ठाणे शहरातील बाळकुम-साकेत मार्गावर त्रिमंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त पुढील तीन दिवस वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले असून, त्यामुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो. ३० जानेवारी सकाळी ७वाजल्यापासून ते १ फेब्रुवारी रात्री ८ वाजेपर्यंत बाळकुम नाका ते कळवा क्रिकनाका या मार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.
या काळात मालवाहू व अन्य जड वाहने पर्यायी मार्गांनी वळवण्यात येणार असून, त्यामुळे शहरातील इतर रस्त्यांवरही वाहतुकीचा ताण वाढण्याची शक्यता आहे. मात्र पोलीस वाहने, रुग्णवाहिका, अग्निशमन दल, ग्रीन कॉरिडॉर व अत्यावश्यक सेवा वाहनांना या निर्बंधातून वगळण्यात आले आहे. नागरिकांनी वेळेपूर्वी घराबाहेर पडावे, पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन ठाणे वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.
#Thane wibhag 2 khopat #thane