Follow
सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
@159107303
4,013
Posts
10,484
Followers
सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
663 views
7 hours ago
⛳ आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष ⛳ 📜 ९ मार्च इ.स.१६६० ( चैत्र शुद्ध अष्टमी, शके १५८२, संवत्सर शार्वरी, शुक्रवार ) आपलेच स्वराज्यद्रोही :- महाराज पन्हाळ्यावर अडकले असताना स्वराज्याच्या नरडीचा घोट घेण्यासाठी मायमूलखातले कपाळकरंटे वळवळू लागले. केदार खोपडे, गोंदाजी पासलकर यांनी वतन मिळाले तर मदत करू आशा पत्रांना उत्तर देणारी फर्मान आदिलशहाकडून मिळाली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtu.be/dxumuI7fzw4 📜 ९ मार्च इ.स. १६६८ (चैत्र शुध्द सप्तमी शके १५९० संवत्सर किलक,सोमवार) औरंगजेबाकडून शिवरायांना 'राजा' हा किताब. मोगलांच्या पंचहजारी मनसबदारीवर औरंगजेबाकडून मान्यता घेऊन संभाजी महाराज राजगडावर परतले होते. औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन राजे आग्य्राहून निसटले होते. सगळीकडी ही बातमी पसरल्यामुळे औरंगजेबाचे हसू झाले होते. त्यामुळे किमान पुरंदर तहाच्या अटी पाळल्या जाव्यात यासाठी तो आग्रही होता. ज्या वेळी मिर्झाराजे जयसिंग यांनी पुरंदरचा तह केला त्या वेळी त्यांनी औरंगजेबाला, 'राजा' हा किताब शिवरायांना घ्यावा अशी गळ घातली होती. जी औरंगजेबने सपशेल फेटाळून लावली होती. मात्र आता संधिसाधू औरंगजेबाने काळाची पावले ओळखून, छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही, कुतुबशाही, मोगलशीही, इंग्रज, सिध्दी, पोर्तुगिज, डच इ. सत्तांना आव्हान देऊन स्वराज्याची स्थापना केली. शिवरायांचे नाव संपूर्ण हिंदुस्थानात गाजत होते. याचमुळे मुअज्जम याच्या मध्यस्थीने याच दिवशी शिवरायांना 'राजा' हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ९ मार्च इ.स.१६६८ (चैत्र शुद्ध सप्तमी, शके १५९०, संवत्सर किलक, सोमवार) छत्रपती संभाजी महाराज नव्याने मोगली मनसबदार मोगलांची मनसबदारी स्वीकारण्यासाठी संभाजीमहाराज राजगडावरुन निघाले. २७ ऑक्टोबर १६६७ ला ते औरंगाबादेला पोहचले. तेथे त्यांची व जसवंतसिंहाची भेट झाली. मोगली मनसबदारीबद्दल विचारविनिमय झाला आणि ४ नोव्हेंबर १६६७ रोजी शहजादा मुअज्जमकडून संभाजीराजांनी मनसब स्वीकारली. या मनसबीबद्दल त्यांना वऱ्हाडात जहांगिरी देण्यात आली, एक दागिन्यांनी मढवलेला हत्ती, रत्नजडित तलवार, पोषाख या गोष्टी भेट म्हणून देण्यात आल्या. सर्व तांत्रिक बाबींचे सोपस्कार पूर्ण झाल्यावर संभाजीराजांना राजगडाला परत जाण्याची परवानगी देण्यात आली. राजे सफाईने वागत होते याचवेळी संभाजीराजांच्याबरोबर निराजी रावजी व प्रतापराव गुजरदेखील होते. त्यांच्या वतीने निराजी व प्रतापराव कारभार पाहतील असे ठरविण्यात आले होते. त्यामुळे पुढे जसवंतसिंहाच्या एका सैन्य तुकडीबरोबर संभाजीराजांची रवानगी राजगडी करण्यात आली व बादशहाकडे मनसब पक्की होण्याचे फर्मान पाठविण्यात आले.आजच्याच दिवशी म्हणजे ९ मार्च १६६८ रोजी संभाजीराजांच्या नव्या मनसबीवर शाही फर्मानाने शिक्कामोर्तब झाले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ९ मार्च इ.स.१६८९ (फाल्गुन वद्य त्रयोदशी, शके १६१०, संवत्सर विभव, शनिवार) संभाजीमहाराजांना पकडल्याची हरजीराजांना बातमी! मराठ्यांच्या धामधुमीत महाराष्ट्रात हाहा:कार उडालेला असताना तिकडे कर्नाटकात संभाजी महाराजांच्या अटकेची बातमी नव्हती. उलट हरजीराजे महाडीक यांनी कर्नाटकात संभाजीमहाराजांच्या सल्ल्यानुसार १६८९ सालापासून फ्रेंच व डचांशी चांगले संबंध ठेवण्यास सुरुवात केली होती! हरजीराजे महाडीक हे फ्रेंच व डचांवर चांगले वजन ठेवून वागत होते. मात्र युरोपात त्याच सुमारास डच व फ्रेंचांचे लिग ऑफ औरंगाबादचे युद्ध सुरु होण्यास फ्रेंचांविरुद्ध मदत मागण्यासाठी डचांनी आता हरजीराजांशी बोलणी सुरूकेली होती. मात्र याच सुमारास वज्राघात झाला, याच सुमास आजच्याच दिवशी म्हणजे ९ मार्च १६८९ रोजी महाराष्ट्रात संभाजीमहाराजांना मोगलांनी अटककेल्याची बातमी आली. या बातमीने हरजीराजे महाडीक मानसिकदृष्ट्या फार खचले! जीवनावरची त्यांची आसक्ती उडाली. कारण संभाजीमहाराजांचा फार मोठा आधार त्यांना होता. केवळ कर्तव्यभावनेने म्हणूनच ते स्वराज्यांची सेवा करीत होते. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://youtu.be/dxumuI7fzw4 📜 ९ मार्च इ.स.१७३१ १७३१ साली मराठ्यांनी फिरंग्यांना(पोर्तुगीज) उत्तर फिरंगाणत(वसई प्रांत) हल्ले करून जेरीस आणले होते. मराठ्यांच्या उत्पातामुळे पोर्तुगीज पुरते वैतागले होते. मराठ्यांचा प्रतिकार करण्यासाठी काय योजना केल्या आहेत त्याबद्दल ९ मार्च १७३१ रोजी उत्तर फिरंगाणच्या अधिकाऱ्याने गोव्याच्या पोर्तुगीज व्हाईसरॉयला पत्र लिहिले. तो पत्रात लिहितो, 'मराठ्यांनी आपल्या मुलखातून पुरता पाय काढलेला नसला तरी त्यांची चढाई थांबली आहे. उलटपक्षी आम्ही मात्र त्यांच्या मुलुखात जाळपोळ करण्याचा क्रम चालू ठेवला आहे. लढाईच्या दंग्यामुळे मराठ्यांच्या व्यापारउदिमाला मोठाच धक्का बसून त्यांची नुकसानी झाली आहे. बहुधा ते आता तहास यावेत आम्ही त्यांची शेकडो बायकापोरे पकडली आहेत. त्यांना आम्ही लवकरच बाटविणार आहोत. तेही त्यांना(मराठ्यांना) मोठे भयच आहे. इंग्रज आपल्याशी(पोर्तुगीज) मिळून आहेत. साष्टीच्या वेळी त्यांच्याच मदतीमुळे निभाव लागला. पुढेही ते मदत खचित करतील. पेशव्यांचे मोगलांशी वैमनस्य आहे. पण मोगल मराठ्यांसारखा विश्वासघातकी आहे. कदाचित तो पेश्व्यासही सामील व्हावयाचा. आंग्र्याशी आपला बिघाड आहे. शिद्दीही बिघडला आहे. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ९ मार्च इ.स.१७४७ नानासाहेब पेशवे इकडे मोहिमांमध्ये गुंतले असताना सातारा दरबारातील पेशव्यांचे प्रतिनिधी बाबूजी नाईक बारामतीकर, नागपूरचे रघूजी भोसले, श्रीपतराव प्रतिनिधी, आनंदराव सुमंत, नारोराम मंत्री, यमाजी शिवदेव दाभाडे, गायकवाड इ. मंडळींनी शाहूमहाराजांच्या कानाशी एकच कुजबूज सुरू केली आणि शाहूराजांचे नानासाहेबांविरोधात कान फुकले. म्हणून या कटकटीला वैतागून दि. ९ मार्च १७४७ रोजी 'शिक्के कट्यार व जरी पटका हुजुरे पाठवून जामदारखान्यात दाखल करविले' आणि नानासाहेबांना पेशवेपदावरून दूर केले. बाजीरावांच्या काळात दौलतीला झालेले प्रचंड कर्ज नानासाहेब फेडू शकणार नाहीत ही शंका आसपासच्या मंडळींनी शाहूमहाराजांच्या मनात निर्माण केल्याने त्यांना ते खरे वाटून नानासाहेबांना पदच्युत केले. आता नानासाहेब एकतर पुन्हा पेशवेपद मिळवण्यासाठी झोळी पसरतील अथवा शाहूमहाराजांविरुद्ध बंड करतील असे दरबारातील प्रतिस्पर्धांचे डावपेच होते. परंतु, नानासाहेबही राजकारणात मुरलेले होते. त्यांना विनातक्रार पेशवेपद सोडून उलट, "सर्वस्वी अपराधी अपत्य आहे. पायाशी कोणती सेवा (घडावी ते) सांगणे, (परंतु) आज्ञा होऊन (या) पायांचा वियोग न व्हावा..." अशी अर्जदास्त नानासाहेबांनी शाहूमहाराजांकडे केली. शिवाय पेशवेपदाच्या (नानासाहेबांच्या!) तोलामोलाचा एकही मनुष्य न दिसल्याने दि. १३ एप्रिल रोजी शाहूमहाराजांनी नानासाहेबांनाच पुन्हा पेशवेपदाची वस्त्रे दिली. यानंतर नानासाहेब लगेच कोकणात पुन्हा जम बसवू पाहणाऱ्या पोर्तुगीजांवर चालून गेले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ९ मार्च इ.स.१७४९ ( चैत्र शुद्ध द्वितीया शके १६७१, शुक्लनाम संवत्सरात गुरुवार) दि. ९ मार्च १७४९ या दिवशी नानासाहेबांचे पुत्र विश्वासराव यांची मुंज करण्यात आली. विश्वासरावांच्या मुंजीनंतर लगेचच नानासाहेबांचे सावत्र बंधू, मस्तानी आणि श्रीमंत बाजीरावपुत्र समशेरबहाद्दर यांचे लग्न पेठ संस्थानचे संस्थानिक लक्षधीर दलपतराय पवार यांची मुलगी लालकुंवर हिच्याशी करण्यात आले. (एप्रिल १७४९). 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀ #🗿शिवकालीन पुराणवस्तू
सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
644 views
15 hours ago
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ 📜 ८ मार्च इ.स.१६७० ( फाल्गुन वद्य द्वादशी, शके १५९१, संवत्सर सौम्य, मंगळवार ) किल्ले पुरंदर स्वराज्यात दाखल :- आग्र्याहून सुटका करून घेतल्यानंतर सुमारे तीन वर्षे महाराजांनी कोणतीही हालचाल केली नाही. मात्र १६७० नंतर तहात गेलेले सर्व किल्ले परत घेण्याचा निश्चय केला व सिंहगडापाठोपाठ आजच्या दिवशी पुरंदर स्वराज्यात दाखल झाला. किल्ले पुरंदर पुन्हा जिंकला तो निळोपंत काकांनी! व्हय पासष्टी-सत्तरीच्या घरात पण मावळी मनगट अजूनही पोलादी असलेलं. ह्या वयातही काकांनी केलेल्या अतुलनीय पराक्रमावर महाराज बेहद्द खुश झाले! 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #🗿शिवकालीन पुराणवस्तू https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtu.be/aTXiwGaM8mQ 📜 ८ मार्च इ.स.१६७३ नरवीर कोंडाजी फर्जंद...🚩 इ.स ८ मार्च १६७३ रोजी रायगड येथे कोंडाजींनी पन्हाळा फत्ते केल्याची बातमी जासुदामार्फत कळाली कोंडाजींच्या शूरत्वाची बातमी समजताच छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर दाखल झाले कोंडाजींची पन्हाळगडावरील तीन दरवाजा नजीक असलेल्या तुपाच्या विहिरी जवळ त्यांनी गळाभेट घेतली छत्रपतींनी कोंडाजींचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक करून त्यांना बक्षिसी दिली छत्रपती शिवाजी महाराजांनंतर कोंडाजींनी स्वराज्य रक्षणासाठी छत्रपती संभाजी महाराजांना मोलाची साथ दिली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ८ मार्च इ.स.१६८९ मोगल बादशाह औरंगजेब याने छत्रपती संभाजी राजे यांना कैद केले व त्यानंतर मराठा साम्राज्य सर्वस्वी संपवावे म्हणून आपल्या झुल्फिकारखान नावाच्या सरदाराला फौजेनिशी छत्रपती राजाराम महाराज होते त्या रायगड किल्ल्याला वेढा घालायला पाठवून दिले. दि ८ मार्च १६८९ या दिवशी तो आपल्या सैन्यासह महाड येथे तळ टाकून बसला. पुढील आज्ञेनुसार दि २५ मार्चला त्याने रायगडाला वेढा दिला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ८ मार्च इ.स.१६९४ औरंगजेबने शहाजादा मुअज्जमचा मुलगा शहाजादा मुइजुद्दीन याला नोव्हेंबर, १६९२ त पन्हाळगडाविरुद्ध रवाना केले. शहाजादा मुइजुद्दीन याने पन्हाळ्याला वेढा घातला. पण किल्ला जिंकून घेण्याचे त्याला जमेना. ऑक्टोबर १६९३ मध्ये रामचंद्रपंत, शंकराजी आणि धनाजी जाधव हे पन्हाळगडाला मदत करण्यासाठी चालून आले. २० ऑक्टोबरपासून चकमकी सुरू होऊन त्या काही दिवस चालू राहिल्या. मराठ्यांनी किल्ल्यात रसद आणि कुमक पोहचविली. याच वर्षी बारामतीचा, मोगलांतर्फे असलेला ठाणेदार हणमंतराव निंबाळकर हे मराठ्यांना येऊन मिळाले. इ. स. १७०४ मध्ये याचा मृत्यू होईपर्यंत याने मोगलांस सळो की पळो करून सोडले. इ. स. १६९४ त पन्हाळगडचा वेढा मोगलांकडून चालूच होता. औरंगजेबाने ७ मार्च १६९४ रोजी पन्हाळ्याकरिता मोगलांना आणखी ६ हजार सैन्याची कुमक पाठविली. पण ती पोचण्यापूर्वीच शहाजादा मुइजुद्दीन हा पन्हाळा सोडून ८ मार्च १६९४ रोजी निघाला होता. हे समजल्याबरोबर औरंगजेबाने शहाजादा अज्जमचा मुलगा बेदारबख्त, यास पन्हाळ्याच्या वेढ्यासाठी पाठविले. तरीही मोगलांस पन्हाळा किल्ला काबीज करणे जमले नाही. म्हणून औरंगजेबने पन्हाळ्याचा मराठा किल्लेदार परशुराम त्रिंबक यास ३१ ऑक्टोबर १६९९त ताकीदवरपत्र लिहिले, ह्या पत्रास किल्लेदार त्रिंबक याने भीक घातली नाही. पन्हाळ्याला घातलेला मोगल वेढा चालूच राहिला. तो चालू असता धनाजी जाधवांनी बाहेरून मोगलांचा अतिशय उच्छेद केला. https://youtu.be/aTXiwGaM8mQ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ८ मार्च इ.स.१७३५ राधाबाईंनी १४ फेब्रुवारी १७३५ ला काशीविशेश्वराच्या यात्रेकरिता पुणे सोडले आणि त्या ८ मार्चला बु-हाणपूरला आल्या. त्यांच्याजवळ काही खास फौज वगैरे नव्हती. शे-पन्नास लोक असतील त्याहून जास्त नाही. बुन्हाणपूर सोडताना येथील मुघल सुभेदाराने प्रवासखर्चासाठी काही रक्कम, तसेच वाटेत रक्षणाकरिता २०० स्वार दिले, ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. हिंदुस्थानात आपल्या पराक्रमाच्या तेजाने तळपणाऱ्या प्रतापसूर्य श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या आईसाहेबांचा पाहुणचार करण्याची आलेली संधी उदेपूरच्या महाराणा प्रतापच्या गादीवरील त्याचा वंशज जगतसिंग याने वाया जाऊ दिली नाही, बाईंचा खूप आदरसत्कार केला. त्यांचे आशीर्वाद मिळवले. प्रवासासाठी रोख रक्कम, तसेच हत्ती, घोडे, सोने-नाणे देऊ केले. उदेपूरचा दिवाण बहिरदास यानेदेखील राधाबाईंना प्रवासासाठी काही रोख रक्कम नजर केली. शाही उमरावांनीदेखील वाटेत जागोजागी राधाबाई यांना नजराणे, आहेर दिले, मेजवान्या दिल्या आणि आपल्या हद्दीतून त्यांना सुखरूप जाऊ दिले. या सर्व यात्रेत बादशाहकडून किंवा कोणत्याही शाही अंमलदारांकडून, सरदारांकडून कोणत्याही प्रकारचा अडथळा झाला नाही. किंबहुना त्यांच्याकडून राधाबाईंची चांगली बडदास्त ठेवण्यात आली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ८ मार्च इ.स.१७५८ मल्हारराव कुंजपुऱ्यावर चालून गेले. तेव्हा बरोबर कुरुक्षेत्र यात्रेसाठी जनानखाना व परिवार होता पलिकडे सरहिंद येथें अबदालीच्या तर्फेने अदुसमदखान बंदोबस्तास होता, त्याने होळकराच्या मंडळीवर चाल करून अटकावून ठेविले पण होळकराच्या संरक्षकांनी अफगाण पहारेकऱ्यास कापून बायकास सोडवून परत नेले. नंतर एक दिड महिना आपले बेत ठरविण्यास घेऊन रघुनाथराव, मल्हारराव वगैरे पुढे चाल करून गेले. ते तारीख ८ मार्च स. १७५८ ला सरहिंद येथे पोचले. तेथे त्यांना अलाजाठची शीख फौज सामील झाली. त्यांनी सरहिंदला वेढा घातला. लढाई चालू झाली. अब्दालीचे सरदार अब्दुस्समदखान व जंगबाजखान यास जखमा लागल्या धरून आणून वस्र भूषणे देऊन आपल्यापाशी ठेविले. शहर लुटून घेतलें. श्रीमंतांनी अबदालीची दहा हजार फौज बुडविली. त्याचा सूड घेतला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ८ मार्च इ.स.१७७९ इष्टुर फाकड्यास मारून तळेगावावर इंग्रजांस जेर करणारा शूर पुरुष भिवराव पानसे तोफखान्याचा कामदार थोडा ताप येऊन एकाएकी मरण पावला.......`` मराठेशाहीत तीन व्यक्तींचा फाकडा ( पराक्रमी,शूर,वीर) म्हणून उल्लेख मराठ्यांच्या इतिहासात केलेला आढळतो.इष्टुर शिवाय मानाजी शिंदे व कोन्हेर त्रिंबक एकबोटे हे अन्य फाकडे आहेत जेम्स स्तुअर्ट ला त्याच्या पराक्रमामुळे कौतुकाने फाकडा म्हटले जाते. रणांगणात शत्रूने दाखविलेल्या पराक्रमाला दिलदारपणे दिलेली ति दाद आहे अण कि शत्रूचे कौतुक ! 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
1K views
2 days ago
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ 📜 ७ मार्च इ.स.१६४७ इ.स. १६४७ मधे सतरा वर्षांच्या छत्रपती शिवरायांनी आदिलशहाच्या ताब्यातला तोरणगड जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. तोरणगड हे स्वराज्याचे तोरणच ठरले. त्याच साली शिवरायांनी कोंढाणा(सिंहगड), आणि पुरंदर हे किल्ले आदिलशहाकडून जिंकून पुणे प्रांतावर पूर्ण नियंत्रण मिळवले.या शिवाय तोरणगडा समोरील मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून त्याची डागडुजी केली व त्याचे नाव त्यांनी राजगड असे ठेवले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #📜इतिहास शिवरायांचा #🗿शिवकालीन पुराणवस्तू https://youtu.be/aeUa842wATA 📜 ७ मार्च इ.स.१६४७ आदिलशाहीशी आज ना उद्या राजांना टक्कर द्यावी लागणार हे दादाजींना स्पष्ट दिसत होते. मनातून ते निराश झाले होते. राजांच्या किल्ल्यांचे बांधकाम पूर्ण होत आले होते. रोहिडेश्वरांची तटबंदी भक्कम झाली होती. किल्ल्यांवरच्या तोफांनी बुरूज सजले होते. राजांची शिबंदीही आता मोठा आकार घेत होती. रोहिडेश्वरावर जमा केलेली हजार-बाराशे मावळेफौज पाच-सहा हजारावर गेली होती. व्याप वाढत होता. त्याबरोबर राजांच्या चिंताही वाढत होत्या. मुख्य चिंता होती दादाजींच्या आजारपणाची. दादाजींचे वय झाले होते. आणि आजारपण चालू होते. त्यांना रात्रीची झोप लागत नसे. दादाजींना आठवले की आपण पारस परगण्याचे मलठाण गावचे हिशेबनीस. शहाजीराजांनी आपल्या कारभारासाठी आपणांस उचलले. महाराज साहेबांचा विश्वास बसला, पुणे जहागिरीचा कारभार आपल्या नावे करण्याची त्यांनी दादाजींना आज्ञा केली. शहाजीराजांच्या ह्या विश्वासामुळे आदिलशाहीच्या दरबारचासुद्धा दादाजींच्यावर भरवसा होता. त्यांनीही दादोजींना अधिकार दिले होते. दादोजींना आपले मरण जवळ आल्याचे समजले, त्यांनी जहागिरीच्या हिशेबांच्या वह्या शिवाजीराजांस दाखविल्या. हळूहळू ते थकत चालले. अंथरुणातून उठण्याची शक्तीसुद्धा त्यांच्यात राहिली नाही. दादोजी घाबरे झाले आणि त्यांनी प्राण सोडला. (इ. स. ७ मार्च १६४७) 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ७ मार्च इ.स.१६७३ #वीर_कोंडाजी_फर्जंद_यांचा_महापराक्रम किल्ले पन्हाळा जिंकण्यासाठी केवळ ६० मावळ्यांना सोबत घेऊन शत्रूच्या २५०० ते ३००० फौजेविरूद्ध लढा देऊन फक्त ३ तासात ती लढाई व किल्ला जिंकणारे वीर कोंडाजी फर्जंद यांची शौर्यगाथा... जगाच्या इतिहासात एवढ्या कमी सैन्याने एवढ्या जास्त सैन्याचा कमीत कमी वेळेत केलेला हा एकमेव पराक्रम... 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ७ मार्च इ.स.१६८० ( फाल्गुन वद्य द्वितीया, शके १६०१, संवत्सर सिद्धार्थी, रविवार ) राजाराममहाराजांची मुंज झाली :- दिलेर खान प्रकरणानंतर शंभूराजे स्वराज्यात परतले. शंभुराजांची पन्हाळगडावर भेट घेऊन सहकाऱ्यांशी चर्चा करून पुढे काय आणि कसे करायचे याच विचारात शिवरायांनी पन्हाळगड सोडला व समर्थांना भेटायला सज्जनगडावर गेले. भेट घेऊन महाराज रायगडावर परतले आणि आजच्या दिवशी राजाराममहाराजांची मुंज महाराजांनी उरकून घेतली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜७ मार्च इ.स.१७६० मराठ्यांचा दक्षिणेतून उत्तरेकडे प्रवास काबूलच्या अब्दालीचा पराभव करण्यासाठी, पेशव्यांनी (नानासाहेबांनी), एक मोहीम आखली, आणि या मोहिमेच नेतृत्व शूरवीर व राजनीतीधुरंधर श्रीमान सदाशिवरावभाऊ यांना दिलं. दि. ७ मार्च १७६० ला, सदाशिवरावभाऊ ४८ हजार फौझेसह, फ्रेंच्याच्या आधुनिक तोफखान्यासह आणि विश्वासू सरदारांसह दिल्लीच्या संरक्षणासाठी निघाले. मार्गात सैन्य जमा होत होतं. https://youtu.be/aeUa842wATA 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
967 views
3 days ago
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ 📜 ६ मार्च इ.स.१६६६ (फाल्गुन शुद्ध दशमी, शके १५८७, संवत्सर विश्वावसू, वार मंगळवार) औरंगजेबाचे अभयपत्र! महाराजांना जिविताची हमी देणारे अभयपत्र मिळाले. महाराजांनी बिनघोर आग्रा येथे यावे हा औरंग्याचा डाव मात्र केवळ स्वराज्याखातर आणि मिर्झाराजे जयसिंगच्या शब्दावर विसंबून महाराजांनी जिवाचा धोका पत्करला होता. स्वतःबरोबर युवराज शंभुराजेंना घेऊन जात दुहेरी धोका महाराजांनी स्विकारला होता. नियती मात्र महाराजांची परीक्षा घेत होती. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtu.be/JBUYfYogGv4 📜 ६ मार्च इ.स.१६७२ १६७२ मध्ये घोडबंदरवर स्वारी करून पोर्तुगीझांची वसाहत काबीज करण्याची छत्रपती शिवाजी महाराजांनी धाडसी प्रयत्न केला. त्यामुळे मुंबईकर इंग्रज घाबरून शिवाजी महाराजांची मर्जी संपादण्याच्या उद्योगास लागले. सख्य जोडण्यासाठी मिस्टर उस्टिक यास रायगडावर पाठविण्याचे कंपनीने ठरविल. राजापूरलुटीची भरपाई करून घेणे, हा तहाचा एक हेतु होता. २२ फेब्रुवारी रोजी मुंबईकरांनी ठरविले की शिवाजी महाराजांस स नजराणा देण्यासाठी ६०० रु. व शिवाजीच्या सरकारकुनांसाठी १५० रु. खर्च करावेत. उस्टिकने आपल्याबरोबर दहा भंडारी, दोन इंग्रज, दोन घोडे, पालखीचे भोई व दोनशे रुपये रोकड घ्यावी. उस्टिक रायगडावर का जात आहे, या बाबत गुप्तपणा राखावा; जाहीर करणेच झाले, तर राजापूरच्या वखारीची व गलबतांची नुकसानभरपाई करून घेण्यासाठी त्यास पाठवीत आहोत, एवढेच सांगावे असे कंपनीने ठरविले. उस्टिकने ६ मार्च १६७२ रोजी रायगडवर जाण्यास मुंबईहून निघाला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ६ मार्च इ.स.१६७३ विजापूरचा सरदार खवासखान आपल्याविरुद्ध स्वारी काढण्याच्या बेतात आहे हे कळल्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी आक्रमक भूमिका घेऊन प्रतापराव गुजर आणि आनंदराव यांना विजापूरी प्रदेशात चढाई करण्यासाठी पाठविले. दरम्यान अण्णाजी दत्तो व कोंडाजी फर्जंद यांना पन्हाळा किल्ला घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी पाठविले. कोंडाजींनी आपल्या बरोबर मर्द मराठे ६० मावळे घेतले. दिनांक ६ मार्च १६७३ रोजी रात्री ते दोऱ्यांवरून किल्ल्यावर चढले. भेद यशस्वी होऊन ते वर जाऊन पोचले, तेव्हा किल्ल्यांतील लोक सावध होऊन त्यांजवर चालून आले. इतकी कडी गस्त ठेऊनही शत्रू आला कसा हेच कोणाला समजेना. शत्रू अफाट असावा असे त्यांस वाटले. भयंकर लढाई जुंपली. कोंडाजींनी एकदम किल्लेदारावर तलवार उगारून चाल केली. दोघांचे अटीतटीचे तुंबळ युद्ध झाले. कोंडाजींनी किल्लेदाराचे मुंडके उडविले. किल्लेदार गडावरच्या राजवाड्यापुढे ठार होऊन पडला. अवघ्या दोन-तीन तासात पन्हाळा किल्ला मराठ्यांनी जिंकला. स्वारीचे रसभरीत वर्णन जयराम पिंडये या कवीच्या ‘पर्णाल पर्वत ग्रहणाख्यान' या संस्कृत ग्रंथात आलेले आहे. पन्हाळा किल्ला हातचा गेला हे समजल्यावर विजापूर दरबारात खळबळ माजली. महाराज रायगडावर होते. त्यांजकडे जासूद पाठविला. ही आनंदाची बातमी महाराजांस २ दिवसांनी कळली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ६ मार्च इ.स.१७२८ #निजामाचा_पराभव, मराठ्यांबरोबर मुंगी-शेगावचा तह निजाम-उल-मुल्क त्याआधी दिल्लीहून सेना घेऊन दक्षिण सुभा सोडवायला बाहेर पडला होता निजाम हा औरंगजेबाच्या काळातील लढवय्या अनेक देश पाहीलेला व अनेक लढाया त्याने स्वबळावर जिंकल्या होत्या.... निजामाचा सरदार इवाझ खान याने बाजीरावांचा पाठलाग सुरू केला बाजीराव खानदेशातून गुजरातकडे निघाले बाजीराव आपल्याला पतंगाप्रमाणे ओढीत नेत असल्याचे लक्षात येऊन निजामाच्या सैन्याने त्यांचा नाद सोडला व बाजीरावास शह देण्यासाठी त्याने पुण्यावरच चाल केली आणि साताऱ्यातील छत्रपतींना धोका निर्माण केला.... असा शह बसल्यावर छत्रपती, बाजीराव दोघेही नाक मुठीत धरून आपल्यास शरण येतील असा निजामाचा हा डाव पूर्ण होत आला होता बाजीरावांनी त्यास भीक न घालता निजामालाच काटशह देण्याचे ठरवले व खुद्द निजामाची राजधानी असलेल्या औरंगाबादवर चाल केली.... निजामास ही खेळी अनपेक्षित होती त्याला औरंगाबादचा बचाव करणे भाग होते पण हाताशी आलेला मराठा छत्रपती सोडणेही त्याच्या जीवावर आले होते आता बाजीरावांच्या कचाट्यातून औरंगाबाद तरी वाचवावे यासाठी निजाम पुणे-सातारा परिसर सोडून उत्तरेस निघाला.... बाजीरावांनी औरंगाबादचा रस्ता सोडून निजामाला वाटेतच पकडण्याचा व्यूह रचला छापा घालून चकमकींचे लढाईत पर्यवसन होण्याआधी आपल्याला अनुकूल अशा दिशेस पळ काढत बाजीरावांनी निजामास नाशिककडे ओढत नेले अवजड तोफखाना, बोजड चिलखती घोडदळ यामुळे निजामाचा तोटाच झाला.... राऊंनी अगदी नियोजन बद्धतेने निजामाला पालखेडला आणले पूर्वनियोजित योजने प्रमाणे सर्व अधिकाऱ्यांना आपापल्या फौजेसह बाजीरावांनी पालखेडला बोलून घेतले होते.... आता मराठ्यांकडे अंदाजे ५०००० सैन्य जमले होते नगर पासून मराठा हेरांच्या टोळ्या निजामाच्या आस-पास होत्या त्याच्या प्रत्येक हालचालीची खबर बाजीरावांना टाकोटाक मिळत होती.... पालखेड वैजापुरच्या पूर्वेला १२ मैल तर औरंगाबाद पासून २८ मैलावर आहे पूर्वेला पाण्याचा साठा आहे त्याच बाजूला आपले सैन्य घेऊन राऊ होते Horse Shoe अर्थात घोड्याच्या नालेसारखी व्यूह रचना करून निजामाला खेचत आणून कोंडीत पकडले.... औरंगाबादकडे झेपावणारे बाजीराव (राऊ) आणि त्यांना तेथे पोहचण्या अगोदर रोखण्याच्या इराद्याने निघालेला निजाम यांची टक्कर २५ फेब्रुवारी १७२८ ला पालखेडला झाली मराठ्यांनी निजामाचे पाणी रोखले, रसद तोडली.... अर्जुनाच्या दिव्यास्त्रां प्रमाणे प्रभावी असलेला निजामाचा प्रसिद्ध तोफखाना नगरला गंजत पडला होता आता त्याचा ह्या आणीबाणीत निजामाला काहीच उपयोग नव्हता मराठ्यांना तोफांनी भाजण्याचे स्वप्न मनात मांडे खाणाऱ्या निजामाचे पुर्णपणे भंगले होते.... आणि भयानक वास्तव मृत्यू बनून पालखेडला त्याच्या समोर उभे होते पालखेडला कोंडीत सापडलेल्या निजामाचे अनन्वित हाल होऊ लागले भूक, तहान आणि समोर असलेले मराठे यांच्या कात्रीत सापडलेल्या निजामावर आणि त्याच्या फौजेवर जिवंतपणीच स्वतःचीच कबर खोदण्याचा प्रसंग आला.... या सर्व बिकट परिस्थितीमुळे अखेर निजामाने ईवाझखाना मार्फत तहाचे बोलणे चालवले अखेर ६ मार्च १७२८ मुंगी-शेवगावला तह झाला.... त्यानुसार निजामाला खालील अटींचे पालन करणे बंधनकारक होते - १.छत्रपती शाहूराजे हे मराठा साम्राज्याचे एकमेव वारस असल्याचे निजामाने व पर्यायाने मोघल सम्राटाने मान्य केले.... २. मराठ्यांना दख्खनमधील चौथ व सरदेशमुखीच हक्क परत केला गेला.... ३.मराठ्यांच्या देशमुखांना परत आपापल्या जहागिरी इनाम झाल्या.... ४.महसूलाची थकलेली रक्कम निजामाने मराठ्यांस नजर करण्याचे कबूल केले.... https://youtu.be/JBUYfYogGv4 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ६ मार्च इ.स.१७३९ चिमाजी आप्पांच्या वसई मोहीमेत या किल्ल्याने महत्वाची भूमिका वठवली होती इ.स १७३७ मध्ये मराठे व पोर्तुगिज यांच्यात पेटलेल्या वसईच्या युध्दामुळे धारावी बेटाला महत्व आले धारावी किल्ला हा वसईच्या किल्ल्या समोर आहे एका बाजूला वसईची खाडी तर दुसऱ्या बाजूला अरबी समुद्रयामुळे धारावी किल्ल्याचे स्थान वसई मोहीमेत अतिशय महत्वाचे होते या किल्ल्यावरुन वसईच्या पोर्तुगिजांना समुद्र व खाडीमार्गे मिळणारी रसद तोडणे शक्य होते तसेच वसई किल्ल्यावर लक्ष ठेवणे व मारा करणे धारावी किल्ल्याच्या उंचीमुळे सहज शक्य होते... १२ एप्रिल १७३७ मध्ये मराठ्यांनी धारावी बेटावर हल्ला केला आणि घाइघाइत धारावी किल्ला बांधायला घेतला पोर्तुगिजांना मराठ्यांच्या किल्ला बांधण्याची बातमी लगेच कळली व पुढील धोका ओळखून त्यांनी हल्ला करुन धारावी बेट व अर्धवट बांधकाम झालेला किल्ला ताब्यात घेतला आणि किल्ला बांधून पुर्ण केला.... वसई किल्ल्याच्या दृष्टीने मराठ्यांना “धारावी किल्ला” जिंकून घेणे आवश्यक होते म्हणून ३० नोव्हेंबर १७३७ रोजी मराठ्यांनी ४००० हशम व १०० घोडेस्वारांच्या मदतीने धारावी किल्ला जिंकला त्यानंतर पोर्तूगिजांनी २८ फेब्रुवारी १७३८ च्या निकराच्या युद्धात धारावी किल्ला परत एकदा जिंकून घेतला पुन्हा चिमाजी आप्पांनी ९ मार्च १७३८ ला जातीने किल्ला घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला हा पराभव जिव्हारी लागल्यामुळे मराठे व पोर्तुगिज यांच्यातील संघर्ष वर्षभर चालू होता शेवटी ६ मार्च १७३९ रोजी मराठ्यांनी परत धारावीचा किल्ला जिंकून घेतला इ.स १८१८ मध्ये या किल्ल्याचा ताबा इंग्रजांकडे गेला.... 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ६ मार्च इ.स.१७७५ रघुनाथरावांनी दि. ६ मार्च १७७५ रोजी इंग्रजांशी पेशवाई पुन्हा मिळवून देण्याबाबत तह केला. यानुसार इंग्रजांना त्यांनी वसई, साष्टी, ठाणे इ. प्रदेश देण्याच्या करारावर सह्या केल्या. हाच तो दुर्दैवी असा प्रख्यात 'सुरतेचा तह'! 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
See other profiles for amazing content