Follow
Sachin
@schn30
1,602
Posts
1,329
Followers
Sachin
420 views
8 hours ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *१४ मार्च इ.स.१६४९* छत्रपती शिवरायांनी शहाजीराज्यांच्या सुटकेसाठी शाहजहानचा मुलगा आणि दख्खनचा सुभेदार शहजादा मुराद यास पत्र पाठविले. छत्रपती शिवाजी राजांच्या दख्खनेमधल्या कारवायांच्या बदल्यात अफझलखानाने शहाजीराजांना २५ - २८ जुलै १६४८ च्या दरम्यान जिंजी येथे अटक केली होती. ह्या पत्राने विजापुरच्या आदिलशहा वर दबाव पडून २ महिन्यानंतर महाराज शहाजीराजांची सुटका झाली. मात्र त्या बदल्यात शिवरायांना सिंहगड विजापुरला परत द्यावा लागला. *१४ मार्च इ.स.१६६५* छत्रपती शिवराय भिवगडावर मुक्कामी होते. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
Sachin
633 views
1 days ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *१३ मार्च इ.स.१६६५* मुघल सरदार "मिर्झाराजा जयसिंग" व "दिलेरखान" यांनी "किल्ले पुरंदर" ला वेढा घातला. *१३ मार्च इ.स.१६७९* छत्रपती शिवरायांनी "दाबोळपूर" जिंकले. छत्रपती शिवरायांनी कर्नाटकातील भाग जिंकण्यासाठी सरनौबत हंबीरराव मोहिते यांना पाठवले होते .सेनापती आनंदराव मकाजी यांनी जोरदार हल्ला चढऊन दोबाळपुर जिंकून घेऊन तो भाग स्वराज्यात आणला . #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
Sachin
637 views
2 days ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *१२ मार्च इ.स.१६६४* *सुरतकरांनी कंपनीस एक पत्र पाठविले ते असे :* छत्रपती शिवाजी महाराजांची सत्ता व सामर्थ्य वाढत असून सर्वांना त्याचे भय वाटते... आज त्यांच्या ताब्यात काही नाही तरी आठ नऊ महत्त्वाची बंदरे आली आहेत. या प्रत्येक बंदरातून इराण, बसरा, मक्का या बाजूला त्याची निदान दोन तीन गलबते व्यापारानिमित्त बाहेर पडतात. या व्यापारार्थ बाहेर पडणाऱ्या महाराजांच्या गलबतांना पकडून इंग्रजांना आपल्या वखारीच्या लूटीची भरपाई करुन घ्यायची होती त्यासाठी टपून बसले होते.छत्रपती शिवरायांनी आता मोठ्या आरमारी स्वारीचा बेत आखला होता. त्याचे नेतृत्व ते स्वतः करणार होते त्यानुसार फेब्रुवारी १६६५ रोजी छत्रपती शिवराय मालवण येथील सिंधुदूर्गाहून ८५ लहान गलबते व ३ मोठी गलबते घेऊन बार्सिलोर (बसनूर) वर निघाले त्यांच्या बरोबर ४००० सैन्य होते. बसनूर हे शहर छत्रपती शिवरायांनी लुटले. या स्वारीचे वर्णन सभासद बखरकार करतो - " शहरांचे लोक बेहुशार होते. एकाएकी जहाजांतून मराठे उतरले, शहर मारिले एक दिवस शहर लुटून केले. जैशी सुरत मारुन मालमत्ता आणली त्याप्रमाणे बसनूरची मालमत्ता, अगणित माल, जडजवाहीर, कापड जिन्नस घेऊन देशास आले. *१२ मार्च इ.स.१६७३* *"कोंडाजी फर्जद" आणि इतर फक्त ६० मावळ्यांनी जिंकलेला "किल्ले पन्हाळा" पाहण्यासाठी छत्रपती शिवराय पन्हाळ्यावर आले. *१२ मार्च इ.स.१७०१* *स्वातंत्र्यसौदामिनी स्वराज्याची मुत्सद्दी महाराणी ताराबाईंवर* बादशहाने जोरदार आक्रमणे सुरु केली. याकाळात ताराराणींनी कुशल युद्धनीतीने मात केली. बादशहाच्या फौजेने वेढा दिलेला किल्ला जास्तीत जास्त काळ लढवायचा पावसाळा जवळ येईपर्यंत किल्ला लढवायचा व नंतर वाटाघाटी करून रोख रक्कम घेऊन किल्ला बादशहाच्या ताब्यात द्यायचा ही रणनीती वापरली. वेढ्यातल्या सैन्यावर मराठे आक्रमण करतच याचबरोबर धनाजी जाधव, हणमंतराव निंबाळकर, नेमाजी शिंदे मोगली मुलखात धुमाकूळ घालत यांना रोखण्यासाठी बादशहा दाऊदखान, राव डाळपात बुंदेला, शहजादा बेदरबख्तत, जुल्फिरखान यांना पाठवत. औरंगजेबाचा चरित्रकार भीमसेन सक्सेना म्हणतो एकट्या जुल्फिरखानाला १७०० च्या मोहिमेत २००० कोसांच्या हालचाली कराव्या लागल्या. सातारा, परळी दोन किल्ले घेतल्यानंतर बादशहा माणदेशात सरकला. पुढे त्याने पन्हाळा-पावनगडास वेढा घातला या परिस्थिती मराठे जोमाने लढत होते. विठोजी केसरकरांनी गडाबाहेर पडून मोर्चा मारल्यानंतर त्यांचे कौतुक करणारे पत्र ताराराणींनी लिहिले त्यातून त्यांनी जिद्द व आत्मविश्वास वाढविला "तुम्ही हमेशा कस्त करून गनिमास नजिता पावविता. एक दोन वेळ मोर्चा मारिला. औरंगजेबाला तरी ठेचगा द्यावा अशी उमेद धरता, म्हणून हे वर्तमान देवजी रघुनाथ व फडणीस यांनी विदित केले त्यावरून तुमचा मुजरा झाला. ऐसियास तुम्ही एकनिष्ठ सेवक तैसेच राहा. याउपरी औरंगजेब आला आहे तरी त्याचा हिसाब न धरता स्वामींची जागा जतन करणे. स्वामी उर्जित हरबाब करतील. दिलासा असो देणे." १२ मार्च १७०१. बादशहा विशाळगडाकडे येतोय हे समजताच ताराराणी व शिवाजीराजे प्रतापगडावर पोहचल्या. या प्रसंगी ताराराणींनी मराठा सरदार प्रतापराव मोरे यांना लिहलेले एक पत्र उपलब्ध आहे ज्यावरून त्यांचे लढाईचे धोरण, सरदारांशी वागणूक, शत्रूशी लढण्याचा निर्धार दिसून येतो. त्यातील एक वाक्य असे "औरंगजेब विशाळगडास बिलगला याजकरिता त्याचे कविलावाड मारून हमेशा गोटावर हल्ले करावेत, तरीच तो बलकुबल राहतो. याजकरिता तुम्ही लोक आपले अवघे एकदील होऊन औरंगजेबास जडून राहणे. तुम्ही स्वामींचे एकनिष्ठ सेवक, मायेचे विश्वासू आहा.* #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
Sachin
27.1K views
3 days ago
#🙏छत्रपती संभाजी राजे बलिदान दिन😔 *#शिवविचार_प्रतिष्ठान* ११ मार्च इ.स.१६८९ #छत्रपती_संभाजी_महाराज_बलिदानदिन... औरंगजेबाची अखेरंची सजा, "संभाजींच मस्तक कलम करा". आणि राजांच मस्तकं छाटलं गेलं. भाल्याच्या फाळाला अडकवलं आणि ""गुढीपाडव्याच् या आदल्या दिवशी महाराष्ट्रात छत्रपती शंभुराजेंच्या मस्तकाची गुढी उभारंली". निघाली वाजत...गाजत! आली "इंद्रायणी - भीमेच्या" तीरावरं त्या रेतीत रोवला तो भल्याचा फाळं आणि मस्तकातनं रक्ताचा एक थेंब पडला "इंद्रायणी - भीमेच्या" पात्रात आणि थरारली ""इंद्रायणी - भीमा"" अरे!!! याच "इंद्रायणी - भीमेनं" पाहिलं होतं ते शौर्य, ते धाडसं, ते साहसं, तो पराक्रम, ती ज्वलाज्वलन तेजसनिष्ठा, ते धैर्य, तो संयम, मानवी जीवनाच्या चिरंतन तत्वाशी जुळंलेलं "संभाजींच" ज्ञाननातं. ती "इंद्रायणी - भीमा" छत्रपती संभाजी राज्याच्या मस्तकाकडं तिरक्या माना करून आसवं ढाळू लागल्या. गेली ३५० वर्ष झाली "इंद्रायणी - भीमा" अजून रडतेचाय. सांगतेय! खरा "सर्जा संभाजीराजा" अजून कळंलाच नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं...कसं जगावं!!! आणि छत्रपती संभाजी महाराजांनी दाखवंल...क मरावं!!!...ती "इंद्रायणी - भीमा" आजही सांगतेय........ या स्वराज्याच्या धाकल धन्यास त्रिवार मानाचा मुजरा. !! जय जिजाऊ ! जय शिवराय ! जय शंभूराजे 🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
Sachin
722 views
5 days ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *९ मार्च इ.स.१६६८* छत्रपती शिवरायांनी आदिलशाही, कुतुबशाही, मोगलशीही, इंग्रज, सिध्दी, पोर्तुगिज, डच इ. सत्तांना आव्हान देऊन स्वराज्याची स्थापना केली. शिवरायांचे नाव संपूर्ण हिंदुस्थानात गाजत होते. याचमुळे औरंगजेबाने शिवरायांना नाईलाजाने "राजा" ही पदवी बहाल केली. *९ मार्च इ.स.१६७३* *"कोंडाजी फर्जद" यांनी जिंकलेला "किल्ले पन्हाळा" पाहण्यासाठी "छत्रपती शिवराय" किल्ले रायगडावरून सरनोबत प्रतापराव गुजर यांच्यासोबत निघाले #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
Sachin
640 views
6 days ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *८ मार्च इ.स.१६७०* पुरंदरच्या तहात गमावलेला पुरंदर वज्रगड निळोपंत मुजुमदारांनी छापा घालून मोगलांकडून कब्जा केला. किल्लेदार रसिउद्दिन पंतांच्या हाती पडला. गड फत्ते झाला. ज्या पुरंदरासाठी दिलेरखान व मिर्झाराजांनी जंग जंग अतोनात प्रयत्न केले, आणि तरिही अखेरपर्यंत जो त्यांना मिळाला नाही, तोच पुरंदर निळोपंतांनी २४ तासात काबीच केला. *८ मार्च इ.स.१६८९* मोगल बादशाह औरंगजेब याने छत्रपती संभाजी राजे यांना कैद केले व त्यानंतर मराठा साम्राज्य सर्वस्वी संपवावे म्हणून आपल्या झुल्फिकारखान नावाच्या सरदाराला फौजेनिशी छत्रपती राजाराम महाराज होते त्या रायगड किल्ल्याला वेढा घालायला पाठवून दिले. दि ८ मार्च १६८९ या दिवशी तो आपल्या सैन्यासह महाड येथे तळ टाकून बसला. पुढील आज्ञेनुसार दि २५ मार्चला त्याने रायगडाला वेढा दिला. *८ मार्च इ.स.१७३१* मराठ्यांनी पेशवे बाजीराव यांच्या नेतृत्वाखाली निजामाचा सुरतेजवळ पराभव केला. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
Sachin
658 views
8 days ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *६ मार्च इ.स.१६७३* *#वीर_कोंडाजी_फर्जंद_यांचा_महापराक्रम* *"किल्ले पन्हाळा जिंकण्यासाठी केवळ ६० मावळ्यांना सोबत घेऊन शत्रूच्या २५०० ते ३००० फौजेविरूद्ध लढा देऊन फक्त ३ तासात ती लढाई व किल्ला जिंकणारे वीर कोंडाजी फर्जंद यांची शौर्यगाथा...* *जगाच्या इतिहासात एवढ्या कमी सैन्याने एवढ्या जास्त सैन्याचा कमीत कमी वेळेत केलेला हा एकमेव पराक्रम...* *६ मार्च इ.स.१७२८* *#निजामाचा_पराभव, मराठ्यांबरोबर मुंगी-शेगावचा तह* *निजाम-उल-मुल्क त्याआधी दिल्लीहून सेना घेऊन दक्षिण सुभा सोडवायला बाहेर पडला होता निजाम हा औरंगजेबाच्या काळातील लढवय्या अनेक देश पाहीलेला व अनेक लढाया त्याने स्वबळावर जिंकल्या होत्या....* *निजामाचा सरदार इवाझ खान याने बाजीरावांचा पाठलाग सुरू केला बाजीराव खानदेशातून गुजरातकडे निघाले बाजीराव आपल्याला पतंगाप्रमाणे ओढीत नेत असल्याचे लक्षात येऊन निजामाच्या सैन्याने त्यांचा नाद सोडला व बाजीरावास शह देण्यासाठी त्याने पुण्यावरच चाल केली आणि साताऱ्यातील छत्रपतींना धोका निर्माण केला....* *असा शह बसल्यावर छत्रपती, बाजीराव दोघेही नाक मुठीत धरून आपल्यास शरण येतील असा निजामाचा हा डाव पूर्ण होत आला होता बाजीरावांनी त्यास भीक न घालता निजामालाच काटशह देण्याचे ठरवले व खुद्द निजामाची राजधानी असलेल्या औरंगाबादवर चाल केली....* *निजामास ही खेळी अनपेक्षित होती त्याला औरंगाबादचा बचाव करणे भाग होते पण हाताशी आलेला मराठा छत्रपती सोडणेही त्याच्या जीवावर आले होते आता बाजीरावांच्या कचाट्यातून औरंगाबाद तरी वाचवावे यासाठी निजाम पुणे-सातारा परिसर सोडून उत्तरेस निघाला....* *बाजीरावांनी औरंगाबादचा रस्ता सोडून निजामाला वाटेतच पकडण्याचा व्यूह रचला छापा घालून चकमकींचे लढाईत पर्यवसन होण्याआधी आपल्याला अनुकूल अशा दिशेस पळ काढत बाजीरावांनी निजामास नाशिककडे ओढत नेले अवजड तोफखाना, बोजड चिलखती घोडदळ यामुळे निजामाचा तोटाच झाला....* *राऊंनी अगदी नियोजन बद्धतेने निजामाला पालखेडला आणले पूर्वनियोजित योजने प्रमाणे सर्व अधिकाऱ्यांना आपापल्या फौजेसह बाजीरावांनी पालखेडला बोलून घेतले होते....* *आता मराठ्यांकडे अंदाजे ५०००० सैन्य जमले होते नगर पासून मराठा हेरांच्या टोळ्या निजामाच्या आस-पास होत्या त्याच्या प्रत्येक हालचालीची खबर बाजीरावांना टाकोटाक मिळत होती....* *पालखेड वैजापुरच्या पूर्वेला १२ मैल तर औरंगाबाद पासून २८ मैलावर आहे पूर्वेला पाण्याचा साठा आहे त्याच बाजूला आपले सैन्य घेऊन राऊ होते Horse Shoe अर्थात घोड्याच्या नालेसारखी व्यूह रचना करून निजामाला खेचत आणून कोंडीत पकडले....* *औरंगाबादकडे झेपावणारे बाजीराव (राऊ) आणि त्यांना तेथे पोहचण्या अगोदर रोखण्याच्या इराद्याने निघालेला निजाम यांची टक्कर २५ फेब्रुवारी १७२८ ला पालखेडला झाली मराठ्यांनी निजामाचे पाणी रोखले, रसद तोडली....* *अर्जुनाच्या दिव्यास्त्रां प्रमाणे प्रभावी असलेला निजामाचा प्रसिद्ध तोफखाना नगरला गंजत पडला होता आता त्याचा ह्या आणीबाणीत निजामाला काहीच उपयोग नव्हता मराठ्यांना तोफांनी भाजण्याचे स्वप्न मनात मांडे खाणाऱ्या निजामाचे पुर्णपणे भंगले होते....* *आणि भयानक वास्तव मृत्यू बनून पालखेडला त्याच्या समोर उभे होते पालखेडला कोंडीत सापडलेल्या निजामाचे अनन्वित हाल होऊ लागले भूक, तहान आणि समोर असलेले मराठे यांच्या कात्रीत सापडलेल्या निजामावर आणि त्याच्या फौजेवर जिवंतपणीच स्वतःचीच कबर खोदण्याचा प्रसंग आला....* *या सर्व बिकट परिस्थितीमुळे अखेर निजामाने ईवाझखाना मार्फत तहाचे बोलणे चालवले अखेर ६ मार्च १७२८ मुंगी-शेवगावला तह झाला....* *त्यानुसार निजामाला खालील अटींचे पालन करणे बंधनकारक होते -* *१.छत्रपती शाहूराजे हे मराठा साम्राज्याचे एकमेव वारस असल्याचे निजामाने व पर्यायाने मोघल सम्राटाने मान्य केले....* *२. मराठ्यांना दख्खनमधील चौथ व सरदेशमुखीच हक्क परत केला गेला....* *३.मराठ्यांच्या देशमुखांना परत आपापल्या जहागिरी इनाम झाल्या....* *४.महसूलाची थकलेली रक्कम निजामाने मराठ्यांस नजर करण्याचे कबूल केले....* #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
Sachin
586 views
9 days ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *५ मार्च इ.स.१६६६* औरंगजेबाच्या भेटीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे राजगडाहून आग्र्याकडे प्रस्थान. त्यांच्या सोबत होते. ९ वर्षाचे शंभूराजे, सर्जेराव जेधे, हीरोजी फर्जद, निराजीपंत, मदारी मेहतर. आऊसाहेबांची मनस्थिती आज काय असेल ? केवळ कल्पनाच केलेली बरी ! छत्रपती शिवाजी महाराज आज मृत्यूच्या दाढेत प्रवेश करायला निघत होते, ९ वर्षाच्या युवराजांसह !!! *५ मार्च इ.स.१६५९* कोकणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची घोडदौड चालू असताना आदिलशहाने कुडाळ येथील देसाई लखम सावंत यांची बंडखोरी मोडून काढण्यासाठी रुस्तुमजमा नावाच्या सरदारास पाठवले. लखम सावंताने निकराचा प्रतिकार करून आपले रक्षण करण्याचा प्रयत्न केला परंतु रुस्तुमजमाने सर्वत्र नाकेबंदी करून लखम सावंताची परिस्थिती बिकट केली. या संकटाला तोंड देण्यासाठी आजच्या दिवशी महाराजांशी तह करून महाराजांचे मांडलिकत्व पत्करले व तहाप्रमाणे महाराजांनी लखम सावंताला मदत करून त्याचे संरक्षण केले. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
See other profiles for amazing content