Mr. Vik@s
ShareChat
click to see wallet page
@36832142
36832142
Mr. Vik@s
@36832142
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#🌹देवी देवता🙏 प्राण्यावर कृपा केलेली वाचली आहे का ? गुरुमहाराज गाणगापूर येथे असताना एक अत्यंत गरीब अशा ब्राह्मणाकडे भिक्षेस गेले ,दारात म्हैस होती ,गृहस्वामिनी अतिथी म्हटल्यावर बाहेर आली आणि स्वामी महाराजांना म्हणाली यजमान स्वतः भिक्षेस गेले आहेत ते येताच भिक्षा स्वीकारावी ,त्यावर गुरुमहाराज म्हणाले दारात म्हैस असताना दूध का बरे नाही ? यावर त्या गृह स्वामिनीने ती म्हैस वांझ आणि म्हातारी दंतहीन असल्याचे सांगितले . माती वाहून नेण्याकरिता लोक तिला नेतात ,आणि त्याबदली काही प्राप्ती होते . यावर गुरुमहाराजांच्या आशीर्वादाने ती म्हैस दुग्धवंती झाली . आता राहिला प्रश्न कृपेचा ,अहो म्हातारी असताना होणाऱ्या कष्टापासून सुटका झाली ,आणि प्रत्यक्ष गुरुमहाराजांचा वरदहस्त लाभला आणखी काय हवं . भले मनुष्य जन्मात हे भाग्य नसेल पण त्या जन्मात तर भाग्य लाभल ,उद्धार झाला ,श्री गुरुदेव दत्त !!! अभय आचार्य
🌹देवी देवता🙏 - 41217 तया   वेळी।I४८| क्षीर   बंतोषोन। பர aஎ भबलीं कामधेननु। विप्रवनिता जातां क्षण। ஓி श्रीगुकवचन 41217 तया   वेळी।I४८| क्षीर   बंतोषोन। பர aஎ भबलीं कामधेननु। विप्रवनिता जातां क्षण। ஓி श्रीगुकवचन - ShareChat
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 फेब्रुवारी❗ ‼श्री गुरुदेव दत्त‼ 🌷🌷प्रवचनाचा विषय🌷🌷 🟪🟥🟪भगवंताच्या नामानेच वासनाक्षय❗🟪🟥🟪 🌀आपण सर्व जीव वासनेत गुंतलेले आहोत, कारण आपला जन्मच वासनेत आहे.🌀 💢वासना म्हणजे 'आहे ते असू द्याच, आणि आणखीही मिळू द्या' असे वाटणे. आपण सध्या या स्थितीत आहोत. पण सुरूवात म्हणून आपण असे म्हणावे की, 'आहे ते असू द्या, आणि आणखी मागायचे ते परमेश्वराजवळ मागू या.' म्हणजे, मिळाले तर 'भगवंताने दिले', आणि न मिळाले तर 'त्याची इच्छा नाही', अशी जाणीव होऊन 'दाता परमात्मा आहे' ही भावना वाढू लागेल; आहे तेही त्याच्याच इच्छेचे फळ आहे असे वाटू लागून अस्वस्थता आणि आसक्ती कमी होऊ लागेल; आणि आसक्ती कमी होऊ लागली की 'हवे नको' कमी होऊन वासना ओसरू लागेल.💢 💮केवळ आपल्या कर्तबगारीने वासनेच्या पलीकडे जाणे अशक्य आहे; त्याला शरणागतीशिवाय गत्यंतर नाही. याकरिता योग्य संगतीचाही फार उपयोग होईल.💮 ❄एखाद्या बैराग्याची संगती केली तर स्वाभाविकच कपडयाचे प्रेम कमी होईल, पण एखाद्या शेटजीच्या संगतीत राहिलो तर छानछोकी करण्याकडे प्रवृत्ती होईल. म्हणून अशा संगतीत राहावे की ज्यामुळे शरणागती यायला मदत होईल.❄ 💠शरणागती म्हणजे परमेश्वराला सर्वस्वी अर्पण होऊन राहणे; याचाच अर्थ, आपण उपाधिरहित बनणे. तर मग आपण अशाची संगती केली पाहिजे की जे अत्यंत उपाधिरहित आहे. हे साधन म्हणजे भगवंताचे नाम.💠 🔹️काळ, वेळ, परिस्थिती, उच्च-नीच भाव, स्त्री,पुरूष, विद्वत्ता, अडाणीपणा, श्रीमंती, गरिबी, प्रकृतीची सुस्थिती-दुःस्थिती, वगैरे कोणतीही गोष्ट नामाला आड येऊ शकत नाही. तसेच, त्याला कोणतीही उपकरणे लागत नाहीत. ते हृदयात सतत आपल्याबरोबर बाळगता येते.🔹️ 🔸️नामात वैराग्याचे कष्ट नाहीत, आणि कुठेही, केव्हाही ते बरोबर नेता येते. त्यासाठी विषयाची तदाकारवृत्ती सोडली पाहिजे. 'भगवंत माझ्या मागे आहे' अशी श्रद्धा राखली की वृत्ती विषयाशी तदाकार होत नाही.🔸️ 🏵मारूतीने दिलेली मुद्रिका पाहिल्यावर सीतेला रामाच्या स्वरूपाची आठवण झाली, त्याप्रमाणे नाम घेताना आपल्याला त्याची आठवण झाली पाहिजे.🏵 ♦️भगवंताच्या अनुसंधानात जो राहिला त्याने काळावर सत्ता गाजविली. अशा लोकांना मरणाचे भय कुठून असणार❓ भगवंताला सर्वस्व दिल्यामुळे त्यांना वासना उरत नाही; आणि जिथे वासना उरली नाही तिथे काळाचा शिरकाव होत नाही.♦️ ⭕वासना नष्ट होणे म्हणजे देहबुद्धी नष्ट होणे होय. वासनेच्या क्षयामध्ये आपलेपणाचे मरण आहे, आणि हे मरण डोळयांनी पाहण्यासाठी आपण भगवंताच्या नामात राहिले पाहिजे.⭕ 🌲#बोधवचन:वासनेचा क्षय भगवंताच्या नामात आहे हे अक्षरशः खरे आहे.🌲 🌹#प्रवचने:श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज🌹 🚩श्री राम जय राम जय जय राम🚩
🙏श्री गुरुदेव दत्त💐 - : : - ShareChat
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 कर्तव्ये विसरणे म्हणजेच कलियुग या नानांच्या कलियुगाच्या व्याख्येवर मी म्हणालो ,का हो नाना , कर्तव्ये आम्ही करतोच आहोत कि ? आणखीन काय करायला हवं . यावर नाना म्हणाले ,अहो आचार्य ,कुटुंब सांभाळले कि झाली कर्तव्ये असं अजिबात नाहीये . संस्कार आणि त्या संस्कारांचे पालन हे तर एक नित्य विसरले जाणारे कर्तव्य . आता मला सांगा ,मुंज म्हणा मौंजीबंधन म्हणा , व्रतबंध अर्थात व्रतबंधन झाले आहे ना ? मग रोज कालानुरूप संध्या होते का ? मी ओशाळून नकार दिला , यावर ते पुढे म्हणाले ,अहो सध्या सर्व काही सोडून दिले आहे . मी अमुक - मी तमुक हे सांगायला मात्र अहमहमिका असते . मोठमोठ्या पूर्वजांचे दाखले देताना अभिमान वाटतो पण त्यांचे आचरण अभ्यासावे आणि अनुसरावे असे वाटत नाही . एके काळी तर क्षत्रिय देखील , व्रतबंधन हे संस्कार आणि संध्या आदी नित्यकर्मे करत असत . यावर मी म्हणालो ,आहे का काही संदर्भ याला ? यावर ते म्हणाले ,,अहो जुन्या शास्त्र ग्रंथात बरंच काही आहे पण ते संस्कृत भाषेत आणि आपण हि भाषा केवळ दहावीपर्यंत गुण तक्ता उत्तम असावा म्हणून अभ्यासली ,आता तर ते हि नाही . इंग्रजी माध्यमामुळे लॉर्ड रामा आणि कर्मा असच काही ऐकू येत . इथे मी अगदी प्राकृत आणि समोर असणारा दाखला देतो . दत्त माहात्म्यात हे आलेलं आहे . आधी व्रतबंधन पाहता अलर्क आख्यानात याचा उल्लेख आहे . शत्रुजित राजाचा पुत्र हा ऋतुध्वज , याचे व्रतबंधन झाल्याचा उल्लेख आहे . त्याचे होता व्रतबंधन l करी सर्व विद्याध्ययन l झाला धनुर्वेदाभिज्ञ l ज्याला प्राज्ञ मानिती ll (द मा २५/११) आता संध्या कोणा क्षत्रिय राजाने केली आहे का ? तर दत्त महाराज स्वतः कार्तवीर्याला सांगत आहेत ,श्रीदत्त म्हणे अर्जुना l आजी करी संध्या वंदना l करुनिया भोजना l उद्या आसनावरी बैस ll (द मा १६/६) थोरले महाराज तर शास्त्र पालन न करणाऱ्या ब्राह्मणाला दर्शन देखील देत नसत ,मग कृपाशीर्वाद फार पुढची गोष्ट झाली .सर्व जमत नाही मान्य आहे पण काही अंशी तरी प्रयत्न व्हायला हवा , मी मान डोलावत उगीच विषय वाढवला असे मनात म्हणत काढता पाय घेतला . श्रीगुरुदेव दत्त !!!---अभय आचार्य
🙏श्री गुरुदेव दत्त💐 - ShareChat
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 एकशे आठ मण्यांची का असते ?* आपण ज्या माळेने जप करतो त्या माळेमध्ये किती मणी असतात, हे तुम्हाला माहिती आहे का ?* जप करण्यासाठी जी माळ उपयोगात आणली जाते त्यामध्ये *108 मणी* असतात. माळेमध्ये 108 मणी का असतात यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे. माळ रुद्राक्ष, तुळस, स्फटिक किंवा मोत्याने बनलेली असते. या माळांमध्ये चमत्कारिक प्रभाव असतो. या माळेने एखाद्या मंत्राचा जप केल्यास कोणतेही कठीण कार्य सिद्ध होते. *देवाच्या स्मरणासाठी मंत्र जप हा सर्वश्रेष्ठ उपाय असून पुरातन काळापासून तपस्वी, ऋषीमुनी, संत हा उपाय मानतात. जपासाठी माळेची आवश्यकता असते आणि याशिवाय मंत्र जपाचे फळ प्राप्त होऊ शकत नाही.* रुद्राक्षाची माळ जप करण्यासाठी सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे. रुद्राक्ष साक्षात महादेवाचे प्रतिक आहे. रुद्रक्षामध्ये सूक्ष्म किटाणू नष्ट करण्याची शक्ती असते. रुद्राक्ष वातावरणातील सकारात्मक उर्जा ग्रहण करून साधकाच्या शरीरात पोहचवतो. शास्त्रामध्ये सांगितले आहे की… बिना दमैश्चयकृत्यं सच्चदानं विनोदकम्। असंख्यता तु यजप्तं तत्सर्व निष्फलं भवेत्।। अर्थ – देवाच्या पूजेसाठी आसन खूप महत्वाचे आहे, त्यानंतर दान-पुण्य आवश्यक आहे. याचप्रकारे माळेशिवाय संख्याहीन केल्या गेलेल्या जपाचे पूर्ण फळ प्राप्त होत नाही. यामुळे जप करताना माळ आवश्यक आहे. जप निश्चित केलेल्या संख्येच्या आधारावर केला तर योग्य राहते. यासाठी माळेचा उपयोग केला जातो. पुढे जाणून घ्या, वेगवेगळे कारणं ज्या आधारावर माळेमध्ये 108 मणी ठेवले जातात… माळेमध्ये १०८ मोती का असतात, यासंबंधी शास्त्रामध्ये सांगितले आहे की… षट्शतानि दिवारात्रौ सहस्राण्येकं विशांति। एतत् संख्यान्तितं मंत्रं जीवो जपति सर्वदा।। या श्लोकानुसार एक सामान्य पूर्ण रूपाने स्वस्थ व्यक्ती दिवसभरात जेवढ्या वेळेस श्वास घेतो, त्याच्याशीच माळेच्या मण्यांची संख्या 108 चा संबंध आहे. सामान्यतः *24 तासांमध्ये व्यक्ती21600 वेळेस श्वास घेतो. दिवसातील 24 तासांमधील 12 तास दैनिक कार्यामध्ये व्यतीत होतात आणि शिल्लक 12 तासांमध्ये व्यक्ती 10800 वेळेस श्वास घेतो.* याचा काळामध्ये देवी-देवतांचे ध्यान करणे आवश्यक आहे. शास्त्रानुसार व्यक्तीने प्रत्येक श्वास घेताना म्हणजे पूजेसाठी निश्चित केलेल्या 12 तासांमध्ये 10800 वेळेस परमेश्वराचे ध्यान करणे आवश्यक आहे, परंतु हे शक्य नाही. यासाठी 10800 वेळेस श्वास घेण्याच्या संख्येमधून शेवटचे दोन शून्य काढून जपासाठी 108 संख्या ठरवलेली आहे. * या संख्येच्या आधारावर जपाच्या माळेमध्ये 108 मणी असतात. आणखी एका मान्यतेनुसार माळेमधील 108 मणी आणि *सूर्याच्या कलांचा संबंध आहे. एक वर्षामध्ये सूर्य 21600 कला बदलतो. सूर्य वर्षभरात दोन वेळेस आपली स्थिती बदलतो. सहा महिने उत्तरायण आणि सहा महिने दक्षिणायन. अशाप्रकारे सूर्य सहा महिन्यातील एका स्थितीमध्ये 10800 वेळेस कला बदलतो. याच 10800 संख्येमधील शेवटचे दोन शून्य काढून माळेमध्ये 108* मण्यांची संख्या निश्चित केली आहे. माळेचा एक- एक मोती सूर्याच्या कलेचे प्रतिक आहे. सूर्य एकमात्र साक्षात दिसणारे देवता आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार ब्रह्मांडाला 12 भागांमध्ये विभाजित केले गेले आहे. या 12 भागांचे 12 राशी नाव मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन आहेत. या 12 राशींमध्ये नऊ ग्रह सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू आणि केतू विचरण करतात. *या 9 ग्रहांच्या संख्येचा गुणाकार 12 राशींशी केला तर 108 संख्या प्राप्त होते. माळेमधील मोत्यांची 108 संख्या संपूर्ण ब्रह्मांडाचे प्रतिनिधित्व करते. आणखी एका मान्यतेनुसार ऋषीमुनींनी माळेमध्ये 108 मणी ठेवण्याच्या मागे ज्योतीषीय कारण सांगितले आहे. शास्त्रानुसार एकूण *27 नक्षत्र आहेत. प्रत्येक नक्षत्राचे चार चरण असतात आणि 27 नक्षत्रांचे एकूण 108* चरण असतात. माळेचा एक-एक मोती नक्षत्राचा एक-एक चरणाचे प्रतिनिधित्व करतो. *108 हा अंक पार केला की जपमाळेत एक मेरुमणी असतो* . तो 108 अंक पूर्ण झाल्याची सूचना हाताला होते. त्यामुळे नेहमी 108 मन्याची माळेचा जप करण्याची प्रथा आहे. त्यामुळे जपमाळ 108 मण्याची असते
🙏श्री गुरुदेव दत्त💐 - ShareChat
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 महाराजांचे समग्र वाङ्मय प पु गुळवणी महाराजांच्या अथक प्रयत्नांनी प्रसिद्ध झाले . हे बहुतांशी संस्कृत भाषेत होते , त्यातील अनेक ग्रंथांचे प्राकृत भाषांतर करण्याचे काम नृसिंहवाडीच्या अनेक दिग्गज विद्वानांनी केले .थोरल्या महाराजांच्या वाङ्मयावर काही लिहिताना किंवा त्यांच्या वाङ्मयाचे भाषांतर करताना आधी किती तयारी हवी ते सांगणे न लगे . केवळ भाषांतर हा मुद्दा इथे नसून त्यातील अधिकाधिक रसग्रहण भक्तांकडून व्हावे या हेतूने हे केलेले अनुवादित भाष्य अशी या भाषांतराची ओळख करून देता येईल . यातील प्रमुख म्हणजे नृसिंहवाडीचे बापूशास्त्री कोडणीकर (कृष्णालहरी आणि दत्त चंपू तृतीय स्तबक ) ,वामनशास्त्री गोविंदशास्त्री पुजारी वाडीकर ( दत्त पुराण ), वामनशास्त्री आत्माराम शास्त्री जेरे पुजारी ( दत्तचंपू द्वितीय स्तबक ) ,वामनशास्त्री गोविंदशास्त्री जेरे पुजारी ( त्रिशति गुरुचरित्र काव्य - द्वितीय शतक ) ,श्रीपादशास्त्री कवीश्वर ( त्रिशति गुरुचरित्र काव्य - प्रथम शतक ) आत्मारामशास्त्री जेरे पुजारी (स्तोत्र संग्रह आणि नारायण स्वामी महाराजांचे चरित्र ) . यातील सर्वात मोठे आणि कठीण असे दत्त पुराण .दत्त पुराण हे आठ अष्टकात चौसष्ठ अध्यायात विभागले आहे . दत्त पुराणाचे भाषांतर मात्र १९७८ साल पर्यंत उपलब्ध नव्हते . हे अत्यंत कठीण असे काम पूर्णत्वास नेले ते नृसिंहवाडीच्या वामनशास्त्री गोविंदशास्त्री पुजारी वाडीकर यांनी . १९७८ साली झुरळे महाराजांनी हे नृसिंहसरस्वती सेवा मंडळातर्फे प्रसिद्ध केले आणि त्याकाळी त्याची किंमत होती पंचवीस रुपये . त्याकाळी हा ग्रंथ केवळ काळ्या पांढऱ्या रंगात छापला जरी गेला असला तरी त्यातील चित्रे अतिशय मोहक होती . प्रासादिक ओघवती भाषा हे या ग्रंथाचे वैशिष्ठ्य म्हणता येईल . पहिल्या अष्टकातील वेद्पादस्तुतीचे वाचन करतानाच या अनुवादाची योग्यता कळून येते . एकदा वाचन होताच पुन्हा पुन्हा याचे वाचन करावे हि प्रेरणा मनाला स्वस्थ बसू देत नाही . थोरल्या महाराजांच्या प्रश्नावलीत एक उत्तर आहे ,वारोनि संकटें सारी ,दत्त हेतु पुरा करी। ‘श्रीमद्दत्तपुराणा’ तें वाचावें वरचेवरी।।५।। . ज्यांना संस्कृत भाषा येत नसेल त्यांनी हे भाषांतर वाचल्यास देखील कार्यसिद्धी होते हा नित्य येणार अनुभव आहे . सध्या या ग्रंथाची आवृत्ती उपलब्ध आहे अथवा नाही ते ठाऊक नाही मात्र तरी कुठे ना कुठे याची प्रत वाचनात आल्यास अवश्य लाभ घ्या . श्रीगुरुदेव दत्त !!!---अभय आचार्य
🙏श्री गुरुदेव दत्त💐 - ShareChat
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 फेब्रुवारी❗ ‼श्री गुरुदेव दत्त‼🙏🙏 🌹🌹प्रवचनाचा विषय🌹🌹 🟧🟧नाम घेतल्याने आपले अवगुण कळून येतील.🟧🟧 ⭕जगातली अनेक साधने जरी पाहिली तरी त्या सर्व साधनांची पहिली पायरी ही, की मनुष्याला त्याचे अवगुण दिसू लागणे. जसजसे साधन वाढत जाईल तसतसे आपल्यातले अवगुण प्रखररूपाने दिसू लागतात, आणि त्या अवगुणांचा पुढे डोंगरच वाटू लागतो.⭕ ♦️'हे परमेश्वरा❗इतक्या अवगुणांनी मी भरलेला असताना, तुझे दर्शन व्हावे अशी मी कशी अपेक्षा करू❓एवढ्या पर्वतप्राय अवगुणांच्या राशीतून मला तुझे दर्शन होईल हे कालत्रयी तरी शक्य आहे का❓' असे वाटू लागते.♦️ 🏵साधन करण्यापूर्वी, रागीट माणूस कधी त्या रागाची खंत बाळगत नाही; किंबहूना, तो अवगुण आहे हे मुळी त्याला पटतच नाही. तो म्हणतो, 'व्यवहारात असा दरारा पाहिजेच; त्याशिवाय कसे चालेल❓' एक साधक मला म्हणाला की, 'अलीकडे मला फार राग येऊ लागला आहे.' वास्तविक, तो राग आताच येऊ लागला असे नसून पूर्वीपासूनच त्याच्याजवळ होता, परंतु साधन करू लागल्यापासून त्याला जाणीव होऊ लागली आहे, किंवा क्रोध वाईट आहे हे आता त्याला कळू लागले आहे, इतकेच❗🏵 🔸️एक लग्नाचा मुलगा होता. त्याने बऱ्याच मुली पाहिल्या, पण एकही त्याच्या मनास येईना. त्याचे आईवडील कंटाळून त्याला म्हणाले, ' तुला मुलगी पसंत पडू दे, मग आम्ही पुढचे काय ते ठरवू.' ते काही मुलगी पाहायला बरोबर जात नसत. त्या मुलाची मोठी बहीण होती तीच त्याच्याबरोबर जात असे. एका ठिकाणाहून मुलगी पाहून आल्यावर मोठया बहिणीने त्याला विचारले, 'कशी वाटली रे तुला❓'त्यावर तो म्हणाला, 'नाही बुवा आपल्याला पसंत.' मोठी बहीण चाणाक्ष होती; तिने फक्त त्याच्या तोंडासमोर आरसा धरला आणि विचारले, 'या प्रतिबिंबापुढे कशी काय वाटते❓' तेव्हा स्वतःचे आणि मुलीचे रूप त्याच्या ध्यानी आले, आणि तो म्हणाला, 'पुष्कळ बरी आहे.' सारांश, जिथपर्यंत आपल्याला स्वतःचे खरे दर्शन होऊ शकत नाही, तिथपर्यंत दुसऱ्यांचे अवगुणच आपल्याला दिसतात.🔸️ 🔹️आपल्याला दुसऱ्यांचे जे काही अवगुण दिसतात, त्यांचे बीज आपल्यातच आहे, हे माणसाने ठाम ओळखले पाहिजे. तेव्हा, दुसऱ्याचे अवगुण पाहण्याची वृत्ती आपण प्रथम टाकून दिली पाहिजे.🔹️ 💠दुसऱ्याचे अवगुण पाहणे हा साधा नेहमीचा व्यवहार आहे, तो परमार्थ नव्हे. खरा परमार्थी जो असतो तो सतत आत्मपरीक्षण करीत असतो. त्याला दुसऱ्याचे अवगुण दिसतच नाहीत; त्याला आपल्याच अवगुणांचे इतके दर्शन होते की, त्या मानाने इतर सर्वजण त्याला परमेश्वररूपच भासतात; आणि हाच खरा परमार्थ.💠 🌲#बोधवचन:आत्मपरीक्षा करून स्वतःमधील अवगुणांच्या बीजाचे उच्चाटन करणे हे एक मोठे साधन आहे; आणि हे साधण्यास नामस्मरणासारखे दुसरे साधन नाही.🌲 🌷#प्रवचने:श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज🌷 🚩🚩श्री राम जय राम जय जय राम🚩🚩
🙏श्री गुरुदेव दत्त💐 - ShareChat
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 गाडी बंगला म्हणजे गुरु कृपा नव्हे... आयुष्यात येणारे अनेक संकटे आपल्या नकळत टळून जातात ते टळलेले संकट म्हणजे गुरु कृपा... गाडीवरून जाताना कुणाचा धक्का लागून पडता पडता आपण स्वतःला सावरतो ते सावरणे म्हणजे गुरु कृपा... एकवेळचे जेवणाचे वांदे असताना मिळालेले दोन वेळच पोटभर जेवण म्हणजे गुरु कृपा... कोसळलेल्या दुःख रुपी डोंगराला पेलण्याची जी ताकत आपल्यात निर्माण होते, ती ताकत म्हणजे गुरु कृपा... 'आता सर्व संपलं' अस वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची नवी उमेद उत्पन्न होते ती उमेद म्हणजे गुरु कृपा... आडचणीमध्ये सर्व साथ सोडून गेले असता "तू लढ.. आम्ही आहोत सोबत" हे गुरुबंधू चे शब्द म्हणजे गुरु कृपा... प्रसिद्धी च्या शिखरावर असतांना तेथूनच हवेत ना उडता पाय जमिनीवर ठेवणे म्हणजे गुरु कृपा.... पैसा, गाडी, बंगला मिळणे म्हणजे सद्गुरू कृपा नव्हे ते नसताना आयुष्यात असलेले ' समाधान ' म्हणजे गुरु कृपा....
🙏श्री गुरुदेव दत्त💐 - ShareChat
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 फेब्रुवारी❗ ‼श्री गुरुदेव दत्त‼ 🌷🌷प्रवचनाचा विषय🌷🌷 🟥🟩🟥देहबुद्धीच्या विस्मरणाकरिता नाम.🟥🟩🟥 🔸️आपली आपल्याला ओळख करून घ्यायला नामस्मरण हाच उपाय आहे.🔸️ ⭕परमेश्वराचा अंश प्राणिमात्राच्या ठिकाणी आहे खरा, पण हे जाणण्याची बुद्धी मात्र मनुष्य प्राण्याच्याच ठिकाणी आहे. पण त्याची अधोगती कशी होत जाते पहा : जीव मुळात परमेश्वरस्वरूपच असल्यामुळे प्रथम तो म्हणतो, 'मी तो, म्हणजे परमेश्वरच आहे.' इथपासून घसरत तो म्हणतो, 'मी त्याचा आहे'; आणि अखेर 'त्याचा माझा काही संबंध नाही' इथपर्यंत तो खाली येतो.⭕ 🛟याला कारण, देहबुद्धीचा पगडा वाढत वाढत शेवटी देह म्हणजेच मी, अशी आपली पक्की भावना होते. पण असे असले तरी मनुष्य अजाणता का होईना, पण खरे आहे ते ओळखल्यासारखेच बोलतो. जसे, एखाद्या इसमाचा स्नेही वारला तर लगेच तो इसम काय म्हणतो, 'आमचे स्नेही गेले❗' याचाच अर्थ, समोर असलेल्या देहाला तो स्नेही समजत नसून त्यात असणार्‍या चैतन्याला, ईश्वरी अंशाला, तो खर्‍या अर्थाने आपला मित्र समजतो. म्हणजे अजाणता का होईना, पण खरे तेच त्याच्या तोंडून बाहेर पडते. असे असले तरी स्वतःच्या बाबतीत मात्र तो ही जाणीव कायम राखीत नाही, आणि आपण म्हणजे देहच असे मानून तो वागत असतो. याला कारण, ज्याचा खरा 'मी' आहे त्याचा विसर पडून देहबुद्धी बळकट होत गेली.🛟 ❄आता याला उपाय हाच, की ज्या मार्गाने मी खाली घसरत आलो त्याच मार्गाने उलट वर जाणे.❄ 🏵तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे, आता मी जो देहरूप बनलो आहे, तो मी त्याचा, परमेश्वराचा आहे अशी जाणीव जागृत करणे. याच जाणिवेची परमावस्था म्हणजे 'मी तोच आहे' ही भावना होणे. हे कसे साधावे❓तर ज्याच्या विस्मरणाने माझी ही अधोगती झाली त्याचे स्मरण करणे.🏵 ♦️स्मरणाला उत्तम साधन म्हणजे भगवंताचे नाव. म्हणजे, नामस्मरणाचा ध्यास ठेवला की मी खरा कोण हे कळेल आणि स्वतःची ओळख होईल.♦️ 🔹️खरा परमार्थ हा असा अगदी सोपा आहे, पण तो योग्य मार्गाने केला पाहिजे. एखादी गाठ सोडविण्यासाठी कोणती दोरी ओढायची ते कळले पाहिजे, नाहीतर जास्तच गुंतागुंत होते, तसेच परमार्थाचे आहे.🔹️ 💠मी कोण हे जाणले पाहिजे, म्हणजे परमात्मा कोण हे आपोआप कळते. दोघांचे स्वरूप एकच आहे. म्हणजे दोघे एकच आहेत. परमात्मा निर्गुण आहे; तो जाणायला आपल्यालाही नको का निर्गुण, देहातीव्हायला❓म्हणून देहबुद्धी सोडली पाहिजे.💠 💮कोणतीही गोष्ट आपण जाणतो म्हणजे आपल्याला त्या वस्तुरूप व्हावे लागते; त्याखेरीज जाणणेच होत नाही. म्हणून परमात्म्याला जाणण्यासाठी आपल्याला नको का परमात्मरूप व्हायला❓यालाच 'साधू होऊन साधूस ओळखावे', 'शिवो भूत्वा शिवं यजेत्', असे म्हणतात.💮 🌲#बोधवचन:नामस्मरणाची चांगली धुंदी आल्यावाचून 'मी' पण जात नाही.🌲 🌹#प्रवचने:श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज🌹 🚩श्री राम जय राम जय जय राम 🚩
🙏श्री गुरुदेव दत्त💐 - ShareChat
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 सद्गुरुंच्या सान्निध्यात एक शिष्य नित्य सेवा करीत होता. अन्न, वस्त्र, निवारा याची त्याला काही उणीव नव्हती.. तरी अंतःकरणात सतत खंत दाटून येई. कधी मन अस्वस्थ होई, कधी विचारांचे काहूर माजे. एके दिवशी शिष्याने धैर्य करून सद्गुरूंना विचारले, “गुरुदेव, लोक म्हणतात जगायला फारस काही लागत नाही. तरी मन का भरत नाही? समाधान का मिळत नाही?” सद्गुरू मंदस्मित करीत उठले. शिष्याला सोबत घेऊन ते आश्रमाबाहेर पडले. मार्गी एक दरिद्री गृहस्थ दिसला. अंगावर जीर्ण वस्त्र, हातात भिक्षापात्र; पण मुखावर विलक्षण शांतता होती. सद्गुरूंनी त्याला प्रेमाने विचारले, “वत्सा, आज उपजीविका कशी झाली?” तो नम्रतेने म्हणाला, “गुरुदेव, प्रभूने आज पोटापुरतं दिलं. त्यातच माझं समाधान आहे.” थोड्या अंतरावर एक धनाढ्य पुरुष भेटला. संपत्ती विपुल, सेवक अनेक; परंतु मुख चिंतेने ग्रासलेले. सद्गुरूंनी त्यास विचारले, “सुख आहे ना?” तो म्हणाला, “आहे सर्व काही, पण मन शांत नाही. अजून हवंय, नाहीतर चैन पडत नाही.” तेव्हा सद्गुरूंनी शिष्याकडे पाहून गंभीर वाणी केली, “ऐक वत्सा. देव प्रत्येकाला देतोच जगण्यापुरत, पोटापुरत. परंतु जो त्यात समाधान मानतो, तो धन्य होतो; आणि जो ‘आणखी’ म्हणतो, तो दुःखी होतो.” सद्गुरू पुढे म्हणाले, “जगायला फारसं काही लागत नाही. पण आपण तसं वागत नाही. देवाने दिलेल्या मर्यादेत आपण थांबत नाही, म्हणूनच मन भुकेल राहत.” हे वचन शिष्याच्या हृदयात आरपार शिरले. त्याच्या नेत्रांतून अश्रू वाहू लागले. त्याला उमगले देव आपल्याला भरभरून देतो आपली अपेक्षाच असमाधानी करते.. त्या दिवसापासून शिष्याने जे मिळेल ते प्रसाद समजून स्वीकारले. समाधानाने सेवा करू लागला. आणि गुरुकृपेने त्याचे जगणे साधे, शांत व धन्य झाले. ॥ श्री गुरुदेव दत्त ॥ दत्तरुप ll
🙏श्री गुरुदेव दत्त💐 - |rRau गुरुदेव , लोक म्हणतात जगायला फारस काही लागत नाही. तरी मन का भरत नाही? समाधान का मिळत नाही? |rRau गुरुदेव , लोक म्हणतात जगायला फारस काही लागत नाही. तरी मन का भरत नाही? समाधान का मिळत नाही? - ShareChat
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 नृसिंहसरस्वती स्वामी दत्त महाराजांचे नाव नरहरि होते . याचा अर्थ म्हणजे नृसिंह अवतारातील विष्णुरूप असा होतो . आता हे नाव ठेवताना त्यांच्या नृसिंहरूपाची कल्पना मात्र मातापित्यांनी केली नव्हती हे निश्चित . काशी येथील निवासात कृष्णसरस्वती मुनींनी संन्यास दीक्षा देताना पुन्हा नरहरि या नावाचे संन्यस्त रूपातील नामकरण नृसिंहसरस्वती असे केले . नृसिंह रूपातील विष्णुस्वरूप आणि नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांचे रूप यात वास्तविक मोठा फरक आहे ,महाराज हे अत्यंत शांत आणि सौम्य प्रकृतीचे होते . दत्त महाराजांच्या लीलांना जाणून घेणे म्हणूनच अवघड आहे . नृसिंह स्वरूपी महाराजांनी उपासना नृसिंह मंत्राची केली असा उल्लेख एकोणिसाव्या अध्यायात आहे . औदूंबर महिमा सांगताना उग्र शांत करावयासी असे म्हटले आहे म्हणजे नेमके काय तर महाराज हे आपल्या नृसिंह स्वरूपातील /मंत्रातील उग्रतेला, दाहकतेला शांत करण्यासाठी औदूंबर वृक्षातळी राहिले .. या नृसिंहरूपाला गुरु महाराजांनी अनेकदा प्रकट केलेले गुरुचरित्रात आढळते . मंजरीका क्षेत्री माधवारण्य मुनींना गुरुमहाराजांनी त्यांच्या मानस पूजेतील नृसिंह मूर्तीप्रमाणे दर्शन दिले . गुरुचरित्र परमकथामृतात एका प्रसंगात या नृसिंह स्वरूपाचे वर्णन आहे . हा प्रसंग संन्यास दीक्षेप्रसंगी घडला होता . एका क्षणी महाराजांचे रूप हे नृसिंहरूप दिसले आणि या प्रसंगी तिथे बसलेले सर्व जन अवाक झाले . कसे दिसले होते महाराज त्यावेळी ? सतैजस नयनी आरक्त तीव्रपणी ll अर्थात अतिशय तेजस्वी अशा लाल भेदक डोळ्यांनी महाराज नृसिंहरूपात पाहत होते . दंष्ट्रे उघडी दंत -- जिव्हा लोलपणी थरथरणी ll तीक्ष्ण असे दात बाहेर होते ,जीभ बाहेर अर्धवट थरथरत होती . आयाळे प्रखरत्व सूर्यकिरणापरी ll सूर्याची प्रभा जशी दिसते तशी महाराजांच्या नृसिंहरूपातील आयाळ होती . पीतांबरधारी प्रखर पूर्ण ll तेजस्वी असे पितांबर नेसले आहेत . मंदपणि अट्टाहास्ये गुरगुरति ll अतिशय मंद अशा हास्य मुद्रेत महाराजांच्या तोंडून गुरुगुरु असा आवाज येत आहे . या प्रसंगी भ्यालेल्या सामान्य जनांना कृष्ण सरस्वतींनी धीर दिला आणि म्हणाले अहो आज तुम्हा सर्वांचे भाग्य उजळले आहे म्हणून महाराजांच्या या स्वरूपाचे हे दर्शन तुम्हा मंडळींना झाले . नृसिंह स्वरूपात महाराज असले तरी हे मंद रूप म्हटले पाहिजे कारण प्रह्लादाच्या वेळी पाहिलेले उग्रत्व या ठिकाणी दिसून येत नाही . दत्त महाराजांच्या लीलांना केवळ तेच जणू शकतात .आपण केवळ पाहून नमस्कार करायचा आणि म्हणायचे श्री गुरुदेव दत्त !!!---अभय आचार्य
🙏श्री गुरुदेव दत्त💐 - ব্তৃচ্ঞাপূনী সীত स्वामी मंदीर ব্তৃচ্ঞাপূনী সীত स्वामी मंदीर - ShareChat