
Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
@63559539
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
हम दुनिया को जितना कम बतायेंगे, हमारी दुनिया उतनी ही खूबसूरत होगी ! #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🙂Positive Thought #💪बुद्धांची तत्वे📜 #🙏 प्रेरणादायक बॅनर #🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ
#💪बुद्धांची तत्वे📜 #🙂Positive Thought #🙏 प्रेरणादायक बॅनर #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ #💪बुद्धांची तत्वे📜 #🙂Positive Thought #🙏 प्रेरणादायक बॅनर #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ
*तक्षशिला विद्यापीठ*
*तक्षशिला हे गांधार देशाची राजधानी ख्रिस्तपूर्व सातव्या शतकातील विद्येचे महान केंद्र होते. उत्तरापथचे ते एक प्रसिद्ध व समृद्ध नगर होते. चंद्रगुप्तानंतर त्याचा पुत्र त्यावेळी सिंहासनारुढ होता. बिंदूसाराने शत्रुचे दमन करुन मौर्य साम्राज्याचे संरक्षण केले होते. त्यामुळे त्याला अमित्रघात (शत्रुविघातक) असे नाव दिल्याचे आढळते. बिंदूसाराच्या अनेक पुत्रापैकी वडीलपुत्र सुषीम आणि अशोक विशेष प्रसिद्ध होते. सुषीम तक्षशिलेचा व त्यामुळे राजपुत्र अशोकाला तेथे पाठविण्यात येवून बंडाचे दमन करण्यात आले होते,*
*सम्राट अशोकाने त्यावेळी राजकुमार कुणालला तक्षशिलेचा उपराजा म्हणून नियुक्त केले हाते. भगवान बुद्ध आणि बिंबीसार यांच्या काळात तक्षशिलेचा राजा पुष्करसारिण हा होता. त्यावेळी गांधार देशाची पूर्वसिमा सिंधूनदी होती. गांधारपासून तक्षशिलेचा प्रदेश पृथक होता असे मत इजिप्तचे टॉलमी यांनी व्यक्त केले आहे.*
*पुराणामध्ये अशी कथा प्रसिद्ध आहे की, नागदेवता वासुकीने विद्येचा प्रसार करण्यासाठी तक्षशिला हे ठिकाण निवडले होते. त्यावेळी नागलोक पराक्रमी, विद्याप्रेमी आणि साहसी होते. त्यामुळे पूर्वेला आसाम, दक्षिण आणि पश्चिमेला अनेक भागात नाग वंशीय पसरलेले असून अनेक ठिकाणी त्यांचे शासन स्थापन झालेले दिसून येत होते. नागलोक प्राचीन भारतातील एक महत्वपूर्ण जमात होती. आर्याच्या महाभारत आणि पुराणातून अनेक नागनेत्यांची नावे आढळतात. त्यामध्ये इंद्राचा मित्र वासुकी, विष्णूचा दास शेष, कर्कोटचा नाग शंख, श्वेत महापदम्, कंबल, अश्वतर, एलापत्र, धनंजय, महाबळ, कुलीक, नागेंद्र, अपराजीत, अनंत इत्यादी नावे प्रमुख आहेत. आर्याशी मित्रत्वाने वागणाऱ्या नागकुलांना तेव्हा आर्यसंस्कृतीत समाविष्ट करण्यात आले होते. परंतु आर्याना न मानणाऱ्या नागांचे त्यांच्याशी फार मोठे वैर होवून मोठे-मोठे संघर्ष झाले. तक्षक कुळांचे पांडवाशी तीन पिढ्यापर्यंत वैर चालत राहिले. अर्जुनाने तक्षकांचे खांडववन जाळले आणि अनेक नागांची कत्तल केली. त्याचा बदला म्हणून तक्षकाने अर्जुनपुत्र परिक्षीताला ठार मारले. परिक्षीताचा मुलगा जनमेजयाने बापाच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी सर्पसत्र चालवून अनेक नागकुलांची कत्तल केली. अशाप्रकारे नागांची वस्ती जवळ जवळ सर्व भारतभर पसरली होती. स्थापना*
*भगवान बुद्धांच्या काळात आणि त्यापूर्वीही तक्षशिला नगराची प्रसिद्धी एक विशाल शिक्षण केंद्राच्या रुपाने संपूर्ण जम्बुदीपात पसरलेली होती. तक्षशिला विद्यापीठ पश्चिम पंजाबपासून जवळ जवळ १८ मैल अंतरावर वसलेले होते.*
*तक्षशिला हे विद्येचे प्राचीन केंद्र होते. कनिंघम यांचे मते तक्षशिला नगरीचे ठिकाण शाहजीकी ढेरी जवळच होते. रावळपिंडीपासून अगदी जवळ या विद्यापीठाचे अवशेष प्राप्त झाले आहेत. पूर्वी भद्रशिला हे या ठिकाणचे नाव होते.*
*भारताच्या वायव्य कडील गांधार देशाची तक्षशिला ही राजधानी होती. हे विशाल सुशासित व धनधान्याने समृद्ध असे नगर होते असे स्ट्रेंबो या इतिहासकाराने म्हटले आहे. इ.स. पूर्व ८०० ते इ.स. ४०० या काळात तक्षशिला शिक्षणाचे केंद्र म्हणून प्रसिद्ध होते.*
*तक्षशिला विद्यापीठाची स्थापना 'भरत' याने केली व प्रशासन 'तक्ष' या व्यक्तिकडे सोपविले होते. असा उल्लेख जातककथेत आहे. वैदिक उत्तर काळात तक्षशिला हे शहर विकास पावले."*
*पाचव्या आणि सातव्या शतकात क्रमशः फाहियान आणि हयु-एन-त्संग यांनी तक्षशिलेची यात्रा केली होती. फाहियान यांनी आपल्या प्रवास वर्णनात लिहून ठेवले आहे की, बोधिसत्वाने एकेकाळी एका प्राण्यांसाठी आपले शिर कापून येथे बलिदान दिले होते. म्हणून या ठिकाणचे नाव तक्षशिला असे पडलें. तक्षशिलाचे चीनी नाव शि-शि- चेंग, याचा अर्थ शिरच्छेद असा होतो.*
*दिव्यावदान (चंद्रप्रभबोधिसत्व चर्यावदानम् २२ वे अवदान) नुसार बोधिसत्वाने आपल्या एका पूर्व जन्मात चंद्रप्रभाच्या रुपात एका ब्राह्मण याचकासाठी आपले शिर येथे अर्पित केले होते. यावरुन या ठिकाणाला तक्षशिला म्हणू लागले.*
*तक्षशिलेचे अधिकतर ग्रीक रुपांतर 'टेक्सिला' या नावावरुन ओळखले जाते. गांधार देशाची तक्षशिला ही राजधानी शिक्षण आणि व्यापार या दोन्ही दृष्टीने दूरवर प्रसिद्ध होती. नंदी विशाल जातक आणि सारभ जातक यामध्ये गांधार राजा येथे राज्य करीत असतानाचा उल्लेख आहे.*
*सांस्कृत काव्य रघुवंश (१५-८९) नुसार भरत याचा पुत्र तक्षक याने या नगरीची स्थापना केली होती असाही उल्लेख आहे तर या विद्यापीठाला तक्षशिला हे नाव तक्षशिला नगराच्या नावावरुनच पडले असे म्हटले जाते. काही विद्वानांच्या मते तक्षशिला ही नागवंशीयाची राजधानी होती. नागंवशाचा प्रभावशाली राजा तक्षक या नावावरुन हे नगर वसविले होते.*
*ह्यु-एन-त्संग या चीनी प्रवाशाने तक्षशिला नगराचे विस्तृत वर्णन केलेले आहे. अशोकाच्या काळात कुणालचे डोळे तिष्यरक्षिताकडून याच नगरात काढले होते...*
*पुढील भागात*
*मुक्तीदाता विशेषांक* #💪बुद्धांची तत्वे📜 #🙂Positive Thought #🙏 प्रेरणादायक बॅनर #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ
*#Apala_prabhat_nagar_Nanded*
*#आपल_प्रभात_नगर_नांदेड*
*आम्ही राजकारण करणारे नाही तर समाज कार्य करणारे आहोत ना कोणता नेता ना कोणता कार्यकर्ता*
*ना कोणाच्या नावासाठी ना स्वतःच्या स्वार्थासाठी*
*फक्त आणि फक्त समाज कार्य करणारे आहोत आम्ही भीमाचे सच्चे भीमसैनिक आहोत सर्वांना क्रांतीकारी जय भीम*
*त्याग मूर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने दिनानिमित्त प्रभात नगर या ठिकाणी डॉ* *बाबासाहेब आंबेडकर,* *तथागत गौतम बुद्ध, नामक डिजिटल फलक बसवण्यात आले व त्याचे अनावरण सर्व भीमसैनिक च्या वतीने करण्यात आले प्रभात नगर*
*कुशी नगर लुंबिनी नगर येथील सर्व भीमसैनिक मोठ्या संख्येले उपस्थित होते*
*सर्व नवयुवक भीम जयंती मंडळ,प्रभात नगर,कुशी नगर,लुंबिनी नगर नांदेड परिवार नांदेड व*
*#DSGruopNanded* #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙂Positive Thought #💪बुद्धांची तत्वे📜
*धम्म प्रभात*
*[द्वेषाचा त्याग]*
*"मी देवाला हे बोलताना ऐकले,*
*भिक्षूंनो! द्वेषाला चांगल्या प्रकारे जाणून घेतल्याशिवाय, मनाला त्यापासून दूर न ठेवता, त्याचा त्याग न करता, [कोणीही] दुःख दूर करू शकत नाही. भिक्षूंनो! केवळ द्वेषाला चांगल्या प्रकारे जाणून घेतल्यावर, मनाला त्यापासून दूर न ठेवता, त्याचा त्याग न करता, [कोणीही] दुःख दूर करू शकतो.*
*भगवंतांनी हे सांगितले. तिथे असे म्हटले आहे: "दुष्ट मनाच्या प्राण्यांना दुर्दैवी बनवणारा द्वेष योगींना सुप्रसिद्ध आहे आणि ते तो द्वेष सोडून देतात. तो सोडून दिल्यानंतर, ते कधीही या जगात परत येत नाहीत."*
*देवानेही हेच सांगितले. मी ते ऐकले.*
*नमो बुद्धाय*
*संदर्भ: डोसा परिज्ञा सुत्त"*
*इतिवृत्तक: सुत्तपिटक* #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙂Positive Thought #💪बुद्धांची तत्वे📜 #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ
किसी की गरीबी देख कर उनसे रिश्ता मत तोड़ना, जितनी इज़्ज़त गरीबों के घर में मिलती है उतनी अमीरों के घर में नहीं मिलती..! #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #💪बुद्धांची तत्वे📜 #🙂Positive Thought #🙏 प्रेरणादायक बॅनर
विद्रोही पंढरपूर
रमाचा देवावर विश्वास होता. धर्मावर विश्वास होता. भीमराव आंबेडकर आगीत उड्या घेत होते. रमाईचा नवरा वाघाच्या तोंडात हात घालत होता. नवऱ्याच्या जिवाला काही धोका होऊ नये म्हणून रमा उपासतापास करीत होती. पूजा करीत होती.
कधी देवाला नवसही बोले. भीमरावांना रमाचा हा देवखुळेपणा पटत नसे. पण तिच्या भावना ते समजून घेत.
कधी तिला ते जवळ बसवीत आणि देवधर्माचा फोलपणा समजावून सांगत. पूजेचा फोलपणा पटवून देत. नवसाची निरर्थकता तिच्या गळी उतरवत.
रमाईला नवऱ्याचं म्हणणं पटत होतं, पण मनातील संस्कार मानत नसत. नवऱ्याच्य चोरून ती पूजा करायची. देव लपवून ठेवायची. बाबासाहेबांच्या नजरेला काही पडणार नाही याची ती काळजी घेई. संस्कार असे वरचढ ठरत.
रमानं पंढरपूरबद्दल बरंच ऐकलं होतं. पांडुरंग हा भक्तांचे लळे पुरवणारा देव आहे. अशी तिची श्रद्धा होती. तिला चोखोबाबद्दल माहीत होतं. चोखोबाच्या बायकोचं बाळंतपण विठोबानं केलं. जनाईचं दळणकांडण त्यानं केलं. तिच्यासोबत गोवऱ्या थापल्या. या सर्व कथा तिच्याही कानावर होत्या. त्यामुळे कधीतरी पंढरपुरास जावं असं तिनं मनातल्या मनात ठरविलं. आषाढी-कार्तिकीला पंढरपुरला जावं. पांडुरंगाचं दर्शन घ्यावं. आपल्या नवऱ्याला सुरक्षित ठेव, सुखी ठेव, असं मागणं त्याला मागावंः यासाठी तिला पांडुरंगाचे वेध लागले होते.
आपला हा बेत साहेबांना पसंत पडणं शक्य नाही हे ती जाणून होती. तरी खडा टाकून पाहायला काय हरकत होती? प्रयत्न करायला काय जात होतं?
'पंढरपूरला जावं म्हणते.'
एके दिवशी घाबरत घाबरत तिनं आपलं मन बाबासाहेबांजवळ मोकळं केलं. रमाईचा हा प्रस्ताव भीमरावांनी ऐकला आणि ते कडाडले,
'खालच्या जातीच्या लोकांना पांडुरंग दर्शन देत नाही. सातशे वर्षांपूर्वी ते चोखामेळ्यालाही घेता आलं नाही. जो देव भक्तांना दर्शन देत नाही त्या देवाकडे कशाला जायचं आपण? जो देव पंड्यांचं ऐकतो आणि प्रांजळ भक्तांना जवळ येऊ देत नाही तो देव काय कामाचा? काय करायचं त्या पंढरपूरचं?'
'मग तुम्ही नाशिकला काळाराम मंदिराचा सत्याग्रह का केला?' रमानं आपली शंका पुढं केली.
'देवाचं दर्शन घेण्यासाठी नव्हता तो सत्याग्रह रामू! तो लढा समतेचा हक्क बजावण्यासाठी होता. देव वगैरे सर्व गोष्टी फालतू आहेत. स्वर्ग वगैरे गोष्टी मूर्खपणाच्या आहेत हे मला माहीत आहे. पण रामू! आपण जर हिंदू आहोत तर हिंदूंना मिळणारे हक्क आपणाला का मिळत नाहीत? आमचा लढा त्या हक्कांसाठी आहे.'
रमाला वाटलं, साहेब आता कडाडले आणि संतापले की ते कोणाची गय करीत नाहीत हेही तिला माहीत होतं. त्यामुळे ती विनवणीच्या सुरात म्हणाली-
'चोखोबानं घेतलं तसं दर्शन मीही घेईन दुरून !'
'नाही' भीमरावांचे शब्द ताठ झाले होते.
'जिथं प्रवेश नाही तिथं जाण्यात अर्थच काय? ते पंढरपूर आपल्या उपयोगाचं नाही. बडवे, पंडे-पुजारी अस्पृश्यांना देवाचं दर्शन घेऊ देत नाहीत. पांडुरंगही त्यांना बदलू शकत नाही. त्यांच्यात तो थोडीही माणुसकी निर्माण करू शकत नाही. काय करायचा असा पांडुरंग ! आणि काय करायचं ते पंढरपूर? रामू माझं ऐक, तू आता पंढरपूरातून डोकं काढून टाक आणि डोक्यातून पंढरपूर काढून टाक.' साहेब कठोर झाले होते.
रमाई हवालदिल झाली होती. रडवेली झाली होती. तिची भावना साहेबांना समजत नव्हती असं नाही, पण भावना विवेकरहीत असली तर फार घातकी ठरते हेही त्यांना माहीत होतं. निदान ही देवखुळी भावना घातकीच आहे याबद्दल त्यांच्या मनात शंकाच नव्हती. तरी साहेबांनी आपला राग आवरला आणि तिच्या मनाची समजावणी ते करू लागले.
'रामू! आपल्या त्यागानं, गोरगरिबांच्या सेवेनं आपण दुसरं नवं पंढरपूर उभं करू। तिथं लोक भक्तीसाठी नाही तर क्रांतीसाठी येतील.'
रमा ऐकत होती. पतीच्या शब्दाबाहेर जाणं तिला अशक्य होतं. साहेबांएवढा विद्वान माणूस तिनंही पाहिलाच नव्हता. आपला हा महान पती आपल्या अहिताचं सांगेल अशी कल्पनाही तिला करता येणं शक्य नव्हतं. ती ऐकत होती. साहेब बोलत होते.
'बुद्धिवादाचं पंढरपूर आपण निर्माण करू! तिथे विज्ञाननिष्ठेचा गजर होईल. ती विवेकाची पेठ होईल. तिथून समतेचा विचार गावोगावी जाईल. तिथून स्वातंत्र्याचे विचार गावोगावी जात राहतील. बंधुत्वाचा सुगंध तिथून देशाला मिळेल. इथे घडतील न्यायाची उपासक मनं, असं पंढरपूर आपण घडवू.
साहेब बोलत होते. रमाई चकीत होऊन ऐकत होती.
'त्या पंढरपुरात देव असणार नाही. ते माणसांचं पंढरपूर असेल. माणसाला माणूस भेटवणारं ते पंढरपूर असेल. आपलं पंढरपूर माणसांचा महिमा वाढवील. ते माणसाला मोठं करील. ते कोणालाच नकार देणार नाही. आपलं पंढरपूर माणसांचा गौरव गाईल.'*
*रमाईला साहेबांचं बोलणं पटलं. तिच्या डोक्यात उजेड पडला.*
*'पंढरपूरला जायचं नाही.'*
*हा निर्धार तिनं केला.*
*'साहेब म्हणतात ते पंढरपूर वसविण्यासाठी आपणही आपल्यापरीनं हातभार लावला पाहिजे असा निश्चय तिनं केला.*
*'साहेब, आता पंढरपूरला जायचा हट्ट सोडला.*
*डोक्यातून पंढरपूर पार काढून टाकलं.'*
*असं ती म्हणाली. तिच्या या निर्धारानं बाबासाहेबांना खूप आनंद झाला...*
*संदर्भ रमाई*
*लेखक डॉ यशवंत मनोहर*
*(मुक्तीदाता विशेषांक)* #🏎लक्झरी कार रिव्यू👑 #🙂Positive Thought #💪बुद्धांची तत्वे📜 #🙏 प्रेरणादायक बॅनर #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ
#Apala_prabhat_nagar_Nanded
#आपल_प्रभात_नगर_नांदेड*
आम्ही राजकारण करणारे नाही तर समाज कार्य करणारे आहोत ना कोणता नेता ना कोणता कार्यकर्ता
ना कोणाच्या नावासाठी ना स्वतःच्या स्वार्थासाठी
फक्त आणि फक्त समाज कार्य करणारे आहोत आम्ही भीमाचे सच्चे भीमसैनिक आहोत सर्वांना क्रांतीकारी जय भीम
*त्याग मूर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने दिनानिमित्त प्रभात नगर या ठिकाणी डॉ* *बाबासाहेब आंबेडकर,* *तथागत गौतम बुद्ध, नामक डिजिटल फलक बसवण्यात आले व त्याचे अनावरण सर्व भीमसैनिक च्या वतीने करण्यात आले प्रभात नगर*
*कुशी नगर लुंबिनी नगर येथील सर्व भीमसैनिक मोठ्या संख्येले उपस्थित होते*
*सर्व नवयुवक भीम जयंती मंडळ,प्रभात नगर,कुशी नगर,लुंबिनी नगर नांदेड परिवार नांदेड व
#ds_gruop_nanded #🙏बुद्ध वॉलपेपर #📲4K वॉलपेपर #📢एडिटिंग ट्यूटोरियल📷 #🏎लक्झरी कार रिव्यू👑
*द्वेष कधीही द्वेषाने संपत नाही.*
*केवळ प्रेमानेच द्वेष संपतो.*
*हा एक शाश्वत नियम आहे."*
*रागाला रागाने प्रतिसाद दिल्याने दुःख आणखी वाढते. बुद्ध शिकवतात की करुणा आणि प्रेमळ दया हीच द्वेष विरघळवण्यासाठी पुरेशी मजबूत शक्ती आहे. जेव्हा आपण प्रतिक्रियेपेक्षा प्रेमाला प्राधान्य देतो, तेव्हा आपण दुःखाचे चक्र तोडतो - केवळ इतरांसाठीच नाही तर स्वतःमधील.*
*#धम्मपद #बुद्धबुद्धी #प्रेमळदया #करुणा #द्वेषाचा अंत* #💪बुद्धांची तत्वे📜 #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🙏 प्रेरणादायक बॅनर #💙 भीमसैनिक 💙 #🙂Positive Thought
त्याग का अभ्यास करो, मोह का असर खत्म हो जाएगा...! #🙂Positive Thought #💙 भीमसैनिक 💙 #🙏 प्रेरणादायक बॅनर #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #💪बुद्धांची तत्वे📜







