फॉलो करा
Sachin
@schn30
1,555
पोस्ट
1,288
फॉलोअर्स
Sachin
517 जणांनी पाहिले
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *२७ जानेवारी इ.स.१६५८* *छत्रपती शिवरायांनी "माहुलीचा किल्ला उर्फ भंडारगड" जिंकून स्वराज्यात आणला.* *ठाणे जिल्ह्यात आसनगावजवळ एक गडाचे त्रिकुट आहे (माहुली, पळसगड आणि भंडारगड). १४८५ च्या सुमारास हे ठिकाण नगरच्या निजामशाहीचा संस्थापक मलिक अहमद याच्याकडे आले. नंतर शहाजी राजे निजामशाहीचे संचालक झाल्यावर मुघल सेना आणि आदिलशाही संयुक्तपणे निजामशाही बुडवण्याचा प्रयत्न करत होत्या. १६३५ च्या सुमारास शहाजीराजेंनी कठीण परिस्थितीत बळकट आश्रयस्थान म्हणून शिवनेरी,* *जुन्नर-पुणेहून जिजाबाई राणी आणि बाल शिवबासह माहुलीला मुक्काम हलवला. खानजमानने त्यावेळी माहुलीला वेढा दिला. शहाजीराजेंनी पोर्तुगीजांकडे मदत मागितली पण त्यांनी नकार दिला. त्यावेळी शहाजीराजेंनी शरणागती पत्करली. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला २७ जानेवारी१६५८ ला मोघलाकडून परत मिळवला.* #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
Sachin
858 जणांनी पाहिले
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *#प्रजासत्ताक दिन* *लहरतो आहे तिरंगा अभिमानाने,उंच आज या आकाशी, उजळत ठेवू सारे रंग त्याचे,घेऊया प्रण हा एक मुखाने.* 26 जानेवारी 1950 रोजी देशाची राज्यघटना लागू झाली, त्याच निमित्ताने प्रजासत्ताक दिन हा भारतातील प्रत्येक नागरिक मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा करतो, प्रजासत्ताक म्हणजे 'लोकांद्वारे लोकांसाठी शासन असं ही आपण याला म्हणू शकतो' 26 जानेवारी 1950 रोजी आपला भारत हा प्रजासत्ताक देश म्हणून घोषित करण्यात आला. प्रजासत्ताक दिन हा विशेष सण म्हणून साजरा करण्याचा मुख्य उद्देश हा आहे की हा भारतीय संविधानाचा स्थापना दिवस आहे. भारतीय प्रजासत्ताक दिनाचा इतिहास खूप रंजक आहे. दरवर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन म्हणून विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. भारतीय नागरिकांच्या जीवनातील हा एक महत्त्वाचा दिवस आहे ज्यामुळे प्रत्येकाला संविधान असण्याचे महत्त्व समजते. भारत देश हा लोकशाही आणि प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून ओळखला जातो, भारतात लोकांच्या मतानुसार शासक निवडला जातो. भारत हा जगातील सर्वात मोठा प्रजासत्ताक देश आहे. भारत घडविण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या संसाराची राखरांगोळी केली तेव्हा कुठे प्रजासत्ताकाचे हे स्वप्न साकार झाले. आजच्या या पावन दिनी अशा सर्व देशभक्तांना शतशः नमन. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
Sachin
721 जणांनी पाहिले
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *२५ जानेवारी इ.स.१६६४* सुरतेच्या या लुटीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रचंड दरारा निर्माण झाला. सुरतेच्या लुटीचे खरे फलित हेच आहे. लूट किती मिळाली, याचे आकडे भिन्न आहेत; परंतु राजांचा दरारा काय होता त्याचे चित्र इंग्रजी पत्रव्यवहारात मिळते. 'Surat trembles at the name obsevagee.' हे वाक्य बर्‍याच वेळा त्या पत्रव्यवहारात वाचावयास मिळते. 'शिवाजीराजांचे नाव काढताच सुरत भीतीने थरथरावयास लागते.' 'त्या' दरार्‍याचे अचूक वर्णन आहे. २५ जानेवारी १६६४ रोजी सुरतेच्या इंग्रजी वखारीतील एक फॅक्टर हेन्री गॅरी याने अर्ल ऑफ मार्लबरोला लिहिलेले एक पत्र फार बोलके आहे. त्यात गॅरी लिहितो, ''.. Savagee the grand rebell to the king of Deccan came here the 6th of this instant with considerable army, entering the town before the governor scarce had any notice of his aproche. He made a great destruction of houses by fire, upwards of 3000, and carried a vast treasure away with him. It is credibly reported near unto ten million of ruppees.'' मुघलांनी सुरतेच्या या लुटीची हाय खाल्ली. ही बातमी ऐकून अनेक जण दिड्मूढ झाले. औरंगजेब सुन्न झाला. पोतरुगीज, इंग्रज, फ्रेंच, डच यांनी मोठमोठी बातमीपत्रे आपापल्या राजांकडे पाठवून दिली. *२५ जानेवारी इ.स.१६६५* छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळातील एक रत्न, राजनैतिक सल्लागार व विश्वासू सेवक सोनोपंत तथा सोनोजी विश्वनाथ डबीर यांचे निधन. *२५ जानेवारी इ.स.१६७३* शिवरायांनी कैदेतील इंग्रज कैद्यांची सुटका केली. *२५ जानेवारी इ.स.१६८४* छत्रपती संभाजी महाराजांची पोर्तुगीजांनी एवढी दहशत घेतली होती की त्यांनी गोव्याची राजधानी मुरगाव बंदरात नेण्याचे ठरवले होते . २५ जानेवारी १६८४ रोजी विसेरई गोव्याच्या दयनीय अवस्थेचे वर्णन करताना पोर्तुगालच्या राजाला लिहतो …. "आमच्या राज्याची अवस्था शोचनीय आहे. मोग्लांमुळे आमचे रक्षण झाले परंतु त्यांनी हे राज्य घेण्याचे ठरवले तर आमची अवस्था अतिशय वाईट होईल ,मोगल निघून गेले तरी देखील संभाजीच्या स्वारीचा धोका पुन्हा आहेच. आमच्या आरमारात माणसे नाहीत. विश्वासू अधिकारी नाहीत,किल्ले निरुपयोगी झालेत,गोलंदाजाची आणि दारूगोल्याची कमतरता आहे.द्रव्याची टंचाई आहेच,हे राज्य आमच्या हातून निसटण्याची भीती आहे …. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
Sachin
764 जणांनी पाहिले
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *२४ जानेवारी इ.स.१६६७* *छत्रपती श्री शिवरायांनी १२ मावळ मधील कानंद खोरे या मावळच्या वतनाचा तंटा मिटवला.मरळ घराण्याकडे पुन्हा वतनदारी* 🚩 *#जय_जिजाऊ* *#जय_शिवराय* *#जय_शंभूराजे*🚩 #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
Sachin
2.4K जणांनी पाहिले
*#शिवविचार_प्रतिष्ठान* छत्रपती शिवरायांची मालवण बंदराची पहिली सागरी मोहीम.       छत्रपती शिवरायांची पहिली आरमारी स्वारी गोमंतकाच्या दक्षिणेकडे, कारवारच्या दक्षिणेला असलेल्या बिदनूर या श्रीमंत शहराच्या दिशेने निघाली. स्वताचे आरमार उभारल्यानंतर शिवरायांनी पहिली आरमार स्वारी कर्नाटकमधील बिदनूरवर काढली. या मोहीमेकरता मालवण बंदरातून ८५ जहाँजे ५० गलबते, ३ मोठ्या तारवा आणि ४००० सैनिकांची फौज बिदनूरकडे निघाली. राजांनी स्वता या सागरी सेनेचे नेतृत्व केले. सिंधूसागराहून निघालेली हि पहिलीच सागरी मोहीम होती. शिवचरित्रात या बसरूर च्या स्वारीचे मोठे ऐतिहासीक महत्व आहे कारण या स्वारीनंतर महाराजांनी कोणत्याही आरमारी मोहिमेचे स्वतः नेतृत्व केलेले इतिहासात नमूद नाही बसरूर ची ही मोहीम शिवचरित्र्यातील पहिली व शेवटची मोहीम ठरली प्रसिद्ध शिवचरित्राचकार शेजवलकर या मोहीमेचे महत्व सांगताना लिहितात "महाराजांच्या बसरूर च्या एकमेक आरमारी पर्यटनांनंतर पुनः कोणत्याही मराठी राजाने तरवांतून स्वारी केलेली नमूद नाही एकट्या महाराजांचेच लक्ष हिंदी राजांना अपरिचित अशा नूतन संरक्षण साधनाकडे पहिल्याने वळले व त्याचा यथाशक्य उपयोग करून घेण्याची तयारी त्यांनी चालवली यात त्यांच्या मोठेपणाचा एक पैलू दृष्टीस पडतो शिवचरित्र्यातील अफझलखान वध शाहिस्तेखानावरील छापा यांसारखे महाराजांचे प्रसिद्ध पराक्रम सर्वानाच परिचित आहेत त्या मानाने तेवढेच महत्व असणारा सागरांवरील हा पराक्रम उपेक्षित च राहिला #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
Sachin
707 जणांनी पाहिले
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *२१ जानेवारी इ.स.१६६२* विजापूरच्या आदीलशहाच्या ताब्यात असलेली कोकण कीणारपट्टी स्वराज्यात सामिल करण्याच्या दृष्टीने छत्रपती श्री शिवरायांनी आजच्या दिवशी कोकण स्वारीस प्रारंभ केला होता. *२१ जानेवारी १६७५* *छत्रपती श्री शिवरायांनी कुतुब खानाचा पराभव केला* छत्रपती श्री शिवरायांनी बऱ्हाणपूर,धरणगाव ठाण्याची लुट करून परत रायगडाकडे येत असताना महाराजांना रोखण्यासाठी मोगली सेनापती कुतुब खान चालून आला. पण मराठ्यांचा जोर विलक्षण होता. कुतुब खानाचे ४०० सैनिक ठार झाले. प्राण भयास्तव कुतुब खान व मोगली सैन्य औरंगाबाद कडे पळून गेले.प्रचंड लुट घेऊन महाराज रायगडी परतले. *२१ जानेवारी इ.स.१७४०* स्वतः शाहू छत्रपतींना बाजीरावांच्या ह्या गुणांची पुरेपूर जाणीव होती. म्हणूनच त्यांनी बहुतांश बाबतीत राऊंना स्वातंत्र्य दिले होते. त्यामुळेच अनेकदा मोहीमांवर बाजीराव परस्पर निर्णय घ्यायचे, तरी बाजीरावांच्या निष्ठेबद्दल शाहू थोडीदेखील शंका बाळगत नसत. बाजीरावांवर कधीच नाराज होत नसत. उलट १७२८ मध्ये सातारा दरबारातील पेशव्यांचे मुतालिक लिहितात (तत्रोक्त), "..राऊ स्वामींची मर्जी अवघियांनी पालावी. त्यांचे चित्तास क्षोभ करु नये"! किंवा मस्तानीच्याही संदर्भात शाहूंचे चिटणीस गोविंद खंडो दि. २१ जानेवारी १७४० यादिवशी नानासाहेबांना लिहितात (पेशवे दफ्तर, खंड ९, पत्र ३२), "ऐसियास राजश्री स्वामींची मर्जी पाहाता ते वस्तू (मस्तानी) त्याजबरोबर (बाजीराव) न द्यावी, ठेवून घ्यावी, चौकी बसवावी; त्यामुळे राऊ खटे जाले, तऱ्ही करावे ऐसी नाही"! एवढी मर्जी सांभाळत असत शाहू बाजीरावांची. *२१ जानेवारी इ.स.१७६१* थोरले माधवराव पेशवे यांनी वयाच्या १६ व्या वर्षी पेशवाईची सूत्रे हाती घेतली. *२१ जानेवारी इ.स.१८०५* होळकर व जाट सैन्याने भरलपूर येथे इंग्रजांचा पराभव केला. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
Sachin
675 जणांनी पाहिले
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *१९ जानेवारी इ.स.१५९७* *#महाराणा_प्रताप_यांचा_स्मृतिदिन* *(जन्म ९ मे १५४०)* राणा प्रतापसिंह गुहिलोत ह्या राजपूत वंशातील एक अत्यंत पराक्रमी राजा. उदयसिंहाचा पुत्र. प्रतापसिंह गुहिलोत ह्या नावाने हा राजस्थानात प्रसिद्ध आहे. उदयसिंहाने जगमल ह्या आपल्या आवडत्या पुत्रास गादीचा वारस नेमले होते; परंतु प्रतापसिंहांच्या मामाने इतर सरदारांच्या मदतीने जगमलास दूर करून प्रताप यांना १ मार्च १५७२ रोजी महाराणा केले. ते महाराणा झाले त्यावेळी राजधानी चितोड शत्रूच्या हातात गेली होती. अनेक राजपूत अधिपतींनी अकबराचे स्वामित्व पतकरले होते व काहींनी आपल्या मुली त्यास देऊन शरीरसंबंध जोडला होता; पण राणाप्रताप यांनी त्याच्यापुढे मान लवविली नाही. त्याने चितोड अकबराच्या हातून स्वतंत्र करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि आपले वास्तव्य अकबराच्या सैन्याच्या दृष्टिक्षेपापासून दूर ठिकाणी केले. प्रजेला अरवलीच्या डोंगराळ भागात, जेथे अकबराचा उपद्रव पोहोचणार नाही, अशा ठिकाणी वस्ती करण्यास लावले. तेथेच त्याने काही भागात शेती केली. मेवाडचा मैदानी प्रदेश ओसाड करून टाकला आणि आपली राजधानी गोगुंड येथे नेली. सर्व डोंगरभागांतून अभेद्य असे किल्ले बांधले व ते शस्त्रास्त्रांनी सुसज्ज केले. अकबराचे स्वामित्व न पतकरल्यामुळे त्यास मोगलांशी अखेरपर्यंत झगडा करावा लागला. अकबराने मानसिंह आणि आसफखान यांच्याबरोबर मोठी सेना देऊन त्याच्यावर पाठविले. २१ जून १५७६ रोजी हळदीघाटच्या घनघोर लढाईत प्रतापसिंहाचा पराजय झाला, तरी तो तीतून निसटला आणि राजस्थानच्या दऱ्याखोऱ्यांतून त्याने मोगलांशी गनिमी काव्याने संघर्ष चालू ठेवला. त्यांच्या रसदा तोडल्या, खजिने लुटले. अकबर स्वतः त्याच्यावर चालून गेला पण त्याला प्रताप यांना न जिंकताच परत फिरावे लागले. त्याची पाठ वळताच प्रतापानी आपले गेलेले सर्व किल्ले परत मिळविले. यानंतर त्याने पुढे १२ वर्षे शांततेने राज्य केले. ह्यावेळी अकबर हा पंजाब व दक्षिण भारत ह्या दोन ठिकाणी आपली सत्ता स्थिर करण्याच्या बेतात होता. त्यामुळे त्याने पुढे प्रतापकडे लक्ष दिले नसावे. राणाप्रतापास परचक्राची फार चिंता होती. म्हणून त्याने आपल्या सरदारांकडून तुर्कांपासून आपल्या देशाचे रक्षण करण्याचे प्रथम वचन घेऊन नंतर आपल्या अमरसिंह ह्या पुत्राच्या हाती राज्य सोपविले व प्राण सोडला. अकबरानेही त्याची मुक्तकंठाने स्तुती केली आहे. कर्नल टॉड म्हणतो, महाराणा प्रताप यांचे नाव अजूनही पूज्य मानले जाते आणि पुढेही एखाद्या नवीन जुलमी राजसत्तेकडून राजपुतांत शिल्लक असलेली देशाभिमानाची ठिणगी विझेपर्यंत ते नाव पूज्यच मानले जाईल.’ #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
Sachin
701 जणांनी पाहिले
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *१८ जानेवारी इ.स.१६७५* छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरुड-जंजिरा समोर कांसा उर्फ़ पद्मदुर्ग उभा करून सिद्दीला थेट आव्हान दिले होते. त्या जलदुर्गाचे काम लवकरात लवकर व्हावे म्हणुन, प्रभावळीचा सुभेदार जिवाजी विनायक याला आरमारास रसद पोचवायचे काम दिले होते. या कामात हयगय केल्याबद्दल शिवरायांनी जिवाजी विनायक याला कडक शब्दात ताकिद देणारे पत्र लिहिले. त्यात ते म्हणतात,”ब्राह्मण म्हणुन कोण मुलाहिजा धरु पाहतो?” पुढे राजे म्हणतात,”या उपरी बोभाट आलिया उपरी तुमचा मुलाहिजा करणार नाही, गनिमाचे चाकर गनीम जालेस ऐसे जाणून बरा नतिजा तुम्हाला पावेल. ताकीद असे. पुढे शिवरायांच्या निधनानंतर "छत्रपती संभाजी महाराज" यांनी त्या जलदुर्गाचे काम पूर्ण केले. त्यास नाव दिले "किल्ले पद्मदुर्ग". *१८ जानेवारी इ.स.१६८४* गोव्यातील मांडवी नदीच्या तोंडावर आग्वाद(अॅग्वाडा) किल्ल्याच्या समोर स्वराज्यावर हल्ला करण्यासाठी औरंगजेबचे लढाऊ आरमार धान्य व युद्ध सामग्री घेऊन उभे होते. *१८ जानेवारी इ.स.१७६१* नानासाहेबांनी १८ जानेवारी सन १७६१ रोजी माळव्याहून सदाशिवराव भाऊसाहेबांना जे पत्र लिहून पाठवले आहे त्यात ते म्हणतात "अब्दालीस कोंडून धरावे" याचा अर्थ पानिपतवरील घडलेल्या विपरीत घटना नानासाहेबांना कळाल्या नव्हत्या ते त्या काळी शक्यही नव्हते. कारण पानिपत ते माळवा यातील अंतर ६५० किमी आहे. नानासाहेबांना पानिपतवर घटनेची सांकेतिक बातमी भेलसा येथे दिनांक २४ जानेवारी रोजी समजली. भेलसा पानिपतपासून सुमारे ५६० किलोमीटरवर आहे. *१८ जानेवारी इ.स.१७६८* राणोजींची राजपूत पत्नी चिमाबाई हिच्या पोटी जन्माला आलेले महादजी हे राणोजी शिंद्यांचे कनिष्ट पुत्र होते. १८ जानेवारी १७६८ रोजी महादजी शिंदे वयाच्या चाळीशीत गादीवर आले ते १७९४ पर्यंत वयाच्या सत्तरीपर्यंत आपल्या अतुल्य पराक्रमाच्या जोरावर सत्तेत राहिले. शिंदे होळकरांनी पुढे इतिहास घडवला. नजीबाच्या शत्रुत्वामुळे आपले दोन बंधू मृत्युमुखी पावले म्हणून महादजींनी त्याचा निर्वंश करायची शपथ घेतली होतीआणि ती पूर्णत्वास नेली नजीबाची राजधानी घौसगढ महादजींनी जमीनदोस्त केली..आणि नजीबाची कबर फोडून त्याचे प्रेत जाळले..नराधम नजीबाचा नीच नातू गुलाम कादर ह्यालाही महादजी शिंदेही यातनामय मरण देऊन त्या चांडाळाचा निर्वंश केला होता. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
See other profiles for amazing content