#🙏श्री गुरुदेव दत्त💐 फेब्रुवारी❗
‼श्री गुरुदेव दत्त‼
🌷🌷प्रवचनाचा विषय🌷🌷
🟥🟩🟥देहबुद्धीच्या विस्मरणाकरिता नाम.🟥🟩🟥
🔸️आपली आपल्याला ओळख करून घ्यायला नामस्मरण हाच उपाय आहे.🔸️
⭕परमेश्वराचा अंश प्राणिमात्राच्या ठिकाणी आहे खरा, पण हे जाणण्याची बुद्धी मात्र मनुष्य प्राण्याच्याच ठिकाणी आहे. पण त्याची अधोगती कशी होत जाते पहा : जीव मुळात परमेश्वरस्वरूपच असल्यामुळे प्रथम तो म्हणतो, 'मी तो, म्हणजे परमेश्वरच आहे.' इथपासून घसरत तो म्हणतो, 'मी त्याचा आहे'; आणि अखेर 'त्याचा माझा काही संबंध नाही' इथपर्यंत तो खाली येतो.⭕
🛟याला कारण, देहबुद्धीचा पगडा वाढत वाढत शेवटी देह म्हणजेच मी, अशी आपली पक्की भावना होते. पण असे असले तरी मनुष्य अजाणता का होईना, पण खरे आहे ते ओळखल्यासारखेच बोलतो. जसे, एखाद्या इसमाचा स्नेही वारला तर लगेच तो इसम काय म्हणतो, 'आमचे स्नेही गेले❗' याचाच अर्थ, समोर असलेल्या देहाला तो स्नेही समजत नसून त्यात असणार्या चैतन्याला, ईश्वरी अंशाला, तो खर्या अर्थाने आपला मित्र समजतो. म्हणजे अजाणता का होईना, पण खरे तेच त्याच्या तोंडून बाहेर पडते. असे असले तरी स्वतःच्या बाबतीत मात्र तो ही जाणीव कायम राखीत नाही, आणि आपण म्हणजे देहच असे मानून तो वागत असतो. याला कारण, ज्याचा खरा 'मी' आहे त्याचा विसर पडून देहबुद्धी बळकट होत गेली.🛟
❄आता याला उपाय हाच, की ज्या मार्गाने मी खाली घसरत आलो त्याच मार्गाने उलट वर जाणे.❄
🏵तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे, आता मी जो देहरूप बनलो आहे, तो मी त्याचा, परमेश्वराचा आहे अशी जाणीव जागृत करणे. याच जाणिवेची परमावस्था म्हणजे 'मी तोच आहे' ही भावना होणे. हे कसे साधावे❓तर ज्याच्या विस्मरणाने माझी ही अधोगती झाली त्याचे स्मरण करणे.🏵
♦️स्मरणाला उत्तम साधन म्हणजे भगवंताचे नाव. म्हणजे, नामस्मरणाचा ध्यास ठेवला की मी खरा कोण हे कळेल आणि स्वतःची ओळख होईल.♦️
🔹️खरा परमार्थ हा असा अगदी सोपा आहे, पण तो योग्य मार्गाने केला पाहिजे. एखादी गाठ सोडविण्यासाठी कोणती दोरी ओढायची ते कळले पाहिजे, नाहीतर जास्तच गुंतागुंत होते, तसेच परमार्थाचे आहे.🔹️
💠मी कोण हे जाणले पाहिजे, म्हणजे परमात्मा कोण हे आपोआप कळते. दोघांचे स्वरूप एकच आहे. म्हणजे दोघे एकच आहेत. परमात्मा निर्गुण आहे; तो जाणायला आपल्यालाही नको का निर्गुण, देहातीव्हायला❓म्हणून देहबुद्धी सोडली पाहिजे.💠
💮कोणतीही गोष्ट आपण जाणतो म्हणजे आपल्याला त्या वस्तुरूप व्हावे लागते; त्याखेरीज जाणणेच होत नाही. म्हणून परमात्म्याला जाणण्यासाठी आपल्याला नको का परमात्मरूप व्हायला❓यालाच 'साधू होऊन साधूस ओळखावे', 'शिवो भूत्वा शिवं यजेत्', असे म्हणतात.💮
🌲#बोधवचन:नामस्मरणाची चांगली धुंदी आल्यावाचून 'मी' पण जात नाही.🌲
🌹#प्रवचने:श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज🌹
🚩श्री राम जय राम जय जय राम 🚩
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 सद्गुरुंच्या सान्निध्यात एक शिष्य नित्य सेवा करीत होता. अन्न, वस्त्र, निवारा याची त्याला काही उणीव नव्हती.. तरी अंतःकरणात सतत खंत दाटून येई. कधी मन अस्वस्थ होई, कधी विचारांचे काहूर माजे.
एके दिवशी शिष्याने धैर्य करून सद्गुरूंना विचारले,
“गुरुदेव, लोक म्हणतात जगायला फारस काही लागत नाही. तरी मन का भरत नाही? समाधान का मिळत नाही?”
सद्गुरू मंदस्मित करीत उठले. शिष्याला सोबत घेऊन ते आश्रमाबाहेर पडले. मार्गी एक दरिद्री गृहस्थ दिसला. अंगावर जीर्ण वस्त्र, हातात भिक्षापात्र; पण मुखावर विलक्षण शांतता होती. सद्गुरूंनी त्याला प्रेमाने विचारले,
“वत्सा, आज उपजीविका कशी झाली?”
तो नम्रतेने म्हणाला,
“गुरुदेव, प्रभूने आज पोटापुरतं दिलं. त्यातच माझं समाधान आहे.”
थोड्या अंतरावर एक धनाढ्य पुरुष भेटला. संपत्ती विपुल, सेवक अनेक; परंतु मुख चिंतेने ग्रासलेले. सद्गुरूंनी त्यास विचारले,
“सुख आहे ना?”
तो म्हणाला,
“आहे सर्व काही, पण मन शांत नाही. अजून हवंय, नाहीतर चैन पडत नाही.”
तेव्हा सद्गुरूंनी शिष्याकडे पाहून गंभीर वाणी केली,
“ऐक वत्सा. देव प्रत्येकाला देतोच जगण्यापुरत, पोटापुरत. परंतु जो त्यात समाधान मानतो, तो धन्य होतो; आणि जो ‘आणखी’ म्हणतो, तो दुःखी होतो.”
सद्गुरू पुढे म्हणाले,
“जगायला फारसं काही लागत नाही. पण आपण तसं वागत नाही. देवाने दिलेल्या मर्यादेत आपण थांबत नाही, म्हणूनच मन भुकेल राहत.”
हे वचन शिष्याच्या हृदयात आरपार शिरले. त्याच्या नेत्रांतून अश्रू वाहू लागले. त्याला उमगले
देव आपल्याला भरभरून देतो
आपली अपेक्षाच असमाधानी करते..
त्या दिवसापासून शिष्याने जे मिळेल ते प्रसाद समजून स्वीकारले. समाधानाने सेवा करू लागला. आणि गुरुकृपेने त्याचे जगणे साधे, शांत व धन्य झाले.
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
दत्तरुप ll
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 नृसिंहसरस्वती स्वामी दत्त महाराजांचे नाव नरहरि होते . याचा अर्थ म्हणजे नृसिंह अवतारातील विष्णुरूप असा होतो . आता हे नाव ठेवताना त्यांच्या नृसिंहरूपाची कल्पना मात्र मातापित्यांनी केली नव्हती हे निश्चित . काशी येथील निवासात कृष्णसरस्वती मुनींनी संन्यास दीक्षा देताना पुन्हा नरहरि या नावाचे संन्यस्त रूपातील नामकरण नृसिंहसरस्वती असे केले . नृसिंह रूपातील विष्णुस्वरूप आणि नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांचे रूप यात वास्तविक मोठा फरक आहे ,महाराज हे अत्यंत शांत आणि सौम्य प्रकृतीचे होते . दत्त महाराजांच्या लीलांना जाणून घेणे म्हणूनच अवघड आहे . नृसिंह स्वरूपी महाराजांनी उपासना नृसिंह मंत्राची केली असा उल्लेख एकोणिसाव्या अध्यायात आहे . औदूंबर महिमा सांगताना उग्र शांत करावयासी असे म्हटले आहे म्हणजे नेमके काय तर महाराज हे आपल्या नृसिंह स्वरूपातील /मंत्रातील उग्रतेला, दाहकतेला शांत करण्यासाठी औदूंबर वृक्षातळी राहिले ..
या नृसिंहरूपाला गुरु महाराजांनी अनेकदा प्रकट केलेले गुरुचरित्रात आढळते . मंजरीका क्षेत्री माधवारण्य मुनींना गुरुमहाराजांनी त्यांच्या मानस पूजेतील नृसिंह मूर्तीप्रमाणे दर्शन दिले . गुरुचरित्र परमकथामृतात एका प्रसंगात या नृसिंह स्वरूपाचे वर्णन आहे . हा प्रसंग संन्यास दीक्षेप्रसंगी घडला होता . एका क्षणी महाराजांचे रूप हे नृसिंहरूप दिसले आणि या प्रसंगी तिथे बसलेले सर्व जन अवाक झाले . कसे दिसले होते महाराज त्यावेळी ? सतैजस नयनी आरक्त तीव्रपणी ll अर्थात अतिशय तेजस्वी अशा लाल भेदक डोळ्यांनी महाराज नृसिंहरूपात पाहत होते . दंष्ट्रे उघडी दंत -- जिव्हा लोलपणी थरथरणी ll तीक्ष्ण असे दात बाहेर होते ,जीभ बाहेर अर्धवट थरथरत होती . आयाळे प्रखरत्व सूर्यकिरणापरी ll सूर्याची प्रभा जशी दिसते तशी महाराजांच्या नृसिंहरूपातील आयाळ होती . पीतांबरधारी प्रखर पूर्ण ll तेजस्वी असे पितांबर नेसले आहेत . मंदपणि अट्टाहास्ये गुरगुरति ll अतिशय मंद अशा हास्य मुद्रेत महाराजांच्या तोंडून गुरुगुरु असा आवाज येत आहे . या प्रसंगी भ्यालेल्या सामान्य जनांना कृष्ण सरस्वतींनी धीर दिला आणि म्हणाले अहो आज तुम्हा सर्वांचे भाग्य उजळले आहे म्हणून महाराजांच्या या स्वरूपाचे हे दर्शन तुम्हा मंडळींना झाले .
नृसिंह स्वरूपात महाराज असले तरी हे मंद रूप म्हटले पाहिजे कारण प्रह्लादाच्या वेळी पाहिलेले उग्रत्व या ठिकाणी दिसून येत नाही . दत्त महाराजांच्या लीलांना केवळ तेच जणू शकतात .आपण केवळ पाहून नमस्कार करायचा आणि म्हणायचे श्री गुरुदेव दत्त !!!---अभय आचार्य
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 गुरुदेव दत्तात्रयांचे सोळा अवतार
१) योगिराज :-
ब्रम्हदेवाचे मानसपुत्र 'अत्रि' हे पुत्र प्राप्तीसाठी पत्निसह हिमालयात कठोर तपश्चर्या करीत होते. त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन साक्षात भगवान कार्तिक शुध्द १५ स प्रकट झाले. त्यांचे रुप स्फटिकासारखे ज्योतिर्मय होते. दत्तात्रेयांचा हा अवतार 'योगिराज' म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांनी योगमार्गाचा पुरस्कार करुन लोकांना सुखी केले. म्हणून वरील नाव पडले. हा अवतार एकमुखी चतुर्भुज व प्रत्यक्ष विष्णूप्रमाणेच होता.
२) अत्रिवरद :-
अत्रिऋषीनी ऋक्ष पर्वतावरील पर्वतावरील परमतीर्थावर १०० वर्षे तप केले. तेव्हा त्यांना वर देण्याकरता 'अत्रिवरद' या नावाने हा योगिराज अवतरला. ब्रम्हा, विष्णू व महेश हे तिन्ही देव या तपाच्या वेळी अत्रिपुढे प्रकट झाले. आपण एकाचेच ध्यान करतो आहोत. मग हे तिघेजण कसे प्रकट झाले याचे आश्चर्य अत्रीना वाटले. तेव्हा ते म्हणाले,"तू ज्या एकाचे ध्यान करीत आहेस, तोच आम्हां तिघात आहे.' या अत्रिवरदाचे रुप तप्त सुवर्णकांन्तीप्रमाणे तेजस्वी, हसतमुख व षङभुज होते. (जन्म :-कार्तिक कृष्ण प्रतिपदा)
३) दत्तात्रेय :-
अत्रिवरदाने अत्रिऋषीना वर मागण्यास सांगितले. तेव्हा तुमच्यासारखाच पुत्र असावा असा वर अत्रिंनी मागितला. त्यावर 'तथास्तु' म्हणून बालरुपातील आपले स्वरूप त्यांनी प्रकट केले. ते दिगंबर रुप मदनासारखे सुंदर व नीलमण्यासारखे तेजस्वी होते. मुख चंद्राप्रमाणे व हात चार होते. हाच दत्तात्रेयांचा 'दत्तात्रेय' नामक तिसरा अवतार. (जन्म :-कार्तिक कृष्ण २)
४) कालाग्रिशमन :-
यानंतर आपणांस औरस पुत्र असावा म्हणून अत्रि ऋषी पुन्हा तप करु लागले. या उग्र तपाने त्यांच्या शरिरात कालाग्नी प्रकट झाला व त्याचा दाह होऊ लागला. तेव्हा याचे शमन करण्यासाठी भगवान शीतल रुप घेऊन प्रकट झाले. म्हणूनच यास 'कालाग्निशमन' हे नाव पडले. (जन्म :- मार्गशीर्ष शुद्ध १५)
५) योगीजनवल्लभ :-
या कालाग्निशमनाच्या दर्शनास देव, ऋषि, गंधर्व, यक्ष व किन्नर जमा झाले. तेव्हा दत्तात्रेयानी आपल्या बालरुपाचा त्याग करुन योगीजनांना प्रिय असे रुप धारण केले. हे अवतार 'योगिजनवल्लभ' या नावाने प्रसिद्ध आहे. (जन्म :-मार्गशीर्ष शुद्ध १५)
६) लिलाविश्वंभर :-
दत्तात्रेयांचा सहावा अवतार 'लिलाविश्वंभर' ज्यावेळी लोक अवर्षणामुळे अन्नान्न दशेस लागले होते तेव्हा दत्तात्रेयांनी लोकांचे कल्याण करण्यासाठी हा अवतार घेतला. (जन्म :-पौष शुद्ध १५)
७) सिद्धराज :-
भ्रमंतीत एकदा दत्तात्रेय बद्रिकावनात गेले. तेथे त्यांना अनेक सिद्ध दिसले. दत्तात्रेयांनी कुमार रुप धारण केले आणि अनेक चमत्कार करुन सिध्दांचे गर्वहरण केले, व त्या सर्वांना योगदीक्षा दिली. हा दत्तात्रेयांचा 'सिध्दराज' नावाचा सातवा अवतार. (जन्म :-माघ शुद्ध १५)
८) ज्ञानसागर :-
सिध्दीला कामनेची जोड नसावी हे पटवण्यासाठी दत्तात्रेयांनी रुपातीत, गुणातीत, ज्ञानयोगमुक्त असे सहजस्थितीतील 'ज्ञानसागर' नावाचे रुप धारण केले. (जन्म :-फाल्गुन शुद्ध १०)
९) विश्वंभरावधूत:-
पुढे आणखी एकदा सिध्दांना बोध देण्यासाठी दत्तात्रेयांनी 'विश्वंभरावधूत' या नावाचा नववा अवतार घेतला व योगीजनांना बीजाक्षर मंत्रांचा (द्रां) उपदेश केला. (जन्म :-चैत्र शुद्ध १५)
१०) मायामुक्तावधूत:-
भक्तांच्या अंतःकरणातील प्रेम व श्रध्दा दृढ करण्यासाठी दत्तात्रेयांनी 'मायामुक्तावधूत' या नावाचा दहावा अवतार घेतला. (जन्म :-वैशाख शुद्ध १४)
११) मायायुक्तावधूत :-
दत्तात्रेयांच्या अकराव्या अवताराचे नाव 'मायायुक्तावधूत' असे असून याचे रुप सावळे व सुंदर होते. मांडीवर एक सुंदर स्त्री घेऊन मद्य व मांस यांचे भक्षण सुरु होते. ही योगमाया होती. (जन्म :-जेष्ट शुद्ध १३)
१२) आदिगुरु :-
दत्तात्रेयांचा बारावा अवतार आदिगुरु या नावाने प्रसिद्ध आहे. मदालसेचा पुत्र 'अलर्क' यास योगाचा व तत्वज्ञानाचा उपदेश करण्यासाठी दत्तात्रेयांनी हा अवतार धारण केला. (जन्म :-आषाढ शुद्ध १५)
१३) शिवरुप :-
एकदा काळ्या आवळीच्या वृक्षाखाली दत्तात्रेय प्रगट झाले. हा दत्तात्रेयांचा 'शिवरुप' नावाचा तेरावा अवतार. (जन्म :-श्रावण शुद्ध ८)
१४) देवदेवेश्वर :-
दत्तात्रेयांचा 'देवदेवेश्वर' नावाचा चौदावा अवतार आहे. (जन्म :-भाद्रपद शुद्ध १४)
१५) दिगंबर :-
दत्तात्रेयांचा हा पंधरावा अवतार 'दिगंबर' या नावाने प्रसिद्ध असून यदुराजास श्री दत्त दिगंबर भेटले व त्यांनी आपल्या २४ गुरुंपासून काय काय ज्ञान घेतले याचा त्याला बोध केला. (जन्म :-आश्विन शुद्ध १५)
१६) कमललोचन :-
'कमललोचन' नावाने सोळाव्या अवतारात दत्तात्रेय प्रकट झाले....(जन्म :-कार्तिक शुद्ध १५)
ॐ योगिराजाय नमः ।
ॐ अत्रिवरदाय नमः ।
ॐ दत्तात्रेयाय नमः ।
ॐ कालाग्निशमनाय नमः ।
ॐ योगिजन वल्लभाय नमः ।
ॐ लीलाविश्वंभराय नमः ।
ॐ सिध्दराजाय नमः।
ॐ ज्ञानसागराय नमः ।
ॐ विश्वंभरावधूताय नमः ।
ॐ मायामुक्तावधूताय नमः ।
ॐ मायायुक्तावधूताय नमः ।
ॐ आदिगुरु: नमः ।
ॐ शिवरुपाय नमः ।
ॐ देवदेवेश्वराय नमः ।
ॐ दिगंबरावधूताय नमः ।
ॐ कमललोचनाय नमः ।
वास्तविक दत्तात्रयांचे कार्यपरत्वे प्रत्येक वेळी होणारा अविष्कार हा अवतारच मानला जातो.
या दृष्टीने स्वयंभू मन्वतरापासून तो आत्तापर्यत भक्त्तजनांच्या कल्याणाकरता दत्तात्रेयांचे जे विविध अवतार झाले त्यात १६ अवतारांना प्राधान्य देण्यात येते.
दत्तात्रयांचे हे अवतार निरनिराळ्या महिन्यात व निरनिराळ्या मुहुर्तावर झालेले असून त्यांची स्वरुपेही भिन्न भिन्न अशी वर्णिलेली आहेत.
◆ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ◆
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 कोणत्याही गोष्टीचा विटाळ नाही. सोवळ्या-ओवळ्याचा विचार न करता जाता-येता, उठता-बसता, कार्य करिता, वदनी वदता, घरी-दारी, घास गिळता, रतिसुखाचे अवसरी असे सर्वकाळ, केव्हाही नामस्मरण करावे, मग ते आपोआप होऊ लागले. फक्त मन पवित्र पाहिजे. प्रसन्न पाहिजे. म्हणजे परमेश्वराच्या कृपेचा प्रवेश अंत:करणात व्हायला वेळ लागणार नाही. नाम किती घ्यावे, कुठवर घ्यावे याला मर्यादा नाही. प्रपंचातून जेवढा वेळ नामासाठी काढता येईल तेवढा काढून नामजप करावा.
जेवढा जास्तीत जास्त नामजप करता येईल तेवढे अधिक चांगले. ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलकर महाराज म्हणतात, ‘‘आंधळ्याने पाणी भरावे तसे नाम घ्यावे. भांडे भरले किती आणि रिकामे किती हे त्याला समजत नाही, तो भरतच राहतो, तसे नाम सतत घेत राहावे. तरच ते देहाच्या कणाकणात आणि मनाच्या अंतरंगात मुरते. पुढे देहांचे आणि मनाचे कणन्कण आपोआप नामजप करतात
!! दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा !!
!! अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त !!
!! श्री गुरू स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 महाराजांकडे काय मागावे यावर अनेक मतमतांतरे आहेत . दत्त अर्थात देणारा तेव्हा तो देत असताना घ्यावे अथवा नाही . काहींचे मत आहे ,मागण्याची इच्छा न व्हावी हे मागावे ,कोणी म्हणते ,पुन्हा जन्म नको अर्थात येरझार चुकवावी हे मागावे ,अन्य काही म्हणतात ,तुमच्या क्षेत्री कायम निवास व्हावा हे दान द्यावे .
सामान्य बुद्धीने आपण अनेक मते देत असलो तरी असामान्य अशा भगवद्भक्तांकडून यावर काय भाष्य झाले आहे पाहू . बापूशास्त्री कोडणीकरांनी दीक्षित स्वामी महाराजांचे गीर्वाण भाषेत श्लोकबद्ध चरित्र लिहिले आहे. यात ते म्हणतात ,
अयमेव परो लाभो नृणां देहभृतां खलु ll
शक्यते तत्कथं नाथ ! दुरापं प्रतिभाति मे ll
देहधारी मानवांचा हाच परम लाभ आहे . तो म्हणजे दत्त दर्शन . देवा ! आपले दर्शन स्वर्गीय देवांनाही दुर्मिळ आहे . ते देखील तुमच्या दर्शनाची इच्छा करतात .
आता प्रश्न असा आहे कि केवळ भक्तांनाच दर्शन झाले असता आनंद होतो का ? तर नाही ,भक्तांच्या भेटीचा आनंद दत्त महाराजांना देखील होतो . बापूशास्त्री पुढे म्हणतात ,भक्तप्रेमाच्या उल्हासाने दत्त महाराज साकार आणि सगुण झाले . आपल्या भक्तांना भेटल्यावर दत्त महाराजांनी आलिंगन दिले पण दोन हातानी आलिंगन देऊन जो आनंद झाला तो अपुरा पडला आणि म्हणूनच महाराज चतुर्भुज झाले . केव्हढे हे भक्तप्रेम !! इथे दत्त महाराजांच्या चतुर्बाहू ध्यानाचे वर्णन आहे .
दत्त माहात्म्यात विष्णुदत्ताच्या गाथेत थोरले महाराज म्हणतात ,विष्णुदत्ताला ब्रह्मराक्षस प्रसन्न झाला ,काय हवे ते माग म्हणाला . काय मागावे ?? संतती मागावी तर मी निर्धन आहे ,धन मागावे तर राहायला घर नाही इथून सुरुवात ,हे सर्व नश्वर म्हणावे तर परलोक देखील नश्वरच कि ! यावेळी विष्णुदत्ताच्या पत्नीने त्याला अप्रतिम मार्गदर्शन केले आहे .
मागू नका नश्वरा l श्रीदत्ताची भेटी करा l
ऐशा वरा मागावे ll
-पुढे ती म्हणते
पडता दत्ताची गाठ l सर्व देव देतील भेट l
संपदा न सोडतील पाठ l मग आटाआट कासया ll
पुढे दत्त महाराजांनी विष्णुदत्ताला दर्शन दिले आहे . केवळ दर्शन नाही तर विष्णुदत्ता घरी महाराज माध्यान्ह कालीन भोजनाला आले होते . ( श्राद्धाकरिता )
दत्त महाराजांची भेट हा फार वेगळा अनुभव आहे ,लक्ष वरुषासी l करितोसी उदासी l लक्षावधी वर्षे तप करून देखील ज्यांची भेट अथवा दर्शन दुर्लभ आहे त्या दत्त महाराजांनी दर्शन दिले कि झाले . आयुष्याची इतिकर्तव्यता यातच आहे . बाकी काय करायचे आहे . श्रीगुरुदेव दत्त !!!--- अभय आचार्य
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ll
दत्तरुप ll
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 रूपात दत्त महाराजांनी अनेक आयुधे धारण केलेली आहेत ,आता प्रश्न असा कि संकल्पमात्रे सर्व काही करू शकणाऱ्या दत्त महाराजांना आयुधांची काय गरज आहे ?
अगदी संन्यस्त स्वरूपातील दत्त महाराजांच्या अवतारात देखील पहा . हातातील दंड हे केवळ संन्यस्त स्थितीचे प्रतीक न धरता चुकणाऱ्या भक्तांना आणि सर्व अभक्तांना तो एक अंकुश आहे . थोरल्या महाराजांनी याचे करुणात्रिपदीत उदाहरण दिले आहे . अपराधास्तव गुरुनाथा l जरी दंडा धरिसी यथार्था ll हा दंड म्हणजे न्यायव्यवस्थेचे प्रतीक देखील म्हणता येईल .
दत्त महाराजांच्या एका आरतीत --- शरणागता जना पाठीशी घालुनी l कळिकाळासी मारी सोटा रे l (अरे प्राण्या सावळा सद्गुरू तारू मोठा रे ll ) दत्त महाराजांच्या हातात सोटा अर्थात दंड आहे . त्यांच्या समोर कली आणि काळ हे दोघेही निष्प्रभ होतात हा मतितार्थ .
पण मग षड्भुज ध्यानात आयुधे का या प्रश्नावर दोन उत्तरे आहेत . पहिले म्हणजे त्रिमूर्ती स्वरूपातील प्रत्येक देवतेच्या हातातील दोन प्रतीके अथवा स्वभाव दर्शनाच्या गोष्टी या षडभुज रूपात आलेल्या आहेत . ब्रह्म स्वरूपाची दोन ,शिव स्वरूपाची दोन आणि विष्णू स्वरूपाची दोन अशी ती प्रतीके आहेत . तर दुसरे म्हणजे हि आयुधे लोक शिक्षणाकरिता धारण केलेली आहेत पण सर्वसामान्यतः आयुधांचा उपयोग कधी केला आहे का ? वेळ येताच दत्त महाराज त्याचा अवश्य उपयोग करतात .
या आयुधांचा विचार करता दत्त महाराजांनी स्वसंरक्षण हेतू कोणत्याही अवतारात काहीही वापरलेले नाही हि गोष्ट अवश्य लक्षात येते . मायाध्यक्ष असणाऱ्या दत्त महाराजांना प्रतिस्पर्धी किंवा आव्हान देणारा कोण असणार आहे ? कोणीही नाही ,तेव्हा कवच ,ढाल अशा कोणत्याही उपायाची गरज नाही . अनेक उदाहरणे घेता येतील ,गुरुचरित्राच्या दहाव्या अध्यायात दोन्ही हातात दोन आयुधे घेत श्रीपाद श्रीवल्लभ दत्त महाराज प्रकट झाले . एका हातात खडग तर दुसऱ्या हातात त्रिशूल . अत्यंत आवेशपूर्ण आणि क्रुद्ध मुद्रा . कुठून आले ,कोण आहेत याची कल्पना करेपर्यंत महाराजांनी दोघा चोरांना ठार केले होते . तेव्हा तिसऱ्याने पाया पडत जीवदान मागितले . भक्तवत्सल आणि भक्ताभिमानी हि बिरुदे इथे सार्थ केलेली दिसून येतात .
दत्त महाराजांनी अनेकदा हि आयुधे संरक्षक कवच म्हणून देखील वापरलेली दिसून येतात . दत्त माहात्म्यात याचे उदाहरण म्हणजे नहुषाच्या रक्षणार्थ दत्त महाराजांनी सुदर्शन चक्राची योजना केली होती . नहूष यावेळी काही दिवसांचा होता . याचे हनन करण्यासाठी बल्लवाने या लहानग्या जीवावर दोन वेळा प्रहार केला . पण सुदर्शन चक्राने मध्ये येत संरक्षकाची भूमिका बजावली आणि ते प्रहार वृथा गेले .
दत्त कवचापासून ते माला कमंडलू या ध्यान श्लोकापर्यंत दत्त महाराजांच्या सहा हातात सहा गोष्टी कोणत्या आहेत ते वर्णन केले आहे ,यात माला कमंडलू खालील हातात ,मधल्या दोन हातात डमरू आणि त्रिशूल तर वरील दोन हातात शंख आणि चक्र या गोष्टी आहेत . मात्र हे ध्यान रूप सर्वत्र दिसत नाही . काषाय वस्त्रं श्लोकात दंड कमंडलू हि संन्यस्त चिन्हे तर वरील चार हातात शंख चक्र गदा आणि पद्म हि भगवान विष्णूंची आयुध आणि चिन्हे आहेत .
आचार ,व्यवहार आणि प्रायश्चित्त यातील प्रायश्चित्त या भागात कर्मविपाक हा भाग येतो . या कर्मविपाकातील फलस्वरूप शासन दत्त महाराज या आयुधांकरवी करतात असेही म्हणता येईल .अनेक संदर्भ आणि त्यावरील उहापोह पाहता विस्तारभयास्तव इथेच थांबतो . श्रीगुरुदेव दत्त !!!--- अभय आचार्य
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 प्रभु पंचदेव पहाड येथे सत्संग करीत असत. श्रीपाद कृष्णा नदीच्या पाण्यावरून चालत जात. त्यांची पाऊले ज्या ठिकाणी पडत तेथे कमल विकसित होत असे. रात्री प्रभु एकटेच कुरवपुर येथे राहत. श्रीपाद स्वतःपेक्षा मोठ्या महिलांना "अम्मा", "सुमती"अथवा "अम्मा तल्ली" म्हणत. स्वतःपेक्षा लहान महिलांना "अम्मा वासवी", "अम्मा राधा" म्हणत. त्यांच्या पेक्षा वयाने मोठ्या पुरूषास ते "अय्या" किंवा "नायना" म्हणत. लहान मुलांना ते " अरे अब्बी" किंवा "बंगारु" म्हणत.
वृध्द स्रियांना " अम्ममा" आणि वृध्द पुरूषांना " ताता" म्हणत. दर्शनाला आलेल्या भक्तांचे ते क्षेमकुशल विचारित आणि त्यांच्या अडचणी प्रेमाने सोडवत. गुरूवारी गुरु तत्वाबद्दल विवेचन असे या दिवशी विशेष स्वयपाक करून पोटभर जेवण असे. स्वतः श्रीपाद आपल्या हाताने पंगतीत वाढत. काही भाग्यवंताना ते स्वतः घास भरवित असे. श्रीपाद प्रभुंचा सत्संग ज्यांना लाभला ते खरोखर भाग्यवान !
श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो.🙏💐 🌸🙏😊
संदर्भ श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र
अध्याय ४८
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 म्हणजे एका माणसाने दुसऱ्या माणसाच्या उपयोगी येणं , पण आता हे ही प्राण्यांकडून शिकावे का ???
🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿
🌷 !! माणूस आणि माणुसकी !!
माणसाने मनाने जगावे, चांगल्या मनाने.
ते प्रत्येकाचे वेगळे असते मन. पण, त्यामध्ये असावा माणुसकीच्या प्रेमाचा प्रेमळ व्रण,
छानशा काळजात प्रेम ठेवावे, सदैव घरटे करून माणसाच्या हृदयात स्थान मिळवावे.
माणुसकी म्हणजे प्रेम, माणुसकी म्हणजे जाणीव, माणुसकी म्हणजे माणसाने माणसाची केलेली कदर, समोरच्या व्यक्तीचा केलेला आदर, माणूसकी म्हणजे निस्वार्थपणे माणसातील माणुस ओळखून पुढे केलेला मदतीचा हात.
दैनंदिन जीवन जगत असतांना या सर्वसामान्य माणसाच्या जीवनात असे काही शब्द आहेत की जे बोलताना त्याची घनता, त्याचा खोल गेलेला अर्थ पटकन लक्षात येत नाही पण ते शब्द असे काही कटू अनूभव शिकवून जातात की काहींचा अर्थ जेवढा लावु तेवढा लागतो, जेवढा ताणू तेवढा ताणतो, जेवढा मनावर घेऊ तेवढा घेता येतो आणि एकदा का त्या शब्दाने किंवा त्या शब्दाच्या अर्थाने आपल्या मनाचा ताबा घेतला ना की मग आपण त्या शब्दाप्रमाणे किंवा त्या शब्दाच्या अर्थाप्रमाणे समोरच्या व्यक्तीसोबत वावरतो. प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्यक्तीमध्ये असते. कधी ती लगेच पहायला मिळते तर कधी कधी ती शोधावी लागते. कधी समोरच्या व्यक्तीच्या वागण्यातून तर कधी बोलण्यातून त्याची ओळख होत असते.
प्रत्येक शब्द कितीही छोटा वा मोठा असो त्या शब्दाच्या गर्भितार्थावरून त्या शब्दाची जाडी-रूंदी आणि त्याची विस्तृतता कळते. त्यापैकी असाच एक जो आपल्या सर्वांना परिचित असलेला पण त्याची फारशी खोल ओळख नसणारा शब्द म्हणजे ‘माणुसकी’. ओळख नसणारा शब्द यासाठी की आजचा माणूस माणसाची ओळख विसरत चालला आहे,‘माणुसकी’ हा केवळ शब्दच नव्हे तर पर्यायाने आपल्या रोजच्या जगण्यातून खुद्द माणूसकीच गहाळ होत चालली आहे असे चित्र आहे. ऎकायला आणि बोलायला अगदीच सहज आणि सोपा वाटणारा हा शब्द, पण त्याचा नेमका अर्थ काय..
माणुसकी म्हणजे प्रेम, माणुसकी म्हणजे जाणीव, माणुसकी म्हणजे माणसाने माणसाची केलेली कदर, समोरच्या व्यक्तीचा केलेला आदर, माणूसकी म्हणजे निस्वार्थपणे माणसातील माणुस ओळखून पुढे केलेला मदतीचा हात. खरच पाहायला मिळते का या सध्याच्या धावपळीच्या जगात ही माणुसकी. पण या माणुसकीला जर ओळखायचे असेल तर असे अनेक प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात आले असतील आणि जरी अद्याप आले नसतील तरी कधी ना कधी ते नक्कीच येतील. जीवनात आलेल्या त्या प्रसंगाना अगदी एकांतात बसून बारकाईने त्यावर नजर टाका म्हणजे माणुसकीतला माणूस किंवा माणसातली माणुसकी शिल्लक राहिली आहे का हे कळेल. या जगात कोणीही तुमचा मित्र किंवा शत्रु म्हणून जन्माला येत नाही. आपली वागणूक, आपला दृष्टीकोण, आपली नाती आणि त्यापेक्षा त्या नात्यांमधील प्रेम यावर ठरते कोण आपला मित्र कोण आपला शत्रू आहे ते. मनुष्याचे मोठेपण हे त्याच्या वयावर नाही तर त्याच्या विचार आणि कर्तुत्वावर अवलंबुन असते. तुमच्या विचारातूनच तुमचं व्यक्तिमत्व झळकत असतं, त्याकडे तुमचे लक्ष नसले तरी इतरांचे लक्ष असते,
तुमचे विचार समजले की तुम्ही समजलात, म्हणून सुंदर विचार करा आणि सुंदर व्यक्तिमत्व घडवा.
#🙏श्री गुरुदेव दत्त💐
निष्काम कर्माचे फार फार महत्त्व आहे. 'भगवंतासाठी भगवंत हवा' अशी आपली वृत्ती असावी. किंबहुना, नाम घेत असताना, प्रत्यक्ष भगवंत समोर ठाकला, आणि 'तुला काय पाहिजे ?' असे त्याने विचारले, तर 'तुझे नामच मला दे' हे त्याच्याजवळ मागणे, याचे नाव निष्कामता होय. कारण, रूपाने व्यक्त झालेला भगवंत केव्हातरी नाहीसा होईल, पण त्याचे नाम मात्र अखंड टिकेल; आणि त्याचे नाम घेतले की त्याला आपल्याकडे येणे जरूर आहे. म्हणून, देहाला कष्ट देण्याच्या भानगडीत न पडता भगवंतासाठीच नाम घेत असावे. त्याची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही.













