Bhimsquadmk

Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
645 views
2 days ago
मी माझे आयुष्याचे शेवटचे दिवस बुद्ध धर्माच्या प्रचारातच व्यतीत करण्याचे ठरविले आहे... दिनांक २७ मे, १९५३ रोजी बुद्ध जयंती निमित्त सकाळी ८ वाजता वरळी, आंबेडकर मैदानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामुदायिक प्रार्थना कशी करावी याचे मार्गदर्शन करणार आहेत आणि सायंकाळी ५ वाजता नरेपार्क, परेल (जी.आय.पी. रेल्वे वर्क शॉप समोरील मैदान) येथे त्यांचे जाहीर व्याख्यान होईल असे दि. २३ मे १९५३ च्या जनतेत श्री. आर. डी. भंडारे, सेक्रेटरी, बौद्ध धर्म प्रचार समिती यांनी जाहीर केले होते. त्यानुसार मुंबई नरेपार्क येथे दिनांक २७ मे १९५३ रोजी सायंकाळी या कार्यक्रमाला प्रचंड जनसमुदाय होता. प्रथम श्री.आर.डी. भंडारे यांनी भ. बुद्धाच्या फोटोला हार अर्पण केला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले, भगिनींनो आणि बंधुजनहो, आपण आज सर्वजण बुद्ध जयंती निमित्ताने एकत्र आलो आहोत. आज या ठिकाणी जी बुद्ध जयंती साजरी होत आहे तशी ती अनेक ठिकाणी साजरी होत असेल तरी येथील जयंतीला विशेष महत्त्व आहे. बुद्ध जयंतीचा दिवस हा सुट्टीचा दिवस मानला जावा म्हणून मी सन १९४२ सालापासून सरकारकडे मागणी करीत होतो. मध्यंतरीच्या काळात मंत्रीमंडळात असतानाही मी बुद्ध जयंतीची सुट्टी मिळावी म्हणून प्रयत्न करीत होतो. परंतु माझे मनोरथ पूर्ण होऊ शकले नाही. त्यावेळचे गृहमंत्री श्री. मॅक्सवेल यांचीही बुद्ध जयंतीची सुट्टी असावी अशी मनीषा होती. परंतु लढाईच्या काळामुळे ती सफल होऊ शकली नाही. बुद्ध जन्मदिनाची सुट्टी जर जाहीर केली तर आपणास युद्धासाठी मुसलमानांपासून मिळत असलेली मदत मिळणार नाही. या विवंचनेत ते होते. त्यानंतर मला पुन्हा काँग्रेस मंत्रीमंडळात घेतले गेले. मंत्रीमंडळात गेल्यानंतर ही माझी जी मागणी होती ती श्री. पंडित जवाहरलाल नेहरूंनी तरी मान्य करावी म्हणून मी त्यांच्या खूप पाठिशी लागलो. माझ्या या मागणीला महाबोधी सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांनीही सहाय्य केले. तेहतीस कोटी हिंदुंच्या जन्म दिवसास सुट्टी, मुसलमान, पारसी, जैन खिस्ती या धर्मातील देवांच्या जन्म दिवसात सुट्टी मिळते. मग बुद्ध जयंतीस का नको? एकतर या सर्व सुट्यातून एखादी कमी करून ती आम्हास द्या अगर एक सुट्टी जास्त वाढवा. अशी मागणी मी श्री. नेहरूंकडे केली. पं. नेहरूंना बुद्धाबद्दल बराच आदर आहे. सुदैवाने नेहरू सरकारने बुद्ध जयंतीची सुट्टी चालू वर्षापासून जाहीर केली. परंतु आपल्या मुंबई सरकारने तिला हरताळ फासला. आपले मुंबई सरकार खूप सुसंस्कृत आहे. मुंबई सरकार कल्चरच कल्चर आहे. वाटल्यास तुम्ही त्यास 'अॅग्रीकल्चर' म्हणा. अशा या सरकारने सुट्टी न दिल्यामुळे पाच वाजता होणारी ही सभा साडेसात वाजता होत आहे. बुद्धाचे नाव काढले की ज्या हिंदू लोकांना एक प्रकारची भीती वाटत होती व आपणावर कोणी बाँच तर टाकीत नाही असे वाटत होते; त्यांच्यामधील कैक लोकात सुज्ञानपणा येऊन ते आज बुद्धाचा गौरव करू लागले आहेत. मी काही एखादा भविष्यवादी नाही व पुढे काय होईल हे सांगू शकत नाही. पण एक गोष्ट मात्र निश्चित सांगू शकतो की, बुद्धाचा धर्म या पृथ्वीतलावर पुन्हा अवतीर्ण होईल. तो कोणत्या मागनि येईल हे आज सांगता येत नाही. मी एक बौद्ध धर्माचा उपासक आहे. मी नुसताच बोध घेतलेला नाही व नुसते बोलतो असे नाही तर प्रत्यक्ष कृती करून दाखवीन, माड़ो शेवटचे आयुष्याचे दिवस आता बुद्ध धर्माच्या प्रचारातच खर्च करण्याचे मी निश्चित ठरविले आहे. मी हे बुद्ध धर्म प्रचाराचे शेत पेरणार आहे व त्यात कोणते पीक येते हे पाहाणार आहे. बुद्ध धर्माबद्दल आपणास विशेष आस्था का वाटते, असे मला अनेक लोक विचारतात. डॉ. राधाकृष्णन् सारखे तत्त्ववेत्ते म्हणतात की, बौद्ध धर्मात विशेष असे काय आहे? त्यात व हिंदू धर्मात काय फरक आहे? उपनिषदातून बुद्धाने सारे काही घेतले, असे हिंदू तत्त्ववेत्ते म्हणतात. मला अशा लोकांबद्दल फारच आश्चर्य वाटते. ज्यांनी कोणी ब्राह्मणांच्या १३८ उपनिषदांचा अभ्यास केला असेल व ती पूर्णपणे वाचली असतील तर त्यात ब्रह्म व आत्मा या दोन गोष्टी शिवाय काय आहे, असेच त्यांना वाटेल. उपनिषदांच्या या कारखान्यातील ब्रह्म व आत्मा या दोन गोष्टीकडे पाहिले तर बुद्धाने त्यापैकी एकही गोष्ट मान्य केली नाही. बुद्धाने स्पष्ट सांगितले की, मला ईश्वर नको, परमेश्वर नको तर या पृथ्वीतलावर जन्मास आलेल्या प्रत्येक माणसास सुख व शांती मिळाली पाहिजे व सर्वांनी सुखाने राहिले पाहिजे. बुद्धाने नुसती शांतताच सांगितली नाही. बुद्ध हा खरा विचारवंत होता. त्याच्यासारखा विचारवंत अजूनपर्यंत जगात झालाच नाही. बुद्धाला वेद मुळीच मान्य नव्हते. हे त्यांनी स्पष्टपणे जाहीर केले होते. वर्णव्यवस्थाही बुद्धाला मान्य नव्हती. बुद्ध वाङ्मयात बुद्धाने चातुर्वर्ण्यवर पदोपदी प्रहार केलेले आहेत आणि त्यामुळेच त्याला कट्टर हिंदू धर्माचा कडवा विरोध झाला. या देशात तीन महत्त्वाचे पंथ आहेत. एक हिंदू, दोन जैन व तीन बुद्ध. जैनाबद्दल मला काहीच सांगावयाचे नाही. बुद्धाने जातीभेदावर कठोर प्रहार केले. मी ब्राह्मणांचा द्वेष करीत नाही. परंतु 'जरी ब्राह्मण झाला भ्रष्ट। तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ' हे मी मान्य करणार नाही, अशी त्याची विचारसरणी होती. जातीभेदाचे मूळ कायमचे उपटून टाकण्यासाठी आपण हिंदू धर्माचा त्याग करणे आवश्यक आहे. चैनीत असलेल्यांना पायाखाली काय कुजत जाहे, याची जाणीव येणार नाही. ही जातीभेदाची समाजरचनाच जर उलथून पाडावयाची असेल तर आपणास बौद्धधर्माचीच शिकवण अंमलात आणली पाहिजे. ही गोष्ट मी निव्वळ गळ्यापासून बोलत नसून बेंबीच्या देठापासून बोलत आहे. ज्याप्रमाणे पांडव हे वनवासात गेले असताना त्यांनी आपली शस्त्रास्त्रे एका शमीच्या झाडावर ठेवून गुप्तपणे वनवास पत्करला व नंतर तीच धनुष्ये घेऊन त्यांनी पराक्रम गाजविला त्याचप्रमाणे आम्हीही आमची आयुधे बाहेर काढणार आहोत. मी माझा प्रचार तुमच्यापुरताच मर्यादित न ठेवता साऱ्या हिंदू धर्माला या नव्या क्षेत्रात आणण्याचा प्रयत्न करीन. यश कितपत येते ते पाहू. मानवतेचे संरक्षण होण्यासाठी हिंदुस्थानलाच काय पण साऱ्या जगाला शेवटी बौद्ध धर्माची कास धरावी लागेल. यासाठी मी बौद्ध धर्माचे बायबल लिहीले आहे. ते लवकरच प्रसिद्ध होईल व ते वाचल्यावर बौद्ध धर्म स्वीकारावयाचा की नाही, हे तुमच्या हाती राहील. एकदा तुम्ही जो मार्ग चोखाळला तो तुमच्या लक्षात राहिला पाहिजे. बुद्धाचे एक देऊळ मी मुंबईत बांधणार आहे. बुद्ध धर्माचे पुनरूज्जीवन करण्यासाठी आपण प्रत्येकजण या मंगलप्रसंगी प्रतिज्ञा करू या... मुक्तीदाता बुद्ध पौर्णिमा विशेषांक संदर्भ जनता, दि. ३० मे, १९५३. #bhimsenik #🙏 प्रेरणादायक बॅनर #🪷बुद्धांची तत्वे📜 #🙂Positive Thought #💙 भीमसैनिक 💙
Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
7.1K views
13 days ago
बाबासाहेबांना अपेक्षित बौद्ध धम्म.... बुद्ध, बोलणाऱ्यास बोलताना परिणामाचा विचार करुन बोलण्याचा सल्ला देतो. तो म्हणतो- आपल्या सद्सद्विवेक बुद्धीचा (प्रज्ञेचा) वापर करुन योग्य परिणामाचा विचार करुन बोला. मुर्खाचे सत्य बोलाल, तर तुमच्या हातून अकुशल कर्म घडेल आणि तुम्ही दुःखी व्हाल. शहाण्याचे सत्य बोलाल, तर तुमच्या हातून कुशल कर्म घडेल आणि तुम्ही सुखी व्हाल. समाजात सुख, संमृद्धी, शांतता नांदण्यास मुसाबादा वेरमणी ह्या शील पालनाची प्रत्येक माणसास गरज आहे, असे बुद्ध सांगतो. सुरामेश्यमज्ज पमाद‌ठ्ठाना वेरमणी : 'व्यसनाधिनता' ही आज प्रत्येक देशातील समाजाची गंभीर समस्या बनली आहे. व्यसनाधिन माणूस स्वतः ही सुखाने जगत नाही आणि दुसऱ्यालाही सुखाने जगू देत नाही. अशा माणसाच्या घरात नेहमी कलह व भांडण असते. असा माणूस पहिल्या चारही शीलांचा भंग करु शकतो. हा प्रमादी म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीचाही असू शकतो. बुद्धाने ह्या शिलाद्वारे जो उपदेश केला आहे तो नीट समजून घेणे आवश्यक ठरते. चारही शीलांत नसलेला एक शब्द 'पमाद' (प्रमाद) ह्या शीलात आहे. त्याचे इथे विशेष महत्व आहे. सुरा ही धान्याचा अर्क, तर मेरय ही फळाचा अर्क. ह्या दोन्हीचा उपयोग औषध म्हणून अणि व्यसनासाठी मादक पदार्थ म्हणून केला जातो. वैद्याच्या सल्ल्याने रोग्याने, रोग निवारक औषध म्हणून वैद्याने सूचविलेल्या प्रमाणात, योग्य वेळी घेतले तर हे कुशल कर्म ठरेल; याला बुद्ध विरोध करीत नाही. परंतु निरोगी माणसाने, वैद्याचा सल्ला न घेता गरज नसताना प्रमाणाबाहेर हा अर्क (दारु) ढोसून घेतला तर तो प्रमादास (गुन्ह्यास) कारणीभूत ठरेल. म्हणजे हे त्या माणसाने केलेले अकुशल कर्म ठरेल. याला बुद्ध विरोध करतात. 'धम्मपदात' एक गाथा आहे' "अप्पमादो अमत पदं, पमादो मच्चूनो पदं।" अर्थ- अप्रमादी असणे (गुन्हेगार नसणे) हा (आदर्श) जीवनाकडे नेणारा मार्ग आहे, तर प्रमादी (गुन्हेगार) असणे हा मृत्युकडे (विनाशाकडे) नेणारा मार्ग आहे. पंचशीलांचे पालन करणारी व्यक्ती ही, गुन्हेगार प्रवृत्तीपासून मुक्त असते. जगातील प्रत्येक समाजाचे शासन, सुव्यवस्थेसाठी अनेक योजना राबवत असते. आणि त्यादृष्टीने लोकशिक्षणाची व्यवस्था करते. चीनमध्ये इ.स.च्या पहिल्या शतकापासून बुद्ध तत्वज्ञानाचा समावेश सार्वजनिक शिक्षणात केला जात आहे. पंचशील हे व्यक्तीच्या जीवनाचे मापदंड, प्रमाणक Standard आहे, असे बाबासाहेब 'बुद्ध आणि त्याचा धम्म' मध्ये सांगतात. पंचशील पालनाने व्यक्ती सदवर्तनी व आदर्श बनते. धम्माचा प्रारंभ याचसाठी शीलपालनाने, माणसाला सदाचारी बनविण्यासाठी केला पाहिजे, असे बाबासाहेब सांगतात. बुद्धाची अन्य शिकवण : समता : माणसामाणसात, त्याच्या व्यक्तीमत्व विकासासाठी बुद्ध भेदभाव मान्य करीत नाही. स्त्री-पुरुष असमानता मान्य करीत नाही. मात्र स्त्री सुरक्षिततेची काळजी घेतो. उपासक वा भिक्खू होण्यास कोणतेही धंद्याचे वा जातीचे बंधन मान्य करीत नाही. त्यापूर्वी विशिष्ट जातीच्या पुरुषांनाच सन्यास घेण्याचा अधिकार होता. त्याला बुद्धाने नाकारले. बुद्ध सर्वांना समान लेखतो आणि प्रत्येकाला व्यक्तीमत्व विकासाची व प्रगतीची संधी बहाल करतो. स्त्रीयांना सुद्धा प्रव्रज्येचा अधिकार देतो. कम्मसिद्धांत : बुद्ध सांगतो पेराल तसे उगवेल, कुशलकर्म- चांगले काम, हितकारक काम कराल, तर त्याचे चांगलेच फळ मिळेल. तुमचा मुक्तीदाता, कुणी बाहेरचा परमेश्वर वा अन्य नाही. तुम्हालाच तुमचा उद्धार करावयाचा आहे. 'अत्ताही अत्तनो नाथो।' तुम्ही स्वतःच स्वतःचे स्वामी आहात. यासाठी तसे कुशल कर्म करा. स्वतःला विकसित करा. विकासाची इच्छा बाळगा (Desire to develop) हे तत्व म्हणजेच बुद्धाचा कम्म सिद्धांत होय. चित्त आहे, आत्मा नाही : प्रत्येकाला मन म्हणजेच चित्त आहे. चित्त हे निरंतर प्रवाही आहे. चित्त चंचल आहे. ते मनोविकाराने म्हणजे लोभ (Greed) मोह, (Attraction) आणि विचिकित्सा, अज्ञान (Stupidity, Illusion) यांनी विचलित होते. माणसावर नियंत्रण ठेवणारे असे एखादे, आत्मा नावाचे (Sole) स्थीर तत्व शरीरात किंवा अन्य कुठेही नाही, असे बुद्ध मानतो. गॉलिलिओ, न्यूटन, आईन्स्टाईन, आणि स्टीफन हॉकींग्ज अशा अनेक महान शास्त्रज्ञांनी आत्मा, परमात्मा, पृथ्वी व सृष्टीची निर्मिती, तिची संरचना आणि निसर्गाचे कार्य याबद्दल जे हल्लीच्या युगात संशोधनांती सांगितले तेच बुद्धाने काय म्हणावे ? अडीच हजार वर्षापूर्वी भारतीयांना सांगितले. पण ऐकतो कोण? याला भारतीयांचे ध्यान : चित्ताला/मनाला कुशल कर्मावर स्थिर करणे म्हणजे चांगल्या वा हितकारक कामात मनाला गुंतवून ठेवणे, अशी ही चित्ताची एकाग्रता, हे ध्यान आहे. चित्ताला वाईट (अकुशल) अहित कारक विचारात, कामात प्रवेश करु देऊ न देणे, मनात वाईट विचार आला तर मनाला त्यापासून परावृत्त करणे हे ही ध्यान आहे. मनात चांगला विचार आला तर मनाला त्यात गुंतवून ठेवणे हे ही ध्यान आहे. हे सारे माणसाच्या आयुष्यभर चालले पाहिजे. ध्यान विकसित करण्यास अनेक माणसे मार्गदर्शकाकडून सराव करुन घेतात. दीर्घ कालीन ध्यान ही समाधी असते. कुशल कर्मावरुन कधीही विचलीत न होणारे मन/चित्त हे स्थीर चित्त असते. असा माणूस 'सम्म समाधीस' (सम्यक समाधीस) पात्र ठरतो. हे कार्य कठीण आहे. सम्म समाधी प्राप्त माणसाच्या मनातील सर्व विकारांचा नाश झालेला असतो. ही स्थिती 'निर्वाणास' (दुःख मुक्तीस) पोषक असते. चित्ताची सततची ही जागृतावस्था म्हणजेच अर्हतत्व. लोभ, राग, द्वेष, मोह यांचा कसलाही प्रभाव होऊ न देणारे चित्त, हे अर्हताचे चित्त असते, असे बुद्ध सांगतो. क्षण भंगुरता : जगात स्थीर असे काहीही नाही. जगात सतत परिवर्तन होत असते. म्हणजे जगातील सारं काही अनित्य आहे, क्षणभंगूर आहे म्हणून जगातील कोणत्याही गोष्टीचा लोभ नसावा ही बुद्धाची शिकवण आहे. याचा 'प्रतित्य समुत्पादाशी' संबंध आहे. कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नाही. प्रत्येक घटनेमागे कारण असतेच. ह्या कार्यकारण भावालाच 'प्रतित्य समुत्पाद' म्हणतात. हे प्रथमतः बुद्धाने जगाला सांगितले. म्हणून जगातल्या वैज्ञानिक संशोधन कार्याचा प्रारंभबुद्धापासून होतो, असे म्हटले जाते. शीलपालन, समानता, बुद्धाचा कर्मसिद्धांत, आत्मा परमात्म्यावरील अविश्वास सम्मसमाधी, अनित्यता, प्रतित्य समुत्पाद सांगणारा बुद्धाचा धम्म व्यक्तिला सदाचारी, कार्य करण्यास सक्षम आणि जबाबदार बनवून त्याच्यात आत्मविश्वास जागवितो. व्यक्तिला निर्भय बनवितो. खऱ्या अर्थाने संपूर्णपणे स्वतंत्र बनवितो. म्हणून धम्म, बहुजन हिताय, बहुजन सुखाय असतो... मुक्तीदाता बुद्ध पौर्णिमा विशेषांक संदर्भ ग्रंथ : १. The seeker's Glossary of Buddhism, Sutra Translation committee of US and Canada. २. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मदिक्षेचा अविस्मरणीय इतिहास वामनराव गोडबोले. सुप्रिया प्रकाशन, अलंकार चित्रपट गृह, नार्थ अंबाझरी, ३. नागपूर-१० बुद्ध आणि त्याचा धम्म. The Buddha and this Dhamma, Dr. B. R. ४. Ambedkar बाबासाहेब आंबेडकर साहित्य आणि भाषणे खंड-११ बौद्ध पूजापाठ - डॉ. बी. आर. आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर साहित्य आणि भाषणे खंड-१६, पृष्ठ क्र. -७२३ ते ७४२. ५. Buddhism as an Education, Ven. Master Chin-king. #bhimsenik #🪷बुद्धांची तत्वे📜 #💙 भीमसैनिक 💙 #🙂Positive Thought #🙏 प्रेरणादायक बॅनर
Prasad Suryavanshi
2.9K views
24 days ago
उद्याच्या चांगल्या आयुष्यासाठी आजचा संघर्ष आवश्यक आहे." - dr babasheb ambedkar #डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
886 views
26 days ago
*#डॉ_बाबासाहेब_आंबेडकर_यांच्या_जयंती_निमित्तान* *#नांदेड_शहरातील_मेन_रोड_श्रीनगर_चौक_येथे* *#नवयुवक_भीम_जयंती_मंडळ_प्रभात_नगर_च्या_वतीने #नांदेड_शहरातील_श्रीनगर_येथील_मुख्य_रस्त्यावर* *#25_फूट_निळा_ध्वज_लावण्यात_आला* *#सर्व_प्रभात_नगर_येथील_भीमसैनिक* *#babadahebAmbedkarjayanti2026* *#drbabadahebAmbedkarjayanti* #🙂Positive Thought #💪बुद्धांची तत्वे📜 #bhimsenik #💙 भीमसैनिक 💙 #🙏 प्रेरणादायक बॅनर