🆔Official_Sagar 💞💤👑
1K views • 16 hours ago
🚩 आजचे ऐतिहासिक दिनविशेष 🚩
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
२ ऑगस्ट १६४८
स्वराज्य स्थापनेच्या शपथेनंतर अवघ्या तीन वर्षात शिवरायांनी "शिरवळ" ठाणे ताब्यात घेतले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
२ ऑगस्ट १६७७
दक्षिण दिग्विजय मोहीम
दक्षिण मोहीमेदरम्यान छत्रपती शिवरायांनी "वेलवान्सोरचा किल्ला" ताब्यात घेतला.
आपल्या दक्षिण मोहिमेत छत्रपती शिवाजी महाराज तिरुमल्लवाडीवरून २४ जुलै च्या दरम्यान वलीगुंडाडपुरम ला आले. ३० जुलैच्या पूर्वी मराठ्यांनी उटळूर चा कोटही जिंकला व या ठिकाणची हवालदारी नागोजी भोसले याना दिली गेली. तेथील सर्व व्यवस्था लावून महाराज वलीगुंडापुरम सोडून तुंदुमगुर्त ला आले व तिथून त्यांनी जवळच असणारे व्यंकोजीराजेंच्या वेलवान्सोर ह्या ठाण्याला जिंकण्यासाठी आपली एक सैन्य तुकडी पाठवून दिली.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
२ ऑगस्ट १६८०
मे १६८० च्या दरम्यान संभाजीराजेनी रामजी नाईक ठाकूर या आपल्या वकिलांबरोबर गोव्याचा विजरई अंतोनियो पाईस द सांदे याला सलोख्याचे पत्र पाठवून आपल्या वडिलांच्या दुःखद निधनाची बातमी दिली आणि आपण सत्ताधारी झाल्याचे कळवले होते आणि मराठे आणि पोर्तुगीज यांच्यात तह करण्यास सुचवले होते. विजरईनेही संभाजीराजेना पत्र पाठवून महाराजांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले होते व तहाच्या सूचनेला मान्यता दिली होती,
शिवाय कोकणात शांतता राखण्यासाठी गेलेल्या रायाजी पंडित याला भेटीच्या वेळी आपण साष्ट व कुडाळ येथील फिरंगी अधिकाऱ्यांना युद्धविषयक हालचाली थांबवण्याचे आदेश दिल्याचे सांगितले होते.
त्याचबरोबर रायाजी पंडितकडे संभाजीराजेंना भेट म्हणून एक सोन्याचा मुलामा दिलेली बंदूक व चार कापडाचे नगही दिले होते.
दोन्ही बाजूंनी अशी शांततेची बोलणी सुरू असताना मराठ्यांचा डिचोलीचा सुभेदार मोरो दादाजी हा पोर्तुगीजांशी पूर्वीच्याच धोरणाने वागत होता. त्याने पोर्तुगीजांच्या बारदेश मधील सिओलीम हे गावात छापा टाकून तेथील तीन माणसांना पकडले होते. डिचोलीच्या मराठी सुभेदारानी सिओलिम गावात छापा टाकण्याची तारीख होती २ ऑगस्ट १६८०
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩
२ ऑगस्ट १७६०
२ ऑगस्ट सन १७६० रोजी सदाशिवराव भाऊसाहेबांनी दिल्ली काबीज करून दिनांक १० ऑगस्ट सन १७६० रोजी परागंदा झालेल्या बादशहाच्या पुत्र शहजादा जवानबख्त याला वलीअहद म्हणजे युवराज बनवले. #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏 #🚩मी शिवबा भक्त #🚩शिवरायांचे भक्त
63 shares