गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🕉️🌺🌅❤️

Sachin
14.5K views
25 days ago
#🤗गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा🌹 *#शिवविचार_प्रतिष्ठान* *✨🚩✨ #गुढीपाडवा _✨🚩✨* *#हिंदू_नववर्ष* *#चैत्र_शुक्ल_प्रतिपदा* *गुढीपाडवा अर्थात बलीप्रतिपदा.* शेतकऱ्यांच पीक यायचा काळ बऱ्याच ठिकाणी पुढील वर्षाच्या पाऊस-पीक-पिकांवरील अपेक्षित रोग याचा अभ्यास करण्यासाठी गुढी पाडवा ते *अक्षय्यतृतीय* हा काळ वापरतात *ज्ञानेश्वर-तुकाराम* यांच्यापासून बऱ्याच संत साहित्यात याचा उल्लेख आहे *..दसरा-दिवाळी पाडवा-गुढी पाडवा आणि अर्धा आखत(अक्षयतृतीया) हे आपल्याकडचे साडेतीन मुहूर्त ..* *अवधर्माची अवधि तोडी | दोषांची लिहिली फाडी |*   *सज्जनाकरवी गुढी | सुखाची उभवि* आपण सध्या वापरतो ते इसवी सनाच्या कॅलेंडरची सुरवात जानेवारी महिन्याच्या एक तारखेपासून होते. हे कॅलेंडर आपल्याला इंग्रजांनी दिलंय. त्याआधी आपण महाराष्ट्रात शालिवाहन शक नावाचं कॅलेंडर सर्रास वापरायचो. त्याचा पहिला महिना चैत्र असतो. महाराष्ट्रात त्याचा पहिला दिवस शुद्ध प्रतिपदा असतो, म्हणजे अमावस्येनंतरचा पहिला दिवस आज महाराष्ट्र गोवा तेलंगणा आंध्र प्रदेश आणि कर्नाटकचा उत्तर भाग मणिपूर या प्रदेशात नवीन वर्ष असत बाकी ठिकाणी ते वेगवेगळ्या वेळी असत बाकी ठिकाणी राहणारे लोक सुद्धा हिंदू आहेत परंतु त्यांचं नववर्ष पाडव्याला नसत जसे की गुजराती दिवाळीला पंजाबी बैसाखीला या सर्वांचा हिंदू असून देखील नववर्ष वेगळं असण्याचं कारण एक च तिथे राज्य करणारे राज्यकर्ते जसे महाराष्ट्राला मुक्त करून ओळख निर्माण करणारे *सातवाहन* राजघराणे त्यांनी जवळपास 460 वर्षे महाराष्ट्र आणि आसपासच्या प्रदेशावर राज्य केले या राजघराण्यातील *गौतमीपुत्र सातकर्णी* या राजाने इसवीसन 78 व्या वर्षी नहपान या शक सरदाराला हरवून महाराष्ट्राला पुन्हा स्वतंत्र केले त्यासाठी त्याने महाराष्ट्र भूमीतील पुतळ्यासारख्या निस्तेज झालेल्या लोकांत स्वाभिमान भरून स्वातंत्र्यासाठी लढायला शिकवले या बाबत एक कथा पण सांगितली जाते की सातकर्णी राजाने मातीचे पुतळे बनवून शत्रूला हरवले त्याचा खरा अर्थ असा की येथील माणसाची अवस्था पुतळ्या सारखी झाली होती *गौतमीपुत्र सातकर्णी* राजाच्या नहपान वरील या विजयाच्या निमित्ताने *शालिवाहन शक* सुरू झाला ( जो की आपण आजदेखील वापरतो ) तो आपला स्वातंत्र्यदिवस आजही आपण नववर्षाच्या स्वरूपात साजरा करतो आणि हेच कारण आहे की हिंदू भरपूर ठिकाणी राहतात पण ज्या ज्या प्रदेशात *सातवाहनांच* राज्य होत त्याच प्रदेशात नववर्ष साजर केलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये सण उत्सव व्रत समारंभ यांना अनन्यसाधारण महत्व आहे सण उत्सव हे आपल्या संस्कृती ची ओळख करून देतात सण साजरे करताना त्यातून चैतन्य निर्मिती होत असते आणि आपल्या वर्षांतील गुढीपाडवा हा पहिला सण चैत्र शुक्ल प्रतिपदा याचा उद्धता वेद आहे वेद हे अतिप्राचीन आहे वेदाने सांगितले म्हणून ते साऱ्या जगाने मान्य केले ज्योतिष शास्त्रानुसार पाडव्याच्या आसपासच सूर्य वसंतसंपावर येतो म्हणजे यावेळी हवामान समशीतोष्ण असते आणि शिशिर ऋतूत झाडाची गळलेली पाने पाडव्याच्या सुमारास झाडांना नवीन पालवी फुटते. वृक्षवल्ली टवटवीत दिसते. पाडव्याच्या दिवशी आपली वडीलधारी मंडळी कडुलिंबाची पाने खायला लावतात यामागे एक शास्त्रीय कारण आहे या कडुलिंबाच्या सेवनाने पाचन क्रिया सुधारते, वरून कडू असणारी वनस्पती ही आरोग्य वर्धक आरोग्यदायी आणि रोगनाशक आहे https://instagram.com/shiv_vichar_pratisthan?igshid=1jjrpx4actqvp #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 गुढी ऐवजी भगवा ध्वज उभा करावा ही समज मुळात चुकीची आहे..! गुढी सोबत भगवा ध्वज ही आपण उभा करूयात सातत्याने होणाऱ्या परकीय आक्रमणामुळे ध्वजाचा अपमान होऊ नये म्हणून जरीचे वस्त्र जे वैभवाच प्रतीक आहे ते उभारण्यास सुरुवात झाली गुढीवरील कलश हे यशाचं प्रतीक आहे. आणि तो उलटा का तर येणारी संकटे ही एकत्र न येता विखुरली जावीत कडुलिंब हा आयोग्यासाठी पुष्पहार हा मांगल्याची खूण तर साखर गाठी माधुर्य भाव प्रदर्शित करण्यासाठी आणि काठी ही सामर्थ्य उन्नतीसाठी अशी ही आपली नववर्षाच्या संकल्पपूर्ती ची गुढी उभारूया आपली संस्कृती जपुया आपली संस्कृती की त्यागप्रधान कृषिप्रधान संस्कृती आहे आपले प्रत्येक सण हे आपल्याला आणि निसर्गाला एकमेकांशी जोडतात *#हिंदू संस्कृती* मध्ये निसर्गाला देव मानले जाते आणि आपले सण आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात घेऊन जातात *शिवकाळात* देखील या मुहुर्तावर भरपूर कार्यक्रम केलेले आढळून येतात तेव्हा आपण चुकीच्या इतिहासाला थोडं बाजूला सारून आपली संस्कृती जपुया सर्वांना गुढीपाडव्या च्या खूप खूप शुभेच्छा