फॉलो करा
सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
@159107303
3,776
पोस्ट
10,165
फॉलोअर्स
सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
587 जणांनी पाहिले
13 तासांपूर्वी
⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳ 📜 २ ऑक्टोबर इ.स.१६७० (अश्विन वद्य चतुर्दशी, शके १५९२, संवत्सर साधारण, वार रविवार) महाराज सुरतेजवळ २० कोसावर आल्याची बातमी सुरत शहरात पोहोचली! #द्वितीय_सुरत_लूट! छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यात झालेला पुरंदरचा तह सण १६६९ च्या अखेरपर्यंत कसाबसा टिकला.औरंगजेबाने महाराजांची वऱ्हाडातील जहागीर जप्त केल्याने महाराजांनीही मुघली मुलुख लुटायला सुरुवात केली. याबरोबरच पुरंदरच्या तहात दिलेले किल्ले त्यांनी परत घेण्याची मोहीम सुरू केली.यादरम्यान मुघलांचा दख्खनचा सुभेदार शहजादा मुअज्जम आणि त्यांचा सरदार दिलेरखान यांच्यात वैर सुरू होते.या भांडणाचा उपयोग करून घेत शिवाजी महाराजांनी ऑगस्ट महिन्यात रायगड सोडला आणि ते मोरोपंतांसह जुन्नरला आले.जुन्नरची मोहीम पंताकडे सोपवून महाराज १५ हजार फौजेसह कल्याणकडे वळले.महाराजांचा रोख होता मुघलांची ऐश्वर्यनगरी सुरतेवर.एप्रिल महिन्यापासून महाराज सुरतेवर चालून येणार असल्याच्या अफवा पसरल्या असतानाही सुरतेचा सुभेदार बेसावध राहिला. शिवाजी महाराज आपल्या १५ हजार सैन्यासह सुरतेच्या अलीकडे २० कोसावर येऊन पोहोचले होते.शिवाजी महाराज सुरतेजवळ २० कोसावर आल्याची बातमी सुरत शहरात पोहोचली. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩शिवराय https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtu.be/4npRM_vueZU 📜 २ ऑक्टोंबर इ.स.१६८३ छत्रपती संभाजीराजेंनी पोर्तुगीजांवर स्वारी केल्यावर मराठी मुलखाला सिद्दीचा उपद्रव कमी झाल्याची इंग्रजांच्या पत्रातील नोंद. इंग्रजांच्या आश्रयाने सिद्दीच्या मराठी मुलखात कुरापती सुरू होत्या. त्यातच मुघलांनीही आक्रमक पवित्रा घेतला होता. अश्यावेळी सिद्दी, इंग्रज आणि मुघल एक झाले तर ते मराठ्यांना त्रासदायक ठरले असते. त्यामुळे इंग्रजाशी सिद्दी संबंधीची आणि तहाची बोलणी करण्यासाठी संभाजीराजेंनी आपले न्यायाधीश प्रल्हाद निराजी यांना मुंबईला पाठवले. प्रल्हाद निराजींना इंग्रजांनी बरेच दिवस त्यांच्या मागण्यांना उत्तर न देता ठेऊन घेतले. पुढे इंग्रजांनी त्यांचा वकील हेन्री स्मिथ ह्याला छत्रपती शंभुराजेंच्याकडे तहाचे फर्मान आणण्यासाठी पाठवला. राजेंनीही इंग्रजांना जशास तसे उत्तर देत हेन्रीला बरेच दिवस अडकवून ठेवले. यानंतरही इंग्रजांनी सिद्दीचा बंदोबस्त केला नव्हता. सिद्दीच्या उपद्रवाबद्दल इंग्रजांची नोंद मुंबईकरांनी वरचेवर सांगूनही सुरतकरांनी सिद्दीचा बंदोबस्त केला नव्हता, परंतु छत्रपती संभाजीराजांनी पोर्तुगीजांविरुद्ध गोव्यावर स्वारी केल्यावर सिद्दीला ऑक्टोबर इ.स.१६८३ मध्ये वेंगुर्लाला जावे लागले. त्यामुळे काही काळ त्याचा उपद्रव कमी झाला होता. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 २ ऑक्टोबर इ.स.१६८३ (अश्विन वद्य ७, सप्तमी, शके १६०५, रुधिरोद्वारी संवत्सर, वार मंगळवार) बादशहा औरंगजेबाने सिद्दीला पाठवलेल्या फर्माना संबंधीची इंग्रजाच्या पत्रातील नोंद! सन १६८३ सालात संभाजीराजेंनी पोर्तुगीजांवर स्वारी केली. या मोहिमेत शहजादा अकबर राजेंच्या बरोबर होता.हे समजताच औरंगजेबाने सिद्दीला तिकडे जाण्यास सांगितले. यासंबंधी सुरतकर इंग्रजांची नोंद,"बादशाहाने सिद्दीस फर्मान पाठवून त्याला आपले आरमार सज्ज करून ताबडतोब किनाऱ्यावरून खाली डिचोलीस जायला सांगितले आहे.सुलतान अकबर तिथे आहे.त्याच्यावर पाळत ठेवण्याचे काम त्याच्यावर आहे.त्याला अडवणे म्हणजे पादशहाशी लढाई पुकारण्यासारखे आहे.पादसशहाच्या मनात कशी व केंव्हा चलबिचल होईल हे सांगता येणे शक्य नाही.तो भयंकर तिरसट आणि अस्वस्थ झाला आहे. सरदार अकबरावर ममता धरतात असा आधाराविना संशय घेऊन बादशहा मोठमोठ्या सरदारांचा अवमान करत आहे.आणि तेही त्याच्याशी काळजीने वागत आहेत.सुलतान अजमतारा,बेगम आणि दिलेरखान यांना निष्कारण बडतर्फ किंवा अवमानित केले आहे. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 २ ऑक्टोबर इ.स.१८०४ २ ऑक्टोबर १८०४ रोजी पेशव्यांनी गायकवाडास अहमदाबादचा इजारा वार्षिक रू. ४ लाखांच्या करारान १० वर्षाच्या बोलीने दिला. त्याची वहिवाट भगवंतराव गायकवाडास सांगितली. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 २ ऑक्टोबर इ.स.१८६९ महात्मा गांधी जन्मदिवस! शके १७९१ च्या भाद्रपद व. १२ ला गुजरातमधील पोरचंदर या गावचे करमचंद गांधी यांना शेवटचे अपत्य झाले त्याचे नांव मोहनदास. हेच पुढे महात्मा गांधी म्हणून प्रसिद्धीस आले. गुजरातची भूमि मूळचीच मऊ व प्रेमळ आहे. श्रीकृष्णाची द्वारका गुजराथमध्येच आहे. या कृष्णाची प्रेमगीते गाणारी मिराबाई, प्रसिद्ध 'वैष्णवजन' नरसी मेहता, आदि भज्ञांच्या वास्तव्याने पवित्र बनलेल्या गुजराथमध्ये महात्मा गांधींचा जन्म झाला. मोहनदासांचे वडील करमचंद वर्णाने वैश्य व पंथाने वैष्णव होते. गांधींची आई पुतळीचाई साध्वी, भाविक, व्यवहारकुशल आणि व्रतवैकल्य करणारी होती. अशा या थोर आईचापांच्या पोटी मोहनदास गांधीजी जन्मास आले. महात्मा गांधींचे नांव भारतांतच नव्हे तर सर्व जगाच्या कानाकोपऱ्यांतून दुमदुमून राहिले आहे. सत्य, अहिंसा, अपरिग्रह, त्याग, शांति, सच्चारित्र्य, क्षमा, आदि विसाव्या शतकांत पोरक्या झालेल्या दैवी गुणांनी आपल्यासाठी निवासस्थान म्हणून ' महात्मा गांधी' या महापुरुषाच्या विशाल हृदयाची निवड केली होती. आपल्या अभिनव अशा जकीय तत्वज्ञानाने गांधीनी सर्व जगाचे डोळे दिपवून टाकले ! त्यांचे तत्त्वज्ञान अंतराळांत भराया मारणारे नसून ते दरिद्रो माणसाच्या झोपडीतून जन्माप्त आले असल्यामुळे ते ' दरिद्रीनारायणा'च्या मालकीचे आहे. कविवर्य रवीन्द्रनाथ टागोरांना एका पत्रांत महात्माजी लिहितात.-" कविराज, तुम्ही म्हणता, प्रातःकालच्या समयीं पक्षी घरट्यांतून बाहेर पडून आकाशांत उंच उंच भराया मारतो आणि भराच्या मारता मारतां परमेश्वराचे गुणगान करतो त्याकडे पहा... पण माझ्या डोळ्यापुढे हिंदुस्थानांतील हे क्रोडो पक्षी दिसत आहेत. त्यांना अन्न नाही म्हणून उडण्याची शचिहि नाही. दिवसभर थकून रात्री जेव्हा हे पक्षी निजतात, त्यापेक्षा अधिक थकवा ते दुसन्या दिवशी उठतात तेव्हा त्यांच्या अंगी असतो!-" स्वतःच्या मायभूमीसाठी गांधीजी जगले आणि तिच्या अभ्युदयासाठीच आपल्या जीवनाचे त्यांनी बलिदान कलें. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
9.4K जणांनी पाहिले
1 दिवसांपूर्वी
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳ 📜 १ ऑक्टोबर इ.स.१६५७ ( अश्विन शुद्ध चतुर्थी, शके १५७९, संवत्सर हेमलंबी, गुरुवार ) शिवराय कल्याणच्या दिशेने रवाना झाले ! शहाजहानच्या आजारामुळे उत्तरेचे राजकारण तापू लागले होते. औरंग्याला सुद्धा दक्षिणेस रस उरला न्हवता. त्यामुळे ह्या स्थितीचा फायदा उचलण्याचे ठरवून आपल्या हशंबखान या सारदारास कल्याण भिवंडीच्या मोहिमेवर पाठवले. मात्र मोगली सरदार मोहम्मद युसूफ सुद्धा कल्याण चा ताबा घेण्यासाठी आला असता दोघांची गाठ पडून उडालेल्या चकमकीत हशंबखान धारातीर्थ झाल्याचे वृत्त कळताच महाराज कल्याण - भिवंडी च्या दिशेने जाण्यास राजगड उतरले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtu.be/Z87lukRhmt4 📜 १ ऑक्टोबर इ.स.१६७७ मराठ्यांच्या इतिहासातील एक गूढ आणि अतर्क्य घटना म्हणजे शंभुराजेंचे दिलेरखानाच्या गोटात जाणे. लढाईत मराठ्यांचा पराभव करता येत नसल्याने औरंगजेबाने इतर मार्गाने त्यांना नामोहरम करण्याचे प्रयत्न चालवले होते.मुघल सुभेदार बहाद्दूर खानाने शिवाजी महाराजांच्या सैन्याशी अनेक लढाया केल्या होत्या, पण त्याला हवे तसे यश मिळाले नव्हते.उलट सतत अपयशी ठरल्याने मुघल दरबारात त्याची अपप्रतिष्ठा झाली होती.त्यातच औरंगजेबाला हेरामार्फत शंभुराजे नाराज असल्याची बातमी त्याला समजली.या संधीचा लाभ घेण्यासाठी औरंगजेबाने एक योजना बनवली.15 सप्टेंबर 1677 च्या दरम्यान त्याने दख्खनचा सुभेदार बहाद्दूरखानाला दरबारी परत बोलावले आणि त्याच्या जागी दिलेरखान या अनुभवी सेनापतीची निवड केली.पुढच्या काळात दिलेरखानाने शंभुराजेंशी पत्रव्यवहार करून त्यांना आपल्या बाजूला वळवून घेतले.बहादूर खानाला परत बोलावून त्या जागी दिलेरखानाची नेमणूक केली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १ ऑक्टोबर इ.स.१७११ चंद्रसेन जाधव हे शाहूंराजांकडून महाराणी ताराबाईंना सामील झाले. महाराणी ताराबाईनी चंद्रसेन जाधवांचे सहर्ष स्वागत केले. शाहू राजांची बाजू यावेळी फारच कमकुवत होती. चंद्रसेन जाधवरावांच्या अगोदर सावंतवाडीचे सावंत, आंग्रे, खंडेराव दाभाडे अशी मातबर मंडळी ताराबाईना मिळाली होतीच. चंद्रसेन जाधवांनी हैबतराव निंबाळकरास चिथावून त्यास ताराबाईंच्या पक्षास आणण्याचा प्रयत्न सुरू केला. अशा वेळी परसोजी भोसले व चिमणाजी दामोदर हे दोन सरदार शाहू राजांच्या बाजूचे राहिले, पण ते खानदेशकडे होते. शाहू राजांचा पक्ष फारच कमकुवत झाला होता. मोठी दुरावस्था प्राप्त झाली होती. तरी शाहू राजे डगमगले नाहीत. त्यांनी चंद्रसेन जाधवांकडील सेनापतीपद काढून ते ता. १ ऑक्टोबर १७११ रोजी त्यांचे बंधू संताजी यास दिले. बाळाजी विश्वनाथांनी यावेळी पुढे सरसावून शाहू राजांची बाजू सावरून धरली. बाळाजींनी पिलाजी जाधव, पुरंदरे यांच्या सहाय्याने सावकारांकडून कर्ज काढले. फौज उभी केली. हीच फौज पुढे “हुजूर फौज”, “हुजूर पागा” म्हणून प्रसिद्ध पावली. सावकारांच्या कर्जास तारण पाहिजे म्हणून शाहू राजांकडून बाळाजींनी पंचवीस लाखाचा सरंजाम करून घेतला (२१ ऑगस्ट १७११). 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १ ऑक्टोबर इ.स.१७२४ साखरखेर्डा लढाई - निझामाने मोगलांचा पराभव केला दख्खनमधील आपल्या भावी आव्हानाची पुरेपूर कल्पना निजामाला येऊन चुकली. बादशहाने निजामाचा नि:पात करण्यास धाडलेल्या मुबारिजखानाला सामोरे जाण्यासाठी निजामाने बाजीरावांच्या साह्याची याचना केली आणि ते तातडीने त्याच्या मदतीला धावून गेले. १ ऑक्टोबर १७२४ला शक्करखेडा लढाईत मुबारिजखानाचा पराभव झाला. निजामाने मराठय़ांना चौथ देण्याचे आश्‍वासन दिले. याशिवाय, या लढाईदरम्यान निजामानिकट वावरल्याने त्याच्या डावपेच आणि विचारसरणीमध्ये जवळून डोकावून पाहण्याची संधी बाजीरावांना मिळाली. या अमूल्य उपहाराचा बाजीरावांनी निजामाबरोबरील भावी लढायांत पुरेपूर उपयोग केला. या विजयामुळेच निजामाच्या दक्षिणेच्या स्वातंत्र्यावर शिक्कामोर्तब झाले. निजामाने मोगल बादशाह मोहम्मद शाह याला सविस्तर पत्र लिहून माफी मागितली. त्यामुळे बादशाहने त्याला परत दक्षिणेची सुभेदारी बहाल केली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १ ऑक्टोबर इ.स.१७५९ दि. १ ऑक्टोबर १७५९. या दिवशी नानासाहेब पेशव्यांनी समशेरबहाद्दरांना साहेबनौबतीचा मान दिला. समशेरबहाद्दरांनी याआधी कितीतरी वेळा तलवार गाजवली होती. तुळाजी आंग्र्यांच्या मोहिमेत समशेरबहाद्दरांनी १८ फेब्रुवारी १७५६ रोजी रत्नागिरीचा किल्ला जिंकला. रघुनाथरावांच्या 'अटकेवरील' स्वारीत यांनी दिल्लीची आघाडी सांभाळली. यानंतर बुंदेलखंडात राजा छत्रसालांचे नातू म्हणजे समशेरबहाद्दरांचे मामेभाऊ जगतराय पुत्र हिंदुपताचा मृत्यू झाला. हिंदुपतांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पुत्रांमधली भाऊबंदकी मिटवून न्याय देण्यात समशेरबहाद्दरांचा महत्त्वाचा वाटा होता. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १ ऑक्टोबर इ.स.१७४९ 'आपले खावंद' म्हणून नानासाहेबांना शाहूमहाराजांबद्दल खूप आदर वाटत असे. इ. स. १७४९ च्या मध्यापासून शाहूमहाराजांच्या तब्येतीत बिघाड होऊ लागला. शाहूमहाराज सत्तरीच्या आसपास पोहोचले होते. आपले आता फार काळ जगणे नाही म्हणून महाराजांनी ऑगस्ट १७४९ मध्ये नानासाहेबांना साताऱ्यात बोलावून घेतले. दि. १ ऑक्टोबर १७४९ या दिवशी शाहूमहाराजांनी गोविंद खंडेराव चिटणीस (खंडो बल्लाळ चिटणीसांचा पुत्र) यांना बोलावून आपल्या माघारी राज्याच्या कारभाराची यादी म्हणजे एकप्रकारे एक मृत्युपत्रच तयार करून घेतले. आजार बरा होईल असे वाटत नव्हते. यातच चिंतेची बाब म्हणजे शाहूमहाराजांना मुलगा नव्हता. नानांनाच ते आपल्या मुलासारखा मानत असत. आपल्या माघारी राज्य आणि प्रजा सांभाळू शकेल असा अन्य कोणीही सरदार वा विश्वासू व्यक्ती न दिसल्याने शाहूमहाराजांनी नानासाहेबांपासून पुढे 'पेशवाई' ही भट घराण्याकडे कायम वंशपरंपरागत करून दिली व साऱ्या कारभाराची सूत्रे पेशव्यांकडे सोपवली आणि अखेरची निरवानिरव करून दि. १५ डिसेंबर १७४९ रोजी शाहूमहाराज साताऱ्यात मृत्यू पावले. योद्धा शिवछत्रपती महाराजांपासूनचे भोसल्यांचे जनक राजपद संपले. आता साताऱ्याच्या गादीवर भोसले कुळातीलच कोणालातरी दत्तक घ्यावे लागणार होते. म्हणूनच कोल्हापूरकर, ताराबाई आणि राजारामांचा नातू, शिवाजीपुत्र राजाराम (दुसरे) यांना नानासाहेबांनी दि. ४ जानेवारी १७५० या दिवशी साताऱ्याच्या गादीवर अभिषेक केला. वास्तविक शाहूमहाराजांच्या मृत्यूनंतर सातारा आणि कोल्हापूरची गादी एक करून, पुन्हा 'एकच' अखंड स्वराज्य निर्माण करण्याची नानासाहेबांची इच्छा होती. त्याकरता या नव्या राज्याचा अधिकारी म्हणून कोल्हापूरकर संभाजीराजालाच नेमण्याचा नानासाहेबांचा विचार होता. परंतु आपल्याला गादीवर बसले तरी सारा कारभार मात्र पेशवे नानासाहेबच बघणार, मग आपण नाममात्रच राहणार या चिंतेने संभाजीरावांनी नानासाहेबांच्या या प्रस्तावाला विरोध दर्शवला. त्यामुळे संभाजीराजांशी जास्त वाद न घालता नानासाहेबांनी त्यांचे सावत्र पुतणे, राजाराम यांना सातारा गादीवर बसवले. अभिषेकानंतर महादजीपंत पुरंदऱ्यांच्या मदतीने आणि मोरोबादादा फडणिसांच्या सल्ल्याने नानासाहेबांनी दरबारातील सर्व सरदारांची पुनर्व्यवस्था लावून दिली आणि आपली विश्वासू माणसे सातारा दरबारात ठेवून दि. २२ एप्रिल सन १७५० रोजी नानासाहेब पुण्याला आले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १ ऑक्टोबर इ.स.१८१२ महाराणी ताराबाई भोसलेंची गादी ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली संभाजीनंतर कोल्हापूरच्या गादीवर शिवाजी द्वितीय (कोल्हापूर) या दत्तक पुत्राची कारकीर्द इ.स. १७६२ ते १८१३ अशी झाली. याच्या कारकीर्दीत १ ऑक्टोबर १८१२ रोजी कोल्हापूर संस्थानाचा ईस्ट इंडिया कंपनी सरकारबरोबर संरक्षणात्मक करार होऊन ते ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली आले. त्यानंतर १८१३ मध्ये शिवाजी महाराज द्वितीय (कोल्हापूर) यांचे निधन झाले. कवी गोविंद यांनी सेनानी महाराणी ताराबाईंच्या पराक्रमाचे वर्णन पुढीप्रमाणे केले आहे. दिल्ली झाली दीनवाणी। दिल्लीशाचे गेले पाणी। ताराबाई रामराणी। भद्रकाली कोपली।। रामराणी भद्रकाली। रणरंगी क्रुद्ध झाली। प्रलयाची वेळ आली। मुगल हो सांभाळ।। 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
736 जणांनी पाहिले
2 दिवसांपूर्वी
⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳ 📜 २९ सप्टेंबर इ.स.१६३५ स्वता शहाजहान बादशहा थोरले महाराज साहेब फर्जद शहाजी राजेंचा बीमोड करण्यासाठी निघाला आणि तडक दौलताबादेस आला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #📜इतिहास शिवरायांचा #🚩शिवराय https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtube.com/shorts/9JQlP8CarDw?feature=share 📜 २९ सप्टेंबर इ.स १६८२ छत्रपती संभाजीराजेंच्या भीतीने मुंबईकर इंग्रज सिद्दीला मुंबईत आश्रय देत नव्हते पण सुरतकर इंग्रजांच्या दडपणामुळे ९ मे १६८२ ला त्यांना सिद्दीला मुंबईत प्रवेश देणे भाग पडले. सिद्दी कासम मुंबईत आल्याचे समजताच मराठ्यांनीही आपली ४० गलबते खांदेरीवर पाठवली. तरीही सिद्दीने ऑगस्ट अखेरीस नागोठणे येथे जाऊन मराठी मुलखात लूटमार केली व बऱ्याच लोकांची नाके कापली आणि एका हवालदाराला पकडून नेले. तरीही सुरतकर मुंबईकरांना सिद्दीला १० हजार रुपयांचा सर्व प्रकारचा माल आणि त्यांच्या कुटुंबांना मुंबईत आसरा दयायला सांगत होते. सिद्दीला मदत करण्याच्या सुरतकर इंग्रजांच्या या धोरणाबद्दल नापसंती व्यक्त करत मुंबईकरांनी लिहिले की,"मागील वेळेप्रमाणेच याही वेळी सिद्दीचे लोक राहिल्याने अन्नाचे दुर्भिक्ष वाढेल,दृष्ट लोकांना आसरा देऊन त्यांच्याशी सामोपचाराने वागणे कठीण आहे. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 २९ सप्टेंबर इ.स.१६८९ सर सुभेदार श्रीमंत हरजीराजे महाडीक यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन हिंदवी स्वराज्य साकारण्यासाठी सोळाव्या शतकापासून एकवि साव्या शतकापर्यंत देव,देश आणि धर्मासाठी झुंजलेले आणि राजेभोसले घराण्याशी एकनिष्ठ राहिलेलं एक शूर मराठा सरदार घराणे म्हणजे राजेमहाडीक घराणे. हे श्रीमंत मराठा सरदार घराणे इतिहासात खूप प्रसिद्ध होते. सोळाव्या शतकात हे महाडला आले महाड वरून त्यांना राजेमहाडिक असे आडनाव पडले .त्यांचे महापुरुष कृष्णाजीराजे १६१४ ला युसूफ आदिलशहाच्या लुटालूटीत मरण पावले . त्यांच्याकडे दाभोळची मुकादमकी होती .नंतर शिवाजी महाराजांची स्वराज्य निर्माण करण्याची सुरुवात झाल्यावर कृष्णा जींचे बंधू कान्होजी यांना ही मुकादमकी मिळाली. कान्होजी १६५० ला युद्धात मरण पावले . त्यांचा मुलगा परसोजी हे शहाजीराजांचे बरोबर कर्नाटकात मदत करत असताना मरण पावले. त्यांचा मुलगा हरजीराजे राजेमहाडिक यांच्यावर शहाजीराजांचे चांगलेच लक्ष होते. हरजीराजे शिवाजी महाराजांचे विश्वासू सरदार होते .जी मोहिम छत्रपती देतील ती मोहीम यशस्वी करूनच हरजीराजे येत होते.छत्रपती शिवरायांनी हरजीराजे यांच्या कर्नाटकातील कामगिरीवर खुश होऊन सोन्याची जेजूरी गडावर हरजीराजांना" राजेशाही " हा किताब सन्मानार्थ देऊ केला. राज्याच्या महत्त्वाचा जिंजी प्रांत हा मोगलांपासून मुक्त ठेवण्याचे श्रेय हरजीराजे महाडिक यांना आहे अशा कर्तबगार राजेमहाडिक घराण्यामुळे त्यांचे नाव इतिहासात अजरामर झाले आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात हरजीराजे महाडिक यांनी कर्नाटक सह दक्षिण प्रांत औरंगजेबाच्या झंजावाती आक्रमणापासून वाचवला. त्यांनी त्यावेळी जिंजी व वेल्लोर,मद्रास ,म्हैसूर ,अर्काट, बंगळूर आधी प्रांत म्हणजे संपूर्ण कर्नाटक व तामिळनाडू हरजीराजे ने जिंजीच्या आधिपत्याखाली आणले. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज १६८९ मध्ये जिंजीस आले. तेथे राजधानी घोषित करून तेथूनच काही काळ राज्यकारभार केला.छ. संभाजी राजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब हा मराठी राज्य गिळंकृत करण्यास टपला होता. मात्र हरजीराजे नेहमी त्याच्या आड आले. दक्षिण प्रांतात मोगली फौजा धुमाकूळ घालत होत्या. अशावेळी हरजीराजे यांनी जिंजी परिसर स्वराज्यात ठेवला ही त्यांची कामगिरी अद्वितीयच म्हणावी लागेल. त्यांच्या शूरवीरतेच्या गुणामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली मुलगी अंबिकाबाई यांचा हात विश्वासाने सन. १६६८ ला श्रीमंत हरजीराजे यांच्या हाती दिला व हा विवाह राजगडावर संपन्न झाला. पुढे शिवरायांच्या मृत्यू झाल्यानंतरही हरजीराजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या बरोबर ईमानाने वागले .म्हणूनच दक्षिण भारताची जबाबदारी शिवरायांनी त्यांच्याकडे ठेवली होती.ती संभाजीराजेंनीही परत त्यांच्याकडेच कायम ठेवली . हरजीराजे त्यांच्या पराक्रमामुळे छत्रपतींचे मन जिंकून घेतले व संभाजी राजेंच्या मृत्यु नंतर छत्रपती राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीत स्वराज्य रक्षणासाठी पराक्रम गाजवले.औरंगजेबाचा सरदार जुल्फिकारखान या सरदाराशी लढता लढता दि.२९ सप्टेंबर १६८९ ला हरजीराजे जिंजी येथे तोफेचा गोळा लागून धारातिर्थी पडले. पुढे हरजीराजे कांचीवर (कर्नाटक प्रांत) चाल करून गेले त्यांच्या पराक्रमापुढे कांची ही नमली व हरजीराजे महाडिक यांनी कांचीही जिंकून घेतली, संभाजीराजेंच्या मृत्यूनंतर छञपती राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीत स्वराज्य रक्षणासाठी हरजीराजेंनी जिंजीत शौर्य पराक्रम गाजवले.पुढे हरजीराजे महाडीक यांचे पुत्र शंकराजी महाडीकांना छत्रपती संभाजी महाराज यांनी आपली मुलगी भवानीबाई यांचे लग्न लावून दिले. १७०९ मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी भवानीबाई व शंकराजी राजेमहाडिक यांना तारळे महालाअंतर्गत 24 गावे व 72 वाड्यांची पाचही वतनाची सनद करून दिली. सनदेप्रमाणे भवानीबाई व शंकराजीराजे तारळ्यात आले.त्याच्या आधी मोगलांनी तारळे महालाची वाताहात केली होती .अशावेळी हनगोजी काटे देशमुख , सिदोजी , विठोजी साळवे- देशमुख , देशपांडे, मुकादम , कुलकर्णी , शेटे ,महाजन व बलुतेदार मंडळींनी रयतेला संरक्षण देण्याबरोबरच महालाला ऊर्जितावस्था आणण्याचे भवानीबाईना साकडे घातले .त्यानुसार भवानीबाई व शंकराजीराजे यांनी तारळे महालावर आपला अंमल प्रस्तावित करून विस्कटलेली घडी बसवली. धाकटया शाहूंराजांजवळ दुर्गाजीराजे महाडिक व कुशाबाराजे महाडिक हे सरदार होते. कान्होजीराजे महाडिक , परसोजी राजेमहाडिक , हरजीराजे महाडिक यांनी मराठेशाहीत आपले पराक्रम गाजवून आपल्या घराण्याचे नाव अजरामर केले. तारळ्यात या पराक्रमाच्या अनेक पाऊलखुणा, दस्तऐवज, पत्रव्यवहार उपलब्ध आहेत .आजही राजेमहाडीक बंधूंचे आठ वाडे मोठ्या दिमाखात उभे असून, त्यात आजची राजे महाडिक घराण्यातील पुढची पिढी नांदते आहे0टठ. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 २९ सप्टेंबर इ.स.१७२७ सुलतानजी नाईक निंबाळकर निजामाला जाऊन मिळाल्यानंतर त्यांचा भाऊ सिधोजी नाईक निंबाळकर यांची सरलष्कर म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी नेमनूक केली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २९ सप्टेंबर इ.स.१७४६ दक्षिणेकडची परिस्थिती, आणि त्यातही निजामादी लोकांची एकंदर कार्यपद्धती पाहता तिथली बरीचशी लोकं वैतागली होती, आणि स्वतंत्र होण्याची इच्छा व्यक्त करत होती. दि. २९ सप्टेंबर १७४६ रोजी पेशव्यांचा हस्तक नागो राम हा कर्नाटकातून अब्दुलमाजीदखानाच्या गोटातून लिहितो की या प्रांतात कोणीच धनी नाही. तेव्हा पेशव्यांनी छत्रपती शाहू महाराजांकडून हा प्रदेश जिंकण्यासाठी परवानगी घ्यावी आणि हे सगळं आपलंसं करावं. यापुढे नागो राम जे लिहितो ते महत्वाचं आहे, "येथे चर्चाही लोक करितात की हा प्रांत पंतप्रधानांनी केल्यास या प्रांताचे प्राक्तन उघडेल ऐसी सर्वांस आशा आहे". 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
1.9K जणांनी पाहिले
4 दिवसांपूर्वी
⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 📜 २८ सप्टेंबर इ.स.१६३६ औरंगजेबाने उदगीर किल्ला जिंकला १४ जुलै १६३६ रोजी बादशाह शाहजहानने शहाजादा औरंगजेबाला दख्खनचा सुभेदार नेमलं आणि तो उत्तरेकडे निघून गेला. पुढची दख्खन मोहीम आता औरंगजेब चालवणार होता. औरंगजेबाने औरंगाबाद ही राजधानी केली आणि निजामशहाचे - म्हणजे शहाजीराजांचे - जवळपासचे किल्ले आणि मुलूख जिंकायचा सपाटा लावला. त्याच्या सोबत मदतीला आदिलशाही सैन्य होतेच. २८ सप्टेंबर १६३६ रोजी त्याने उदगिरचा किल्ला जिंकला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtube.com/shorts/gWMstDKOBkA?feature=share 📜 २८ सप्टेंबर इ.स १६५६ ( अश्विन शुद्ध प्रतिपदा, शके १५७९, संवत्सर हेमलंबी, सोमवार ) तिमाजी खंडेरावाच्या निवाड्यास महाराजांनी पुण्यात गोतसभा भरवली :- तिमाजी खंडेराव सुपे परगण्यातील मौजे कोल्हाळ येथील रहिवासी होता आणि कुलकर्णी देखील होता. दुष्काळात रखमाजी व अंताजी उंडे पणदरकर यांची कुलकर्ण व ज्योतिषवृत्ती २० होणास तिमाजीने विकत घेतली. ३५ वर्षांनी रखमाजी ऊंडेंचे पुत्र विसाजी व रामाजी यांनी संभाजी मामा मोहिते ह्यांना लाच देऊन तिमाजीवर अन्याय करून जबरदस्तीने कुलकर्ण वतन हिसकावून घेतले. तिमाजी कर्नाटकात थोरले महाराज शहाजीराजांकडे मदतीस गेला. शहाजीराजांनी जे पत्र दिले ते घेऊन तिमाजी शिवरायांकडे आला व गोतसभेत महाराजांनी सर्वांना बोलावून निर्णय दिला की, " ३५ वर्षांपूर्वी जर तिमाजी खंडेरायने २० होन दिले नसते तर तुमचे कुटुंब वाचले नसते, यावर बोभाटा ना करणे " आणि अश्या प्रकारे तिमाजीला न्याय मिळाला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २८ सप्टेंबर इ.स १६८२ संभाजीराजे जेंव्हा दिलेरखानाला जाऊन मिळाले तेंव्हा त्यांच्या बरोबर त्यांची पत्नी व एक बहीण होती. संभाजीराजे मुघलांच्या तावडीतून निसटले पण त्या दोघी मागेच राहिल्या. दिलेरखानाने त्यांना कैद करून अहमदनगरच्या किल्ल्यात ठेवले. संभाजीराजेंनी राज्यकारभार स्विकारल्यावर त्यांना सोडवण्यासाठी आपल्या सैन्याच्या तुकड्या पाठवायला सुरुवात केली. मराठ्यांच्या या आक्रमक हल्ल्यांनी सावध होऊन औरंगजेबाने त्यांची रवानगी दौलताबादच्या किल्ल्यात केली. तरीसुद्धा मराठ्यांचे नगरच्या किल्ल्यावरील हल्ले थांबले नव्हते. त्यामुळेऔरंगजेबाने शहजादा शाहआलमचा मुलगा महंमद मुईजुद्दीन याला ८ हजार प्यादे आणि ६ हजार स्वारांची मनसब दिली व रत्नजडीत कंठा, एक घोडा व खिलतीची वस्त्रे दिली आणि त्याला अहमदनगर शहर व किल्ल्याचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवले. या स्वारीत रणमस्तखान,दाऊदखान व गझनफरखान या सरदारांना त्याने शहजादयाच्या मदतीला दिले.औरंगजेबाच्या या तयारीवरून शंभुराजेंच्या आदेशाने अहमदनगर परिसरात मराठ्यांनी किती आक्रमक हल्ले केले होते ते लक्षात येते. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २८ सप्टेंबर इ.स १६८७ (अश्विन शुद्ध द्वितीया, शके १६०९ प्रभव संवत्सर, वार बुधवार) अकबराच्या बंडाबाबत लंडनचे पत्र! लंडनहून आलेल्या एका पत्रात लोकसमाजाचे एक चांगलेच चित्र रेखाटले गेले आहे. "औरंगजेबाचा मुलगा अकबर याने बापाच्या विरुद्ध शस्त्र धरले असून त्याने त्याच्या बापाची आणि आजोबांची पार वाट लावली हे इतिहासात नमूद आहे अर्थात त्यांच्या मुलाकडून त्यापेक्षा कोणती अधिक चांगली वागणूक मिळणार? बहुतेक सर्व मनुष्यांच्या पापाचे शासन ईश्वर याच जन्मात भोगावयास लावतो. त्यामुळे तुम्ही औरंगजेबाबद्दल काहीही लिहिलेत तरी आमचे मत आहे की, सध्याचा मुघल बादशहा औरंगजेब या जगात शांततेचे फारच थोडे दिवस काढील". घरगुती भांडणाबरोबर औरंगजेबाने इतरत्र चांगले संबंध राखले नव्हते. अदिलशाही, कुतुबशाहिशी वैर करून त्यांची राज्ये खालसा करण्याचा डाव, डच, फ्रेंच यांचेसोबतचे वाद, सुरतेच्या वखारीचे मुघलांनी केलेले नुकसान, त्यामुळे सुरतकर इंग्रजांचे वैर यामुळे खऱ्या अर्थाने आता एकटा पडत चालला होता. इंग्रजांच्या पत्रातून औरंगजेबाच्या स्वभावाचे पदर समोर येतात. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २८ सप्टेंबर इ.स.१७३९ शके १६६१ च्या आश्विन शु. ७ रोजी वसईच्या संग्रामांत रामचंद्र हरि पटवर्धन यांस गोळी लागल्यामुळे मृत्यु आला. पेशव्यांच्या अमदानीत जी धराणा प्रसिद्धीस आली त्यांत हरभट पटवर्धनांचे घराने प्रमुख आहे. यांचीच मुले गोविंदपंत नाना, रामचंद्रपंत व भास्करपंत ही पुण्यास येऊन बजीरावांजवळ राहून पराक्रम गाजवू लागली. पश्चिम किना-यावर पोर्तुगीजांचा धार्मिक जुल्म वाढत चालला होता. त्याला आळा घालण्याचे काम चिमाजीअप्पाने केल. मराठ्यांच्या इतिहासात राष्ट्रप्रेम, शौयें, संघशक्ति, इत्यादि उदात्त गुणांचे दर्शन घडविणारे जे काही थोडे प्रसंग आहेत त्यांत वसईच्या युद्धाची गणना प्रामुख्याने होत असते. या संग्रामातील मोहीम इ.स.१७३७ च्या मार्च-जूनमध्ये होऊन ठाणे व साष्टी काबीज झाली. या लढाईत रामचंद्र पटवर्धन प्रमुखांपैकी एक होते. आता पोर्तुगीजांच्या लढयास चांगले रूप येणार होते. बाजीरावांने रामचंद्र हरीस लिहिले, “साडेबत्तीसशे माणूस केळवे माहिमच्या कार्यभागास तुम्हांकडे नेमिलें आहे.... फिरग्यांच्या लोकांनी वारे घेतले आहे. तुम्हांवरही तोंड टाकतील, त्यांस जपून एकवेळ कापून यानंतर १७३८ मध्ये रामचंद्र हरि यांनी माहिमास मोर्चे लावले, आणि केळव्याकडे सातभाठी माणूस घेऊन रामचंद्रपंत चालुन गेले. रामचंद्रपंतांनी खुद्द दोघे ठार केले आणि गनिम फिरवला. ते समयी रामचंद्रपंतांचे उजव्या हातास गोळी लागली. हातची तलवार सुटून गुडघ्यास लागली ऐसे होतांच मशारनिलहे पिरले त्याबरोबर गनिमाने मोर्चे काबीज केले, आमचे लोकांचा धीर सुटोन निघाले, महादजी केशव व धोंडोपंत, वाघोजी खानविलकर, राजबाराव बुरुडकर, चितो शिवदेव, वगैरे लोक मोचीत होते त्यांस निघावयास फुरसत न होऊन तेथेच झुंजोन कामास आले. अजमासे दोनशें माणूस कामास आले व जखमी शंभरापर्यंत." या लढाईत झालेल्या जखमी मुळेच रामचंद्र हरीचें आश्विन शु. ७ रोजी निधन झाले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २८ सप्टेबर इ.स.१८३८ बहादूरशहाच्या आधी तख्तपोशी करून राजा झालेला धाकटा युवराज मिर्झा जहांगीर पुढे अतिमद्यपानाने मेला. त्याच्या निधनानंतर आपल्याला दिल्लीची गादी मिळेल असे बहादूरशहाला वाटत होते. २८ सप्टेबर १८३८ ला जफरला दिल्लीचे तख्त मिळाले देखील ; पण ते राज्य, ती राजवस्त्रे अंगावर जेंव्हा चढली तेंव्हा त्याच्या सत्तेवर अप्रत्यक्षपणे इंग्रजाचाच अंमल होता. धूर्त इंग्रजांनी त्याला बजावले होते की, "तू आता राजा आहेस, पण लक्षात ठेव फक्त आणि फक्त नामधारी राजा !" ज्या मुघल सत्तेच्या सीमा एके काळी चारीदिशांना हजारो किलोमीटर अंतरापर्यंत विस्तारल्या होत्या त्या मुघलांच्या अखरेच्या शिलेदाराची सत्तासीमा फक्त लाल किल्ल्य़ाच्या वेशीपर्यंतच राहणार होती. ज्या लाल किल्ल्यात दिवाने खासची शान मुघल बादशहाच्या आगमनाने वाढत होती, तिथे बादशहाच केविलवाणा झाला होता. ज्याच्या मागेपुढे अहोरात्र चवऱ्या ढाळल्या जायच्या त्याच्या मागे आता फक्त त्याची दीनवाणी सावली उरली होती. काळीज विदीर्ण करणारा ही अट बहादूरशहाने डोळ्यात पाणी आणून कबूल केली, कारण त्याच्यापुढे कुठलाही पर्याय बाकी नव्हता.... 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
321 जणांनी पाहिले
6 दिवसांपूर्वी
केदारेश्वर व्यायाम शाळा या ठिकाणी जमा करावे संपर्क. अमोलदादा कबुले. +91 94039 68312 अमोल जाधव +91 88063 73131 तेजस तळेकर. 8830446802 सूरज राऊत. +91 74987 07698 शुभम गुंजवटे. +91 97674 91104 जितेंद्र मगर. +91 97661 11137 सुमित पानसरे. +91 91 72818 788 #🙏 प्रेरणादायक बॅनर #🏛️राजकारण #🌧पाऊस कविता/चारोळ्या✒ #🌹पावसाळी फुले🌹 #😍मान्सून फॅशन टिप्स😍
सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
2.2K जणांनी पाहिले
6 दिवसांपूर्वी
⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳ 📜 २६ सप्टेंबर इ.स.१६७७ ( अश्विन शुद्ध दशमी, शके १५९९, संवत्सर पिंगळ, बुधवार ) ज्ञछत्रपती श्री शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमे वेळी जिंजी व वेलोर ह्या दोन बळकट किल्ल्यांच्या आसपासचा बावीस लाख होन उत्पादनाचा मुलूख काबीज केला व त्याच्या बंदोबस्तासाठी पुष्कळ पायदळ व घोडदळ ठेवून दिले. त्यांनी १४ मोठे किल्ले व ७२ मजबूत टेकडया काबीज केल्या. कर्नाटकातील बहुतेक सधन लोकांकडून अपार द्रव्य घेतले. महाराजांनी कर्नाटकांत जिंकलेल्या किल्ल्यांची डागडुजी व जिंकलेल्या प्रांतांचा बंदोबस्त रघुनाथ नारायण हणमंते यांनी केली म्हणून छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी त्यांस २६ सप्टेंबर १६७७ या दसऱ्याच्या मुहूर्तावर दख्खनची मजमू व जिंजी प्रांताचा सरसुभा असे महत्त्वाचे अधिकार सोपविले. हणमंते यांनी कर्नाटक प्रांताचा बंदोबस्त चांगला ठेवून त्यांत आणखी भर घातली. पण छत्रपती श्री संभाजी महाराजांविरुद्ध जे कट रायगढला शिजले त्यांत हणमंते यांचे अंग आहे असे छत्रपती संभाजी महाराजांस कळून आले तेव्हा त्यांस कैद करवून त्या प्रांताचा कारभार हरजीराजे महाडीक या आपल्या मेहुण्यांकडे सोपविला. त्यांच्या मदतीस जैताजी काटकर आणि दादाजी काकडे या दोन मराठे सरदारांना जिंजीस पाठवून दिले. हरजीराजेंनि आपला जम कर्नाटकात चांगला बसविला होता. संभाजी महाराजांच्या कारकीर्दीत कर्नाटकातील महसूर, मदुरा, रामनाड, त्रिचनापल्ली एकेरी इत्यादी पाळेगारांची छोटी-छोटी राज्ये होती. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 📜 २६ सप्टेंबर इ.स.१६७९ महाराजांनी शामजी नाईक यांना विजापुरास रवाना केले. विजापुरचा सरदार मसाऊदखान हा दिलेरखानास दाद देत नव्हता, म्हणून विजापुरचे भले भले सरदार व सर्जाखानासही फोडून आपल्या झेंड्याखाली आणले. दिलेरखानाने मोठ्या उत्साहाने भीमा ओलांडली व लगेच सप्टेंबर मध्ये त्याने मंगळवेढे जिंकून घेतले. नाईलाजाने मसाऊदखानाने विजापुरच्या रक्षणार्थ महाराजांना विनवणी केली. महाराजांनी शामजी नाईक यांच्या बरोबर १० हजार स्वार धान्य, आणि सामानसुमानांचे २ हजार बैल आनंदराव यांच्या नेतृत्वाखाली विजापुरास पाठविले. वकिल म्हणून विसाजीपंत नीळकंठराव हेपण विजापुरास निघाले. मसुदखानाने विजापुरच्या किल्ल्यावर संरक्षणाची व्यवस्था मजबूत करून ठेवली. महाराजांनी विजापुरवरिल संकट लक्षात घेऊन, मसाउदखानाशी बोलणी करण्यासाठी आपले मुत्सद्दी शामजी नाईक यांना रवाना केले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 २६ सप्टेंबर इ.स.१६८४ सुर्यकांत इंग्रजांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबर झालेल्या त्यासंबंधी लंडनला पत्र पाठवले. सुरतकर इंग्रजांच्या चुकीच्या धोरणाला कंटाळून मुंबईकर इंग्रजानी तिथल्या रहिवाश्यांच्या सहाय्याने ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता झुगारून बंड केले आणि इंग्लंडच्या चार्लस राजाने मुंबई बेट ताब्यात घेतल्याचे जाहीर केले.मुंबईचा गव्हर्नर म्हणून रिचर्ड केजविन ची नेमणूक केली गेली.अधिकार मिळताच केजविनने मराठ्यांशी धरसोडीचे धोरण सोडून तह केला आणि सिद्दीचा बंदोबस्त करून त्याला मुंबईत प्रवेश बंद केला.केजविन ने या तहाची माहिती लंडनला कळवली होती,यावर लक्ष ठेऊन असणाऱ्या सुरतकरांनी लंडनला लिहून पाठवले की,"मुंबईच्या बंडखोराकडून संभाजीकडे गेलेल्या कॅ. गॅरीच्या कामाची आम्हाला कारवारकडून काहीच बातमी मिळाली नाही.परंतु संभाजीराजांनी त्यास झिडकारून लावला असून हा कारभार महागात पडला आहे. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 २६ सप्टेंबर इ.स.१६८९ छत्रपती राजाराम महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यातुन छत्रपती संभाजी महाराजांच्या क्रूर हत्येनंतर रायगडाला झुल्फिकारखानाचा वेढा पडला. रायगडावरील महाराणी येसूबाई आणि मुत्सद्दी मंडळींनी राजाराम महाराजांना स्वराज्याचे वारसदार बनवून त्यांचे मंचकरोहन केले.पुढील धोका ओळखून नियोजित योजनेनुसार राजाराम महाराज आपल्या निवडक सहकाऱ्यासह रायगड सोडून मुघलांना हुलकावणी देत प्रतापगड मार्गे पन्हाळगडावर आले.पण मुघलांनी पन्हाळ्यालाही वेढा दिला.मुघलांशी सुरू असलेली लढाई महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन आघाड्यावर लढण्यासाठी राजाराम महाराजानी जिंजीला जायचे ठरवले.त्यानुसार वेषांतर करून मानसिंग मोरे,प्रल्हाद निराजी,कृष्णाजी अनंत, निळो व बहीरो मोरेश्वर,खंडो बल्लाळ,बाजी कदम,खंडोजी कदम या व इतर काही सहकाऱ्यासह राजाराम महाराज पन्हाळ्यावरून मध्यरात्री गुप्तपणे निसटून गेले.छत्रपती राजाराम महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटून गेले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 २६ सप्टेंबर इ.स.१७१५ आदिलशाही राज्यात लपविलेली करवीरनिवासिनी अंबाबाईची मूर्ती छत्रपतींनी पुन्हा मूळ मंदिरात स्थापन केली, तो आजचा ऐतिहासिक दिनविशेष.... पातशाह्यांच्या काळात कोल्हापूर प्रांतावर आदिलशहाचा ताबा होता. या काळात सर्वत्र धामधूम माजलेली असायची. राज्यव्यवस्था स्थिर नव्हती. युद्धप्रसंगी मंदिरांची नासधूस केली जायची. अशावेळी देवीच्या मूर्तीस काही अपाय पोहोचू नये या हेतूने करवीरनिवासिनी अंबाबाईच्या पुजाऱ्यांनी देवीची मूळ मूर्ती मंदिरातून काढून नेऊन कपीलतीर्थाजवळ गुप्त ठेवली होती. पुढील काळात कोल्हापूर प्रांत स्वराज्यात आला. छत्रपतींचे स्थिरस्थावर राज्य स्थापन झाले, तेव्हा वेदशास्त्रसंपन्न नरहरभट सावगावकर यांनी करवीर राज्याचे अधिपती श्रीमंत छत्रपती संभाजीराजे (दुसरे) यांची पन्हाळगडावर भेट घेऊन महाराजांस हा सर्व वृत्तांत सांगितला व आपणांस साक्षात्कार होऊन आई अंबाबाईने आपली मूर्ती मूळ ठिकाणी स्थापन करावी, असा दृष्टांत दिल्याचे महाराजांस सांगितले. यावेळी छत्रपती संभाजीराजेंनी आपले सेनापती सिदोजी घोरपडे - हिंदूराव गजेंद्रगडकर यांना अंबाबाईच्या मूर्तीची मूळ मंदिरात विधीवत प्रतिष्ठापना करण्याची आज्ञा दिली. महाराजांच्या आज्ञेनुसार सेनापती घोरपडेंनी सन १७१५ साली विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर करवीरनिवासिनीच्या मूर्तीची मूळ मंदिरात विधीवत प्रतिष्ठापना केली. ती तारीख होती दिनांक २६ सप्टेंबर १७१५. तोच हा आजचा ऐतिहासिक दिवस, जेव्हा एक शतकाहून अधिक काळ गुप्तपणे लपवून ठेवलेल्या अंबाबाईच्या मूर्तीची तिच्या मूळ मंदिरात पुनर्स्थापना झाली. छत्रपतींच्या स्थिर व सुरक्षित राजसत्तेचे ते प्रतीक होते. मूर्तीबद्दलची माहिती देऊन आपल्याकडून हे शुभकार्य घडवून घेतल्याबद्दल छत्रपती संभाजीराजांनी नरहरभट यांना काही पेठा व वतने इनाम दिली व देवीच्या नित्य पूजाअर्चेसाठी सावगाव हे गाव इनाम दिले. छत्रपती संभाजीराजे (दुसरे) म्हणजे छत्रपती शिवरायांचे नातू व छत्रपती राजाराम महाराजांचे सुपुत्र होत. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 २६ सप्टेंबर इ.स.१७५९ पेशवाईतील वन्यजीव रक्षण व जंगलतोड बंदी पुणे जिल्ह्यातील निसर्गरम्य तीर्थशेत्र श्रीभीमाशंकर येथील होणारी वृक्षतोड व जंगली प्राण्यांची शिकार यावर बंदी घालावी याकरिता महादजी राम कानिटकर यांनी नानासाहेब पेशवे यांना २६-०९-१७५९ रोजी पत्रे लिहून यावर योग्य कारवाई करावी अशी मागणी केली. जंगल व वन्यप्राणी यांचे संवर्धन याविषयी असलेली जागरूकता याविषयीचे महत्व विषद करणारी हि पत्रे म्हणजे तत्कालीन निसर्गाविषयी असलेली काळजी दर्शविते. श्रीभीमाशंकर क्षेत्राच्या आजूबाजूस तीर्थक्षेत्र व वनराई असून त्यात विविध प्रकारचे प्राणी व पक्षी वास्तव्यास असतात. त्या ठिकाणी झाडांची तोड केली जाते. त्यासंबंधी ताकीद देण्यात यावी . तीर्थक्षेत्राच्या परिसरातील वृक्षतोड न करता तीर्थक्षेत्राच्या राईबाहेरील झाडांची तोड करावी. महादाजी राम कानिटकर यांनी नानासाहेब पेशवे यांना विनंती केली की, रामचंद्र कृष्णराव तसेच मुकादम आणि देशमुखांना भीमाशंकरच्या आसपासच्या प्रांतात झाडे न तोडण्याचे आदेश जारी करावेत. श्रीभीमाशंकर क्षेत्रात निरुपद्रवी सांबर व अन्य वन्यजीव आश्रयास असतात. भोवर गावातील गावकरी व कोकण प्रांतातील लोक वन्य प्राण्यांची शिकार करतात. तीर्थक्षेत्राच्या तीन कोस परीसरात शिकार करण्यास मनाई करण्यात यावी . शिकार करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी. महादाजी राम कानिटकर यांनी नानासाहेब पेशवे यांना विनंती केली की, यासंबंधी ताकीद देणारी पत्रे जारी करावीत . 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
397 जणांनी पाहिले
8 दिवसांपूर्वी
असेच शेतीत सुरू राहीले तर उद्या...... ‘भारता’ कडे बघत ‘इंडिया’ कळवळून म्हणाला - तुला सारे शेअर्स देतो, एक कप दूध दे तुला कंपन्यांचे बॉन्ड देतो ,एक भाजीची जुडी दे क्रेडिट कार्डचा गठ्ठा देतो ,फक्त कोबीचा गड्डा दे प्लॉट नावावर करून देतो ,फक्त एक भाकर दे ------------------------------------------------ तेव्हा वैतागून शेतकरी म्हणाला.. शेअरच्या ‘बुल’ची करा शेती ‘बॉन्ड’ची भाजी करून खा ‘सेन्सेक्स’ची आज करा उसळ क्रेडिट कार्ड पिळून काढा दूध.. सोने खाणारा मिडास राजा आज इंडियात भेटतो आहे शेतीच्या बांधा बांधावर,भुकेचा अंगार पेटतो आहे .. #🌧पाऊस कविता/चारोळ्या✒ #😍मान्सून फॅशन टिप्स😍 #🌹पावसाळी फुले🌹 #☔मान्सून ब्युटी टिप्स💄 #🏛️राजकारण
सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
3K जणांनी पाहिले
8 दिवसांपूर्वी
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳ 📜 २४ सप्टेंबर इ.स.१६५६ (अश्विन वद्य १ शके १५७८ प्रतिपदा वार बुधवार) सुपे परगणा स्वराज्यात दाखल! महाराजांनी मोहीते मामांना पत्र पाठवले की, "पागा घेऊन पुणे मुक्कामी येणे" पण मोहीते मामांनी महाराजांचे पत्र आणणार्‍या जासुदासमोर उर्मट जाबसाल करताना म्हटले की "शहाजीराजे समक्ष असता हे मालक नाहीत. हुकूम करितात आणि राज्यात पुंडावे करून ठाणी बसवितात हे राजांच्या प्रतिष्ठेवरी निभावले होते. याउपरी फैल (=पुंडावा) केला तरी राजांची शोभा राहणार नाही आणि हेही प्राणेकरून वाचणार नाहीत. काही आपले पायाकडे पाहून करावे. म्हणजे मामांनी भाच्यालाच "प्रौढ" उपदेश केला. आपल्याच तोऱ्यात वावरणाऱ्या मामांनी पत्राचा जबाब पेश केला नाही की ते स्वतःही महाराजांच्या भेटीस गेले नाहीत. महाराजांच्या सूचनेकडे त्यांनी सरळसरळ दुर्लक्ष केले. संभाजी मामा हे जसे शहाजीराजेंचे शालक व महाराजांचे मामा होते तसेच ते शहाजीराजेंचे व्याहीही होते. म्हणजे मामाची मुलगी अन्नुबाई ही शहाजीराजेंचे पुत्र व्यंकोजीराजे यांना दिली होती. बहुधा या नाते संबंधांमुळे महाराज आपणास हात लावणार नाहीत असा मोहीते मामांचा अंदाज असावा. पण मामा बऱ्या बोलाने वळत नाहीत हे लक्षात येताच महाराजांनी इ.स.१६५६ च्या अश्विनात दसरा उलटल्यावर अकस्मात सुप्यावर हल्ला चढविला. गढीत फारसे बळ नव्हतेच. सुपे लगेच महाराजांच्या ताब्यात आले. महाराजांनी क्षणार्धात मोहीतेमामांना कैद केले. गढीत बरेच द्रव्य कापडचोपड, वस्तू व पागेत ३०० घोडे होते. हे सर्व महाराजांनी जप्त केले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtube.com/shorts/XSUNBCNI2Zc?feature=share 📜 २४ सप्टेंबर इ.स.१६७१ छत्रपती शिवाजीराजांची अंतर्गत व्यापारावर करडी नजर १६७१ साली कोकणातील दाभोळ इथे नारळ स्वस्तात विकले जात होते. ज्यामुळे आसपासच्या परिसरात नारळाच्या व्यापारावर परिणाम होत होता. शिवाजी राजांच्या हे लक्षात येताच त्यांनी मामले प्रभावळीचे सुभेदार तुकोराम यांना नारळाच्या विक्रीबाबत दक्षता घ्यावी ह्याबद्दल हे पत्र लिहिले आहे. शिवाजी राजांचा आत्मविश्वास आणि व्यापार नीती पत्रात स्पष्ट दिसून येते. मशहुरल हजरत मायन्याचे २४ सप्टेंबर १६७१ रोजी लिहिलेले हे पत्र शिवाजी राजांच्या राज्याभिषेक पूर्वीच्या पत्रात दिसणाऱ्या जुन्या मायन्यांपैकीचे एक आहे. शिवशाहीच्या त्रिशुळाने जिंकलेला कोकणच्या प्रदेशात स्थिर झाल्यानंतर, मराठ्यांचा आत्मविश्वास चांगलाच बळावला असावा. त्याचा परिणाम अश्या पत्रांतून रूंदावणाऱ्या व्यापारी हेतूतून आणि एक केंद्रशासित सत्ता आणि व्यवस्थापन व्हावे ह्या नीतीतून दिसतो. स्वराज्य चौफेर वाढत असताना देखील केंद्रशासित रहावे तेव्हा कुडाळच्या नरहरी आनंदराव सुभेदाराला देखील डिसेंबर १६७१ मध्ये असाच एक जबर जकातीचा हुकुम महाराजांनी पोर्तुगीज मीठावर लावावा असे लिहिलेले दिसून येते. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 २४ सप्टेंबर इ.स.१६७४ ( अश्विन शुद्ध पंचमी, शके १५९६, संवत्सर आनंद, गुरुवार ) शिवरायांचा दुसरा राजाभिषेक :- छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला दुसरा राज्याभिषेक का करून घेतला? तो कोणी व कसा केला याबद्दल सविस्तर माहिती मिळेल का? स्वराज्य चे स्वप्न २ पिढ्यांनी पाहिले होते. फर्जंद महाराजा शहाजीराजेंनी अथक प्रयत्न करून केलेल्या पायाभरणी वर त्यांच्या पुत्र शिवरायांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करत सुवर्ण कळस चढविले आणि ह्या मायभूमीचे पांग फेडले. ई. स. १६७४ साली रायगडावर अवघ्या इतिहासाच्या साक्षीने वैदिक पद्धतीने राज्याभिषेक सोहळा पार पडला. अखेर मराठी मातीला गादी मिळाली. हिंदूंचे तख्त निर्माण झाले. ह्या म्लेंच्छ बादशाही मध्ये एक मऱ्हाटा एवढा पातशहा झाला. ६ जून, १६७४ साली झालेला राज्याभिषेक सोहळा जवळपास सर्वांनाच माहीत आहे. परंतु, त्याच्या २-३ महिन्यांच्या नंतर सप्टेंबर महिन्यात शिवरायांनी अजुन एक* *राज्याभिषेक करुवून घेतला , तो म्हणजे तांत्रिक राज्याभिषेक. ह्या राज्याभिषेकाबद्दल ची माहिती आपल्याला गोविंद नारायण बर्वे लिखित " शिवराज राज्याभिषेक कल्पतरू " नावाच्या ग्रंथामध्ये मिळते. मूळ ग्रंथ हा ई. स. १६९९ मध्ये लिहलेला असून तो संस्कृत भाषेत होते. आज ही पोथी Indian Asiatic Society, Calcutta मध्ये ठेवण्यात आली आहे. तांत्रिक राज्याभिषेकाच्या पौरोहित्य हे निश्चल पुरी गोसावी ह्यांनी केले. ते गोसावी पंथाचे असून यजुर्वेदाचे निष्णात अभ्यासक होते. ते मूळचे वाराणशीचे होते. निश्चल पुरींनी हा तांत्रिक राज्याभिषेक " आनंद नाम संवत्सर अश्विन शुद्ध पंचमी " ह्या तिथीला (म्हणजेच २४ सप्टेंबर, १६७४) प्रातःकाळी उठून कलश स्थापन करून राज्याभिषेक विधी सुरू केला. उपलब्ध पोथी मध्ये एकूण ८ शाखा (भाग) आहेत. ह्यातील पहिल्या ४ प्रकरणात निश्चल पुरी आणि गोविंद बर्वे ची झालेली भेट आणि वैदिक राज्याभिषेकाचे वर्णन आहे. ५ व्या प्रकरणात निश्चल पुरी नी केलेल्या तीर्थ यात्रेचे वर्णन तसेच महाराजांनी निश्चल पुरीस केलेली विनंती, असा गोषवारा आहे. ६ व्या आणि ७ व्या प्रकरणात तांत्रिक राज्याभिषेकाचे वर्णन आहे. तसेच ८ व्या प्रकरणात राज्याभिषेकाचा महाराजांवर झालेल्या परिणामाचे वर्णन केलेले आहे. हा विधी फक्त एका दिवसाचा होता. निश्चल पुरींनी प्रातःकाळी उठुन कलश स्थापना केली. त्यानंतर सर्व पूजा विधी तंत्रानुसार केली. नाना रंगानी आकर्षक बनवलेले मेरुयंत्र यंत्र उचलून घेतले. ललित पंचमीच्या योगावर अभिषेकाचा महोत्सव झाला. ते स्थान छतानी आणि खांबानी सुशोभित झाले होते. मंडपानी अलंक्रुत झालेले होते. त्यानंतर सिहासनाच्या ठिकाणी मंडपामध्ये कलशांची पुजा करुन भुमी विधीपुर्वक शुद्ध केली. ती पंचरत्नानी पुर्ण केली. त्यानंतर सिंहासाठी बळी अर्पण केले. आसनाच्या पूर्व दिशेस हर्यक्ष नावाच्या सिंहास पशुचा बळी दिला. दक्षिणेला पंचास्य नावाच्या यमाला घाबरविणारा स्थापन केला व बळी दिला. नैऋत्येला केसरी नावाचा बळीचे भरपूर भोजन करणारा स्थापन केला व बळी आर्पण केला. पश्चिम बाजुस मृगेंद्र स्थापन करून बळी दिला. वायव्येला शार्दुल स्थापित करुन त्यास पशुचा बळी दिला. उत्तरेला गजेंद्र स्थापन करून त्यास पशुचा बळी दिला. शंकराच्या दिशेला बळीचे रक्षण करणारा हरी नियुक्त केला. अशाप्रकारे आठ जणाच्या पाठीवर आसन स्थिर केले. निश्चल पूरीनी रत्नमय वेदीवर रुप्याचे मोठे आसन स्थापित केले आणी अभिषेकासाठी महाराजांना त्यावर बसवले. तेथे आठ दिशेला आठ कलश स्थापन केले आणि त्याची रत्नानी पूजा केली. त्यानंतर त्यांनी महाराजांना आसनावर बसविले. स्वजनाना दुर पाठवुन सर्व आवयवाना शुभप्रद अशा महामंत्रानी वेष्टन घातले. त्यावेळी राजसभेत नगारा वगैरेवाद्ये वाजविली जात होती. वेदपारंगत ब्राह्मण साममंत्र गात होते. त्यानंतर महाराजांनी नवीन वस्त्रे परिधान केले व अन्नाच्या पर्वतास नैवेद्य दाखवला.त्यामुळे रायरी पर्वत संतुष्ट झाला.त्यानंतर निश्चलने महाराजाना विद्येचा उपदेश केला. त्यानंतर महाराजानी घरात प्रवेशकेला व भोजन करुन राजसभेकडे आले. या विधीत दहा महामंत्र,राजराजेश्वरी विद्या, ब्रह्मस्त्र महाविद्या व ६४ तंत्र विद्या महाराजाना दिल्या, असे ह्या पोथी मध्ये लिहला आहे. निश्चलपुरी गोसावी नी दुसरा राज्याभिषेक केला.तमाम इतिहासकारांनी संभाजी महाराजांना शाक्त पंथ चे पूजक असल्याचे आरोप केले अन निश्चलपुरी गोसावी हे पण शाक्त पंथांचे होते . शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक हा वेदिक पद्धतीने गागाभट्ट यांनी केला. गागाभट्ट ने त्यानुसार शिवाजी महाराजांनी गागाभट्ट यांच्या शी चर्चा करून राज्यभिषेक रायगड वर करण्याचा निर्णय घेतला. १४ व्या आणि १५ स्या शतकात पैठण हे विद्वानांचे शहर म्हणून प्रसिद्ध होते.तिथेच भट्ट आणि शेष नावाचे दोन घर प्रसिद्ध होते.भट्ट यांच्याच घरातील गोविंद भट्ट हा पैठणहून काशीस गेले आणि त्यांच्या च घरात हे गागाभट्ट जन्माला आले होते. अकबर च्या कारकिर्दीत शेष नावाचे यांनी शुद्रचार्शिरोमनी ग्रंथ लिहिला आणि त्यात लीहाले की क्षत्रिय या जगात संपले याचाच समाचार गागाभट्ट यांनी कर्यास्याधर्मपदिप नावाचं एक ग्रंथ लिहिला आहे.त्यात त्यांनी शुद्रचार्शिरोमनी नावाच्या ग्रंथाचा समाचार घेतला आहे. महाराष्ट्रात काही शतके असा राज्यभिषेक झाला नव्हता आणि खिलजी च्या आक्रमण नंतर अशी विद्वान लोक शिल्लक नव्हती.त्यामुळे या शेष घराण्याचे मत शिवाजी महाराजांना मानावल नाही बाळाजीआवाजी, केशावभट्ट , भालचंद्र भट्ट यांनी राजस्थानला जाऊन सर्व महाराजांच्या कुळाची माहिती घेतली. रीतीने ६ जून १६७४ ला पहिला राज्यभिषक झाला. याच राज्यभिषेक ल निश्चलपुरी गोसावी आमंत्रित म्हणून उपस्थित होते. राज्यभिषेक नंतर ते कोकणात सर्व क्षेत्री फिरले तिथे त्यांनी गोविंद या ब्राम्हण विद्वान ना भेटले आणि राज्यभिषेक ची माहिती दिली. त्यात त्यांनी घटना सांगितल्या शिवाय पहिला राज्यभिषेक झाल्यावर निश्चलपुरी नी शिवाजी महाराज ना जाताना सांगितले की राजा १३ व्य, २२ व्यां ,५५ व्यं आणि ६५ दिवशी खेद जनक गोष्टी घडतील. १३ व दिवशी जिजाबाई आऊसाहेबांचे निधन झाले.रायगडवर हत्ती मरण पावला. १) राज्यभिषेक अगोदर राजांची पत्नी काशीबाई यांचे निधन झाले २) राज्यभिषेक आधी सेनापती गुर्जर यांचे पण निधन झाले ३) राज्यभिषेक का वेळी गायोच्युदेश च्यां आदल्या रात्री उल्कापात झाला. ४) राज्यभिषेक च्याच वेळी शिवाजी महाराजांनी पुनः आपल्या पत्नीशी विवाह केला जे अपशकुनी होते असे निश्चलपुरी चे म्हणणे होते ५) सुवर्णतुला वेळीस एक लाकूड पडले आणि गागाभट्ट च्या नाकास लागले ६) गागाभट्ट ने त्याच्या ब्राम्हणांना आहेत दिला याच राग पण निश्चलपुरी ने बोलून दाखविला ७) राज्यभिषेक वेळी बळभट्टाच्या अंगावर लाकडी फुले पडले ८) निश्चलपुरी मात्र राज्याभिषेक हा कुमुहूर्तावर होता ९) स्थानिक देवांचे पूजन आणि बलिदान न दिल्यामुळे निश्चलपुरी बोलले की राज्यभिषेक अपशकुनी झाला आहे.रायगडवर शिकाई देवीची पूजा केली नाही.कोकण रक्षक भार्गव ची पूजा केली नाही.हनुमान आणि वेताळ ल पुजले नाही. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 २४ सप्टेंबर इ.स १६८४ (भाद्रपद वद्य १०, दशमी, शके १६०६, रक्ताक्ष संवत्सर वार बुधवार) फितुरी सुरुच! राअंदाजखानाच्या कौलनाम्यानुसार छत्रपती संभाजी महाराजांचा नोकर भद्रोजी हा चाकरीच्या आशेने आला. त्यास मनसब येईपर्यंत रोजीना दिला जावा असा हुकूम खंडोजी हासुद्धा काझी हैदर याच्या मध्यस्थी मार्फत मुगलांकडे आले त्यांना मनसदी व त्यांचा उत्कर्ष करण्याचा हुकूम देण्यात आला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २४ सप्टेंबर इ.स.१६९० छत्रपती संभाजी महाराजांच्या अखेरच्या काळात स्वराज्यातील अनेक वतनदार मुघलांच्या सेवेत जायला सुरुवात झाली होती. याला प्रमुख कारण होते वतनदारांची वतनाप्रती असलेली आसक्ती. छत्रपती शिवाजी महाराजांचा वतनदारीला विरोध होता. त्यांनी वतने सरकारजमा केली होती व त्यांच्या सेवेबद्दल रोख रक्कम म्हणजे वेतन द्यायला सुरुवात केली होती. पण संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर बदललेल्या परिस्थितीत छत्रपती राजाराम महाराजाना हा निर्णय बदलावा लागला. वतनदार मंडळी स्वराज्याशी एकनिष्ठ राहण्यासाठी महाराजाना देशमुख, देशकुलकर्णी,मोकदम व इतरांची वतने परत करावी लागली. छत्रपती राजाराम महाराजाना हा निर्णय कोणत्या परिस्थितीत घ्यावा लागला ते आपल्याला मुठेखोरेच्या हवालदार व कारकून यांना मावळ प्रांताचे सुभेदार महादजी शामराज यांनी पाठवलेल्या पत्रातून लक्षात येते. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 २४ सप्टेंबर इ.स.१७०९ "राजा शाहू मोठी फौज घेऊन चंदनगडातून बाहेर पडला ,त्याने मराठे सरदारास आज्ञा केली, बादशाहने सरदेशमुखी वतन आम्हास बहाल केले आहे, तुम्ही उत्तर प्रांतातून त्याचा वसूल आणा , चौथाईचा वसूल यावयाचा तो आला नसेल तर बादशाही "खजिने लुटून " भरपाई करून घ्या ." हे आदेश मोगलांनी नोंदविलेले आहेत व ते उत्तरेशी संबंधित आहेत. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 २४ सप्टेंबर इ.स.१७२४ पेशवे बाजीराव यांची निजामाशी दिनांक १८ मे सन १७२४ रोजी नालछा येथे भेट झाली. मुबारिजखान याच्या विरोधात निजामास मदत करण्याचे पेशवा बाजीराव यांनी आश्वासन दिले. चारच महिन्यांनी म्हणजे सन १७२४ च्या सप्टेंबर महिन्यात पेशवा बाजीराव यांनी पातशाही सुभेदार मुबारिजखान याचा सपशेल पराभव केला. हा पराक्रम पाहून निजामाने पेशवा बाजीराव यांना "शहामतपनाह" हा किताब दिला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २४ सप्टेंबर इ.स.१८६१ मॅडम भिकाजी रुस्तुम कामा यांचा जन्म या भारतीय क्रांतिकारक महिला व परदेशातील भारतीय क्रांतिकारकांच्या आधारस्तंभ होत्या. १९०७ मधे जर्मनीत भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत ब्रिटिशांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासंबंधी प्रस्ताव मांडला. त्याच वेळी भारतीय स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून ’वंदे मातरम’ हा मंत्र असलेला तिरंगी ध्वज त्यांनी फडकावला. (मृत्यू: १३ ऑगस्ट १९३६) 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २४ सप्टेंबर इ.स.१८७३ महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. तथाकथित उच्चवर्णीयांकडून होणार्‍या अन्यायापासून, अत्याचारापासून व गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. 'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे या समाजाचे घोषवाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरीविरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. या समाजातर्फे पुरोहितांशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. महात्मा फुल्यांच्या कवितेच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार्‍या खालील ओळी प्रसिद्ध आहेत. - “विद्येविना मती गेली। मतीविना नीती गेली। नीतीविना गती गेली। गतीविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।” जोतीरावांनी त्यांच्या पत्‍नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
See other profiles for amazing content