⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳
📜 ८ मे इ.स.१६६३
( वैशाख शुद्ध द्वादशी, शके १५८५, संवत्सर शोभन, शुक्रवार )
शाहिस्तेखानवरती महाराजांचा छापा पडला. दि. ६ एप्रिल १६६३. यावेळी औरंगजेब बादशाह काश्मिरात श्रीनगर येथे होता. त्याला या मराठी छाप्याची बातमी दि. ८ मे १६६३ या दिवशी कळली. तो चकीतच झाला. चिडलाही. तो त्वरित दिल्लीस परतला. शाहिस्तेखानाची ही तीन वर्षांची मोहिम पूर्ण वाया गेली होती. तो विचार करीत होता. आता या शिवाचा बंदोबस्त कसा करावा ? प्रथम त्याने शाहिस्तेखान मामांना पत्र पाठविले की , ‘ तुमची बदली आसाम-बंगाल सरहद्दीवर ढाका या ठिकाणी करण्यात येत आहे. तरी ताबडतोब ढाक्याकडे रवाना व्हावे ‘ त्या काळी या भागात कोणाची बदली वा नेमणूक केली गेली तर ती एकप्रकारे बादशाहांची नाराजी आणि शिक्षाही समजली जात असे. हा बदलीचा हुकूम मिळाल्यावर खानाने औरंगजेबास एक नम्र पश्चातापाचे पत्र पाठवून विनंती केली की , मला एकवार पुन्हा संधी द्या. मी शिवाचा बिमोड करतो. (पण माझी ढाक्यास बदली करू नका.) पण बादशाहने पुन्हा जरा कडक शब्दांत खानास हुकूमावले की , ताबडतोब ढाक्यास रवाना व्हा.आता निरुपाय होता. दु:खी खान ढाक्याकडे रवाना झाला. याच काळात आसामच्या राज्यात लछित बडफुकन या नावाचा एक जबरदस्त सेनापती आसामच्या ओहोम राजघराण्याच्या पदरी होता. हा लछित आपल्या संताजी वा धनाजीसारखाच अचाट कर्तृत्त्वाचा सेनापती होता. आसामच्या या स्वतंत्र राज्याचे मोगलांशी सततच युद्ध चालू होते. लछितने तर दिल्लीला अगदी हैराण केले होते. या लछित बडफुकनला शाहिस्तेखान आता आसामवरती येणार असल्याच्या बातम्या मिळाल्या. दक्षिणेतील शिवाजीराजाने या खानाला फजित करून पिटाळला आहे हे लछितला तपशीलवार कळले असावे ; असे दिसते. ‘ बडफुकन ‘ या शब्दाचा अर्थ ‘ बडा सेनापती ‘ मुख्य सेनापती असा आहे. या लछितने शाहिस्तेखानाला एक पत्र पाठविल्याची नोंद , ‘ शाहिस्तेखानकी बुरंजी ‘ या नावाच्या एका आसामी बखरीत आहे. लछित या खानाला लिहितो आहे.
‘ अरे , तू दक्षिणेस गेला होतास. तेथे असलेल्या शिवाजीराजाने तुझी पार फजिती केली. तुझी बोटेच तोडली म्हणे! आता तू आमच्यावर चालून येतो आहेस. आता तुझे डोके सांभाळा ?
शिवाजीमहाराजांची करामत पार आसामपर्यंत त्याकाळी कशी पोहोचली होती याचे हे उदाहरण आहे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
#🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🗿शिवकालीन पुराणवस्तू
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtube.com/shorts/lq18N5sct60?feature=share
📜 ८ मे इ.स.१६६४
अजीजखान यांनी बालाघाट उतरून सुभेदार राहुजी पंडीतांवर चालून गेला. आदिलशहाने पुन्हा महाराजांविरुद्ध हालचाल सुरू केली. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विजापुराहून सेनापती अजीजखान ४ हजार घोडदळ व पायदळ घेऊन चौलपर्यंतचा मुलूख परत घेण्यासाठी कुडाळकडे निघाला. दि. ८ मे इ.स.१६६४ रोजी त्याचे सैन्य बालाघाटातून उतरून सुभेदार राहुजी पंडीतांवर चालून गेले. परंतु विजापुरी सैन्याच्या आगमनाची वार्ता कळताच राहुजी कुडाळ सोडून राजापुरला परतले व तेथे त्यांनी स्वसंरक्षणाची तयारी आरंभिली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ८ मे इ.स.१६७५
महाराजांनी फोंड्याचा किल्ला घेतला. फोंडा किल्ला घेतल्यामुळे फोंड्याच्या अंकीत असलेले तिसवाडी, चंद्रमहल, केले, बाल्ली आणि काणकोण हे आदिलशाही महाल महाराजांच्या अंमलाखाली आले. त्यानंतर महाराजांनी दक्षिणेकडे चाल करून, सांप्रतच्या कारवार प्रांतातील सिवेश्वर, कडवा, कद्रा, आणि अंकोला हा गंगावळी अथवा गंगावती नदीपर्यंतचा आदिलशाही प्रदेश काबीज केला. महाराजांनी फोंडे येथे आपला सुभेदार नेमला व दक्षिणेकडील प्रदेशाचा कारभार बघण्यासाठी बाल्ली येथे एक हवालदार नेमला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻
📜 ८ मे इ.स.१६८०
(वैशाख वद्य पंचमी, शके १६०२, रौद्र नाम संवत्सर, वार शनिवार)
गोव्याचा गव्हर्नर आंतोनियू पाईश द सांद यांनी कोकण प्राताचे सरसुभेदार रायाजी पंडीत यांस लिहीलेल्या पत्राची नोंद!
छत्रपती संभाजी महाराजांनी कोकणचे सरसुभेदार म्हणून आपली निवड केल्याचे पाहून खूप समाधान झाले. "महाराजांच्या महानिर्वाणाची बातमी कळताच मी आमच्या साष्टी प्रांताचा कॅप्टन जनरलला युद्ध बंद करण्याची आज्ञा दिली. हाच प्रकार फोंड्याच्या सरहद्दीवर सुद्धा आहे. युद्ध बंदीचा एकतर्फी निर्णय आम्ही घेत असून जो राजा आता सिंहासनावर येईल त्याने आमच्याशी युद्ध चालू ठेवावे की बंद करावे यासंबंधी निर्णय घेण्यासाठी आम्ही पाऊल उचलले आहे. भूतकाळाच्या गोष्टी विसरून जाऊन नवीन राजाशी, नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्याचा मी प्रयत्न करीत आहे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻
📜 ८ मे इ.स.१६८२
(वैशाख शुद्ध द्वादशी, शके १६०४, दुदुंभी संवत्सर, वार सोमवार)
सिद्दीची लुटालूट सुरूच!
छत्रपती संभाजी महाराजांनी सिद्दीला पायबंद घालण्यासाठी इंग्रजांबरोबर केवळ बोलणीच केली नाही. तर इंग्रजांशी जरबेचे बोलणे करून इंग्रजांची कोंडी करण्यास सुरुवात केली. याचा परिणाम म्हणून इंग्रजांनी सिद्दीशी बोलणे केले आणि एकंदर परिस्थितीचा आढावा इंग्रजांनी घेतला.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ८ मे इ.स.१६९९
मराठ्यांनी ८ मे १६९९ रोजी सिद्धगड काबिज केला व एक हजार पायदळ सैनिक व किल्ला चढून जाण्याची सामग्री (दोराच्या शिड्या वगैरे) माहुलीकडे पाठविली. बादशहाला हे कळताच त्याने माहुली किल्ला लढविण्याची कामगिरी कल्याण-भिवंडीचा ठाणेदार मातबरखान याजवर सोपविली. याच सुमारास अहमदनगर जिल्ह्यातील शेगांव परगण्यांतील खेडी मराठा सरदार हणमंतराव यांनी लुटली. त्याचे पारिपत्य तेथील मोगली फौजदार इल्तिफातखान याजकडे पथके नसल्यामुळे झाले
नाही.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ८ मे इ.स.१७०७
शंभूपुत्र छत्रपती थोरले शाहू महाराज मुगल कैदेतून स्वराज्यात परतले
छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येनंतर औरंगजेबाने जुल्फिकार खानास रायगड लढवण्यास पाठवून दिले.महाराणी येसूबाई राणीसाहेब यांनी तब्बल दहा महिने रायगड लढवला . रायगड वाचवण्यासाठी व स्वराज्यासाठी येसूबाई राणीसाहेबांनी वैधव्याचे दुःख सहन करत आटोकाट प्रयत्न करत केला. परंतु प्रचंड मोगली सैन्यापुढे येसूबाई राणीसाहेब यांना हार पत्करावी लागली व त्या आपल्या पुत्रासह मोगलांच्या स्वाधीन झाल्या.
औरंगजेबाच्या मृत्यू पूर्वी त्यांच्या मुलांना आपल्या भवितव्याचे वेध लागले होते.औरंगजेबाच्या महाराष्ट्रातील 27 वर्षाच्या प्रदिर्घ वास्तव्यानंतर अहमदनगर येथे निधन झाले. शहाजादा आजम याला आपल्या पित्याच्या मृत्युची बातमी समजताच तो अहमदनगरला आला व
स्वतःस बादशहा घोषित करून तो दिल्लीकडे जाण्यास तयार झाला. जाताना बरोबर येसूबाई राणीसाहेब व शाहुराजांना बरोबर घेण्यास तो विसरला नाही.झुल्फिकारखानाला बरोबर घेऊन त्याला संपूर्ण दक्षिणेचा मुख्य अधिकारी नेमले. येसूबाई व शाहू राजांची काळजी घेणारी झीनतबेगमही बरोबर होती.
पुढे बुर्हाणपुरजवळ मुक्काम पडला असता शाहूराजे व आझम यांची भेट झाली. आजमने पोषाख देऊन त्यांचा गौरव केला.छत्रपती शाहूला सोडण्याचे त्याच्या विचारात नव्हते. कारण मराठ्याचा राजा सोडून तो परत डोईजड होईल याची आजमला भिती होती. परंतु रजपूत सरदार ,काही मनसबदार, या सर्वांच्या मध्यस्थीने शाहुराजांना दोहरा येथून17 वर्षे 7 महिन्यानंतर कैद मुक्त केले गेले. यावेळी शाहूराजांची सुटका केल्यास मराठी राज्यात वारसासाठी भांडणे सुरू होतील ,हा सुज्ञ विचार करून आजमने छत्रपती शाहूंमहाराजांची सुटका केली होती. शाहूमहाराजांवर काही अटी घालण्यात आल्या. तुम्ही दिल्लीच्या बादशहाच्या अंकीत म्हणून राज्य करावे.तुमची आई ,भाऊ, व बायका यास आम्हापाशी ठेवावे. तसेच तुम्ही राज्यात बंदोबस्त करावा .बखेडा करणाऱ्या लोकांचे पारिपत्य करावे आणि बादशाही लक्षात ठेवून वागावे. इकडील मुलखास उपद्रव देऊ नये.तुम्ही याप्रमाणे वागता अशी खातरजमा झाली म्हणजे आम्ही दिल्लीस गेल्यावर व तेथे सिंहासनारूढ झाल्यावर तुमची माणसे तुम्हाकडे पाठवून देऊ
वरील ठरावाने शाहूराजे मोगलांचे मांडलिक होऊन मोगली मनसबदार म्हणून कैदेतून निसटले व 8 मे 1707 मधे ते महाराष्ट्राकडे वळले .परंतु येसूबाई राणीसाहेब मात्र यावेळी महाराष्ट्रापासून हजारो मैल महाराष्ट्रापासून दूर दिल्लीकडे गेल्या. कैदेत का होईना परंतु आत्तापर्यंत येसूबाईराणी मराठी राज्यात होत्या. आता मात्र दिल्लीसारख्या अत्यंत दूर परकीय राज्यात त्यांना पुढील काळ घालवायचा होता.छत्रपती शिवाजीराजांच्या वेळेपासून ते छत्रपती संभाजीराजांच्या मृत्यूपर्यंतच्या घटना त्यातील येसूबाई राणी यांचा सहभाग, त्यांच्या आयुष्यातील अनेक चढ-उतार यांचे एक महत्त्वाचे पर्व येथे संपले.
इकडे शाहूमहाराज महाराष्ट्रात परत आले .छत्रपती शिवाजीराजांच्या गादीचा वारस, त्यांचा नातू, छत्रपती संभाजीराजे व येसूबाई राणीसाहेब यांचा पुत्र असूनही शाहू महाराजांनी मोगलांच्या छावणीत कैदी म्हणून जीवन व्यतीत केले. औरंगजेबाच्या कैदेत असल्यामुळे मराठ्यांचे वारस म्हणून किंवा छत्रपती शिवाजीराजांच्या गादीचा वारस म्हणून त्यांना कोणत्याही प्रकारचे राजकीय शिक्षण मिळाले नव्हते.जोत्याजी केसरकर व येसूबाईराणीसाहेब यांच्या सहवासामुळे थोडेफार शिक्षण मिळाले तेवढेच काय ते. बाहेरच्या जगाचा कोणताही आणि कसलाही संबंध शाहुराजांना आला नाही. तरीही शाहू महाराजांनी मोठ्या हुशारीने मराठी सरदारांशी, मनसबदारांशी गुप्तपणे नाते जोडून संपर्क ठेवला होता .तब्बल 17 वर्षे 6 महिन्यांनी स्वराज्याचा खरा वारसदार मोगली कैदेतून सुटून महाराष्ट्रात परत आले.याच शंभूपुत्र छत्रपती थोरले शाहू महाराज यांनी तब्बल 42 वर्षे अत्यंत हुशारीने राज्यकारभारून करून आपल्या मातोश्री येसूबाई राणीसाहेब यांची 29 वर्षांनी मुगल कैदेतून सुटका करून घेतली.
https://youtube.com/shorts/lq18N5sct60?feature=share
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ८ मे इ.स.१८१७
इंग्रजांच्या फौजांनी ८ मे १८१७ रोजी सकाळी पुण्यास वेढा घातला. हे कळताच बाजीरावाने (दुसरे) इंग्रजाशी युद्ध पुकारण्याचा निश्चय केला. परंतु लागलीच इग्रजांकडे शरणागतीची याचना केली व त्रिंबकजी डेंगळेस पकडून देण्याबद्दल २ लाखाचे बक्षिस व गाव इनाम देण्याचे जाहीरनामे लावले. त्यावरच काम निभावले नाही. एलफिस्टनने बाजीरावाची भेट घेऊन नवीन तहाच्या कलमाची वाटाघाट केली. हा तह गव्हर्नर जनरलच्या हुकुमावरून पेशव्यांवर लादला गेला. त्यातील मुख्य मतलब म्हणजे महाराष्ट्राबाहेरील पेशव्यांचे ३४ लाख वसुलाचे सर्व प्रदेश इंग्रजांनी आपल्या कबजात घेतले आणि इतर मराठे सरदारांशी त्यांचा सबंध कायमचा तोडून लावला. तदनुसार बाजीरावाजवळ असलेले शिंदे, होळकर आदींचे वकिल पुण्यातून काढून बाहेर असलेले त्यांचे वकिल यास परत बोलवावे लागले. शेवटी हो ना करता दिनांक १३ जून १८१७ रोजी पेशव्यांने ह्या तहावर मोठ्या नाखुशीने सही केली. नंतर तो गव्हर्नर जनरलकडे पाठविण्यात येऊन दिनांक ५ जुलै १८१७ रोजी मंजूर होऊन आला. ह्या तहाने बाजीरावाचे राज्य जाऊन तो एक लहानसा संस्थानिक बनला.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀