन श्री गुरूदेव दत्त' असा जयघोष करत असतात. अवधूत हे दत्तात्रयाचे नाव असून या शब्दाचा अर्थ म्हणजे- नेहमी आनंदात रमणारा, प्रत्येक क्षण वर्तमानकाळात जगणारा होय. श्री दत्ताच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी व चार श्वान म्हणजे चार वेदांचे प्रतीक आहे. श्री दत्तगुरूंनी पृथ्वीला आपले गुरु मानले होते. पृथ्वीप्रमाणे सहनशील व सहिष्णु असावे, अशी तिच्याकडून त्यांनी शिकवण घेतली होती. तसेच त्यांनी अग्नीला गुरु माणून आपला देह हा क्षणभंगूर आहे, अशी शिकवण त्यांनी अग्नीच्या ज्वालेपासून घेतली होती. अशाप्रकारे चराचरातील प्रत्येक वस्तूत परमेश्वराचे अस्तित्व आहे. ते पाहण्यासाठी श्रीदत्तगुरूंनी चोवीस गुरु केले होते.
श्री दत्त दररोज खूप भ्रमण करीत असत. ते स्नानासाठी वाराणसीला, चंदनाची उटी लावायला प्रयागला जात, तर दुपारची भिक्षा कोल्हापूरला मागत व दुपारचे जेवण पांचाळेश्वर, बीड जिल्हा येथे गोदावरीच्या पात्रात घेत असत. तांबुलभक्षणासाठी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात राक्षसभुवन येथे जात, तर प्रवचन व कीर्तन ऐकण्यासाठी नैमिष्यारण्यात बिहार येथे पोहोचत. निद्रेसाठी मात्र माहूरगडावर जात व योग गिरनार येथे करीत असता. श्री दत्त अवलिये होते. क्षणात कोठेही अंतर्धान पावत असत. श्री कृष्णांच्या लीलाप्रमाणेच श्रीदत्तात्रयाच्या लीला आहे.
महाराष्ट्रात हिंदूच्या बरोबरीने मुस्लिम समाजही श्रीदत्तप्रभुची उपासना करताना दिसतो. 'श्रीपाद श्रीवल्लभ' हा दत्ताचा पहिला अवतार, 'श्री नृसिंह सरस्वती' हा दुसरा तर 'स्वामी समर्थ हा तिसरा अवतार आहे. जैनपंथीय श्री दत्तगुरूंची 'नेमिनाथ' म्हणून पूजा करतात तर मुसलमान 'फकिर' म्हणून पूजतात. दत्तजयंतीच्या दिवशी दत्तगुरूंचा जन्मोत्सव साजरा केला जातो. गुरुचरित्राचे पारायण केले जाते. भजन, कीर्तन आदी कार्यक्रम आयोजन केले जाते.
#shreedattarajgurumauli #dattagurumaharaj
#🌹देवी देवता🙏 काळजी' असे आपण सहज बोलून जातो. परंतु आयुष्याच्या अनेक टप्प्यावर आपल्याला दिव्यत्त्वाची प्रचिती येते. फक्त आपण त्याकडे सजगतेने पाहत नाही. याबाबत एक दृष्टांत सांगतो. एके ठिकाणी,*
*विष्णुसहस्रनामाचे पारायण सुरू होते. अनेक लोक नित्यपारायणाला येत आणि भंडाऱ्याचा प्रसाद घेऊन जात असत. असेच एके दिवशी, पारायण झाले आणि भंडाऱ्याला सुरुवात झाली. सगळे भाविक शिस्तबद्धपणे एका रांगेत उभे होते. सेवक प्रसाद वाढण्यासाठी उभे राहिले. तेवढ्यात एक फाटक्या वेषातील व्यक्ती, हातात भले मोठे पात्र घेऊन पुढे आली आणि प्रसाद मिळवण्यासाठी धडपड करू लागली. सेवकांनी तिला रांगेने ये सांगितले. परंतु, ती व्यक्ती अरेरावी करू लागली आणि चर्चेचे पर्यवसान वाद-विवादात झाले. सेवक त्या व्यक्तीला मठाधीपती यांच्याकडे घेऊन आले. स्वामींनी त्या व्यक्तीला अभय दिले आणि त्याच्या गैरवर्तणुकीबद्दल विचारणा केली. स्वामींना शरण येऊन ती व्यक्ती म्हणाली, 'स्वामीजी, माझ्या घरात सहा लहान-लहान मुले आहेत. ती उपाशी आहेत. त्यांना या प्रसादाची जास्त गरज आहे.'*
*'अरे, पण प्रसाद तर सर्वांनाच मिळणार होता ना?'- स्वामीजी उत्तरले.*
*'काय सांगावं? भली मोठी रांग संपेपर्यंत प्रसादही संपला असता तर? मी आणि माझी मुले उपाशी राहिलो असतो. म्हणून मी घुसखोरी केली. मला प्रसाद द्या स्वामी....'*
*स्वामींनी सेवकांना सांगून व्यक्तीसाठी प्रसाद बांधून दिला. प्रसाद सोपवताना स्वामीजी म्हणाले, 'तू इथे विष्णुसहस्रनाम म्हणायला येत होतास ना, थोडेसे मलाही म्हणून दाखवतोस?' तोंडघशी पडणार, या भीतीने त्या व्यक्तीने स्तोत्र म्हणायला सुरुवात केली.*
*ओम विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्यभवत्प्रभु:।*
*भूतकृद् भूतभृद् .....*
*एवढे म्हणून ती थांबली. कारण पुढचे स्तोत्र पाठ नव्हते. त्या श्लोकाच्या शेवटच्या शब्दाचा आधार घेत स्वामीजी म्हणाले, 'तुला १००० नावांपैकी फक्त ६ च नावे पाठ आहेत? त्या सहाव्या नावावर लक्ष केंद्रित कर. 'भूतभृद्' म्हणजे, अशी व्यक्ती, जी अखिल विश्वाचा सांभाळ करते, पोषण करते. तुला जर, हा अर्थ उमगला असता, तर तू अशी कृती केली नसती आणि परमेश्वरावर भार टाकला असता. म्हणून प्रत्येक नामाचे महत्त्व समजून घे आणि संपूर्ण विष्णुसहस्रनाम आत्मियतेने पाठ करून दररोज भगवंताचे स्मरण कर. ती व्यक्ती खजिल होऊन प्रसाद घेत निघून गेली. स्वामीजींच्या सांगण्याप्रमाणे भक्तीभावाने विष्णुसहस्रनामाचे पठण करू लागली. मठात सामुहिक पठण आणि प्रसादाचे वाटप सुरू होते. मात्र, काही दिवसात एक अजबच घटना घडू लागली. भंडारा वाटून संपेपर्यंत भगवान कृष्णासमोर ठेवलेला नैवेद्य गायब होऊ लागला. सेवकांनी ही बाब स्वामीजींच्या कानावर घातली. स्वामींना अचानक त्या दीन व्यक्तीची आठवण झाली आणि विचारपूस केल्यावर, त्या व्यक्तीचे येणे बंद झाले, असे कळले. सेवकांना त्या व्यक्तीवर संशय आला. स्वामीजींनी त्या व्यक्तीची भेट घ्यायची, असे ठरवले. ती व्यक्ती नदीच्या पलीकडे असलेल्या गावात राहत होती. स्वामीजी येताच ती नम्रपणे उभी राहीली आणि नतमस्तक झाली. स्वामीजींनी तिची ख्यालीखुशाली विचारली आणि मठात न येण्याचे कारण विचारले. आपण घरीच स्तोत्रपठण करतो, असे ती म्हणाली. कुटुंबाच्या पालपोषणाचे काय? असे विचारले असता, ती व्यक्ती म्हणाली...'स्वामीजी! विष्णुसहस्रनामाचे पठण सुरू केल्यापासून एक तरुण रोज प्रसादपात्र घेऊन येतो आणि तो आपला सेवक आहे असे सांगतो. आपण एवढी कृपादृष्टी ठेवलीत, धन्य झालो.' यावर स्वामीजी म्हणाले, 'मी कोणीही सेवक पाठवला नाही. स्वयं परमात्मा तुमची क्षुधाशांती करण्यासाठी सेवकरूपाने तुझ्या द्वारी आला. हे तुझ्या श्रद्धेचे आणि भक्तीचे फळ आहे. भगवंतावर अशीच श्रद्धा कायम ठेव. कारण, तोच या जगाचा पालनकर्ता आहे.*
Whatsapp वरून साभार
जन्म पत्रिका सद्गुरू बदलू शकतात.....
गुरुसान्निध्यात असणाऱ्या शिष्याची पत्रिका कितीही वाईट असू द्या. जर शिष्याने गुरुसेवा ही ईश्वरसेवा समजून केली तर गुरूंचे त्याच्या पत्रिकेवर नियंत्रण राहते. सामान्य मनुष्य किंवा ज्योतिषी त्यात बदल करू शकत नाही. दत्त अवतार वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींच्या बाबतीत घडलेली ही सत्य घटना आहे. एका स्त्रीचा मुलगा खूप आजारी पडला. ती एका ज्योतिषाकडे गेली असता त्याने मुलाच्या पत्रिकेत त्यावेळी मृत्यूयोग असल्याचे सांगितले. ती बाई रडत टेंबे स्वामींकडे गेली. स्वामींनी पत्रिका पाहिली. व स्वतः पत्रिकेतील ग्रहांची स्थाने बदलून नवी पत्रिका मांडली. त्यांच्या या कृतीने मुलाचा मृत्यूयोग टळला.
जसे ड्रायव्हरला गाडी कुठेही थांबवता येते. कारण ब्रेकवर त्याचे नियंत्रण असते. पण प्रवाशाचे ते नसते. तसेच या सद्गुरुंच्या शक्तीचे आहे. म्हणून गुरूंचा अधिकार आणि आधार ईश्वरापेक्षा मोठा असतो. शिष्याने गुरूंना केव्हाही कोठूनही हाक मारली तरी गुरू त्याच्या मदतीला धावून जाणारच. पण आपल्या हाकेत ती श्रध्दा, ती आर्तता असली पाहिजे!
गुरुच्या देहाची सेवा करणे हीच गुरूची सेवा, असे तुम्हाला वाटते का? त्याच्या देहाची सेवा करणे ही गुरूची खरी सेवाच नव्हे; गुरू सांगेल तसे वागणे, हीच त्याची खरी सेवा होय. माझ्याजवळ जे येतात, ते कुणी मुलगा मागतो, कुणी संपत्ती मागतो, कुणी रोग बरा करा म्हणून मागतो. तेव्हा माझी सेवा करायला तुम्ही येता की मीच तुमची सेवा करावी, म्हणून येता? माझ्याजवळ येऊन मनुष्यदेहाचे खरे सार्थक होईल, असे करा.
गुरुकृपा हि केवलम् ! शिष्य परम मंगलम् ! #🌹देवी देवता🙏
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 महात्म्य - एक प्रभावी उपासना.*
*प.पु. श्री सद्गुरू श्री वासुदेवानन्द सरस्वती स्वामी महाराजांनी सर्व पुराणातील सार काढून श्रीदत्त पुराण या ग्रंथाची संस्कृत भाषेमध्ये रचना केली असून त्याची ज्ञान, कर्म व उपासना ही कांडे आहेत.*
*कालमानानुसार समाजातील संस्कृतचे कमी ज्ञान होऊ लागल्याने शके १८२३ मध्ये (सन १९०१) त्यांनी श्री दत्त पुराणातील उपासना कांडावर 'श्रीदत्त महात्म्य' हा प्राकृत ओवीबद्ध ग्रंथ लिहिला. या ग्रंथाचे एकावन्न अध्याय असून पाच हजार चारशे ओव्या आहेत. श्री महाराजांनी यांत उपनिषद ज्ञान सांगितले असून ग्रंथात मुख्यत्वे नवविधा भक्ती, सहस्त्रार्जुन, अलर्क, आयु व यदु या चार भक्तांची चरित्रे व तत्वज्ञान यांचा समावेश आहे. शेवटच्या अध्यायात श्रीमहाराजांनी श्रीदत्तात्रेयांची प्रार्थना केली आहे की, या ग्रंथात प्रपंचाचे सतत सान्निध्य ठेवावे. या ग्रंथाची पारायणे भाविक श्री गुरुचरित्र या ग्रंथा प्रमाणे नित्य करत असतात.*
*आबालवृद्धांस सुलभबोध करून देणाऱ्या दत्तमाहात्म्य ग्रंथासारखा सर्वांग सुंदर ग्रंथ वाङ्मयात अपूर्वच आहे. महाराजांच्या स्वरूपाप्रमाणे हा ग्रंथही अत्यंत चित्ताकर्षक असाच आहे. कितीही वाचन झाले तरी ‘नित्य नवं नवं’ असाच तो आहे. सगुण स्वरूप साक्षात्काराची ज्ञानशक्ती व वैराग्यरूपसाधने रसभरित वाणीने महाराजांनी यात सांगितली आहेत. महाराज अल्पकाम असल्याने देवाजवळ काही मागत नसत. परंतु या ग्रंथात सान्निध्य ठेवण्याकरता त्यांनी श्रीदत्तप्रभूंजवळ प्रार्थना केली आहे. ते म्हणतात,‘हे प्रभो दत्तात्रेया, मी मागतो पसरूनी हात । ह्या ग्रंथी सतत सान्निध्य ठेवी ।’ (अ. ५१ ओ. ११०) व या प्रार्थनेप्रमाणे दत्तमहाराजांचे या ग्रंथात सान्निध्य आहे असा अनुभव वाचकांसही येतो. त्यांच्या इतर कोणत्याही ग्रंथात याप्रमाणे महाराजांनी प्रार्थना केलेली दिसत नाही. यावरून या ग्रंथाची थोरवी किती आहे, हे सहजच लक्षात येण्यासारखे आहे.*
*श्रीगुरुचरित्राप्रमाणे महाराजांनी दत्तमहात्म्याचेही एकावन्न अध्यायच केले आहेत. याची ओवी संख्या पाच हजार चारशे केली आहे. यात श्रीदत्तमहाराजांचे सांगोपांग चरित्र व सहस्त्रार्जुन, अलर्क, यदु, आयुराजा, परशुराम, प्रल्हाद वगैरे भक्तांची व तद्नुषंगाने अत्रि, अनसूया, रेणुका, जमदग्नी इत्यादिकांचीही चरित्रे अत्यंत रसाळवाणीने वर्णन करून स्वस्वाधिकारानुरूप साधकांचे भक्तिज्ञान, वैराग्य, निष्कामकर्म इत्यादि परमार्थमार्ग अत्यंत स्पष्ट व निश्चित स्वरूपाने वर्णिले आहेत. साल व कोयरहित आम्रादि फळांचा गाभा जसा सर्वच अमृतमय असतो तसाच हा ग्रंथ अगदी अमृतमय आहे. त्यामुळे त्याच्या निरंतर सेवनाने मूळचाच अमृत असणारा मानव अमृतमय होईल यात बिलकूल संशय नाही.*
*प. पु. श्री सद्गुरू श्री वासुदेवानन्द सरस्वती स्वामी महाराजांनी सर्व पुराणातील सार काढून श्रीदत्त पुराण या ग्रंथाची संस्कृत भाषेमध्ये रचना केली असून त्याची ज्ञान, कर्म व उपासना हि कांडे आहेत. कालमानानुसार समाजातील संस्कृतचे कमी ज्ञान होऊ लागल्याने शके १८२३ मध्ये (सन १९०१) त्यांनी श्री दत्त पुराणातील उपासना कांडावर 'श्री दत्त महात्म्य' हा प्राकृत ओवीबद्ध ग्रंथ लिहिला. या ग्रंथाचे एकावन्न अध्याय असून पाच हजार चारशे ओव्या आहेत. श्री महाराजांनी यांत औपनिषद ज्ञान सांगितले असून ग्रंथात मुख्यत्वे नवविधा भक्ती, सहस्त्रार्जुन, अलर्क, आयु व यदु या चार भक्तांची चरित्रे व तत्वज्ञान यांचा समावेश आहे. शेवटच्या अध्यायात श्रीमहाराजांनी श्रीदत्तात्रेयांची प्रार्थना केली आहे कि या ग्रंथात प्रभूंनी सतत सानिध्य ठेवावे.*
*श्रीदत्त महात्म्य या ग्रंथाची रचना भाविक जनांच्या आग्रहावरून महत्पूर येथे शके १८२३ (इ.स.१९०१) च्या चातुर्मासांत झाली असें श्री स्वामीमहाराजांच्या पत्रावरून कळते. त्यांतच पुढे ते म्हणतात, ‘(श्रीदत्तपुराणातील) तृतीयाष्टकापासून सहाव्याच्या सहाव्या अध्यापर्यंत आजपर्यंत (श्रावण शु।।११) ओव्या लिहिल्या. प्रायः प्रत्यही एकशें आठ होत गेल्या. तेवढ्याचाच अध्याय ठेवला. उद्यां पन्नास अध्याय पुरा होईल. सुमारें साडेपाच हजार ओव्यांचा ग्रंथ झाला. आतां पुढें लिहिण्याची इच्छा होत नाहीं...’ यानंतर अवतरणिकेचा एक अध्याय झाला. असे एकूण ५१ अध्याय आहेत. गुरुचरित्राच्या अध्यायांचीच संख्या येते.*
*प. पू. योगिराज श्री गुळवणीमहाराज यांनी प्रकाशित केलेल्या श्रीदत्तमाहात्म्याचे संपादन पं. आत्मारामशास्त्री जेरे यांनी केले आहे. त्यांच्या शब्दांत ‘प्राकृत दत्तमाहात्म्यस्वरूप ही सुद्धां एक सर्वश्रेष्ठ अशी महाराजांची लीला आहे. आबालवृद्धांस सुलभबोध करून देणाऱ्या दत्तमाहात्म्य ग्रंथासारखा सर्वांगसुंदर ग्रंथ वाङ्मयात अपूर्वच आहे! सगुणस्वरूप साक्षात्काराची ज्ञान, भक्ति व वैराग्यरूप साधने रसभरित वाणींने महाराजांनी यांत सांगितली आहेत. महाराज आप्तकाम असल्याने देवाजवळ काहीं मागत नसत. परंतु या ग्रंथांत सतत सान्निध्य ठेवण्यांकरीतां त्यांनी श्रीदत्तप्रभूंची प्रार्थना केली आहे. ते म्हणतात, ‘प्रभो दत्तात्रेया, मागतों पसरूनी हात। ह्याग्रंथी सतत सान्निध्य ठेवी।। (५१:११०) व या प्रार्थनेप्रमाणें दत्तमहाराजांचे या ग्रंथात सान्निध्य आहे असा अनुभव वाचकांसही येतो. यांत श्रीदत्तमहाराजांचें सांगोपांग चरित्र व सहस्रार्जुन, अलर्क, यदु, आयुराजा, परशुराम, प्रह्लाद वगैरे भक्तांची व तदनुषंगानें अत्रि, अनसूया, जमदग्नि इत्यादिकांचीही चरित्रे अत्यंत रसाळ वाणीने वर्णन करून स्वस्वाधिकारानुरूप साधकांचे भक्ति, ज्ञान, वैराग्य, निष्कामकर्मयोग इत्यादि परमार्थमार्ग अत्यंत स्पष्ट व निश्चित स्वरूपानें वर्णिले आहेत. साल व कोयरहित आम्रादि फळांचा गाभा जसा गसर्वच अमृतमय असतो तसाच हा ग्रंथ अगदीं अमृतमय आहे. त्यामुळे याच्या निरंतर सेवनाने मूळचाच अमृत असणारा मानव अमृतमय होईल यांत बिलकुल संशय नाही. हा एकच ग्रंथ वाचकाच्या सर्व कामना पूर्ण करून त्याला परब्रह्म पदवी देणारा आहे.’ खुद्द श्रीस्वामी महाराजांनीच ग्रंथाच्या शेंवटीं त्याच्या प्रयोजनाविषयी म्हटले आहे, ‘मंदां विशेंषेंकरून। नुमजे औपनिषदज्ञान। त्यांकरितां हे लेखन। करवी अत्रिनंदन दयाळू।। (५१:१०६) कलियुगातील अशक्त जीवांना उपनिषदांचे श्रवण, मनन, निदिध्यासनादि मार्ग अगम्य आहेत. तसेंच त्यांचा अधिकारही मर्यादित आहे. म्हणून गीतेच्या वचनाप्रमाणे स्त्रिया, वैश्य, शूद्र इत्यादि सर्व जीवांना ह्या ग्रंथाद्वारें श्रीस्वामी महाराजांनी मोक्षाचा मार्ग प्रशस्त केला आहे. ह्या ग्रंथाच्या ३९व्या अध्यायापासून ग्रंथाच्या समाप्तीपर्यंत प्रत्येक ओवीचे तिसरे अक्षर क्रमाने वाचल्यास मांडुक्योपनिषद, भद्रं कर्णेभिः व स्वस्ति नो हे शांतिमंत्र, ईशावस्योपनिषद्, पूर्णमदः..., अतो देवा अवंतु नो हे मंत्र साकार होतात. हें श्रीमहाराजांच्या वरील वचनाचेंच द्योतक आहे.*
*त्यांनी निर्माण केलेल्या ग्रंथसंपत्तीपैकी बरेचसे ग्रंथ संस्कृत भाषेत आहेत. त्या ग्रंथांची महत्ता केवढीही मोठी असली तरी सर्वसामान्य लोकांना त्यांचा विशेष उपयोग होण्यासारखा नाही. हे ध्यानात घेऊन श्रीमहाराजांनी मराठीत जे साहित्य निर्माण केले आहे, त्यात प्रस्तुत ग्रंथाची योग्यता अनेक दृष्टींनी अलौकिक आहे. प्रस्तुत ग्रंथाचे स्वरूप व त्याच्या निर्मितीचे कारण यांवर महाराजांनी स्वत:च प्रकाश टाकलेला आहे. ते लिहितात,*
*"जगदुद्धारार्थ परमेश्वर । अत्रीच्या घरी धरी अवतार । त्याच्या चरिताचा विस्तार । वर्णिला सुंदर पुराणी ॥ तत्सारभूत दत्तपुराण । औट सहस्त्र निरूपण । ते अपरिचित गीर्वाण भाषण । प्राकृतजन नेणती ॥ म्हणोनि हा ग्रंथारंभ । ह्या योगे उमजेल स्वयंप्रभ । भक्तवत्सल पद्मनाभ । चित्तक्षोभहर्ता जो ॥ श्रीदत्तपुराणाचे तीन भाग । ज्ञानोपासनाकर्मयोग । त्यांतील उपासनाकांड भाग । ईश्र्वरानुराग दावी जो ॥ जेथे कार्तवीर्याचे आख्यान । अलर्काचे विज्ञान । आयुयदूंचे उद्धरण । हेंचि वर्णन मुख्यत्वे ॥"*
#🙏श्री स्वामी समर्थ📿 *चिंतन* 🙏
*आपण सकाळी पंधरा मिनिटे पूजा करून टाकतो आणि नंतर दिवसभर मौजमजा. संचितातले पुण्य भसाभस संपत जाते. काही पापही हातून घडत असते. पण मनात सतत अहंकार असतो की, मी सकाळी पूजा केली आहे ! पण एक हजार रुपये पगारावर उत्तम संसार होऊ शकतो का? महान तपश्चर्या केलेल्या कालीभक्त परमहंसांना कॅन्सर झाला. विवेकानंदांना मधुमेहाने ग्रासले. व-हाडचे महान संत गुलाबराव महाराजांना अंधत्व आले. सुरदासही आंधळे होते. मुक्तेश्वर मुके होते. कुर्मदास पांकळे होते. जन्मभर श्रीकृष्णांसाठी वेड्या झालेल्या मीराबाईला खूप छळ सोसून शेवटी विषाचा प्याला घ्यावा लागला. पांचालीला वस्त्रहरणाच्या दिव्यातून जावे लागले. महान पतिव्रता सीतादेवींना बंधनवासात रहावे लागले आणि अग्निदिव्याला सामोरे जावे लागले. प्रत्यक्ष श्रीकृष्णांना स्यमंतक मणी चोरल्याचा आरोप सहन करावा लागला. श्री रामप्रभूंना वनवास भोगावा लागला. विश्वामित्रांची तपश्चर्या भंग पावली. पैशाची टांकसाळ घरात असताना ह्या महान पुण्यवान जीवांना दारिद्र्य भोगावे लागले, इतकी कर्माची गति गहन असते, तर आपल्या टिचभर पुण्याचा डांगोरा पिटणे हास्यास्पद नाही का? "मी एवढे देवाचे करतो तरी माझ्याच वाट्याला दुःख का?" असे रडगाणे गाणा-या अज्ञ जीवांनी वरील उदाहरणे वाचून निमुटपणे प्रेमाने, गुरुपदेशित नाममंत्राची सातत्याने उपासना करीत रहावे व परमेश्वराच्या अचुक न्यायदानावर विश्वास ठेवावा. त्याच्या न्यायालयात कधीही गफलत होत नाही.*
🙏🙏
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 नोव्हेंबर❗
‼श्री गुरुदेव दत्त‼
🌹🌹प्रवचनाचा विषय🌹🌹
🟧🟪🟧भगवंताजवळ काय मागावे❓🟧🟪🟧
💠परमात्मा कसा असतो म्हणून विचारले तर काय सांगता येईल❓तो तर नाम, रूप आणि गुण यांच्या अतीत आहे; म्हणून, आपल्या भावनेने जसा पाहावा तसा तो आहे असे सांगता येईल. म्हणजेच, सर्व काही आपल्या भावनेवर आहे.💠
⭕आपण त्याच्याजवळ काहीही मागितले तरी तो द्यायला तयार असतो. आपण विषय मागितले तर तो देत नाही असे नाही, पण त्याबरोबरच त्याचे फळ म्हणून सुखदुःखेही आपल्याला भोगावी लागतात. म्हणून, काही मागायचे झाले तर ते विचार करून मागावे.⭕
💮एक गृहस्थ दमून एका झाडाखाली बसला. ते झाड कल्पवृक्षाचे होते. तो सहज म्हणाला, 'इथे आता मला पाणी मिळाले तर फार बरे होईल.' असे म्हणताच त्याला पाणी मिळाले. पुढे, 'आता काही खायला मिळाले तर बरे.' असे म्हणताच त्याला खायला मिळाले. त्यावर, त्याला विश्रांती घ्यावीशी वाटली, आणि तसे म्हणताच त्याची निजण्याची सोय झाली. पुढे त्याला वाटले की आता इतके सर्व मिळाले, तेव्हां इथे माझी बायकोमुले असती तर मजा आली असती; असे म्हणताच ती तिथे आली. एवढे झाल्यावर त्याला वाटले, ' आपण जी इच्छा केली ते सर्व मिळाले. तर आता इथे मरण आले तर--' असे म्हणताच तो मरण पावला❗म्हणून काय, की विषय मागत गेले तर त्यापासून विषयच वाढत जातात. तेव्हां, ज्यापासून आपले कल्याण होईल असे मागावे.💮
🔸एका भिकाऱ्याला राजा म्हणाला की, 'तुला काय मागायचे असेल ते माग.' त्याने आपल्याला पांघरायला घोंगडी मागितली. मागितले असते तर अर्धे राज्यही द्यायला तो राजा तयार होता, त्याच्यापाशी त्याने यःकश्चित् घोंगडी मागितली.🔸
♦समर्थ द्यायला भेटल्यावर त्याच्याजवळ काय मागायचे हे नीट विचार करून मागावे. म्हणूनच, भगवंतापाशी त्याच्या भक्तिची याचना करावी; ही मागितल्याने आपल्याला समाधान मिळते, आणि दुसरे काही मागण्याची इच्छा होत नाही.♦
🏵भगवंताचे अवतार कसे झाले आहेत❓तर भक्तांकरिताच देवाला अवतार घ्यावे लागले आहेत. अवतार घेतल्यावर नुसते भक्तांचेच काम होते असे नाही, तर त्यामुळे इतरांनाही 'देव आहे' ही भावना निर्माण होते. आपण त्याला शरण जाऊन त्याचे होऊन रहावे, म्हणजे आपल्याला मग इतर कोणत्याही बाबतीत काळजी करण्याचे कारण उरत नाही.🏵
❄भगवंत हा अत्यंत दयाळू आहे. लोखंडाने परिसाला मारले तरी त्याचे सोनेच बनते. त्याप्रमाणे, भगवंताने भरताला भाऊ म्हणून तारला, बिभीषण शरण आला म्हणून त्याला तारला, आणि रावणाला शत्रू म्हणूनही तारला; पण त्याने सोडले कुणालाच नाही. असा भगवंत जोडायला नामाशिवाय दुसरा कोणताच उपाय नाही.❄
🌹#बोधवचन :भगवंताच्या नामाशिवाय मला काहीच कळत नाही, असे ज्याला कळले त्यालाच सर्व कळले.🌹
🎄#प्रवचने :श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज🎄
🌺श्री राम जय राम जय जय राम🌺🙏🙏
श्रीगुरु इतके देतात, की त्यासमोर मोक्षही फिका पडावा. म्हणून त्यांचे वर्णन करताना श्रीज्ञानेश्वरीत भगवान श्रीकृष्ण सांगतात-
*जे पुरुषार्थ सिद्धी चौथी l* *घेऊनि आपुल्या हाती l*
*रिगाला भक्ती पंथी l**जगा देतु ll*
*कैवल्याचा अधिकार l* *मोक्षाची सोडी बांधी करी l*
*की जळाचिये परि l* *तळवटु घे ll*
असा परमात्मस्वरूपाचा आनंद श्रीगुरु आपणास प्राप्त करून देतात. अर्थात हा आनंद बाहेरून आणून देत नाहीत, तर आपले आनंदस्वरूप ते जाणवून देतात. तो आनंद आपल्या ह्रदयातच आहे, हे दाखवितात. म्हणजेच त्या परमात्मस्वरूपाची प्राप्ती करून देतात. तात्त्विक परिभाषेत मायेचे आवरण दूर करतात. तत्त्वज्ञानात मायेचे आवरण जाणे म्हणजेच आनंदाची प्राप्ती होणे. ही माया जी सर्व दुःख परंपरा निर्माण करते, ती आपणास त्या आनंदापासून वंचित ठेवते.
म्हणून श्रीगुरु त्या मायेचाच नाश करतात. त्याचे वर्णन श्रीज्ञानेश्वरमहाराज पुढच्या ओवीत करतात,
*मोडोनि माया कुंजरू l* *मुक्तमोतियाचा वोगरू l*
*जेवविता सद्गुरु l* *श्रीनिवृत्ति वंदू ll*
श्रीगुरु माया मोडून काढतात म्हणजेच नाहीशी करतात. आणि परमानंदाचे भोजन घालतात. या ओवीबाबत पाठभेद आहे. काही प्रतींमध्ये ही ओवी तीन क्रमांकाची आहे. व काही प्रतीत दोन क्रमांकाची आहे. क्रम कोणताही स्विकारला तरी अन्वयार्थामध्ये फरक पडत नाही.!!👏 #🙏श्री गुरुदेव दत्त💐
जो पुष्कळांना मनापासून आवडतो तो मनुष्य चांगला; असा मनुष्य अजरामर होतो. तो निःस्वार्थीपणाने राहून मनावर संयम ठेवतो. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसर्याला बुडविण्याचा दुष्टपणा त्याच्याकडून होणेच शक्य नाही. असा सत्पुरुष म्हातार्याला म्हातारा, पुरूषाला पुरूष, मुलाला मुलासारखा दिसतो; म्हणजेच जो ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे त्याचे त्याच्याशी वर्तन असते. असा मनुष्य कोणाविषयी काही निंदा किंवा स्तुती बोलत नाही. मान घ्यायला योग्य असूनही मानाची अपेक्षा तो करीत नाही. स्वतःच्या विकारांवर त्याचा पूर्ण ताबा असतो आणि दुसर्याच्या दुःखात तो त्यांना सुख देण्याचा प्रयत्न करीत असतो. तो सहजावस्थेत राहतो; म्हणजेच उपाधीमुळे बांधला जात नाही. असा योगी मनुष्य खरोखरच मुक्त समजावा. अशा लोकांनाच संत म्हणतात; आणि ते जी जी कर्मे करतात, ती ती भगवंताच्या प्रेरणेनेच आणि भगवंतासाठीच असल्यामुळे, त्या कर्मांच्यापासून जगाचे कल्याण घडते. संतांच्या प्रत्येक कर्मामध्ये तुम्हाला प्रेम, दया, परोपकार, निःस्वार्थीपणा आणि भगवंताची निष्ठा याच गोष्टी आढळून येतील." श्री राम समर्थ #🌹देवी देवता🙏
गुरुचरित्राच्या पन्नासाव्या अध्यायापर्यंत आपण गुरुमहाराजांच्या अनेक लीला वाचतो ,ते ते प्रसंग साक्षात डोळ्यासमोर उभे राहतात आणि तल्लीन मनाला एक्कावन्नाव्या अध्यायाच्या वेळी जाग येते . गुरुमहाराज आपल्या प्रस्थानाचे सूतोवाच करताच आपल्या मनाला हुरहूर लागते आणि आपण मनात म्हणतो हे काय महाराज --- एव्हढ्यात आपण निघताय ?? अहो अजून अनेक लीला वाचायची इच्छा आहे आणि आम्हाला सोडून कोठे निघालात ??
तेव्हड्यात ओळी येतात ,
प्रातःस्नान कृष्णातीरी l पुण्यवृक्ष औदुंबरी l अनुष्ठान बिंदुक्षेत्री l माध्यान्ही येतो भीमातटीं ll
अमरजा संगमी स्नान करोनि l पूजा घेऊ मठी निर्गुणी l चिंता न करा अंतःकरणी l म्हणोनि सांगती श्रीगुरु ll
गुरुमहाराज आपले सांत्वन करत म्हणताहेत कि मी इथेच आहे पण मन ऐकत नाही . पुन्हा त्यांचे सान्निध्य अनुभवायला यांत्रिकरीत्या हाताने पहिली पाने उलटली जातात आणि आपण पुन्हा एकदा सुरवात करतो -----श्री गणेशाय नमः l श्री सरस्वत्यै नमः l श्री गुरुभ्यो नमः l ------------
नित्य सहवासाने प्रेम उत्पन्न होते हा नियम आहे आणि हे गुरुचरित्रासारखे ग्रंथ म्हणजे दत्त महाराजांचा नित्य सहवासच आहे . त्याचे वाचन ,मनन ,श्रवण ,कीर्तन आदी करून आपण त्यांच्या सहवासाचे अक्षय्य सुख हे अनुभवतो.
अहो स्वर्गात वास्तव्य करून मग्न झालेले देवसुद्धा दत्त महाराजांची कृपा मिळावी म्हणून भूलोकी नरजन्म मिळावा अशी इच्छा करतात आणि आम्हाला तर दत्त कृपेने अगदी सहजच या नरजन्माची प्राप्ती झाली आहे . तेव्हा या जन्माचे सार्थक करायला गुरुचरित्र /दत्त माहात्म्यासारखे ग्रंथराज आतुर आहेत . श्री गुरुदेव दत्त !!! --- अभय आचार्य . #🙏श्री गुरुदेव दत्त💐
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 परान्नदोषाचा जो उल्लेख आहे, तो केवळ अन्नाच्या शुद्ध–अशुद्धतेपुरता मर्यादित नाही; तर तो मन, संस्कार, भावना आणि कर्मांच्या आदानप्रदानाशी घट्ट जोडलेला आहे.
अन्न हे फक्त देहाला पोषण देत नाही, तर ते ज्या भावनेतून, ज्या मनोभूमिकेतून तयार केले जाते, त्या सर्वांचा प्रभाव आपल्यावर अनिवार्यपणे पडतो. म्हणूनच पूर्वी परान्नाबाबत काटेकोर नियम होते.
अन्न हे नुसते अन्न नाही; ते करणाऱ्याची भावना, गुण, सद्गुण, दोष, मन:स्थिती, कर्म आणि संस्कार यांचे अदृश्य वहन आहे. म्हणूनच संत जेव्हा ‘परान्न टाळा’ म्हणतात, तेव्हा त्यामागचा हेतू मर्यादाबद्ध नाही; तो जीवन शुद्ध, मन निर्मळ आणि संस्कार तेजस्वी ठेवण्याचा आहे.
आजच्या काळात परान्न अनिवार्य असेल, तरी ते खरे समाधान, कृतज्ञता, शुद्ध मन, आणि सकारात्मक भावनेने स्वीकारले तर त्याचा परिणामही सद्गुणीच होतो. आणि जेव्हा आपण आपल्या घरी, आपल्या हाताने, चांगल्या भावनेतून कोणाला अन्न देतो तेव्हा त्या अन्नाचे पुण्य स्वतः आपल्याकडे परत येते. अतिथीस दिलेला आदर, प्रेमाने वाढलेले अन्न, आणि देण्यामागची कृतज्ञता हेच तर दत्तमहाराजांच्या कृपेचे खरे द्वार.
|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
© दत्तरुप ll
---------------------------------------------------
#श्रीदत्तरूप #गुरुचरित्र #दत्तजयंती #श्रीदत्त #दत्त













