Follow
❤🚩शिवभक्त🚩❤
@mangesh5663
2,153
Posts
12,474
Followers
❤🚩शिवभक्त🚩❤
2K views
21 hours ago
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल* *इतिहास शिवरायांचा* ********************************** *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *१३ एप्रिल इ.स.१६६३* *(चैत्र वद्य प्रतिपदा, शके १५८५, संवत्सर शोभन, वार सोमवार)* *महाराज कुडाळ मोहिमेसाठी किल्ले राजगडावरून रवाना झाले.* *महाराज मोहिमेसाठी कुठेही आणि कधीही वेळ दवडत नसत. अफजलखानाचा (३२ दाताच्या राक्षसी बोकडाच्या) कोथळा बाहेर काढून त्याला यमसदनी धाडल्यानंतर पुढील महिनाभर महाराजांनी आदिलशाहीवर मोहिमा काढून आदिलशाहीस सळो की पळो करून सोडले. आजही महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे तोडल्यावर कुठलाही उत्सव साजरा न करता आठवडाभरातच नव्या मोहिमेची आखणी केली. ४ हजार घोडदळ, आणि १० हजार पायदळासह महाराज राजापुर मार्गे कुडाळ मोहिमेसाठी वेंगुर्ला भागाकडे निघाले. मात्र महाराजांच्या आगमनाच्या भितीमुळे पोर्तुगिजांची चांगलीच धावपळ झाली. डिचोली आणि साखळीचे हवालदार महाराजांच्या स्वारीच्या भयाने पळून गेले. महाराज मात्र, राजापुरास जाऊन तीरथे राहुजी सोमनाथ यांना सोबत घेऊन कुडाळसाठी पुढे निघून गेले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१३ एप्रिल इ.स.१६६५* *दिलेरखानाने मोठ्या जिद्दीने अबदुल्लाखान, फतेलष्कर आणि हाहेली ह्या तोफा टेकड्यांवर चढवल्या. दि. १३ एप्रिल १६६५ ला मध्यान्हीं दिलेरखानाने या वज्रगडावर निर्णायक आक्रमण केले. शेवटी तोफांच्या माऱ्याने वज्रगड ढासळू लागला व मावळ्यांना आतल्या बाजला जावे लागले. संध्याकाळपर्यंत मुरारबाजीच्या मूठभर मावळ्यांनी निकराने युद्ध केले पण संख्याबळ व सामग्री यांच्या समोर त्याचें काही न चालून त्यांना शेवटी शस्त्र खाली ठेवावे लागले. ८० लोकांचे बळी देऊन व १०९ लोकांच्या जखमांकडे पाहत दिलेरखानाने वज्रगड जिंकला आणि मोगली ध्वज फडकू लागला. शरण आलेल्या मावळ्यांना निशस्त्र केले गेले पण त्यांना जयसिंगाने अभयदान दिले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१३ एप्रिल इ.स.१७००* *छत्रपती राजारामराजे जाऊन महिना होऊन गेला तरी बादशाहस अजिंक्यतारा काही दाद देत नव्हता. १३ एप्रिलच्या पहाटे मोगलांनि किल्ल्याच्या तटाखाली दोन भुयारे खणली. आणि त्यात सुरुंग पेरून त्यांस बत्ती लाविली. एक सुरुंग फुटला आणि अनेक मराठे त्या खाली गाडले गेले, खुद्द प्रयागजी सुद्धा ढीगाऱ्यात अडकले पण सुदैवाने ते बचावले. तट फुट्ल्याचा आनंदात मोगल वर चढून येऊ लागले, अनेक मोगल किल्ल्यात घुसले. तेवढ्यात अचानक दुसरा सुरुंग उडाला आणि तट चढ़णारे हजारो मोगल त्या खाली गाढले गेले. कित्येक मोगल तर उंच फेकले गेले. आधीच आत आलेल्या मोगली सैन्यावर आता प्रयागजी आणि त्यांचे मराठे तुटून पडले आणि त्यांना साफ़ कापून काढले. गडावरच्या मुठभर मराठ्यांच्या मदतीने प्रयागजींनी तब्बल साडेचार महीने औरंगजेबाशी झुंज दिली आणि अखेर गडावरचा दाणागोटा, दारुगोळा संपला, तेव्हा गडावरच्या मराठ्यानी २१ एप्रिल १७०० रोजी शरणागती पत्करली.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१३ एप्रिल इ.स.१७३१* *छत्रपती शाहू महाराज व छत्रपती संभाजीराजे कोल्हापूरकर यांचेमध्ये दि.१३ एप्रिल १७३१ रोजी तह झाला. हाच तह "वारणेचा तह" म्हणून ओळखला जातो. या तहामध्ये एकूण नऊ कलमे आहेत. ती पुढीलप्रमाणे :* *"तहनामा चिरंजीव राजेश्री संभाजीराजे यांसी प्रती शाहूराजे यांनी लिहून दिले सुll* *१) इलाखा वारुण महाल तहत संगम दक्षिणतीर कुल दुतर्फा मुलुख दरोबस्त देखील व किल्ले तुम्हास दिले असत.* *२) तुंगभद्रेपासून तहत रामेश्वरदेखील निम्मे आम्हाकडे ठेऊन तुम्हाकडे करार दिला असे.* *३) किल्ले कोप्पल तुम्हाकडे दिला. त्याचा मोबदला तुम्ही रत्नागिरी आम्हाला दिला.* *४) वडगावचे ठाणे पाडून टाकावे.* *५) तुम्हाशी जे वैर करतील त्यांचे पारिपत्य आम्ही करावे. आम्हासी जे वैर करतील त्यांचे पारिपत्य तुम्ही करावे. तुम्ही आम्ही एकविचारे राज्यभिवृद्धी करावी.* *६) वारणा व कृष्णेच्या संगमापासून दक्षिणतीर तहद निवृत्तीसंगम तुंगभद्रेपावेतो दरोबस्त देखील गड ठाणी तुम्हांकडे दिली असत.* *७) कोकण प्रांत साळशीपलीकडे तहद पंचमहाल अंकोलेपावेतो दरोबस्त तुम्हांस दिली असत.* *८) इकडील चाकर तुम्ही ठेवू नये. तुम्हाकडील चाकर आम्ही ठेवू नये.* *९) मिरज प्रांत, विजापूर प्रांताची ठाणी देखील अथणी, तासगाव वगैरे आमचे स्वाधीन करावी.* *एकूण कलमे नऊ करार करुन तहनामा दिला असे. सदरहूप्रमाणे आम्ही चालू. यास अंतराय होणार नाही."* *या कराराप्रमाणे सर्वच गोष्टी पुढे प्रत्यक्षात आल्या असे नाही. कलम एक व दोननुसार संपूर्ण दक्षिण व तुंगभद्रेपर्यंतचा प्रदेश संभाजीराजेंस मिळाला मात्र तुंगभद्रेच्या पलीकडे शाहू महाराज व पेशव्यांच्या अनेक मोहिमा झाल्या. त्यामध्ये संभाजीराजेंनी सहभाग घेतला नाही. कलम तीन व चार पूर्णतः पाळले गेले. कलम पाचसुद्धा सामान्यतः पाळले गेले. कलम सहाप्रमाणे असणारा संभाजीराजेंचा मुलुख सोडून उर्वरीत काहीसा मुलुख शाहू महाराज व पेशव्यांनी जिंकून घेतला. त्यातील हिस्सा संभाजीराजेंना दिला नाही. कलम सात पूर्णतः पाळला गेला नाही. कलम आठ काही अंशी पाळला गेला. कलम नऊप्रमाणे मिरज, अथणी तासगाव वगैरे भाग संभाजीराजेंनी शाहू महाराजांच्या स्वाधीन केला नाही.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१३ एप्रिल इ.स.१७३९* *सावंतांनी गोव्याच्या जनरलला पाठविलेल्या पत्राची नोंद!* *पोर्तुगिजांच्या संगनमताने सावंतांनी बार्देश व्यापिले होते, कारण मराठे बार्देश घेतील अशी भीती पोर्तुगिजांना वाटल्याने, पोर्तुगिजांनीच सावंतांना बार्देश घेण्यास सांगितले होते. ह्या संदर्भात जयराम सावंत व रामचंद्र सावंत या दोघांनी गोव्याच्या गव्हर्नर जनरलला पाठविलेले पत्र बोलके आहे. त्यात ते दोघे म्हणतात, "व्यंकटराव यांची फौज वरघाटी जाईस्तोवर बार्देश आम्हाकडे असावा, तद्नंतर ते तुमचे स्वाधीन करू".* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१३ एप्रिल इ.स.१९१९* *जालियनवाला बाग हत्याकांड* *जालियनवाला बाग हत्याकांडाच्या उल्लेखाने आजही भारतीयांचे रक्त सळसळते. निशस्त्र शेतक-यांवर ब्रिटिशांनी अमानुष हल्ला केला होता, या घटनेने आजही अंगावर काटा उभा राहतो.* *जालियनवाला बाग येथे १३ एप्रिल १९१९ रोजी ब्रिटिश राजवटीविरुद्ध झालेल्या निदर्शनाला १५ ते २० हजार नागरिक जमले होते. जेव्हा नेते भाषण करत होते तेव्हा, ब्रिगेडीअर जनरल रेजीनॉल्ड डायर सैनिकांसह तिथे दाखल झाला. त्या सर्वांच्या हातात रायफल होत्या. शांत आणि निशस्त्र लोकांवर शस्त्र चालवले जाणार नाही अशी नेत्यांची भाबडी आशा पुढच्या काही क्षणात धुळीस मिळाली. ब्रिगेडियर जनरल रेनाल्ड डायर याने ५० बंदुकधारी शिपायांना या नागरिकांवर गोळीबार करण्याचा आदेश दिला होता. सैनिकांनी बागेला चारही बाजूने वेढा टाकला आणि कोणतीही पूर्व सुचना न देता बंदूकीच्या फैरी झाडण्यास सुरुवात केली. डायर याने दहा मिनिटे गोळीबार सुरूच ठेवण्यास सांगितले होते. बंदुकीतील गोळ्या संपल्यानंतर हा गोळीबार बंद करण्यात आला. यावेळी बंदुकांच्या सुमारे १६५० फैरी झाडण्यात आल्या आणि यात सुमारे एक हजार निष्पाप नागरिक बळी गेले तर एक हजार १०० जण जखमी झाले होते. हा आकडा विविध ठिकाणी कमी अधिक दिसतो, मात्र त्यामुळे घटनेचे महत्व आणि क्रूरता कमी होत नाही.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* ⛳ *जय गडकोट*⛳ *!! हर हर महादेव !!* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री मंगेश चंद्रकांत वीर* ( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख ) मा श्री महेंद्र तानाजी देवघरे* ( अध्यक्ष पुणे जिल्हा ) मा श्री योगेशजी सुदामराव शेलार (प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🙏 शिवराय स्टेटस
❤🚩शिवभक्त🚩❤
2.5K views
1 days ago
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल* *इतिहास शिवरायांचा* ********************************** *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *१२ एप्रिल इ.स.१६६३* *शाहिस्तेखानावरील छाप्याच्या संदर्भात काहीशी माहिती मिळते ती इंग्रजी पत्रात. ती माहिती पुढीलप्रमाणे आहे :* *त्यांत छत्रपती शिवाजी महाराज ४०० निवडक लोकांसह जातीने शाइस्तेखानाच्या तळावर गेला त्याची हकीकत आहे. कांही बहाणा करून ते सलाम करण्यासाठी म्हणून शाइस्तेखानाच्या तंबूंत गेले. आणि लगेच पहारा साफ मारून, शाइस्तेखानाचा वडील मुलगा, त्याचा जावई, त्याच्या १२ बिब्या, ४० मोठे दरकदार, मोंगलांचा सेनापती, इत्क्यांचे प्राण हरण करून खुद्द शाइस्तेखानाला आपल्या स्वतःच्या हाताने जखम करून त्याच्या आणखी ६ बायका, आणि दोन मुलगे, छत्रपती शिवाजीने ठार केले. या सगळ्या भानगडीत त्याचे फक्त ६ सैनिक मेले आणि ४० जखमी झाले ! १० हजार घोडेस्वारांचा अधिपती राजा जसवंतसिंग समीप असून पाठलाग न करितां स्तब्ध राहिला. यावरून त्याचे यांत अंग होते असे सगळ्यांना वाटते.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१२ एप्रिल इ.स.१६६५* *पुरंदरचा रणसंग्राम - वज्रगडाचा बुरुज ढासळला* *पुरंदरावर तोफ वरती नेत असताना तिकडे गडावरून मराठे शर्थीने लढतच होते, अग्नीवर्षाव करीतचं होते. पुरंदर शर्थीने लढतच होता. पण मोगलही चहूबाजूंनी भिडलेले होते. त्यांचाही किल्ल्यावर मारा सुरूच होता. त्यात आता अशा बलाढ्य तोफा त्यांना येऊन मिळाल्या, आणि या तोफांच्या माऱ्यात वज्रगडाचा एक बुरुज ढासळलाचं ती तारीख होती १२ एप्रिल १६६५....* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१२ एप्रिल इ.स.१६७३* *(वैशाख शुद्ध षष्ठी, शके १५९५, संवत्सर प्रमादी, वार शनिवार)* *महाराज पन्हाळगड मुक्कामी!* *सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी धर्मवाट देऊन बेहलोलखानास सोडून दिल्याची वार्ता महाराजांना कळली होती. त्यामुळे महाराजांनी सरसेनापती प्रतापराव गुजर यांची चांगलीच कानउघाडणी केली होती. त्यामुळे सरसेनापती प्रतापराव गुजर स्वराज्यात न जाता अथणी आणि हुबळीच्या रोखाने दौडू लागले. हुबळीची लुट करून सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी अथणीवर धाड टाकली. कारवार प्रांतात सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी मांडलेली धुम पाहून बेहलोलखानाने कोल्हापूर भागात सैन्यांची जमवाजमव करून सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्यावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे लक्ष विचलित करण्याचा हा प्रकार होता. मात्र याच वेळी महाराज खुद्द पन्हाळगडावर मुक्कामी असल्याची वार्ता बेहलोलखानाच्या कानी गेली. त्याचबरोबर पावसाळाही जवळ असल्याने बेहलोलखानाने इथे फारशी हालचाल केली नाही.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१२ एप्रिल इ.स.१६८३* *व्हिसेरेई कौंट द आल्वोर याने औरंगजेब बादशहास पाठविलेल्या पत्राचा आशय!* *"आपल्या प्रजेला उपद्रव देणार्‍या छत्रपती संभाजी महाराजांस शासन करण्यासाठी आपण युवराज अहमद आझमशहा यांना मोठे सैन्य देऊन इकडे पाठविले आहे व नबाब कर्नलखान हेही मोठे आरमार घेऊन येत आहेत हे आपल्या पत्रावरून कळते. आपण माझ्याकडे मागणी केली आहे की, आपल्या पुरवठ्याच्या नौकांना मी आमच्या आरमारी जहाजांचे संरक्षण द्यावे व छत्रपती संभाजी महाराजांचे निर्दालन करण्यासाठी आपले जे सरदार इकडे येत आहेत त्यांना मदत करावी. एक काब्रा घोडा आणि टेहाळणीच्या ६ तोफा आपण मला नजराण्यादाखल पाठविल्या आहेत. मोठ्या प्रेमाने पाठविलेल्या ह्या नजराण्याची मला अप्रुकता वाटते.""आपले पत्र येण्यापूर्वी माझे स्वामी पोर्तुगालचे महाराज यांनी मला पत्र पाठवून आपणास मदत करण्याची आज्ञा केली होती. त्या आज्ञेस अनुसरून मी आमच्या उत्तरेकडील प्रदेशाचे कॅप्टन जनरल तसेच चौल, वसई आणि दमण या तिन्ही कॅप्टनना पत्रे पाठवून आपल्या सैन्याला आमच्या ठाण्याच्या हद्दीतून वाट देण्यास व ह्या सैन्याला आमच्या राज्यात जीवनोपयोगी वस्तू खरेदी करण्यास परवानगी देण्याबाबत लिहिले होते. तसेच आपल्या नौकांना आमच्या नद्यांतून वाहतूक करू देण्यासाठी आमच्या अधिकार्‍यांना सुचना पाठविल्या होत्या. शिवाय आपल्या आरमाराच्या सामोरा जाण्यासाठी दारुगोळ्याने भरलेल्या ६ नौकांना हुकूम केला होता". औरंगजेब बादशहाचा एक दुत वाटाघाटी करण्यासाठी गोव्यास आला तेव्हा व्हिसेरेई त्याला म्हणाला होता की, छत्रपती संभाजी महाराजांशी पोर्तुगीजांचा तह झाल्याने त्याचा भंग होण्यासारखे क्रृत्य आपण होऊ देणार नाही. परंतु वरील पत्र वाचल्यावर छत्रपती संभाजी महाराजांशी असलेल्या तहास हरताळ फासून पोर्तुगिजांनी मोगलांना मदत केल्याचे दिसून येते. गोव्याचे पोर्तुगीज हे छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब बादशहा या दोघांना खूश ठेवण्याचे संधिसाधूपणाचे राजकारण कसे खेळत होते त्याचा प्रत्यय व्हिसेरेई कौंट द आल्वोर याने औरंगजेब बादशहाला पाठविलेल्या वरील पत्रावरून येतो.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१२ एप्रिल इ.स.१६८९* *छत्रपती राजाराम महाराजांनी कोकणचा सरदार कृष्णाजी गोळे यांना १२ एप्रिल १६८९ रोजी पत्र लिहिले होते. त्या पत्रामध्ये छत्रपतींनी गोळे यांना असे आवाहन केले होते की, “सरदार गोळे यांना आपल्या अनुयायांसहित चरितार्थाकरता योग्य ती व्यवस्था इनाम गांवे जोडून केली जाईल. छत्रपती राजाराम महाराजांनी स्वीकारलेली इनामांची ही पद्धती त्यांना आपले मराठे सरदार, सैनिक राखण्यासाठी निश्चित सहाय्यकारी झाली. हे औरंगजेबाच्या कानी येताच त्याने मोगल अधिकाऱ्यांकरवी त्यात गोळे कुटुंबातील चार सदस्यांना आदेश कळविले की, मोगल बादशहाची निष्ठेने सेवा करण्याची अट पाळण्यास जर ते (सरदार गोळे) तयार असतील तर बादशहा त्यांना चार गांवे इनाम देऊन सातगावांची जहागीरही देतील जी निरंतर त्यांना उपभोगावयास मिळेल. परंतु देवदयेने ह्या मसलतीमध्ये रामचंद्रपंत अमात्यांच्या प्रयत्नास यश आले. गोळे स्वराज्यातच राहिले आणि मोगल बादशहाने रंगवलेली भवितव्याची स्वप्ने भंग पावली. गोळे घराणे हे नेहमीच हिंदवी स्वराज्याच्या सेवेशी एकनिष्ठ होते.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१२ एप्रिल इ.स.१७०३* *मुघल फौजांनी सिंहगडावर तोफांचा मारा सुरू केला , त्यात औरंगजेबाने स्वतः जातीने हजर राहून सिंहगड जिंकून घेतला. पण फक्त ३ वर्षेच किल्ला मुघलांच्या ताब्यात राहिला .. १७०६ मध्ये मराठ्यांनी पुन्हा सिंहगड जिंकला आणि सिंहगड शेकडो वर्ष मराठ्यांकडेच राहिला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१२ एप्रिल इ.स.१७३७* *मराठ्यांनी धारावी बेटावर हल्ला केला आणि घाईघाईत धारावी किल्ला बांधायला घेतला. त्यासाठी २२०० माणसांना रोज ५/- रुपये याप्रमाणे ११०००/- रुपये किल्ला बांधण्यसाठी मागणी करणारे शंकरजी केशव यांनी चिमाजी अप्पांना लिहलेले पत्र उपलब्ध आहे. पोर्तुगिजांना मराठ्यांच्या किल्ला बांधण्याची बातमी लगेच कळली व पुढील धोका ओळखून त्यांनी हल्ला करुन धारावी बेट व अर्धवट बांधकाम झालेला किल्ला ताब्यात घेतला आणि किल्ला बांधून पुर्ण केला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१२ एप्रिल इ.स.१७५२* *१७५२ साल हे मराठ्यांच्या राजकारणाच्या दृष्टीने फार महत्वाचे होते.* *१२ एप्रिल १७५२ रोजी सफदरजंगाने बादशहाच्या वतीने मराठी सरदारांशी करार (अहमदनामा) केला. त्यानुसार इथल्या व परकीय आक्रमणांपासून मोगल बादशहाचे रक्षण करण्याची जबाबदारी पेश्व्यावर पडली.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* ⛳ *जय गडकोट*⛳ *!! हर हर महादेव !!* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री मंगेश चंद्रकांत वीर* ( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख ) मा श्री महेंद्र तानाजी देवघरे* ( अध्यक्ष पुणे जिल्हा ) मा श्री योगेशजी सुदामराव शेलार (प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🙏 शिवराय स्टेटस #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
❤🚩शिवभक्त🚩❤
2K views
3 days ago
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल* *इतिहास शिवरायांचा* ********************************** *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *१० एप्रिल इ.स.१६६०* *किल्ले पन्हाळगडास सिद्धि जोहरच्या वेढ्यात इंग्रज सामील* *१० एप्रिल १६६० आदिलशाहीचा सरदार सिद्धि जोहर, सिद्धि मसूद आणि फाजल खानाने किल्ले पन्हाळ्याला चौफेर वेढा दिला होता. परंतु जोहरची कोणतीही तोफ गडाच्या अंगाला स्पर्श करू शकत नव्हती.मार्याच्या टप्यात पुढे सरकावे तर गडावरुन बंदूकी,तोफा आणि बाणांचा वार्षावाला सामोरे जाणे शक्य नव्हते. आणि एक दिवस तटाच्या रोखाने तोफेचा गोळा तटाच्या भिंतीवर धडकला. प्रचंड आवाज आणि हादरा, ही शिवछत्रपतींना आश्चर्याची आणि संतापाची ठीणगी होती. तटावरुन महाराजांनी वेढ्यातील छावनीचे निरीक्षण करताच शिवछत्रपतींना दिसली टोपीकर इंग्रजांची धूर्त बेईमानी तोफ आणि यूनियन जॅक झेंडे... दिड महिन्यांपूर्वी ज्या हेन्री रीव्हिंग्टन वर मेहेरबानी केली तोच कृतघ्न इंग्रज स्वराज्यावर आक्रमण करायला परक्याला परका सामील झाला होता.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१० एप्रिल इ.स.१६९३* *१६८९ मध्ये राजधानी रायगड मुघलांच्या ताब्यात गेल्यावर मराठ्यांचे तिसरे छत्रपति राजाराम महाराज 'जिंजी' (सध्या तामिळनाडू मध्ये) येथे गेले होते. तेथेच त्यांनी स्वतःला राजाभिषेक करवून घेतला आणि राज्याची सूत्र काही काळासाठी त्यांनी तिकडून पाहिली. ह्या दरम्यान १० एप्रिल १६९३ रोजी त्यांनी तंजावर गादीचे शहाजीराजे (दुसरे) यांची भेट घेतली.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१० एप्रिल इ.स.१६९८* *छत्रपती राजाराम महाराज दक्षिण कोकणातील गड कोटांच्या मोहिमे वर गेले. ह्या मोहिमेचा उद्देश म्हणजे आगामी लढ्यची पूर्व तयारी म्हणून गडकोटांवरील फौज,रसद, शस्त्रास्त्रे-दारुगोळा ह्या बाबी मजबूत करून त्यांना सज्ज करणे.ही मोहीम आटपून महाराज प्रतापगड - विशाळगड-सज्जनगड करत साताऱ्यास जुलै १६९८ मध्ये आले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१० एप्रिल इ.स.१७०३* *सिंहगडचा रणसंग्राम* *एप्रिलला सेनापती धनाजी जाधवांचा पुत्र शम्भूसिंह जाधवने म्हलर्जी व खंडोजी च्या सोबतीने ४ हजार घोडदळ सकट इराडत खानाच्या ठाण्यावर हल्ला केला. हे ठाणे बादशाही छावणीच्या रक्षणाच्या हेतूने छावणी पासून केवळ ४ कोस दूर होते व माघारी जाता जाता आखरपूर इथून छावणी कडे येणारी रसद ही १० एप्रिल ला लुटली.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१० एप्रिल इ.स.१७५८* *सरदार मानाजी पायगुडेंचा पराक्रम* *सन १७५८ मध्ये मराठ्यांनी सरहिंद, लाहोर, जिंकले. अहमदशहा अब्दालीचा मुलगा तैमुर आणी सरदार जहानखान यांनी लाहोर सोडून पळ काढला. परंतु त्यांच्याजवळील अवजड तोफखाना व खजिना आणी दिल्ल्तीतील लुटीचा खाजींना त्यांनी तेथेच सोडून दिला. जाताना मात्र तैमुर ने आपला गुलाम तहमासखान यास गुलामगिरीतून मुक्त केले होते. तहमासखानाने मुक्त झाल्यामुळे लाहोरच्या वेशीचे दरवाजे उघडले. याच दरम्यान मराठा सरदार वीर मानाजी पायगुडे यांनी १० एप्रिल १७५८ रोजी लाहोरमध्ये पहिले पाउल टाकले. लाहोरमध्ये निधड्या छातीने पाउल टाकणारे ते पहिले मराठा शूर सरदार होते. तहमासखानाने आपल्या आत्मचरित्ररुपी तहमासनामा या ग्रंथात हि घटना स्पष्टपणे लिहून ठेवली आहे.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१० एप्रिल इ.स.१८१८* *छत्रपती प्रतापसिंह महाराजांची साताऱ्याच्या गादीवर इंग्रजांकडून पुनःप्रतीष्ठापणा* *१० एप्रिल १८१८ ला प्रतापसिंह यांची सातारा राज्याच्या गादीवर पुनःस्थापना झाली तरी त्यांचा ब्रिटिशांबरोबर तह २५ सप्टेंबर १८१९ मध्ये झाला. कारण तोपर्यंत बाजीराव इंग्रजांना शरण आला नव्हता व त्याचा पूर्ण बंदोबस्त केल्यावरच इंग्रज सातारच्या महाराजांकडे लक्ष देणार होते. कंपनी सरकारतर्फे जेम्स ग्रांट तर महाराजांतर्फे त्यांचा मुखत्यार-पॉवर ऑफ अटर्नी-विठ्ठल बल्लाळ फडणीस ने सह्या केल्या. जेम्स ग्रांट ने राज्यकारभाराच्या दृष्टीने परिपूर्ण सातारा राज्य ५ एप्रिल १८२२ महाराजांच्या हाती सोपविले. हे राज्य त्यानंतर सुमारे २६ वर्षे अस्तित्वात राहिले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* ⛳ *जय गडकोट*⛳ *!! हर हर महादेव !!* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री मंगेश चंद्रकांत वीर* ( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख ) मा श्री महेंद्र तानाजी देवघरे* ( अध्यक्ष पुणे जिल्हा ) मा श्री योगेशजी सुदामराव शेलार (प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🙏 शिवराय स्टेटस
❤🚩शिवभक्त🚩❤
2.7K views
4 days ago
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल* *इतिहास शिवरायांचा* ********************************** *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *ৎ एप्रिल इ.स.१६३३* *स्वतः शहाजी राजे यांचा सहभाग असलेल्या लढाईत मोघल बादशहा शाहजहानच्या फौजांनी निजामशाही विरुद्ध त्यांच्या देवगिरी किल्ल्यावर हल्ला चढवला. ९ एप्रिल ला मुघलांना किल्ल्याच्या तटबंदीच्या एका भागात स्फोट करून भगदाड पाडता आले पण त्यातून किल्ल्यात प्रवेश करता आला नाही, १७ एप्रिलला रणदुल्लाखान व शहाजी राजांनी किल्ल्याजवळ रसद पोहोचवायचा प्रयत्न केला पण मुघलांनी त्यांना अडविले व परतवून लावले. मुघलांच्या वाढत्या प्रभावाने व घटणाऱ्या रसदेमुळे किल्ल्यातले आदिलशाही सैन्य विवश झाले. त्यांनी मुघलांकडे अभयवचन मागितले व किल्ला देऊ केला. मालोजी भोसलेनी हा निरोप महाबतखानकडे नेला व त्यानी लगेच अभयदान दिले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *ৎ एप्रिल इ.स.१६६९* *काशी विश्वेश्वराचे देवालय जमीनदोस्त करण्याचा हुकुम बादशहाने दिला. औरंगजेब बादशहाने एक फतवा काढून हिंदुस्थानात सर्व हिंदुंना अतिशय पुज्य असलेल्या मोठमोठ्या देवालयांवर पडू लागली. सोमनाथचे दुसरे देवालय, काशीचे विख्यात विश्वेश्वराचे मंदिर आणि मथुरा येथील केशवराजाचे मंदिर ही हिंदुंची श्रद्धास्थाने औरंग्याला नजरेसमोर नकोशी वाटू लागली. सूर्यग्रहण आले. या सूर्यग्रहणाच्या मुहुर्तावरच काशी विश्वेश्वराचे देवालय जमीनदोस्त करण्याचा हुकुम औरंगजेब बादशहाने सोडला. या पाशवी हुकुमाने निसर्गही थरारला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *९ एप्रिल इ.स.१६७४* *इंग्रजांच्या नुकसान भरपाई मागणीस यश* *ब्रिटिश सल्लागार मंडळाच्या सभेंत ठरले की, हेन्री ऑक्झेंडनने रायगडावर जाण्याची तयारी करावी. ऑक्झेंडन व उष्टीक यांनी विचार करून तहनाम्यांवर अधिक काही गोष्टी घालावयाच्या असल्यास सुचवाव्यात. ता. ९ एप्रिल रोजी मुंबईहून सुरतेस पत्र रवाना झाले; त्यात ३/४ हजार रुपयांची रत्ने खरेदी करण्याची जबाबदार अधिकाऱ्यांस विनंती करण्यात आली. मुंबईकरांचे पत्र सुरतेस पोहोचल्यावर तेथील कौन्सिलच्या सभासदांचे मत झालें की नारायण शेणवी यास अपेक्षेबाहेर यश आलें आहे; तेव्हा शिवाजीस प्रसन्न करण्यासाठी राज्याभिषेकाच्यावेळी भरीव नजराणा द्यावा, म्हणून ६ मोत्ये, ३ अंगठ्या, १ शिरपेच, २ सलकडी अशा सुमारे ३३१४ रुपये किंमतीच्या वस्तु खरेदी करून मुंबईस धाडण्यात आल्या.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *ৎ एप्रिल इ.स.१६८२* *मुघल सरदार शहाबुद्दीनचा 'किल्ले रामशेज' ला पुन्हा वेढा टाकण्याचा प्रयत्न. पण किल्लेदार माजी पवार व इतर मावळ्यांचा त्यांच्यावर जोरदार हल्ला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *ৎ एप्रिल इ.स.१६९५* *शके १६१७ च्या वैशाख शु. ६ रोजी प्रसिद्ध पंडितकवि वामनपंडित यांनी भोगांव येथे समाधि घेतली.* *वामनपंडित हे ऋग्वेदी, वसिष्ठ' गोत्री ब्राह्मण असून विजापूरचे राहणारे. विजापूरचा बादशहा आपणांस बाटविणार ही बातमी कळताच त्यांनी विजापूर सोडले व काशी येथे संस्कृत भाषेचा व तत्कालीन शास्त्रांचा अभ्यास केला. विद्वत्ता मिळाली तरी चित्तास समाधान लाभले नाही म्हणून त्यांनी ' मलया- चला 'वर तपश्चर्या केली. तेथे ध्यानमग्न असता कोणा यतीने जो उपदेश दिला तो वामनपंडितांनी निगमसार' ग्रंथात साठविला आहे. यानंतरहि ‘कर्मतत्त्व', 'समश्लोकी', 'सिद्धांतविजय', 'अनुभूतिलेश', इत्यादि लहान लहान अध्यात्म प्रकरण पंडितांनी लिहिली. परंतु, वामनपंडितांचे सर्व बुद्धिवैभव त्यांच्या 'यथार्थ दीपिके 'त दिसून येते. सामान्य जनांना वामनपंडित प्रिय वाटतात ते त्यांच्या आख्यानक कवितेमुळे. सुश्लोक वामनाचा' म्हणून यांची प्रसिद्धि आहे. ' गजेन्द्र- मोक्ष', 'सीतास्वयंवर', 'कात्यायनी व्रत', 'वनसुधा', 'वेणुसुधा', इत्यादि सुंदर प्रकरणे रसिकांना आजहि रिझवितात. कित्येक ठिकाणी बीभत्स व शृंगार रस हे आपली पायरी ओलांडून जातात हैहि खरेंच आहे. जगन्नाथ पंडितांची गंगालहरी' व भर्तृहरीची नीतिशतके' यांचा उत्कृष्ट मराठी अनुवाद वामनांनीं केला आहे. वामनपंडित हे कोरेगांव ( शिगांव ) येथून कृष्णाकाठाने तीर्थकषेत्र पाहत पाहत महाबळेश्वर येथे जात असतांना मार्गात गुन्हेघर येथे समाधिस्थ झाले. पण भोगांवच्या हद्दीत कृष्णेच्या काठी यांचे दहन झाले. बरोबर असलेल्या शिष्याने-महादेवाने तेथे त्यांची समाधि बांधली. “वामनपंडिताप्रमाणे भक्तीने ईश्वरपर्दी लीन होऊन अद्वैतविचारावर मोठमोठाले ग्रंथ लिहिणारा, अक्षर गणांच्या वृत्तांनी सोपी, मधुर व पुष्कळ कविता रचणारा आणि निःस्पृहतेने केवळ ईश्वरपर वर्णन करणारा ग्रंथकार, कवि आणि साधु त्याच्यामागे आज- पर्यंत झाला नाही. वामनपंडिताने महाराष्ट्र भाषेवर व लोकांवर फार उपकार केले आहेत.” असा अभिप्राय कै. बा. म. हंस यांनी दिला आहे.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* ⛳ *जय गडकोट*⛳ *!! हर हर महादेव !!* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री मंगेश चंद्रकांत वीर* ( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख ) मा श्री महेंद्र तानाजी देवघरे* ( अध्यक्ष पुणे जिल्हा ) मा श्री योगेशजी सुदामराव शेलार (प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🙏 शिवराय स्टेटस #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
❤🚩शिवभक्त🚩❤
3.3K views
5 days ago
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल* *इतिहास शिवरायांचा* ********************************** *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *८ एप्रिल इ.स.१६६७* *छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्ऱ्यात कैदेत अडकलेल्या डबीर आणि कोरडे या आपल्या दोन वकीलांच्या सुटकेसाठी औरंगजेबास एक पत्र लिहिले आहे. त्याचा मराठी भाषेतील तजुर्मा सापडला आहे. संपूर्ण पत्रच वाचण्यासारखे आहे. ते मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा यात छापले आहे. आपण वाचा.* *त्यातील मुख्य विषय असा की , ‘ मी आपली परवानगी न घेता आग्ऱ्याहून निघून आलो , याचे मला वाईट वाटते. मी पूवीर्प्रमाणेच आपल्याशी नम्र आहे. ‘औरंगजेबानेही एकूण आपली परिस्थिती ओळखली होती. त्यानेही त्र्यंबक सोनदेव डबीर आणि रघुनाथ बल्लाळ कोरडे या दोन वकीलांची दि. ८ एप्रिल १६६७ रोजी सुटका केली. सुमारे नऊ महिने यमयातना सहन करून ते दोघे वकील सुटले आणि राजगडावर येऊन पोहोचले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *८ एप्रिल इ.स.१६७४* *छत्रपती शिवाजी महाराज चिपळूण येथे आले.* *छत्रपती शिवाजी महाराज लष्कर पाहणीसाठी व नवे सरनौबत नियुक्त करण्यासाठी चिपळूणला आले. लष्कराची पाहणी करून थोर लष्करास व पायदळ लोकांस खजिना फोडून महाराजांनी वाटणी केली. याच वेळी चालू वर्षाचा खर्डा ठरवून लष्कराच्या छावण्या, नव्या नेमणुका करून टाकल्या. सरनौबतीची वस्त्रे हंसाजीराव मोहिते "हंबीरराव" यांना दिली. हंबीरराव हा मोहीते घराण्यास किताब होता. ममोहित्यांचे मूळ आडनाव चव्हाण असावे. असा कयास आहे. चिपळूणला छत्रपती शिवाजी महाराजांचा मुक्काम सुमारे महिनाभर होता.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *८ एप्रिल इ.स.१६७६* *मार्च अखेरीस मराठ्यांनी कोल्हापूर जिंकले. महाराज कुडाळहून फोंड्यास गेले आणि फोंड्याच्या किल्ल्यास वेढा घातला (८ एप्रिल). फोंड्याचा किल्लेदार महमदखान हा शर्तीने किल्ला लढवीत होता. त्याला जवळचे पोर्तुगीज गुप्तपणे मदत करीत होते. मराठ्यांनी ही मदत पकडली आणि पोर्तुगिजांस त्याबद्दल जाब विचारला, तेव्हा त्यांनी कानावर हात ठेवले. आमचा ह्या मालाशी संबंध नाही असा जबाब त्यांनी दिला. विजापुराहून बहलोलखान फोंड्याच्या मदतीस १५ हजार फौज घेऊन येत होता. तो मिरजेस आल्यावर त्याच्या वाटेत मोठमोठी झाडे पाडुन महाराजांनी त्यास मिरजेतच गप्प बसविले. मराठी फौजा कार्यरत राहिल्या. त्या फौंड्यांत घुसल्या. त्यांनी विजापूर फौजेची कत्तल केली. पुढे किल्लेदार महमदखान यास कैद करून फोंडा किल्ला ६ मे रोजी हिरवी स्वराज्यात सामील झाला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *८ एप्रिल इ.स.१७०३* *सिंहगडाच्या तटबंदीवर तोफांची मारगिरी मोगलांनी केली. पण किल्ला तोफांच्या मारगिरीने हस्तगत होईल असे मोगलांना वाटत नव्हते. तेव्हा तरबियतखानाने मराठा शिबंदीशी वाटाघाटी केल्या. भली मोठी रक्कम किल्लेदारास दिल्यावर किल्ला ८ एप्रिल १७०३ रोजी मोगलांचे ताब्यात आला. त्या किल्ल्याचे नाव बाख्शीदाबखा (ईश्वरदत्त) असे ठेविले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *८ एप्रिल इ.स.१७२८* *ऊत्तर पोर्तुगालच्या सल्लागार मंडळाच्या सचिवाने व्हिसेरेईला पाठविलेल्या पत्राची नोंद!* *"डिचोलीचा किल्ला पाडून टाकावा अशी आज्ञा महाराजांनी केली आहे". वसईच्या युद्धात वाडीकर सावंत यांनी तटस्थतेचे धोरण पत्करले असावे. कारण, पेशव्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. त्यातच कुलाबेकर आंग्रे यांच्याशी त्यांच्या कटकटी चालू होत्या.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *८ एप्रिल इ.स.१८५७* *क्रांतिकारी मंगल पांडे यांस फासावर चढविण्यात आले. अशा प्रकारे १८५७ च्या उठावातील पहिला क्रांतिकारक व पहिला हुतात्मा होण्याचा बहुमान मंगल पांडे यांस जातो. हा १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाचा प्रारंभ मानला जातो. त्यांच्या नावाचा ब्रिटिशांवर इतका जबर्दस्त प्रभाव पडला होता की, या क्रांतियुद्धातील सर्व सैनिकांना इंग्रज `पांडे’ याच नावाने संबोधू लागले होते. बराकपूरच्या लष्करी छावणीमध्ये मंगल पांडे यांस फाशी देण्यात आले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *८ एप्रिल इ.स.१९२९* *भगतसिंह आणि बटुकेश्वर दत्त यांनी संसदेत बॉम्ब फेकले* *बटुकेश्वर दत्त यांना मुख्यत्वे ओळखलं जातं ते म्हणजे ब्रिटीशांच्या केंद्रीय विधानसभेत (आजच्या संसदेत) त्यांनी भगतसिंहांना सोबत केलेल्या बॉम्बस्फोटामुळे. तत्कालीन ब्रिटीश सरकारने ‘पब्लिक सेफ्टी बिल और ट्रेड डिस्प्यूट बिल‘ नावाने दोन बिलं संसदेत मंडळी होती ज्यामुळे मजुरांच्या उपोषण करण्यावर सरकार निर्बंध घालून आणि क्रांतिकारकांच्या विरुद्ध पोलिसांना अनावश्यक अधिकार मिळवून द्यायचा प्रयत्न सरकार करत होतं. याचा निषेध म्हणून भगतसिंह आणि बटुकेश्वर दत्त यांनी ८ एप्रिल १९२९ रोजी कुणालाही हानी होणार नाही अशा पद्धतीने संसदेच्या प्रेक्षक दिर्घेतून बॉम्ब फेकून गोंधळ उडवला. या गोंधळात आपल्या विचारांची पत्रके उधळून त्यांनी बॉम्बस्फोटाचा उद्देश सर्वाना कळवण्याचा प्रयत्न केला. अन तिथून पळून न जाता स्वतःला अटक करून घेतली.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* ⛳ *जय गडकोट*⛳ *!! हर हर महादेव !!* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री मंगेश चंद्रकांत वीर* ( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख ) मा श्री महेंद्र तानाजी देवघरे* ( अध्यक्ष पुणे जिल्हा ) मा श्री योगेशजी सुदामराव शेलार (प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🙏 शिवराय स्टेटस
❤🚩शिवभक्त🚩❤
4.3K views
6 days ago
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल* *इतिहास शिवरायांचा* ********************************** *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *७ एप्रिल १६५७* *( वैशाख शुद्ध चतुर्थी, शके १५७९, संवत्सर हेमलंबी, मंगळवार )* *छत्रपती शिवरायांचा काशीबाई आईसाहेबांशी विवाह* *छत्रपती शिवरायांनी मातब्बर घराण्यांशी तत्कालीन रुढीनुसार सोयरीक संबंध करून त्यांचीही स्वराज्याशी बांधिलकी तयार केली. आजच्या दिवशी जाधवरावांच्या घराण्यातील काशीबाई आईसाहेबांचा छत्रपती शिवरायांशी विवाह झाला आणि आणखी एक घराणे स्वराज्याशी जोडले गेले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *६ व ७ एप्रिल इ.स.१६६३* *जसवंतसिंहाने कोंढाण्यास वेढा घातला.* *शाहिस्तेखानावर पडलेला आकस्मिक छापा औरंगजेबालाही वाटला नसेल इतका दु:खदायक काही राजपूत सरदारांना वाटला. लाल महालातील हा फजितीदायक छापा घडल्यानंतर (इ. १६६३ एप्रिल ६ ) या जसवंतसिंहाने पुण्या शेजारच्या कोंढाणा किल्ल्यावर हल्ला चढविला. त्याच्याबरोबर त्याचा मेहुणा भावसिंह हाडा (बुंदीमहाराजा) हाही होता. जसवन्तसिंहांना सिंहगड अजिबात मिळाला नाही, त्यांनी गडाला वेढा घातला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *७ एप्रिल इ.स.१६८७* *(वैशाख शुद्ध ५, पंचमी, शके १६०९, प्रभव संवत्सर, वार गुरुवार)* *स्वराज्याचे पेशवे नीळकंठ मोरेश्वर यांची राजाज्ञा!* *छत्रपती संभाजी महाराजांच्या स्वराज्याचे पेशवे नीळकंठ मोरेश्वर यांनी पुरंदरचे किल्लेदार बाजी घोलप यांना राजाज्ञा केली की किल्ले पुरंदरावरील पुरंदरेश्वर व केदारेश्वर यांचा अभिषेक अनुक्रमे नारायण भट व शिव भट करतील या कामी इतर कोणाची ढवळाढवळ न करणे. या कामी स्वामिंची सनद लवकरच पाठविली जाईल या आशयाची आज्ञा केली.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *७ एप्रिल इ.स.१७३७* *वसईच्या मोहिमे वेळी ७ एप्रिल १७३७ साली मराठ्यांचे सरदार शंकराजी केशव फडके हे चिमाजी अप्पांना लिहितात, "शहरात सिरते समयी आम्ही लोकास ताकीद केली की, रयेतीचे काडीस येकंदर हाथ न लावणे."* *अशी असंख्य उदाहरण आपल्याला भेटतील की, कोणत्याही प्रकारे रयतेस तोशीस पोहचू नये, याची काळजी मराठ्यांचे राज्यकर्ते कसे घेत होते. हाच शिवछत्रपतींनी शिकवलेला 'महाराष्ट्रधर्म' होता !* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *७ एप्रिल इ.स.१८१७* *त्रिंबकजी डेंगळेला इकडे पकडायला सैन्य पाठवावे तर भलतीकडेच त्रिंबकजीचे सैन्य छापा मारून जायचे. ह्यावर काय उपाय करावा हे इंग्रजांना अजिबात सुचत नव्हते. पण ते त्रिंबकजींना पकडायचे पूर्णपणे प्रयत्न करत आहेत असे रिपोर्ट्स मात्र ते वेळोवेळी कंपनीच्या डायरेक्टरांना कळवायचे. उदाहरणार्थ हा रिपोर्ट म्हणतो की त्रिंबकजी धारवाडकडे पळून गेलाय पण तरीही त्याच्या फौजा विजापूर - पंढरपूर भागात आहेत - त्याचबरोबर खान्देशात पण त्याच्या फौजा वाढतच चालल्या आहेत!* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *७ एप्रिल इ.स.१८१८* *दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली. त्यात ७ एप्रिलला देवगड विनासायास इंग्रजांच्या ताब्यात गेला. प्राचीन कालखंडापासून देवगड हे महत्वाचे बंदर म्हणून ओळखले जाते. किल्ल्याच्या बांधकामाच्या कालखंडाविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. छत्रपती शिवरायांनी गडाजवळच्या खाडीमध्ये तारवे बांधल्याचा पुरावा उपलब्ध आहे. किल्ल्यावरील तटबंदी आणि बुरुज आजही मजबूत अवस्थेत उभे आहेत. तटबंदीवरून आजूबाजूच्या समुद्राचे विहंगम दृश्य दिसते. किल्ल्यावर पुरातन वाड्यांचे अवशेष आणि सुस्थितीत असलेला दरवाजा तसेच पुरातन गणपती मंदिर आहे.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* ⛳ *जय गडकोट*⛳ *!! हर हर महादेव !!* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री मंगेश चंद्रकांत वीर* ( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख ) मा श्री महेंद्र तानाजी देवघरे* ( अध्यक्ष पुणे जिल्हा ) मा श्री योगेशजी सुदामराव शेलार (प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🙏 शिवराय स्टेटस #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏शिवदिनविशेष📜
❤🚩शिवभक्त🚩❤
7.7K views
7 days ago
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल* *इतिहास शिवरायांचा* ********************************** *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *६ एप्रिल इ.स.१६६३* *( चैत्र शुद्ध नवमी, शके १५८५, संवत्सर शोभन, सोमवार )* *हल्ल्यानंतर महाराज सिंहगडावर दाखल :-* *शाहिस्तेखानाची ३ बोटे छाटली व त्याच्या छावणीत पुर्ण हलकल्लोळ माजवून महाराज सहीसलामत किल्ले सिंहगडी दाखल राजे सिंहगडी सुरक्षित पोहोचले होते. तेव्हा पहाट होत होती. सुर्यनारायणाची आभा पसरत होती. आणि महाराजांच्या हेरांनी सकाळी गडावर बातमी आणली, "खान मेला नाही त्याची फक्त ३ बोटे उडाली". महाराजांना ही बातमी कळली. महाराजांनी स्मितहास्य केले व म्हणाले, "शाहिस्तेखानास शास्त झाली, पातशहाने नाव ठेवले, परंतु यथार्थ ठेवले नाही ते नाव आपण शास्त करून रुजू केले, परमेश्वराने हे अचाट साहस आपणास करावयास लावले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *६ एप्रिल इ.स.१६६५* *इ.स. १६६५ एप्रिल ६ पोर्तूगीज व्हाईसरायचे पत्र - "शिवाजीराजे कानडा प्रांतांतून गोव्याकडे येणारा तांदूळ ताब्यांत घेण्यासाठीं तुमचीं ९ जहाजे मुरगांव बंदराकडे आली व परत जाऊ लागलीं. त्यामुळे आम्हास कांही लढाऊ जहाजे तेथे पाठविणे भाग पडले. त्यांनी तुमची जहाजें धरुन आणूंन बंदरांत ठेवली. परंतु तुमच्या स्नेहसबंधाकडे लक्ष देऊन मीं तीं जहाजें जाळण्याचा हूकूम न सोडतां परत जाण्यास मोकळीक दिली."* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *६ एप्रिल १६६६* *( चैत्र शुद्ध द्वादशी, शके १५८८, संवत्सर पराभव, शुक्रवार )* *राजे दिल्ली जवळ करीत होते :-* *छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगाबाद सोडले व महाराजांच्या पुढच्या प्रस्थानाची बातमी देण्यासाठी वकील म्हणून रघुनाथपंत कोरडे दिल्लीस रवाना झाले. महाराज आग्रा प्रवासात असताना त्यांना औरंगजेबाचे पत्र मिळाले. त्यात औरंग्याने, "मिर्झाराजे जयसिंग यांनी ठरवल्याप्रमाणे तुम्ही इकडील प्रांती रवाना झाले ते पाहून संतोष झाला. ऐशीयास इकडील पुर्ण लोभ तुम्हांवर आहे. म्हणोन अदकार न करता खातरजमेने दरमजल करत निघोन यावे. भेटी अंती बहुत सत्कार पाहून माघारे जाण्याविषयी निरोप दिला जाईल. सांप्रत तुम्हाकरीता पोशाख पाठवत आहे. तो घ्यावा". "भेटी अंती बहुत सत्कार पाहून माघारे जाण्याविषयी निरोप दिला जाईल". हे औरंगजेबाचे लेखी वचन पाहून महाराजांचा उत्साह व अपेक्षा निश्चितच उंचावल्या.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *६ एप्रिल इ.स.१६८२* *(चैत्र शुद्ध नवमी, शके १६०४, संवत्सर दुदुंभी, वार गुरुवार)* *खडगगडाचे किल्लेदार बादशहाच्या सेवेत रुजू!* *खडगगडाचे किल्लेदार (अंकाई) आणि खडगगडाच्या प्रदेशातील नामांकित जमीनदार, सावकार, चिमणजी प्रभू बादशाही सेवेत रूजू झाले. महाराजांच्या महानिर्वाणानंतर फितुरांची स्पर्धाच लागली होती. वतनासाठी लाचार होऊन मुसलमानी सत्ताकर्ते फेकतील ती हाडके घेऊन चघळण्यात धन्यता मानणार्‍यांची अहमिका लागली होती! बादशहातर्फे चिमणाजी प्रभू यांना मोठी खिलजीची वस्त्रे देऊन गौरविण्यात आले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *६ एप्रिल इ.स.१७८२* *अहमदखानाचे व नजफखानाचे वाकडे होते. त्यामुळे बादशहा शहाअलम हा आपला वजीर नजफखान याच्या वर्चस्वास कंटाळला. शहाअलम बादशहा हा मराठ्यांच्या मर्जीने रहाण्यास उत्सुक होता आणि वारंवार तो बोलून दाखवी की, महादजी शिंदे किंवा हरिपंत फडके यासारखा एक फौजबंद मराठा सरदार सतत दिल्लीस रहावा आणि मराठ्यांनी बादशहास दरमहा २ लक्ष रुपये देऊन करोडीची स्थळे हस्तगत करावी. ही परिस्थिती सन १७८० मध्ये होती. परंतु यावेळी मराठे व इंग्रज यामध्ये नेकीने युद्ध चालू असल्यामुळे मराठ्यास हे कार्य पत्करणे शक्य नव्हते. दिनांक ६ एप्रिल १७८२ रोजी नजफखान मृत्यू पावला. आणि पुढील महिन्यात सालबाईचा तह पुरा होऊन पहिले इंग्रज मराठे युद्ध थांबले. तेव्हा महादजी शिंदे यांना दिल्लीच्या राजकारणाकडे लक्ष पुरवण्यास अवसर मिळाला. बादशहास सन १७७२ त दिल्लीस आणून तख्तनशीन केल्यावेळे पासून महादजी शिंद्यांच्या मनात दिल्लीचा कारभार आपल्या ताब्यात घ्यावा असे होते पण वर सांगितल्याप्रमाणे सालबाई तहापर्यंत महादजींना दिल्लीच्या राजकारणाकड पहाण्यास फुरसत नव्हती. ह्या संधीचा फायदा मिझ नजफखान याने घेतला. पण मिझ नजफ ६ एप्रिल १७८२ मध्ये निर्वतल्यानंतर दिल्लीच्या बादशहाने महादजीस दिल्लीचा कारभार हाती घेण्याची विनंती केली. बादशहा शहाअलम महादजींना दिल्लीस आणण्यास एवढा उतावीळ झाला की, त्याने त्यावेळी दिल्ली दरबारी असलेले मराठ्यांचे वकील हिंगणे यास महादजीस दिल्लीस येण्यास आवर्जून लिहिण्यास सांगितले. त्याप्रमाणे हिंगणे यांनी पाटील बावांस लिहिले, “ही वेळ अशी आहे की, इकडे येण्याने तुम्हाला कीर्तीच नव्हे तर पैसाही मिळेल.”* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *६ एप्रिल इ.स.१८१७* *बाजीराव पेशव्याने (दुसरे) इंग्रजांशी लढाई करण्याकरिता गुप्तपणे तयारी चालविली होती. त्याने आपल्याकडील जडजवाहर व खजिना रायगड किल्ल्यात सुरक्षिततेसाठी पाठवून दिला. दिनांक १ एप्रिल १८१७ रोजी एल्फिन्स्टनने बाजीरावास एक कडक पत्र लिहून कळविले की त्रिंबकजीचा पाठलाग जर झाला नाही तर इंग्रज सरकारला आपल्याशी जाहीररीत्या युद्ध पुकारावे लागेल व त्याच्या बऱ्या वाइटाचे धनी तुम्हीच व्हाल. दिनांक ६ एप्रिलला बाजीरावाने एल्फिन्स्टनला भेटीस बोलाविले व नेहमीच्या पद्धतीने याने लाचारी दाखवून लाघवी बोलून डेंगळेच्या बाबतीत आपण निरपराधी आहोत अशी बतावणी केली. एल्फिन्स्टनने त्यावर कठोरपणे सांगितले की एक महिन्याचे आत तुम्ही त्रिंबकजीस पकडून आणून आमचे स्वाधीन करा आणि तोपर्यन्त जामीन म्हणून तुमचे चार किल्ले रायगड, पुरंदर, सिंहगड व त्रिंबक आमचे ताब्यात द्या. या डरावणीने बाजीराव अगदी घाबरून गेला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *६ एप्रिल इ.स.१८४९* *कोहिनूर आणि दुलीपसिंग यांची इंग्लंडला रवानगी* *रणजितसिंग २७ जून १८३९ रोजी लाहोर इथे मरण पावला. त्याच्या वारसांमध्ये पण हाणामाऱ्या, कट, कारस्थाने होऊन त्याचा सगळ्यात धाकटा मुलगा दुलीपसिंग जो त्यावेळी ( सप्टेंबर १८४३ ) मध्ये अवघ्या पाच वर्षांचा होता, सिंहासनारूढ झाला. मार्च १८३९ मध्ये इंग्रजांनी अन्य भारतीय संस्थानांसारखे शीख साम्राज्य पण खालसा केले. त्यांनी ज्या प्रमाणे पेशवाईचा पाडाव झाल्यांनतर अल्पवयीन प्रतापसिंह महाराजांना नव्याने निर्माण केलेल्या सातारा राज्यावर बसवून( एप्रिल १८१८ ) त्यांच्या मार्गदर्शनासाठी कॅ.जेम्स ग्रांट ची नियुक्ती केली होती त्या प्रमाणेच दुलीपसिंगसाठी इंग्रजांनी डॉ. लोगिनला लाहोर दरबारी नियुक्त केले. तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसीच्या हुकुमानुसार इंग्रजांनी कोहीनुरसहित रणजितसिंगाचा सर्व शाही खजिना ताब्यात घेतला. कोहिनूर घेऊन दस्तुरखुद्द डलहौसी मुंबईस आला व कोहिनूर आणि दुलीपसिंग ह्या दोघांची ६ एप्रिल १८४९ ला बोटीने इंग्लंडला रवानगी केली. ज्याप्रमाणे पुण्यश्लोक शाहू महाराज औरंगजेबच्या कुटुंबीयात राहिले होते तद्वतच दुलीपसिंग विक्टोरिया राणीच्या सहवासात बराच काळ राहिला. इ.स.१८५१ मध्ये ज्यावेळी त्याने कोहिनूर हिरा प्रथमच पाहिला होता, विक्टोरिया राणीस भेट म्हणून देऊन टाकला. तेहापासून कोहिनूर तेथील राण्यांच्या मुगुटामध्ये विराजमान आहे. कोहिनूर पुरुषांना लाभत नसल्याच्या भीतीने राजघराण्यातील पुरुष मंडळींनी तो कधी परिधान केला नाही.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *६ एप्रिल इ.स.१९२७* *सरफरोशी की तमन्ना* *काकोरी दरोडा प्रकरणातील सर्व क्रांतिकारी दोन गाड्यांनी कोर्टात आणले गेले. ते देशभक्तीपर गाणी गात असत. घोषणा देत असत. लोकांची भरपूर गर्दी होत असे. ६ एप्रिल १९२७ रोजी ‘सरफरोशी की तमन्ना’ हे गाणे म्हणत सर्वजण कोर्टात शिरले. जस्टिस हॅमिल्टनने शिक्षा सुनावल्या. पंडीत रामप्रसाद ‘बिस्मिल’, राजेंद्र लाहिरी, ठाकूर रोशनसिंग, आणि अश्कफुल्ला खान ह्यांना फाशी झाली. अनेकांना जन्मठेप, १४-१०-७-५-४-३ वर्षांचे सश्रम कारावास झाले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* ⛳ *जय गडकोट*⛳ *!! हर हर महादेव !!* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री मंगेश चंद्रकांत वीर* ( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख ) मा श्री महेंद्र तानाजी देवघरे* ( अध्यक्ष पुणे जिल्हा ) मा श्री योगेशजी सुदामराव शेलार (प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #📜इतिहास शिवरायांचा #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🙏 शिवराय स्टेटस
❤🚩शिवभक्त🚩❤
3.5K views
8 days ago
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल* *इतिहास शिवरायांचा* ********************************** *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *५ एप्रिल इ.स.१६६०* *( वैशाख शुद्ध षष्टी, शके १५८२, संवत्सर शार्वरी, गुरुवार )* *शाहिस्ते खान बारामतीला दाखल :-* *शाइस्ताखान बारामतीला पोहचला. अन् मे १६६० ला तो पुण्यात पोचला. तो लाल महलात घुसल. आणि सुमारे ३ वर्ष ठाण मांडून बसला. सिद्दीच्या मगोमाग आलेला हा दुसरा गनीम लाल महलात ठाण मांडून बसला होता. तो होता औरंगजेबाचा सख्खा मामा, अमीर-उल्-उमराव नवाब-बहादुर मिर्झा अबूतालीब उर्फ शाइस्ताखान. ७७ हजार घोडदळ, ३० हजार पायदळ, हत्ती, घोडे, उंटांवरचा तोफखाना (शुत्तरनाळा), हत्तीवरचा तोफखाना (फिलनाळा), बारूद वगैरे सर्व साधने घेऊन हजारोंच्या सैन्यासह, सोबत शम्स खान पठाण, नामदार खान, गयासुद्दीन, हसन मुनीम, सुल्तान मिर्झा, मनचेहर, तुरुकताज, कुबाहत खान, हौद खान, सिद्दी फत्ते, कारतलब खान, शामसिंह, राजसिंह गौड, रामसिंह, रायसिंह सिसोदिया, दत्ताजी खंडागळे, दत्ताजी व रुस्तमराव जाधव, रंभाजी पवार, माहुरची रायबाघन व तिचे कृष्णराज, प्रचंडराज ई. भाऊ, सर्जेराव घाटगे यांसह सुमारे ५६ सरदार या मोहिमेत होते.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *५ एप्रिल इ.स.१६६३* *( चैत्र शुद्ध अष्टमी, शके १५८५, संवत्सर शोभन, रविवार )* *शाहिस्तखानावर सर्जिकल स्ट्राईक शास्ताखानास स्वराज्यात घुसून दोन वर्षे होऊन गेली होती. डुकराप्रमाणे स्वराज्याची नासधूस त्याने चालविली होती. बंदोबस्त आवश्यकचं होता. राजेंचा लालमहाल त्याने कब्ज्यात घेतला होता. त्यामुळे शास्ताखानाचा बंदोबस्त म्हणजे काळाची गरज झाली होती. राजगडी विचारचक्रे सुरु झाली. त्यातच शास्ताखानावर प्रत्यक्ष हल्ला करण्याचा बेत राजेंनी सांगितला. त्याप्रमाणे एकाअद्भूत धाडसाची अत्यंत काळजीपूर्वक आणखी राजगडावर होऊ लागली. सर्वप्रथम दिवस ठरवला गेला. शोभान नाम संवत्सर शके १५८५ ची चैत्र शुद्ध अष्टमी ही तिथी हल्ल्यासाठी निवडली गेली. हल्ला प्रथम अर्थातच मध्यरात्रीनंतर व्हायचा होता. त्या दिवशी रविवार असून इंग्रजी तारीख होती.५ एप्रिल १६६३ (रात्री १२ नंतर ६ एप्रिल) मुसलमान कालगणनेप्रमाणे हा रमजानचा महिना असून त्या दिवशी सहावा चंद्र होता. या शिवाय या दिवसाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हां दिवस बादशहाच्या राज्यरोहणाच्या वाढदिवसानिमित्त साजरा केल्या जाणाऱ्या दिवसांपैकी एक दिवस. चैत्रशुद्ध अष्टमी उजाडली. सर्व योजना आखली गेली होती. हुजुरपागेतून महाराजांनी १००० निवडक धारकरी माणूस निवडले. वरकड लष्करातून २००० सडे सडे राऊत घेतले.* *तेव्हा त्यांच्यासोबत नेताजी पालकर, बाबाजी बापुजी मुदगल, चिमणाजी बापुजी मुदगल, बाजी सर्जेराव जेधे, चान्दाजी कान्होजी जेधे, कोयाजी बांदल, येसाजी कंक व तान्हाजी मालुसरे हे होते. राजगडाहून महाराज सिंहगडी आले. रात्रीचा पहिला प्रहर उलटला. सिंहगडाच्या दिशेनेच जसवंतसिंह हा मोगली सरदार दहा हजार घोडदळासह तळ ठोकून बसलेला होता. त्याच्या नकळत छापा घालायचा होता. म्हणून रात्री आडमार्गे जायचे ठरलेमहाराज पुण्याच्या अलीकडे १ मैलावर आंबीलवोढ्या जवळ येऊन थडकले. बहुधा ते डोणज्याच्या खिंडीने उतरून आले असावेत. महाराज सैनिकांच्या एका तुकडीत मिसळून होते. या तुकडीचे नेतृत्व बाबाजी व चिमणाजी या बंधूंकडे होते. चिलखत, जिरेटोप, ढाल, तरवार, अशा पूर्ण तयारीत महाराज होते. ही तुकडी चालत चालत शास्ताखानने बसवलेल्या चौकीपहाऱ्याच्या दरम्यान आली. आणि चतुराईने आत दाखल झाली सुद्धाअसेही मोगली छावणी म्हणजे प्रचंड गबाळेपणा अशी त्यांची ख्याती होती. कॉस्म द गार्द्र अशा छावन्यांचे वर्णन करताना म्हटले आहे. की, The moorish armies are like big cities, as many people follow them and come to the camp at all hours without being questioned.* *ऐन मध्यरात्र सारी छावणी सुस्त होती. या छावणीत मराठी मंडळीही चिक्कार होती. त्या मराठ्यांच्या खात्यावर ही मराठी मंडळी छावणीत शिरली. लाल महालात घुसताना महाराजांनी स्वतः बरोबर ४०० निवडक उत्तम सैनिक व कोयाजी बांदल, चांदजी जेधे, बाबाजी व चिमणाजी देशपांडे वगैरे धाडसी जवान घ्यायचे ठरविले होते. लाल महालातील परसांगणाच्या दारांत चिणलेले चिरे उचकटून हे लोकं आत उतरले. असेच ते आतल्या चौकात गेले. तेवढ्यात चाहूल लागून पहारेकरी सावध झाले. ओरडा आणि कापाकापी सुरू झाली. शाइस्तेखान घाईने, खाली काय गोंधळ आहे ते पाहावयास आला. आणी आला तो अतिशहाणा धनुष्यबाण घेऊन लढाईला आला. आता इतक्या अंधारात याच्या बापानी तरी धनुष्य बाण युद्धात कधी वापरले होते काय ? तिथेच तो मरायचा. पण त्यात त्याचा पुत्र अबुल फते खान मध्ये धावला. त्यामुळे खान बचावला, पण पोरगा मेला. खान आपल्या महालाकडे जीव मुठीत धरून धांवत असता महाराज त्याच्या मागे धावले. महालातील स्त्रियांनी घाबरून पण चतुराईने दिवेच फुंकून टाकले. अंधारात महाराजांनी अंदाजाने खानावर खाडकन् घाव घातला. हा घाव खानाच्या उजव्या हातावर बसला अन् तीन बोटे तुटली. खान प्राणांतीक आरडला.महाराजांना वाटले, खान खलास झाला. ते परत फिरले.या युद्धात महाराजांची सहा माणसे ठार झाली व चाळीस जखमी झाली. जखमी झालेल्यांमध्ये कोयाजी बांदल हे सुद्धा होते. रात्रीच्या या हल्ल्यात खानाचा एक मुलगा, एक जावई, बारा बिव्या, चाळीस मोठे दरकदार, एक सेनापती असे एकूण पंचावन्न लोक महाराजांनी व त्यांच्या मराठ्यांनी मिळून कापून काढले होते. सारा लाल महाल घाबरून कल्लोळत होता.दगा ! बचाओ ! गनीम ! मराठ्यांनीहि असेच ओरडण्यास प्रारंभ केला ! एकच कल्लोळ ! महाराजांनी या हलकल्लोळाचा फायदा घेतला व सर्वजण त्या गर्दित मिसळून पसार झाले...* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *५ एप्रिल इ.स.१६८९* *(चैत्र वद्य द्वितीया, शके १६०३, संवत्सर सिद्धार्थी, वार सोमवार) छत्रपती राजाराम महाराजांनी किल्ले रायगड सोडला.* *दुर्गराज रायगड म्हणजे हिंदवी स्वराज्याच्या तक्ताची जागा. गडांचा राजा व राजांचा गड, परंतु नियतीची चक्रे अकस्मात फिरली व इ.स.१६८९ पर्यंत अभेद्य व अप्राप्य वाटणारा हा हिंदवी स्वराज्याच्या राजधानीचा गड छत्रपती संभाजी महाराजांच्या म्रृत्यूनंतर मात्र हतबळ झाला. शत्रूसुद्धा जो सहजी कधी प्राप्त होईल असे वाटले नव्हते तो गड २५ मार्च इ.स.१६८९ पासून मोगली विळख्यात सापडला. रायगडचे फास आवळले जाऊ लागले. समय बाका होता, महाराणी येसुबाईसाहेब यांनी आपल्या पुत्रास मंचकारोहण करण्याचा मोह टाळून आपल्या दिरास वारसदार म्हणून मंचकारोहण करण्याच्या निःस्वार्थी व उदार निर्णयाने स्वराज्याचा वारसा हक्काचा धोका मागे पडून मोगली आक्रमणास का, कसे, कुठे व कोणी व कोणती उपाय योजना करावी यावर विचारमंथन झाले. प्राप्त परिस्थितीत रायगडावर शाहू महाराजांसह आपण वास्तव्य करण्याचा व युवराज राजाराम महाराजांनी बाहेर पडून मोगलांशी संघर्ष सुरू ठेवण्याचा सल्ला सर्व जेष्ठ की श्रेष्ठ मुत्सद्यांना व सेनांनींना पटला. त्यानुसार युवराज राजाराम महाराजांनी ताराराणीसाहेब, राजसबाईसाहेब, प्रल्हाद निराजी आदींसह गुप्तपणे रायगडाच्या वाघ दरवाज्यातून जिंजीकरीता प्रयाण केले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *५ एप्रिल इ.स.१७१८* *मराठा सरखेल 'कान्होजी आंग्रे' यांच्या आरमाराला जशास तसे उत्तर देण्यासाठी सर्व तह बाजूला सारून ईस्ट इंडिया कंपनीच्या बॉम्बे कौन्सिलच्या बैठकीत आंग्र्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला गेला. पुढे काही दिवसांनी इंग्रजांनी आंग्र्यांचे एक शिबाड पकडले तेंव्हा आंग्र्यांनी इंग्रजांना पत्र पाठवले. "तुमची आमची मैत्री संपली. इथून पुढे देवाची कृपा होऊन माझ्या हाती जे लागेल ते घेतल्याशिवाय मी राहणार नाही."* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *५ एप्रिल इ.स.१७४०* *श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी दि. २३ मार्च १७४० रोजी खरगोण प्रांतात प्रवेश केला. सुभ्याची व्यवस्था लावत असताना बाजीरावांची तब्येत बिघडली होती. दि. ५ एप्रिल रोजी बाजीराव नर्मदाकाठी रावेरखेडी येथे आपल्या वाड्यात येऊन राहिले. इतर प्रांतांची व्यवस्था लावून पूर्ण झालेली होती. परंतु, तरीही बाजीराव पेशवे पुण्याला न राहता रावेरखेडीलाच राहिले. वास्तविक पुणे हे बाजीरावांचे अत्यंत प्रिय. शनिवारवाड्यासारखा बळकट महाल त्यांनी उभा केला, पुण्याची पुनर्बाधणी केली. परंतु, मस्तानी प्रकरणाने त्याच पुण्याने आपल्या घरातल्यांनीही त्यांना वाळीत टाकल्यासारखेच केले होते. सतत मस्तानीच्या असण्यावरून घरातल्या मंडळींचे नाराज चेहरे त्यांना पुण्यापासून लांब राहण्यास प्रवृत्त करू लागले. चिमाजीआप्पांनी राधाबाईंना पत्राद्वारे रावांची प्रकृती कळवली.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *५ एप्रिल इ.स.१७७०* *मराठ्यांनी आग्रा व मथुरा जिंकले तिसऱ्या पानिपत युद्धात मराठ्यांची जबरदस्त हानी झाली होती. त्याचा धक्का सहन न झाल्यामुळे नानासाहेब पेशवा लवकरच निधन पावला. त्यामुळे उत्तरेत लक्ष देता आले नाही. १७६८ नंतर माधवरवाना उत्तरेकडे लक्ष देण्यास फुरसत मिळाली. १७६९ च्या शेवटी माधवरावांनी एक जंगी मराठा सैन्य रामचंद्र गणेश कानडे आणि विसाजी कृष्ण बिनीवाले यांच्या नेतृत्वाखाली उत्तरेकडे रवाना केले.पानिपत युद्धातील कलंक धुवून काढणे,विश्वासघातकी नजीबला शासन करणे व उत्तरेत पुन्हा मराठ्यांचे अधिपत्य निर्माण करायचे,असे माधवराव नि ठरवले होते.त्याचा भाग म्हणून मराठ्यांनी पुन्हा उत्तरेत आपला जम बसविण्यास सुरुवात केली.महादजी शिंदे सुद्धा मोठ्या जोमाने ह्या कार्यात आघाडीवर होते. मराठी फौजांच्या मार्गात जाट मंडळींचा अडथळा होता.पण ५ एप्रिल १७७० ह्या दिवशी मराठ्यांनी जाट सैन्याचा पराभव करून आग्रा व मथुरा हि दोन ठिकाणे काबीज करून दिल्लीकडे आगेकूच चालू ठेवली.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *५ एप्रिल इ.स.१७७८* *महादजी शिंद्याचे छत्रपतींविरुद्ध आक्रमण आणि तह* *कोल्हापूरच्या छत्रपतींचे पारिपत्य करण्यासाठी पेशव्यांनी त्यांचे सरदार महादजी शिंद्यास पाठवले. तीन महिने कोल्हापूरास वेढा पडला होता. अतोनात जिवीत व वित्तहानी झाली होती. त्यात महांकाळी तोफ कोल्हापूरात पोहोचल्यास तटबंदी टिकाव धरु शकणार नाही हे ओळखून सेनापती येसाजी शिंद्यांनी महादजीच्या अटीवर तह करण्याचे कबूल केले. ५ एप्रिल १७७८ रोजी तह झाला. तहानुसार छत्रपतींनी महादजीस वीस लाख रुपये खंडणी म्हणून द्यावे लागले व कोल्हापूरच्या फौजेने पकडलेली महादजीची माणसे सोडून द्यावी लागली.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *५ एप्रिल इ.स.१८२२* *सातारा राज्याचे छत्रपती प्रतापसिंह एप्रिल १८१८ ला प्रतापसिंह यांची सातारा राज्याच्या गादीवर पुनःस्थापना झाली तरी त्यांचा बरोबर तह २५ सप्टेंबर १८१९ मध्ये झाला. कारण तोपर्यंत बाजीराव इंग्रजांना शरण आला नव्हता व त्याचा पूर्ण बंदोबस्त केल्यावरच इंग्रज सातारच्या महाराजांकडे लक्ष देणार होते. कंपनी सरकारतर्फे जेम्स ग्रांट तर महाराजांतर्फे त्यांचा मुखत्यार-पॉवर ऑफ अटर्नी-विठ्ठल बल्लाळ फडणीस ने सह्या केल्या. जेम्स ग्रांटने राज्यकारभाराच्या दृष्टीने परिपूर्ण सातारा राज्य ५ एप्रिल १८२२ महाराजांच्या हाती सोपविले. हे राज्य त्यानंतर सुमारे २६ वर्षे अस्तित्वात राहिले. ५ एप्रिल १८४८ ला आप्पासाहेबांच्या मृत्यूनंतर सातारा राज्य इंग्रजांनी खालसा केले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *५ एप्रिल इ.स.१८४८* *छत्रपती आप्पासाहेब यांचा मृत्यू (सातारा गादी)* *धाकटे शाहूमहाराज उर्फ आबासाहेब ह्यांना तीन मुलगे होते. सर्वात वडील प्रतापसिंह उर्फ बुवासाहेब, द्वितीय रामचंद्र उर्फ भाऊसाहेब आणि तृतीय अप्पासाहेब उर्फ शहाजी. धाकटे शाहूमहाराज इ.स.१८०८ मध्ये मृत्यू पावल्या नंतर त्यांचा वडील मुलगा प्रतापसिंह छत्रपती बनला. ते इंग्रजांनी पदच्युत करेपर्यंत म्हणजे ५ सप्टेंबर १८३९ पर्यंत छत्रपतीपदी विराजमान राहिले. त्यांच्या नंतर अप्पासाहेब उर्फ शहाजी ह्यांना इंग्रजांनी १८ नोवेंबर १८३९ ला सातारा गादीवर बसवले. अप्पासाहेब ५ एप्रिल १८४८ रोजी मरण पावले. मृत्यूनंतर सातारा राज्य इंग्रजांनी खालसा केले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *५ एप्रिल इ.स.१८६३* *छत्रपती चौथे शिवाजी महाराज कोल्हापूर संस्थान यांचा जन्म (करवीर राज्य)* *दुसरे छत्रपती राजाराम महाराजांच्या अकाली निधनानंतर करविर गादीवर ८ वर्षाचे नारायण दिनकरराव भोसले अर्थात छत्रपती चौथे शिवाजी महाराज छत्रपती झाले. चौथे शिवाजी महाराजांचा जन्म कोल्हापुर येथील सावर्डे येथे ५ एप्रिल १८६३ रोजी झाला. (सावर्डेकर भोसले घराण्यातून दत्तक घेतलेले) महाराज उंचपुरे रुबाबद व्यक्तीमहत्व होते.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* ⛳ *जय गडकोट*⛳ *!! हर हर महादेव !!* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री मंगेश चंद्रकांत वीर* ( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख ) मा श्री महेंद्र तानाजी देवघरे* ( अध्यक्ष पुणे जिल्हा ) मा श्री योगेशजी सुदामराव शेलार (प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏 शिवराय स्टेटस #🚩जय भवानी जय शिवाजी🚩
❤🚩शिवभक्त🚩❤
2.3K views
9 days ago
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल* *इतिहास शिवरायांचा* ********************************** *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *४ एप्रिल इ.स.१६६३* *(चैत्र शुद्ध सप्तमी, शके १५८५, संवत्सर शोभन, वार शनिवार)* *महाराजांची शाहिस्तेखानाला शास्त देण्याची तयारी!* *महाराजांची महाराजांचा मुक्काम यावेळी किल्ले रायगडावर होता. तेथून ते किल्ले राजगडला परतले. सरनौबत नेतोजी राजगडी दाखल झालेले होतेच. मोरोपंत पेशवे व निळोपंत मुजुमदार किल्ले सिंहगडावर गेलेले होते. राजगडी पोहोचताच महाराजांनी निवडक मुत्सद्यांसमवेत विचार विनिमय करून प्रत्यक्ष शाहिस्तेखानावरच हल्ला करण्याचा आपला धाडशी बेत त्यांना सांगितला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *४ एप्रिल इ.स.१६७०* *नगरमध्ये मराठे घुसलेले पाहून 'दाऊदखान कुरेशी' हा खानदेशातून त्वरेने नगरास ७००० स्वारांसह आलेला होता. नगरमध्ये घुसलेले मराठे आजच्या दिवशी जुन्नर प्रांतात पळाले. दाऊदखान त्यांच्यामागे हाथ धुवून पळत सुटला, जुन्नर प्रांतातूनही मराठे तात्पुरते पळून गेले. मग मात्र दमलेला दाऊदखान नगरला परतला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *४ एप्रिल इ.स.१६७२* *निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू !* *अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंतयोगी !!* *दि. ४ एप्रिल १६७२ – चैत्र वद्य द्वितीया, शके १५९४ या दिवशी समर्थ रामदास स्वामींनी शिवरायांना एक ओवीबद्ध पत्र पाठवले. “निश्चयाचा माहामेरू...” अश्या शब्दांनी सुरुवात होणारी आणि शिवरायांचे गुणसंकीर्तन करणारी ही शिवप्रशस्ती अलौकिक आहे. हे काव्य मोठे आहे पण त्यातील निवडक ओव्या गानकोकिळा लताबाई मंगेशकर यांनी आपल्या गोड गळ्याने गाऊन महाराष्ट्रातील घराघरात पोहोचवल्या आहेत. आजवर अनेक प्रतिभावंतांनी शिवरायांवर स्तुतीसुमने उधळली आहेत. शिवरायांना समकालीन असलेल्या कविन्द्र परमानंद, कवि भूषण, केशवराज पंडित अश्या अनेकांनी शिवाजी महाराजांना आपल्या उत्तुंग प्रतिभेच्या शब्दसामर्थ्याने गौरविले आहे. परंतु समर्थांनी, ‘निश्चयाचा माहामेरू’ या काव्यात शिवस्तुती करताना वापरलेल्या शब्दांची ऊंची कोणालाच गाठता आलेली नाही.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *४ एप्रिल इ.स.१६७४* *प्रतापराव रणांगणात पडले त्या दिवशी महाशिवरात्री होती.* *प्रतापराव व बहलोलखान यांच्यात झालेल्या युद्धाचे वर्णन नारायण शेणवी (इंग्रजांचा दुभाशी) हा डेप्युटी गव्हर्नर, मुंबई यांना ४ एप्रिल १६७४ रोजी लिहीलेल्या पत्रात लिहीतात.* *The Rajah Sevajee intended to proceed to currall to give a new orders to his army and to creat a New generall of his horse in the rooms of pertab roy (Pratap ray) Who fell in the encounter of Sevajees army with Bullool Ckaun in a narrow passage betwixt two hills who with six horse man more were slaine, being not succored by the rest of the army, so that Bullool ckaun remains victorius. (factory records of surat)* *राजे शिवाजी यांनी आपल्या फौजेला आज्ञा देण्यासाठी व नविन सरनोबत नियुक्त करण्यासाठी कुडाळ येथे जाण्याचा निर्णय घेतला त्याचे कारण असे की, सरनोबत प्रतापराव हे बहलोलखानाशी झालेल्या चकमकीत मारले गेले. ही चकमक दोन टेकड्यांच्या मधे असलेल्या अरुंद ठिकाणी (खिंडीत - नेसरीची खिंड) झाली. प्रतापरावांसोबत आणखी सहा घोडेस्वार मारले गेले. प्रतापरावांना वेळेवर सैन्याची मदत न पोहोचू शकल्याने ह्या सर्वांची कत्तल झाली. लढाईमद्धे बहेलोल खान विजयी ठरला.* *प्रतापराव बहलोलखानाशी फक्त ६ घोडेस्वारांनिशी लढताना बाकीच्या सैन्याचे अभावी मारला गेला. त्याचे जागी नविन सेनापती नेमून, सैन्याला नवे हुकूम देण्यासाठी शिवाजी कुडाळला जाणार होता. परंतु प्रतापरावाचा दुय्यम आनंदराव याने धीराचे पत्र लिहिल्यामुळे शिवाजीने त्याला सेनापती पद देऊन " शत्रूचा मोड केल्याशिवाय तोंड दाखवू नये." असा हुकूम केला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *४ एप्रिल इ.स.१६७४* *एप्रिल ३ रोजी दुपारी शेणवी गडावर जाऊन दरबारांत छत्रपती शिवाजीराजे यांस भेटला. निताजीपंत हजर होते. राजापूरची वखारीची लुट केल्याने इंग्रजांचे जें नुकसान झालें, त्यावर प्रामुख्याने बोलणी झाली. यावेळी निराजीपंताने इंग्रजांच्या या मुद्दयावर अपेक्षेबाहेर तरफदारी केली. छत्रपती शिवरायांच्या मनावर निराजीपंतांच्या विचारांचा परिणाम होऊन त्यांनी ताबडतोब कारकुनास हुकुम लिहिण्यास सांगितले. राजापूरच्या नुकसानीची भरपाई छत्रपती शिवाजीराजे यांनी तीन हप्त्यांनी करावयाची. नुकसानीच्या रकमेदाखल २५०० होन राजापूरच्या जकातीतून; २५०० होन १ सप्टेबरपासून सुरु होणाऱ्या १ ल्या वर्षी व उरलेले एकूण ५ हजार होन छत्रपती शिवाजीराजे यांनी पुढील दोन वर्षांत इंग्रजांस पोहोचते होण्याची व्यवस्था करावी, असें या कलमाचे स्वरूप होते. या कलमाने इंग्रजांचे झालेले नुकसान भरून दिले पाहिजे, हि गोष्ट तत्वतः व प्रत्यक्षतः छत्रपती शिवरायांनी स्पष्टपणे मान्य केली.* *नारायण शेणव्याचा हा मोठा विजय होता. त्याने ४ एप्रिल रोजी मुंबईच्या डेप्युटी गव्हर्नरला उद्देशून लिहिलेल्या पत्रात कळवले, ' येत्या जूनमध्ये राज्याभिषेक करून घेण्याच्या उद्देशाने छत्रपती शिवाजीराजे तयारी करीत आहे. सोनें, हिरे यांनी जडवलेले भव्य सिंहासन तयार होत आहे. असंख्य विद्वानांना बोलावणी जातील. रायगडावर फार मोठ्या प्रमाणात दानधर्म होईल. आता ऑक्झेंडनबरोबर छत्रपती शिवाजीकरिता चांगला नजराणा पाठवा. आरबी घोडा वगैरे न धाडता मूल्यवान रत्ने, राज्याभिषेकसमयी धारण करण्याजोगी पाठवावीत. नजराणा हजार बाराशे रुपयांचा पाठवावा.'* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *४ एप्रिल इ.स.१६८३* *(चैत्र वद्य तृतीया, शके १६०५, संवत्सर रुधिरोद्रारी, वार बुधवार)* *छत्रपती संभाजी महाराजांचा तारापूर, डहाणू व अशेरी भागावर हल्ला!* *एकीकडे पोर्तुगीज छत्रपती संभाजी महाराजांशी तह करून वरवर आपले सलोख्याचे संबंध आहेत असे दाखवत होते आणि त्याच सुमारास औरंगजेबाचा एक दुत गोव्याच्या विजरईशी वाटाघाटी करण्यासाठी आला होता. अशा स्वरूपाच्या छुप्या गोष्टी कोंट-द-अल्वारे पत्ररूपाने करत असल्याचे छत्रपती संभाजी महाराजांना समजले आणि मग या विश्वासघातकी पोर्तुगिजांना चांगलाच धडा शिकविण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी ठाणे जिल्ह्यातील डहाणू, सिरीगाव (शिरगाव), असेरी (अशेरी), सैबाण (बहुधा सायवन), तारापूर या पोर्तुगीज ठाण्यावर प्रचंड हल्ला करून अनेक खेडी जाळली. छत्रपती संभाजी महाराजांच्या सैन्याने केलेल्या हल्ल्यामुळे बदला म्हणून कोंट-द-अल्वारेने छत्रपती संभाजी महाराजांचे गोव्यातील वकील येसाजी गंभीरराव यांना अटक करून नजरकैदेत ठेवले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *४ एप्रिल इ.स.१६८७* *छत्रपती संभाजी महाराज मोगलांवर बाहेरून हल्ले चढविण्याकरिता व सर्वत्र रसद मारून मोगली सैन्य जेर करण्यासाठी आपल्या सैनिकासह गोवळकोंड्याभोवती हिंडत होते. त्यांचे कर्नाटकातील सैन्यही नाकेबंदी करून राहिले होते. मच्छलीपटणचे दिनांक ४ एप्रिल १६८७ चे फोर्ट सेंट जॉर्जला लिहिलेल्या पत्रात छत्रपती संभाजीराजे १२ हजार स्वार व ५० हजार पायदळ लोकांसह गोवळकोंडा याच्या रोखाने गोवळकोंड्यापासून ४/५ दिवसांच्या मुक्कामावर आले आहेत असा मजकूर आहे. गोवळकोंड्याचा सुलतान मोगलांच्या हल्ल्याचा जोरात प्रतिकार करीत होता.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *४ एप्रिल इ.स.१७०३* *सिंहगडचा रणसंग्राम* *४ एप्रिल१७०३ ला तर सेनापती धनाजी जाधवांचा पुत्र शम्भूसिंह जाधवने म्हलर्जी व खंडोजी च्या सोबतीने ४ हजार घोडदळ सकट इराडत खानाच्या ठाण्यावर हल्ला केला. हे ठाणे बादशाही छावणीच्या रक्षणाच्या हेतूने छावणी पासून केवळ ४ कोस दूर होते.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* ⛳ *जय गडकोट*⛳ *!! हर हर महादेव !!* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री मंगेश चंद्रकांत वीर* ( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख ) मा श्री महेंद्र तानाजी देवघरे* ( अध्यक्ष पुणे जिल्हा ) मा श्री योगेशजी सुदामराव शेलार (प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏 शिवराय स्टेटस #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜
❤🚩शिवभक्त🚩❤
859 views
10 days ago
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल* *इतिहास शिवरायांचा* ********************************** *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *३ एप्रिल इ.स.१६८०* *(चैत्र वद्य द्वितीया, शके १६०३, संवत्सर सिद्धार्थी, वार सोमवार)* *महाप्रतापी स्वराज्य सुर्य अंधारला. हिंदवी स्वराज्य संस्थापक (निर्माते) महाराजांना देवाज्ञा!* *आपले स्वराज्य पोरके करून छत्रपती शिवाजी महाराजांचे महानिर्वाण झाले. रयत पोरकी झाली. मोहरीएवढ्या बिजातून एक अंकुर उमलावा व पाहता पाहता त्याचे वटव्रृक्षांत रुपांतर व्हावे. अफाट पसारा व्हावा असे हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवरायांच्या संकल्पनेतून साकारले होते. उण्यापुर्‍या ३५ वर्षांच्या कारकिर्दीत पुण्याच्या ३६ गावच्या पोटमोकासेदारीने पुणे जहागिरीतील आजुबाजूच्या सवंगड्यांच्या साथीने महाराजांनी हिंदवी स्वराज्याची सुरूवात आपल्या रक्ताभिषेकाने केली. पाहता पाहता महाराजांच्या मागे स्वराज्य उभे राहिले. संवगडी उभे राहिले. या सवंगड्यांच्या साथीने स्वराज्याचे हिंमतीचे पायदळ उभे राहिले अन् महाराज त्या पायदळाचे नेतृत्वकर्ते ठरून "नरपती" झाले. हळूहळू पायदळाबरोबर अश्वदल उभे राहिले. पागा सजल्या. पागेत घोडी फुरफुरू लागली अन् महाराज "हयपती" झाले. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून, गिरीकंदरातून राजांचे विजयी अश्व दौडू लागले. गजांतलक्ष्मी दारी येऊ लागली महाराज अन् "गजपती" झाले. रोहिडा, तोरणा घेऊन स्वराज्याचे तोरण बांधणारे राजे पुढे प्रतापगड, राजगड, रायगड, पुरंदर, सिंधुदुर्ग अशा अनेक किल्ल्यांवर स्वराज्याची तोरणे बांधली गेली. अन् महाराज "गडपती" झाले. याच बुलंद गडांनी परिसराची भुमी गडाच्या बलदंड आश्रयाने मुक्त होऊ लागली. आनंदवनभुवनी असल्याचा अनुभव जनतेला आला. अन् महाराज "भुपती" झाले. खळाळल्या समुद्रावर तरांडी फिरून स्वराज्यांच्या भगव्याची पताका सागरावर डौलाने फडकू लागली. अन् महाराज "जलपती" झाले. आणि मग तमाम मराठी साम्राज्याची मान ताठ मानेने उंचावेल असे महाराज रायगडी सिंहासनाधीश्वर झाले अन् महाराज "छत्रपती" झाले. या साऱ्यांचा नुसता विचार जरी आपण केला तरी मन थक्क होऊन नतमस्तक व्हावे असा पसारा महाराजांनी मांडला. तमाम मराठी मनगटांत चैतन्य निर्माण करून ताठ मानेने हिंदु म्हणून जगण्याचा अधिकार छत्रपती शिवरायांनी रयतेला दिला. असे महाराज हे शिवयोगी जाण्याने ३ एप्रिल इ.स.१६८० रोजी स्वराज्य पोरके झाले. शिवभारत संपले अन् स्रृष्टी हिंदोळली. शककर्ते छत्रपती शिवराय यांना त्यांच्या महानिर्वाणदिनी त्रिवार मुजरा...* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *३ एप्रिल इ.स.१६६३* *कोंढाणे जिंकण्यासाठी तानाजी मालुसरे यांची च का निवड केली? ३ एप्रिल १६६३ ला महाराजांनी पेशवे मोरोपंत पिंगळे व सोनदेव मुजुमदार यांना लिहिलेल्या पत्रात कोंढाणा किल्यावर फितुरी आहे. त्या साठी तान्हाजी मालुसरे यांना पाठवण्यात आले. या काळात तानाजी मालुसरे यांना गडाची खडा न खडा माहिती होती.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *३ एप्रिल इ.स.१६६७* *आग्र्याहून सुटका प्रकरणानंतर औरंगजेब व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात युद्धबंदीचा तह झाला. आग्र्याहून सुटका प्रकरणात सापडलेले रघुनाथ बल्लाळ कोरडे व त्र्यंबक सोनदेव डबीर यांना औरंगजेबाने सोडले. माहिती काढण्यासाठी यांचे अनन्वयीत हाल केले गेले पण या स्वामी निष्ठांनी तोंडही उघडले नाही.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *३ एप्रिल इ.स.१६७४* *इ.स.१६७४ मध्ये इंग्रजांची शिवाजी महाराजांसोबत तहाची बोलणी सुरू होती. यावेळी नारायण शेणवी सोबत मुख्य वकील म्हणून हेन्री ऑक्झेंडरची नेमणूक करण्यात आली. ३ एप्रिल रोजी दुपारी शेणवी आणि इंग्रज वकील शिवाजी महाराजांनी भेटला यावेळी राजापूरच्या वखारीची लुट केल्याने इंग्रजांचे जे नुकसान झाले होते त्याची भरपाई मिळावी याबद्दलची बोलणी झाली. शिवाजी महाराजांनी भरपाई देण्याचे मान्य केले. नुकसानीच्या रकमेबद्दल २५०० होन राजापूरच्या जकातीतून , २५०० होन १ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्यावर्षी व उरलेले ५००० होन पुढील दोन वर्षात द्यावे असे शिवाजी महाराजांनी मान्य केले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *३ एप्रिल इ.स.१६७४* *"भीमजी पारख" मुद्रणयंत्राचा (प्रिंटिंग मशीन) पहिला भारतीय मालक...* *"भीमजी पारख" हे इस्ट इंडिया कंपनीचे दलाल म्हणून काम करत असत. त्यांना (इंग्रजांच्या भाषेत) काही "ब्राह्मणी लिखाण छापण्यासाठी" (बहुदा देवनागरी असावे) मुद्रणयंत्र, मुद्रक व कागद हवे होते त्यासाठी त्यांनी जानेवारी १६७१ रोजी कंपनीकडे यांची मागणी केली होती. तब्बल तीन वर्षांनी म्हणजेच दिनांक ३ एप्रिल सन १६७४ रोजी भीमजी पारख यांना मुंबईत मुद्रणयंत्र (प्रिंटिंग मशीन), मुद्रक (छापणारा कारागीर) व कागद पाठविण्यात आले. मुद्रकाचा पगार दरसाल पन्नास पाऊंड ठरविण्यात आला होता.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *३ एप्रिल इ.स.१६७९* *(वैशाख शुद्ध तृतीया, शके १६०१, संवत्सर सिद्धार्थी, गुरुवार)* *शंभूराजे दिलेर खानासह भूपाळगडावर :-* *दिलेरखानाने छत्रपती संभाजी महाराज त्यांच्याकडे आल्याचा फायदा घेऊन मराठी मुलखांतील प्रदेश जिंकण्यास सुरुवात केली. छत्रपती संभाजी महाराज दिलेरखानाकडे गेल्यावर दिलेरखान व छत्रपती संभाजी महाराज यांनी ३ एप्रिल १६७९ रोजी स्वराज्यातील भूपाळगड जिंकला. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला मांजऱ्यानजीकच्या पर्वतावर बांधून त्याचे भूपाळगड असे नाव ठेविले होते. या किल्ल्यावर सामान, सरंजाम आणि मालमत्ता ठेवण्यात येत असे. गडावर लढाऊ शिबंदी व शूर शिपायांचा पक्का बंदोबस्त केलेला होता. मोगलांची फौज येत आहे असा पुकारा होतांच किल्ल्यांच्या आसमतांतील गावचे लोक किल्ल्यांत आश्रयास जाऊन राहिले. दिलेरखानाने शंभुराजेंच्या मदतीने भूपाळगड किल्ला घेतला. या वेळा किल्ल्यांचे किल्लेदार फिरंगोजी नरसाळा हे होते. दिलेरखानाने भूपाळगडची तटबंदी पाडून टाकली. यानंतर दिलेरखान व शंभुराजे विजापूरवर चालून गेले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *३ एप्रिल इ.स.१७९१* *धारवाड किल्ल्यावर मराठा भगवा टिपू सुलतानच्या धारवाड किल्ल्यावर हल्ला करणाऱ्या मराठा-इंग्रज फौजेचे नेतृत्व परशुरामभाऊ पटवर्धन करीत होते. ३ एप्रिल १७९१ रोजी किल्लेदाराने किल्ला रिकामा करून मराठ्यांच्या स्वाधीन केला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *३ एप्रिल इ.स.१९४८* *अजेय असा हा जंजिरा, २० सिद्दी सत्ताधीशांनंतर आलेल्या सिद्दी मुहमंदखान हा शेवटचा सिद्दी असताना, व त्या राज्याच्या स्थापनेनंतर ३३० वर्षांनी, म्हणजे ३ एप्रिल १९४८ रोजी ते राज्य भारतीय संघराज्यात विलीन झाले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* ⛳ *जय गडकोट*⛳ *!! हर हर महादेव !!* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री मंगेश चंद्रकांत वीर* ( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख ) मा श्री महेंद्र तानाजी देवघरे* ( अध्यक्ष पुणे जिल्हा ) मा श्री योगेशजी सुदामराव शेलार (प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🙏शिवदिनविशेष📜 #🙏 शिवराय स्टेटस #📜इतिहास शिवरायांचा #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🚩छत्रपति शिवाजी महाराज