कट्टर भिम सैनिक

• 65K views
#मालेगाव_येथे_डॉ_बाबासाहेब_आंबेडकर_यांच्या #पुतळ्याला_अभिवादन_करताना_मुस्लिम_बांधव.. ही आहे भारताची एकता ही ताकत आहे भारतीय संविधान मध्ये सर्व धर्मीय सर्व धर्म समभाव हे स्वातंत्र्य दिलेले आहे संविधानाने #malegaon #ramzan #babasahebambedkar #bhimshahi #babasaheb #drbabasahebambedkar #jaybhim #🙏 प्रेरणादायक बॅनर #bhimsenik #💙 भीमसैनिक 💙 #🙂Positive Thought
208 likes
1 comment 55 shares
*डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शैक्षणिक प्रवास* *डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावापुढे ओनक पदव्या लावलेल्या असतात. एम. ए., पीएच, डी., डी. एससी., एलएल. डी., डी. लिट. बार अॅट लॉ या पदव्या त्यांच्या नावापुढे असतात. अस्पृश्यता आणि जातीभेद तीव्र असलेल्या काळात डॉ. बाबासाहेबांनी या पदव्या मिळविण्यास अपार कष्ट वेचले व अनेक हालअपेष्टा सहन केल्या. डॉ. बाबासाहेब हे मुळात अर्थशास्त्राचे विद्यार्थी होते. त्यांच्या महत्त्वाच्या पदव्या त्यांना अर्थशास्त्रातील शोध प्रबंधांकरिता बहाल करण्यात आल्या.* *शालेय शिक्षणाचा आरंभ प्राथमिक शिक्षण कॅम्प स्कूल सातारा, १८९६ ते १९०० उपलब्ध माहितीनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वयाच्या ५ व्या वर्षी अक्षर ओळख झाली. त्यांचे वडील बंधू आनंदराव दापोलीच्या मराठी शाळेत शिकत होते. त्यांच्यासोबत बालक भीमराव शाळेत जात असत. वडील आणि भावाच्या मदतीने त्यांना अक्षरओळख झाली. परंतू त्यांचे नाव या शाळेत दाखल करण्यात आले नव्हते. त्यांचे वडील जेव्हा दापोलीहून सातारा येथे आले. तेव्हा १८९६ च्या नोव्हेंबर महिण्यात "कॅम्प स्कूल सातारा' या शाळेत त्यांचे नाव दाखल करण्यात आले. १८९६ ते १९०० पर्यंत त्यांनी 'कॅम्प स्कूल सातारा' या शाळेत मराठी शिक्षण घेतले. काही मान्यवर ७ नाव्हेंबर १९०० हा त्यांचा शाळा प्रवेश दिवस म्हणून सांगतात. तो इंग्रजी शाळा प्रवेशाचा दिवस होय.* *माध्यमिक शिक्षण* *सातारा हायस्कूल १९०० - १९०४* *७ नोव्हेंबर १९०० रोजी सातारा हायस्कूल येथे इंग्रजी पहिल्या वर्गात त्यांचे नाव नोंदविण्यात आले. सातारा हायस्कूलमध्ये त्यांच्या शाळा प्रवेशाच्या नोंदी आहेत.* *सातारा हायस्कूलमधून प्राप्त नोंदी* *विद्यार्थ्यांचे नाव भिवा रावजी आंबेडकर* जन्म तारीख १४/४/१८९१ प्रवेश तारीख ७/११/१९०० कोणत्या वर्गात प्रवेश १ ला वर्ग (इंग्रजी) शाळा सोडण्याची तारीख नोव्हेंबर १९०४ (इंग्रजी ४ था वर्ग पास)* *एल्फिन्स्टन हायस्कूल एल्फिन्स्टन हायस्कूल, मुंबई १९०५-१९०७* *डिसेंबर १९०४ साली रामजी आंबेडकर सातारा सोडून मुंबईला आले.* *डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आधी मराठा हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले पण त्यानंतर मात्र ती शाळा बदलून त्यांच्या वडिलांनी त्यांना ३-१-१९०५ रोजी एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये दाखल केले. १९०७ साली बाबासाहेबांनी याच हायस्कूल मधून मॅट्रिकची परीक्षा पास केली. प्राप्त गुण ७५० पैकी २८२.* *एल्फिन्स्टन हायस्कूलमधून मॅट्रीकची परिक्षा पास झाल्यावर त्यांच्या अभिनंदनाची सभा आयोजित करण्यात आली. या सभेत गुरूवर्य कृष्णराव अर्जुन केळूसकर यांना त्यांनी स्वतः लिहिलेले 'गौतम बुद्धाचे चरित्र' हे पुस्तक भेट केले. यानंतर गुरूवर्य केळूसकर भीमरावांना सयाजीराव गायकवाड महाराजांकडे घेऊन गेले व महाविद्यालयीन शिक्षणाकरीता शिष्यवृत्ती मिळवून दिली.* *उच्च शिक्षण* *बी. ए. पास केल्यानंतर बाबासाहेबांनी शिष्यवृत्तीची परतफेड करण्यास बडोदे संस्थानात नोकरी पत्करली. काही विद्यार्थ्यांना बडोद्यातर्फे अमेरिकेला उच्च शिक्षणासाठी पाठवावे, याबद्दल महाराजांचा विचार चालू होता. महाराजांचा मुक्काम मुंबईत असताना भीमराव आपली बडोद्यातील नोकरीची व राहण्याची किती गैरसोय आहे, याबद्दलची माहिती महाराजांच्या कानावर घालण्यासाठी व त्यांच्याकडून काही हुकूम घेऊन पुन्हा बडोद्याला जावे या विचाराने, महाराजांना भेटण्यास मलबार हिलवरील राजवाड्यात गेले. या भेटीत भीमरावाने आपली सर्व हकीगत महाराजांना निवेदन केली. भीमरावाबद्दलची एकंदर हकीगत महाराजांच्या कानावर गेलेली होती. त्यांचे इंग्रजी भाषेवरील प्रभूत्व व त्यांचे चयनमनोहर इंगजी हस्ताक्षर पाहून महाराज त्यांच्यावर खूप झालेले होते. त्याने आपल्या गैरसोयीबद्दलची जी हकीगत सांगितली. त्याबद्दल महाराज एकही शब्द न बोलता भीमरावाबरोबर निरनिराळ्या विषयांवर संभाषण करू लागले. महाराज ज्या विषयावर प्रश्न विचारीत त्या प्रश्नावर भीमराव आपले मत देत. अशा चर्चेत अर्धा तास गेला. मग महाराज भीमरावाला म्हणाले, "तू मला उद्या याचवेळी भेट." आपल्या तक्रारीबद्दल महाराज काहीच बोलले नाहीत. याबद्दल भीमरावाला वाईट वाटले.* *महाविद्यालयीन शिक्षण एल्फिन्स्टन कॉलेज १९०८-१९१३* त्यांनी ३/१/१९०८ रोजी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश मिळविला.* *मॅट्रीकची परीक्षा पास केल्यावर बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांनी भीमराव आंबेडकर यांना महाविद्यालयीन शिक्षणाकरिता दरमहा रू. २५/ शिष्यवृत्ती मंजूर केली. जानेवारी १९१३ साली भीमराव आंबेडकर यांनी बी. ए. ची परिक्षा पास केली. एकूण गुण १००० पैकी ४४९.* *एल्फिन्स्टन कॉलेज, मुंबईमधून प्राप्ती नोंदी अनुसार* *विद्यार्थ्यांचे नाव* *भिमराव रामजी आंबेडकर* *जन्म तारीख* *१४/४/१८९१* *प्रवेश तारीख* *३/१/१९०८* *कोणत्या वर्गात प्रवेश* *प्रिव्हियस* *कॉलेज सोडल्याची तारीख* *जानेवारी १९१३* *नावात व आडनावातील बदल* *शिक्षण घेत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावात व आडनावात जे बदल झाले आहेत त्यांची नोंद घेण्यासारखी आहे. सुरवातीला त्यांचे नाव भिवा अथवा भिवराव असे नोंदविले गेले. कॅम्प स्कूल सातारामध्ये त्यांचे नाव भिवा रामजी आंबडेकर असे नोंदविले गेल्याचे आढळते. सातारा हासस्कूलमध्ये त्यांचे नाव भिवा रावजी आंबेडकर असे नमूद आहे. दापोलीपासून सुमारे ७-८ किलोमिटर अंतरावर असलेल्या 'आंबावडे' या लहानशा खेड्यातून आल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला सुरूवातीला 'आंबावडेकर' या आडनावाने ओळखले जात असे. प्राथमिक शाळेतील त्यांच्या कृष्णाजी आंबेडकर नावाच्या शिक्षकाने त्यांचे...* *पुढील भागात* *मुक्तीदाता विशेषांक* #🙂Positive Thought #bhimsenik #💪बुद्धांची तत्वे📜 #🙏 प्रेरणादायक बॅनर #💙 भीमसैनिक 💙
16 likes
12 shares
Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
548 views 6 hours ago
बाबासाहेबांचे विविध भाषणातून विचार... भाग 2 विकल्या गेलेल्या नेत्यांना ओळखायला शिका हे समाजात राहून समाजाला दिशाहीन करण्याचे काम खूप अलगत करत असतात त्यांच्या पासून सावधान रहा हे स्वतःचा फायदा करून समाजाचे आणि चळवळीचे नुकसान करत असतात... तुम्ही स्वतःच स्वतःची गुलामगिरी संपवली पाहिजे. ती नष्ट करण्यासाठी कोण्या देवावर किंवा कोण्या महापुरुषावर अजिबात विसंबुन राहू नका. लक्षात ठेवा की लोक नुसते आकडेवारीने बहुसंख्य असणे पुरेसे नाही. यश मिळवण्यासाठी आणि ते टिकवण्यासाठी लोकांनी सजग, सक्षम आणि स्वाभिमानी असणे अत्यंत आवश्यक आहे. आपण आपले मार्ग स्वतःच आखले पाहिजेत आणि स्वतःच त्या मार्गावरुन चालले पाहिजे... अस्पृश्यता ही अस्पृश्यांसाठी जीवन सुधारण्याच्या सर्व प्रकारच्या संधींची दारे बंद करून टाकते. ती अस्पृश्याला समाजात मोकळेपणाने फिरण्याची संधी देत नाही, तर ती त्याला कैदेत आणि विजनवासात जगण्यास भाग पाडते; ती त्याला स्वतःला सुशिक्षित करण्यापासून व त्याच्या निवडीचा व्यवसाय करण्यापासून रोखते... अस्पृश्यतेने अस्पृश्य, हिन्दू व अंतिमतः देशाचाही विनाश केला आहे. उपेक्षित वर्गाला जर त्याचा आत्मसन्मान प्राप्त झाला तर ते केवळ स्वतःच्याच प्रगती व समृद्धीमध्ये सहभागी होतील असे नाही तर त्यांची व्यावसायिक कौशल्ये आणि निर्धारामुळे ते देशाच्या शक्ती व समृद्धीमध्ये देखील योगदान देतील. अस्पृश्यतेच्या अवमानकारक जिण्याविरुद्ध संघर्ष करण्यासाठी अस्पृश्यांना जी काही महाकाय शक्ती खर्च करावी लागते आहे, ती जर वाचवली तर तीच शक्ती त्यांनी शिक्षणाचा प्रसार आणि संपूर्ण देशातील संसाधनांचा विकास यासाठी वापरली असती.... या देशात अनेक महात्मे होऊन गेले ज्यांचे एकमेव उद्दिष्ट अस्पृश्यतेला नष्ट करून उपेक्षित वर्गाचे जिणे उंचावून त्यांना मुख्य प्रवाहात सामिल करून घेणे हे होते, पण कुणालाही त्यांच्या कार्यात यश आले नाही. महात्मे आले आणि महात्मे गेले, परंतु अस्पृश्य हे अस्पृश्यच राहिले... जातीप्रथेचे संपूर्णतः निर्मूलन करण्याच्या दृष्टिकोनातून संतांच्या संघर्षाचा समाजावर काही परिणाम झालेला नाही. व्यक्तीचे मूल्य हे स्वयंभू व स्वस्थापित असते; ते त्याच्याकडे भक्तीच्या मुलाम्यामुळे येत नाही. संतांनी हा मुद्दा प्रस्थापित करण्यासाठी संघर्ष केला नाही. याउलट, उपेक्षित वर्गावर त्यांच्या संघर्षाचा अयोग्य परिणाम झालेला आहे. यांमुळे ब्राह्मणांना अस्पृश्यांच्या तोंडावर फेकून त्यांची तोंडे बंद करायला एक तर्क मिळाला की तुम्ही जर चोखामेळा सारखे व्हाल तरच तुम्हाला आदर मिळेल नाहीतर नाही... हिंदू संहितांमधून खोडसाळपणे असा प्रचार केला गेला की उच्च वर्णीयांची सेवा करण्यातच शुद्रांची मुक्ती सामावलेली आहे. अस्पृश्यता ही गुलामगिरीचेच दुसरे नावरूप आहे. कोणताही वंश त्याचा आत्मसन्मान नष्ट करून वाढूच शकत नाही. तेव्हा जर तुम्हाला खरोखरच अस्पृश्यांचे उत्थान करायचे असेल, तर तुम्ही सामाजिक स्तरावर त्यांना त्यांचे भवितव्य घडवण्यासाठी मुक्त असे स्वतंत्र नागरिक म्हणूनच वागवले पाहिजे... मुक्तीदाता विशेषांक #bhimsenik #💪बुद्धांची तत्वे📜 #💙 भीमसैनिक 💙 #🙏 प्रेरणादायक बॅनर
15 likes
7 shares
*लवकरच भिमजन्मोत्सव 2026* *Coming soon 14 April* *नगरमध्ये नाही, महाराष्ट्रात नाही, भारतात नाही* *तर अवघ्या १०० वरून अधिक देशात साजरी होणारी जयंती म्हणजे* *भीम जयंती* *10X60* *BIGGEST BANNER* *BHIM JAYANTI 20K6* *NANDED* *The first 10X 60 graphics design hoarding was put up in Srinagar, Nanded city, on the occasion of Dr. Babasaheb Ambedkar's 135th birth anniversary.* *संघर्षाच्या आगीतून जन्मलेला समाज) विद्रोह आमच्या शब्दात आणि जगन्यात आहे सर भीमसैनिक प्रभात नगर नांदेड* #🙏 प्रेरणादायक बॅनर #bhimsenik #🙂Positive Thought #💙 भीमसैनिक 💙 #💪बुद्धांची तत्वे📜
13 likes
16 shares