Follow
-Kalpana K
@300228307
35,379
Posts
91,860
Followers
-Kalpana K
307 views
1 hours ago
#🙏श्री महालक्ष्मी वैशाख कृष्ण षष्ठी श्री करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवी ची आजची अलंकार पुजा 8/5/26
-Kalpana K
581 views
13 hours ago
#🌺गणपती 🍁 *श्री सिध्दिविनायक प्रसन्न!!*🍁 *श्री सिध्दिविनायक गणपती मंदिर न्यास* 🛕 🙏 *आजचे शुभ दर्शन* 🛕 🙏 *शुक्रवार दिनांक ०८ मे २०२६* *🙏।।श्री गणेशाय नमः।।🙏* *वक्रतुण्ड महाकाय सूर्य कोटी समप्रभ |* *निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा ||* 🌹 *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा* 🌹 🍁 *ॐ गं गणपतये नमः* 🍁 🛕 *बाप्पा सर्वाना सुख, समृद्धी,निरोगी व भरभराटी देऊन आनंदात ठेवा*🛕 🚩🚩🚩 *जय गणेश*🚩🚩🚩 🏮🏮🏮🛕🏮🏮🏮 *🌺शुभ सकाळ*🌺
-Kalpana K
605 views
23 hours ago
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🌻आध्यात्म 🙏 #✍️भक्ती संदेश #💐संत महंत🙏 मित्रानो कुरवपूर हे परमात्मा श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंचे तपस्या स्थान आहे, हे सर्वांनाच माहित आहे. तसेच श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत मध्येही त्याचा उल्लेख आढळतो. पण कधी आपण असा विचार केला आहे का की, परमात्म्याला तपस्या करण्याची आवश्यकता का भासली? श्रीपाद श्रीवल्लभ हे भगवान दत्तात्रेय यांचे प्रथम अवतार मानले जातात, म्हणजे ते स्वतःही परमात्मस्वरूपच होते. मग त्यांनी तपस्या का केली....?यामागे एक अत्यंत गूढ आणि सूक्ष्म आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे जेव्हा भगवान दत्तात्रेयांनी या सृष्टीची निर्मिती केली,त्या वेळी श्रीपाद श्रीवल्लभ हे शक्तीरूपाने त्यांच्यामध्ये विराजमान होते. म्हणजेच सृष्टी निर्माण करण्यासाठी जी दिव्य शक्ती कार्यरत होती, तीच शक्ती “श्रीपाद श्रीवल्लभ” या स्वरूपात प्रकट झाली होती. त्यामुळे जरी भगवान दत्तात्रेय आणि श्रीपाद श्रीवल्लभ यांनी वेगवेगळ्या कालखंडात अवतार घेतले असले, तरी त्यांच्या तत्त्वात कोणताही भेद नाही. म्हणूनच श्रीपाद प्रभू म्हणतात मीच दत्तात्रेय आहे आणि माझ्याशिवाय या सृष्टीची निर्मिती होऊ शकत नाही परंतु मग प्रश्न उरतो परमात्म्याने तपस्या का केली? कुरवपूर येथे श्रीपाद श्रीवल्लभांनी केलेली तपस्या ही केवळ स्वतःच्या सिद्धीसाठी नव्हती,तर संपूर्ण सृष्टीच्या कल्याणासाठी होती. कलियुग हे अधर्म, विकार, लोभ, स्वार्थ, हिंसा आणि अशांततेचे युग आहे. जेव्हा मनुष्य चुकीच्या विचारांनी आणि कर्मांनी भरकटतो, तेव्हा त्याचा परिणाम केवळ त्याच्यावर होत नाही, तर संपूर्ण वातावरणावर होतो.मनुष्याच्या अशुद्ध विचारांमुळे आणि अधार्मिक वर्तनामुळे वायुमंडल दूषित होते. त्या दूषित ऊर्जेचा परिणाम पंचमहाभूतांवर पृथ्वी,जल,अग्नी,वायु आणि आकाश यांच्यावरही होतो आणि जेव्हा ही पंचतत्त्वे असंतुलित होतात, तेव्हा निसर्ग आपले रौद्र रूप दाखवू लागतो. अतिवृष्टी, दुष्काळ, भूकंप, चक्रीवादळे, रोगराई आणि अनेक संकटे निर्माण होतात अशा काळात श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंनी कुरवपूरमध्ये बसून तपश्चर्या केली. त्या तपस्येचा उद्देश होता पंचतत्त्वांना शांत करणे,वायुमंडल शुद्ध करणे,सृष्टीमध्ये सात्त्विक ऊर्जा निर्माण करणे आणि जीवसृष्टीचे रक्षण करणे त्या दिव्य तपशक्तीमुळेच आजही या घोर कलियुगात पृथ्वीवर जीवन सुरळीत चालू आहे ऋतू बदलतात, पाऊस पडतो,शेतीमध्ये धान्य उगवते आणि निसर्गाचे संतुलन काही प्रमाणात टिकून आहे. हे सर्व त्या दिव्य तपस्येच्या प्रभावामुळेच आहे,परंतु आज मनुष्यामध्ये वाढणारा स्वार्थ, लोभ, क्रोध, हिंसा आणि भक्तीचा अभाव यांमुळे ती सात्त्विक ऊर्जा कमी होत चालली आहे. म्हणूनच प्रत्येक भक्ताने केवळ कुरवपूरला जाऊन दर्शन घेणे पुरेसे नाही, तर आपल्या जीवनातही तप, संयम, सदाचार आणि भक्ती यांचा स्वीकार करणे आवश्यक आहे कारण परमात्म्याने सुरू केलेले कार्य पुढे नेण्याची जबाबदारी आता भक्तांवर आहे. ॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
-Kalpana K
2.6K views
1 days ago
#🙏श्री महालक्ष्मी वैशाख कृष्ण पंचमी श्री करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवी ची आजची अलंकार पुजा 7/4/26