#🙏 प्रेरणादायक बॅनर #🙏भक्तीमय सकाळ🎬 #🙏जय हरी विठू माउली🙏 #🙏विठ्ठल नामाची शाळा भरली बाजारात नेहमी तीच लोकं एकटी पडतात. जी मनानं स्वच्छ असतात लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी,आपली एक चूक कारणीभूत ठरते ते दिशाहीन होण्यासाठी...*
*शुभ सकाळ...*
🌿🌾🌿🌾🌿🌾🌿🌾
#🤗 जुन्या आठवणी #👩🏻सिम्पल घरगुती हेअर स्टाईल #✨मराठ मोळी नथनी #🔖महिलांसाठी हेल्थ टिप्स #👌हृदयस्पर्शी फोटो साडीतला थाट,*
*कपाळी छोटीशी टिकली...*
*तुझ्या रूपाची मोहिनी,*
*निसर्गावरच प्रतिबिंबली...*
*.!!!*💐
#🙏 प्रेरणादायक बॅनर #✍मराठी साहित्य #🤗 जुन्या आठवणी #😇माझे बाबा माझे खरे मित्र💖 कोण❓️*
नोकरी संपली,
दिनक्रमही गेला,
घरातली गजबजही थांबली,
आणि शांततेच्या प्रतिध्वनीत
मी स्वतःला शोधायला लागलो.
*मी कोण❓️*
बंगलो बांधले,
फार्महाऊस उभारले,
मोठी-लहान गुंतवणूक केली,
आणि आता?
चार भिंतीत अडकून पडलोय.
सायकलवरून मोपेड,
मोपेडवरून मोटार,
मोटारीतून गाडी,
गती आणि स्टाईलच्या मागे धावलो,
पण आता?
हळूहळू पाय रेंगत रेंगत
आपल्या खोलीतच फिरतोय.
निसर्गाने विचारलं—
*“कोण आहेस रे मित्रा?”*
मी म्हणालो,
*“मी... फक्त मीच.”*
राज्य, देश, खंड फिरलो,
पण आज
माझे प्रवास
हॉलपासून स्वयंपाकघरापर्यंतच.
संस्कृती, परंपरा जाणून घेतल्या,
पण आता माझ्या कुटंबाने
मला समजून घ्यावं
अशी इच्छा आहे.
निसर्ग हसून म्हणाला—
*“कोण आहेस रे मित्रा?”*
मी उत्तर दिलं,
*“मी... फक्त मीच.”*
पूर्वी वाढदिवस,
लग्नसमारंभ मोठ्या थाटामाटात केले,
पण आज
फक्त छान झोप लागली,
भूक लागली,
हेच साजरं करतो.
सोने, चांदी, हिरे, मोती
सगळं बँकेत गप्प बसलंय.
सूट-बूट कपाटात लटकलेले.
आता फक्त मऊ सूताचे कपडे,
साधेपणातला आराम.
इंग्रजी, फ्रेंच, हिंदी शिकलो,
पण आता
माझ्या मायबोलीतच
सुख मिळतं.
व्यवसायासाठी
जगभर धावलो,
नफा-तोट्यांची गणितं केली,
पण आज
फक्त आठवणींमध्ये हिशोब करतो.
व्यवसाय सांभाळला,
कुटुंब जोडलं,
खूप नाती केली,
पण आता?
शेजारचा साधा-सोपा माणूसच
माझा जिवलग सोबती आहे.
नियम पाळले,
शिक्षण घेतलं,
पण आता कळतंय—
खरं महत्त्वाचं काय आहे.
जीवनाचे चढउतार अनुभवून,
शांत क्षणी
माझ्या आत्म्यानेच मला सांगितलं:
“पुरे झालं आता…
तयार हो प्रवासी,
अंतिम प्रवासासाठी…”
निसर्ग पुन्हा हसून विचारतो—
“कोण आहेस रे मित्रा?”
मी हळूच म्हणतो:
“अरे निसर्गा,
तूच मी…आणि मीच तू.
एकेकाळी आकाशात झेपावलो,
आता जमिनीलाही
प्रेमाने स्पर्शतो.
मला माफ कर…
एकदा पुन्हा जगू दे मला—
पैशाच्या यंत्रासारखा नव्हे,
तर खराखुरा माणूस म्हणून—
मूल्यांसह,कुटुंबासह,आणि प्रेमासह.”
🍀
*“वरिष्ठ नागरिकांना समर्पित*
*प्रेम, बळ आणि शांतीच्या शुभेच्छा.”*
🫠cp
#🙏भक्तीमय सकाळ🎬 #🌹राधा कृष्ण #🙏ध्यानी मनी विठ्ठल #🙏जय हरी विठू माउली🙏 #🙏विठ्ठल नामाची शाळा भरली मास.
भारतीय पंचांगानुसार येणारा अकरावा महिना म्हणजे माघ मास होय. ग्रेगेरीयन कॅलेंडर प्रमाणे सरासरी जानेवारी फेब्रुवारी या महिन्यात माघ मास होतो. ज्या महिन्यात पोर्णिमेचा चंद्र मघा नक्षत्रात असेल त्या महिन्यास माघ असे म्हणतात.
पोर्णिमांत पौंष पौर्णिमेपासून माघ स्नानाची सुरुवात होते तर पोर्णिमांत माघ मासात पौर्णिमेला माघ स्नानाची समाप्ती होते.
माघ महिन्यात हेमंत ऋतू संपून शिशीर ऋतूची सुरवात होते. उत्पत्ती स्थिती आणि लय या निसर्ग नियमाप्रमाणे शिशीर ऋतूत वृक्षवल्लीची पानगळ सुरू होते, तर वसंत ऋतूत पुन्हा नवीन पाने येऊन निसर्ग बहरतो.
माघ महिन्यात सूर्य पूजेचे फार महत्त्व आहे. सूर्य हा विश्वाच्या अक्षय ऊर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत आहे. सृष्टी वरील सर्व ऊर्जा या सूर्यापासूनच तयार होतात. इतकेच नाही तर सृष्टीचा जन्म देखील सूर्यापासूनच झालेला आहे. म्हणूनच मग महिन्यात सूर्यनारायणाच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे. माघ शुद्ध सप्तमीला रथसप्तमी असे म्हणतात. रथसप्तमी ला सूर्याला नैवेद्य दाखवला जातो. माघ शुद्ध पंचमीला वसंत पंचमी असे म्हणतात. शिशिर ऋतू मध्ये येणाऱ्या या पंचमीला वसंत पंचमी देखील म्हणतात. श्री पंचमी किंवा ज्ञान पंचमी म्हणून देखील वसंत पंचमीला ओळखले जाते. वसंत ऋतूची सुरुवात होणार असल्यामुळे माघ शुद्ध पंचमी वसंत पंचमी म्हणून साजरी केली जाते. याच दिवशी पृथ्वीवर सरस्वती देवी अवतरली असे मान्यता आहे. सरस्वती ही ज्ञानाची देवता असल्यामुळे या पंचमीला ज्ञानपंचमी असे देखील म्हणतात. माघ शुद्ध चतुर्थीला गणेश जन्म केला जातो. माघमहिन्यामध्ये गणेश जन्म (गणेश चतुर्थी)वसंत किंवा श्री पंचमी, मग शुद्ध षष्ठीला श्री गणेशाचा लग्न सोहळा साजरा केला जातो. बीड पासून जवळ असलेल्या नामलगाव या क्षणी गणेश विवाह सोहळा फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. रथसप्तमी, वैद्य नवमी म्हणजे रामदास नवमी, वैद्य चतुर्दशी म्हणजे महाशिवरात्र, निवृत्तीनाथ जयंती, माध्वाचार्य, चांगदेव यांची पुण्यतिथी,तसेच सर्वसाधारणपणे भारतीय प्रजासत्ताक दिन हा माघ महिन्यातच साजरा केला जातो. पंधरवडी शुद्ध आणि वैद्य या दोन्ही एकादशी पुण्यप्रद मानल्या जातात. त्याच्यातही आषाढी कार्तिकी चैत्र आणि माघ वारी या एकादशी अधिक पुण्यकारक म्हटल्या जातात. महाराष्ट्रामध्ये पंढरपूर येथे या दिवशी मोठी यात्रा जमते. याच मुळे माघ महिन्यास पुण्यप्रद महिना किंवा पूजेचा महिना असे म्हणतात. मग महिन्यात पोर्णिमेस शनी मेष,गुरू चंद्र सिंह राशीत तर सूर्य श्रवण नक्षत्रात असेल तर चौकोनी महायुतीत महामाघी योग असे म्हणतात.
माघ अमावस्येला दान देऊन मौनव्रताचे पालन केले जाते. पितरांसाठी तर्पण पिंडदान आणि श्राद्ध केली जाते.
गौतम ऋषिंनी इंद्राला दिलेल्या शापातून मुक्ती मिळण्यासाठी माघ महिन्यास गंगा स्नान करायचा उ:शाप दिला होता. त्यामुळेच मग पौर्णिमा आणि अमावास्या या दिवशी जागत स्नान करणे पुण्यप्रद मानले जाते. थंडीचा महिना असल्यामुळे शरीरातील उष्णता कायम टिकून ठेवण्यासाठी या महिन्यात देखील तिळाचा भोजनात मोठ्या प्रमाणावर वापर करतात. बाराही महिन्यात विष्णुसहस्त्रनाम आणि गीतेचा पाठ करावा पण त्यातली त्यात माघ महिन्यात विष्णुसहस्रनाम गीतेचा पाठ करणे पुण्यप्रद मानले जाते.
अशा या पूण्यप्रद माघ महिन्याची सुरुवात श्री विष्णुसहस्रनामाने करुयात.
ॐ विष्वंविष्णर्वषटकारो भूतभव्य स्वतः प्रभु:
भूतकृत भूतभृतभावो भूतांच्या भूतभावन:
ॐनमो भगवते वासुदेवाय
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏जय हरी विठू माउली🙏 #🌹राधा कृष्ण #🙏ध्यानी मनी विठ्ठल #🙏भक्तीमय सकाळ🎬 पिंपळ झाडाचे धार्मिक महत्त्व….
पिंपळ हे अत्यंत पवित्र झाड मानले जाते. यामध्ये विष्णू, ब्रह्मा आणि महेश यांचा वास आहे अशी श्रद्धा आहे. शनिवारी पिंपळाची पूजा, प्रदक्षिणा केल्याने पापक्षय व मानसिक शांती मिळते असे मानले जाते.
आयुर्वेदिक महत्त्व….
पिंपळाची पाने, साल, फळे औषधी गुणांनी परिपूर्ण आहेत. दमा, खोकला, पचनविकार, जखमा यावर आयुर्वेदात पिंपळाचा उपयोग सांगितला आहे.
पर्यावरणीय महत्त्व…
पिंपळ झाड दिवसा व रात्री दोन्ही वेळा जास्त प्रमाणात प्राणवायू (ऑक्सिजन) देणारे मानले जाते. त्यामुळे हवा शुद्ध ठेवण्यात मोठी भूमिका बजावते.
वास्तु व आध्यात्मिक महत्त्व…
घर किंवा मंदिराजवळ पिंपळ असल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते. ध्यान, जप, साधनेसाठी पिंपळाखाली बसणे अत्यंत शुभ समजले जाते.
⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️
➡️ © निकेश विसपुते
शुभ वास्तु सोल्युशन, जळगाव- महाराष्ट्र
⤴️⤴️⤴️⤴️⤴️⤴️⤴️⤴️⤴️⤴️⤴️⤴️⤴️⤴️⤴️⤴️⤴️
#🙏भक्तीमय सकाळ🎬 #🙏ध्यानी मनी विठ्ठल #🙏जय हरी विठू माउली🙏 #🌹राधा कृष्ण #🙏श्री गुरुदेव दत्त💐 करावं तर कृष्णवर करावं
कर्तव्य शिकवणाऱ्या, पण प्रेम विसरू न देणाऱ्या जीवनदृष्टीवर.
प्रेम करावं राधाच्या कृष्णप्रेमावर
नात्यापेक्षा भावना मोठी ठरवणाऱ्या समर्पणावर.
प्रेम करावं कृष्णाच्या बासरीवर
शब्दांशिवाय मन जिंकणाऱ्या शांत संवादावर.
प्रेम करावं सुदामा कृष्ण मैत्रीवर
गरिबीतही श्रीमंती जपणाऱ्या मैत्रीवर.
प्रेम करावं अर्जुनला दिलेल्या गीतेवर
गोंधळातही मार्ग दाखवणाऱ्या सत्यावर.
प्रेम करावं गोवर्धन उचलणाऱ्या कृष्णावर
अहंकार झुकवून भक्ती वाचवणाऱ्या धैर्यावर.
#✍मराठी साहित्य #🙏भक्तीमय सकाळ🎬 #🙏 प्रेरणादायक बॅनर #🤗 जुन्या आठवणी आयुष्य आपल्याला हसवेल तेव्हा समजून जा. चांगल्या कर्माचं फळ मिळालंय. आणि आयुष्य जेव्हा रडवेल तेव्हा ध्यानात ठेवा की, चांगलं कर्म करण्याची वेळ आलीय..!*💯
🌺,,,_____💎💎______,,,🌺
,,_______________________________,,
*🔸शुक्रवार ०९ जानेवारी🔹*
,,,_______________________________,,,
*💎🌺 Good Morning🌺💎*
*💫✨*
#🙏भक्तीमय सकाळ🎬 #🙏 प्रेरणादायक बॅनर #✍मराठी साहित्य शांत कृतज्ञता!
भारतीय संस्कृतीत जेवण म्हणजे केवळ पोट भरण्याचे साधन नसून ते एक संस्कार मानला जातो.
म्हणूनच जेवणापूर्वी “दासबोध” मध्ये श्री समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेला खालील श्लोक म्हटला जातो.
“वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे।
सहज हवन होते नाम घेता फुकाचे ॥
जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्णब्रम्ह ।
उदरभरण नोहे जीणिजे यज्ञकर्म ॥”
या काही ओळींमध्ये केवळ देवाचे स्मरण नसते. तर अन्नासाठी त्यामागील श्रमासाठी आणि मिळालेल्या समाधानासाठी कृतज्ञता दडलेली असते. मग असे अन्न खाताना अहंकार भाव नसावा. कारण ते आपल्या कष्टाचे असले तरी ते ईश्वर कृपेने मिळालेले असते. त्यात ईश्वराचा वास व देवपूजेसारखे पुण्यकर्म असते. असे श्रद्धेने,योग्य भावनेने केलेले जेवण म्हणजेच यज्ञ होय.
अशी प्रार्थना करण्याची आपली परंपरा आहे.मात्र आजच्या धावपळीच्या जीवनात आणि मोबाईल मध्ये गुंतलेल्या आयुष्यात ही प्रार्थना हळूहळू विस्मरणात जात आहे.
परदेशात रहात असताना, एके दिवशी अगदी सहजपणे माझ्या नजरेत एक साधसं दृश्य आलं. आणि माझ्या मनात ते खोलवर रुतून बसलं. माझी कामवाली (मेड) जेवणाच्या प्लेट समोर बसली होती. तिचे डोळे मिटले होते. आणि ओठाने हलकेच पुटपुटत होती. सभोवतालच्या गडबडीतही तिच्याभोवती शांततेचे एक वलय होते.
जेवणानंतर मी तिला विचारलं. तेव्हा ती सहजपणे म्हणाली Madam,”We are praying for and believing in one God in heaven “ (“मी प्रार्थना करत होती.” )
मला थोडं आश्चर्यच वाटलं. पुढे ती म्हणाली की, त्यांच्या संस्कृतीत जेवणापूर्वी देवाचे आभार मानण्याची पद्धत आहे. अर्थात,तिने ती प्रार्थना तिच्या स्थानिक भाषेत केली होती. पण नंतर तिने मला तिचा अर्थ इंग्रजीत सांगितला. खरेतर तिच्या प्रार्थनेचे शब्द साधे पण अर्थ विलक्षण खोल विचार करायला लावणारा होता. ती म्हणाली, “आम्ही अगोदर देवाचे आभार मानतो. कारण त्याच्या कृपेने मला आज हे अन्न मिळाले. आणि त्याच्याच बरोबर तुमचेही आभार मानतो कारण तुम्ही ते मला दिले. त्यामुळेच मी आज तृप्तपणे खाऊ शकते आहे.आणि त्यासाठी तुम्हाला सदैव सुख शांती लाभो अशीही मी देवाकडे प्रार्थना करते. थोडक्यात काय, “अन्न दाता सुखी भव।”
म्हणजेच प्रार्थना शब्दात नसते.
ती भावनेत असते. ती देवळात नाही तर ताटा समोरही करायची असते.
आणि त्याच क्षणी मला प्रकर्षाने जाणवलं प्रार्थना ही भाषा, देश किंवा संस्कृतीत अडकलेली नसते. आपल्यापेक्षा वेगळ्या देशात, वेगळ्या संस्कृतीतील एक साधी स्त्री अन्नाप्रती इतकी कृतज्ञता व्यक्त करते. की जी कृतज्ञता आपण विसरत चाललो आहोत. तीच कृतज्ञता एका परक्या देशात अजूनही श्वास घेताना पाहत होते.
कदाचित पुन्हा एकदा आपल्याला हे असेच जेवणापूर्वी थोडं थांबायला हवं ताटाकडे पाहून क्षणभर डोळे मिटून शब्दाशिवाय “धन्यवाद” म्हणायला हवेत. कारण “अन्न पोट भरतं.”
पण “कृतज्ञता माणूसपण जिवंत ठेवत.”
©️®️✍️शुभश्री
😊
#📝कविता / शायरी/ चारोळी #✍मराठी साहित्य #🤗 जुन्या आठवणी #🙏 प्रेरणादायक बॅनर म्हणजे सत्याचा शोध घेणारे, समाजाला दिशा देणारे आणि लेखणीतून आवाज बनून प्रश्न मांडणारे शब्द होय, जसे की "सत्याचा सजग प्रहरी", "शब्दांचा शूर योद्धा" आणि "लोकशाहीचा चौथा स्तंभ"...💯*
. *खऱ्या लोकशाहीसाठी*
*अशाच*
*✒️पत्रकारांची📰*
*गरज आहे*
🟡🟠🔴🟣🔴🟠🟡
**
❣️
#📝हृदयस्पर्शी मराठी कविता✍🏻 #🤗 जुन्या आठवणी #🙏 प्रेरणादायक बॅनर #✍मराठी साहित्य #📝कविता / शायरी/ चारोळी ही संजीवनी वनस्पती आहे जी कधीही नातेसंबंधांना हारू देत नाही.🙏🙏..._*













