Bhimsquadmk

Prasad Suryavanshi
1.2K views
4 days ago
उद्याच्या चांगल्या आयुष्यासाठी आजचा संघर्ष आवश्यक आहे." - dr babasheb ambedkar #डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
626 views
6 days ago
बाबासाहेबांचे विविध भाषणातून विचार... भाग 2 विकल्या गेलेल्या नेत्यांना ओळखायला शिका हे समाजात राहून समाजाला दिशाहीन करण्याचे काम खूप अलगत करत असतात त्यांच्या पासून सावधान रहा हे स्वतःचा फायदा करून समाजाचे आणि चळवळीचे नुकसान करत असतात... तुम्ही स्वतःच स्वतःची गुलामगिरी संपवली पाहिजे. ती नष्ट करण्यासाठी कोण्या देवावर किंवा कोण्या महापुरुषावर अजिबात विसंबुन राहू नका. लक्षात ठेवा की लोक नुसते आकडेवारीने बहुसंख्य असणे पुरेसे नाही. यश मिळवण्यासाठी आणि ते टिकवण्यासाठी लोकांनी सजग, सक्षम आणि स्वाभिमानी असणे अत्यंत आवश्यक आहे. आपण आपले मार्ग स्वतःच आखले पाहिजेत आणि स्वतःच त्या मार्गावरुन चालले पाहिजे... अस्पृश्यता ही अस्पृश्यांसाठी जीवन सुधारण्याच्या सर्व प्रकारच्या संधींची दारे बंद करून टाकते. ती अस्पृश्याला समाजात मोकळेपणाने फिरण्याची संधी देत नाही, तर ती त्याला कैदेत आणि विजनवासात जगण्यास भाग पाडते; ती त्याला स्वतःला सुशिक्षित करण्यापासून व त्याच्या निवडीचा व्यवसाय करण्यापासून रोखते... अस्पृश्यतेने अस्पृश्य, हिन्दू व अंतिमतः देशाचाही विनाश केला आहे. उपेक्षित वर्गाला जर त्याचा आत्मसन्मान प्राप्त झाला तर ते केवळ स्वतःच्याच प्रगती व समृद्धीमध्ये सहभागी होतील असे नाही तर त्यांची व्यावसायिक कौशल्ये आणि निर्धारामुळे ते देशाच्या शक्ती व समृद्धीमध्ये देखील योगदान देतील. अस्पृश्यतेच्या अवमानकारक जिण्याविरुद्ध संघर्ष करण्यासाठी अस्पृश्यांना जी काही महाकाय शक्ती खर्च करावी लागते आहे, ती जर वाचवली तर तीच शक्ती त्यांनी शिक्षणाचा प्रसार आणि संपूर्ण देशातील संसाधनांचा विकास यासाठी वापरली असती.... या देशात अनेक महात्मे होऊन गेले ज्यांचे एकमेव उद्दिष्ट अस्पृश्यतेला नष्ट करून उपेक्षित वर्गाचे जिणे उंचावून त्यांना मुख्य प्रवाहात सामिल करून घेणे हे होते, पण कुणालाही त्यांच्या कार्यात यश आले नाही. महात्मे आले आणि महात्मे गेले, परंतु अस्पृश्य हे अस्पृश्यच राहिले... जातीप्रथेचे संपूर्णतः निर्मूलन करण्याच्या दृष्टिकोनातून संतांच्या संघर्षाचा समाजावर काही परिणाम झालेला नाही. व्यक्तीचे मूल्य हे स्वयंभू व स्वस्थापित असते; ते त्याच्याकडे भक्तीच्या मुलाम्यामुळे येत नाही. संतांनी हा मुद्दा प्रस्थापित करण्यासाठी संघर्ष केला नाही. याउलट, उपेक्षित वर्गावर त्यांच्या संघर्षाचा अयोग्य परिणाम झालेला आहे. यांमुळे ब्राह्मणांना अस्पृश्यांच्या तोंडावर फेकून त्यांची तोंडे बंद करायला एक तर्क मिळाला की तुम्ही जर चोखामेळा सारखे व्हाल तरच तुम्हाला आदर मिळेल नाहीतर नाही... हिंदू संहितांमधून खोडसाळपणे असा प्रचार केला गेला की उच्च वर्णीयांची सेवा करण्यातच शुद्रांची मुक्ती सामावलेली आहे. अस्पृश्यता ही गुलामगिरीचेच दुसरे नावरूप आहे. कोणताही वंश त्याचा आत्मसन्मान नष्ट करून वाढूच शकत नाही. तेव्हा जर तुम्हाला खरोखरच अस्पृश्यांचे उत्थान करायचे असेल, तर तुम्ही सामाजिक स्तरावर त्यांना त्यांचे भवितव्य घडवण्यासाठी मुक्त असे स्वतंत्र नागरिक म्हणूनच वागवले पाहिजे... मुक्तीदाता विशेषांक #bhimsenik #💪बुद्धांची तत्वे📜 #💙 भीमसैनिक 💙 #🙏 प्रेरणादायक बॅनर
Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
744 views
17 days ago
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील काही घटना १९३० साली नाशिक येथील काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाला सुरुवात झाली आणि दलित समाजाच्या शेकडो सत्याग्रहींनी मंदिराला वेढा दिला. त्यामुळे सनातन्यांची माथी भडकली आणि त्यांनी सत्याग्रहींवर दगडांचा मारा सुरू केला, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरही दगडांचा वर्षाव सुरू झाला. त्यांना वाचविण्यासाठी त्यांच्या डोक्यावर छत्री धरण्यात आली. परंतु तिचा फारसा उपयोग होऊ शकला नाही. अशा स्थितीत बाबासाहेबांनी सुरक्षित ठिकाणी जावे अशी विनंती दादासाहेब गायकवाड आदी कार्यकर्त्यांकडून त्यांना करण्यात आली, परंतु बाबासाहेब त्या संग्रामातून हटले नाहीत. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना तर स्पष्टच सांगितले की, 'जे साऱ्या सत्याग्रहींचे होईल तेच माझे होईल. मग त्यात माझा प्राण गेला तरी बेहत्तर; पण वा साऱ्या सत्याग्रहींना संग्रामात सोडून मी एकटा कदापि जाणार नाही. डॉ. बाबासाहेबांचे ते बोल ऐकून साऱ्यांना चेतना मिळाली आणि दगडांच्या त्या वर्षावातही सत्याग्रहींची ती मिरवणूक बाबासाहेबांचा जयजयकार करीत पुढे सरकत गेली. यावरून बाबासाहेब किती निर्भय पुढारी होते हेच दिसून येईल. बाबासाहेब नेहमी म्हणत की, 'जो मृत्यूला घाबरतो तो मृत्यूजवळच जातो, पण जो घाबरत नाही त्याच्यापासून मृत्यूसुद्धा लांब जातो.' मुंबईच्या वरळी मैदानात गांधीजी थांबले असताना आंबेडकर अनुयायांनी त्यांना काळे झेंडे दाखवले आणि त्यावरून बातावरण चिघळले. तशातच देवरूखकर नावाच्या दलित वर्गाच्या नेत्याला मुंबईमध्ये भोसकून ठार करण्यात आले आणि द्वेष, कटुता यांनी सारे वातावरण ढवळून निघाले. राजगृहाच्या अवतीभोवतीही दंगलखोर फेऱ्या मारू लागले. अशा परिस्थितीत बाचासाहेबांनी तेथे जाऊन आपला जीव धोक्यात टाकू नये असे अनुयायांकडून त्यांना सांगण्यात आले. परंतु बाबासाहेब ठरले निधड्या छातीचे आणि बेडर वृत्तीचे. त्यांनी लागलीच त्या साऱ्यांना सुनावले, 'प्राणांपेक्षाही प्रिय असलेली माझी पुस्तकं, माझे ग्रंथालय धोक्यात टाकून केवळ आपला जीव वाचविण्यासाठी तेथे न जाण्याचा भेकडपणा मी करणार नाही. बेहत्तर मला तेथे मरण आले तरी!' मोठा धोका पत्करूनही डॉ. बाचासाहेब आंबेडकर राजगृही गेले. प्राणापेक्षाही ग्रंथ, ग्रंथालय त्यांना प्रिय होती. एकदा ते म्हणाले होते की, 'जर कोणी मला एकाच वेळी ग्रंथ आणि भाकरी देऊ केली तर मी प्रथम ग्रंथच पसंत करीन.' बाबासाहेबांच्या विद्वत्तेमुळे मी मी म्हणणारे देशातील विद्वान त्यांच्यापासून चार हात लांबच राहायचे व त्यांच्या निर्भय वृत्तीमुळे सनातनी गुंडही त्यांच्या अंगावर हात टाकायला कचरायचे. बाबासाहेबांना दुखावले तर त्याचा काय परिणाम होईल ह्याची दहशत खुद त्या वेळच्या शंकराचार्यांनाही असे. महाड येथे मनुस्मृतीचे दहन करताच सनातनी मंडळी खवळली आणि बाबासाहेबांवर आग पाखडू लागली. गांधीजींच्या उपोषणामुळे तर त्यात भरच पडली... #💪बुद्धांची तत्वे📜 #🙂Positive Thought #bhimsenik #🙏 प्रेरणादायक बॅनर #💙 भीमसैनिक 💙