Follow
सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
@159107303
4,017
Posts
10,682
Followers
सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
961 views
14 hours ago
⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳ 📜 ८ ऑगस्ट इ.स.१६४८ (श्रावण अमावास्या, शके १५७०, संवत्सर सर्वधारी, वार मंगळवार) छत्रपतींचा बुद्धिबळाचा डाव आदिलशाहपुढे पदर पसरून राजांच्या प्राणांची भीक मागणं! स्वराजाच्या शपथा विसरून जाणं अन् मिळविलेलं स्वराज्य पुन्हा आदिलशाहच्या कब्जात देऊन टाकणं. नाहीतर शहाजी राजांचा मृत्यू. स्वराज्याचा नाश आणि शिवाजीराजांच्याही अशाच चिंधड्या उडालेल्या उघड्या डोळ्यांनी पाहणं हे आऊसाहेबांच्या नशीबी नव्हतं ! शिवाजीराजांनी स्वराज्यावर याचवेळी चालून आलेल्या फत्तेखानाचा प्रचंड पराभव केला होता. सुभानमंगळ , पुरंदर गड , बेलसर आणि सासवड या ठिकाणी राजांनी आपली गनिमी काव्याची कुशल करामत वापरून शाही फौजा पार उधळून लावल्या होत्या. सह्याद्रीच्या आणि शिवाजीराजांच्या मनगटातील बळ उफाळून आलं होतं. अन् त्यामुळेच आता कैदेतले शहाजीराजे जास्तच धोक्यात अडकले होते. कोणत्याही क्षणी संतापाच्या भरात शहाजीराजांचा शिरच्छेद होऊ शकत होता, नाही का ? पण शिवाजीराजांनी एका बाजूने येणाऱ्या आदिलशाही फौजेशी झुंज मांडण्याची तयारी चालविली होती , अन् त्याचवेळी शहाजीराजांच्या सुटकेकरताही त्यांनी बुद्धीबळाचा डाव मांडला होता. राजांनी आपला एक वकील दिल्लीच्या रोखाने रवानाही केला. कशाकरता ? मुघल बादशाहशी संगनमत करून मोघली फौज दिल्लीहून विजापुरावर चालून यावी , असा आदिलशाहला शह टाकण्याकरता. राजांचा डाव अचूक ठरला. दिल्लीच्या शहाजहाननं विजापुरावरती असं प्रचंड दडपण आणलं की , शहाजीराजांना सोडा नाहीतर मुघली फौजा विजापुरावर चाल करून येतील! वास्तविक दिल्लीचे मोगल हे काही शिवाजीराजांचे मित्र नव्हते. पण राजकारणात कधीच कुणी कुणाचा कायमचा मित्रही नसतो आणि शत्रूही नसतो. उद्दिष्ट कायम असतं. हे शिवाजीराजांचं वयाच्या अठराव्या वर्षीचं कृष्णकारस्थान होतं. अचूक ठरलं. विजापूरच्या आदिलशहाला घामच फुटला असेल! शहाजीराजांना कैद करून शिवाजीराजांना शरण आणण्याचा बादशाहचा डाव अक्षरश: उधळला गेला. नव्हे , त्याच्याच अंगाशी आला. कारण समोर जबडा पसरलेला दिल्लीचा शह त्याला दिसू लागला. त्यातच भर पडली फत्तेखानाच्या पराभवाची. चिमूटभर मावळी फौजेनं आपल्या फौजेची उडविलेली दाणादाण भयंकरच होती. मुकाट्यानं शहाजीराजांची कैदेतून सुटका करण्याशिवाय आदिलशहापुढे मार्गच नव्हता. डोकं पिंजूनही दुसरा मार्ग बादशहाला सापडेना. त्याने दि. १६ मे १६४९ या दिवशी शहाजीराजांची सन्मानपूर्वक मुक्तता केली. अवघ्या सतरा-अठरा वर्षाच्या शिवाजीराजांची लष्करी प्रतिभा प्रकट झाली. मनगटातलं पोलादी सामर्थ्यही प्रत्ययास आलं. वडीलही सुटले. स्वराज्यही बचावलं. दोन्हीही तीर्थरुपच. किशोरवयाच्या पोरानं विजापूर हतबल केलं. अन् ही सारी करामत पाहून इतिहासही चपापला. इतिहासाला तरुण मराठ्यांच्या महत्त्वाकांक्षा क्षितीजावर विस्मयाने झुकलेल्या दिसल्या. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙏शिवदिनविशेष📜 #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 #🚩 छत्रपती शिवाजी महाराज गाणी🎶 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtube.com/shorts/aSRARds37Ss?feature=share 📜 ८ आगस्ट इ.स.१६४८ (श्रावण अमावास्या, शके १५७०, संवत्सर सर्वधारी, वार मंगळवार/ उत्रावळीच्या केदारजी खोपडे देशमुखाला आदिलशाही फर्मान! "मुहम्मद आदिलशहा केदारजी खोपडे देसाई तर्फ भोर किल्ले रोहिडा. फतहखान खुदाबंदखान यांस कोंढाणा किल्ल्याच्या तर्फेस मसलत फर्मावली आहे तरी हे फर्मान पोहोचताच, त्याने (केदारजी) स्वार व प्यादे यासह उपर्युक्त खानाच्या जवळ जाऊन, त्याच्या आज्ञेत राहून दिवानची मसलत करावी. म्हणजे उपर्युक्त खानाच्या लिहिल्यानुसार निष्ठा व्यक्त होऊन तीप्रमाणे उत्कर्ष होईल. याबाबतीत विसर करण्याचा परिणाम चांगला होणार नाही. बरी ताकीद जाणून फर्मानाप्रमाणे अंमल करावा. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ८ ऑगस्ट इ.स.१६७६ छत्रपती शिवरायांच्या सूचनेवरून "किल्ले महीपतगड" वर हवालदार "दसमाजी नरसाळा" यांस तर "किल्ले सज्जनगड" वर हवालदार "जिजोजी काटकर" यांस कारभाराविषयी पत्र. ज्यात महाराज जिजोजीला म्हणतात, "रामदास गोसावी गडावर येतील, त्यांना रहायला चांगली जागा करून द्या, त्यांना काय हवं नको पहा, त्यांची विचारपूस करा, जितके दिवस राहू म्हणतील तितके दिवस राहू द्या आणि जेव्हा जाऊ म्हणतील तेव्हा जाऊद्या. या कामात कसलीही हयगय होऊ देउ नका !! असंच पत्र, याच तारखेचं महिपतगडचा किल्लेदार दसमाजी नरसाळा यालाही दिलंय. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ८ ऑगस्ट इ.स.१६८३ संभाजीराजांनी ही पोर्तुगीजांवरची मोहिम आखली आणि पोर्तुगीजांच्या चौलला वेढा घातला. चौलच्या वेढ्याला प्रतिउत्तर म्हणून आणि संभाजीराजांचे लक्ष चौलवरून हटवण्यासाठी पोर्तुगीजांनी फोंड्यावर हल्ला केला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ८ ऑगस्ट इ.स.१६८३ दिनांक ८ ऑगस्टच्या सकाळी मराठ्यांनी चेऊलवर हल्ला केला. मोठमोठ्या शिड्या लावून किल्ल्याच्या तटावर चढून जाण्याचा प्रयत्न केला. हे कळताच पोर्तुगिजांनी मोठा भोंगा वाजवून आवाज काढला. त्यावेळी शहरातील लोक धावत येऊन त्यांनी शिड्या फेकून दिल्या. मराठ्यांनी इ. स. १६८३ मध्ये चौलच्या तोंडाशी असलेला कुर्लाई हा लहानसा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही. मराठ्यांनी किल्ल्याचे तट चढून जाण्यासाठी ६ गुप्तहेर पाठविले. ते तटबंदी चढून किल्यावर गेले तेव्हा त्यांना लगेच पकडून पोर्तुगिजांनी त्यांचा अनन्वित छळ करून त्यांच्या येण्याचा उद्देश त्यांच्याकडून वदवून घेतला आणि त्यांना कंठस्नान घातले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ८ आगस्ट इ.स.१७९० मराठ्यांनी लुनी नदी ओलांडली. आणि त्यांच्या फौजा मेडत्यावर चालून आल्या. मराठी फौजेने राजपुतांना हैराण करावयास सुरूवात केली. द बुआन्यचा तोफखाना मात्र अजूनही नदीच्या अलिकडेच होता. मारवाडी फौजेचे सेनापती गंगाराम भंडारी होते. मराठ्यांना लुनी नदीच्या अलीकडेच अडविण्याचा त्यांचा डाव होता. पण तो काही सफल झाला नाही. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ८ ऑगस्ट इ.स.१८०३ इंग्रजांनी आपल्याला मराठ्यांशी युद्ध करावे लागणार हे गृहीत धरूनच जोराची तयारी चालविली होती. दक्षिणेत जनरल वेलस्लीच्या हाताखाली ३६ हजार सैन्य होते. जनरल वेलस्लीला दक्षिणेतील फौजांचा सरसेनापती म्हणून जाहीर केले होते. कृष्णा-तुंगभद्रा दुआबात जनरल स्टुअर्ट आपल्या ८,००० सैन्यासह युद्धाच्या तयारीने तळ देऊन होता. आजुबाजूचे पाळेगार, बंडखोर, यांना ताब्यात ठेऊन जनरल वेलस्लीला लागेल त्यावेळी मदत करण्याचे त्यास हुकूम दिले होते. ७ ऑगस्ट १८०३ रोजी जनरल वेलस्ली बरोबर ९ हजार सैन्य घेऊन आणि कर्नल स्टीव्हेन्सन ह्याचे ८ हजार सैनिक ही दोन्ही सैन्ये अहमदनगरच्या किल्याजवळ येऊन थडकली. निजामाचे १५ हजार सैन्य, अप्पा देसाई निपाणकर यांजकडील ८ हजार सैन्य आणि बापू गोखले यांनी जनरल वेलस्लीला मदत करावयाची असे हुकूम गव्हर्नर जनरलने दिले होते. सुरतजवळ कॅप्टन मरे आपल्या ८ हजार सैन्यानिशी दक्षिणेत निघण्याच्या तयारीत होता. जनरल लेकला उत्तरेतील सैन्याचे अधिपत्य देऊन कानपूर व लखनौ येथील सैन्यास शिंद्यांवर हल्ला करण्यासाठी ठेवले होते. शिंदे दक्षिणेत पुण्याच्या दिशेने येत होते, त्यास अडवून धरण्यासाठी त्यांच्या ताब्यातील अहमदनगरचा किल्ला काबिज करण्याचा बनाव वेलस्लीने ८ ऑगस्ट १८०३ घडवून आणला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ८ ऑगस्ट इ.स.१८३१ उमाजी व त्यांच्या साथीदारांनी कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे व मराठवाड्यात अक्षरश: धुमाकूळ घातला. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अनेक इंग्रज अधिकारी नेमले गेले. ८ ऑगस्ट १८३१ रोजी इंग्रजांनी आणखी एक जाहीरनामा काढून उमाजींना पकडून देणाऱ्यास १०,००० रु. बक्षीस व ४०० बिघे जमीन देण्याचे जाहीर केले. या आमिषाला उमाजीचे दोन साथीदार काळू व नाना हे बळी पडले. त्यांनी उमाजींना १५ डिसेंबर १८३१ रोजी स्वत: पकडून इंग्रजांच्या स्वाधीन केले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ८ ऑगस्ट इ.स.१९४२ भारताला स्वातंत्र्य मिळणे हे केवळ भारतासाठीच नाही तर जगाच्या शांतीसाठी गरजेचे आहे.शके १८६४ आषाढ व.१२ फिरंगी दि.८ ऑगस्ट इ.स.१९४२ या दिवशी रात्री दहा वाजता प्रसिद्ध असा "चले जाव" ठराव पास झाला. 'चले जाव'ची घोषणा केली गेली आणि 'ब्रिटिशांनी तत्काळ हा देश भारतीयांच्या हाती सोपवून चालते व्हावे', असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
1.4K views
1 days ago
⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳ 📜 ७ आगस्ट इ.स.१६४८ महाराज किल्ले पुरंदर पाहण्यासाठी गडावर! किल्ले पुरंदराची अभेद्यता व भव्यता पाहून महाराज बहोत खूष झाले. भविष्यात हा गड फार उपयोगी व महत्वाचा आहे. हे जाणून महाराजांनी अनेक डागडुजी आणि शिबंदीसाठी योग्य ती व्यवस्था करण्यास सांगितले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🚩 छत्रपती शिवाजी महाराज गाणी🎶 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 #🙏 प्रेरणादायक बॅनर https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtube.com/shorts/AlBGn8g3jBA?feature=share 📜 ७ आगस्ट इ.स.१६८८ स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी औरंगजेब बादशहाने आपले मातब्बर मोहरे पाठविले. छत्रपती संभाजी महाराजांचा मुलुख जिंकण्यासाठी औरंगजेब बादशहाने मुल्तफतखान व त्याच्या बरोबर बरवा बलंदखान, मुल्तफखानाचा भाचा फजलुल्ला, व नागोजी ५ हजारी मनसबदार यांना पाठविले. नुकत्याच जिंकलेल्या सरसगड किल्ल्यावर सय्यद अब्दुल्लाखान याची नेमणूक करण्यात आली. मुल्तफखानाच्या फौजेत महादजी (महादजी निंबाळकर) यांचे ४०० स्वार तैनात करण्याचा हुकुम झाला. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 ७ ऑगस्ट इ.स.१७९० पानिपतच्या लढाईनंतर उत्तरेत मराठ्यांचा जम बसवण्याची महत्वपूर्ण कामगिरी केली ती सरदार महादजी शिंदे यांनी. दिल्ली काबीज करण्याच्या उद्देशाने महादजींनी आपली फौज एकत्र करून दिल्लीवर आक्रमण केले. दिल्ली यावेळी अफगाण व रोहिल्यांच्या ताब्यात होती.महादजींनी दिल्ली ताब्यात घेतली व इंग्रजांच्या आश्रयाला गेलेल्या शहाआलम ला परत आणून त्याला दिल्लीच्या गादीवर बसवले.पण महादजींचे हे वर्चस्व बादशहाचे काही सरदार व राजपुताना मानवले नाही,त्यांनी एकत्र येऊन 29 जुलै ला लालसोटच्या लढाईत महादजींचा पराभव केला.यानंतर पानिपतचा सूत्रधार नजीबखानाचा नातू गुलाम कादिर आणि इस्माईल बेग यांनी बादशहा शहाआलम ला पदच्युत करून त्याचे डोळे काढले व त्याच्या जागी बिदर बख्तला गादीवर बसवले.महादजींनी हार न मानता पुन्हा सैन्य जमवून दिल्लीवर हल्ला करून दिल्ली ताब्यात घेतली आणि गुलाम कादरला कैद करून ठार मारले आणि पुन्हा अंध शहाआलम ला गादीवर बसवले.शहाआलम ने खुश होऊन संपूर्ण राज्यात गोवधबंदी जाहीर केली व मथुरा व वृंदावन ही पवित्र स्थळे महादजींना देण्यासंबंधीचे फर्मान काढले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜७ ऑगस्ट इ.स.१९४१ 🚩विश्वकवी रवींद्रनाथ टागोर यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन प्रतिभावंत साहित्यिक , ओजस्वी कवी , प्रखर शिक्षणतज्ञ व सामाजिक भान असलेले विचारवंत रविंद्रनाथ टागोर हे अलौकिक व्यक्तीमत्व होते. वयाच्या ९ व्या वर्षी पाहिली कविता करणाऱ्या टागोरांनी वयाच्या ८० व्या वर्षी एक हजारावी कविता केली. लहानपणापासून टागोरांची शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अगदी वेगळा होता. चारभिंतीच्या आड शाळा म्हणजे तुरुंग व शिक्षक म्हणजे पोलिस अशा वातावरणात सहज शिक्षण मिळू शकत नाही. या विचारामुळे टागोरांनी कधी औपचारिक शिक्षण घेतले नाही. त्यांना घरी शिक्षणांची सोय त्यांच्या वडीलांनी केली.बंगाली साहित्यातच नाही तर जागतिक साहित्यात रविंद्रनाथ टागोरांनी आपल्या साहित्याचा ठसा उमटवला . टागोरांनी " गीताजंली"नावाचा अजोड ग्रंथ लिहून भारतातील साहित्यातील पहिला नोबाल पुरस्कार मिळवला. गीताजंलीचे इंग्रजीत पुढे भाषांतर झाले. पुढे जगातील अनेकदा भाषांत गीताजंलीचे भाषांतर झाले. गीताजंलीच्या नोबल पुरस्कारांच्या पैशातून रविंद्रनाथ टागोरांनी त्यांनी त्याच्या कल्पनेतील शाळा निर्माण केली तीच " शांतिनिकेतन " होय. निर्सगाच्या सानिध्यात असलेली ही संस्था जगाचा आकर्षणाचा विषय ठरली.जन गण मन......सारखे राष्ट्रीय गीत लिहून टागोरांनी तमाम भारतीयांना एकत्र जोडले. टागोर यांचे संपूर्ण साहित्य हा ज्ञानाचा भंडार होता. पु.ल. देशपांडे यांनी टागोरांचे साहित्य वाचण्यासाठी खास बंगाली भाषा शिकले.टागोर यांचे बरेचसे साहित्य हे जरी बंगालीमधील असले तरी साहित्यिकाला प्रांताच्या सीमा नसतात. हे त्यांच्या विविध साहित्यांतून समजते.टागोर छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणास्थान मानत असे. शिवरायांवर टागोरांनी खंडकाव्य रचले. स्वदेशी व बहिष्कार चळवळीबाबत त्यांची मतभिन्नता होती. १९१९ मध्ये जालियनवाला बागहत्याकांडाचा टागोरांनी निषेध करुन आपली "सर "ही पदवी ब्रिटिश शासनाला परत केली. महात्मा गांधी व डॉ.आंबेडकरांच्या पुणे कराराबाबत सहकार्य टागोरांनी केले. परमेश्वर म्हणजे काय ? या विषयाची फोड करताना टागोर म्हणतात , आपले अपूर्णत्व असह्य झाल्यामुळे मनात आणि जीवनात आकारास येणारी परिपूर्णतेची प्रतिमा म्हणजेच परमेश्वर होय. देव खडी फोडणा-यांच्या घामात आहे. श्रमिकांच्या कामात आहे. शेतकऱ्यांच्या सावलीत आहे. यावरुन टागोरांच्या विचारांची प्रग्लभता सहज लक्षात येते. विषय ठरली.जन गण मन......सारखे राष्ट्रीय गीत लिहून टागोरांनी तमाम भारतीयांना एकत्र जोडले. अशा या अलौकिक साहित्यांचा मृत्यू ७ आॕगस्ट १९४१ मध्ये झाला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
2.2K views
2 days ago
⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳ 📜 ६ ऑगस्ट इ.स.१६४८ (श्रावण वद्य १२, द्वादशी, शके १५७०, संवत्सर सर्वधारी, वार रविवार) महाराजांची किल्ले पुरंदर " मोहीम! किल्ले पुरंदर आदिलशाहीच्या ताब्यात होता आणि किल्ले पुरंदरचे किल्लेदार होते महादजी नीळकंठराव सरनाईक पिढ्यानपिढ्या सरनाईक घराणे किल्ले पुरंदरची किल्लेदारी करत होते. त्यात राजे शहाजीराजे यांचा आणि महादजींचा दाट स्नेह वयोवृद्ध महादजी‌ आता थकले होते. त्यामुळे त्यांच्या निळोपंत, शंकराजीपंत, विसाजीपंत व त्रिंबकपंत या ४ मुलांत वतनासाठी कटकटी सुरू होत्या. चाणाक्ष शंकराजीपंत महाराजांच्या सहाय्याने मदत मिळवू पहात होते. महाराजांनीही मग शंकराजीपंतांना हाताशी धरून भेदनीतीने किल्ले पुरंदरचे राजकारण केले आणि किल्ला हाती घेतला. किल्ले पुरंदर निश्चित कधी हाती आला व कसा आला यात, निरनिराळ्या अभ्यासकांच्या मतभिन्नता आहे. मात्र फत्तेखानाच्या स्वारीची शक्यता पहाता हा किल्ला महाराजांनी आगस्ट इ.स.१६४८ ते आक्टोबर महिन्याच्या इ.स.१६४८ आधी स्वराज्यात निष्चितच दाखल केला आहे. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 #🚩 छत्रपती शिवाजी महाराज गाणी🎶 #🙏शिवदिनविशेष📜 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #छत्रपती संभाजी महाराज https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtube.com/shorts/Scs3J1XNvns?feature=share 📜 ६ ऑगस्ट इ.स.१६५७ (श्रावण शुद्ध ७, सप्तमी, शके १५७९, संवत्सर हेमलंबी, वार गुरुवार) महाराजांचा अहमदनगर येथे मुघल छावणीत हल्ला! छत्रपती शिवाजी महाराजांनी अहमदनगर येथे मुघल छावणीत हल्ला केला. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇 📜 ६ ऑगस्ट इ.स.१६५९ ठाण्याच्या पोर्तुगिझ गवर्नरने गोवा येथील प्रमुख गवर्नरला 'मराठ्यांच्या आरमाराबद्दल सावधान' असण्याबद्दलचे पत्र लिहिले. शिवरायांनी १६५७ पासून कल्याण-भिवंडी परिसरात आरमार बनवण्याचा उद्योग सुरु केला होता. यात लढाउ तसेच व्यापारी जहाजे सुद्धा होती. त्यामुळे सतर्क होवून पोर्तुगिझ गवर्नरने हे पत्र लिहिले. सदर पत्राचा मराठी अनुवाद- "शहाजीचा मुलगा (शिवाजी) याने आदिलशाहीच्या ताब्यामधील वसई ते चेउल मधला बराच भूभाग जिंकला असून त्याने स्वतःची लढण्याची ताकद वाढवली आहे. त्याने कल्याण, भिवंडी, पनवेल ह्या वसईच्या आसपासच्या बंदरांमध्ये काही लढाउ जहाजे बनवली आहेत. आम्हाला आता सतर्क रहायला हवे. ही जहाजे बंदरामधून खुल्या समुद्रात बाहेर येणार नाहीत यासाठी योग्य ती पावले उचलण्याचे आदेश आम्ही पोर्तुगिझ कप्तानाला दिले आहेत." 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇 📜६ ऑगस्ट इ.स.१६७७ दक्षिण दिग्विजय मोहिमेत छत्रपती शिवाजी महाराज तुंदुमगुर्ती ला आले. या मुक्कामात महाराजाना भेटण्यासाठी तेवेनापट्टणमचे डच अधिकारी आले होते. डच मंडळींना पायदळाचे सैनिक महाराजांच्या नाजूक अल्कटिव्ह असणाऱ्या तोरणपट्टानी सजवलेल्या महाराजांच्या तंबूत घेऊन गेले.डच मंडळी तंबूत बसल्यावर शिवराय तंबूत आले. त्यांच्यासोबत जनार्दन व रघुनाथ पंडित होते. शिवराय आपल्या आसनावर बसल्यावर जनार्दन पंडित त्यांच्यासमोर तर रघुनाथ पंडित महाराजांच्या जवळ उजवीकडे बसले. शिवराय जेंव्हा तंबूत आले तेंव्हा तंबूत असणारे सारे उठून उभे राहिले. महाराजानी यावेळी सोनेरी नक्षीकाम केलेली वस्त्रे परिधान केली होती. त्यांच्या उजव्या हातात मुठीला सोन्याचा वर्ख लावलेला पट्टा होता. भेटीत महाराजांनी डचाना कौल दिला व त्यांचा अधिकारी निकोलस क्लेमेंट यांच्याशी मैत्रीपूर्ण बोलनी केली. यावेळी डचानी महाराजाना चंदेरी कपडा, ८ रुंद तलवारी, ३३ पौंड चंदन, २ पेट्या गुलाबपाणी, ३ हरणाची कातडी, ४८ पौंड लवंग, जायफळ, १ चांदीचा पानपुडा, ३ छोट्या सोनसाखळ्या या भेटवस्तू दिल्या. महाराजांनी डचानाही भेटवस्तू देऊन निरोप दिला. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇 📜 ६ ऑगस्ट इ.स.१८०३ इंग्रज आणि शिंदे-भोसले ! शके १७२५ च्या श्रावण व ३ रोजी इंग्रज अधिकारी जनरल वेलस्ली यानें शिंदे व भोसले यांच्याविरुद्ध लढाई पुकारली. अठराव्या शतकाच्या अखेरीस मार्किस ऑफ वेलस्ली हा हिंदुस्थानचा गव्हर्नर जनरल म्हणून आला तेव्हां राजकीय परिस्थिति मोठी गंभ होती. हिंदुस्थानांत फ्रेंचांची सत्ता बळावत होतीच; परंतु युरोपमध्यें नेपोलियनचा उदय झाल्यामुळे इंग्रजांना फार धास्ती वाटत होती. इंग्रजांच्या विरुद्ध टिपूनें सर्व मुसलमानांचा एक संघ निर्माण केला होता. आणि मराठ्यांच्यामध्येंहि अशीच एकजूट निर्माण झालेली होती. पेशवे, शिंदे, गायकवाड, भोसले, वगैरे अनेकांच्या मदतीने 'मराठा कॉन्फीडर 2 निर्माण झाली होती. या बिकट परिस्थितीतून धूर्त इंग्रजांनी वाट काढली आणि या सर्वांवर विजय मिळविला. निजाम आणि मराठे यांच्या साह्याने . इंग्रजांनी टिपूचा पराभव केला आणि त्याचें श्रीरंगपट्टणचें राज्य काबीज केलें, आणि त्यानंतर कांहीं कुरापत काढून निजामासहि हतवीर्य करून त्याच्या जवळील फ्रेंच सैन्य घालवून दिलें. व आपली तैनाती फौज ठेवून दिली. आणि आतां इंग्रजांचें सारे लक्ष ' मराठा कॉन्फिडरसी' कडे लागले. मराठी राज्याचे दुर्दैव याच वेळी आपली संधि साधीत होते. यशवंतराव होळकरांच्या भीतीनें बाजीराव सिंहगडाहून महाडास आणि तेथून वसईस गेला. आणि त्याने इंग्रजाश लाजिरवाणा तह केला ! बाजीराव इंग्रजी कृपेमुळे परत गादीवर येणार होता. त्याच्या पदरीं इंग्रजी तैनाती फौज राहणार होती, त्यामुळे बाजीराव इंग्रजांच्या हातचें बाहु बनला. या वेळी पुण्याच्या दरचारीं महादजींचे दत्तक पुत्र दौलतराव शिंदे यांचें वर्चस्व होते. त्यांच्या पदरीं फ्रेंच फौज चांगलीच तयार झालेली होती. तेव्हां आतां शिंद्यांकडे लक्ष देणें इंग्रजांचे कर्तव्य होते. सर्वत्र फंदफितुरी करून इंग्रजांनी मोठींच कृष्णकारस्थानें रचलीं. त्यांनीं बाजीरावास गादीवर बसविलें. आणि दौलतराव शिंदे यांचे अजिंक्य लष्कर आणि जय्यत तोफा यांचा नाश करण्यास ते प्रवृत्त झाले. त्याप्रमाणें जनरल वेलस्ली यानें श्रावण व. ३ रोजी लढाई पुकारली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
911 views
3 days ago
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳ 📜 ५ ऑगस्ट इ.स.१६५२ १२ मावळची सुरूवात जिथून होते त्या रोहीड खोऱ्यातील "खोपडे देशमुख" हे पहिल्यापासून स्वराज्यासाठी ईमाने इतबारे सेवा देणारे घराणे. पण त्याच"खोपडे देशमुख"घराण्यात नेहमी होणारा भाऊबंदकीचा वाद शिवरायांच्या मध्यस्तीने पूर्णपणे मिटला. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🚩 छत्रपती शिवाजी महाराज गाणी🎶 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtube.com/shorts/gUjk84Alpdg?feature=share 📜 ५ आगस्ट इ.स.१६६८ निराजी, राहुजी आणि सेनापती प्रतापराव गुजर (कुडतोजी) सैन्यासह औरंगाबाद (आत्ताचे छ. संभाजीनगर) येथे पोहोचले. सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या सैन्याची शहाजाद्याने स्वतंत्र व्यवस्था केली. त्यांस "शिवपुरा असे नाव दिले. युवराज शंभुराजेंच्या नेतृत्वाखाली सरसेनापती प्रतापराव गुजर व आनंदराव युद्ध आघाड्यांवर असत. निराजी, राहुजी आणि सेनापती प्रतापराव गुजर सैन्यांसह औरंगाबाद येथे पोहोचले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 ५ आगस्ट इ.स.१६८३ (श्रावण वद्य ८, अष्टमी, शके १६०५, रुधिरोद्रारी संवत्सर, वार रविवार) औरंगजेब बादशहाकडून रणमस्तखानास "बहादुरखान " हा किताब ! रणमस्तखानास बहादुरखान हा किताब औरंगजेब बादशहाकडून देण्यात आला. या आधी हा किताब औरंगजेब बादशहाचा दुधभाऊ आणि बहादुरगड बांधणारा बहादुरखान कोकलताश यांच्याकडे होता परंतु त्याच्या मृत्युनंतर हा किताब रणमस्तखानास देण्यात आला. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
1.6K views
4 days ago
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 📜 ४ ऑगस्ट इ.स.१६६८ (श्रावण शुद्ध ७, सप्तमी, शके १५९०, संवत्सर किलक, वार मंगळवार) शिवरायांनी कोकणातील जैतापूर जिंकले. शिवरायांनी आग्रा येथून सुटका करून घेतल्यानंतर मोगलांशी तह केला व आपले लक्ष पोर्तुगीज राज्यावर केंद्रीत केले. धर्मांध पोर्तुगीजांना धडा शिकविण्यासाठी महाराजांनी आपली मोहिम‌ उघडली व त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापूरवर हल्ला करून ते जिंकुन घेतले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 #🙏शिवदिनविशेष📜 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🚩 छत्रपती शिवाजी महाराज गाणी🎶 #🙏 प्रेरणादायक बॅनर https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtube.com/shorts/IX2hZkPncf0?feature=share 📜 ४ ऑगस्ट इ.स.१६८१ दुटप्पी धोरणाने वागणाऱ्या इंग्रजांच्या सहकार्याने मुंबईत आणि लगतच्या उंदेरी किल्ल्यावर राहून मराठी मुलखात नासधुस व लुटालूट करत असे.उंदेरी किल्ला सिद्दीकडून घेतला आणि मुंबईतही त्याला थारा मिळाला नाही तर सिद्दीच्या हालचालींना पायबंद बसेल असे संभाजीराजेना वाटत होते. त्यामुळे सिद्दीकडून उंदेरी घ्यायचे असे राजांच्या मनात पूर्वीपासून घोळत होते.त्यादृष्टीने त्यांनी ऑगस्ट १६८० मध्ये तसा प्रयत्न केला होता पण तो फसला गेला.पण संभाजीराजेनी हार मानली नाही,त्यांच्या आदेशाने मराठ्यांनी पुन्हा एकदा उंदेरीवर हल्ला चढवला होता.याबाबत इंग्रजांची नोंद अशी होती,"मराठ्यांनी दि.१८ जुलै १६८१ ला पहाटे उंदेरीवर हल्ला चढवला. मराठे आणि सिद्दी सतत ४ तास एकमेकांवर हल्ले करत होते. त्यात काही माणसे मेली व पुष्कळ पकडली गेली.अखेर सिद्दीने हा हल्ला परतवून लावला." 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ४ ऑगस्ट इ.स.१६८७ छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रमाणेच शंभुराजेंना सुध्दा आपल्या लष्करात शिस्त असणे अपेक्षीत होते.आपल्या लष्करी अधिकाऱ्यांनी रयतेला किंवा देवस्थानांना त्रास दिलेला त्यांना खपत नसे.पुणे प्रांतातील मौजे चिंचवड हा गाव श्री देव यांच्याकडे चालत असे. महाराजांच्या लष्करातील सुभेदार,जुमलेदार,हवालदार, हशम यांच्याकडून या देवस्थानाला उपद्रव होत असे.मन मानेल तशी वसुली हे अधिकारी करत असत.त्यामुळे शंभुराजेंनी त्यांना आज्ञा केली की,"असे असता तुम्ही रहदारीस नाहक दरफ्ती करता,उपद्रव देऊन धामधूमही करता.रयतीकडून गैरसनदी मनास येईल ते मागत होता म्हणोन कळो आले.तरी हे ढंग स्वामिस कैसे मानो पाहतात?या उपरी ही बदराहा वर्तणूक केलीया तुमचा एकंदर मुलाहिजा होणार नाही.जो धामधूम करील त्यास स्वामी जिवेच मारतील. हे जाणून मौजे मजकुरास तसदी ना देणे.ताकीद असे."शंभुराजेंच्या या एकमेव पत्रात स्वामी जिवेच मारतील हा दम दिलेला आढळतो. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ४ ऑगस्ट इ.स.१७३० (भाद्रपद शुद्ध द्वितीया शालिवाहन शक १६५२, साधारणनाम संवत्सर) भाऊसाहेब अर्थात सदाशिवरावांचा जन्म. चिमाजीअप्पांना पहिलाच पुत्र झाला. शनिवारवाड्यावर चौघडा वाजू लागला. पुण्यात साखरा वाटल्या गेल्या. सदाशिवचा जन्म झाल्यानंतर त्यांची आई रखमाबाईंची तब्येत ढासळली. औषधोपचार चालु झाले मात्र त्याचा उपयोग न होऊन ३१ ऑगस्ट १७३० रोजी रखमाबाई निधन पावल्या. सदाशिवराव त्यावेळी केवळ २७ दिवसांचे होते.इ.स. १७४० मधे चुलत बंधु नानासाहेबांना पेशवाई मिळाल्यानंतर भाऊंचे सातार्याच्या दरबारात काही वर्षे वास्तव्य होते. या काळात त्यांना राजकारणाचा बराच अनुभव मिळाला. १७४६ मधील कर्नाटक मोहिम, १७४७ मधे तिथेच झालेली आजर्याची लढाई, बहादूरभेंड्याचा किल्ला जिंकणे, तुंगभद्रा किनारी जाऊन बंडखोर नवाब व देसायांना जरब बसवणे इत्यादी मोहिमा त्यांच्या नावावर होत्या. त्याचबरोबर सावनूरच्या नवाबांकडून भाऊंनी ३६ परगणे काबीज करून मराठा साम्राज्याला जोडले. १७५० मधे सांगोल्याला यमाजी शिवदेवाचे बंड मोडले. त्याच वर्षी छत्रपती राजारामांनी (दुसरे) त्यांना मराठा राज्याची कायमची मुखत्यारी दिली. तसेच नागपूरच्या भोसल्यांची दिवाणीही भाऊंना मिळाली होती. १७५० मधेच भाऊंनी कोल्हापूरमधील काही किल्ले व ५० हजार रूपयांची जहागिरी मिळवली. हे वरील नमूद केलेले व इतर काही कामगिर्या भाऊंनी त्यांच्या आयुष्यात पार पाडल्या. भाऊसाहेबांचा स्वभाव करारी होता, शुद्ध आचरण, न्यायी व्रुत्ती, हिशेबी व्रुत्ती, दक्षता हे गुणही होते. (मृत्यू: १४ जानेवारी १७६१) 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ४ ऑगस्ट इ.स.१७३३ कान्होजी आंग्रेंचे बाजीरावाला पत्र प्रतिनिधी जोपर्यंत कोकणात आहेत तोपर्यंत काहीही होणार नाही हे सगळ्यांना कळून चुकलं होतं. खुद्द सरखेल सेखोजी आंग्रे ४ ऑगस्ट १७३३ रोजी बाजीरावांना कळवतात, “प्रतिनिधीचा विचार घालमेलीचा व शामलाचे (सिद्दी) ममतेचा पहिल्यापासून आहे तो आपणास अवगतच आहे. या कोकणच्या मानसुब्यास दोन्ही गोष्टी कार्याच्या नाहीत. आपणाजवळ (पेशव्यांजवळ) आम्ही (आंग्रे) स्वच्छंदे अथवा आपले आज्ञेने वर्तणूक करू. तैसी त्याजपासी होणे दुरापास्त. प्रतिनिधी उठोन जातील ते कळणार(ही) नाही, आपले बेत, गोद्विजांचा उच्छेद केल्याचे श्रय आपल्या पदरी पडेल. आपले पदरी आम्हासारिखे असता अगाध काय आहे? प्रतिनिधीकडील वेध चुकलियावरी अंजनवेलीस मोर्चे देतो. गोवळकोट घेतो. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
827 views
5 days ago
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳ 📜 ३ ऑगस्ट इ.स.१३४७ दिल्लीचा सुलतान मुहम्मद तुघलख याच्या कारकिर्दीत दक्षिणेत जाफरखान उर्फ अल्लाउद्दीन हसन याने बंड करून गुलबर्गा इथे ३ ऑगस्ट १३४७ ला बहामनी राज्याची स्थापना केली. या बहामनी राज्यात १३४७ ते १५३८ या काळात एकूण १८ सुलतान होऊन गेले. बहामनी राज्यातील १४ वा सुलतान शिहाबुद्दीन महमूद याच्या कारकिर्दीच्या दरम्यान बहामनी सत्तेचा कर्तबगार वजीर महंमद गवान याची हत्या झाल्यानंतर बहामनी सत्तेचे वेगवेगळे सुभेदार जसे युसुफ आदिलखान (आदिलशाही), फतहुल्लाह इमाद (इमादशाही), कुत्ब उल्मुख (कुतुबशाही), अमीर कासीम बरीद (बरीदशाही) व मलिक अहमद बहिरी (निजामशाही) यांनी बहामनी सत्तेतून बाहेर पडत आपली स्वतंत्र राज्ये स्थापन केली. यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यस्थापनेच्या कामी महत्वाचा अडसर राहिला तो विजापूरच्या आदिलशाहीचा. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🙏 प्रेरणादायक बॅनर #🚩 छत्रपती शिवाजी महाराज गाणी🎶 #🙏शिवदिनविशेष📜 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtu.be/xwCZFxsw9n4 📜 ३ आगस्ट इ.स.१६६४ (श्रावण वद्य षष्ठी, शके १५८६, संवत्सर क्रोधी, वार बुधवार) महाराजांच्या आरमाराने पोर्तुगीज व मोगली आरमाराचा समाचार घेण्यासाठी १० गलबतांचा ताफा रवाना ! छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा आरमाराने हेरांनी आणलेल्या माहितीवरून पोर्तुगीज व मोगली आरमाराचा समाचार घेण्यासाठी १० गलबतांचा ताफा रवाना केला. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 ३ ऑगस्ट इ.स‌.१६७७ छत्रपती शिवाजी महाराज दक्षिणेत वृद्धाचलम् येथे मुक्कामी आले. इथून महाराजांनी परतीचा प्रवास सुरु केला. वृद्धाचलम, कावेरीपट्टम, चिदंबरम तसेच शहाजीराजे यांच्या जुन्या जहागिरीचा प्रदेश बाळापुर, बंगरूळ, शिरें, होसकोट जिंकून घेतला. अरणीला वेढा घालून अरणी जिंकली, त्यासोबतच चिकबाळापूर, दोडडबाळापूर, देवरायानदुर्ग, तुमकुर, चित्रदुर्ग, कल्याणदुर्ग, रायदुर्ग, हंपी, कनकगिरी, कोप्पळ, लक्ष्मेश्वर, गदग हा भागही जिंकून घेतला. महाराजांना वेल्लोरशिवाय जास्त विरोध कुठेच झाला नाही व हे सर्व करत करत महाराज पन्हाळ्यावर परतले मार्च १६७८ साली. त्यानंतर लगेच वेल्लोर किल्ला मराठ्यांनी जिंकला ज्याचा वेढा तब्बल एक वर्ष सुरु होता. व्यंकोजी राजांनी महाराजांनी बळकावलेल्या प्रदेशावर हल्ला करून तो मिळवण्याचा प्रयत्न देखील केला पण त्यात त्यांचा पराभव झाला. अश्याप्रकारे तब्बल दीड वर्ष चाललेल्या कर्नाटक मोहिमेची यशस्वी सांगता झाली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ३ आगस्ट इ.स.१७६४ माधवराव पेशवे यांनी व्हिसेरेईस पाठविलेल्या पत्राची नोंद ! या दरम्यान माधवराव पेशवे मात्र स्वस्थ बसून नव्हते. त्यांना पोर्तुगिजांनी घेतलेला किल्ले मर्दनगडाचा टापू हवा होता. त्यांनी व्हिसेरेईला पत्र पाठवून किल्ले मर्दनगड व त्याच्या कक्षेतील प्रदेश खाली करून तो मराठा अंमलदाराच्या करारान्वये हैदरअलीविरुद्ध आपणास मदत करण्याचे आवाहन केले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ३ ऑगस्ट इ.स.१९०० स्वातंत्र्यपूर्व काळात पत्री सरकार म्हनजेच प्रतिसरकार स्थापन करून इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान असलेले ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म. महाराष्ट्रात (प्रामुख्याने सातारा, सांगली भागात) स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे, तसेच पत्री सरकार किंवा प्रतिसरकार हा समांतर शासनाचा एकमेवाद्वितीय प्रयोग राबवणारे लढवय्ये राजकीय कार्यकर्ते म्हणजे "क्रांतिसिंह नाना पाटील" होत. महाराष्ट्रातील एक देशभक्त, झुंझार नेते आणि क्रांतिसिंह म्हणून ते ओळखले जात. त्यांचा जन्म ३ आॅगस्ट १९०० रोजी सांगली जिल्ह्यातील येडे मचिंद्र या खेड्यात एका शेतकरी कुटुंबात झाला. नानांचे वडील रामचंद्र हे गावचे पाटील होते. नानांचे प्राथमिक शिक्षण गावी झाले आणि ते मुलकीपरीक्षा उत्तीर्ण झाले (१९१६) यानंतर त्यांना तलाठ्याची नोकरी मिळाली पुढे सत्यशोधक चळवळीकडे ते आकृष्ट झाले. त्यांनी ग्रामीण भागातून दौरे काढून तत्कालीन अंधश्रद्धा, हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथा व चालीरीती यांविरुद्ध लोकमत जागृत केले. अनेक अनिष्ट चालीरीतीविरुद्ध त्यांनी बंड पुकारले. 🙏क्रांतीसूर्य नाना पाटील यांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन 🙏 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
980 views
6 days ago
⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳ 📜 २ ऑगस्ट इ.स.१६४८ ( श्रावण वद्य नवमी, शके १५७०, संवत्सर सर्वधारी, बुधवार ) शिरवळ स्वराज्यात :- शिवरायांनी १६४८ च्या सुमारास किल्ले कोंढाणा उर्फ सिंहगड स्वराज्यात घेऊन विजापूरच्या सत्तेला सरळ आवाहन दिले होते. विजापूरकर स्वराज्यावर चालून येणार हे लक्षात घेता त्याला नियोजन काय असावे ह्या विचारात महाराज आणि मुत्सद्दी होते. पण पावसाळा सुरू असताना विजापुरकर मोहीम करणार नाहीत हे सुद्धा ठाऊक होते आणि त्यामुळे भर पावसाळ्यात हालचाल करून अत्यंत मोक्याचे असे शिरवळ ठाणे ताब्यात घेतले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🚩 छत्रपती शिवाजी महाराज गाणी🎶 #🙏शिवदिनविशेष📜 #🙏 प्रेरणादायक बॅनर https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtube.com/shorts/Z1_YA1ypa_M?feature=share 📜 २ ऑगस्ट इ.स.१६६८ इंग्लंडच्या राजाने १६ जानेवारी १६६८ रोजी शिवाजी महाराजांना पत्र लिहून ईस्ट इंडिया कंपनीला व्यापारासाठी परवानगी दयावी म्हणुन विनंती केली..... उत्तरादाखल २ ऑगस्ट १६६८ रोजी महाराजांनी जे पत्र आपल्या वकिलामार्फ़त इंग्लंडच्या राजाला पाठवले त्यात त्यांचा मुत्सद्दीपणा आणि जागरूकता दिसून येते राजे म्हणतात..., “दगाबाजी केलियास दोस्ती राहणार नाही आणि कंपनिस ताकीद करावी की व्यापाराशिवाय दुसरे कामात शिरू नये.....” 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २ ऑगस्ट इ.स.१६७७ आपल्या दक्षिण मोहिमेत छत्रपती शिवाजी महाराज तिरुमल्लपाडीवरून २४ जुलै च्या दरम्यान वलीगंडापुराम ला आले.शेरखान पठाणाच्या या मुख्य ठाण्याचा भुईकोट किल्ला जिंकून महाराजानी तिथे यशवंतराव कदम यांना नामजाद केले.३०जुलैच्या पूर्वी मराठ्यांनी उटळूर चा कोटही जिंकला.या ठिकाणची हवालदारी नागोजी भोसले याना दिली गेली. तेथील सर्व व्यवस्था लावून महाराज वलीगंडापुरम सोडून तुंदुमगुर्ती ला आले.तिथून त्यांनी जवळच असणारे व्यंकोजीराजेंच्या एलवनसुर ह्या ठाण्याला जिंकण्यासाठी आपली एक सैन्य तुकडी पाठवून दिली.महाराज मात्र आपण स्वतः वृद्धाचलम च्या मंदिरात शिवदर्शन करण्यास गेले.मराठी सैन्याने व्यंकोजीराजेंचे वेलवान्सोर हे ठाणे घेतले ती तारीख होती २ ऑगस्ट १६७७ 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 २ ऑगस्ट इ.स.१६८० दि.५ मे १६८० च्या दरम्यान संभाजीराजेनी रामजी नाईक ठाकूर या आपल्या वकिलांबरोबर गोव्याचा विजरई अंतोनियो पाईस द सांदे याला सलोख्याचे पत्र पाठवून आपल्या वडिलांच्या दुःखद निधनाची बातमी दिली आणि आपण सत्ताधारी झाल्याचे कळवले होते आणि मराठे आणि पोर्तुगीज यांच्यात तह करण्यास सुचवले होते.विजरईनेही संभाजीराजेना पत्र पाठवून महाराजांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले होते व तहाच्या सूचनेला मान्यता दिली होती. शिवाय कोकणात शांतता राखण्यासाठी गेलेल्या रायाजी पंडित याला भेटीच्या वेळी आपण साष्ट व कुडाळ येथील फिरंगी अधिकाऱ्यांना युद्धविषयक हालचाली थांबवण्याचे आदेश दिल्याचे सांगितले होते. त्याचबरोबर रायाजी पंडितकडे संभाजीराजेंना भेट म्हणून एक सोन्याचा मुलामा दिलेली बंदूक व चार कापडाचे नगही दिले होते. दोन्ही बाजूंनी अशी शांततेची बोलणी सुरू असताना मराठ्यांचा डिचोलीचा सुभेदार मोरो दादाजी हा पोर्तुगीजांशी पूर्वीच्याच धोरणाने वागत होता.त्याने पोर्तुगीजांच्या बारदेश मधील सिओलीम हे गाव लुटून तेथील तीन माणसांना पकडले होते. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 २ ऑगस्ट इ.स.१६८० डिचोलीच्या मराठी सुभेदाराने बारदेश मधील सिओलीम गाव लुटले. २ ऑगस्ट इ.स.१६८० ५ मे १६८० दरम्यान छत्रपती संभाजीराजेंनी रामजी नाईक ठाकूर या आपल्या वकिलांबरोबर गोव्याचा विजरई अंतोनियो पाईस द सांदे याला सलोख्याचे पत्र पाठवून आपल्या वडिलांच्या दुःखद निधनाची बातमी दिली आणि आपण सत्ताधारी झाल्याचे कळवले होते आणि मराठे आणि पोर्तुगीज यांच्यात तह करण्यास सुचवले होते. विजरईनेही छत्रपती संभाजीराजेंना पत्र पाठवून महाराजांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले होते व तहाच्या सूचनेला मान्यता दिली होती. शिवाय कोकणात शांतता राखण्यासाठी गेलेल्या रायाजी पंडित याला भेटीच्या वेळी आपण साष्ट व कुडाळ येथील फिरंगी अधिकाऱ्यांना युद्धविषयक हालचाली थांबवण्याचे आदेश दिल्याचे सांगितले होते. त्याचबरोबर रायाजी पंडितकडे संभाजीराजेंना भेट म्हणून एक सोन्याचा मुलामा दिलेली बंदूक व चार कापडाचे नगही दिले होते. दोन्ही बाजूंनी अशी शांततेची बोलणी सुरू असताना मराठ्यांचा डिचोलीचा सुभेदार मोरो दादाजी हा पोर्तुगीजांशी पूर्वीच्याच धोरणाने वागत होता. त्याने पोर्तुगीजांच्या बारदेश मधील सिओलीम हे गाव लुटून तेथील तीन माणसांना पकडले होते. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २ ऑगस्ट इ.स.१७६० २ ऑगस्ट सन १७६० रोजी सदाशिवराव भाऊसाहेबांनी दिल्ली काबीज करून दिनांक १० ऑगस्ट सन १७६० रोजी परागंदा झालेल्या बादशहाच्या पुत्र शहजादा जवानबख्त याला वलीअहद म्हणजे युवराज बनवले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
1.6K views
7 days ago
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 📜 १ ऑगस्ट इ.स.१६४४ आदिलशहाचे एक फर्मान! "ज्याअर्थी राजे शहाजीराजे दरबारातून निर्वासित व अपमानित झाले व त्यांचा मुतालिक दादाजी कोंडदेव कोंडाण्याच्या बाजूस आहे (त्याअर्थी त्यांस) दफे करण्यासाठी व ती विलायत ताब्यात आणण्यासाठी खंडोजी व बाजी घोरपडे यांस तुमच्यासह नेमले आहे. तरी तुम्ही आपल्या हशमांसह मशारनिल्हे जवळ जाऊन त्यांच्या संमतीने दादाजी कोंडदेव व त्यांच्या संबंधिंना शिक्षा देऊन नेस्तनाबूत करा व ती विलायत ताब्यात आणा. ते तुमच्या उत्कर्षाचे कारण आहे. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🀊 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 #🚩 छत्रपती शिवाजी महाराज गाणी🎶 #🙏शिवदिनविशेष📜 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🙏 प्रेरणादायक बॅनर https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 📜 १ ऑगस्ट इ.स.१६७८ छत्रपती शिवरायांनी "पनवेल" प्रांत जिंकला. छत्रपती शिवाजीराजांनी राजांनी कल्याण, भिवंडी, पनवेल जिंकल्यावर कल्याणच्या खाडीत समुहुर्ताने आपल्या आरमाराची पहिली पठाने तरती केली, तसेच वसई व चौल कडील प्रदेश काबीज केला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १ ऑगस्ट इ.स.१६९४ संताजी घोरपडे, धनाजी जाधव, रामचंद्रपंत यांनी अनेक संयुक्त मोहिमा काढल्या एक मोगली बातमीपत्रात यांच्या एकत्रीत असणाऱ्या एका मोहिमेची बातमी कळते २२ जुलै १६९४ चे बातमीपत्रात तळबीडचा ठाणेदार अडाणी याने धनाजी जाधव व हणमंतराव (निंबाळकर) ससैन्य तळबीड जवळ आले असून धामधूम माजविली आहे हे कळते सोबत संताजी घोरपडे आहेत आणि रामचंद्रपंत येऊन सामील होणार असल्याचे देखील समजते यावर बादशहाने आज्ञा केली की हिंमतखानाने जाऊन गानिमांवर हल्ला चढवावा.., याच्याच नंतर रामचंद्र अमात्य येऊन मिळाल्याने मराठ्यांची कुमक वाढली असून ते साताऱ्याच्या आग्नेयस असणाऱ्या वारूगड काबीज करण्याचा त्यांना इरादा असावा यासाठी महिमानगडाच्या किल्लेदाराने बादशहास अधिक कुमकीसाठीच अर्ज केला याची तारीख होती १ ऑगस्ट १६९४ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १ ऑगस्ट इ.स.१७३४ (श्रावण शुद्ध त्रयोदशी, आनंदनाम संवत्सरी श्री शालिवाहन शके १५५६ रोजी गुरुवार) श्रीमंत बाजीराव (पहिले) पेशव्यांचे पहिले दोन पुत्र दीर्घकाळ जगू शकले नाही. यावेळेस काही अनुचित व अभद्र घडू नये म्हणून राधाबाईंनी(बाजीराव पेशव्यांच्या मातोश्री) सप्ताहास आणि अनुष्ठानास ब्राह्मण बसविले. पवित्रस्थानी अपत्य जन्मास यावे म्हणून काशिबाई साताऱ्यास माहुलीक्षेत्री राहायला आले. माहुलीला पेशव्यांचा एक लहानसा वाडा होता. आणि दि. १ ऑगस्ट १७३४, श्रावण शुद्ध त्रयोदशी, आनंदनाम संवत्सरी श्री शालिवाहन शके १५५६ रोजी गुरुवारी माहुलीच्या वाड्यात पुत्र जन्माला आला. बाळाचे बारसेही माहुलीलाच झाले. पेशव्यांच्या या नव्या पुत्राचे नाव ठेवण्यात आले 'रघुनाथ'. (हेच पुढे रघुनाथराव उर्फ राघोबादादा म्हणून प्रसिद्ध) साधारणतः त्याच सुमारास मस्तानीबाईंनाही पुत्रप्राप्ती झाली. या पुत्राचे नाव मस्तानीने 'कृष्णसिंह' ठेवले. रघुनाथपंतांच्या जन्मानंतर पुण्यात साखरा वाटण्याचा आणि चौघडा वाजविण्यासाठी चिमाजीआप्पांनी हुकूम सोडले. इकडे कृष्णसिंहाचा जन्म झाल्यानंतर त्या आनंदाप्रीत्यर्थ मस्तानीने खैरात वाटली. या दोन्ही पुत्रांच्या जन्माच्या वेळेस बाजीराव कुठे होते? बाजीराव होते कोकणात! छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून कोकणात पोर्तुगीज, इंग्रज, सिद्दी या परकीय सत्ता जम बसवत होत्या. महाराजांनी इंग्रज व पोर्तुगीजांना धाकात ठेवले होते. परंतु, सिद्दी मात्र उपद्रव देतच होता. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १ ऑगस्ट इ.स.१७५६ दि. १३ फेब्रुवारी रोजी कॅप्टन फोर्ड (फोर्ब्स?) हा साठ माणसांसह जमिनीवर उतरला. पण पेशव्यांची फौजही किल्ल्यात शिरायला तयार आहे, असे पाहून इंग्रजी आरमाराने मुद्दाम किल्ल्यावर तोफांचा मारा सुरूच ठेवला. संध्याकाळी फोर्ड गुपचूप किल्ल्यात शिरला आणि त्याने निशाण लावले. परंतु, त्याआधीच तुळाजी आंग्रे खंडोजी माणकरांच्या स्वाधीन झाले होते. तुळाजी अत्यंत शूर होते, यात शंकाच नाही. क्लाईव्ह आणि वॉटसनला ग. बर्शियरने स्पष्ट बजावले होते, "तुळाजी आंग्रे सापडल्यास मुंबईस आणावा. पेशव्यांचे हाती देऊ नये. कारण ते कदाचित त्यास पुनरपि मोकळा सोडतील आणि तो पुन्हा पहिल्यासारखा आपणास त्रास देऊ लागेल." बर्शियरच्या उपदेशावरूनच कल्पना येते. शिवाय विजयदुर्ग घेण्याचा त्यांचा मनसुबा होताच. त्यामुळे तुळाजी पेशव्यांच्या स्वाधीन झाले हे पाहताच पेशव्यांचे सैन्य विजयदुर्गात शिरण्याआधीच इंग्रजांनी शिताफीने किल्ल्याचा ताबा घेतला. इंग्रजांचे सैन्य प्रथम मराठे आणि किल्ल्याच्या मध्ये उतरले आणि बाहेरून इंग्रजी तोफांचा भडिमार सुरू असल्याने किल्ल्यातील उरलेल्या माणसांनी किल्ला इंग्रजांच्या स्वाधीन केला. दुसऱ्या दिवशी रामाजीपंत अॅडेमिरल वॉटसनच्या भेटीला गेले असता, वॉटसनने विजयदुर्गच्या हस्तांतरणासाठी गव्हर्नरच्या परवानगीची गरज असून त्याबदल्यात पेशव्यांनी तुळाजीला इंग्रजांच्या हाती सोपवावे, ही अट घातली. तहनाम्यात ठरल्याप्रमाणे पेशव्यांच्या संमतीने कलमे ठरविण्यात येण्याचे ठरले असल्याने रामाजीपंतांना अचानक विजयदुर्गच्या बदल्यात तुळाजींना हस्तांतरित करता येईना. रामाजीपंत स्पष्टपणे पेशव्यांना तसे कलवितात, “कजिया करावा तरी पातशाही सरदार... दरम्यान जनरल व तहनामा आहे म्हणोन उतावळी न करता आहो..." अखेरीस विजयदुर्गसाठी वॉटसनने अडवून धरले तसेच रामाजीपंतांनीही तुळाजींचा ताबा शेवटपर्यंत इंग्रजांना दिला नाही. पेशव्यांनी दि. २० जुलै रोजी पुण्यात आल्यानंतर मुंबईचा गव्हर्नर बर्शियरला अत्यंत कडक शब्दात 'आज्ञापत्र' पाठविले आणि विजयदुर्ग पुन्हा मागितला. यावर १ ऑगस्ट रोजी बर्शियरने अत्यंत नरमाईचे धोरण स्वीकारून पावसाळा संपताच विजयदुर्ग पुन्हा देण्याचे मान्य केले आणि आपले दोन वकील (टॉमस वायफिल्ड आणि जॉन स्पेन्सर) पुणे दरबारात पाठविले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १ ऑगस्ट इ.स.१७६० मराठा सेना पेशवे सदाशिवराव भाऊसाहेब यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत पोहोचली. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा अडीचशे वर्षांपूर्वी म्हणजे १ ऑगस्ट १७६० रोजी सदाशिवराव भाऊ यांनी दिल्लीचे तख्त पालटून टाकले. सुमारे ५०० वर्षे राज्य करणाऱ्या मुघलांना धूळ चारली आणि दिल्लीच्या तख्तावर मराठ्यांचे नाव काढले, त्या मर्द मरहट्ट्याला मानाचा मुजरा. म्हणूनच म्हंटले जाते. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १ ऑगस्ट इ.स.१९२० लोकमान्य टिळक पुण्यतिथी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. ज्या प्रमाणे चिखलात कमळ उगवते, त्या प्रमाणे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी २३ जुलै १८५६ रोजी झाला. टिळक हे बालपणापासूनच हुशार आणि स्वाभिमानी होते. टिळकांचे शिक्षण फर्गुसन कॉलेज मध्ये झाले पुढे टिळकांनी स्वताला देशकार्यास वाहून घेतले. त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल, हि शाळा स्थापन केली. लोकांमध्ये जागृती होण्यासाठी केसरी व मराठा ही दोन वर्तमानपत्रे सुरू केली. टिळकाच्या कार्याने धास्तावून इंग्रजांनी त्यांना अटक करून त्यांच्यावर खटला चालवला. न्यायालयात टिळकांनी "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच" अशी सिंहगर्जना केली. इंग्रजांनी टिळकांना ६ वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावून त्यांची रवानगी ब्रह्मदेशातल्या मंडाले तुरुंगात केली. तेथे टिळकांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला. स्वातंत्र्यपूर्व काळात, लोकांची एकी व्हावी म्हणून टिळकांनी गणेश चतुर्थी आणि शिवजयंती हे दोन उत्सव सुरू केले. जनतेने त्यांना प्रेमाने लोकमान्य ही पदवी दिली. असं हे बहुमूल्य रत्न मधुमेह व्याधीच्या निमित्ताने १ ऑगस्ट १९२० रोजी काळाने आपल्यापासून हिरावून घेतले. त्यांना शतशः प्रणाम. #जय_हिंद ! #जय_महाराष्ट्र ! 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १ ऑगस्ट इ.स.१९२० मराठी साहीत्य क्षेत्रात सर्वोच्च योगदान असलेले आणि मराठी साहीत्य तसेच छत्रपती शिवरायांचे चरीत्र पोवाड्यातून सातासमुद्रापार पोचवणारे "लोकशाहीर आण्णा भाऊ साठे" यांची आज जयंती. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
1K views
8 days ago
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 📜 ३१ जुलै इ.स.१६५७ छत्रपती शिवरायांनी "दंडाराजपुरी" स्वराज्यात दाखल केले. आदिलशहाच्या कारकिर्दीत नागोठाण्यापासून सावित्री नदी पर्यंतचा मुलुखाची सत्ता जंजिरा किल्ल्याच्या सिद्दीकडे होती. त्यांचे मुख्य ठाणे होते दंडा राजपुरी.सन १६१८ मध्ये सिद्दी सुरुलखान हा जंजिऱ्याचा पहिला हबशी सुभेदार होता.इसवीसन १६४२ मध्ये जंजिऱ्याचा सुभेदार सिद्दी अंबर मृत्यू पावल्यावर १६५५ पर्यंत सिद्दी युसूफ जंजिऱ्याचा सुभेदार होता.त्यानंतर सिद्दी फतहखान अधिकारावर आला. जंजिऱ्याच्या प्रदेशात पक्के पाय रोवलेले सिद्दी हे धर्मान्ध व अत्यंत क्रूर होते.दुबळ्या कोकणी प्रजेवर अत्याचाराची परिसीमा त्यांनी गाठली होती. जावळी पाठोपाठ उत्तर कोकण शिवाजी महाराजांनी जिंकल्यावर स्वराज्याची सीमा सिद्दीच्या मुलखाला जाऊन भिडली होती. प्रजेला जाचक ठरणाऱ्या या सिद्दीचा बंदोबस्त करण्यासाठी १६५७ च्या ऐन पावसाळ्यात महाराजांनी सिद्दीवर मोहीम काढायचे ठरवले. या मोहिमेसाठी महाराजांनी रघुनाथ बल्लाळ सबनीस यांची नेमणूक केली.त्यानुसार ५ ते ७ हजार सैन्यासह ते दंडा राजपुरीवर चालून गेले.रघुनाथपंतांनी दंडा राजपुरीवर हल्ला केला व जिंकून घेतले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🚩 छत्रपती शिवाजी महाराज गाणी🎶 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtu.be/M0MXlHc8yHY 📜 ३१ जुलै इ.स.१६८३ (श्रावण वद्य ३, नृतीया, शके १६०५, रुधिरोद्वारी संवत्सर, वार मंगळवार) सुरतकर इंग्रजांचे मुंबईकर इंग्रजांना पत्र ! सुरतकर इंग्रजांचे मुंबईकर इंग्रजांना लिहीलेले एक पत्र उपलब्ध असून त्यात, छत्रपती संभाजी महाराज स्वार होऊन राजापुरास गेले. फिरंग्यांशी बिघाड केला. रेवदंडा यासी वेढा घातला. या आशयाचे हे पत्र असून या सुमारास छत्रपती संभाजी महाराज स्वतः युद्ध नेतृत्व करत असल्याचे निदर्शनास येते. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ३१ जुलै इ.स.१८५७ १८५७ च्या प्रथम स्वातंत्र्यलढ्यातील महाराष्ट्राचा सहभाग कोल्हापूर:इथल्या २७ व्या नेटिव-देशी पायदळ तुकडीतील २०० सैनिकांनी ३१ जुलै १८५७ ला उठाव करून इंग्रज अधिकाऱ्यांच्या घरांवर हल्ले करून तिघा अधिकाऱ्यांना ठार मारले.नंतर स्थानिक जनता पण ह्या उठावात सामील झाली.ह्या उठावाचे नेते कोल्हापूर महाराजांचे धाकटे बंधू चिमासाहेब हे होते. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ३१ जुलै इ.स.१८९७ द्वितीय छत्रपती राजाराम महाराज यांचा जन्मदिवस लोकराजा ही पदवी मिळालेल्या कर्तुत्ववान पित्याचे हे पुत्र. म्हणजेचं राजर्षी शाहू महाराज यांचे ज्येष्ठ चिरंजीव छत्रपती राजाराम आज्याचेच, पंज्याचे नाव नातू पणतू यांना देण्याच्या परंपरेमुळे छत्रपती घराण्यातील या दुसऱ्या राजाराम महाराजांची दखल तशी जास्त कुणी घेतलीच नाही, कोल्हापूर मधली अत्ता शेवटच्या अवस्थेत असलेल्या पिढीचा जर अपवाद सोडला तर यांच्याविषयी जर समाजात माहिती असली तरच नवल समजाव. वडिलांच्याच पावलावर पाउल टाकत समाज हिताची कामे करणारया या राजांनी अनेक मोठमोठी कार्य पार पाडली. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी जे राधानगरी धरणाचे बांधकाम सुरु केले होते, ते बांधकाम शाहूराजांच्या पश्चात पूर्णत्वास नेण्याचे मोठे काम राजाराम महाराजांनी केले. आजही सुजलाम सुफलाम असलेल्या कोल्हापूरची बीजे जणू शाहू राजांनी रोवली आणि त्यास वाढविण्याचे, राखण्याचे कार्य राजाराम महाराजांनी केले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ३१ जुलै इ.स.१९४० क्रांतिकारी उधमसिंग बलिदान दिन लंडनमधल्या कोर्टात खटला चालून क्रांतिकारी उधमसिंगांना ३१ जुलै १९४० रोजी लंडनमधल्या पेंटॉनव्हिले तुरुंगातच फाशी झाली आणि त्यांचे प्रेतही तुरुंगाच्या आवारातच पुरले गेले. १३ मार्च १८४० रोजी लंडनमधल्या कॅक्स्टन हॉलमध्ये ब्रिगेडियर जनरल सर पर्सी साईक्सचं अफगाणिस्तानबद्दल भाषण चाललं होतं. भाषण संपल्यावर भारतमंत्री लॉर्ड झेटलंडने कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले. ह्या कार्यक्रमाला मुंबईचा पूर्वीचा गव्हर्नर लॉर्ड लॅमिंग्टन आणि पंजाबचा पूर्वीचा गव्हर्नर सर लुईस डेन हेही उपस्थित होते. ह्या कार्यक्रमाला अजून दोन लोक उपस्थित होते - ते म्हणजे पंजाबचा पूर्वीचा अजू एक गव्हर्नर सर मायकेल ओ’ड्वायर आणि ‘मोहम्मद सिंग आझाद’ हे नाव (नाव नीट वाचा म्हणजे गंमत कळेल!) घेऊन तिथे आलेला भारतीय क्रांतिकारी उधम सिंग! कसेबसे पैसे जमा करून फक्त जालियनवाला हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी लंडनमध्ये आलेल्या उधम सिंगांनी इथे लंडनमध्ये चरितार्थ चालवण्यासाठी अनेक फुटकळ कामे केली. गाड्या दुरुस्त करणे, रंगारीकाम, सुतारकाम वगैरे. एक सहसा माहीत नसलेली गोष्ट म्हणजे त्यांना अभिनयाचेही अंग होते. त्यांनी लंडनमध्ये असताना ‘द फोर फेदर्स’ व ‘एलिफंट बॉय’ या दोन इंग्रजी चित्रपटांत कामही केले होते. (‘एलिफंट बॉय’ ची लिंक खाली देतोय.) पण हे सगळं वरवरचं होतं. त्यांचा लंडनला यायचा मूळ हेतू जालियनवाला हत्याकांडाचा बदला घेणे हाच होता आणि ते संधीची वाटच पहात होते. कॅक्स्टन हॉलच्या सभेचं आमंत्रण त्यांना मिळालं. मग त्यांनी तयारी सुरु केली. बोर्नमाऊथला जाऊन एका इंग्रज शिपायाकडून जाऊन एक जुनं पिस्तूल आणि गोळ्या विकत घेतल्या. एका पुस्तकात त्या पिस्तुलाच्या आकाराची पोकळी बनवून त्यात ते लपवलं. सोबत खिशात एक चाकूही घेतला. १३ मार्च रोजीच्या सभेला उधमसिंगांनी मोहम्मद सिंग आझाद ह्या नावाने मस्त सूट - टाय - ट्रिल्बी हॅट वगैरे त्यावेळचा टिपिकल इंग्रजी पोशाख घालून हॉलमध्ये ऐटीत एंट्री केली. वर सांगितलेले साईक्सचे भाषण संपताच त्यांनी पुस्तकातून पिस्तुल काढून सहा गोळ्या झाडल्या. दोन गोळ्या ओ’ड्वायरला लागल्या आणि तो तिथेच गतप्राण झाला. दोन गोळ्या लॉर्ड झेटलंडला चाटून गेल्या. एक गोळी सर लुईस डेनच्या मनगटावर लागली तर एक गोळी लॉर्ड लॅमिंग्टनच्या हाताला लागली. दोन लोकांनी लगेच झडप मारून उधमसिंगांना पकडले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀