अजित दादांची दुर्घटना खरोखरच दुर्देवी व महाराष्ट्राला हादरवून सोडणारी होती त्याला कोण दोषी होते की नव्हते पण या दुर्दवी घटनेला 50 टक्के महाराष्ट्र निवडणूक आयोग जबाबदार आहे. हो खरे आहे ते एका पाठोपाठ निवडणुका लावल्या प्रथम विधानसभा नंतर नगरपालिका नंतर महानगर पालिका नंतर जिल्हा परिषद त्यामुळे झाले काय की जे प्रमुख नेते आहेत देवा भाऊ, अजित दादा, पवार साहेब, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, प्रकाश आंबेडकर, वेळ कमी धावपळ जास्त त्यामुळे वेळ वाचविण्याकरिता विमान , छोटे विमान, हेलिकॉप्टर यांचा जास्तीत जास्त वापर झाला . देवा भाऊ चे हेलिकॉप्टर चार पाच वेळा खराब झाले होते आता नुकतेच पंकजा ताई चे हेलिकॉप्टर खराब झाले होते. एक नेशन एक निवडणूक म्हणणारे निवडणूक आयोग महानगर पालिका व नगर पालिका यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकले असते. यापुढे जे प्रमुख नेते आहे त्यांनी प्रत्येक ठिकाणी न जाता जबाबदारी विभागून द्यावी जसे देवा भाऊ ने प्रत्येक ठिकाणी न जाता महाजन, रविंद्र चव्हाण यांना पाठवावे. तसेच एकनाथ शिंदे यांनी श्रीकांत शिंदे, सावंत यांना जबाबदारी विभागून द्यावी तसेच उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे, राऊत यांना जबाबदारी विभागून द्यावी तसेच बाकीच्या पक्षांच्या नेत्यांनी ही करावे. #🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎 #🏛️राजकारण #😇माझे अनमोल विचार✍