Follow
Sachin
@schn30
1,630
Posts
1,399
Followers
Sachin
680 views
15 hours ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *१० जून इ.स.१६६१* छत्रपती शिवरायांची 'कल्याण-भिवंडी'कडे मोहिम. *१० जून इ.स.१६६४* विजापूर बादशाहाने सिद्दी अझीजखान यास महाराजांविरूद्ध तळकोकणावर रवाना केले. पण त्याने एकदम अल्लाघरीच स्वारी केली. या मोहिमेत तो एकाएकी मरण पावला. *१० जून इ.स.१६७६* छत्रपती शिवरायांच्या 'दक्षिण दिग्विजय' मोहिमेस सुरुवात. राजाभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी 'दक्षिण दिग्विजय' मोहिम आखली. गोवळकोंडयाच्या कुतुबशाही बरोबर सख्य करून विजापुरच्या आदिलशाहीचा नाश करायचा हे या मोहिमेमागचे सूत्र होते. *१० जून इ.स.१६८१* औरंगजेबचा मुलगा पाछ्चा उर्फ़ अकबर छत्रपती संभाजी महाराजांच्या शरणार्थी आला. त्यास संभाजी राजांनी नेतोजी पालकर आणि हीरोजी फर्जद यांसमवेत पाली येथील सुधागड जवळ ठेवीले. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
Sachin
439 views
1 days ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *९ जून इ.स.१६५९* छत्रपती शिवरायांनी सिद्दीवर स्वारी करून विजय मिळविला. *९ जून इ.स.१६८०* दक्षिणेचा सुभेदार नेमलेला खान खानजहान बहाद्दूर औरंगाबादला पोहचला व त्याने लगेच मराठ्यांच्या ताब्यात असलेल्या हनुवंतगडास (अहिवंतगड) वेढा घातला. *९ जून इ.स.१६८२* छत्रपती संभाजी महाराजांनी गुजरात सीमेवरील "खंबायत" व "रामनगर" जिंकले. *९ जून इ.स.१६९६* छत्रपती राजाराम आणि महाराणी ताराबाई यांना तामिळनाडू येथील जिंजी किल्ल्यावर पुत्ररत्न झाले. मुलाचे नाव 'शिवाजी' ठेवले. *९ जून इ.स.१७००* दख्खन स्वारीवर असलेल्या औरंगजेबाने सज्जनगड जिंकला. *९ जून इ.स.१७१८* पूर्ण ताकदीनिशी इंग्रज सरखेल कान्होजी आंग्रेंच्या विजयदुर्ग येथील आरमारावर चालून गेले. बरेचसे आरमार आंग्र्यान्नी पावसाळ्यासाठी नांगरुन ठेवले होते. तरीसुद्धा उत्कृष्ट संरक्षण क्षमता आणि सागराचा वापर ह्यामुळे इंग्रज ९ दिवस प्रयत्न करून पराभूत होउन मुंबईला परत गेले. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
Sachin
524 views
2 days ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *८ जून इ.स.१६४९* *_छत्रपती शिवरायांनी चाकणचा संग्रामदुर्ग घेतला._* *८ जून इ.स.१६६६* आग्रा कैदेत असताना छत्रपती शिवरायांनी सोबत असलेला काही अनावश्यक फौजफाटा औरंगजेबाचे परवाने घेऊन स्वराज्याकडे पाठविण्यास सुरूवात केली. *८ जून इ.स.१६७०* पुरंदरच्या तहात गमावलेला रोहिडा किल्ला शिवरायांनी पुन्हा जिंकून घेतला. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
Sachin
3.9K views
3 days ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *७ जून इ.स.१६६६* छत्रपती शिवरायांचे आग्र्याहून सुटका प्रकरण. छत्रपती शिवरायांनी आपल्यासोबत आणलेल्या फौजेला राजा देऊन घरी पाठवण्यासाठी औरंगजेबाकडे परवाने मागितले. *७ जून इ.स.१६६६* छत्रपती शिवरायांचे आग्र्याहून सुटका प्रकरण. छत्रपती शिवरायांनी रामसिंगला आपल्या जामिनकीतून मुक्त होण्यास सांगितले परंतू रामसिंगने स्पष्ट नकार देत आपली जबाबदारी सोडली नाही. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
Sachin
948 views
4 days ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *#शिवचरित्र_एक_प्रेरणा* *#शिवराज्याभिषेक एक नवीन युगपर्व* मातृभूमीची परकीय अमलापासून मुक्तता म्हणजेच हिंदवी स्वराज्याची स्थापना हे शिवछत्रपतींचे जीवनकार्य होते या कार्यासाठी त्यांनी हयातभर अविरत कष्ट घेतले आणि १६७४ साली स्वतःस राज्याभिषेक करवून या कार्यास राजनैतिक व कायदेशीर अधिष्ठान प्राप्त केले. आपले ध्येय साध्य करीत असता त्यांनी आपल्या अंगच्या असामान्य राजकीय व लष्करी गुणांचे प्रकटीकरण केले त्यांची कर्तबगारी ही फक्त राजकीय व लष्करी क्षेत्रांपुरती मर्यादित नव्हती स्वराज्याच्या उभारणीबरोबर त्यांनी त्याचे अत्यंत कार्यक्षम व लोकाभिमुख असे प्रशासन निर्माण केले. शिवछत्रपतींची ही कामगिरी त्यांच्या लष्करी पराक्रमांइतकीच महत्त्वाची आहे. सामान्यातील सामान्य माणसाचे विशेषतः गोरगरीब रयतेचे कल्याण व संरक्षण हे या प्रशासनाचे मुख्य सूत्र असल्याने हिंदुस्थानच्या इतिहासात 'रयतेचा राजा' म्हणून त्यांची प्रतिमा निर्माण झाली आहे.शिवपूर्वकालीन हिंदुस्थानात परिस्थिती अत्यंत बिकट होती इस्लामी राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राची भूमी आक्रमित करून एतद्देशीय लोकांवर केवळ राजकीयच नव्हे, तर सामाजिक व सांस्कृतिक गुलामगिरी लादली होती. सलग तीनशे वर्षे महाराष्ट्र इस्लामी राज्यकर्त्यांच्या सर्वंकष गुलामगिरीत खितपत पडला होता. मराठ्यांचे तत्कालीन पुढारी सुलतानांची चाकरी करण्यातच धन्यता मानीत होते छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांची गुलामगिरीची मानसिकता तोडली आणि हिंदवी स्वराज्याची स्वतंत्र व सार्वभौम राज्याची स्थापना केली महाराजांचे हे कार्य हे एक युगकार्य मानले गेले महाराष्ट्र सारख्या छोट्याशा राज्यातून पेटलेली एक ठिणगी पूर्ण हिंदुस्थानात पसरली या हिंदुस्थातील गुलामगिरी सहन करत खितपत पडलेल्या लोकांना स्वाभिमान या शब्दाचा खरा अर्थ कळला सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा #🚩शिवराज्याभिषेक: एकच धून 6 जून📢 #🚩शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा👑 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
Sachin
793 views
4 days ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *#शिवचरित्र_एक_प्रेरणा* *#शिवराज्याभिषेक एक नवीन युगपर्व* मातृभूमीची परकीय अमलापासून मुक्तता म्हणजेच हिंदवी स्वराज्याची स्थापना हे शिवछत्रपतींचे जीवनकार्य होते या कार्यासाठी त्यांनी हयातभर अविरत कष्ट घेतले आणि १६७४ साली स्वतःस राज्याभिषेक करवून या कार्यास राजनैतिक व कायदेशीर अधिष्ठान प्राप्त केले. आपले ध्येय साध्य करीत असता त्यांनी आपल्या अंगच्या असामान्य राजकीय व लष्करी गुणांचे प्रकटीकरण केले त्यांची कर्तबगारी ही फक्त राजकीय व लष्करी क्षेत्रांपुरती मर्यादित नव्हती स्वराज्याच्या उभारणीबरोबर त्यांनी त्याचे अत्यंत कार्यक्षम व लोकाभिमुख असे प्रशासन निर्माण केले. शिवछत्रपतींची ही कामगिरी त्यांच्या लष्करी पराक्रमांइतकीच महत्त्वाची आहे. सामान्यातील सामान्य माणसाचे विशेषतः गोरगरीब रयतेचे कल्याण व संरक्षण हे या प्रशासनाचे मुख्य सूत्र असल्याने हिंदुस्थानच्या इतिहासात 'रयतेचा राजा' म्हणून त्यांची प्रतिमा निर्माण झाली आहे.शिवपूर्वकालीन हिंदुस्थानात परिस्थिती अत्यंत बिकट होती इस्लामी राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राची भूमी आक्रमित करून एतद्देशीय लोकांवर केवळ राजकीयच नव्हे, तर सामाजिक व सांस्कृतिक गुलामगिरी लादली होती. सलग तीनशे वर्षे महाराष्ट्र इस्लामी राज्यकर्त्यांच्या सर्वंकष गुलामगिरीत खितपत पडला होता. मराठ्यांचे तत्कालीन पुढारी सुलतानांची चाकरी करण्यातच धन्यता मानीत होते छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांची गुलामगिरीची मानसिकता तोडली आणि हिंदवी स्वराज्याची स्वतंत्र व सार्वभौम राज्याची स्थापना केली महाराजांचे हे कार्य हे एक युगकार्य मानले गेले महाराष्ट्र सारख्या छोट्याशा राज्यातून पेटलेली एक ठिणगी पूर्ण हिंदुस्थानात पसरली या हिंदुस्थातील गुलामगिरी सहन करत खितपत पडलेल्या लोकांना स्वाभिमान या शब्दाचा खरा अर्थ कळला सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा #🚩शिवराज्याभिषेक: एकच धून 6 जून📢 #🚩शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा👑 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
Sachin
696 views
5 days ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *५ जून इ.स.१६६६* आग्रा कैदेत असताना छत्रपती शिवरायांना ठार मारण्याचा नविन प्रस्ताव "जहाॅंआरा बेगम" च्या मध्यस्तीने औरंगजेबने मागे घेतला. *५ जून इ.स.१६६६* आग्रा कैदेत छत्रपती शिवरायांच्या जीवास धोका असल्याचे समजताच मिर्झाराजे जयसिंगाचा मुलगा "रामसिंग" याने शिवरायांच्या निवासस्थानाबाहेर विश्वासातील अर्जुनसिंह कछवाह, सुखसिंह नाथावट आणि तेजसिंह यांच्यामार्फत पहारा चालू केला. *५ जून इ.स.१६७२* युवराज संभाजीराजेंनी स्वतंत्रपणे मोहीम सुरू करून मोरोपंत त्र्यंबक पिंगळे (शिवाजी महाराजांचे पंतप्रधान)" यांच्या साथीने जव्हार" परगणा जिंकून मुक्त केका. *५ जून इ.स.१६७४* छत्रपती शिवाजी महाराजांनी संपुर्ण विधी पुर्ण केला. #🚩शिवराज्याभिषेक: एकच धून 6 जून📢 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
Sachin
611 views
6 days ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *४ जून १६७४* ज्येष्ठ शुद्ध एकादशी, शके १५९६ दि. ४ जून १६७४ रोजी रात्री निर्ऋतियाग झाला. या यागात इतर यागद्रव्यांसोबतच पक्व व अपक्व मांस, मत्स्य व सुरा यांचेही बलिदान झाले. कृष्णवस्त्र धारण करून हा विधी केला. कृष्ण पुष्य गंधानेच पूजा केली. हा विधी आटोपल्यावर शुभ्र वस्त्र परिधान करून पुण्याहवाचन झाले. गोदान, दक्षिणा होऊन त्यादिवशीचा सोहळा आटोपला. *४ जून इ.स.१६५७* छत्रपती शिवरायांनी अहमदनगरवर हल्ला केला. नसीरखाना सोबत झालेल्या या हल्ल्यात महाराजांनी ७०० घोडे व काही हत्ती काबीज केले. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
Sachin
2.3K views
7 days ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *३ जून इ.स.१६७३* छत्रपती शिवराय व थोमास निकल्स यांची किल्ले रायगडावर भेट. *३ जून इ.स. १६७४* छत्रपती शिवरायांनी राज्याभिषेकासाठी निरगती याग, पूजा, गोदान केले. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
Sachin
724 views
8 days ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *२ जून इ.स.१६६४* छत्रपती शिवराय किल्ले कोंढाणा(सिंहगड)किल्ल्यावर दाखल झाले. किल्ला लढवलेल्या शुर मावळ्यांचा महाराजांनी मानसन्मान केला. *२ जून इ.स.१६६५* किल्ले पुरंदरची माची व पाच बुरुज मुघलांच्या ताब्यात गेले. *२ जून इ.स.१६७४* छञपती शिवरायांनी राजाभिषेकापूर्वी नक्षञयञ आणि उत्तरपूजन विधी केले. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏