Follow
सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
@159107303
4,024
Posts
10,566
Followers
सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
4.4K views
9 hours ago
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ 📜 १५ एप्रिल इ.स.१६५७ छत्रपती शिवाजी महाराज इंगळे घराण्यातील गुणवंताबाईसाहेब यांच्याशी विवाह संपन्न. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtube.com/shorts/YRf4Ej_jRRs?feature=share 📜 १५ एप्रिल इ.स.१६४५ (चैत्र वद्य चतुर्दशी, शके १५६७, संवत्सर पार्थिव, वार मंगळवार) स्वराज्याची शपथ! लहानपणापासून माँसाहेब जिजाऊंसाहेबांच्या तोंडून श्रीरामांच्या, धणुर्धारी अर्जुनाच्या, त्यांच्या पराक्रमाच्या गाथा ऐकत महाराज वयाच्या १५, पंधराव्या वर्षात आले. महाराजांच्या जीवनातला हा अत्यंत महत्वपूर्ण असा काळ मनात हिंदवी स्वराज्य स्थापनेचा संकल्प आकारास येण्याचा हा अनुकूल काळ होता. १२ मावळचे अनेक सवंगडी ज्यात तानाजी मालुसरे, सुर्याजी मालुसरे, बाजी पासलकर, चिमणाजी व बाळाजी मुदगल देशपांडे, येसाजी कंक, कोंडाजी कंक, भिकाजी चोर, बाजी जेधे, सुर्यराव काकडे, त्र्यंबक सोनदेव, "दादाजी नरसप्रभु देशपांडे ही नव्या दमाची, तरुण तडफदार मंडळी यवनांच्या अन्यायी आक्रमणाविरुद्ध महाराजांचा शब्द झेलायला तयार होती, आणि हाच संकल्प महाराज आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी, त्यांच्या सवंगड्यांनी शंभुमहादेवाच्या साक्षीने रोहिडेश्वराच्या मंदिरात सोडला. भोर तालुक्यातील रोहिडा खोऱ्यातील रायरेश्वर हे सह्याद्रीच्या शिखरावरील गच्च झाडीत असलेल्या ठिकाणी रक्ताचा अभिषेक घालून, सर्व सवंगड्यांचे इमान "श्री" पाशी झाले. हिंदवी स्वराज्य संकल्पनेचा नाद इथेच गुंजला. आदिलशाहीच्या अन्यायाविरुद्धच्या संघर्षास जणू एक अधिष्ठान प्राप्त झाले. ही शपथक्रिया रायरेश्वराच्या मंदिरात शंभुमहादेवाच्या साक्षीने करंगळी कापून मावळ्यांच्या बरोबर रक्ताचा अभिषेक करून स्वराज्य स्थापनेचा संकल्प सोडला गेला. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇 📜 १५ एप्रिल इ.स.१६७३ पन्हाळा किल्ला मराठ्यांनी काबीज केल्याची बातमी विजापूर दरबारांत धडकल्यावर तेथे खळबळ उडाली. सर्व सरदारांनी विचार करून आपला नामांकित सेनानी बहलोलखान याच्या नेतृत्वाखाली राजांवर सैन्य पाठविले. विजापूर दरबाराचा हा अफझलखानसारखा अतिशय बडा सरदार होता, त्याचे नाव अब्दुल करीम बहलोलखान, हा मूळचा अफगाणिस्थानातील जवान. जातीचा पठाण. तो विजापूर दरबारी आल्यावर त्यास दरबारने मिरज व पन्हाळा सुभ्याचा सुभेदार नेमले होते. खुद्द त्याच्या सुभ्यापैकी महाराजांनी पन्हाळा किल्ला घेतल्यामुळे तो चिडला होता. बहलोलखान विजापुराहून निघून तिकोट्यावरून उंब्राणीवर येऊन पोचला. त्यास रांगणा अद्वानी, कार्नोल आदी ठिकाणाहून आणखी सैन्य येऊन मिळावे म्हणून विजापूर दरबारने हुकूम काढले. शिवाय त्याने मोगल सरदार दिलेरखान याच्याकडेही फौजेची मागणी केली. हे राजांना कळले तेव्हा बहलोलखानास दुसरी सैन्ये येऊन मिळण्यापूर्वीच त्यांच्यावर आपण हल्ला करावा म्हणून राजियांनी प्रतापराव व आनंदराव यांची त्याजवर रवानगी केली. दोनच दिवसांत प्रतापराव उंब्रणीजवळ बहलोलखानाच्या तळाशी आले. उमराणीच्या तलावाचे पाणी बंद करण्याचे हुकूम दिले. पाणी बंद झाल्याचे समजल्यावर खानाच्या तोंडचे पाणी पळाले, तेव्हा खानाने युद्धास सुरवात केली, तीन तास घनघोर युद्ध चालले. मुंडक्यांचा खच पडला. प्रतापरावांस शरण जाण्याशिवाय खानाकडे दुसरा उपाय नव्हता. खानाने आपला वकील प्रतापरावाकडे पाठविला, शरणागती पत्करली आणि पुन्हा मराठ्यांच्या वाटेस जाणार नाही असे कबूल केल्यामुळे प्रतापरावाने त्यास जाऊ दिले. मराठ्यांच्यापुढे मानाखाली घालून पठाणांची सेना निघून गेली. (दिनांक १५ एप्रिल १६७३) महाराज यावेळी रायगडावर होते. प्रतापरावांनी खानाला शरण आणले, एक खासा हत्ती काबीज केला हे ऐकून शिवराय आनंदले. पण प्रतापरावाने बहलोलखानास सोडून दिल्याचे समजतांच छत्रपती शिवाजीराजे भयंकर रागावले. त्यांनी रावांना लिहिले, “खानाशी सल्ला काय निमित्त केला?" 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇 📜 १५ एप्रिल इ.स.१६८० महाराजांच्या मृत्युनंतर छत्रपती शंभूराजांनी राजापूर, कुडाळकडील ‘कामावीसदारास’ पत्रे धन घेऊन पन्हाळ्यावर बोलावले तसेच कारवारच्या बंदरात धान्य होते ते त्यांनी आपणाकडे आणले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇 📜 १५ एप्रिल इ.स.१६८३ छत्रपती संभाजी राजांनी स्वत: १००० घोडदळ व २००० पायदळ घेऊन ‘तारापूर’ वर हल्ला केला आणि ते शहर जाळले. याशिवाय मराठ्यांनी दमण पासून वसई पर्यंत असलेल्या डहाणू, आसेरीम, सैबाना आणि इतर काही गावावर हल्ले केले. त्यांनी काही गावे लुटली, काही जाळली, होड्या व पाडाव हस्तगत केले आणि २ पोर्तुगीज पाद्री कैद केले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १५ एप्रिल इ.स.१७३९ वसई किल्ल्यावरील मराठ्यांच्या हल्यामध्ये पोर्तुगीज ऑफीसर पिंटो आणि सिलवेरा यांचा मृत्यू. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
1.1K views
1 days ago
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 📜 १४ एप्रिल इ.स.१६६४ (चैत्र वद्य प्रतिपदा, शके १५८६, संवत्सर क्रोधी, वार गुरुवार) जसवंतसिंहाचा सुलतानढवा! जसवंतसिंहाने सुलतानढवा नावाचा हल्ला करून किल्ले सिंहगड जिंकण्याचा प्रयत्न केला मात्र सजग मराठ्यांनी तो पुरता उधळून लावला. जसवंतसिंहाचा किल्ले सिंहगड वेढा बादशाही थाटात सुरूच होता. सुमारे ६ महिने झाले तरी मराठे जसवंतसिंहास दाद देत नव्हते. अखेर "सुलतानढवा" म्हणजे निर्वाणीचा हल्ला केला. तोफांसह मोगलांनी निकराचा हल्ला करून, गड घेण्याचा प्रयत्न केला. मात्र चिवट मराठ्यांनी अतिशय तिखट प्रतिकार करून शेकडो मोगल आणि राजपूत कापून काढले, अनेक मोगल सैनिक दारुगोळ्याच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत ठार झाले. त्यामुळे जसवंतसिंहाचे माथे पार भडकून गेले. जसवंतसिंह व रावसिंह हाडा यांच्यातच वाद सुरू झाले. मात्र सुलतानढवा अयशस्वी झाल्यामुळे जसवंतसिंह पुरता निराश झाला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩शिवराय https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtube.com/shorts/7euoCKwtAyw?feature=share 📜 १४ एप्रिल इ.स.१६६५ (वैशाख शुद्ध दशमी, शके १५८७, संवत्सर विश्वावसू, वार शुक्रवार) किल्ले वज्रगड मोगलांच्या ताब्यात! मुरारबाजींच्या हौतात्म्यानंतर किल्ले पुरंदरचा जुळा भाऊ असलेल्या किल्ले वज्रगडावर दिलेरखानाने हल्ला करून किल्ले वज्रगड ताब्यात घेतला. परंतु मराठी मनगटाची ताकद काय असते, किती चिवट असते हे मिर्झाराजे जयसिंग व दिलेरखान यांस कळून आले. ३ महिन्यांपेक्षा जास्त काळ जर एक किल्ला घेण्यास लागत असेल तर स्वराज्य घेण्यास किती वेळ लागेल हाच विचार मिर्झाराजे जयसिंग यांनी केला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १४ एप्रिल इ.स.१६६७ रांगणा किल्ल्याला आदिलशाहीचा वेढा १४ एप्रिल ते १२ मे १६६७ या काळात रांगण्याला बहलोलखान व व्यंकोजी भोसले यांनी वेढा दिला होता. परंतु शिवरायांनी जातीने येऊन हा वेढा मोडून काढला. शिवरायांनी या गडाच्या मजबुतीकरणासाठी ६००० होन खर्च केल्याचा पुरावा सापडतो. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १४ एप्रिल इ.स.१६७३ छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरून किल्ले रायगडाच्या दिशेने आले. हुबळीवर स्वारी करून प्रतापराव गुजरकाकांनी अथनीवर धाड टाकली. कारवार प्रांतात प्रतापरावांनी मांडलेली धूम पाहून बेहलोलखान कोल्हापूर भागात सैन्यांची जमवाजमव करून प्रतापरावांना दडपण आणण्याचा प्रयत्न केला. मात्र याच वेळी महाराज खुद्द पन्हाळगडावर मुक्कामी असल्याची वार्ता बेहलोलखानाच्या कानी गेली. त्याचबरोबर पावसळाही जवळ असल्याने खानाने जास्त हालचाल केली नाही. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १४ एप्रिल इ.स.१६८५ विजापुरचा वेढा सुरू असल्याचे औरंगजेब बादशहाला कळविण्यात आले. शके १६०७, क्रोधेन संवत्सरे, रहिमखान बबुरखान (बहादुरखान) रणमस्तखान येऊन विजापुरास वेढा घातला. औरंगजेब बादशहा अहमदनगरलाच होता, त्यास जमादिलावल महिन्याच्या २०, वीस तारखेस म्हणजे आज विजापुरचा वेढा सुरू असल्याचे कळविण्यात आले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १४ एप्रिल इ.स.१८९१ #भारतरत्न_डॉ_बाबासाहेब_आंबेडकर_जयंती भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म वडील रामजी व माता भीमाबाई यांच्या पोटी १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
905 views
2 days ago
⛳ आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष ⛳ 📜 १३ एप्रिल इ.स.१६६३ (चैत्र वद्य प्रतिपदा, शके १५८५, संवत्सर शोभन, वार सोमवार) महाराज कुडाळ मोहिमेसाठी किल्ले राजगडावरून रवाना झाले. महाराज मोहिमेसाठी कुठेही आणि कधीही वेळ दवडत नसत. अफजलखानाचा (३२ दाताच्या राक्षसी बोकडाच्या) कोथळा बाहेर काढून त्याला यमसदनी धाडल्यानंतर पुढील महिनाभर महाराजांनी आदिलशाहीवर मोहिमा काढून आदिलशाहीस सळो की पळो करून सोडले. आजही महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे तोडल्यावर कुठलाही उत्सव साजरा न करता आठवडाभरातच नव्या मोहिमेची आखणी केली. ४ हजार घोडदळ, आणि १० हजार पायदळासह महाराज राजापुर मार्गे कुडाळ मोहिमेसाठी वेंगुर्ला भागाकडे निघाले. मात्र महाराजांच्या आगमनाच्या भितीमुळे पोर्तुगिजांची चांगलीच धावपळ झाली. डिचोली आणि साखळीचे हवालदार महाराजांच्या स्वारीच्या भयाने पळून गेले. महाराज मात्र, राजापुरास जाऊन तीरथे राहुजी सोमनाथ यांना सोबत घेऊन कुडाळसाठी पुढे निघून गेले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #📜इतिहास शिवरायांचा https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtube.com/shorts/oe-GErXDYrI?feature=share 📜 १३ एप्रिल इ.स.१६६५ दिलेरखानाने मोठ्या जिद्दीने अबदुल्लाखान, फतेलष्कर आणि हाहेली ह्या तोफा टेकड्यांवर चढवल्या. दि. १३ एप्रिल १६६५ ला मध्यान्हीं दिलेरखानाने या वज्रगडावर निर्णायक आक्रमण केले. शेवटी तोफांच्या माऱ्याने वज्रगड ढासळू लागला व मावळ्यांना आतल्या बाजला जावे लागले. संध्याकाळपर्यंत मुरारबाजीच्या मूठभर मावळ्यांनी निकराने युद्ध केले पण संख्याबळ व सामग्री यांच्या समोर त्याचें काही न चालून त्यांना शेवटी शस्त्र खाली ठेवावे लागले. ८० लोकांचे बळी देऊन व १०९ लोकांच्या जखमांकडे पाहत दिलेरखानाने वज्रगड जिंकला आणि मोगली ध्वज फडकू लागला. शरण आलेल्या मावळ्यांना निशस्त्र केले गेले पण त्यांना जयसिंगाने अभयदान दिले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १३ एप्रिल इ.स.१७०० छत्रपती राजारामराजे जाऊन महिना होऊन गेला तरी बादशाहस अजिंक्यतारा काही दाद देत नव्हता. १३ एप्रिलच्या पहाटे मोगलांनि किल्ल्याच्या तटाखाली दोन भुयारे खणली. आणि त्यात सुरुंग पेरून त्यांस बत्ती लाविली. एक सुरुंग फुटला आणि अनेक मराठे त्या खाली गाडले गेले, खुद्द प्रयागजी सुद्धा ढीगाऱ्यात अडकले पण सुदैवाने ते बचावले. तट फुट्ल्याचा आनंदात मोगल वर चढून येऊ लागले, अनेक मोगल किल्ल्यात घुसले. तेवढ्यात अचानक दुसरा सुरुंग उडाला आणि तट चढ़णारे हजारो मोगल त्या खाली गाढले गेले. कित्येक मोगल तर उंच फेकले गेले. आधीच आत आलेल्या मोगली सैन्यावर आता प्रयागजी आणि त्यांचे मराठे तुटून पडले आणि त्यांना साफ़ कापून काढले. गडावरच्या मुठभर मराठ्यांच्या मदतीने प्रयागजींनी तब्बल साडेचार महीने औरंगजेबाशी झुंज दिली आणि अखेर गडावरचा दाणागोटा, दारुगोळा संपला, तेव्हा गडावरच्या मराठ्यानी २१ एप्रिल १७०० रोजी शरणागती पत्करली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १३ एप्रिल इ.स.१७३१ छत्रपती शाहू महाराज व छत्रपती संभाजीराजे कोल्हापूरकर यांचेमध्ये दि.१३ एप्रिल १७३१ रोजी तह झाला. हाच तह "वारणेचा तह" म्हणून ओळखला जातो. या तहामध्ये एकूण नऊ कलमे आहेत. ती पुढीलप्रमाणे : "तहनामा चिरंजीव राजेश्री संभाजीराजे यांसी प्रती शाहूराजे यांनी लिहून दिले सुll १) इलाखा वारुण महाल तहत संगम दक्षिणतीर कुल दुतर्फा मुलुख दरोबस्त देखील व किल्ले तुम्हास दिले असत. २) तुंगभद्रेपासून तहत रामेश्वरदेखील निम्मे आम्हाकडे ठेऊन तुम्हाकडे करार दिला असे. ३) किल्ले कोप्पल तुम्हाकडे दिला. त्याचा मोबदला तुम्ही रत्नागिरी आम्हाला दिला. ४) वडगावचे ठाणे पाडून टाकावे. ५) तुम्हाशी जे वैर करतील त्यांचे पारिपत्य आम्ही करावे. आम्हासी जे वैर करतील त्यांचे पारिपत्य तुम्ही करावे. तुम्ही आम्ही एकविचारे राज्यभिवृद्धी करावी. ६) वारणा व कृष्णेच्या संगमापासून दक्षिणतीर तहद निवृत्तीसंगम तुंगभद्रेपावेतो दरोबस्त देखील गड ठाणी तुम्हांकडे दिली असत. ७) कोकण प्रांत साळशीपलीकडे तहद पंचमहाल अंकोलेपावेतो दरोबस्त तुम्हांस दिली असत. ८) इकडील चाकर तुम्ही ठेवू नये. तुम्हाकडील चाकर आम्ही ठेवू नये. ९) मिरज प्रांत, विजापूर प्रांताची ठाणी देखील अथणी, तासगाव वगैरे तुम्ही आमचे स्वाधीन करावी. एकूण कलमे नऊ करार करुन तहनामा दिला असे. सदरहूप्रमाणे आम्ही चालू. यास अंतराय होणार नाही." या कराराप्रमाणे सर्वच गोष्टी पुढे प्रत्यक्षात आल्या असे नाही. कलम एक व दोननुसार संपूर्ण दक्षिण व तुंगभद्रेपर्यंतचा प्रदेश संभाजीराजेंस मिळाला मात्र तुंगभद्रेच्या पलीकडे शाहू महाराज व पेशव्यांच्या अनेक मोहिमा झाल्या. त्यामध्ये संभाजीराजेंनी सहभाग घेतला नाही. कलम तीन व चार पूर्णतः पाळले गेले. कलम पाचसुद्धा सामान्यतः पाळले गेले. कलम सहाप्रमाणे असणारा संभाजीराजेंचा मुलुख सोडून उर्वरीत काहीसा मुलुख शाहू महाराज व पेशव्यांनी जिंकून घेतला. त्यातील हिस्सा संभाजीराजेंना दिला नाही. कलम सात पूर्णतः पाळला गेला नाही. कलम आठ काही अंशी पाळला गेला. कलम नऊप्रमाणे मिरज, अथणी तासगाव वगैरे भाग संभाजीराजेंनी शाहू महाराजांच्या स्वाधीन केला नाही. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १३ एप्रिल इ.स.१७३९ सावंतांनी गोव्याच्या जनरलला पाठविलेल्या पत्राची नोंद! पोर्तुगिजांच्या संगनमताने सावंतांनी बार्देश व्यापिले होते, कारण मराठे बार्देश घेतील अशी भीती पोर्तुगिजांना वाटल्याने, पोर्तुगिजांनीच सावंतांना बार्देश घेण्यास सांगितले होते. ह्या संदर्भात जयराम सावंत व रामचंद्र सावंत या दोघांनी गोव्याच्या गव्हर्नर जनरलला पाठविलेले पत्र बोलके आहे. त्यात ते दोघे म्हणतात, "व्यंकटराव यांची फौज वरघाटी जाईस्तोवर बार्देश आम्हाकडे असावा, तद्नंतर ते तुमचे स्वाधीन करू". 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://youtube.com/shorts/oe-GErXDYrI?feature=share 📜 १३ एप्रिल इ.स.१९१९ जालियनवाला बाग हत्याकांड जालियनवाला बाग हत्याकांडाच्या उल्लेखाने आजही भारतीयांचे रक्त सळसळते. निशस्त्र शेतक-यांवर ब्रिटिशांनी अमानुष हल्ला केला होता, या घटनेने आजही अंगावर काटा उभा राहतो. जालियनवाला बाग येथे १३ एप्रिल १९१९ रोजी ब्रिटिश राजवटीविरुद्ध झालेल्या निदर्शनाला १५ ते २० हजार नागरिक जमले होते. जेव्हा नेते भाषण करत होते तेव्हा, ब्रिगेडीअर जनरल रेजीनॉल्ड डायर सैनिकांसह तिथे दाखल झाला. त्या सर्वांच्या हातात रायफल होत्या. शांत आणि निशस्त्र लोकांवर शस्त्र चालवले जाणार नाही अशी नेत्यांची भाबडी आशा पुढच्या काही क्षणात धुळीस मिळाली. ब्रिगेडियर जनरल रेनाल्ड डायर याने ५० बंदुकधारी शिपायांना या नागरिकांवर गोळीबार करण्याचा आदेश दिला होता. सैनिकांनी बागेला चारही बाजूने वेढा टाकला आणि कोणतीही पूर्व सुचना न देता बंदूकीच्या फैरी झाडण्यास सुरुवात केली. डायर याने दहा मिनिटे गोळीबार सुरूच ठेवण्यास सांगितले होते. बंदुकीतील गोळ्या संपल्यानंतर हा गोळीबार बंद करण्यात आला. यावेळी बंदुकांच्या सुमारे १६५० फैरी झाडण्यात आल्या आणि यात सुमारे एक हजार निष्पाप नागरिक बळी गेले तर एक हजार १०० जण जखमी झाले होते. हा आकडा विविध ठिकाणी कमी अधिक दिसतो, मात्र त्यामुळे घटनेचे महत्व आणि क्रूरता कमी होत नाही. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
819 views
3 days ago
⛳ आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष ⛳ 📜 १२ एप्रिल इ.स.१६६३ शाहिस्तेखानावरील छाप्याच्या संदर्भात काहीशी माहिती मिळते ती इंग्रजी पत्रात. ती माहिती पुढीलप्रमाणे आहे : त्यांत छत्रपती शिवाजी महाराज ४०० निवडक लोकांसह जातीने शाइस्तेखानाच्या तळावर गेला त्याची हकीकत आहे. कांही बहाणा करून ते सलाम करण्यासाठी म्हणून शाइस्तेखानाच्या तंबूंत गेले. आणि लगेच पहारा साफ मारून, शाइस्तेखानाचा वडील मुलगा, त्याचा जावई, त्याच्या १२ बिब्या, ४० मोठे दरकदार, मोंगलांचा सेनापती, इत्क्यांचे प्राण हरण करून खुद्द शाइस्तेखानाला आपल्या स्वतःच्या हाताने जखम करून त्याच्या आणखी ६ बायका, आणि दोन मुलगे, शिवाजीने ठार केले. या सगळ्या भानगडीत त्याचे फक्त ६ सैनिक मेले आणि ४० जखमी झाले ! १० हजार घोडेस्वारांचा अधिपती राजा जसवंतसिंग समीप असून पाठलाग न करितां स्तब्ध राहिला. यावरून त्याचे यांत अंग होते असे सगळ्यांना वाटते. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🙏शिवदिनविशेष📜 #🚩शिवराय https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtu.be/U01qa_1GoCA 📜 १२ एप्रिल इ.स.१६६५ पुरंदरचा रणसंग्राम - वज्रगडाचा बुरुज ढासळला पुरंदरावर तोफ वरती नेत असताना तिकडे गडावरून मराठे शर्थीने लढतच होते, अग्नीवर्षाव करीतचं होते. पुरंदर शर्थीने लढतच होता. पण मोगलही चहूबाजूंनी भिडलेले होते. त्यांचाही किल्ल्यावर मारा सुरूच होता. त्यात आता अशा बलाढ्य तोफा त्यांना येऊन मिळाल्या, आणि या तोफांच्या माऱ्यात वज्रगडाचा एक बुरुज ढासळलाचं ती तारीख होती १२ एप्रिल १६६५.... 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १२ एप्रिल इ.स.१६७३ (वैशाख शुद्ध षष्ठी, शके १५९५, संवत्सर प्रमादी, वार शनिवार) महाराज पन्हाळगड मुक्कामी! सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी धर्मवाट देऊन बेहलोलखानास सोडून दिल्याची वार्ता महाराजांना कळली होती. त्यामुळे महाराजांनी सरसेनापती प्रतापराव गुजर यांची चांगलीच कानउघाडणी केली होती. त्यामुळे सरसेनापती प्रतापराव गुजर स्वराज्यात न जाता अथणी आणि हुबळीच्या रोखाने दौडू लागले. हुबळीची लुट करून सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी अथणीवर धाड टाकली. कारवार प्रांतात सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी मांडलेली धुम पाहून बेहलोलखानाने कोल्हापूर भागात सैन्यांची जमवाजमव करून सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्यावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे लक्ष विचलित करण्याचा हा प्रकार होता. मात्र याच वेळी महाराज खुद्द पन्हाळगडावर मुक्कामी असल्याची वार्ता बेहलोलखानाच्या कानी गेली. त्याचबरोबर पावसाळाही जवळ असल्याने बेहलोलखानाने इथे फारशी हालचाल केली नाही. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १२ एप्रिल इ.स.१६८३ व्हिसेरेई कौंट द आल्वोर याने औरंगजेब बादशहास पाठविलेल्या पत्राचा आशय! "आपल्या प्रजेला उपद्रव देणार्‍या छत्रपती संभाजी महाराजांस शासन करण्यासाठी आपण युवराज अहमद आझमशहा यांना मोठे सैन्य देऊन इकडे पाठविले आहे व नबाब कर्नलखान हेही मोठे आरमार घेऊन येत आहेत हे आपल्या पत्रावरून कळते. आपण माझ्याकडे मागणी केली आहे की, आपल्या पुरवठ्याच्या नौकांना मी आमच्या आरमारी जहाजांचे संरक्षण द्यावे व छत्रपती संभाजी महाराजांचे निर्दालन करण्यासाठी आपले जे सरदार इकडे येत आहेत त्यांना मदत करावी. एक काब्रा घोडा आणि टेहाळणीच्या ६ तोफा आपण मला नजराण्यादाखल पाठविल्या आहेत. मोठ्या प्रेमाने पाठविलेल्या ह्या नजराण्याची मला अप्रुकता वाटते.""आपले पत्र येण्यापूर्वी माझे स्वामी पोर्तुगालचे महाराज यांनी मला पत्र पाठवून आपणास मदत करण्याची आज्ञा केली होती. त्या आज्ञेस अनुसरून मी आमच्या उत्तरेकडील प्रदेशाचे कॅप्टन जनरल तसेच चौल, वसई आणि दमण या तिन्ही कॅप्टनना पत्रे पाठवून आपल्या सैन्याला आमच्या ठाण्याच्या हद्दीतून वाट देण्यास व ह्या सैन्याला आमच्या राज्यात जीवनोपयोगी वस्तू खरेदी करण्यास परवानगी देण्याबाबत लिहिले होते. तसेच आपल्या नौकांना आमच्या नद्यांतून वाहतूक करू देण्यासाठी आमच्या अधिकार्‍यांना सुचना पाठविल्या होत्या. शिवाय आपल्या आरमाराच्या सामोरा जाण्यासाठी दारुगोळ्याने भरलेल्या ६ नौकांना हुकूम केला होता". औरंगजेब बादशहाचा एक दुत वाटाघाटी करण्यासाठी गोव्यास आला तेव्हा व्हिसेरेई त्याला म्हणाला होता की, छत्रपती संभाजी महाराजांशी पोर्तुगीजांचा तह झाल्याने त्याचा भंग होण्यासारखे क्रृत्य आपण होऊ देणार नाही. परंतु वरील पत्र वाचल्यावर छत्रपती संभाजी महाराजांशी असलेल्या तहास हरताळ फासून पोर्तुगिजांनी मोगलांना मदत केल्याचे दिसून येते. गोव्याचे पोर्तुगीज हे छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब बादशहा या दोघांना खूश ठेवण्याचे संधिसाधूपणाचे राजकारण कसे खेळत होते त्याचा प्रत्यय व्हिसेरेई कौंट द आल्वोर याने औरंगजेब बादशहाला पाठविलेल्या वरील पत्रावरून येतो. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://youtu.be/U01qa_1GoCA 📜 १२ एप्रिल इ.स.१६८९ छत्रपती राजाराम महाराजांनी कोकणचा सरदार कृष्णाजी गोळे यांना १२ एप्रिल १६८९ रोजी पत्र लिहिले होते. त्या पत्रामध्ये छत्रपतींनी गोळे यांना असे आवाहन केले होते की, “सरदार गोळे यांना आपल्या अनुयायांसहित चरितार्थाकरता योग्य ती व्यवस्था इनाम गांवे जोडून केली जाईल. छत्रपती राजाराम महाराजांनी स्वीकारलेली इनामांची ही पद्धती त्यांना आपले मराठे सरदार, सैनिक राखण्यासाठी निश्चित सहाय्यकारी झाली. हे औरंगजेबाच्या कानी येताच त्याने मोगल अधिकाऱ्यांकरवी त्यात गोळे कुटुंबातील चार सदस्यांना आदेश कळविले की, मोगल बादशहाची निष्ठेने सेवा करण्याची अट पाळण्यास जर ते (सरदार गोळे) तयार असतील तर बादशहा त्यांना चार गांवे इनाम देऊन सातगावांची जहागीरही देतील जी निरंतर त्यांना उपभोगावयास मिळेल. परंतु देवदयेने ह्या मसलतीमध्ये रामचंद्रपंत अमात्यांच्या प्रयत्नास यश आले. गोळे स्वराज्यातच राहिले आणि मोगल बादशहाने रंगवलेली भवितव्याची स्वप्ने भंग पावली. गोळे घराणे हे नेहमीच हिंदवी स्वराज्याच्या सेवेशी एकनिष्ठ होते. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १२ एप्रिल इ.स.१७०३ मुघल फौजांनी सिंहगडावर तोफांचा मारा सुरू केला , त्यात औरंगजेबाने स्वतः जातीने हजर राहून सिंहगड जिंकून घेतला. पण फक्त ३ वर्षेच किल्ला मुघलांच्या ताब्यात राहिला .. १७०६ मध्ये मराठ्यांनी पुन्हा सिंहगड जिंकला आणि सिंहगड शेकडो वर्ष मराठ्यांकडेच राहिला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १२ एप्रिल इ.स.१७३७ मराठ्यांनी धारावी बेटावर हल्ला केला आणि घाईघाईत धारावी किल्ला बांधायला घेतला. त्यासाठी २२०० माणसांना रोज ५/- रुपये याप्रमाणे ११०००/- रुपये किल्ला बांधण्यसाठी मागणी करणारे शंकरजी केशव यांनी चिमाजी अप्पांना लिहलेले पत्र उपलब्ध आहे. पोर्तुगिजांना मराठ्यांच्या किल्ला बांधण्याची बातमी लगेच कळली व पुढील धोका ओळखून त्यांनी हल्ला करुन धारावी बेट व अर्धवट बांधकाम झालेला किल्ला ताब्यात घेतला आणि किल्ला बांधून पुर्ण केला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १२ एप्रिल इ.स.१७५२ १७५२ साल हे मराठ्यांच्या राजकारणाच्या दृष्टीने फार महत्वाचे होते. १२ एप्रिल १७५२ रोजी सफदरजंगाने बादशहाच्या वतीने मराठी सरदारांशी करार (अहमदनामा) केला. त्यानुसार इथल्या व परकीय आक्रमणांपासून मोगल बादशहाचे रक्षण करण्याची जबाबदारी पेश्व्यावर पडली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
738 views
4 days ago
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 📜 ११ एप्रिल इ.स.१६६७ (चैत्र वद्य त्रयोदशी, शके १५८९, संवत्सर प्लवंग, वार गुरुवार) किल्ले रांगणा व परिसर आदिलशाहीकडे! महाराजांनी याच काळात रांगण्याचा वेढा स्वतःहून उठविला. महाराज आग्रा येथील जीवघेण्या प्रसंगातून सुटून आले होते. सततच्या साऱ्या, लढाया, मोहिमा, युद्धे, जाळपोळ यामुळे रयतदेखील त्रस्त झाली होती. त्यामुळे महाराजांना काही वर्षे शांतता हवी होती. कारण राज्यकारभाराची घडी विस्कळीत झाली असल्याने ती सर्व प्रथम स्थिरस्थावर करून, जनतेच्या मनात स्थैर्य निर्माण करणे आवश्यक होते. त्यामुळे सर्व प्रथम आग्रा येथून निघून आल्याबद्दल औरंगजेब बादशहास दिलगिरी व्यक्त करणारे पत्र लिहून काही अटींवर तह केला. औरंगजेबानेही नाइलाजास्तव हा तह मान्य मान्य केला. कारण इराणच्या स्वारीच्या शक्यतेने औरंगजेब बादशहाची डोकेदुखी वाढली होती. त्याचबरोबर पेशावरी लोकांनी बंड केल्यामुळे, औरंगजेब बादशहाने महाराजांशी संघर्ष टाळून तहास मान्यता दिली. मात्र मोगलांशी तह झाल्यामुळे विजापुरकरांचे पित्त खवळले. त्यामुळे आदिलशाहीने किल्ले रांगणा परत मिळविण्यासाठी बेहलोलखान आणि व्यंकोजीराजे यांना महाराजांच्यावर पाठविले. मात्र महाराजांनी त्वरित तो हल्ला मोडून काढून या दोघांना पिटाळून लावले. मात्र, महाराजांनाही संघर्ष नको होता. तर सध्या शांती हवी होती. त्यामुळे महाराजांनी यावेळी किल्ले रांगणे याचा वेढा स्वतःहून उठविला. आणि विजापुर आघाडी शांत करण्यासाठी हा किल्ला तहांअतर्गत आदिलशाहीस दिला. मात्र, त्याच वेळी दक्षिण कोकण याच तहांअतर्गत स्वतःकडे ठेवण्यास महाराजांना यश आले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #📜इतिहास शिवरायांचा https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtube.com/shorts/_g9xakmrZps?feature=share 📜 ११ एप्रिल इ.स.१६८० राजापूरकर इंग्रजांनी सुरतला पाठवलेल्या पत्रात म्हणतात."छत्रपती शिवाजी महाराज मरण पावले, त्यांच्या मरणामुळे या भागात पुष्कळ घोटाळा माजेल असे दिसते." 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ११ एप्रिल इ.स.१६९१ ११ एप्रिल १६९१ रोजी नागोजी मान्यास छत्रपती राजाराम महाराजांनी सरदेशमुखाच्या वतनाची सनद दिली. त्यात महाराज म्हणतात, “तुम्ही पूर्वी तांब्रांकडे (मोगलांकडे) होते. ऐसियास स्वामीचे राज्य म्हणजे देवताभूमी. या राज्यास तांब्रांचा उपद्रव न व्हावा, मराठा धर्म रहावा, स्वामीच्या राज्यांची अभिवृद्धी व्हावी या उद्देशाने स्वामींच्या पायापाशी एकनिष्ठा धरून कर्नाटकांत चंदीचे मुक्कामी स्वामीपाशी आले. तिथे येऊन विनंती केली की आपणांस देशात सरदेशमुखीचे वतन करून दिले पाहिजे तेवी तपशील त्यापुढे १२ महालांची नावे दिली आहेत. ऐसियासी तुम्ही स्वामी सेवेवरील एकचित्त वर्तीत आहात म्हणून स्वामी तुम्हांवर कृपाळू होऊन नूतनवतन सरदेशमुखींचे बारा महालांचे करून दिले आहे" नागोजी मानेंचे पिताश्री रतनोजी माने हे पराक्रमी व राजकारणी होते. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ११ एप्रिल इ.स.१७०३ सिंहगडचा रणसंग्राम मराठ्यांकडून बाळाजी विषवनाथ व मोगलांकडून तोफखाण्याचा प्रमुख तरबीयतखंन व त्याचा भाऊ कमियाबखान ह्यांच्या नेतृत्वात सिंहगड हस्तांतरणाची चर्चा झाली. १३ एप्रिल रोजी मोगलांनी ५० हजार रुपये च्या बदल्यात सिंहगड किल्ला ताब्यात घेतला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ११ एप्रिल इ.स.१७३८ वसई येथील पोर्तुगीज वॉइसरॉय 'डेम लुइ बोतेलुइ' याची गोवा येथे बदली त्याच्या जागी 'पेद्रा दे मेलु' याची नियुक्ती. वसईच्या किल्ल्याचे नाक म्हणून ओळखला जाणारा धारावी किल्ला हा भाइंदर जवळ आहे. इ.स.१७३७ मध्ये मराठे व पोर्तुगिज यांच्यात पेटलेल्या वसईच्या युध्दामुळे धारावी बेटाला महत्व आले धारावी किल्ला हा वसईच्या किल्ल्या समोर आहे एका बाजूला वसईची खाडी तर दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र यामुळे धारावी किल्ल्या चे स्थान वसई मोहीमेत अतिशय महत्वाचे होते. या किल्ल्यावरुन वसईच्या पोर्तुगिजांना समुद्र व खाडीमार्गे मिळणारी रसद तोडणे शक्य होते. तसेच वसई किल्ल्यावर लक्ष ठेवणे व मारा करणे धारावी किल्ल्याच्या उंचीमुळे सहज शक्य होते. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ११ एप्रिल इ.स.१८२७ अठराव्या शतकातील दिन दलित आणि स्त्रियांना योग्य शिक्षण आणि समानतेचा हक्क मिळावा म्हणून विधायक कार्य करणारे महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करू या ! ज्योतीबांनी केलेले कार्य विधायक होते.प्रत्यक्ष कार्य करूनच त्यांनी समाजातील उपेक्षितांना पुढे नेण्यासाठी परिश्रम घेतल्यामुळे . समाजाने त्यांचा महात्मा म्हणून गौरव केला आहे. महाराष्ट्रातील समाजसुधारकांच्या पहिल्या पिढीतील श्रेष्ठ समाजसुधारक आणि विशेषतः समाजातील श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची व सामाजिक दास्याची मीमांसा करणारा क्रांतिकारक विचारवंत. सावता माळी समाजातील गोविंदराव शेटिबा फुले आणि चिमणाबाई या दांपत्याचे जोतीराव हे दुसरे अपत्य. मूळचे गोऱ्हे हे उपनाव बदलून फुलांच्या धंद्यामुळे फुले हे नाव पडले. जोतीरावांच्या लहानपणीच त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांच्या पालनपोषणाचा सर्व भार वडिलांवरच पडला. जोतीरावांना इंग्रजी शिक्षणाचा वेध लागला होता. त्यात अनेक अडचणी आल्या, तरी शालान्त परीक्षेइतके इंग्रजी शिक्षण त्यांनी पुरे केले. इंग्रजीतील उच्च दर्जाचे ग्रंथ समजण्याची पात्रता तसेच इंग्रजीत लेखन करण्याची क्षमताही त्यांनी प्राप्त करून घेतली. बौद्धिक शिक्षणाबरोबरच शरीरशिक्षणही घेतले. लहूजीबुवा मांग यांच्यापाशी दांडपट्टा शिकले, मल्लविद्या संपादन केली. शिक्षण पुरे केल्यावर १८४० मध्ये जोतीरावांचा विवाह सातारा जिल्ह्यातील शिरवळपासून ५ किमी.वर असलेल्या नायगाव येथील खंडोजी नेवसे पाटील यांची कन्या सावित्री हिच्याशी झाला. सावित्रीबाईचे शिक्षण जोतीरावांनीच पुरे केले. त्या स्वयंस्फूर्तीने जोतीरावांच्या समाजसुधारणेच्या आणि लोकशिक्षणाच्या कार्यात जन्मभर सहभागी झाल्या. शालेय शिक्षण चालू असताना जोतीरावांनी अनेक मित्र मिळविले. सदाशिव बल्लाळ गोवंडे, सखाराम यशवंत परांजपे, मोरोपंत विठ्ठल वाळवेकर इ. मित्र शेवटपर्यंत जोतीरावांना सामाजिक सुधारणेच्या चळवळीतही सहकारी म्हणून चिकटून राहिले. जगाचा, पश्चिमी देशांचा व विशेषतः भारताचा प्राचीन, अर्वाचीन इतिहास त्यांनी इंग्रजीमधून वाचला आणि सखोलपणे त्यावर मनन केले. अमेरिकन राज्यक्रांतीच्या इतिहासाची त्यांच्या मनावर खोल छाप पडली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://youtube.com/shorts/_g9xakmrZps?feature=share 📜 ११ एप्रिल इ.स.१८२७ जोतीराव गोविंदराव फुले जन्म. कटगुण, सातारा,महाराष्ट्र महात्मा जोतीबा फुले (एप्रिल ११, इ.स. १८२७ - नोव्हेंबर २८, इ.स. १८९०) हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन पुरोगामी विचारांची मांडणी केली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणास प्रोत्साहन देऊन मुहुर्तमेढ रोवली. त्यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा १८४८ साली पुणे येथे भिडेंच्या वाड्यात उघडली. आपल्या पुरोगामी विचारांची निर्भयपणे मांडणी केली व स्वत:चे विचार आचरणात आणले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
679 views
5 days ago
⛳ आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष ⛳ 📜 १० एप्रिल इ.स.१६६० (वैशाख शुद्ध दशमी, शके १५८२, संवत्सर शार्वरी, वार मंगळवार) सिद्दी जौहरने वेढा आवळला! सह्याद्रीचा सिंह कोंडला गेला होता. कारण बाहेरून सिद्दी जौहरने वेढा करकचून आवळला होता. त्यातच सोबतीला हेन्री रेव्हिंग्टन, मिशेल, गिफर्ड, वेलजी यांनी पन्हाळा गडास आल्या आल्या लांब पल्ल्याच्या तोफाही पन्हाळगडावर डागायला सुरूवातही केली. असाच एक गोळा पन्हाळ्यावर येऊन पडला असता गडपाहणी करत असताना महाराजांना हा इंग्रजांचा प्रताप समजला. इकडे सिद्दी जौहर खूश होता. कारण तोफेचे गोळे पन्हाळ्याच्या तटाला भिडत होते. त्यामुळे आज ना उद्या तरी यश येईलच या खुशीने त्याने हेन्री रेव्हिंग्टन बरोबर पावसाळ्यापर्यंत दारुगोळा पुरविण्याचा करारही करून टाकला. महाराजांना हेन्री रेव्हिंग्टनच्या हालचालींची बित्तंबातमी कळत होती. मात्र स्वराज्य संकटात सापडले. एकीकडून शाहिस्तेखान दुसरीकडून सिद्दी जौहर या दुहेरी आक्रमणात महाराज सापडले होते. सिद्दी जौहर वेढ्यात जराही ढिलाई करत नव्हता. जर ढिलाई झाली तर सर्वांसमक्ष त्या सैनिकांची गर्दन उडवत असे. तीही विनाचौकशी. त्यामुळे सैन्यसुद्धा दक्ष होते. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩शिवराय https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtu.be/noYEc1UJGsI 📜 १० एप्रिल इ.स.१६९३ १६८९ मध्ये राजधानी रायगड मुघलांच्या ताब्यात गेल्यावर मराठ्यांचे तिसरे छत्रपति राजाराम महाराज 'जिंजी' (सध्या तामिळनाडू मध्ये) येथे गेले होते. तेथेच त्यांनी स्वतःला राजाभिषेक करवून घेतला आणि राज्याची सूत्र काही काळासाठी त्यांनी तिकडून पाहिली. ह्या दरम्यान १० एप्रिल १६९३ रोजी त्यांनी तंजावर गादीचे शहाजीराजे (दुसरे) यांची भेट घेतली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १० एप्रिल इ.स.१६९८ छत्रपती राजाराम महाराज दक्षिण कोकणातील गड कोटांच्या मोहिमे वर गेले. ह्या मोहिमेचा उद्देश म्हणजे आगामी लढ्यची पूर्व तयारी म्हणून गडकोटांवरील फौज,रसद, शस्त्रास्त्रे-दारुगोळा ह्या बाबी मजबूत करून त्यांना सज्ज करणे.ही मोहीम आटपून महाराज प्रतापगड - विशाळगड-सज्जनगड करत साताऱ्यास जुलै १६९८ मध्ये आले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १० एप्रिल इ.स.१७०३ सिंहगडचा रणसंग्राम एप्रिलला सेनापती धनाजी जाधवांचा पुत्र शम्भूसिंह जाधवने म्हलर्जी व खंडोजी च्या सोबतीने ४ हजार घोडदळ सकट इराडत खानाच्या ठाण्यावर हल्ला केला. हे ठाणे बादशाही छावणीच्या रक्षणाच्या हेतूने छावणी पासून केवळ ४ कोस दूर होते व माघारी जाता जाता आखरपूर इथून छावणी कडे येणारी रसद ही १० एप्रिल ला लुटली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १० एप्रिल इ.स.१७५८ सरदार मानाजी पायगुडेंचा पराक्रम सन १७५८ मध्ये मराठ्यांनी सरहिंद, लाहोर, जिंकले. अहमदशहा अब्दालीचा मुलगा तैमुर आणी सरदार जहानखान यांनी लाहोर सोडून पळ काढला. परंतु त्यांच्याजवळील अवजड तोफखाना व खजिना आणी दिल्ल्तीतील लुटीचा खाजींना त्यांनी तेथेच सोडून दिला. जाताना मात्र तैमुर ने आपला गुलाम तहमासखान यास गुलामगिरीतून मुक्त केले होते. तहमासखानाने मुक्त झाल्यामुळे लाहोरच्या वेशीचे दरवाजे उघडले. याच दरम्यान मराठा सरदार वीर मानाजी पायगुडे यांनी १० एप्रिल १७५८ रोजी लाहोरमध्ये पहिले पाउल टाकले. लाहोरमध्ये निधड्या छातीने पाउल टाकणारे ते पहिले मराठा शूर सरदार होते. तहमासखानाने आपल्या आत्मचरित्ररुपी तहमासनामा या ग्रंथात हि घटना स्पष्टपणे लिहून ठेवली आहे. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://youtu.be/noYEc1UJGsI 📜 १० एप्रिल इ.स.१८१८ छत्रपती प्रतापसिंह महाराजांची साताऱ्याच्या गादीवर इंग्रजांकडून पुनःप्रतीष्ठापणा १०-०४-१८१८ ला प्रतापसिंह यांची सातारा राज्याच्या गादीवर पुनःस्थापना झाली तरी त्यांचा ब्रिटिशांबरोबर तह २५ सप्टेंबर १८१९ मध्ये झाला. कारण तोपर्यंत बाजीराव इंग्रजांना शरण आला नव्हता व त्याचा पूर्ण बंदोबस्त केल्यावरच इंग्रज सातारच्या महाराजांकडे लक्ष देणार होते. कंपनी सरकारतर्फे जेम्स ग्रांट तर महाराजांतर्फे त्यांचा मुखत्यार-पॉवर ऑफ अटर्नी-विठ्ठल बल्लाळ फडणीस ने सह्या केल्या. जेम्स ग्रांट ने राज्यकारभाराच्या दृष्टीने परिपूर्ण सातारा राज्य ५ एप्रिल १८२२ महाराजांच्या हाती सोपविले. हे राज्य त्यानंतर सुमारे २६ वर्षे अस्तित्वात राहिले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
1.2K views
6 days ago
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ 📜 ৎ एप्रिल इ.स.१६३३ स्वतः शहाजी राजे यांचा सहभाग असलेल्या लढाईत मोघल बादशहा शाहजहानच्या फौजांनी निजामशाही विरुद्ध त्यांच्या देवगिरी किल्ल्यावर हल्ला चढवला. ९ एप्रिल ला मुघलांना किल्ल्याच्या तटबंदीच्या एका भागात स्फोट करून भगदाड पाडता आले पण त्यातून किल्ल्यात प्रवेश करता आला नाही, १७ एप्रिलला रणदुल्लाखान व शहाजी राजांनी किल्ल्याजवळ रसद पोहोचवायचा प्रयत्न केला पण मुघलांनी त्यांना अडविले व परतवून लावले. मुघलांच्या वाढत्या प्रभावाने व घटणाऱ्या रसदेमुळे किल्ल्यातले आदिलशाही सैन्य विवश झाले. त्यांनी मुघलांकडे अभयवचन मागितले व किल्ला देऊ केला. मालोजी भोसलेनी हा निरोप महाबतखानकडे नेला व त्यानी लगेच अभयदान दिले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtu.be/KtZY-xkaHrw 📜 ৎ एप्रिल इ.स.१६६९ काशी विश्वेश्वराचे देवालय जमीनदोस्त करण्याचा हुकुम बादशहाने दिला. औरंगजेब बादशहाने एक फतवा काढून हिंदुस्थानात सर्व हिंदुंना अतिशय पुज्य असलेल्या मोठमोठ्या देवालयांवर पडू लागली. सोमनाथचे दुसरे देवालय, काशीचे विख्यात विश्वेश्वराचे मंदिर आणि मथुरा येथील केशवराजाचे मंदिर ही हिंदुंची श्रद्धास्थाने औरंग्याला नजरेसमोर नकोशी वाटू लागली. सूर्यग्रहण आले. या सूर्यग्रहणाच्या मुहुर्तावरच काशी विश्वेश्वराचे देवालय जमीनदोस्त करण्याचा हुकुम औरंगजेब बादशहाने सोडला. या पाशवी हुकुमाने निसर्गही थरारला. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 ९ एप्रिल इ.स.१६७४ इंग्रजांच्या नुकसान भरपाई मागणीस यश ब्रिटिश सल्लागार मंडळाच्या सभेंत ठरले की, हेन्री ऑक्झेंडनने रायगडावर जाण्याची तयारी करावी. ऑक्झेंडन व उष्टीक यांनी विचार करून तहनाम्यांवर अधिक काही गोष्टी घालावयाच्या असल्यास सुचवाव्यात. ता. ९ एप्रिल रोजी मुंबईहून सुरतेस पत्र रवाना झाले; त्यात ३/४ हजार रुपयांची रत्ने खरेदी करण्याची जबाबदार अधिकाऱ्यांस विनंती करण्यात आली. मुंबईकरांचे पत्र सुरतेस पोहोचल्यावर तेथील कौन्सिलच्या सभासदांचे मत झालें की नारायण शेणवी यास अपेक्षेबाहेर यश आलें आहे; तेव्हा शिवाजीस प्रसन्न करण्यासाठी राज्याभिषेकाच्यावेळी भरीव नजराणा द्यावा, म्हणून ६ मोत्ये, ३ अंगठ्या, १ शिरपेच, २ सलकडी अशा सुमारे ३३१४ रुपये किंमतीच्या वस्तु खरेदी करून मुंबईस धाडण्यात आल्या. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ৎ एप्रिल इ.स.१६८२ मुघल सरदार शहाबुद्दीनचा 'किल्ले रामशेज' ला पुन्हा वेढा टाकण्याचा प्रयत्न. पण किल्लेदार माजी पवार व इतर मावळ्यांचा त्यांच्यावर जोरदार हल्ला. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 https://youtu.be/KtZY-xkaHrw 📜 ৎ एप्रिल इ.स.१६९५ शके १६१७ च्या वैशाख शु. ६ रोजी प्रसिद्ध पंडितकवि वामनपंडित यांनी भोगांव येथे समाधि घेतली. वामनपंडित हे ऋग्वेदी, वसिष्ठ' गोत्री ब्राह्मण असून विजापूरचे राहणारे. विजापूरचा बादशहा आपणांस बाटविणार ही बातमी कळताच त्यांनी विजापूर सोडले व काशी येथे संस्कृत भाषेचा व तत्कालीन शास्त्रांचा अभ्यास केला. विद्वत्ता मिळाली तरी चित्तास समाधान लाभले नाही म्हणून त्यांनी ' मलया- चला 'वर तपश्चर्या केली. तेथे ध्यानमग्न असता कोणा यतीने जो उपदेश दिला तो वामनपंडितांनी निगमसार' ग्रंथात साठविला आहे. यानंतरहि ‘कर्मतत्त्व', 'समश्लोकी', 'सिद्धांतविजय', 'अनुभूतिलेश', इत्यादि लहान लहान अध्यात्म प्रकरण पंडितांनी लिहिली. परंतु, वामनपंडितांचे सर्व बुद्धिवैभव त्यांच्या 'यथार्थ दीपिके 'त दिसून येते. सामान्य जनांना वामनपंडित प्रिय वाटतात ते त्यांच्या आख्यानक कवितेमुळे. सुश्लोक वामनाचा' म्हणून यांची प्रसिद्धि आहे. ' गजेन्द्र- मोक्ष', 'सीतास्वयंवर', 'कात्यायनी व्रत', 'वनसुधा', 'वेणुसुधा', इत्यादि सुंदर प्रकरणे रसिकांना आजहि रिझवितात. कित्येक ठिकाणी बीभत्स व शृंगार रस हे आपली पायरी ओलांडून जातात हैहि खरेंच आहे. जगन्नाथ पंडितांची गंगालहरी' व भर्तृहरीची नीतिशतके' यांचा उत्कृष्ट मराठी अनुवाद वामनांनीं केला आहे. वामनपंडित हे कोरेगांव ( शिगांव ) येथून कृष्णाकाठाने तीर्थकषेत्र पाहत पाहत महाबळेश्वर येथे जात असतांना मार्गात गुन्हेघर येथे समाधिस्थ झाले. पण भोगांवच्या हद्दीत कृष्णेच्या काठी यांचे दहन झाले. बरोबर असलेल्या शिष्याने-महादेवाने तेथे त्यांची समाधि बांधली. “वामनपंडिताप्रमाणे भक्तीने ईश्वरपर्दी लीन होऊन अद्वैतविचारावर मोठमोठाले ग्रंथ लिहिणारा, अक्षर गणांच्या वृत्तांनी सोपी, मधुर व पुष्कळ कविता रचणारा आणि निःस्पृहतेने केवळ ईश्वरपर वर्णन करणारा ग्रंथकार, कवि आणि साधु त्याच्यामागे आज- पर्यंत झाला नाही. वामनपंडिताने महाराष्ट्र भाषेवर व लोकांवर फार उपकार केले आहेत.” असा अभिप्राय कै. बा. म. हंस यांनी दिला आहे. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
1.1K views
7 days ago
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ 📜 ८ एप्रिल इ.स.१६६७ महाराजांनी आग्ऱ्यात कैदेत अडकलेल्या डबीर आणि कोरडे या आपल्या दोन वकीलांच्या सुटकेसाठी औरंगजेबास एक पत्र लिहिले आहे. त्याचा मराठी भाषेतील तजुर्मा सापडला आहे. संपूर्ण पत्रच वाचण्यासारखे आहे. ते मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा यात छापले आहे. आपण वाचा. त्यातील मुख्य विषय असा की , ‘ मी आपली परवानगी न घेता आग्ऱ्याहून निघून आलो , याचे मला वाईट वाटते. मी पूवीर्प्रमाणेच आपल्याशी नम्र आहे. ‘ औरंगजेबानेही एकूण आपली परिस्थिती ओळखली होती. त्यानेही त्र्यंबक सोनदेव डबीर आणि रघुनाथ बल्लाळ कोरडे या दोन वकीलांची दि. ८ एप्रिल १६६७ रोजी सुटका केली. सुमारे नऊ महिने यमयातना सहन करून ते दोघे वकील सुटले आणि राजगडावर येऊन पोहोचले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🚩शिवराय https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtu.be/QqKdd89MCUA 📜 ८ एप्रिल इ.स.१६७४ महाराज चिपळूण येथे आले. महाराज लष्कर पाहणीसाठी व नवे सरनौबत नियुक्त करण्यासाठी चिपळूणला आले. लष्कराची पाहणी करून थोर लष्करास व पायदळ लोकांस खजिना फोडून महाराजांनी वाटणी केली. याच वेळी चालू वर्षाचा खर्डा ठरवून लष्कराच्या छावण्या, नव्या नेमणुका करून टाकल्या. सरनौबतीची वस्त्रे हंसाजीराव मोहिते "हंबीरराव" यांना दिली. हंबीरराव हा मोहीते घराण्यास किताब होता. ममोहित्यांचे मूळ आडनाव चव्हाण असावे. असा कयास आहे. चिपळूणला महाराजांचा मुक्काम सुमारे महिनाभर होता. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ८ एप्रिल इ.स.१६७६ मार्च अखेरीस मराठ्यांनी कोल्हापूर जिंकले. महाराज कुडाळहून फोंड्यास गेले आणि फोंड्याच्या किल्ल्यास वेढा घातला (८ एप्रिल). फोंड्याचा किल्लेदार महमदखान हा शर्तीने किल्ला लढवीत होता. त्याला जवळचे पोर्तुगीज गुप्तपणे मदत करीत होते. मराठ्यांनी ही मदत पकडली आणि पोर्तुगिजांस त्याबद्दल जाब विचारला, तेव्हा त्यांनी कानावर हात ठेवले. आमचा ह्या मालाशी संबंध नाही असा जबाब त्यांनी दिला. विजापुराहून बहलोलखान फोंड्याच्या मदतीस १५ हजार फौज घेऊन येत होता. तो मिरजेस आल्यावर त्याच्या वाटेत मोठमोठी झाडे पाडुन महाराजांनी त्यास मिरजेतच गप्प बसविले. मराठी फौजा कार्यरत राहिल्या. त्या फौंड्यांत घुसल्या. त्यांनी विजापूर फौजेची कत्तल केली. पुढे किल्लेदार महमदखान यास कैद करून फोंडा किल्ला ६ मे रोजी हिरवी स्वराज्यात सामील झाला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ८ एप्रिल इ.स.१७०३ सिंहगडाच्या तटबंदीवर तोफांची मारगिरी मोगलांनी केली. पण किल्ला तोफांच्या मारगिरीने हस्तगत होईल असे मोगलांना वाटत नव्हते. तेव्हा तरबियतखानाने मराठा शिबंदीशी वाटाघाटी केल्या. भली मोठी रक्कम किल्लेदारास दिल्यावर किल्ला ८ एप्रिल १७०३ रोजी मोगलांचे ताब्यात आला. त्या किल्ल्याचे नाव बाख्शीदाबखा (ईश्वरदत्त) असे ठेविले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://youtu.be/QqKdd89MCUA 📜 ८ एप्रिल इ.स.१७२८ ऊत्तर पोर्तुगालच्या सल्लागार मंडळाच्या सचिवाने व्हिसेरेईला पाठविलेल्या पत्राची नोंद! "डिचोलीचा किल्ला पाडून टाकावा अशी आज्ञा महाराजांनी केली आहे". वसईच्या युद्धात वाडीकर सावंत यांनी तटस्थतेचे धोरण पत्करले असावे. कारण, पेशव्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. त्यातच कुलाबेकर आंग्रे यांच्याशी त्यांच्या कटकटी चालू होत्या. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ८ एप्रिल इ.स.१८५७ क्रांतिकारी मंगल पांडे यांस फासावर चढविण्यात आले. अशा प्रकारे १८५७ च्या उठावातील पहिला क्रांतिकारक व पहिला हुतात्मा होण्याचा बहुमान मंगल पांडे यांस जातो. हा १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाचा प्रारंभ मानला जातो. त्यांच्या नावाचा ब्रिटिशांवर इतका जबर्दस्त प्रभाव पडला होता की, या क्रांतियुद्धातील सर्व सैनिकांना इंग्रज `पांडे’ याच नावाने संबोधू लागले होते. बराकपूरच्या लष्करी छावणीमध्ये मंगल पांडे यांस फाशी देण्यात आले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://youtu.be/QqKdd89MCUA 📜 ८ एप्रिल इ.स.१९२९ भगतसिंह आणि बटुकेश्वर दत्त यांनी संसदेत बाँब फेकले बटुकेश्वर दत्त यांना मुख्यत्वे ओळखलं जातं ते म्हणजे ब्रिटीशांच्या केंद्रीय विधानसभेत (आजच्या संसदेत) त्यांनी भगतसिंहांना सोबत केलेल्या बॉम्बस्फोटामुळे. तत्कालीन ब्रिटीश सरकारने ‘पब्लिक सेफ्टी बिल और ट्रेड डिस्प्यूट बिल‘ नावाने दोन बिलं संसदेत मंडळी होती ज्यामुळे मजुरांच्या उपोषण करण्यावर सरकार निर्बंध घालून आणि क्रांतिकारकांच्या विरुद्ध पोलिसांना अनावश्यक अधिकार मिळवून द्यायचा प्रयत्न सरकार करत होतं. याचा निषेध म्हणून भगतसिंह आणि बटुकेश्वर दत्त यांनी ८ एप्रिल १९२९ रोजी कुणालाही हानी होणार नाही अशा पद्धतीने संसदेच्या प्रेक्षक दिर्घेतून बॉम्ब फेकून गोंधळ उडवला. या गोंधळात आपल्या विचारांची पत्रके उधळून त्यांनी बॉम्बस्फोटाचा उद्देश सर्वाना कळवण्याचा प्रयत्न केला. अन तिथून पळून न जाता स्वतःला अटक करून घेतली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
1K views
8 days ago
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 📜 ७ एप्रिल १६५७ :- ( वैशाख शुद्ध चतुर्थी, शके १५७९, संवत्सर हेमलंबी, मंगळवार ) शिवरायांचा काशीबाई आईसाहेबांशी विवाह :- शिवरायांनी मातब्बर घराण्यांशी तत्कालीन रुढीनुसार सोयरीक संबंध करून त्यांचीही स्वराज्याशी बांधिलकी तयार केली. आजच्या दिवशी जाधवरावांच्या घराण्यातील काशीबाई आईसाहेबांचा शिवरायांशी विवाह झाला आणि आणखी एक घराणे स्वराज्याशी जोडले गेले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtu.be/yFnPY4ASwt4 📜 ६ व ७ एप्रिल इ.स.१६६३ जसवंतसिंहाने कोंढाण्यास वेढा घातला. शाहिस्तेखानावर पडलेला आकस्मिक छापा औरंगजेबालाही वाटला नसेल इतका दु:खदायक काही राजपूत सरदारांना वाटला. लाल महालातील हा फजितीदायक छापा घडल्यानंतर (इ. १६६३ एप्रिल ६ ) या जसवंतसिंहाने पुण्या शेजारच्या कोंढाणा किल्ल्यावर हल्ला चढविला. त्याच्याबरोबर त्याचा मेहुणा भावसिंह हाडा (बुंदीमहाराजा) हाही होता. जसवन्तसिंहांना सिंहगड अजिबात मिळाला नाही, त्यांनी गडाला वेढा घातला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ७ एप्रिल इ.स.१६८७ (वैशाख शुद्ध ५, पंचमी, शके १६०९, प्रभव संवत्सर, वार गुरुवार) स्वराज्याचे पेशवे नीळकंठ मोरेश्वर यांची राजाज्ञा! छत्रपती संभाजी महाराजांच्या स्वराज्याचे पेशवे नीळकंठ मोरेश्वर यांनी पुरंदरचे किल्लेदार बाजी घोलप यांना राजाज्ञा केली की किल्ले पुरंदरावरील पुरंदरेश्वर व केदारेश्वर यांचा अभिषेक अनुक्रमे नारायण भट व शिव भट करतील या कामी इतर कोणाची ढवळाढवळ न करणे. या कामी स्वामिंची सनद लवकरच पाठविली जाईल या आशयाची आज्ञा केली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ७ एप्रिल इ.स.१७३७ वसईच्या मोहिमे वेळी ७ एप्रिल १७३७ साली मराठ्यांचे सरदार शंकराजी केशव फडके हे चिमाजी अप्पांना लिहितात, "शहरात सिरते समयी आम्ही लोकास ताकीद केली की, रयेतीचे काडीस येकंदर हाथ न लावणे." अशी असंख्य उदाहरण आपल्याला भेटतील की, कोणत्याही प्रकारे रयतेस तोशीस पोहचू नये, याची काळजी मराठ्यांचे राज्यकर्ते कसे घेत होते. हाच शिवछत्रपतींनी शिकवलेला 'महाराष्ट्रधर्म' होता ! 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ७ एप्रिल इ.स.१८१७ त्रिंबकजी डेंगळेला इकडे पकडायला सैन्य पाठवावे तर भलतीकडेच त्रिंबकजीचे सैन्य छापा मारून जायचे. ह्यावर काय उपाय करावा हे इंग्रजांना अजिबात सुचत नव्हते. पण ते त्रिंबकजींना पकडायचे पूर्णपणे प्रयत्न करत आहेत असे रिपोर्ट्स मात्र ते वेळोवेळी कंपनीच्या डायरेक्टरांना कळवायचे. उदाहरणार्थ हा रिपोर्ट म्हणतो की त्रिंबकजी धारवाडकडे पळून गेलाय पण तरीही त्याच्या फौजा विजापूर - पंढरपूर भागात आहेत - त्याचबरोबर खान्देशात पण त्याच्या फौजा वाढतच चालल्या आहेत! 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://youtu.be/yFnPY4ASwt4 📜 ७ एप्रिल इ.स.१८१८ दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली. त्यात ७ एप्रिलला देवगड विनासायास इंग्रजांच्या ताब्यात गेला. प्राचीन कालखंडापासून देवगड हे महत्वाचे बंदर म्हणून ओळखले जाते. किल्ल्याच्या बांधकामाच्या कालखंडाविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. छत्रपती शिवरायांनी गडाजवळच्या खाडीमध्ये तारवे बांधल्याचा पुरावा उपलब्ध आहे. किल्ल्यावरील तटबंदी आणि बुरुज आजही मजबूत अवस्थेत उभे आहेत. तटबंदीवरून आजूबाजूच्या समुद्राचे विहंगम दृश्य दिसते. किल्ल्यावर पुरातन वाड्यांचे अवशेष आणि सुस्थितीत असलेला दरवाजा तसेच पुरातन गणपती मंदिर आहे. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
1.1K views
9 days ago
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 📜 ६ एप्रिल इ.स.१६६३ ( चैत्र शुद्ध नवमी, शके १५८५, संवत्सर शोभन, सोमवार ) हल्ल्यानंतर महाराज सिंहगडावर दाखल :- शाहिस्तेखानाची ३ बोटे छाटली व त्याच्या छावणीत पुर्ण हलकल्लोळ माजवून महाराज सहीसलामत किल्ले सिंहगडी दाखल राजे सिंहगडी सुरक्षित पोहोचले होते. तेव्हा पहाट होत होती. सुर्यनारायणाची आभा पसरत होती. आणि महाराजांच्या हेरांनी सकाळी गडावर बातमी आणली, "खान मेला नाही त्याची फक्त ३ बोटे उडाली". महाराजांना ही बातमी कळली. महाराजांनी स्मितहास्य केले व म्हणाले, "शाहिस्तेखानास शास्त झाली, पातशहाने नाव ठेवले, परंतु यथार्थ ठेवले नाही ते नाव आपण शास्त करून रुजू केले, परमेश्वराने हे अचाट साहस आपणास करावयास लावले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩शिवराय https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtu.be/N9nUo5e6jo8 📜६ एप्रिल इ.स.१६६५ इ.स. १६६५ एप्रिल ६ पोर्तूगीज व्हाईसरायचे पत्र - "शिवाजीराजे कानडा प्रांतांतून गोव्याकडे येणारा तांदूळ ताब्यांत घेण्यासाठीं तुमचीं ९ जहाजे मुरगांव बंदराकडे आली व परत जाऊ लागलीं. त्यामुळे आम्हास कांही लढाऊ जहाजे तेथे पाठविणे भाग पडले. त्यांनी तुमची जहाजें धरुन आणूंन बंदरांत ठेवली. परंतु तुमच्या स्नेहसबंधाकडे लक्ष देऊन मीं तीं जहाजें जाळण्याचा हूकूम न सोडतां परत जाण्यास मोकळीक दिली." 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ६ एप्रिल १६६६ :- ( चैत्र शुद्ध द्वादशी, शके १५८८, संवत्सर पराभव, शुक्रवार ) राजे दिल्ली जवळ करीत होते :- छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगाबाद सोडले व महाराजांच्या पुढच्या प्रस्थानाची बातमी देण्यासाठी वकील म्हणून रघुनाथपंत कोरडे दिल्लीस रवाना झाले. महाराज आग्रा प्रवासात असताना त्यांना औरंगजेबाचे पत्र मिळाले. त्यात औरंग्याने, "मिर्झाराजे जयसिंग यांनी ठरवल्याप्रमाणे तुम्ही इकडील प्रांती रवाना झाले ते पाहून संतोष झाला. ऐशीयास इकडील पुर्ण लोभ तुम्हांवर आहे. म्हणोन अदकार न करता खातरजमेने दरमजल करत निघोन यावे. भेटी अंती बहुत सत्कार पाहून माघारे जाण्याविषयी निरोप दिला जाईल. सांप्रत तुम्हाकरीता पोशाख पाठवत आहे. तो घ्यावा". "भेटी अंती बहुत सत्कार पाहून माघारे जाण्याविषयी निरोप दिला जाईल". हे औरंगजेबाचे लेखी वचन पाहून महाराजांचा उत्साह व अपेक्षा निश्चितच उंचावल्या. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ६ एप्रिल इ.स.१६८२ (चैत्र शुद्ध नवमी, शके १६०४, संवत्सर दुदुंभी, वार गुरुवार) खडगगडाचे किल्लेदार बादशहाच्या सेवेत रुजू! खडगगडाचे किल्लेदार (अंकाई) आणि खडगगडाच्या प्रदेशातील नामांकित जमीनदार, सावकार, चिमणजी प्रभू बादशाही सेवेत रूजू झाले. महाराजांच्या महानिर्वाणानंतर फितुरांची स्पर्धाच लागली होती. वतनासाठी लाचार होऊन मुसलमानी सत्ताकर्ते फेकतील ती हाडके घेऊन चघळण्यात धन्यता मानणार्‍यांची अहमिका लागली होती! बादशहातर्फे चिमणाजी प्रभू यांना मोठी खिलजीची वस्त्रे देऊन गौरविण्यात आले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://youtu.be/N9nUo5e6jo8 📜६ एप्रिल इ.स.१७८२ अहमदखानाचे व नजफखानाचे वाकडे होते. त्यामुळे बादशहा शहाअलम हा आपला वजीर नजफखान याच्या वर्चस्वास कंटाळला. शहाअलम बादशहा हा मराठ्यांच्या मर्जीने रहाण्यास उत्सुक होता आणि वारंवार तो बोलून दाखवी की, महादजी शिंदे किंवा हरिपंत फडके यासारखा एक फौजबंद मराठा सरदार सतत दिल्लीस रहावा आणि मराठ्यांनी बादशहास दरमहा २ लक्ष रुपये देऊन करोडीची स्थळे हस्तगत करावी. ही परिस्थिती सन १७८० मध्ये होती. परंतु यावेळी मराठे व इंग्रज यामध्ये नेकीने युद्ध चालू असल्यामुळे मराठ्यास हे कार्य पत्करणे शक्य नव्हते. दिनांक ६ एप्रिल १७८२ रोजी नजफखान मृत्यू पावला. आणि पुढील महिन्यात सालबाईचा तह पुरा होऊन पहिले इंग्रज मराठे युद्ध थांबले. तेव्हा महादजी शिंदे यांना दिल्लीच्या राजकारणाकडे लक्ष पुरवण्यास अवसर मिळाला. बादशहास सन १७७२ त दिल्लीस आणून तख्तनशीन केल्यावेळे पासून महादजी शिंद्यांच्या मनात दिल्लीचा कारभार आपल्या ताब्यात घ्यावा असे होते पण वर सांगितल्याप्रमाणे सालबाई तहापर्यंत महादजींना दिल्लीच्या राजकारणाकड पहाण्यास फुरसत नव्हती. ह्या संधीचा फायदा मिझ नजफखान याने घेतला. पण मिझ नजफ ६ एप्रिल १७८२ मध्ये निर्वतल्यानंतर दिल्लीच्या बादशहाने महादजीस दिल्लीचा कारभार हाती घेण्याची विनंती केली. बादशहा शहाअलम महादजींना दिल्लीस आणण्यास एवढा उतावीळ झाला की, त्याने त्यावेळी दिल्ली दरबारी असलेले मराठ्यांचे वकील हिंगणे यास महादजीस दिल्लीस येण्यास आवर्जून लिहिण्यास सांगितले. त्याप्रमाणे हिंगणे यांनी पाटील बावांस लिहिले, “ही वेळ अशी आहे की, इकडे येण्याने तुम्हाला कीर्तीच नव्हे तर पैसाही मिळेल.” 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜६ एप्रिल इ.स.१८१७ बाजीराव पेशव्याने (दुसरे) इंग्रजांशी लढाई करण्याकरिता गुप्तपणे तयारी चालविली होती. त्याने आपल्याकडील जडजवाहर व खजिना रायगड किल्ल्यात सुरक्षिततेसाठी पाठवून दिला. दिनांक १ एप्रिल १८१७ रोजी एल्फिन्स्टनने बाजीरावास एक कडक पत्र लिहून कळविले की त्रिंबकजीचा पाठलाग जर झाला नाही तर इंग्रज सरकारला आपल्याशी जाहीररीत्या युद्ध पुकारावे लागेल व त्याच्या बऱ्या वाइटाचे धनी तुम्हीच व्हाल. दिनांक ६ एप्रिलला बाजीरावाने एल्फिन्स्टनला भेटीस बोलाविले व नेहमीच्या पद्धतीने याने लाचारी दाखवून लाघवी बोलून डेंगळेच्या बाबतीत आपण निरपराधी आहोत अशी बतावणी केली. एल्फिन्स्टनने त्यावर कठोरपणे सांगितले की एक महिन्याचे आत तुम्ही त्रिंबकजीस पकडून आणून आमचे स्वाधीन करा आणि तोपर्यन्त जामीन म्हणून तुमचे चार किल्ले रायगड, पुरंदर, सिंहगड व त्रिंबक आमचे ताब्यात द्या. या डरावणीने बाजीराव अगदी घाबरून गेला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ६ एप्रिल इ.स.१८४९ कोहिनूर आणि दुलीपसिंग यांची इंग्लंडला रवानगी रणजितसिंग २७ जून १८३९ रोजी लाहोर इथे मरण पावला. त्याच्या वारसांमध्ये पण हाणामाऱ्या, कट, कारस्थाने होऊन त्याचा सगळ्यात धाकटा मुलगा दुलीपसिंग जो त्यावेळी ( सप्टेंबर १८४३ ) मध्ये अवघ्या पाच वर्षांचा होता, सिंहासनारूढ झाला. मार्च १८३९ मध्ये इंग्रजांनी अन्य भारतीय संस्थानांसारखे शीख साम्राज्य पण खालसा केले. त्यांनी ज्या प्रमाणे पेशवाईचा पाडाव झाल्यांनतर अल्पवयीन प्रतापसिंह महाराजांना नव्याने निर्माण केलेल्या सातारा राज्यावर बसवून( एप्रिल १८१८ ) त्यांच्या मार्गदर्शनासाठी कॅ.जेम्स ग्रांट ची नियुक्ती केली होती त्या प्रमाणेच दुलीपसिंगसाठी इंग्रजांनी डॉ. लोगिनला लाहोर दरबारी नियुक्त केले. तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसीच्या हुकुमानुसार इंग्रजांनी कोहीनुरसहित रणजितसिंगाचा सर्व शाही खजिना ताब्यात घेतला. कोहिनूर घेऊन दस्तुरखुद्द डलहौसी मुंबईस आला व कोहिनूर आणि दुलीपसिंग ह्या दोघांची ६ एप्रिल १८४९ ला बोटीने इंग्लंडला रवानगी केली. ज्याप्रमाणे पुण्यश्लोक शाहू महाराज औरंगजेबच्या कुटुंबीयात राहिले होते तद्वतच दुलीपसिंग विक्टोरिया राणीच्या सहवासात बराच काळ राहिला. इ.स.१८५१ मध्ये ज्यावेळी त्याने कोहिनूर हिरा प्रथमच पाहिला होता, विक्टोरिया राणीस भेट म्हणून देऊन टाकला. तेहापासून कोहिनूर तेथील राण्यांच्या मुगुटामध्ये विराजमान आहे. कोहिनूर पुरुषांना लाभत नसल्याच्या भीतीने राजघराण्यातील पुरुष मंडळींनी तो कधी परिधान केला नाही. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://youtu.be/N9nUo5e6jo8 📜 ६ एप्रिल इ.स.१९२७ सरफरोशी की तमन्ना काकोरी दरोडा प्रकरणातील सर्व क्रांतिकारी दोन गाड्यांनी कोर्टात आणले गेले. ते देशभक्तीपर गाणी गात असत. घोषणा देत असत. लोकांची भरपूर गर्दी होत असे. ६ एप्रिल १९२७ रोजी ‘सरफरोशी की तमन्ना’ हे गाणे म्हणत सर्वजण कोर्टात शिरले. जस्टिस हॅमिल्टनने शिक्षा सुनावल्या. पंडीत रामप्रसाद ‘बिस्मिल’, राजेंद्र लाहिरी, ठाकूर रोशनसिंग, आणि अश्कफुल्ला खान ह्यांना फाशी झाली. अनेकांना जन्मठेप, १४-१०-७-५-४-३ वर्षांचे सश्रम कारावास झाले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀