फॉलो करा
शिवभक्त सुरेश भोसले
@sureshbhosale
4,342
पोस्ट
14,398
फॉलोअर्स
शिवभक्त सुरेश भोसले
1.3K जणांनी पाहिले
*🚩आजचे _ऐतिहासिक _शिवदिनविशेष🚩* ▬▬▬▬▬▬꧁☾︎✫☽︎꧂▬▬▬▬▬▬ *⛳ श्री शिवशंभू प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य* ⛳ ▬▬▬▬▬▬꧁☾︎✫☽︎꧂▬▬▬▬▬▬ *🚩शिव कार्य हेच आमचे ध्येय आणि हेच आमचे धोरण* *************************************** https://www.instagram.com/shrishivshambhu_pratishtan?igsh=dG9ib2pubnA5dDU4 #📜इतिहास शिवरायांचा ⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳ 📜 ४ जानेवारी इ.स.१६६४ (पौष शुद्ध प्रतिपदा शके १५८५ संवत्सर शोभन वार सोमवार) छत्रपती शिवाजी महाराज सुरतजवळील घणदेवी येथे आजच्या रात्री येऊन धडकले. (सकाळी १०, वाजण्याच्या सुमारास) तेथून पूढे ते उधन्यास येऊन पोचले. उधन्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला वकील ईनायतखान सुभेदाराकडे पाठवला. वकीलाने फर्मावले की, “ईनायतखान सुभेदाराने व सुरतेतील नामवंत व्यापारांनी महाराज सांगतील तेवढी खंडणी भरण्याची व्यवस्था करावी. अन्यथा सुरतची बदसुरत झाल्यास त्याची जबाबदारी आमच्यावर नाही.” सुरतेमध्ये प्रचंड धावपळ सुरू झाली. ईनायतखान सुभेदाराने महाराजांची खंडणीची मागणी उडवून लावली. उलट उर्मट जबाब वकीलामार्फत पाठवला. महाराजांनी या वकिलालाच कैद केले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ४ जानेवारी इ.स.१६६५ ( पौष वद्य त्रयोदशी, शके १५८६, संवत्सर क्रोधी, बुधवार ) महाराज प्रतापगडी :- महाराज ग्रहणानिमित्त पर्वणी साधण्यासाठी व दानधर्म करण्यासाठी तसेच आई भवानीचे दर्शन घेण्यासाठी प्रतापगडी दाखल. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 ४ जानेवारी इ.स.१६८१ छत्रपती शिवाजी महाराजांच्या अखेरच्या काळात त्यांचे पोर्टगीजांशी फारसे चांगले संबंध नव्हते. महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजीराजेंनी मराठी मुलखाभोवती असणाऱ्या परकीय सत्ताधीशांशी पत्रव्यवहार करून त्यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. ५ मे १६८० ला त्यांनी आपला वकील गोव्याच्या व्हाइसरॉय कडे पाठवून मैत्रीचा तह करण्यास सुचवले होते. ही बोलणी सुरू असतानाच मराठ्यांचा डिचोलीचा सुभेदार मोरो दादाजी याने बारदेश मधील सिओलीम हे गाव लुटले व गोव्याकडे मौल्यवान रत्ने घेऊन जाणाऱ्या व्यापाऱ्याला पकडले. या बातम्या समजताच गोव्याचा व्हाइसरॉय अंतोनियो पाइस द सांदे याने मोरो दादाजीला पत्र पाठवून या घटनेचा निषेध केला व पकडलेल्या माणसांना सोडले नाही तर संभाजीराजेंना आपल्याशी मैत्री नको आहे असे समजण्यात येईल असे सांगितले. शिवाय धर्माजी नागनाथ व मोरो दादाजी यांच्या प्रांतातील व्यापरही बंद केला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ४ जानेवारी इ.स.१६८४ बापाच्या सांगण्यानुसार संभाजी महाराजांवर चाल करण्यासाठी शहजादा मुअज्जम कोकणात उतरला. डोंगर दर्यांची कधीच सवय नसलेली, आयुष्यातील बराचकाळ आयषोआरामात घालवलेल्या शाही फौजेला सह्याद्री सोबत मिळते जुळते घेता आलेच नाही, मराठ्यांकडून सपाटून मार खाऊन परतताना त्यांच्यावर उपासमारीची भयानक वेळ ओढवली, जीवाचीच धास्ती अशी काही बसली कि अंगावरील कपड्याची गत ती काय 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ४ जानेवारी इ.स.१७२१ सय्यदबंधूंपैकी हुसेनअली सैय्यद हा खानदेशात आपल्याच एका बंडखोर सरदाराविरुद्ध लढत होता. अन् त्याच सुमारास हैद्राबादच्या निजामाने कुरापती काढायला सुरुवात केली होती. सर्वप्रथम सैय्यद बंधूंच्या मदतीला जाणे गरजेचे होते. सरलष्कर हैबतराव निंबाळकर मराठी फौजेनिशी खानदेशात निघाले. यावेळी फौज नक्की किती होतीबते समजत नाही, परंतु निदान वीस हजार मराठी फौज असावी. खानदेशातील बंड मोडले गेले. इकडे निजामाच्या फौजा आता उघडउघड स्वराज्यात घुसखोरी करू लागल्या होत्या. निजामाच्या मोंगली फौजा शेवगाव-पैठण ओलांडून औरंगाबादेत येण्याच्या मार्गावर होत्या. मजल दरमजल करत मराठी फौजा औरंगाबादेस पोहोचल्या. दि. १५ डिसेंबर १७२० रोजी निजामाच्या फौजांत आणि मराठी फौजांत मोठे युद्ध झाले. खानदेशातील विजयामुळे मराठ्यांच्यात नवीन चैतन्य निर्माण झाले होते. निजामाचा दारूण पराभव झाला. निजाम दाती तृण धरून शरण आला. यानंतर दिनांक ४ जानेवारी १७२१ रोजी चिखलठाण येथे श्रीमंत बाजीराव पेशवे आणि निजामाची भेट झाली. उभयतांची ही प्रत्यक्ष पहिलीच भेट होती. पण पहिल्याच भेटीत निजामाला बाजीरावांची चांगलीच ओळख झाली होती. या साऱ्या गोष्टी सासवडला पेशवेवाड्यात समजत होत्या. भेटीच्या एक दिवस आधी मातोश्री राधाबाईंनी बाजीरावांना पत्र पाठवले होते. पूर्वी बाळाजी विश्वनाथांच्या कारभारात राधाबाईंनी प्रत्यक्ष सहभाग जरी घेतला नसला तरी राजकारणात कधी, काय अन् कसे करायचे याची राधाबाईंना चांगलीच माहिती होती. म्हणूनच निजामाची भेट घेताना भेटीसाठी कसे जावे, भेट केव्हा व कोणत्या ठिकाणी घ्यावी याचे संपूर्ण तपशीलवार मार्गदर्शन राधाबाईंनी केले होते. राऊ अजून राजकारणात नवखे आहेत यांच्या काळजीपोटीच त्या सल्ले देत होत्या. बाजीरावांनीही मातोश्रींच्या सल्ला-मसलतीचा योग्य विचार केला व ते निजामाच्या भेटीला गेले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ४ जानेवारी इ.स. १७७९ काल्पिचे ठाणे इंग्रजांनी घेतल्यामुळे इंग्रज-मराठे यांच्यात बिघाड झाला आहे ही बातमी उघडच होती. हेस्टिंग्जनेही मुंबईकर इंग्रजांना रघुनाथरावांना घेऊन पुण्यास जाण्यास परवानगी दिली. त्यामुळे कर्नल इगर्टन या गोऱ्या साहेबाच्या नेतृत्वाखाली ५०० इंग्रज व २००० हिंदुस्थानी शिपायांसह रघुनाथराव आणि अमृतराव मुंबईची खाडी ओलांडून पनवेलजवळ उतरले. दि. २५ डिसेंबर १७७८ रोजी इगर्टन रघुनाथरावांसह बोरघाट चढून खंडाळ्यास आले. परंतु हे पाहताच मराठ्यांनी आसपासच्या प्रदेशातील सर्व प्रदेश जाळून टाकला. त्यामुळे इंग्रजांचे दाणा-पाणी संपूर्ण तुटले. दि. ३० डिसेंबर १७७८ रोजी इगर्टनची फौज खंडाळ्याहून पुढे निघाली. दि. ४ जानेवारी १७७९ रोजी कााजवळ इंग्रजी पलटणी आल्या असता भिवराव पानशांच्या तुकडीने हल्ला चढवला. वडगाव मावळातील एकवीरा भवानीसमोरच कॅ. स्टुअर्ट मारला गेला. याच सुमारास इगर्टन आजारी पडल्याने कॅ. कॉकथन याने मोर्चा सांभाळला. दि. १३ जानेवारी रोजी तळेगावच्या मुक्कामी इंग्रज पलटणी उतरल्या. पानशांच्या तोफखान्यात मुसा नारज हा एक फ्रेंच गोलंदाज होता. याचे मूळ नाव होते 'मस्यू नोरोन्हा'. याच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे इंग्रजांची पाचावर धारण बसली होती. यानंतर पानशांच्या मदतीसाठी रामचंद्र गणेश कानडे, बाजी पंत, शिंदे-नाना इ. सर्वजण ४५००० फौजेसह वानवडीहून निघाले. मराठी फौजा थेट पलटणींना जाऊन भिडल्या. इंग्रजांच्या पाच तोफा पाडाव झाल्या. चार-पाचशे माणसे पडली. दोन हजार बंदुकांची लूट मिळाली. हे होत असतानाच बाळाजीपंत फाटक आपली चार हजार फौज घेऊन कल्याण प्रांतात उतरले. बोरघाटाची संपूर्ण नाकाबंदी करण्यात आली. इंग्रजांची रसद पूर्णपणे बंद झाली. शेवटी इंग्रजांचे खूपच नुकसान होऊ लागले हे पाहताच कॅ. फॉर्मर या अधिकाऱ्याने नाना, महादजी आणि हरिपंततात्यांची भेट घेतली. नाना-महादजींनी फॉर्मरला स्पष्ट दमच भरला की, रघुनाथरावांना मराठ्यांच्या हवाली केल्याशिवाय अन् मुलुखाच्या उपद्रवा बदल्याचा तह केल्याशिवाय तुम्हाला परत जाता येणार नाही. यावर फॉर्मर म्हणाला की, "तह करण्याचा आम्हाला काही अधिकार नाही." तेव्हा नानांनीही स्पष्ट विचारले, "मग पुरंदरचा तह मोडून मराठ्यांवर हल्ला करण्याचा अधिकार तुम्हाला कसा?" शेवटी नाईलाजाने इंग्रजांनी मराठ्यांशी नवा तह केला. तो तहनामा पुढीलप्रमाणे- १) रघुनाथरावदादास पुन्हा मराठ्यांच्या हवाली करावे. २) साष्टी, ठाणे, उरण आणि गुजरातचे काही महाल इंग्रजांनी परत मराठ्यांना द्यावेत. ३) साष्टी कब्जा होईपर्यंत दोन इंग्रज इसमांनी मराठ्यांकडे कैदी म्हणून रहावे. ४) रघुनाथरावांकडून घेतलेले सर्व दस्तऐवज परत करावे व कलकत्याहून येणाऱ्या पलटणी परत पाठवाव्यात. याशिवाय भडोच परगणा आणि ४१००० हजार रुपये महादजी शिंद्यांना नजराणा म्हणून द्यावेत. इंग्रजांनी या तहनाम्यावर सह्या करताच रघुनाथरावदादांसह कॅ. फॉर्मर आणि स्टुअर्ट हे दोन इंग्रज मराठ्यांच्या स्वाधीन झाले आणि माघ शुद्ध १ म्हणजेच दि. १८ जानेवारी १७७९ रोजी नारो गणेश, विसाजी कृष्ण इ. मंडळींनी इंग्रजी फौजांभवतीच्या चौक्या उठवल्या. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬ ✍ *लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.* ▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬ *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* *जय गडकोट* *!! हर हर महादेव !!* #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩जय जिजाऊ
शिवभक्त सुरेश भोसले
1.3K जणांनी पाहिले
*🚩आजचे _ऐतिहासिक _शिवदिनविशेष🚩* ▬▬▬▬▬▬꧁☾︎✫☽︎꧂▬▬▬▬▬▬ *⛳ श्री शिवशंभू प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य* ⛳ ▬▬▬▬▬▬꧁☾︎✫☽︎꧂▬▬▬▬▬▬ *🚩शिव कार्य हेच आमचे ध्येय आणि हेच आमचे धोरण* *************************************** https://www.instagram.com/shrishivshambhu_pratishtan?igsh=dG9ib2pubnA5dDU4 ⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳ 📜 ३ जानेवारी इ.स.१६७१ (माघ शुद्ध त्रृतीया शके १५९२ संवत्सर साधारण वार मंगळवार) महाराज आक्रमक ! इ.स.१६७० नंतर महाराजांनी मिर्झाराजे जयसिंगच्या बरोबरचा तह मोडून तहात गमावलेले किल्ले आणि प्रदेश पुन्हा स्वराज्यात घेण्यास सुरुवात केली.‌ अत्यंत आक्रमकपणे किल्ले सिंहगड घेऊन औरंगजेब आणि मोगलांना आव्हान देत रणशिंग फुंकले. म्हणूनच त्याला प्रत्युत्तर म्हणून औरंगजेबाने महाराजांना रोखण्यासाठी महाबतखानाची नेमणूक करून, दक्षिणेचा सेनापती म्हणून पाठविले व त्यासोबत जसवंतसिंहाची नेमणूक केली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ३ जानेवारी इ.स. १६८२ इ. स. १६८१ च्या डिसेंबरमध्ये सिद्दीने मराठ्यांची आपटे व नागोठणे ही गावे लुटली आणि जाळली. जंजिरेकर सिद्दीच्या ह्या अशा कृत्यांचे छत्रपती संभाजी महाराजांनी लपंडाव करून जंजिरा हस्तगत करण्याचे ठरवले. छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या कोंडाजी फर्जंद यांना सिद्दीकडे नोकरी मिळवण्यास पाठवले. त्यात ते यशस्वी झाले आणि आपल्या कुटुंबांसह जंजिरा किल्ल्यात राहू लागले. जंजिऱ्यावरील दारूखाना इत्यादींना आग लावून देण्याचा त्यांचा विचार होता. कोंडाजी फर्जंद यांचा हा डाव सिद्दीस कळला तेव्हा सिद्दीने त्यांचे डोके मारले. त्यांच्या सोबत असणाऱ्या काही लोकांना बुडविले. दगलबाजीने जंजिरा सर करण्याचा प्रयत्न अयशस्वी होताच संभाजी महाराजांनी दादाजी रघुनाथ देशपांडे या सेनापतींस दंडाराजपुरीस वेढा घालण्याकरता पाठवले. नंतर, संभाजी महाराज, राजपुत्र अकबर हे वीस हजार सैनिकांसह रायगडाहून निघाले आणि वेढा घालून राहिलेल्या सैनिकांस येऊन मिळाले. ह्या सैन्याने ्पंधरा दिवस सतत जंजिऱ्यावर तोफा डागल्या. तोफांच्या भडिमारामुळे किल्ल्याची भिंत कोसळून पडण्याची वेळ आली. दिनांक ३ जानेवारीपासून दिनांक ३ फेब्रुवारी १६८२ ह्या काळात संभाजी महाराजांनी सिद्दीवर अतिशय दबाव आणला होता, सिद्दीला अडचणीत टाकले होते आणि त्यावेळी मराठे जंजिरा जिंकून घेण्याच्या बेतात होते. त्याकरिता त्यांनी किल्ल्याभोवती खंदक भरून काढण्याकरता ५० हजार माणसे कामास लावली. आठशे यार्ड रुंद आणि तीस यार्ड खोल असणारा खंदक दगड, लाकडे, कापसाची गाठोडी वगैरे टाकून त्यांनी भरून काढला. अशाप्रकारे किल्ल्यावर चाल करून जाणाऱ्या आपल्या सैनिकांकरता त्यांनी रस्ता तयार केला. परंतु, औरंगजेबाचे दोन हजार घोडदळ आणि पंधरा हजार पायदळासह नबाब हसन अलिखान याचे मोगल सैन्य ४ फेब्रुवारी १६८२ रोजी कोकणात येऊन थडकले. दिनांक ३० जानेवारी १६८२ रोजी मोगलांनी कल्याण जिंकून घेतले. त्यामुळे संभाजी महाराजांना सिद्दीवरील मोहीम महाडच्या दादाजी प्रभू देशपांडे यांच्यावर सोपवून मोगल सेनेशी मुकाबला करण्यासाठी रायगडावर परत यावे लागले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ३ जानेवारी इ.स.१६८४ छत्रपती संभाजी महाराजांनी वसईच्या देशमुखास पत्र लिहिले:- सुलतान माजम व शाबदिखान गनीम दोहिकडून कोकणात उतरला, या प्रसंगी हशामांचे बहुतच प्रयोजन आहे. याकरिता संताजी, येसाजी यास नौसंचनी हशमाचा जमाव वरघाटे पाठविले असे हे सांगतील तिहेप्रमाणे हशमांची नौसंचनी करून पाठवून देणे, तुम्हासंगी हशामाचा पोख्ता जमाव झाला तरी गनिमाचा काय गुमान लागला बुडविलाच जातो. आजवरी स्वामीने तुमचे चालविले ते सार्थक या दिवसात करून आपला मजुरा करून घेणे म्हणजे स्वामी तुम्हावरी संतोषी होतील, आपले समाधान असो देणे. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ३ जानेवारी इ.स.१७११ गोव्याच्या व्हिसेरेईने पोर्तुगालच्या राजास लिहीलेल्या पत्राची नोंद! इ.स.१७०७ छत्रपती शाहू महाराजांचे महाराष्ट्रात आगमण झाले तेव्हा त्यांच्याशी लढण्यासाठी महाराणी ताराबाईसाहेब यांनी व्हिसेरेई दों रुद्रिगु द कांश्त याला पत्र पाठवून तहाचा संदर्भ लावला होता. व्हिसेरेईने पत्रोत्तरी महाराणी ताराबाईसाहेब यांना कळविले होते की, तहाच्या वाटाघाटी करण्यासाठी त्यांचे दुत आपणाकडे पाठवावे. परंतु ह्या वाटाघाटी पुर्ण होण्यापूर्वीच छत्रपती शाहू महाराजांकडून महाराणी ताराबाईसाहेब यांचा पराभव झाल्याने त्यांना कोल्हापूरला जाऊन पन्हाळ्याच्या किल्ल्याचा आश्रय घ्यावा लागला. पोर्तुगिजांकडून आपणाला संकटप्रसंगी मदत झाली नाही हे महाराणी ताराबाईसाहेब यांच्या मनात राहीले व पन्हाळ्याला स्थिरस्थावर झाल्यावर त्यांनी पोर्तुगिजांशी शत्रुत्वाचे धोरण अवलंबिले. "महाराणी ताराबाईसाहेब यांचे सैन्य गोव्याच्या सिमेवर गोळा झाले आहे. हे सैन्य केव्हा गोव्यात घुसेल त्याचा नेम नसल्याने 'कोंगो' येथील ठाण्याच्या मदतीला आरमार पाठवीता आले नाही". 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ३ जानेवारी इ.स.१७३७ यशवंत बुरुज - मार्टेलो टॉवर १७३७ ऑक्टोबरला अर्नाळा किल्ल्याच्या तटबंदीच्या बुरुजाच्या बांधकामास सुरुवात झाली. ३ जानेवारी १७३७ ला किल्ल्यापासून अदमासे १००० हात अंतरावर फिरंगी बुरुज होता त्याचा बांधकामास हात घातला घेरा ११५ हात, पाया जमिनीत ४ हात, १८ हात जमिनीपासून उंच ,नऊ हातावर सफेली चुने गच्ची बांधणी केली ,आठ जनग्या धरल्या व १६ तोफांच्या जागा केल्या त्यावर सुतार लावोन तक्तपोशी कौलारु केली 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ३ जानेवारी इ.स.१७३९ गुजरात मधील ठाणे बादल पारडी घेण्यासाठी चिमाजी आप्पांनी, पिलाजी जाधव यांचा मुलगा सटवाजी जाधव यास रवाना केले, पण दमण येथील किल्ल्यांची भक्कम शिबंदी पाहता, या मुलखात रायजी शंकर नावाच्या एका माहितगाराला पाठविले व ३ जानेवारी १७३९ रोजी लिहिलेल्या पत्रात चिमाजी आप्पा चौकशी करताना सटवाजी जाधवास लिहितात. श्री. शके १६६० पौष शु॥ ५. राजश्री सटवोजी जाधव गोसावी यांसि :-- अखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्य स्नो। चिमणाजी बल्लाळ आशीर्वाद. सु॥ तिसा सलासीन मया अलफ. रामनगरकर राज्यांस आह्मी भेटीस बोलाविलें आहे. ऐशास, तुह्मी बादलापारडीस खटपट करावयाचा उद्योग केला असेल, तरी रामनगरकर राज्यांसदेखील तुह्मी आपणाजवळ ठेऊन घेणें; आणि काम सिद्धीस नेणें. तैसेंच रा। रायाजी शंकर यास कार्य असिलें तर ठेवणें. ते राहातील. जरी तुह्मी तेथील कार्यास उपक्रम केलाच नसेल, तर मग विना कार्य मशारनिल्हेस ठेवावेसें नाहीं. पाठऊन देणें. डहाणूजवळ डोंगर बांधावयाचा आहे तो बांधतील. सारांश, तुह्मी बादलापारडी जेर करावयाचा उद्योग केला असेल तरी व रायाबा तेथें असावेसें असेल, तें वर्तमान लिहिणें ? लेखन सीमा. श्री राजा शाहू नरपति हर्षनिधान बाजीराव बल्लाळ प्रधान. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ३ जानेवारी इ.स.१७७५ गोव्याच्या व्हिसेरेईने पुणे दरबारातील पोर्तुगिजांचे वकील नारायण शेणवी धुमे यांना लिहीलेल्या पत्राची नोंद! "आशियाई लोक हे लांचलुचपतीला बळी पडणारे असतात. तेव्हा तुम्ही मंत्री आणि अधिकारी यांना लाच चारून त्यांना सहज वश करून घेऊ शकाल. मात्र पैशांचा व्यवहार विश्वासू माणसांमार्फत करावा".वानगी दाखल वरील अवतरण दीले आहे, त्यावरून पोर्तुगीज आणि पेशवाईतील मुत्सद्दी यांच्यामधील संबंधावर चांगला प्रकाश पडतो. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ३ जानेवारी इ.स.१८३१ भारतातील पहिल्या मुलींच्या शाळेच्या 'शिक्षिका', 'मुख्याध्यापिका' आणि पहिल्या 'शेतकरी शाळेच्या' संस्थापक "महानायिका क्राँतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती (मृत्यू : मार्च १०, इ.स. १८९७ पुणे) सावित्रीबाईंच्या सामजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून १९९५ पासून ३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा “बालिकादिन ” म्हणून साजरा केला जातो. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬ ✍ *लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.* ▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬ *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* *जय गडकोट* *!! हर हर महादेव !!* #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩जय जिजाऊ #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏शिवदिनविशेष📜
शिवभक्त सुरेश भोसले
1.6K जणांनी पाहिले
*🚩आजचे _ऐतिहासिक _शिवदिनविशेष🚩* ▬▬▬▬▬▬꧁☾︎✫☽︎꧂▬▬▬▬▬▬ *⛳ श्री शिवशंभू प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य* ⛳ ▬▬▬▬▬▬꧁☾︎✫☽︎꧂▬▬▬▬▬▬ *🚩शिव कार्य हेच आमचे ध्येय आणि हेच आमचे धोरण* *************************************** https://www.instagram.com/shrishivshambhu_pratishtan?igsh=dG9ib2pubnA5dDU4 #🚩जय जिजाऊ ⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳ 📜 १ जानेवारी इ.स.१३९९ शके १३२१ च्या पौष व. ९ रोजी तैमूरलंग भारतांतून अगणित लूट घेऊन आणि मनसोक्तपणे रक्तपात करून आपल्या मायदेशी गेला. दिल्ली शहर हस्तगत झाल्याबरोबर तैमूरच्या सैन्यांत विजयोत्सव सुरू झाले. पकड, लूट, मारहाण या प्रकारांना ऊत आला. पंधरा दिवसपर्यंत तैमूरलंगाचा मुक्काम दिल्लीस होता. भारतांतील कलाकौशल्यावर तो फार खुष होता. कित्येक कारागीर त्याने स्वतःबरोबर धेतले. जाता जाता ही त्याने पुष्कळच अनन्वित प्रकार केले. मिरत शहरी त्याच्या सैन्याची थट्टा कोणी केली म्हणून त्यानें सर्वोची कत्तल केली. आग्नि व तरवार यांच्या साह्याने तैमूरचा तुफानी प्रचार होत होता. हरद्वार येथे आल्यावर त्यास समजलें कीं, गोमुखांतून गंगा पडते. या 'पारवंडीपणा 'वर तो खूपच संतापला आणि त्यामुळे त्यावर विश्वास ठेवणारांना कडक शासन भोगावे लागले. लक्षावधि लोकांना त्याने मृत्यु- लोकांत पाठविले. मनुष्यजातीचे महान् शत्रु म्हणून इतिहासांत जे नांवाजलेले आहेत त्यांच्यांत तैमूरची गणाना केली जाते. तो एखाद्या नवीन शहरी आला म्हणजे तेथील लोकांजवळ सर्व संपत्तीची दरडावून मागणी करीत असे. नंतर ती लुटून आणण्यास आपली फौज पाठवी. सर्व लोकांना पकडून तो एका ठिकाणी जमा करी. अशा लोकांतून कोणी कारागीर किंवा विद्वान् असतील तर तो त्यांना निवडून दूर करी. इतरांचा जीव घेऊन त्यांच्या शिरांचा एक मोठा ढीग शहराबाहेर रचण्यांत येई. बगदाद शहर घेतले त्या वेळेस अशा शिरांचे मनोरे एकशेवीस झाले होते. केव्हां केव्हा जिवंत माणसांना चुन्याने व विटांनी चिणून त्यांचा तट बांधण्याचे काम तैमूरचे कुशल कारागीर करीत." हिंदुस्थानांत मुंगली जुलभास व्यवस्थितपणे सुरुवात तैमूरनेच केली. त्याच्या नांवाने बादशाहीहि चालू होती. तो जिवंत असेपर्यंत त्याच्या नांवानें खुत्बा वाचण्यांत येत असे. तैमूरलंगाची स्वारी म्हणजे एक प्रकारचा ईश्वरी क्षोभच भारतीय लोक समजत असत. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 📜 १ जानेवारी इ.स.१६६२ पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांचा जन्म. (मृत्यू: १२ एप्रिल १७२०) 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 📜 १ जानेवारी इ.स.१६६५ (पौष वद्य दशमी शके १५८६ संवत्सर क्रोधी वार रविवार) महाराज सहपरिवार महाबळेश्वर येथे मुक्कामी! डिसेंबर इ. स. १६६४, रोजीच्या शेवटच्या आठवड्यात महाराजांनी डचांची वेंगुर्ल्याची वखार साफ लुटली. मात्र याच काळात धुमकेतू दर्शनामुळे जनमानसात खळबळ माजली होती, त्या पाठोपाठ येणाऱ्या सूर्यग्रहणामुळे महाराजांनी आपली इतर कामे बाजूला सारून ग्रहण निवारणार्थ पर्वणी साधण्यासाठी महाराज सहपरिवार महाबळेश्वर येथे आले. सूर्यग्रहणाच्या या पर्वावर महाराजांनी मनोमन माँसाहेब जिजाऊ आणि सोनोपंत डबीर यांची सुवर्णतुला करण्याचे ठरविले. या सगळ्याची आवश्यक ती तयारी करण्यासाठी महाराज महाबळेश्वर येथे मुक्कामी आले. याच काळात महाराजांनी पुढे ग्रहणानिमित्त पर्वणी साधून सुवर्णतुलेचा योग घडवून आणला. 📜 १ जानेवारी इ.स.१६७५ इ.स. १६७३ मध्ये महाराजांनी कर्नाटकातील हुबळी येथे घातलेल्या छाप्यात इंग्रजांचीही वखार लुटली गेली. यात इंग्रजांचे सुमारे पाऊण लाख रुपयांचे नुकसान झाले. हुबळी आणि राजापूर इथल्या लुटीची नुकसानभरपाई मिळावी म्हणून मुंबईचा डेप्युटी गव्हर्नर ऑनजिअर याने महाराजांकडे पुष्कळवेळा आर्जव केले. पण महाराजांनी ते मान्य केले नाही. मे १६७३ मध्ये मुंबईहून टॉमस निकल्स नावाचा वकील महाराजांना भेटायला रायगडावर आला, पण त्याचा काही फारसा उपयोग झाला नाही. निकल्स हात हलवत परत फिरला. पुढे इ.स. १६७४ च्या ४ एप्रिलला मुंबईहूनच हेन्री ऑक्झेंडन हा वकील महाराजांच्या भेटीसाठी आला. त्याने बरोबर येताना वीस कलमी मसुदा तयार करून आणला होता. त्यात बाकीची सर्व कलमे ही व्यापारविषयक होती. पण शेवटचे कलम होते, ते म्हणजे मराठ्यांच्या राज्यात इंग्रजांची (कंपनीची) नाणी चालावीत. पण महाराजांनी नेमके हेच कलम रद्द करून बाकीची कलमे मान्य केली. यावेळेस मराठे आणि इंग्रज यांच्यात समझोता झाला असतानाही दि. १ जानेवारी १६७५ रोजी खुद्द महाराजांच्या फौजेने व-हाड-खानदेशातील मोगलांवरील स्वारीच्या वेळी इंग्रजांची धरणगावास असणारी वखार लुटली. याची चौकशी करण्याकरता, खरंतर जाब विचारण्याकरता आणि नुकसानभरपाईसाठी इंग्रजांचा ऑस्टिन नावाचा माणूस रायगडावर आला. पण महाराजांनी त्याला स्पष्टपणे सांगितले, 'आम्ही शत्रूच्या मुलुखात युद्ध करीत असता, कोणाचेही नुकसान झाले तरी ते भरून देण्यास आम्ही बांधील नाही!' बिचारा ऑस्टिन मुकाट्याने परत फिरला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 📜 १ जानेवारी इ.स.१६८१ इंग्रजांच्या आश्रयाने मराठी मूलखाला त्रास देणाऱ्या सिद्दीचा बंदोबस्त करण्यासाठी संभाजी महाराजांनी इंग्रजांशी बोलणी करण्यासाठी आपला वकील मुंबईला पाठवला.संभाजीराजेंचे वकील आवजी पंडित यांनी इंग्रजांना सांगितले की शिवाजी महाराजांशी झालेल्या तहाप्रमाणे इंग्रजानी जर सिद्दीचा बंदोबस्त केला नाही तर संभाजीराजे इंग्रजांशी युद्ध पुकारतील. आवजी पंडित मुंबईत आल्याचे पाहून मराठ्यांच्या आरमाराला तोंड द्यायची तयारी नसल्याने सिद्दीने आपले आरमार बंदराच्या बाहेर नांगरले. त्यानंतर शंभुराजेंच्या आणि पर्यायाने मराठ्यांच्या सामर्थ्याची पुरेपुर माहिती व परिणामांची त्यांना असलेली भीती इंग्रजानी पत्र पाठवून लंडनला कळवली होती. "संभाजीराजे इंग्रजांशी मैत्री राखण्यासाठी तयार असले तरी ते यापुढे हा उपद्रव सहन करणार नाहीत. सिद्दीचा मदत ताबडतोब थांबवून त्याला आरमारासह बाहेर काढले नाही आणि त्याची मदत चालू राहिली तर संभाजी महाराजांनी मुंबईवर स्वारी करण्याचा निश्चय केला आहे. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 📜 १ जानेवारी इ.स.१६८२ छत्रपती संभाजी महाराजांनी डिचोलीच्या सुभेदाराची बदली केली आणि शिवाजी फडनाइकांची नेमणूक केली. ही बातमी समजल्यावर विजरई येसाजी गंभिरराव यांस कळवितो की, "आमचे या दोन्ही राज्यांत सलोखा निर्माण व्हावा ही तळमळीची इच्छा आहे". 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 📜 १ जानेवारी इ.स.१६८३ शके १६०४ च्या पौष शु. १३ रोजी समर्थपंचायतनांतील प्रसिद्ध सत्पुरुष भागानगरकर केशवस्वामी हे समाधिस्थ झाले ! महाराष्ट्रातील संतांत तीन पंचायतने प्रसिद्ध आहेत. निवृत्ति, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई व चांगदेव हे ज्ञानेश्वर-पंचायतन, एकाजनार्दन, रामजनार्दन, जनी- जनार्दन, विठा रेणुकानंद व दासोपंत हे एकनाथ -पंचायतन व रामदास, जयराम स्वामी, रंगनाथ स्वामी, केशव स्वामी व आनंदमूर्ति हे रामदास-पंचायतन. या शेवटच्या पंचायतनांतील केशव स्वामी खेरीज इतर सर्व संत प्रांतांत शेजारी शेजारी राहत असत. त्यामुळे त्यांच्या वारंवार गांठी-भेटी होत असत परंतु केशव स्वामींचे वास्तव्य मात्र हैद्राबादेस असे. केशव स्वामी मूळचे कल्याणीचे. आत्मारामपंत कुलकर्णी व गंगाबाई या सच्छील दांपत्याच्या पोटी केशवस्वामींचा जन्म झाला. असे सांगतात की, केशवस्वामी वयाच्या पांचव्या वर्षापर्यंत बोलतच नव्हते. परंतु पुढे श्रीमत् आचार्य यांच्या कृपेवरून केशवस्वामी बोलूं लागले. संमर्थीप्रमाणें यांना ही गाण्याची अत्यंत आवड होती. केशवस्वामी ' स्वामी असले तरी प्रपंची होते. ते व त्यांची पत्नी नेहमी भगवभक्तीत दंग असत. जनतेत धर्मश्रद्धा निर्माण' करण्यासाठी, हे स्वतः कविता रचून कर्तिने करीत असत. त्यांच्या पद्यांतून वरवर शृंगाराची छटा असे. गीतगोविंदकतें जयदेव कवि यांचेच अवतार म्हणून ही लोक यांना समजत. यांच्या काव्याबद्दल राजा- राम प्रासादी भक्तमंजरीमालेत म्हणतात. "जगत्रं जाली कीर्ति । धन्य कृपाळु केशवमूर्ती ॥ उद्घारावया यया जगतीं । जयदेव कवि अवतरला ॥ पूर्वी शृंगार देवाचा । वर्णितां लाचावली वाचा । तोचि अभ्यास पडता साचा । अनुकार कवनाचा तोचि पै ॥ अध्यात्मयुक्त शृंगारिक । भाषण जयाचें नेमक । जाहलें काव्य तेंचि चोख । प्रासादिक सकल जनां । " केशवस्वामींची कविता श्री. नरहरशास्त्री स्वरशीकर यांनी प्रसिद्ध केली आहे. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 📜 १ जानेवारी इ.स.१७०१ परळीपासून बादशहाला सैन्यासह भूषणगडाकडे जावयाचे होते. भूषणगड परळीपासून रस्त्याने ४५ मैल अंतरावर. परळीहून बादशहाने भूषणगडाकडे जाण्यासाठी भर पावसाळ्यात २१ जून १७०० ला कूच केले. ज्या जनावरांवर सामानाची ओझी लावली होती ती जनावरे पटापट मरू लागली. कृष्णा नदीला पूर होता. त्यातून सैन्य मोठ्या मुष्किलीने पैलतीरी पोहोचले. शेकडो उपासमारीने मेले, पुढे हळूहळू मार्ग आक्रमत मोगली लष्कर २५ जुलै रोजी भूषणगडास पोहोचले व गडाचा ताबा मिळविला. येथे बादशहाने आपल्या शहाजाद्याला व इतर सरदारांना सैन्यासह निरनिराळ्या शहरात जाऊन विश्रांती घेण्यास पाठविले. त्यांनी त्याप्रमाणे केले व त्यामुळे त्यास व त्यांचे घोड्यांस भरपूर दाणागोटा मिळाल्यामुळे ते आनंदित झाले. बादशहा ३० ऑगस्ट १७०० ला खवासपुरी येथे जाऊन राहिला. तेथे असताना माण नदीस अचानक मोठा पूर आल्याने चार-पाच हजार लोक, हत्ती, घोडे, वगैरे वाहून गेले व लष्कराचे फार नुकसान झाले. नंतर १६ डिसेंबर १७०० ला बादशहाने मिरजेस जाण्यासाठी आपला तळ हालविला व १ जानेवारी १७०१ ला बादशाही सैन्य मिरजेस आले. त्यानंतर तो २ महिने तिथेच मुक्काम ठोकून राहिला. त्या मुदतीत त्याने पन्हाळगडावर स्वारी करण्याचे ठरविले. त्यासाठी उत्तर हिंदुस्थानातील ताज्या दमाची फौज व सामानसुमान मिरजेस येऊन पोहचले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 📜 १ जानेवारी इ.स.१८१८ कोरेगाव भिमाची लढाई ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामधील कोरेगाव भिमा या गावात भीमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे. ही लढाई १ जानेवारी इ.स. १८१८ रोजी इंग्रज ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व मराठा साम्राज्य यांच्यात झाली होती. ब्रिटिशांच्या बाजूने एकूण ८३४ सैनिक होते, ज्यांचे नेतृत्व सेनापती कॅप्टन फ्रान्सिस एफ. स्टाँटन करीत होता तर मराठा साम्राज्याच्या बाजूने २८,००० सैनिक होते, ज्याचे नेतृत्व सेनापती पेशवा बाजीराव दुसरा करीत होता. इंग्रजांच्या सैनिकांत 'बॉम्बे नेटिव लाइट इन्फेंट्री तुकडी'चे ५०० महार सैनिक होते, काही युरोपियन व इतर काही सैनिक होते. मराठ्यांच्या सैनिकांत मराठा, अरब व गोसाई या सैनिकांचा समावेश होता. पेशवाईच्या काळात अस्पृश्यतेचे पालन मोठ्या प्रमाणावर होत होते व महार, मांग व इतर अस्पृश्यांना अत्यंत हीन वागणूक दिली जात असे, याला विरोध म्हणून महार सैनिक आत्मसन्मासाठी ब्रिटिशांच्या बाजूने मराठ्यांविरूद्ध लढले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 📜 १ जानेवारी इ.स.१८४८ महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुणे येथे भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. समाजाच्या विरोधात जाऊन एखादं चांगलं काम करायचं झालेतरी अंगावर दगडी पडतात. सगळ्यात या दगडी खाण्याची हिम्मत असतेच असे नाही, मनात खूप असते ओ पण समाज काय म्हणेल या विचारातून उठणाऱ्या मनातल्या लाटा पुन्हा मनातचं विरून जातात. पण क्रांतीज्योती कधीच डगमगली नाही, नावाप्रमाणेचं महात्मा जोतीबा फूलेंनी अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठी सुरवात केली होती. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬ ✍ *लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.* ▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬ *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* *जय गडकोट* *!! हर हर महादेव !!* #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा
शिवभक्त सुरेश भोसले
881 जणांनी पाहिले
*🚩आजचे _ऐतिहासिक _शिवदिनविशेष🚩* ▬▬▬▬▬▬꧁☾︎✫☽︎꧂▬▬▬▬▬▬ *⛳ श्री शिवशंभू प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य* ⛳ ▬▬▬▬▬▬꧁☾︎✫☽︎꧂▬▬▬▬▬▬ *🚩शिव कार्य हेच आमचे ध्येय आणि हेच आमचे धोरण* *************************************** https://www.instagram.com/shrishivshambhu_pratishtan?igsh=dG9ib2pubnA5dDU4 #🚩जय जिजाऊ #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपति शिवाजी महाराज ⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳ 📜 ३० डिसेंबर इ.स.१६०० काही ब्रिटिश व्यापारी एकत्र आले आणि त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. इंग्लंडच्या राज्या तर्फे या कंपनीला भारतातील व्यापाराचे सारे अधिकार देण्यात आले. त्या नंतर १६०८ साली कंपनीचे पहिले जहाज सुरतेच्या बंदरात येऊन धडकलं. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ३० डिसेंबर इ.स. १६८० (पौष शुद्ध अष्टमी शके १६०१ सिद्दार्थी संवत्सर वार मंगळवार) छत्रपती संभाजी महाराजांची सुवर्णतुला! १४ जानेवारी इ.स.१६८१ ते १६ जानेवारी इ.स.१६८१ छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला असला तरी त्यासाठी आवश्यक असणारी सुवर्णतुला आज करण्यात आली. या सुवर्णतुलेनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी सपत्नीक किल्ले प्रतापगडावर जाऊन कुलस्वामिनी भवानीआईचे षोडशोपचारे पूजाअर्चा केली. सदर राज्यभिषेक व सुवर्णतुलेचे अनुपुराणात वर्णन आढळत असले तरी समकालीन इतर कागदपत्रांत फारसे उल्लेख आढळत नाहीत. छत्रपती संभाजी महाराजांची सुवर्णतुला झाली. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 ३० डिसेंबर इ.स.१७०४ रामचंद्रपंत अमात्य यांनी व्हिसेरेईला पाठविलेल्या पत्राची नोंद! रामचंद्रपंत अमात्य यांनी व्हिसेरेईला पत्र पाठवून कळविले होते की, आपल्या दरबारात पोर्तुगीज राजदूत नाही म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना विषाद वाटतो. व्हिसेरेई रामचंद्रपंत अमात्य यांना दि.३० डिसेंबर इ. स.१७०४, रोजी पाठविलेल्या ऊत्तरात शीण काढतो की, त्याचे गोव्यात व्हिसेरेई म्हणून आगमन झाले, तेव्हा बहुतेक राजेरजवाड्यांनी पत्रे पाठवून त्याचे स्वागत केले होते. परंतु त्या पत्रात महाराजांचे अभिनंदनपर पत्र नव्हते. राजदूत विषयी तो म्हणतो की, छत्रपती शिवराय व पोर्तुगीज यांच्यामध्ये सलोखा नांदत असल्याचा सुगावा मोगल बादशहास लागू नये म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दरबारात राजदूत न पाठविण्याचा निष्काळजीपणा आपल्या हातून घडला असावा. ज्याप्रमाणे आपले अभिनंदन न करण्याचा निष्काळजीपणा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कडून घडला त्याप्रमाणे पोर्तुगिजांनी आपला वकील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दरबारात पाठविला नाही म्हणून बुरानजी मोहीते आणि कान्होजी आंग्रे या दोघांनाही व्हिसेरेईला पत्रे पाठवून तक्रार गुदरवली होती. रामचंद्रपंतत्या दोघांनाही व्हिसेरेईने वरच्या सारखेच ऊत्तर धाडले. अमात्य यांनी व्हिसेरेईला पत्र पाठविले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 ३० डिसेंबर इ.स.१७२५ छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती शाहूराजे यांच्यात करार छत्रपती संभाजींनी निजामाशी प्रथम मैत्री संपादिली, तसेच गोव्याचे पोर्तुगीज यांच्याबरोबर १७१६ साली दारुगोळा, तोफा, बंदुका वगैरे सामान विकत घेण्याचा करार केला. शाहू महाराजांनी संभाजींच्या सरदारांविरुद्घ जशी मोहीम आखली, तशीच संभाजींनी सातारापक्षीय सरदारांविरुद्घ आघाडी उघडली. त्यांपैकीच १७१८ मधील सावंतवाडीची मोहीम होती. यासंदर्भात दोघांमधील वडगावच्या लढाईत शाहूंची सरशी झाली; तथापि मिरज, कराड इ. ठाणी त्यांनी स्वतः सैन्याचे नेतृत्व केले. २० मार्च १७२० च्या उरुणबहे लढाईत (इस्लामपूर जवळचे कृष्णेकाठचे गाव) बाळाजी विश्वनाथांनी त्यांचा पूर्ण पराभव केला, तेव्हा संभाजींना माघार घेऊन पन्हाळ्याला जावे लागले. छत्रपतींच्या दोन घराण्यांत राज्याची विभागणी व्हावी, अशी त्यांची सुरुवातीपासून इच्छा होती. त्यानुसार ३० डिसेंबर १७२५ मध्ये उभयतांत एक करार झाला. त्यानुसार दक्षिणेकडील सर्व ठाणी व किल्ले संभाजींकडे आणि मिरज व विजापूर प्रांत हे शाहूंकडे असे ठरले आणि एकविचारे राज्याभिवृद्धी करावी, असे ठरले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 ३० डिसेंबर इ.स.१७६० ३० डिसेंबर १७६० रोजी उत्तरेतला अजून एक मामलेदार गोपाळराव गणेश बर्वे, दहा हजाराचे अनअनुभवी सैन्य घेऊन शूजाच्या मुलुखात घुसला. गोपाळरावांच्या मराठी शिलेदारांनी भोजपुरच्या बळकट गढीवर हल्ला चढविला. या गढीत काही उत्तम बंदुकधारी रोहिले होते पण मराठ्यांच्या पुढे त्यांचा टिकाव लागला नाही आणि ते पळून जवळच असलेल्या धरेमौ गढीच्या आश्रयास गेले. मराठ्यांनी आता या गढीला वेध घातला. उपासमार झाल्याने किल्लेदाराने पूर्ण ताकदीनिशी मराठ्यांवर प्रतिहल्ला केला पण या चकमकीत सुद्धा रोहिल्यांचा पूर्ण बिमोड झाला, त्यांचे अनेक सैनिक कापले गेले तर अनेक युद्ध बंदी झाले. मराठ्यांनी शूजाच्या मुलुखाची वाताहात केली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ३० डिसेंबर इ.स.१९४३ ऐतिहासिक व स्फूर्तिदायी दिवस ३० डिसेंबर. आजचा दिवस भारताच्या स्वातंत्र्य लढायांतील एक अति महत्वाचा व स्फूर्तिदायी दिवस. १९४३ साली याच दिवशी आझाद हिंद सेनेचे सेनापती नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी अंदमानमध्ये पोर्ट ब्लेअर शहरात प्रथमच 'स्वतंत्र' भारताचा ध्वज फडकवला व भारतीय स्वातंत्र्याची घोषणा केली. त्या काळात दुसरे महायुद्ध चालू होते. नेताजींनी जपान व जर्मन सरकारांशी संगनमत करून आझाद हिंद सेनेकडून ब्रिटिश प्रदेशावर आक्रमणे सुरू केली. या मोहिमेचा भाग म्हणून अंदमान-निकोबार द्विप समुह त्यांनी जिंकला. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 ▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬ ✍ *लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.* ▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬ *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* *जय गडकोट* *!! हर हर महादेव !!*
See other profiles for amazing content