डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील काही घटना
१९३० साली नाशिक येथील काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाला सुरुवात झाली आणि दलित समाजाच्या शेकडो सत्याग्रहींनी मंदिराला वेढा दिला. त्यामुळे सनातन्यांची माथी भडकली आणि त्यांनी सत्याग्रहींवर दगडांचा मारा सुरू केला, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरही दगडांचा वर्षाव सुरू झाला. त्यांना वाचविण्यासाठी त्यांच्या डोक्यावर छत्री धरण्यात आली. परंतु तिचा फारसा उपयोग होऊ शकला नाही. अशा स्थितीत बाबासाहेबांनी सुरक्षित ठिकाणी जावे अशी विनंती दादासाहेब गायकवाड आदी कार्यकर्त्यांकडून त्यांना करण्यात आली, परंतु बाबासाहेब त्या संग्रामातून हटले नाहीत. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना तर स्पष्टच सांगितले की, 'जे साऱ्या सत्याग्रहींचे होईल तेच माझे होईल. मग त्यात माझा प्राण गेला तरी बेहत्तर; पण वा साऱ्या सत्याग्रहींना संग्रामात सोडून मी एकटा कदापि जाणार नाही. डॉ. बाबासाहेबांचे ते बोल ऐकून साऱ्यांना चेतना मिळाली आणि दगडांच्या त्या वर्षावातही सत्याग्रहींची ती मिरवणूक बाबासाहेबांचा जयजयकार करीत पुढे सरकत गेली. यावरून बाबासाहेब किती निर्भय पुढारी होते हेच दिसून येईल. बाबासाहेब नेहमी म्हणत की, 'जो मृत्यूला घाबरतो तो मृत्यूजवळच जातो, पण जो घाबरत नाही त्याच्यापासून मृत्यूसुद्धा लांब जातो.'
मुंबईच्या वरळी मैदानात गांधीजी थांबले असताना आंबेडकर अनुयायांनी त्यांना काळे झेंडे दाखवले आणि त्यावरून बातावरण चिघळले. तशातच देवरूखकर नावाच्या दलित वर्गाच्या नेत्याला मुंबईमध्ये भोसकून ठार करण्यात आले आणि द्वेष, कटुता यांनी सारे वातावरण ढवळून निघाले. राजगृहाच्या अवतीभोवतीही दंगलखोर फेऱ्या मारू लागले. अशा परिस्थितीत बाचासाहेबांनी तेथे जाऊन आपला जीव धोक्यात टाकू नये असे अनुयायांकडून त्यांना सांगण्यात आले. परंतु बाबासाहेब ठरले निधड्या छातीचे आणि बेडर वृत्तीचे. त्यांनी लागलीच त्या साऱ्यांना सुनावले, 'प्राणांपेक्षाही प्रिय असलेली माझी पुस्तकं, माझे ग्रंथालय धोक्यात टाकून केवळ आपला जीव वाचविण्यासाठी तेथे न जाण्याचा भेकडपणा मी करणार नाही. बेहत्तर मला तेथे मरण आले तरी!'
मोठा धोका पत्करूनही डॉ. बाचासाहेब आंबेडकर राजगृही गेले. प्राणापेक्षाही ग्रंथ, ग्रंथालय त्यांना प्रिय होती. एकदा ते म्हणाले होते की, 'जर कोणी मला एकाच वेळी ग्रंथ आणि भाकरी देऊ केली तर मी प्रथम ग्रंथच पसंत करीन.' बाबासाहेबांच्या विद्वत्तेमुळे मी मी म्हणणारे देशातील विद्वान त्यांच्यापासून चार हात लांबच राहायचे व त्यांच्या निर्भय वृत्तीमुळे सनातनी गुंडही त्यांच्या अंगावर हात टाकायला कचरायचे. बाबासाहेबांना दुखावले तर त्याचा काय परिणाम होईल ह्याची दहशत खुद त्या वेळच्या शंकराचार्यांनाही असे. महाड येथे मनुस्मृतीचे दहन करताच सनातनी मंडळी खवळली आणि बाबासाहेबांवर आग पाखडू लागली. गांधीजींच्या उपोषणामुळे तर त्यात भरच पडली...
#💪बुद्धांची तत्वे📜 #🙂Positive Thought #bhimsenik #🙏 प्रेरणादायक बॅनर #💙 भीमसैनिक 💙