*🚩आजचे _ऐतिहासिक _शिवदिनविशेष🚩*
▬▬▬▬▬▬꧁☾︎✫☽︎꧂▬▬▬▬▬▬
*⛳ श्री शिवशंभू प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य* ⛳
▬▬▬▬▬▬꧁☾︎✫☽︎꧂▬▬▬▬▬▬
*🚩शिव कार्य हेच आमचे ध्येय आणि हेच आमचे धोरण*
***************************************
https://www.instagram.com/shrishivshambhu_pratishtan?igsh=dG9ib2pubnA5dDU4
#🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩जय जिजाऊ #🚩छत्रपति शिवाजी महाराज #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜
⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳
📜 ११ ऑक्टोबर इ.स.१६५९
( कार्तिक शुद्ध षष्टी, शके १५८१, संवत्सर विकारी, मंगळवार )
खानाच्या वकिलाला निरोप :-
कृष्णा भास्करला जाणूनबुजून गड दाखवला गेला. गडाचा बंदोबस्त किती मजबूत आहे हा निरोप खानापर्यंत जावा हा हेतू. खानाचे पत्र स्वीकारून रिवाजानुसार आपलेही वकील खानाकडे येतील असे सांगून कृष्णा भास्करास उंची नजराणे, भारी पोशाख, घोडा व भेटवस्तू देऊन आजच्या दिवशी त्यांना निरोप देण्यात आला.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ११ ऑक्टोबर इ.स.१६७९
सुंदरजी प्रभू नामक छत्रपती शिवाजी महाराजांचे एक हेर मुंबईमध्ये गुपचूप माहिती जमा करीत असताना इंग्रजांच्या तावडीत सापडले. इंग्रजांनी त्यांच्याकडून माहिती जमा करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात अपयश येऊन इंग्रजांनी त्यांना कैदेत टाकले. तसेच मुंबईतील ३-४ गरीब रहिवाश्यांना चौलच्या आसपास टेहळणीकरिता पाठवले व त्यांना आदेश दिला की, त्यांनी दर ३-४ दिवसांनी मुंबईला मराठ्यांच्या हालचालीबद्दल खबर कळवावी. हे हेर मराठ्यांच्या हालचाली इंग्रजांना कळवीत होते. मुंबईतील जवळजवळ सर्वच फौज खांदेरीच्या नाकेबंदीत सामील असल्यामुळे मुंबईचे संरक्षण कमी झाले होते व त्याचा धोका जाणवून इंग्रजांनी १३ ऑक्टोबर रोजी २ शिबाडे भाडेतत्वावर घेऊन मुंबई बंदर संरक्षित केले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ११ ऑक्टोबर इ.स.१६८२
स्वराज्यावर चालून आल्यावर औरंगजेबाने नोव्हेंबर १६८१ पासूनच तळकोकणावर आपले सरदार पाठवून हल्ले करण्यास सुरुवात केली होती. या मोहिमेवर हसन अलीखान,राव दलपत यासारखे मातब्बर सरदार होते. ऑगस्ट १६८२ मध्ये खानजहान बहादूर या सरदारालाही तळ कोकणात पाठवले होते. छत्रपती संभाजीराजे कोकणात मुघलांच्या या चालू असलेल्या हालाचली थांबवण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यांनी तळ कोकणातील आपल्या अधिकाऱ्यांना हुकूम देऊन मुघल सैन्याच्या वाटा अडवायला सांगितले होते. मराठ्यांच्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी या हुकुमाची ताबडतोब अंमलबजावणी केली. कोकणच्या वाटेवर संभाजीराजेंच्या सैन्याने चोख बंदोबस्त ठेवला असल्याने मुघल सरदारांना आणि त्यांच्या सैन्याला मराठ्यांनी कोकणात शिरु दिले नाही. याच दरम्यान १६८२ च्या ऑक्टोबर महिन्यात तळ कोकणचा मुघल अधिकारी अली चौधरी याने आपल्याला एक सरदार, अहजार स्वार व २ हजार प्यादे दिले तर आपण सुरतपासून तळ कोकणपर्यंत मुलुख लुटू शकेन असे कळवले होते.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ११ ऑक्टोबर इ.स.१७२४
निजामाने मुबारिझखानास लिहिले की, आपण दोघेही बादशहाचे सेवक, आपसात लढणे चांगले नाही. माझी नेमणूक दुसरीकडे कोठे झाल्यावर मी दक्षिण सोडून जाईन. खानाने हे बोलणे जुमानले नाही. लढाईनेच सोक्षमोक्ष करून घ्यावयाचे त्याने ठरविले. कदाचित दिल्लीची कुमक
खानास मिळेल म्हणून त्यास अगोदर गाठण्यासाठी निजामाने आपल्याकडील बाजीराव व मराठी फौज घेऊन तारीख ३ सप्टेंबर रोजी औरंगाबादेहून दौड केली. बाजीरावांनी आपली माणसे मुबारिझखानाच्या हालचाली कळविण्यास पाठविली होती. दोन्ही सैन्याची गाठ साखरखेड या गावी पडली. तारीख १ ऑक्टोबर रोजी तुंबळ युद्ध झाले. मुबारिझखानाने लढण्याची पराकाष्ठा केली पण तो व त्याचे दोन मुलगे मारले गेले. त्याच्या फौजेचा मोठा संहार झाला. विजयी निजामाने जानेवारी १७२५ च्या सुरुवातीस हैद्राबादेचा ताबा मिळविला. निजामाच्या या विजयामुळे भागानगर ऊर्फ हैद्राबादचा सुभा फत्तेसिंगास मिळावा ही शाहू महाराजांची मागणी पार वितळून गेली. निजामाने औरंगाबाद व हैद्राबाद या बाजू आपल्या सरदारांकडून व्यापल्यामुळे शाहू महाराजांच्या सरदारांना कर्नाटकाकडे आपली मुलुखगिरीची कामगिरी करावी लागली.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ११ ऑक्टोबर इ.स.१७८०
दि. ११ ऑक्टोबर १७८० रोजी हालेचा मुक्काम उल्हास नदीकाठावर असलेल्या बदलापूरानजीक कुळगाव येथे असताना आनंदराव रास्त्यांच्या फौजांनी त्याच्यावर हल्ला
चढवला. यात हालेचे विशेष नुकसान झाले नाही. तरीही बदलापूराजवळच्या हल्ल्याची धास्त खाऊन तो टिटवाळा मुक्कामी गेला. रामचंद्र गणेश कानडे हे वसईच्या कुमकेकरता जात असतानाच टिटवाळ्याच्या जवळच हालेने त्यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्याला रामचंद्रपंतांनीही असे कडवे प्रत्युत्तर दिले की, हार्टलेची पाचावर धारण बसली. अशावेळी दि. १२ डिसेंबर रोजी सकाळी वज्रेश्वरी नजिक आकाशात खूप मळभ असताना रामचंद्रपंत गुपचूप हार्टलेला पकडण्यासाठी पुढे सरसावले. परंतु, ऐनवेळी चक्क उन पडले आणि हार्टलेला रामचंद्रपंत दिसले. इंग्रजांनी त्यांच्यावर बेछूट गोळ्या झाडल्या आणि रामचंद्रपंत ठार झाले. इकडे वज्रेश्वरीला पंत पडले अन् तिकडे त्याच सुमारास वसईदेखील पडली!!!
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ११ ऑक्टोबर इ.स.१७८८
गुलाम कादरने नवीन बादशहाचे सहाय्याने जनानखाना व राजपुत्रांचे महाल लुटले. एके दिवशी शहाजाद्यांना व दासींना आपल्या समोर उभे करून गावयास व नाचावयास लाविले, तसेच बादशहास दिवाणी इ-खासात ओढून आणून चाबकाने मारिले. इतकेही करून द्रव् मिळेना म्हणून बादशहास पुरलेल्या द्रव्याचा ठावठिकाणा विचारला, तेव्हा बादशहाने आपल्याला असे द्रव्य माहीत नाही असे उत्तर करताच तक्तावर हुक्का ओढीत बसलेल्या गुलाम कादरने एकदम उडी टाकून बादशहा शहा अलम यास खाली पाडले व त्याचे उरावर बसून पेषकबजाने बादशहाचे दोन्ही डोळे फोडले. शहरात सतत लुटालूट चालू ठेविली. इस्माईल बेग यास गुलाम कादरचे हे वर्तन मुळीच आवडले नाही. अशा वाईट कृत्यात आपण सामील असल्याने आपल्यावरही केव्हातरी गदा येईल म्हणून तो घाबरून गेला आणि सरळ महादजी शिंद्यास येऊन मिळाला महादजीनी काळजीपूर्वक योजना आखून ऑक्टोबर १७८८ त आपला सरदार राणेखान यास फौज व तोफा देऊन दिल्लीचा कबजा घेण्यास रवाना केले. तसेच गुलाम कादरचे अंतर्वेदीतील मुलुखात मराठी फौज पाठविली. अंतर्वेदीतील या मराठे फौजेने सन १७८८ च्या ऑक्टोबरात रोहिल्यांची ठाणी उठवून मराठ्यांचा अंमल पूर्ववत स्थापिला. मराठ्यांची फौज आपल्यावर चालून येत आहे असे पाहून गुलाम कादरखान दिल्ली सोडून आपल्या मुलुखाचे रक्षण करण्यासाठी निघून गेला. पुढे दिनांक ११ ऑक्टोबर १७८८ रोजी मराठी फौजेने दिल्लीच्या किल्ल्यात प्रवेश केला. त्यानंतर २२ ऑक्ट रोजी मराठे सरदार अंध बादशहा शहाअली यास नजर शिष्टाचार करून भेटले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬
✍ *लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.*
▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*