फॉलो करा
सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
@159107303
4,048
पोस्ट
10,589
फॉलोअर्स
सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
449 जणांनी पाहिले
3 तासांपूर्वी
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 📜 ९ मे इ.स.१५४० #महाराणा_प्रताप_यांचा_जन्म (मृत्यू – १९ जानेवारी १५९७) गुहिलोत ह्या राजपूत वंशातील एक अत्यंत पराक्रमी राजा. उदयसिंहाचा पुत्र. प्रतापसिंह गुहिलोत ह्या नावाने हा राजस्थानात प्रसिद्ध आहे. उदयसिंहाने जगमल ह्या आपल्या आवडत्या पुत्रास गादीचा वारस नेमले होते; परंतु प्रतापसिंहाच्या मामाने इतर सरदारांच्या मदतीने जगमलास दूर करून प्रतापास १ मार्च १५७२ रोजी महाराणा केले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🙏शिवदिनविशेष📜 https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtube.com/shorts/UrTro1K0wcA?feature=share 📜 ९ मे इ.स.१६६० शाहिस्तेखान पुण्यास पोहोचला! शाहिस्तेखानाने औरंगाबाद ते पुणे हा प्रवास सर्व लवाजम्यासह सव्वातीन महिण्यात मुंगीच्या वेगाने पुर्ण केला. पुणे एकाच तडाख्यात शाहिस्तेखानाच्या हाती आले. मुठेच्या किनाऱ्यावर शाहिस्तेखानाची औरस चौरस छावणी पडली. खासा खान महाराजांच्या लाल महाली डेरा देऊन राहीला. पुणे प्रदेश उद्ध्वस्त होऊ लागला. व्यापारी पळून गेले. लोक प्राणभयाने परांगदा झाले. गावे बेचिराख होऊ लागली. माँसाहेब जिजाऊसाहेबांची तगमग सारखी सुरू होती. त्यांचे अर्धे लक्ष होते स्वराज्यातील गांजल्या जाणाऱ्या निष्पाप प्रजेकडे तर, अर्धे लक्ष लागले होते पन्हाळ्यात वेढल्या गेलेल्या शिवबा राजेंकडे ! 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 ९ मे इ.स.१६६६ आग्रा प्रकरण - महाराज नरवरला पोहचले महाराजांच्या प्रवासातील बातम्यांनी औरंगजेबास सतत कळत होते की , शिवाजीराजे कसे कसे आपल्या जवळ येत आहेत ! या वर्षी त्याचा पन्नासावा वाढदिवस आग्ऱ्याच्या दिवाणे आममधल्या शाही दरबारात साजरा होणार होता. त्याच दरबारात शिवाजीराजे हजर व्हावेत अशी त्याची इच्छा होती. हजारो दरबारी उपस्थितांच्या देखत तो आजपर्यंत बेलगाम बंडखोरासारखा वागलेला सीवा मरहट्टा कसा आदबीने मुजरे करीत येतो ते त्याला जनतेला दाखवायचे होते आणि महाराजांनाही मोगल साम्राज्याचा तळपता दिमाख दाखवायचा होता. क्षणाक्षणाने तो क्षण जवळ येत होता. महाराजांनी चंबळ नदी ओलांडली होती. नरवर या ठिकाणी महाराज पोहोचले दि. ९ मे १६६६ या दिवशी. दि. १२ मे १६६६ या दिवशी बादशाहाची पन्नासावी सालगिरा होती. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 ९ मे इ.स.१६७४ छत्रपती शिवाजी महाराजांचे कोकणातील अधिकार्‍यांना आदेश "राज्यभिषेक" होण्या आगोदर छत्रपती शिवाजी महाराज चिपळुण येथे पडलेल्या 'मराठ्यांच्या छावणीला' भेट देवुन "रायगडाकडे" रवाना. शिवछत्रपतींचे युद्ध आणि सैन्यविषयक धोरण हा अजून एक अभ्यासाचा प्रचंड विषय. सैन्याची छावणी ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणी कोणती काळजी घ्यायला हवी ह्याबद्दल सविस्तर सूचना आपल्या कोकणातील अधिकाऱ्यांना दिल्या. राज्याभिषेक अवघ्या महिन्यावर आलेला असतानाही राजांचे प्रजाहीताकडे संपूर्ण लक्ष होते. सैन्याकडून प्रजेला यत्किंचितही उपसर्ग पोहोचू नये यासाठी ते किती सतर्क असत हे ह्या पत्रावरून दिसून येते. आपल्या ३०० सैनिकांकडून एका गावाला उपसर्ग झाल्याचे कळताच त्यांचे हात तोडणारा हा राजा निराळाच. तलवार घेऊन लढाई करणाऱ्या हातांपेक्षा स्वराज्यामागे असलेले जनतेचे हात त्यांना जास्त महत्वाचे वाटले असणार. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 ९ मे इ.स.१६८१ (ज्येष्ठ शुद्ध द्वितीया, शके १६०३, दुर्मती संवत्सर, वार सोमवार) शहजादा अकबराने नर्मदा नदी ओलांडली! ‌ शहजादा अकबराने आपल्या जन्मदात्या बापाविरुद्ध बंड केले. औरंगजेब बादशहाच्या सामर्थ्याला हा फार मोठा धक्का नव्हता तर आव्हानच होते. दुर्गादास राठोड व शहजादा अकबर आपल्या ३०० ते ४०० सैन्यदलासह रानोमाळ भटकत असतानाच महाराष्ट्रात यायचा निर्णय घेतला व अकबरपुर येथे त्याने नर्मदा नदी ओलांडली. दुर्गादास राठोडच्या सल्ल्यानुसार शहजादा अकबर पळून जाण्यात यशस्वी झाला. जर शहजादा अकबर यावेळेस औरंगजेब बादशहाच्या हाती लागला तर शहाजहान, दारा शुकोह मुराद आधीप्रमाणे त्याचीही हत्या नक्कीच झाली असती यात शंका नाही. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 ९ मे इ.स.१६८२ (वैशाख शुद्ध त्रयोदशी, शके १६०४, दुदुंभी संवत्सर, वार मंगळवार) इंग्रजांचे दुटप्पी धोरण! १९ एप्रिल इ.स.१६८२ पत्रातून मुंबईकर इंग्रज, सुरतकर इंग्रजांना कळवतात की, सिद्दीसारख्या दुष्ट आणि माजोरी, खुनशी वृत्तीच्या लोकांना आपण जवळ राहू दिल्यास छत्रपती संभाजी महाराज आपणास विचारणा केल्यावाचून राहणार नाहीत. आपल्या जवळ मुंबईत पुरेसे सैन्य साधनसामुग्रीही नाही. शिवाय छत्रपती संभाजी महाराज आपल्यावर हल्ला करतील ते वेगळेच त्यामुळे सिद्दीला पावसाळ्यापुर्वी मुंबई बंदरातून हलवणे योग्य होईल तशी तजवीज करावी असे मुंबईकर इंग्रज सुरतकर इंग्रजांना कळवितात. मात्र सुरतेच्या इंग्रजांची इतकी दंडेली की, त्यांनी मुंबईकरांना पत्रात सिद्दीला मुंबई बंदरात घेण्याची सक्ती केली. पुढे जाऊन मराठी आरमाराने योग्य ती कारवाई केलीच. मात्र इंग्रज कसे दुटप्पी वागत होते, याचा हा ढळढळीत पुरावा आहे. https://youtube.com/shorts/UrTro1K0wcA?feature=share 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 ९ मे इ.स.१७०३ छत्रपती शाहू महाराजांच्या धर्मांतराचे प्रयत्न ९ मे १७०३ या तारखेची नोंद पुढीलप्रमाणे आहे: बादशहाने हमीदोद्दीनखान यास म्हटले, “तुम्ही शाहुकडे जा, त्याला म्हणावे--तू मुसलमान हो. त्याप्रमाणे हमीदोद्दीनखान शाहूकडे गेला. त्याने शाहूला बादशहाचा निरोप सांगितला. शाहूने त्या सूचनेला निर्धाराने नकार दिला परत येऊन हमीदोद्दीनखानाने शाहूचा नकार बादशहाला कळविला. हे ऐकून बादशहा इतकेच म्हणाला "शाहूवर कडक नजर ठेवा." ही बातमी मोगल दरबाराच्या अखबारामध्ये सहजपणे नोंदली गेली आहे. पण महाराष्ट्राच्या इतिहासात त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 ९ मे इ.स.१८२३ दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे कारभारी त्रिंबकजी डेंगळ्यांना इंग्रजांनी १८१८ मध्ये पकडले. १८१९ मध्ये कलकत्त्यात चौकशी पूर्ण होऊन त्यांना उत्तरेत वाराणसीजवळ चुनारच्या किल्ल्यात तुरुंगात ठेवलेले होते. ९ मे १८२३ ला बंगालला पाठवलेल्या ह्या वृत्तांतात (बनारसमधल्या एजंटने) लिहिलेले आहे की "...१४ एप्रिलला आम्ही तुमच्याकडे त्रिंबकजी डेंगळ्यांनी लिहिलेला सुटकेचा अर्ज पाठवला होता, जो स्पष्ट कारणांमुळे नाकारला गेला. बंदी (त्रिंबकजी) तुरुंगावरच्या पहारेकऱ्यांशी संगनमत करून काहीतरी संधान साधायच्या तयारीत आहे.एजंटाला ह्या बाबतीत अधिक माहिती घेण्यासाठी त्याच वेळी बोलावणे पाठविलेले आहे. ..." 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 ९ मे इ.स.१९५९ रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील स्मृतीदिन... "एकवेळ जन्मदात्या बापाचे नाव बदलेल,पण कॉलेजला दिलेले छत्रपती शिवरायांचे नाव कदापीही बदलणार नाही" - कर्मवीर भाऊराव पाटील स्मृतीदिनी कर्मवीरांस विनम्र अभिवादन... 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀ #🚩शिवराय
सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
681 जणांनी पाहिले
1 दिवसांपूर्वी
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳ 📜 ८ मे इ.स.१६६३ ( वैशाख शुद्ध द्वादशी, शके १५८५, संवत्सर शोभन, शुक्रवार ) शाहिस्तेखानवरती महाराजांचा छापा पडला. दि. ६ एप्रिल १६६३. यावेळी औरंगजेब बादशाह काश्मिरात श्रीनगर येथे होता. त्याला या मराठी छाप्याची बातमी दि. ८ मे १६६३ या दिवशी कळली. तो चकीतच झाला. चिडलाही. तो त्वरित दिल्लीस परतला. शाहिस्तेखानाची ही तीन वर्षांची मोहिम पूर्ण वाया गेली होती. तो विचार करीत होता. आता या शिवाचा बंदोबस्त कसा करावा ? प्रथम त्याने शाहिस्तेखान मामांना पत्र पाठविले की , ‘ तुमची बदली आसाम-बंगाल सरहद्दीवर ढाका या ठिकाणी करण्यात येत आहे. तरी ताबडतोब ढाक्याकडे रवाना व्हावे ‘ त्या काळी या भागात कोणाची बदली वा नेमणूक केली गेली तर ती एकप्रकारे बादशाहांची नाराजी आणि शिक्षाही समजली जात असे. हा बदलीचा हुकूम मिळाल्यावर खानाने औरंगजेबास एक नम्र पश्चातापाचे पत्र पाठवून विनंती केली की , मला एकवार पुन्हा संधी द्या. मी शिवाचा बिमोड करतो. (पण माझी ढाक्यास बदली करू नका.) पण बादशाहने पुन्हा जरा कडक शब्दांत खानास हुकूमावले की , ताबडतोब ढाक्यास रवाना व्हा.आता निरुपाय होता. दु:खी खान ढाक्याकडे रवाना झाला. याच काळात आसामच्या राज्यात लछित बडफुकन या नावाचा एक जबरदस्त सेनापती आसामच्या ओहोम राजघराण्याच्या पदरी होता. हा लछित आपल्या संताजी वा धनाजीसारखाच अचाट कर्तृत्त्वाचा सेनापती होता. आसामच्या या स्वतंत्र राज्याचे मोगलांशी सततच युद्ध चालू होते. लछितने तर दिल्लीला अगदी हैराण केले होते. या लछित बडफुकनला शाहिस्तेखान आता आसामवरती येणार असल्याच्या बातम्या मिळाल्या. दक्षिणेतील शिवाजीराजाने या खानाला फजित करून पिटाळला आहे हे लछितला तपशीलवार कळले असावे ; असे दिसते. ‘ बडफुकन ‘ या शब्दाचा अर्थ ‘ बडा सेनापती ‘ मुख्य सेनापती असा आहे. या लछितने शाहिस्तेखानाला एक पत्र पाठविल्याची नोंद , ‘ शाहिस्तेखानकी बुरंजी ‘ या नावाच्या एका आसामी बखरीत आहे. लछित या खानाला लिहितो आहे. ‘ अरे , तू दक्षिणेस गेला होतास. तेथे असलेल्या शिवाजीराजाने तुझी पार फजिती केली. तुझी बोटेच तोडली म्हणे! आता तू आमच्यावर चालून येतो आहेस. आता तुझे डोके सांभाळा ? शिवाजीमहाराजांची करामत पार आसामपर्यंत त्याकाळी कशी पोहोचली होती याचे हे उदाहरण आहे. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🗿शिवकालीन पुराणवस्तू https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtube.com/shorts/lq18N5sct60?feature=share 📜 ८ मे इ.स.१६६४ अजीजखान यांनी बालाघाट उतरून सुभेदार राहुजी पंडीतांवर चालून गेला. आदिलशहाने पुन्हा महाराजांविरुद्ध हालचाल सुरू केली. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विजापुराहून सेनापती अजीजखान ४ हजार घोडदळ व पायदळ घेऊन चौलपर्यंतचा मुलूख परत घेण्यासाठी कुडाळकडे निघाला. दि. ८ मे इ.स.१६६४ रोजी त्याचे सैन्य बालाघाटातून उतरून सुभेदार राहुजी पंडीतांवर चालून गेले. परंतु विजापुरी सैन्याच्या आगमनाची वार्ता कळताच राहुजी कुडाळ सोडून राजापुरला परतले व तेथे त्यांनी स्वसंरक्षणाची तयारी आरंभिली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ८ मे इ.स.१६७५ महाराजांनी फोंड्याचा किल्ला घेतला. फोंडा किल्ला घेतल्यामुळे फोंड्याच्या अंकीत असलेले तिसवाडी, चंद्रमहल, केले, बाल्ली आणि काणकोण हे आदिलशाही महाल महाराजांच्या अंमलाखाली आले. त्यानंतर महाराजांनी दक्षिणेकडे चाल करून, सांप्रतच्या कारवार प्रांतातील सिवेश्वर, कडवा, कद्रा, आणि अंकोला हा गंगावळी अथवा गंगावती नदीपर्यंतचा आदिलशाही प्रदेश काबीज केला. महाराजांनी फोंडे येथे आपला सुभेदार नेमला व दक्षिणेकडील प्रदेशाचा कारभार बघण्यासाठी बाल्ली येथे एक हवालदार नेमला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻 📜 ८ मे इ.स.१६८० (वैशाख वद्य पंचमी, शके १६०२, रौद्र नाम संवत्सर, वार शनिवार) गोव्याचा गव्हर्नर आंतोनियू पाईश द सांद यांनी कोकण प्राताचे सरसुभेदार रायाजी पंडीत यांस लिहीलेल्या पत्राची नोंद! छत्रपती संभाजी महाराजांनी कोकणचे सरसुभेदार म्हणून आपली निवड केल्याचे पाहून खूप समाधान झाले. "महाराजांच्या महानिर्वाणाची बातमी कळताच मी आमच्या साष्टी प्रांताचा कॅप्टन जनरलला युद्ध बंद करण्याची आज्ञा दिली. हाच प्रकार फोंड्याच्या सरहद्दीवर सुद्धा आहे. युद्ध बंदीचा एकतर्फी निर्णय आम्ही घेत असून जो राजा आता सिंहासनावर येईल त्याने आमच्याशी युद्ध चालू ठेवावे की बंद करावे यासंबंधी निर्णय घेण्यासाठी आम्ही पाऊल उचलले आहे. भूतकाळाच्या गोष्टी विसरून जाऊन नवीन राजाशी, नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्याचा मी प्रयत्न करीत आहे. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻 📜 ८ मे इ.स.१६८२ (वैशाख शुद्ध द्वादशी, शके १६०४, दुदुंभी संवत्सर, वार सोमवार) सिद्दीची लुटालूट सुरूच! छत्रपती संभाजी महाराजांनी सिद्दीला पायबंद घालण्यासाठी इंग्रजांबरोबर केवळ बोलणीच केली नाही. तर इंग्रजांशी जरबेचे बोलणे करून इंग्रजांची कोंडी करण्यास सुरुवात केली. याचा परिणाम म्हणून इंग्रजांनी सिद्दीशी बोलणे केले आणि एकंदर परिस्थितीचा आढावा इंग्रजांनी घेतला. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 ८ मे इ.स.१६९९ मराठ्यांनी ८ मे १६९९ रोजी सिद्धगड काबिज केला व एक हजार पायदळ सैनिक व किल्ला चढून जाण्याची सामग्री (दोराच्या शिड्या वगैरे) माहुलीकडे पाठविली. बादशहाला हे कळताच त्याने माहुली किल्ला लढविण्याची कामगिरी कल्याण-भिवंडीचा ठाणेदार मातबरखान याजवर सोपविली. याच सुमारास अहमदनगर जिल्ह्यातील शेगांव परगण्यांतील खेडी मराठा सरदार हणमंतराव यांनी लुटली. त्याचे पारिपत्य तेथील मोगली फौजदार इल्तिफातखान याजकडे पथके नसल्यामुळे झाले नाही. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 ८ मे इ.स.१७०७ शंभूपुत्र छत्रपती थोरले शाहू महाराज मुगल कैदेतून स्वराज्यात परतले छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येनंतर औरंगजेबाने जुल्फिकार खानास रायगड लढवण्यास पाठवून दिले.महाराणी येसूबाई राणीसाहेब यांनी तब्बल दहा महिने रायगड लढवला . रायगड वाचवण्यासाठी व स्वराज्यासाठी येसूबाई राणीसाहेबांनी वैधव्याचे दुःख सहन करत आटोकाट प्रयत्न करत केला. परंतु प्रचंड मोगली सैन्यापुढे येसूबाई राणीसाहेब यांना हार पत्करावी लागली व त्या आपल्या पुत्रासह मोगलांच्या स्वाधीन झाल्या. औरंगजेबाच्या मृत्यू पूर्वी त्यांच्या मुलांना आपल्या भवितव्याचे वेध लागले होते.औरंगजेबाच्या महाराष्ट्रातील 27 वर्षाच्या प्रदिर्घ वास्तव्यानंतर अहमदनगर येथे निधन झाले. शहाजादा आजम याला आपल्या पित्याच्या मृत्युची बातमी समजताच तो अहमदनगरला आला व स्वतःस बादशहा घोषित करून तो दिल्लीकडे जाण्यास तयार झाला. जाताना बरोबर येसूबाई राणीसाहेब व शाहुराजांना बरोबर घेण्यास तो विसरला नाही.झुल्फिकारखानाला बरोबर घेऊन त्याला संपूर्ण दक्षिणेचा मुख्य अधिकारी नेमले. येसूबाई व शाहू राजांची काळजी घेणारी झीनतबेगमही बरोबर होती. पुढे बुर्हाणपुरजवळ मुक्काम पडला असता शाहूराजे व आझम यांची भेट झाली. आजमने पोषाख देऊन त्यांचा गौरव केला.छत्रपती शाहूला सोडण्याचे त्याच्या विचारात नव्हते. कारण मराठ्याचा राजा सोडून तो परत डोईजड होईल याची आजमला भिती होती. परंतु रजपूत सरदार ,काही मनसबदार, या सर्वांच्या मध्यस्थीने शाहुराजांना दोहरा येथून17 वर्षे 7 महिन्यानंतर कैद मुक्त केले गेले. यावेळी शाहूराजांची सुटका केल्यास मराठी राज्यात वारसासाठी भांडणे सुरू होतील ,हा सुज्ञ विचार करून आजमने छत्रपती शाहूंमहाराजांची सुटका केली होती. शाहूमहाराजांवर काही अटी घालण्यात आल्या. तुम्ही दिल्लीच्या बादशहाच्या अंकीत म्हणून राज्य करावे.तुमची आई ,भाऊ, व बायका यास आम्हापाशी ठेवावे. तसेच तुम्ही राज्यात बंदोबस्त करावा .बखेडा करणाऱ्या लोकांचे पारिपत्य करावे आणि बादशाही लक्षात ठेवून वागावे. इकडील मुलखास उपद्रव देऊ नये.तुम्ही याप्रमाणे वागता अशी खातरजमा झाली म्हणजे आम्ही दिल्लीस गेल्यावर व तेथे सिंहासनारूढ झाल्यावर तुमची माणसे तुम्हाकडे पाठवून देऊ वरील ठरावाने शाहूराजे मोगलांचे मांडलिक होऊन मोगली मनसबदार म्हणून कैदेतून निसटले व 8 मे 1707 मधे ते महाराष्ट्राकडे वळले .परंतु येसूबाई राणीसाहेब मात्र यावेळी महाराष्ट्रापासून हजारो मैल महाराष्ट्रापासून दूर दिल्लीकडे गेल्या. कैदेत का होईना परंतु आत्तापर्यंत येसूबाईराणी मराठी राज्यात होत्या. आता मात्र दिल्लीसारख्या अत्यंत दूर परकीय राज्यात त्यांना पुढील काळ घालवायचा होता.छत्रपती शिवाजीराजांच्या वेळेपासून ते छत्रपती संभाजीराजांच्या मृत्यूपर्यंतच्या घटना त्यातील येसूबाई राणी यांचा सहभाग, त्यांच्या आयुष्यातील अनेक चढ-उतार यांचे एक महत्त्वाचे पर्व येथे संपले. इकडे शाहूमहाराज महाराष्ट्रात परत आले .छत्रपती शिवाजीराजांच्या गादीचा वारस, त्यांचा नातू, छत्रपती संभाजीराजे व येसूबाई राणीसाहेब यांचा पुत्र असूनही शाहू महाराजांनी मोगलांच्या छावणीत कैदी म्हणून जीवन व्यतीत केले. औरंगजेबाच्या कैदेत असल्यामुळे मराठ्यांचे वारस म्हणून किंवा छत्रपती शिवाजीराजांच्या गादीचा वारस म्हणून त्यांना कोणत्याही प्रकारचे राजकीय शिक्षण मिळाले नव्हते.जोत्याजी केसरकर व येसूबाईराणीसाहेब यांच्या सहवासामुळे थोडेफार शिक्षण मिळाले तेवढेच काय ते. बाहेरच्या जगाचा कोणताही आणि कसलाही संबंध शाहुराजांना आला नाही. तरीही शाहू महाराजांनी मोठ्या हुशारीने मराठी सरदारांशी, मनसबदारांशी गुप्तपणे नाते जोडून संपर्क ठेवला होता .तब्बल 17 वर्षे 6 महिन्यांनी स्वराज्याचा खरा वारसदार मोगली कैदेतून सुटून महाराष्ट्रात परत आले.याच शंभूपुत्र छत्रपती थोरले शाहू महाराज यांनी तब्बल 42 वर्षे अत्यंत हुशारीने राज्यकारभारून करून आपल्या मातोश्री येसूबाई राणीसाहेब यांची 29 वर्षांनी मुगल कैदेतून सुटका करून घेतली. https://youtube.com/shorts/lq18N5sct60?feature=share 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ८ मे इ.स.१८१७ इंग्रजांच्या फौजांनी ८ मे १८१७ रोजी सकाळी पुण्यास वेढा घातला. हे कळताच बाजीरावाने (दुसरे) इंग्रजाशी युद्ध पुकारण्याचा निश्चय केला. परंतु लागलीच इग्रजांकडे शरणागतीची याचना केली व त्रिंबकजी डेंगळेस पकडून देण्याबद्दल २ लाखाचे बक्षिस व गाव इनाम देण्याचे जाहीरनामे लावले. त्यावरच काम निभावले नाही. एलफिस्टनने बाजीरावाची भेट घेऊन नवीन तहाच्या कलमाची वाटाघाट केली. हा तह गव्हर्नर जनरलच्या हुकुमावरून पेशव्यांवर लादला गेला. त्यातील मुख्य मतलब म्हणजे महाराष्ट्राबाहेरील पेशव्यांचे ३४ लाख वसुलाचे सर्व प्रदेश इंग्रजांनी आपल्या कबजात घेतले आणि इतर मराठे सरदारांशी त्यांचा सबंध कायमचा तोडून लावला. तदनुसार बाजीरावाजवळ असलेले शिंदे, होळकर आदींचे वकिल पुण्यातून काढून बाहेर असलेले त्यांचे वकिल यास परत बोलवावे लागले. शेवटी हो ना करता दिनांक १३ जून १८१७ रोजी पेशव्यांने ह्या तहावर मोठ्या नाखुशीने सही केली. नंतर तो गव्हर्नर जनरलकडे पाठविण्यात येऊन दिनांक ५ जुलै १८१७ रोजी मंजूर होऊन आला. ह्या तहाने बाजीरावाचे राज्य जाऊन तो एक लहानसा संस्थानिक बनला. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
920 जणांनी पाहिले
2 दिवसांपूर्वी
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ 📜 ७ मे इ.स.१४९८ पोर्तुगीज गोव्यात आले. पाल्बाव हा पाद्री गोव्यात आला आणि त्याने बाटवाबाटवीच्या छळाचा अतिरेक केला. व त्यांनी इ.स.१९६१ रोजी पर्यंत हिंदुस्थानात चाचेगिरी निर्भयपणे केली. अल्फान्सो अल्बुकर्क याने सप्तकोटेश्वराचे देऊळ पाडून तेथे चर्च उभे केले. अनेक अन्यायकारक गोष्टी घडत गेल्या. गोव्यातील हिंदू बांधवांनी त्याला फार सोशिकपणाने तोंड दिले. पुढे पोर्तुगिजांनी वसई, ठाणे, तारापूर, वांद्रे, माहीम, मुंबई येथे सत्ता स्थापन केली. दीव घेतले. दमण घेतले. गोवा, दीव, दमण यांवर त्यांची सत्ता आली. इक्विझिशनचा छळवाद संपूर्ण जगात चालू होता. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩शिवराय https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtube.com/shorts/f6EpMnIOkS4?feature=share 📜 ७ मे इ.स.१६६० (ज्येष्ठ शुद्ध अष्टमी, शके १५८२, संवत्सर शार्वरी, वार सोमवार) शाहिस्तेखान पुण्याच्या दिशेने! शाहिस्तेखान पुण्याच्या दिशेने सरकत असल्याची बातमी चलाख हेरांनी दिली होती. शाहिस्तेखानालाही मग इंगा दाखवायचा ह्या हेतूने मराठ्यांची एक तुकडी शाहिस्तेखानाच्या सैन्याची अन्नधान्याची रसद तोडण्यासाठी रवाना केली. या तुकडीने आपले काम चोख बजावले. पिछाडीवर हल्ला करून शाहिस्तेखानाची रसद तोडल्याने, शाहिस्तेखानाच्या सैन्याला काही दिवस उपवासही घडला. महाराजांच्या फौजा शाहिस्तेखानाच्या सैन्याला चावा घेत त्रस्त करतच होत्या. महाराज सिद्दी जौहरच्या वेढ्यात अडकले असताना हे घडत होते. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ७ मे इ.स.१६७२ विलायती वकीलांशी इंग्रजीत चर्चा- इ.स.१६७२ मध्ये शिवाजीराजांनी संभाजीराजांना जाणीवपूर्वक परकीय वकीलांशी चर्चा करण्याचे अधिकार दिले. वयाच्या सोळाव्या वर्षापासून संभाजीराजांना दरबारातील शिष्टाचाराचा व परकीय दूतांशी संवाद साधण्याचा अनुभव मिळाला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ७ मे इ.स.१६८० (वैशाख वद्य ४, चतुर्थी, शके १६०२, रौद्र नाम संवत्सर, वार शुक्रवार) छत्रपती संभाजी महाराजांची राजमुद्रा ! महाराजांच्या महानिर्वाणानंतर अनेक घटना वेगात घडल्या. अनेक ज्येष्ठ सहकाऱ्यांच्या सल्ल्याने, सहकार्याने छत्रपती संभाजी महाराजांनी किल्ले पन्हाळगडावरूनच राज्यकारभार सुरू केला. प्रल्हाद निराजी यांचे न्यायदानाचे व न्यायधीश हे पद आधीप्रमाणे सुरू राहिले. हंबीरराव मोहिते हे सरलष्कर म्हणून तर बाळाजी आवजी हे चिटणीस पदावर कायम राहीले. काळ भराभर पुढे सरकत होता. मंचकारोहण होण्यापूर्वी छत्रपती संभाजी महाराजांनी आधी किल्ले पन्हाळगडावरून तर मंचकारोहण झाल्यावर किल्ले रायगडावरून प्रशासकीय कारभार सुरू केला. छत्रपती संभाजी महाराजांनी मुरगुडच्या रुद्रप्पा देसाई यांना पत्र लिहिले. त्या पत्रावर छत्रपती संभाजी महाराजांची पिंपळपानी, १६ बुरजी, षोडशावली राजमुद्रा प्रथम आढळते. ती अशी: श्री शंभो: शिव जातस्य मुद्राद्यौ। रिव राजते यदं। कसे विनो लेखा। वर्तते कस्यनो। परि। अर्थ: शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांची मुद्रा सुर्याप्रमाणे शोभते. त्या मुद्रेचा आश्रय करणारी लेखासुद्धा कोणावरही सत्ता गाजविते. छत्रपती संभाजी महाराजांची मुद्रा "मर्यादेयं विजयते" अशी होती. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ७ मे इ.स.१८१८ पेशव्यांची शरणागती आणि प्रतापसिंह महाराजांस चिमुकले राज्य देऊन त्यांची मांडलीक राजे म्हणून स्थापना या दोन गोष्टी इंग्रजांनी १८१८ च्या युद्धाने झालेल्या मराठ्यांच्या ताब्यात असलेले मजबूत किल्ले सिंहगड, पुरंदर, वासोटा हे एप्रिल १८१८ च्या आरंभीच इंग्रजांनी जिंकले. हिंदवी स्वराज्याची राजधानी श्रीमान रायगड प्रिटल्झरच्या स्वाधीन करण्यात आला. (दिनांक ७ मे १८१८) त्याचवेळी इ. स. १६८९ च्या मोगलाने घातलेल्या वेढ्यांतून जे काही कागदपत्रे शिल्लक होते ते इंग्रजांनी केलेल्या तोफांच्या माऱ्यामुळे नष्ट झाले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
1.1K जणांनी पाहिले
3 दिवसांपूर्वी
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 📜 ६ मे इ.स.१४५२ सेंट झेविअर गोव्यात आला! व त्याने इक्विझिशन सुरू करण्याची मागणी केली. येशू ख्रिस्ताच्या निर्वाणानंतर त्यांच्या काही शिष्यांनी युरोपात स्थलांतर केले व युरोप मध्ये आपला धर्म वाढविण्याचा प्रयत्न चालू केला. 'ज्यू लोकांना बाटविण्यासाठी त्यांचा छळ करणे इ. गोष्टी इटली, जर्मनी, स्पेन आणि पोर्तुगाल ह्या देशांमध्ये सुरू झाल्या. पुढे या गोष्टी पोर्तुगालमधून हिंदुस्थान व गोव्यात आल्या. हे करताना ज्यू लोक जे नवख्रिश्चन झाले ते त्या धर्माचे आचरण व्यवस्थित करतात की नाही. याचा शोध घेण्यासाठी ते न करणारांस शिक्षा देण्यासाठी ख्रिस्ती धर्मगुरू ९ वा ग्रेगरी पोप याने इ.स.१२३९ मध्ये इक्विझिशन (पवित्र न्यायसभा) स्थापन केले आणि त्यांच्या द्वारे लोकांचा अनन्वित छळ सुरू झाला. त्यातील काही नवख्रिश्चन ज्यू गोव्यात आले. गोव्यातही बाटवाबाटवीने नवख्रिश्चन झाले होते. त्या नवख्रिश्चनांना शिकविण्यासाठी सेंट झेविअर गोव्यात आला, ती तारीख होती, ६ मे इ.स.१४५२. आणि त्याने गोव्यात इक्विझिशन सुरू करण्याची मागणी केली. "पेतरोज" हा इतिहासकार म्हणतो. ६ मे इ.स.१४५२ हा दिवस गोव्याच्या इतिहासातील महत्त्वाचा दिवस. या दिवशी सेंट झेविअरचे पाय गोव्यास लागले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtube.com/shorts/lK_dgkCmKpE?feature=share 📜 ६ मे इ.स.१६३२ शहाजहान बादशहा व आदिलशहा यांच्यामधे शहाजी राजांना पराभूत करण्याबद्दल तह झाला शहाजहान व अदिलशहा यांच्यामध्ये १ महत्त्वाचा तह झाला, हा "तह" दक्षिणेतील राजकारणाला कलाटणी देणारा होता व यामध्ये २ "कलम" होते. एका कलमाप्रमाणे 'अदिलशहा हा 'शहाजहानचा' मांडलीक झाला. दुसर्‍या कलमाप्रमाणे 'निजामशाही' संपवून ते राज्य 'मुघल' व 'अदिलशहा' यांनी वाटून घेण्याचे ठरले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 ६ मे इ.स.१६३६ आदिलशहा व मोगल बादशहा यांच्यामध्ये तह ठरला. त्यानुसार विजापुरकरांनी दिल्लीपतीचे प्रभुत्व मान्य करावे, निजामशाहीचा मुलुख दोघांनी वाटून घ्यावा, आदिलशहाने मोगल बादशहाची सरहद्द ओलांडू नये, या तहानुसार प्राप्त झालेल्या मुलूखाचा ताबा मोगलांना बिनतक्रार घेऊ द्यावा. निजामशाहीतील पश्चिमेकडील भीमा व सीना या दोन नद्यांमधील सोलापूर परिंडा किल्ल्यासह सोलापूर व वांगणी महाल, निजामशाही कोकण, पुणे व चाकण परतणे ईशान्येकडील भालकी व चिडगुपा हे परगणे हा सर्व मुलूख मिळून (दरसाल २०, वीस लक्ष होण वसुलीचा) "विजापुरकरांकडे तर उर्वरित मोगलांकडे जोडला जावा असे ठरले. + याशिवाय राजे शहाजीराजे यांच्या निजामशाहीस मान्यता न देता त्यांनी बळकावलेले जुन्नर, त्रिंबक, भीमगड इत्यादी किल्ले ते मोगलांना जोपर्यंत परत करीत नाहीत तोपर्यंत आदिलशहाने त्यांना थारा देऊ नये. अथवा आपल्या नोकरीत ठेऊ नये. आल्यास कैद करावे असेही एक कलम तहात होते. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 ६ मे इ.स.१६५५ ( वैशाख अमावस्या, शके १५८७, संवत्सर विश्वासू, शुक्रवार ) मराठी फौज आणि रयतेचा चिवट प्रतिकार :- आजच्या दिवशी दाऊद खानाने पुढे कूच करून टेहाळणी पथक लोहगड परिसरात पाठवले आणि आकस्मात मराठे मोगलांवर तुटून पडले. मोगलांची ताकद कमी पडते आहे असे समजताच दाऊद खानाने मिरझा जयसिंग, अचल सिंग, कुतुबुद्दीन खानला पाठवले. मात्र चिवट मराठे आणि रयत शर्थीने प्रतिकार करत होते. हाच प्रतिकार आणि गरीब रयतेची चिवट झुंज पाहून दाऊद खान मेटाकुटीला आला होता. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ६ मे इ.स.१६५६ रायरी हा किल्ला शिवरायांनी जिंकला आणि त्याचे रायगड असे नामकरण केले. रायरी हा किल्ला जावळीच्या मोरे याच्याकड़े होता. राजांनी जानेवारी १६५६ मध्ये जावळी जिंकल्यावर हा मोरे तिकडून पळाला तो थेट रायरीवर येउन बसला. छत्रपती शिवरायांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस वेढा घातला व मे महिन्यात रायरी शिवरायांच्या ताब्यात आला. कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद याच्याकडून लुटलेल्या खजिन्याचा वापर गडाच्या बांधकामासाठी केला. रायगडाची जागा अवघड ठिकाणी असल्यामुळे तसेच ते सागरी दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचे असल्यामुळे छत्रपति शिवाजी महाराजांनी रायगडाची राजधानी म्हणून निवड केली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ६ मे इ.स.१६६७ औरंगजेब बादशहाने महाराजांच्या वकिलास बोलावून सांगितले की, "तुमचे मालकास कळविने की, तुमचे अपराध आम्ही माफ केले आहेत आणि तुमच्या मुलाला म्हणजेच युवराज शंभुराजे यांना चाकरीस ठेवून घेतले आहे. जो विजापुरी मुलूख तुम्ही जिंकाल तो तुम्हालाच देऊ आणि तुम्ही स्वतःचेच ठिकाणी कायम राहा. तुमच्याकडील प्रत्येक महाल तुम्ही शहजादा मोहम्मद मोअज्जमकडे रुजू करा". जुम्दतुलमकास हुकुमकेला. महाराजांच्या वकिलास कैदेतून सोडावे. महाराजांस सुद्धा लिहावे, विश्वासू जामीन दिल्यास आणि स्वतःच्या मुलास हजर ठेवले तर तुमचे अपराध माफ होतील. औरंगजेब बादशहाने महाराजांशी त्यांच्या म्हणण्यानुसार तह केला. महाराजांचा वकिल दिल्ली दरबारात राहीला. औरंगजेब बादशहाने विजापुरवरील स्वारीची लुट आणि ऐवज स्वतःकडे ठेवण्यास परवानगी दिली आणि युवराज शंभुराजे यांना पुन्हा "मनसबदारी" मिळाली. महाराज दक्षिणेत राहीले. महाराजांकडील सर्व महाल शहजादा मुअज्जमकडे देण्यात आले. महाराजांच्या मुळ जहागिरी व सरदेशमुखी या महाराजांकडे राहील्या., 📜 ६ मे इ.स.१६८८ (वैशाख वद्य प्रतिपदा, शके १६१०, विभव संवत्सर, वार रविवार) शहजादा अकबरासंदर्भात इंग्रजांचे पत्र ! शहजादा अकबराने इराणला जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळे जहाजांची वगैरे सर्व तयारी होऊन, राजापुराहून ती येईपर्यंत व इराणच्या शहाचे फर्मान मिळेपर्यंत तो भडोचला सुरक्षित राहीला. पुढे राजापुरच्या फ्रेंच व व वेंगुर्ल्याच्या डच व्यापाऱ्यांकडून जहाजाची योजना करून दिल्यानंतर शहजादा अकबर इराणला गेला. शहजादा अकबराचा उद्देश सफल झाल्यासारखा होता कारण इराणच्या शहाने त्याला मदत केली. त्या संदर्भात एक पत्र उपलब्ध असून त्या पत्रानुसार जर सुलतान अकबराला ६० हजार स्वारांची केलेली मदत पुरली नाही, तर इराणच्या शहा त्याच्या पाठोपाठ मोठे सैन्य घेऊन निघणार आहे. इराणच्या शहाने शहजादा अकबराला दिल्ली तख्तावर स्थापन करण्याचे दाढीची शपथ घेऊन वचन दिले आहे. या आशयाचे हे पत्र आहे. अशा पत्रातून शहजादा अकबराच्या इ.स.१६८८ रोजी नंतरच्या हालचालींवर प्रकाश पडतो. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 ६ मे इ.स.१९२२ राजातील माणुस आणी माणसातील राजा लोकराजा "राजश्री छत्रपती शाहू महाराज" यांचे निधन झाले. महाराजांनी बहूजन समाजात शिक्षणाचा प्रसार करण्यास भर दिला, कोल्हापुर संस्थानात "प्राथमिक शिक्षण" सक्तीचे व मोफत केले, "स्त्री शिक्षणाचा" प्रसार व्हावा म्हणुन "राजज्ञा काढली व बहूजनंना "राजकिय निर्णय प्रक्रियेत" सामावुन घेण्यासाठी 'डेक्कन रयत असोशियन' संस्था स्थापन केली. इ.स.१९१७ मध्ये विधवांसाठी 'पुर्नविवाहाचा' कायदेशीर मान्यता मिळवून दिली. अशाप्रकारे "शाहूंनी" समाजात महत्वाचे अनेक बदल घडवून आणले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
766 जणांनी पाहिले
4 दिवसांपूर्वी
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 📜 ५ मे इ.स.१६५७ ( जेष्ठ शुद्ध द्वितीया, शके १५७९, संवत्सर हेमलंबी, मंगळवार ) शिवरायांची किर्ती सातासमुद्रा पार :- पोर्तुगालच्या गव्हर्नरने पोर्तुगालच्या राजाला लिहिलेले एक सुंदर पत्र उपलब्ध असून, त्यात त्याने लिहिले आहे की, "शहाजीराजे यांचे पुत्र शिवाजीराजे यांनी उत्तरेकडील मूलखास उपद्रव दिला आहे. त्यामुळे अधिकचे ८० शिपाई चौल येथे बंदोबस्तासाठी पाठवावे लागत आहे." सिंधुसागराच्या पाठीवर लाटांची टिपरी वाजवून सातासमुद्रा पलीकडील पोर्तुगालच्या राजाला गव्हर्नरने महाराजांची महती ऐकवली. पाश्चात्य श्रीशिवचरित्रात हा बहुदा पहिलाच उल्लेख असावा. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🚩शिवराय https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtube.com/shorts/T_Np6JTHF2k?feature=share 📜 ५ मे इ.स.१६६१ एका वलंदेजी पत्रात राजांच्या चपळ हलचालींमुळे आदिलशाही अधिकाऱ्यांची उडालेली तारांबळ दिसून येते राजांनी कोकणात कुडाळपर्यंत सर्व भाग जिंकून घेतला असेही त्यात म्हटले आहे. फेब्रुवारी १६६० ला दाभोळही राजांच्याकडे आले व त्याच सुमारास कुडाळचा किल्लाही त्यांनी जिंकला. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 ५ मे इ.स.१६६३ गोव्याच्या पोर्तुगीज वॉइसरॉयने त्याच्या दख्खनच्या गवर्नरला छत्रपती शिवरायांच्या सागरी हालचालींबद्दल सावधान करणारे पत्र लिहिले. १६५७ पासून राजांनी कल्याण-दुर्गाडी येथून आरमार उभे करण्यास सुरवात केली होती. १६६३ पर्यंत बऱ्याच बोटी बनवून उत्तर कोकणामधले काही सागरी किल्ले मराठ्यान्नी काबीज केले होते. तसेच दाभोळ, राजापूर सारखी संपन्न बंदरेसुद्धा ताब्यात घेतली होती. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 ५ मे इ.स.१६८० छत्रपती संभाजी महाराजांनी रामजी नाईक ठाकूर या वकीलाबरोबर गोव्याचा विजरई यास 'सलोख्याचे' पत्र पाठवले. या पत्रात छत्रपती शंभूराजांनी आपल्या वडिलांच्या निधनाची बातमी देऊन आपण सत्ताधारी झाल्याचे कळवले आणि पोर्तुगीज व मराठे यांच्यात मैत्रीचा तह करण्यास सुचवले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 ५ मे इ.स.१६८२ कारवार जवळील अंजदीव बेटावर छत्रपती संभाजी राजे किल्ला बांधणार यामुळे गोव्यास धोका उत्पन्न होणार कारण अरब व छत्रपती संभाजीराजे यांची मैत्री दिवसेदिवस वाढत होती व अरब हे पोर्तुगीझांचे शत्रू. त्यामुळे अंजदीव बेट छत्रपती संभाजी महाराजांच्या ताब्यात जाण्याची भीती विजरईला वाटू लागली व आजच्या दिवशी त्याने अंजदीव बेटाचा ताबा घेतला. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 ५ मे इ.स.१७४६ पोर्तुगिजांनी सावंतांचा "हलणे" किल्ला घेतला. ह्या लढाईत सदई किल्ल्याचा किल्लेदार गोमा सावंत याने मोठा पराक्रम गाजविला. हलणेहून पोर्तुगीज सैन्याने डिचोलीच्या किल्ल्यावर चाल केली. तो किल्ला पोर्तुगीज घेतल्याशिवाय राहणार नाहीत हे जाणून सावंतांनी त्याची मोडतोड करून तो निकामी करून टाकला. https://youtube.com/shorts/T_Np6JTHF2k?feature=share 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 ५ मे इ.स.१९११ शहीद प्रीतीलता वड्डेदार यांचा जन्म (मृत्यू - २३ सप्टेंबर १९३२) भारतीय स्वतंत्र लढ्यात शहीद होणारी पहिली महिला… २१ वर्ष वयाच्या मुलीने इंग्रजांविरुद्ध लढतांना आपल्या प्राणाची आहुती दिली तिचं नाव आहे “प्रीतीलता वड्डेदार.” प्रीतीलता वड्डेदार चा जन्म बंगाल मधील चिटगाव येथे ५ मे १९११ रोजी झाला. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
1.4K जणांनी पाहिले
5 दिवसांपूर्वी
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ 📜 ४ मे इ.स‌.१६४९ राजा छत्रसाल बुंदेला यांच्या जयंतीनिमित्त त्यांना त्रिवार सलाम. "||शिवाजीराजे पिछे हुआ,बुंदेला बलवान|| ||प्राणनाथ का शिष्य यह, छत्रसाल महान||" आजही बुंदेलखंडात महाराज छत्रसाल बुंदेला यांच्या समाधीवर ही गुरू शिष्याची महत्त्व दुगोच्चार करणारं कवन पूर्ण जगाला प्रेरणा देत विराजमान आहे. "शिवराय पाठीशी होते म्हणून मी आज एवढा बलवान झालो" असा या कवनाचा अर्थ. आजही बुंदेलखंडात छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव आदराने आणि सन्मानाने घेतलं जातं किती अभिमानाची गोष्ट ही आपल्यासाठी आणि आपल्या देशासाठी. शिवरायांना छत्रसाल यांनी आपल्या गुरुस्थानी मानले होते. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtube.com/shorts/Gcgv7mFL-Qg?feature=share 📜 ४ मे इ.स.१६६५ (वैशाख वद्य चतुर्दशी, शके १५८७, संवत्सर विश्वावसू, वार गुरुवार) दाऊदखानाचा पुण्यात चिंचवड येथे तळ! मोगली उठावाला तोंड देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचे सैन्य ज्या तडफेने प्रतिकार करत होते ते वृत्त मिर्झाराजे जयसिंग यांना समजले. किल्ले रायगडावर झालेला प्रतिकार दाऊदखान मागे हटल्याचे वृत्त मिर्झाराजे जयसिंग यांना समजल्यावर मिर्झाराजे जयसिंग यांनी दाऊदखानास आणि कुतुबूद्दीनखान यांना किल्ले लोहगडाकडे जाण्याची आज्ञा केली. त्यानुसार हे दोघे पुण्यात भेटले आणि पुण्यानजीक चिंचवड येथे तळ दिला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ४ मे इ.स.१६७५ (वैशाख वद्य पंचमी, शके १५९७, राक्षस संवत्सर, वार मंगळवार) युवराज शंभुराजे यांचे ताकीदपत्र! स्वराज्य कार्यात महाराजांनी युवराज शंभुराजे यांना गुंतवल्यानंतर युवराज शंभुराजे यांच्या प्रशासनाचे चांगले निवाडेसुद्धा उपलब्ध आहेत. दि. १३ मार्च इ.स.१६७५ रोजीच्या युवराज शंभुराजेंनी गोपाळसेट सेट्याच्या सेटेपणाच्या तंट्याचा निकाल लावला. त्याबद्दल युवराज शंभुराजे यांना भेटीदाखल ५ होण गोपाळसेटने दिले. युवराज शंभुराजे यांनी पुण्याच्या राघो भास्कर सरहवालदार याला व जुन्नरच्या राघो बल्लाळ, सुभेदाराला लिहीलेली पत्रे इतिहासात उपलब्ध आहेत. निळोजी, शंकराजी, विसाजी व त्र्यंबकजी नीळकंठराव यांनी मिरासपट्टी मागू नये अशा स्वरूपाची ताकीद पत्रातून दिलेली आहे. युवराज शंभुराजे वयाच्या १७, व्या वर्षापासूनच राज्यकारभारात लक्ष घालत होते. याचे ही उत्तम उदाहरणे आहेत. वरील उदाहरणे युवराज शंभुराजे यांच्या कार्यकर्तृत्वाची साक्ष देत आहेत. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ४ मे इ.स.१६८३ (वैशाख वद्य चतुर्थी, शके १६०५, रुधिरोद्रारी संवत्सर, वार शुक्रवार) रघुनाथ हणमंते यांना देवाज्ञा! १२ डिसेंबर इ.स.१६८० ते ९ जानेवारी इ.स.१६८१ या काळात रघुनाथ नारायण हणमंते यांना चंदी येथे अटक करून तुरूंगात डांबण्यात आले. मात्र इ.स.१६८२ पुर्वी त्यांना मुक्त करण्यात आले. अटकेतून मुक्त झाल्यावर थेट कर्णाटकातून रघुनाथपंत छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्यात येऊन भेटले. फितुरी व राजद्रोह कटांचे हलाहल पचविणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांनी मागचे सारे विसरून पुन्हा "मुजुमदार" या पदावर नियुक्त केले. मात्र दुसऱ्यांदा मुजुमदारपदी नियुक्त झाल्यावर पुढील अवघ्या ४ ते ५ महिन्यांत वलणी येथे मृत्युमुखी पडले. यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी रघुनाथपंथ हणमंते यांचे चिरंजीव नारायण रघुनाथ हणमंते यांना मुजुमदारी (अमात्य) पद दिले, तर तिमाजी हणमंते यांना कर्नाटकात मुजुमदार पदी नियुक्त केले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜४ मे इ.स.१७५८ बाजीराव आणि चिमाजीने खरच मराठी सत्तेचा दबदबा दख्खन पासुन रुमशे पावतो पसरवला. मराठ्यांची विजयी घोडी नर्मदा ओलांडुन गेली. थोरले बाजीराव हे एकमेव अपराजित सेनापती होते. अटकेच्या मोहिमेत तुकोजी होळकर आणि त्यांच्या सोबत असणारे सरदार राणोजी शिंदे यांनी अप्रतिम पराक्रम केला होता, रघुनाथरावाने वयाच्या २३व्या वर्षी अटकेवर भगवा फडकवला. राघोबाचा राघो-भरारी झाला. याच काळातिल ४ मे रोजी राघोबादादांचे नानासाहेबांना लिहीलेले एक पत्र मराठ्यांमधील चेतलेल्या आत्मविश्वासाचे बोलके उदाहरण आहे – "आपण लाहोर, मुल्तान, काश्मीर आणि अटकेच्या आसपासचे सुभे आपल्या अंमलाखाली आणले आहेत, आणि जे न आलेले प्रदेश आहेत ते लवकरच आपल्या राज्यात समाविष्ट करु. अहमदशहा अब्दालीचा पुत्र तैमु्र सुल्तान आणि जहानखान यांना आपल्या सैन्याने पराजित केले आहे. त्यांना आपण अक्षरश: नागवले आहे. आपले विस्कळीत सैन्य घेउन ते एव्हाना पेशावरपर्यंत पोहोचले असतिल. आम्ही आपले राज्य कंदहारपर्यंत वाढवण्याचे निश्चित केले आहे." मराठी साम्राज्य उत्तरेत सिंधु नदी आणि कश्मीरपर्यंत, पुर्वेला ओरिसापर्यंत, दक्षीण-पश्विमेला गोव्यापर्यंत आणि दक्षीणेला म्हैसुरपर्यंत पसरले होते. https://youtube.com/shorts/Gcgv7mFL-Qg?feature=share 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 ४ मे इ.स.१७९९ हैदरअलीचा थोरला मुलगा व मैसूरचा वाघ, शहाबहादूर फतेह अली खान ऊर्फ टिपू सुलतान इंग्रजांबरोबर झालेल्या लढाईत ठार झाला. (जन्म: २० नोव्हेंबर १७५०) 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 ४ मे इ.स.१८०८ राजे शाहू महाराज (दुसरे) महानिर्वाण झाले व तद्नंतर त्यांचा मुलगा प्रतापसिंह हा गादीवर बसला. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
1.1K जणांनी पाहिले
6 दिवसांपूर्वी
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ 📜 ३ मे इ.स.१६७३ महाराजांनी राहुजी सोमनाथ यांना कुडाळ मोहिमेवर पाठविले. स्वराज्याचे "पहीले प्रतिनिधी" राहुजीपंत झाले. राहुजी म्हणजे रावजी सोमनाथ ही व्यक्ती काय दर्जाची होती याचा विचार केल्यास छत्रपती शिवाजी महाराजांची कर्तबगार आणि विश्वासू माणसांच्या कर्तृत्वाचे चीज करण्याची पद्धत किती अचूक होती हे ध्यानात येते. आग्रा येथे जाताना माँसाहेब जिजाऊसाहेबांच्या मदतीस त्यांनी ज्या महत्वाच्या व्यक्ती ठेवल्या होत्या, त्यात मोरोपंत पेशवे, निळोजीपंत मुजुमदार, दर्यासारंग आणि राहुजी सोमनाथ हे होते. छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथे गेल्यावर फोंड्यावर पहिल्या वेढ्याच्या वेळी राहुजीपंत तळकोकणात खंबीरपणे उभे होते. अदिलशहाकडून रांगणा किल्ला त्यांनी मिळविला. इ.स.१६६७ मध्ये युवराज शंभुराजे शहजाद्याकडे मोगली मनसबदार म्हणून गेले. त्यांच्याबरोबर निराजीपंत व राहुजीपंत होते. वऱ्हाडच्या लुटीच्या वेळी राहुजीपंत होतेच, बाजी घोरपड्यांवर केलेल्या चालीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर ते होते. राहुजीपंत हे कुडाळच्या सुभ्याचे सुभेदार झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना कुडाळ मोहिमेवर पाठविले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩शिवराय #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtube.com/shorts/CBB-HEtMjro?feature=share 📜 ३ मे इ.स.१६८० मुंबईकर इंग्रजांच्या पत्राची नोंद! ‌‌. "मुंबईकर इंग्रजांच्या पत्रात छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या नावाची ग्वाही फिरवून ते वडिलांच्या गादीवर बसले असे लिहीले आहे मोरोपंत, अण्णाजीपंत वगैरे, महाराजांचे हुकूम घेण्याकरिता पन्हाळ्यास गेले आहेत. युवराज राजाराम किल्ले रायरीला आहते. ते तेथेच राहणार असून तो किल्ला त्यांच्याच ताब्यात आहे. सर्व सुभेदार व हवालदारांना छत्रपती संभाजी महाराजांनी तसेच ठेविले. काही बदल केला नाही". 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 📜 ३ मे इ.स.१६८० (वैशाख शुद्ध पौर्णिमा, शके १६०२, रौद्र संवत्सर, वार सोमवार) छत्रपती संभाजी महाराजांची इंग्रजांना दहशत! इंग्रजांनी महाराजांशी केलेला. तह पाळला नव्हता आणि महाराज जंजिरा किल्ला घेऊ शकले नव्हते. आणि महीनाभरापुर्वीच महाराजांचे महानिर्वाण झाल्याने इंग्रजांनी आता स्वैर वागायला सुरुवात केली होती. सिद्दी मुंबई भागात लुटमार करीतच होता. लुटीच्या जहाजांचा उघडपणे लिलाव करून त्यांनी इंग्रजांनाच आव्हान दिले होते. त्यामुळे इंग्रजांचे आता धाबे चांगलेच दणाणले होते. जर छत्रपती संभाजी महाराजांना इंग्रजांचे हे कारनामे आणि सिद्दीला आतून फूस असल्याचे कळले तर छत्रपती संभाजी महाराज सिद्दी व इंग्रज दोघांनाही त्रास देणार हे निश्चितच होते. त्यात कुठलीही शंकाच नव्हती कारण नुकतेच कुठे छत्रपती संभाजी महाराज महाराजांच्या महानिर्वाणाच्या धक्यातून सावरत असताना जर छत्रपती संभाजी महाराजांनी आरमारी युद्ध केले तर स्वराज्याचे वारसदार म्हणून तडफेची लढाई होणार यात शंका नव्हती. त्यामुळे मुंबईकर इंग्रजांनी घाबरून सिद्दीचा दाणागोटा बंद केला व सर्व मदत थांबविली. या वागण्याचा परिणाम मात्र लगेच दिसून आला अन् सिद्दीने नागोठणे पेण, आपटे, बट्टी इथे लुटालूट थांबविली. मुंबईकरांनी छत्रपती संभाजी महाराजांची अगदी सुरुवातीपासूनच किती धास्ती घेतली होती याचा निर्वाळा मिळतो. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 📜 ३ मे इ.स.१७२० छत्रपती शाहू महाराजांना नाराजीचे पत्र बाजीरावांच्या सुरुवातीच्या काळात, इ.स.१७२० मध्ये कर्नाटकच्या रायबाग परगण्यात असलेल्या संदूत्ती नावाच्या गावात बाजीरावांच्या सैन्याने लुटालूट केली. इथे एक हिंदू मठ होता तोही लुटला गेला. इथल्या मठाधिपती तरागिर गोसाव्याने दि. ३ मे १७२०ला शाहूछत्रपतींना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली तेव्हा शाहू महाराजांनी गोसाव्यालाच म्हटलं, "राऊ आले होते तेव्हाच आधीच भेट घेऊन तुम्ही स्वतःला सुरक्षित करायला हवं होतं. लष्कर अनिवार असतं, धामधुमीच्या काळात प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवता नाही येत तेव्हा लष्कराने लुटलं ती गोष्ट झाली. आता मी अभयपत्र देतो त्यावरून पुन्हा गावाला इजा लागणार नाही". 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 ३ मे इ.स.१७६४ माधवराव पेशवे व हैदरअली यांच्यात लढाईला प्रारंभ! माधवराव पेशवे यांनी हैदरचा बंदोबस्त करायचे ठरविले. मुरारराव घोरपडे यांना घेऊन मराठी फौज इ.स. १७६२ मध्ये कर्णाटकात उतरली. बाळापुरच्या लढाईत हैदरअलीचा पराभव झाला. त्रिंबकराव पेठ्याने धारवाडपासून तुंगभद्रेपर्यंत खंडण्या वसूल केल्या. मात्र पेशवा फिरताच हैदरने मुराररावांच्या सैन्यावर हल्ला केला. सुत्ती सोडून घोरपडे यांचा इतर प्रदेश हैदरअलीने कबज्यात घेतला. खंडेराव घोरपडे वगैरे बऱ्याच जणांना कैदेत घातले. पुढच्याच वर्षी त्याने बिदनूर घेतले. ते संस्थान हस्तगत करून त्याचे नाव हैदरनगर ठेवले. तेथे टांकसाळ करून त्याने स्वतःची नाणी पाडली. होणावर बंदरात आरमार सिद्ध केले. सोंधे घेतले. सावनूर, हुबळी, धारवाड ही सारी स्थाने हैदरअलीने ताब्यात घेतली. जवळजवळ ५० लाखांचा मुलूख हैदरच्या ताब्यात गेला आणि त्याच्या राज्याच्या सीमा जवळजवळ कृष्णेस येऊन मिळाल्या. माधवराव पेशवे यांचा या बातम्या ऐकून तीळपापड होत असे. हैदरचा बंदोबस्त करावा म्हणून त्यांनी फौज कर्णाटकात उतरली. धुळपाचे मराठी आरमारही मदतीस बोलावले गेले. हैदरचे बळ या मराठी फौजेपुढे कमी होते. समोरासमोर हैदर लढाई करतच नव्हता. गणिमी काव्यानेच लढावयास सुरुवात केली. तो बिदनूरच्या जवळच्या जंगलात लपून बसला होता. रात्री अपरात्री त्याची फौज मराठी फौजेवर तुटून पडे. त्याची मुख्य फौज रट्टेहळळीस होती. मराठी फौज हैदरच्या रट्टेहळळीवरील फौजेवर तुटून पडली. आणि लढाईला प्रारंभ झाला. तुफान संग्राम झाला. हैदरही स्वतः या लढाईत सामील झाला. मात्र मराठी फौज हिरीरीने लढली. मोठा पराक्रम करून मराठी फौजेने हैदरचा पराभव केला. बंकापुर, सावनूर येथेही चकमकी झाल्या. शेवटी सारी मराठी फौज धारवडच्या किल्ल्याच्या समोर आली. https://youtube.com/shorts/CBB-HEtMjro?feature=share 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 📜 ३ मे इ.स.१८१८ दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली! मेजर एल्ड्रिजने जीवधन किल्ला जिंकला. घाटघरच्या परिसरात असलेला हा पूर्वमुखी किल्ला प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी उभारण्यात आला होता. नाणेघाटापासून जीवधन किल्ला अगदी हाकेच्या अंतरावर आहे. जीवधनच्या पायथ्याचे गांव म्हणजे घाटघर. बांबूची बने हे या गावचे वैशिष्टय शिवजन्माच्या वेळी अस्ताला जाणाऱ्या निजामशाहीच्या देणारा किल्ला म्हणजे जीवधन होय. १७ जून १६६३ रोजी निजामशाही बुडाली. शहाजीराजांनी निजामशाहीचा शेवटचा वंशज मुर्तिजा निजाम याला जीवधनच्या कैदेतून सोडवून संगमनेरजवळील पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशहा म्हणून घोषित केले व स्वतः वजीर बनले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
702 जणांनी पाहिले
7 दिवसांपूर्वी
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ 📜 २ मे इ.स.१६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले रायरी उर्फ रायगड ताब्यात घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आला. शिवाजी राजांनी चंद्रराव मोरे यांचा पराभव करुन रायगड किल्ला ताब्यात घेतला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🗿शिवकालीन पुराणवस्तू https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtube.com/shorts/edelcH3kEew?feature=share 📜 २ मे इ.स.१६६५ (वैशाख वद्य त्रयोदशी, शके १५८७, संवत्सर विश्वासू, मंगळवार) दाऊद खान किल्ले कोंढाण्याच्या दिशेने :- राजगडावरून प्रचंड मार खाऊन निघालेला दाऊद खान मराठ्यांच्या रेट्यासमोर टिकेनासा झाला. राजगड परिसरातून २ कोस मागे हटल्यानंतर त्याने आपला तळ गुंजन घेऱ्याजवळ दिला व तिथून एक दिवस विश्रांती घेऊन खेड शिवापुरच्या दिशेने स्वराज्याची नासधूस करत कोंढण्याच्या दिशेने सरकला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २ मे इ.स.१६८३ छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून राज्यव्यवहार कोष तयार करणारे मुत्सद्दी कारभारी "रघुनाथ नारायण हणमंते" यांचे निधन. शिवरायांच्या सांगण्यावरून रघुनाथपंतानें 'राजव्यवहार कोश, रचिला आणि आपल्या सर्वाना शब्दाचा रास उघड झाला. आजही मराठीतील प्रचिलित असलेले शब्द शिवराज्यकोशात असल्याचे पाहून आनंद होतो . .🙏 सचिव , मंत्री , सभासद , न्यायधीश , दुर्ग , कोशागार , शस्त्रागार , चषक , सभा , लेखा , आय - व्यय (जमाखर्च ) , वेतन , ऋण , पतिभु (जामिन ) , कारागृह , आयपत्र , सहकारी , अनुक्रमणिका , सवांद , गणना. असे अनेक असंख्य शब्द आजही आपल्या वापरात आहे. राज्यव्यवहारकोश विविध आठ नावांनी ओळखला जातो . १) राज्यव्यवहारकोश २) राजकोश ३) शिवचरित्रप्रतीप ४) राजकोश नीघुन्तु (#ट) ५) व्यवहारकोश ६) शिवराजकोश ७) श्री छत्रपती राजकोश ८) श्री छत्रपती राज्यव्यवहारकोश 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २ मे इ.स.१७३९ गोव्याचे पोर्तुगीज आणि व्यंकटराव घोरपडे यांच्यात तह! या तहात खोर्जुवे बेट आणि पनाळे बेट ही पोर्तुगिजांनी घेतलेली सावंतांची दोन्ही बेटे त्यांनी सावंतांना परत करावी, असे कलम होते. परंतु मी दोन्ही बेटे त्यांनी सावंतांना परत करावी, असे कलम होते. परंतु ती दोन्ही बेटे पोर्तुगिजांनी सावंतांना परत केली नाहीत. तत्पूर्वी पोर्तुगिजांच्या संगनमताने सावंतांनी बार्देश व्यापिले होते. कारण मराठे बार्देश घेतील अशी भीती पोर्तुगिजांना वाटल्याने त्यांनीच सावंतांना बार्देश घेण्यास सांगितले होते. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २ मे इ.स.१७३९ छत्रपती शाहू महाराजांचे सरदार व्यंकटराव घोरपडे व दादाजी भावे नरगुंदकर या दोघांनी गोव्याच्या पोर्तुगिजांच्या तहाच्या करारावर सह्या केल्याची नोंद! दादाजी भावे यांस पोर्तुगिजांकडून भरपूर लाच मिळाल्याने त्याने रायतूरच्या किल्ल्यावर हल्ला करण्यास चालढकल केली. नंतर मराठा सरदारांच्या डोळ्यास पाणी लावण्यासाठी लुटूपुटूचा हल्ला केला. पण त्यात दम नव्हता. दादाजी भावे व्यंकटराव घोरपडे आणि पोर्तुगीज आधिकारी यांच्यामधील तहाच्या वाटाघाटीचे एरंडाचे गुऱ्हाळ पुष्कळ दिवस चालले. व्यंकटराव यांचा दिवाण गोविंदपंत ठाकूर याने एक अट घातली की, पोर्तुगिजांनी त्यांच्या अमलाखालच्या हिंदुंकडून शेंडी कर वसूल करू नये व त्यांना त्यांनी संपूर्ण धर्मस्वातंत्र्य द्यावे. भावे यांचा दिवाण महादजी शेणवी याने "इंक्विझिशनच्या अधिकाऱ्यांनी हिंदूंच्या वाटेस जाऊ नये". अशी शर्त घातली. परंतू त्या दोन्हीही अटी पोर्तुगिजांनी मान्य केल्या नाहीत. त्यांनी सबब सांगितली की हा प्रश्न धार्मिक असल्याने त्यात ढवळाढवळ करण्याचा आपणास आधिकार नाही. व्यंकटराव घोरपडे आणि दादाजी भावे या दोघांनी पोर्तुगिजांकडून लाच घेतल्याने "ते त्यांचे मिंघे बनले होते. त्या दोघांनी तहाच्या करारावर दि. २ मे इ.स.१७३९ या दिवशी मुकाट्याने सह्या केल्या. लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही की ह्या लांछणास्पद करारावर छत्रपती शाहू महाराज यांनी शिक्कामोर्तब केले नाही. पोर्तुगिजांनी युद्ध नुकसानी म्हणून मराठ्यांना ७ लक्ष रुपये द्यावे अशी अट तहाच्या कलमात होती. ह्या रकमेपैकी एक लक्ष रुपये आपणा स्वतःला मिळण्याची व्यवस्था दादाजीने अगोदरच करून ठेवली होती. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २ मे इ.स.१८१८ त्र्यंबकेश्वरची शान असलेला 'नास्सक' हिरा दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी खडकीच्या लढाईत पराभव झाल्यानंतर नोव्हेंबर १८१७ पुणे सोडले अन् इंग्रजांपासून बचावासाठी त्यांची पळापळ सुरू झाली. पण ते इंग्रजांच्या तावडीत सापडले अन् पेन्शन घेऊन बिठूर येथे राहणे त्यांनी पसंत केले. १८१८ ला पेशवाईचा अस्थ झाला. त्यानंतर इंग्रजांनी पेशव्यांची संपत्ती ताब्यात घ्यायला व त्यांचे खजिने लुटायला सुरुवात केली. कॅप्टन ब्रिग्जला नाशिकच्या संपत्तीच्या शोधाची मोहीम हाती देण्यात आली. त्याने २ मे १८१८ च्या रात्री त्र्यंबकेश्वर लुटले. ही लूट डेक्कन प्राईज मनी अॅक्शन नुसार सैन्यांमध्ये वाटली गेली. मात्र, सोने व हिऱ्यांसारख्या वस्तू इंग्लंडला पाठविण्यात आल्या. यात नास्सक हिराही इंग्लंडला गेला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २ मे इ.स.१८४८ क्रांतीविर राघोजी भांगरेना ठाणे कारागृहात फाशी. या महान आदिवासी क्रांतिकारकाच्या १७३ व्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://youtube.com/shorts/edelcH3kEew?feature=share 📜 २ मे इ.स.१९२१ स्वातंत्र्यवीर सावरकरांची अंदमानच्या अंधार कोठडीतून दि.२ मे १९२१ रोजी सुटका झाली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀