9 shares
More like this
- शिवकालीन दिनविशेष🚩#🚩शिवराय #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩शिवकालीन दिनविशेष🚩11280
- Vinay patil 5210#🚩 छत्रपती शिवाजी महाराज गाणी🎶 #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🙏शिवदिनविशेष📜1631
- mahesh m. shirkar*#शिवविचार_प्रतिष्ठान* *२१ ऑगस्ट इ.स.१६८८* माहुली गड मुघलांच्या ताब्यात गेला. *२१ ऑगस्ट इ.स.१६६२* छत्रपती शिवरायांनी रामराजपंतांच्या जागी "नरहरी आनंदराव" यांना पेशवेपदी नेमले, तर "अण्णाजी दत्तो" यांना वाकनिशी दिली. तसेच इतर काही मंत्र्यांना पालख्यांची नेमणूक केली. *२१ ऑगस्ट इ.स.१६८१* औरंगजेबाने आपला दुसरा मुलगा आज्जम याला “शहा” हि पदवी देवून दक्षिणेच्या मोहिमेवर पाठवले. *२१ ऑगस्ट इ.स.१६८२* "किल्ले रामशेज" मराठ्यांकडून जिंकण्यासाठी मुघल सरदार "कासीमखान" याने कील्ल्याच्या बरोबरीने डेरे (मनोरा) उभे केले. पण मराठ्यांनी रात्रीतच ते नेस्तनाबूत केले. #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜 #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩615
- शिव दिनविशेष#🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा2346
- सचिन दादा पानसरे शिरवळ शहर⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳ 📜 २० ऑगस्ट इ.स.१६४३ अदिलशहाचे राजे शहाजीराजे यांना हुकुमनामा पत्र! रणदुल्लाखान मृत्यू पावताच विजापुर दरबारात राजे शहाजीराजे यांचा पक्ष दुर्बळ झाला. तर त्यांच्या वाईटावर असलेल्या मुस्तफाखान, अफजलखान, बाजी घोरपडे इत्यादी मुत्सद्यांचे पारडे जड झाले. रणदुल्लाखानाची दौलत आता त्याचा खिजमतगार असलेल्या अफजलखानाकडे आली. तो त्यावेळी राजे शहाजीराजे यांच्या बरोबर कर्नाटकातच होता. अफजलखान राजे शहाजीराजे यांच्या कट्टर दुष्मनांपैकी एक होता. स्वाभाविकपणेच राजे शहाजीराजे यांना तो पाण्यात पाहू लागला. अफजल खानानेच चंदीच्या राचेवर मराठ्यांना राजे शहाजीराजे फितूर असल्याची "बदगोह" (अफवा) विजापूर दरबारला लिहून कळविली. या किंवा अशाच स्वरूपाच्या काही अन्य तक्रारींवरून आदिलशहाचे मत राजे शहाजीराजे यांच्या विरुद्ध कलुषित झाले. २० आगस्ट इ.स.१६४३ एका पत्रावरून काही दिवसांपूर्वी राजे शहाजीराजे यांना आपली जमात आदिलशहाकडे हजर करण्याचा हुकुम झाल्याचे कळते. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🙏 प्रेरणादायक बॅनर #🚩 छत्रपती शिवाजी महाराज गाणी🎶 #🙏शिवदिनविशेष📜 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtu.be/nUG1HKWp6NQ 📜 २० ऑगस्ट इ.स.१६६६ ( श्रावण अमावस्या, १५८८, संवत्सर पराभव, सोमवार ) औरंग्याचे मिरझा जयसिंगला फर्मान :- रामसिंगाने फितुरी करून शिवरायांना जाऊ दिले व त्याबदल्यात मात्र, औरंग्याने रामसिंगला शिक्षा करण्यास फर्मावले. त्याचबरोबर आजच्या दिवशी महाराजांचे दोन विश्वासू साथीदार रघुनाथपंत कोरडे आणि त्र्यंबक डबीर, फौलाद खानाच्या धरपकडीत सापडले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 २० ऑगस्ट इ.स.१६८३ औरंगजेबने दिनांक २० ऑगस्ट १६८३ रोजी शहाजादे अजम व त्याचा मुलगा बेदारबख्त यांची विजापुरच्या मोहिमेवर नेमणूक केली. ऑक्टोबरला अजम आपल्या फौजेसह मोहिमेवर निघाला. या मोहिमेचा मूळ हेतू विजापुराकडील छत्रपती संभाजी राजांकडे असलेला मुलूख काबीज करणे हा होता. इ. स. १६८४ च्या सुरुवातीस ह्या फौजेस रसद न मिळाल्यामुळे फारच हालांत दिवस काढावे लागले. ही दैन्यावस्था औरंगजेबस समजताच त्याने ४ फेब्रुवारी १६८४ रोजी अजम व बेदारबख्त भेटावयास आले असता त्यांस विजापुरांकडील मुलूख लुटण्याचा हुकूम दिला. त्या आज्ञेवरून त्यांनी सर्व मुलूख लुटून धारवाडच्या किल्ल्यांवर हल्ला चढविला आणि थोड्याच दिवसांत तो किल्ला फत्ते करून माघारे छावणीस गेले. छत्रपती संभाजी महाराजांचे राज्य जिंकून घेण्यासाठी विजापूरकरांचा फारसा उपयोग होणार नाही हे औरंगजेबाच्या लक्षात आले म्हणून त्याने आदिलशहावर दडपण आणण्याचे प्रयत्न चालूच ठेविले. औरंगजेब आणि त्याचा मुलगा शहाआलम यांनी शिकंदर पातशहाकडे १७ एप्रिल १६८४ व ३० एप्रिल १६८४ रोजी फर्माने पाठविली. त्यांत खालील मुख्य कलमे विजापूरकरांसाठी होती (१) स्वारीचा खर्च व रूखद विजापूरकरांनी काही एक सबब न सांगता पोहोचविणे. (२) आपले मुलूखातून फौजेचा व रसद येण्याजाण्याचा मार्ग मोकळा ठेवणे. (३) छत्रपती संभाजी महाराजांची मैत्री व सख्य बाह्यात्कारी व अंतरयामी करून सोडून देणे व सर्वांनी एकदिल होऊन संभाजी महाराजांचा समूळ फडशा करण्याकरिता विचार करणे. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 २० ऑगस्ट इ.स. १७६१ पेशवाईची वस्त्रे मिळाल्यानंतर माधवराव पुण्यात आले आणि पहिल्यांदा नजर वळविली ती निजामाकडे. निजामाने मराठे आता पुरते मोडले आहेत, असे समजून घोरपडे, जाधव, घाटगे अशा मराठा सरदारांना पेशव्यांविरुद्ध फितवले आणि नळदुर्ग काबीज केल्यानंतर तो थेट पुण्याच्या रोखाने निघाला. इकडे माधवरावांनी २० ऑगस्ट १७६१ ला निजामावर स्वारी करायचे ठरले. परंतु नुकत्याच पानिपतच्या युद्धात झालेल्या सैन्याच्या भयंकर नुकसानीमुळे माधवरावांनी निजामाशी थेट न भिडता आपले सैन्य निजामाच्या मुलुखात घुसवले. निजामाचा भाऊ सफदरजंगही फितूर होऊन मराठ्यांच्या मदतीला आला होता. या मोहिमेत आजारीपणाचे निमित्त करून रघुनाथराव सामील झालेले नव्हते. ते शनिवारवाड्यातच होते. निजाम मार्गावरची मंदिरे फोडत, जाळपोळ करत पुण्याच्या आग्रेयेस असलेल्या 'उरूळी- कांचन' या गावापाशी येऊन पोहोचला. निजामाच्या या हल्ल्यामुळे राघोबादादा गांगरून गेले. कारण यावेळेस निजामाला तोंड देण्याकरता पुण्यात फारशी फौजच नव्हती. आता लवकर हालचाल केली नाही तर निजाम पुणेही जाळेल, ही भीती वाटल्याने दि. २९ डिसेंबर १७६१ या दिवशी रघुनाथरावांनी निजामाशी घाईघाईने तह केला व त्या अन्वये २७ लक्ष रुपये वार्षिक उत्पन्नाचा मुलुखही तोडून देण्याचे कबूल केले. जानेवारी १७६२ मध्ये माधवरावांना या तहाची बातमी मिळाली. आता काहीही करता येऊ शकत नव्हते. शेवटी नाईलाजाने माधवराव पुण्यास परतले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀3041
- 🆔Official_Sagar 💞💤👑राजमाता जिजाऊ साहेबांच्या कर्तृत्वशाली व्यक्तिमत्वाचे गौरव करताना डाॅ. बाळकृष्ण यांनी यथार्थ शब्दात म्हटले आहे की, She had a head of a man over the shoulders of a woman. She remained a guide, philosoper and friend to Shivaji maharaj throughout her life. She anxiously watched the rising sun of the glory and was fortunate to witness it's climax in the form of his coronation as an independent king and an ornament of the kshatriya race... ● अर्थात : जिजाऊसाहेबांचे शरिर स्त्रीचे पण डोके मुत्सद्दी पुरूषाचे होते संपुर्ण आयुष्यभर ही माऊली शिवरायांची मार्गदर्शक तत्वज्ञ व खर्या मित्राप्रमाणे राहीली...अत्यंत उत्सुकतेने तिने आपल्या पुत्राच्या भाग्यसुर्याचे चढते वैभव पाहीले.. एवढेच नव्हे तर क्षत्रियकुलावंतस व सिंहासनाधिष्ठ सार्वभौम नृपतीच्या रूपात आपल्या पुत्राच्या भाग्यरवीचा दैदिप्यमान माध्यान्हही या भाग्यशालिनीने याचि देही याची डोळा पाहीला... जय जिजाऊ जय शिवराय 🙏🚩 #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏 #🚩शिवरायांचे भक्त #🚩मी शिवबा भक्त1316
- 🆔Official_Sagar 💞💤👑🚩 हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि अवघ्या जगाने कौतुक करावे, असे उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या मातीत जन्म घेतलेले, सर्वांना आपलेसे वाटणारे, तेजस्वी, महाप्रतापी छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजीराजांचे केवळ नाव ऐकले, घेतले तरी अभिमान वाटतो, गर्वाने मान ताठ होते. छत्रपती शिवाजी महाराज अतिशय चारित्र्यसंपन्न होते. जगाच्या इतिहासात हा एकमेव राजा आहे, ज्याच्या दरबारी कधी स्त्री किंवा नर्तकी नाचली नाही. छत्रपती शिवाजी महाराज नेहमी 'रयतेचं स्वराज्य' असाच शब्द वापरत. स्वभावातील सहिष्णुता, दूरदृष्टी, करारीपणा व धाडसी वृत्ती अशी काही वैशिष्ट्ये शिवाजीराजांची सांगता येतील. शिवाजी महाराजांच्या अनेकविध गोष्टी आजही समाजाला प्रेरणा देतात आणि आजच्या काळातही प्रेरणादायक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापन करताना अनेक अडचणी आल्या, समस्या आल्या. प्रत्येक टप्प्यावर अडचणींवर मात करूनच शिवाजी महाराज पुढे गेले. समस्या आहेत, अपयश आले, म्हणून शिवाजी महाराज कधी निराश झाले नाहीत. तर जिद्दीने, चातुर्याने आणि बुद्धी वापरून शिवाजी महाराजांनी समस्यांवर मात करत प्रचंड यश संपादन केले आणि स्वराज्याची स्थापना केली. मोहिमा आखताना छत्रपतींनी बुद्धिचातुर्याचा चलाखीने उपयोग करून त्या फत्ते करून दाखवल्या. सूरत मोहीम, आग्रा मोहीम, अफजलखान वध अशी अनेक उदाहरणे महाराजांच्या बुद्धिचातुर्याची देता येतील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वात जादू होती. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली, तरी त्याला हसत हसत आनंदाने सामोरे जाण्याची कला त्यांनी आत्मसात केली होती. शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांवर व रयतेवर जीवापाड प्रेम केले. जाती-पातीच्या भिंती तोडून सर्वांना सन्मान दिला. प्रत्येक मोहिमेनंतर छत्रपती शिवाजी महाराज तलवारी मिरवणाऱ्या धारकऱ्यांना 'मानकरी', भाला फेकणाऱ्या निष्णात सैनिकाचा 'भालेराव' अशी उपाधी देऊन गौरव करायचे. जीवावर उदार होऊन चढाई करणाऱ्या सैनिकांना सोन्याचे कडे द्यायचे. स्वराज्यासाठी हातभार लावणाऱ्या सर्वांचा ते सन्मान करायचे. . . . छत्रपती शिवाजी महाराज 🙏🚩 छत्रपतींची पारख जय जिजाऊ जय शिवराय जय शिवराय #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏 #🚩शिवरायांचे भक्त #🚩मी शिवबा भक्त812
- Vinay patil 5210#🚩 छत्रपती शिवाजी महाराज गाणी🎶 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕1522
- शिवकालीन दिनविशेष🚩#🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 #🚩शिवराय #🚩शिवकालीन दिनविशेष🚩 #🗿शिवकालीन पुराणवस्तू1231
- Suraj Chavan*•།आजचे_ऐतिहासिक_शिवदिनविशेष།•* 📜 २१ ऑगस्ट इ.स.१६६१ सण १६६१ च्या एप्रिल महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी पालवणच्या जसवंतराव दळवी आणि त्याचा आश्रयादाता शृंगारपूरचा सूर्यराव सुर्वे यांचा बंदोबस्त केला. महाराजांच्यासोबत यावेळी १५ हजारांची पायदळ सेना होती.पुढे या सूर्यराव सुर्वेला आश्रय देणारे कुडाळकर लखम सावंतही महाराजाच्या भीतीने कुडाळ सोडून डोंगरात निघून गेले. तेथील व्यवस्था लावून महाराज महाडला आले. राजापूराच्या महाराजांच्या कैदेत असणारे परकीय कैद्यांच्या सुटकेसंदर्भात सुभेदार रावजी पंडित यांना सूचना देऊन महाराज शाहिस्तेखानाच्या हालचालीना पायबंद घालण्यासाठी कल्याणला आले.पण त्यांना त्यात अपयश आले. पावसाळ्याच्या पूर्वी महाराज राजगडावर आले आणि प्रशासकीय व्यवस्थेत बदल करत शामराज निळकंठ रांझेकर यांच्या जागी नरहरी आनंदराव यांना पेशवेपद दिले तर अनाजीपंताना वाकेनिस पद दिले. याबरोबरच सर्व मंत्र्यांना पालखीचा मान दिला. राजगडावर झालेल्या या बदलाची तारीख होती. 📜 २१ ऑगस्ट इ.स.१६८२ "किल्ले रामशेज" मराठ्यांकडून जिंकण्यासाठी मुघल सरदार "कासीमखान" याने कील्ल्याच्या बरोबरीने डेरे (मनोरा) उभे केले. पण मराठ्यांनी रात्रीतच ते नेस्तनाबूत केले. 📜 २१ ऑगस्ट इ.स.१६८८ ठाणे जिल्ह्यात असणारा माहुली किल्ला शिवाजी महाराजांनी १६६१ मध्ये मुघलांकडून जिंकून घेतला होता, पुरंदरच्या तहात तो पुन्हा मोगलांकडे गेल्यावर १६७० मध्ये मोरोपंतांनी तो परत जिंकून घेतला. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर शंभुराजेच्या काळात मराठ्यांचे किल्ले लढून जिंकता येत नसल्याने औरंगजेबाने ते फितुरीने जिंकून घेण्याचा प्रयत्न सुरू केला. किल्ला फितुरीने घेण्यासाठी मुघल सरदार मातबरखानाने माहुलीचा किल्लेदार द्वारकोजी याचे मन वळवण्यासाठी नरसु महाडिक याला मध्यस्थ नेमले. त्याच्या प्रयत्नाने किल्लेदार द्वारकोजी मुघल सरदार अब्दुल कादिर याला भेटला आणि म्हणाला की,'साल्हेरचा किल्लेदार आसोजीप्रमाणे मला मनसब दिली तर मी किल्ला खाली करीन,आणि ४० हजार रुपये,१० घोडे,खिलत,इनाम आणि राहण्यासाठी जुन्नरजवळची दोन गावे वतन दिली तर मी स्वतः दरबारात हजेरी देण्यासाठी येईन.'किल्लेदार द्वारकोजी अब्दुल कादिरला भेटला. 📜 २१ ऑगस्ट इ.स.१७११ चंद्रसेन जाधवरावांच्या ह्या उघड बंडाने महाराष्ट्रात सनसनाटी निर्माण केली. ताराबाईनी चंद्रसेन जाधवांचे सहर्ष स्वागत केले. छत्रपती शाहू राजांची बाजू यावेळी फारच कमकुवत होती. चंद्रसेन जाधवरावांच्या अगोदर सावंतवाडीचे सावंत, आंग्रे, खंडेराव दाभाडे अशी मातबर मंडळी ताराबाईना मिळाली होतीच. चंद्रसेन जाधवांनी हैबतराव निंबाळकरास चिथावून त्यास ताराबाईंच्या पक्षास आणण्याचा प्रयत्न सुरू केला. अशा वेळी परसोजी भोसले व चिमणाजी दामोदर हे दोन सरदार शाहू राजांच्या बाजूचे राहिले, पण ते खानदेशकडे होते. शाहू राजांचा पक्ष फारच कमकुवत झाला होता. मोठी दुरावस्था प्राप्त झाली होती. तरी शाहू महाराज राजे डगमगले नाहीत. त्यांनी चंद्रसेन जाधवांकडील सेनापतीपद काढून ते ता. १ ऑक्टोबर १७११ रोजी त्यांचे बंधू संताजी यास दिले बाळाजी विश्वनाथांनी यावेळी पुढे सरसावून शाहू राजांची बाजू सावरून धरली. बाळाजींनी पिलाजी जाधव, पुरंदरे यांच्या सहाय्याने सावकारांकडून कर्ज काढले. फौज उभी केली. हीच फौज पुढे “हुजूर फौज”, “हुजूर पागा” म्हणून प्रसिद्ध पावली. सावकारांच्या कर्जास तारण पाहिजे म्हणून शाहू राजांकडून बाळाजींनी पंचवीस लाखाचा सरंजाम करून घेतला (२१ ऑगस्ट १७११). याच सुमारास शाहू राजास बातमी समजली की, आपल्याकडील परशुरामपंत प्रतिनिधीसुद्धा ताराबाईच्या पक्षास मिळण्याच्या बेतात आहे, तेव्हा प्रतिनिधींना कैद करून (२० नोव्हेंबर १७११) त्यांचा सरंजाम, घर, जिंदगीसुद्धा जप्त केली. चंद्रसेन जाधवांचा फितवा हेच शाहू राजांवर आलेले सर्वात अरिष्ट होय. या अरिष्टाची उठावणी दाऊदखान पन्नीच्या कारवाईने सिद्ध झाली. ताराबाईंनी त्यांत भर घातली आणि शाहू राजांवर नाराज झालेले खटावकर, थोरात, चव्हाण इत्यादी सरदारांना उठाव करण्यास राणीनी प्रोत्साहन दिले, मोठा पेच उत्पन्न झाला. त्यास शाहू राजांनी धिमेपणानें तोंड देऊन सर्वाच्या बंडाचा उपशम वर्ष सहा महिन्यात केला. 📜 २१ ऑगस्ट इ.स.१७३३ रोजी विश्वासराव बाजीराव पेशव्यांना लिहितात, “अंजनवेलीत अडकलेला सिद्दीसात पुन्हा जंजीऱ्यात न्यावा आणि अंजनवेलीत संबूळला ठेवावं असा व विचार झाला आहे” (पेशवे दफ्तर ३ लेखांक ६९). मध्यंतरी सेखोजी आंग्रे यांचा मृत्यू झाल्याने अंजनवेलच्या कामात थोडा ढिलेपणा आला. याचा फायदा प्रतिनिधींनी घेतला आणि त्यांनी आपली माणसं अंजनवेलच्या मोर्चावर बसवली. त्यात प्रतिनिधींनी साताऱ्यात शाहू महाराजांना लिहिलं की, “अंजनवेली घेऊन तरीच उठोन, अन्यथा उठतो ऐसे नाही”, आणि म्हणूनच महाराज प्रतिनिधींवर खुश होते. यानंतर अचानक प्रतिनिधींनी आपला मुक्काम चिपळूणच्या प्रदेशातून हलवला, बाजीरावांना स्वतःलाही उत्तरेच्या मोहिमेवर लक्ष केंद्रित करावं लागलं आणि मोहीम जवळपास स्थगित झाल्यासारखी झाली. इ.स. १७३५ मध्ये चिमाजीअप्पा, नारोराम मंत्री वगैरे लोक पुन्हा फौजेनिशी कोकणात उतरल्यावर मोहिमेला पुन्हा तरतरी आली. एप्रिल १७३६ मध्ये खास जंजिरेकर सिद्दी सात हा मारला गेला. हि खबर साताऱ्यात शाहू महाराजांना मिळाल्यानंतर त्यांनी तोफा उडवण्याची आणि नौबत वाजवण्याची आज्ञा दिली, म्हणाले, “सिद्दीसातासारिखा गनीम मारिला, हे कर्म सामान्य न केले” (पेशवे दफ्तर ३ लेखांक १८२). अप्पांना वस्त्रं, तलवार आणि बहुमान तसेच मानाजी आंग्रे यांनाही वस्त्रं आणि पदक पाठवलं. बाजीरावही म्हणतात, “राजश्री स्वामींचे (शाहू महाराज) प्रतापे व कैलासवासी नानाचे (बाळाजी विश्वनाथ) आशीर्वादे व स्वामींचे (ब्रह्मेंद्र) आशीर्वादे राजश्री आपास यश थोर आले” 📜 २१ ऑगस्ट इ.स.१८५७ जोधपूर राज्यातील एरिनपूरा छावणीतील देशी सैनिकांनी विद्रोहाची ज्वाला प्रज्ज्वलित केली. त्या सैनिकात बहुसंख्य राजपूत सैनिक होते . "चलो दिल्ली - मारो फिरंगी" अशा घोषणा देत सैन्य दिल्लीकडे निघाले. त्यांचा पहिला पडाव मारवाडमधील आहुजा नगरीजवळ पडला. तेथिल ठाकूर कुशलासिंह चंपावत या राजाने त्या सैनिकांचे नेतृत्व स्विकारले. आसोप, गुलर आणि आलनियावास येथले ठाकूरही आपल्या सैन्यांसह त्यांना येऊन मिळाले. तेव्हा त्या सैनिकांची संख्या सहा हजारापर्यंत झाली होती. *≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈* *आपल्या राजा शिवछत्रपती Whatsapp समुहामध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपले नाव आणि पत्ता सांगा आपल्याला समुहामध्ये सामील केले जाईल..*👇👇 *♠️ अजय सोनवणे* https://wa.me//918605494249 #☘️हर हर महादेव🙏🏼 #🙏शिवदिनविशेष📜 #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏आई एकविरा 🙏 #🙏श्री स्वामी समर्थ📿 *≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈* *WhatsApp ग्रुप लिंक* *།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०१* https://chat.whatsapp.com/EBOf3f2DDie3q5GrvcKYNA *།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०२* https://chat.whatsapp.com/F0OcXttE6x1LrWYF9eqWdb *≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈* *-----------☆★۩۞۩★☆-----------* *राजा शिवछत्रपती, इतिहास माझ्या राज्याचा* *महाराष्ट्र राज्य* *-----------☆★۩۞۩★☆-----------* *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* *जय गडकोट* *!! हर हर महादेव !!* 1810