❤🚩शिवभक्त🚩❤
2K views • 23 days ago
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल*
*इतिहास शिवरायांचा*
**********************************
*शिव दिनविशेष*
🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩
*१ जुलै १६९३*
*शंभुराजांच्या मृत्युनंतर मोघलांकडे गेलेला सिंहगड स्वराज्यात दाखल.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१ जुलै इ.स.१६६३*
*छत्रपती शिवरायांनी सिंधुदुर्ग किल्ल्याजवळील "वेंगुर्ला" हे बंदर ताब्यात घेतले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१ जुलै इ.स.१६८१*
*बऱ्हाणपुरच्या लुटीनंतर परत येताना छत्रपती संभाजी महाराज आपल्या सैन्यासह सुरतेपासून पाच कोसाच्या प्रदेशात थांबले. त्यांनी तो प्रदेश लुटून गाडीयापूर शहराला आग लावली. इतक्यात औरंगजेबाने बऱ्हाणपूरच्या सुभेदाराची बदली करून त्याजागी खान जमात याजला दिनांक १ जुलै १६८१ रोजी नेमण्यात आले. औरंगजेब बऱ्हाणपूरला आपल्या लव्याजम्यानिशी दिनांक १३ नोव्हेंबर ८१ रोजी पोहोचल्यावरसुद्धा मराठ्यांनी आपली आक्रमक चढाई चालूच ठेविली. ते बऱ्हाणपूर आणि भोवतालच्या प्रदेशांची नासधूस करीतच होते. बऱ्हाणपुरातील राजवाड्यात लागून असलेल्या कोठारास आग लावणे, लाल बागेजवळच्या लुत्फुल्लाखान कोका यांच्या तळावर डाका घालणे आणि तेथील मालमत्ता लुटणे हे प्रकार मराठ्यांनी केले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१ जुलै इ.स.१७१०*
*हुशार व धाडशी भवानी बाई शंकराजी महाडिक औरंगजेबाच्या नोकरीत कर्नाटकात असताना शाहू राजांच्या सुटकेसाठी त्यांनी खुप प्रयत्न केले. संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर औरंगजेब मराठी राज्य गिळंकृत करण्यास टपला होता, साऱ्या दक्षिण प्रांतात मोगली फौजा धुमाकूळ घालत होत्या, अशावेळी हरजी महाडीक व शंकराजी महाडिक यांनी जिंजी परिसर स्वराज्यात ठेवण्याचा फार मोठा पराक्रम केला त्यामुळे शाहू महाराजांनी शंकराजी माहाडिक म्हणजेच आपले थोरले मेव्हणे यांना चार हजारी मनसबदार करून आपल्या ज्येष्ठ भगिनी भवानी बाई यांना चोवीस गावांची सनद त्यांच्या नावे करून दिली. शाहू महाराजांचे आपल्या मोठ्या भगिनी भवानीबाई यांच्यावर अतिशय प्रेम होते. भवानीबाई या अत्यंत हुशार व धाडशी होत्या मोगलांच्या धामधुमीत तारळे गावाची झालेली वाताहात १ जुलै १७१० मध्ये भवानी बाईंनी परत उभी केली. शंकराजी महाडिक यांचे सुमारे १७२८ च्या दरम्यान निधन झाले त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी म्हणजेच संभाजी महाराजांच्या कन्या भवानीबाई सती गेल्या.*
*१ जुलै इ.स.१७१८*
*श्रीमंत बाजीराव पेशवे वडिलांबरोबर म्हणजे बाळाजी विश्वनाथांबरोबर दिल्लीस निघाले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१ जुलै इ.स.१७३७*
*चिमाजी अप्पाने आपली निवडक माणसे ठाणे सर करावयास पाठवून त्यांनी २६ मार्च १७३७ रोजी ठाणे पोर्तुगिजांपासून जिंकून घेतले. आणि तिथून वसईवर हल्ला करण्यासाठी चांगला बंदोबस्त ठेविला. ३ एप्रिलला पारसिक घेतले, बेलापूर २८ एप्रिलला पडले. तसेंच वसईजवळील धारावी व कल्याणजवळील सांताक्रूझ ही ठाणी मे महिन्यातमराठ्यांनी घेतली. पाऊस काल जवळ आला तेव्हा चिमाजी अप्पाने निरनिराळ्या किल्ल्यांवर बंदोबस्तास खात्रीची मंडळी ठेवून व सगळी व्यवस्था चोख पणे लावून ते १ जुलै १७३७ रोजी पुण्यास परत आले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१ जुलै इ.स.१७९२*
*संशय दूर जाले, हें अति चांगले! अति चांगले!*
*श्रीमंत सवाई माधवरावांच्या कारकीर्दीत मराठी साम्राज्याचा जरीपटका दिल्लीच्या लाल किल्यावर डौलात फडकत होता. मुत्सद्दी नाना फडणीस आणि तरवारबहाद्दर महादजी शिंदे गनिमांस शहाणपण आणि पराक्रमाचा तमाशा दाखवीत होते. परंतु या दोन महारथींना काही काळ गैरसमजाच्या ग्रहणाने ग्रासले होते. सन १७९२ साली पाटीलबावा तब्बल एका तपानंतर पुण्यास आले. बादशहा कडून आणलेल्या फर्मानांचा फर्मानबाडीचा समारंभ झाला. छत्रपती माहाराजांकडून फर्मानांना मान्यता मिळाली. या दरम्यानच्या काळात नाना व महादजी यांच्यातील गैरसमजांचे ग्रहण सुटले.*
*सदर सर्व हकिगत नानांनी निजामाकडील पेशव्यांचे वकील गोविंदराव काळे यांना कळवली होती. ही हकिगत समजल्यानंतर गोविंदरावांनी दिनांक १ जुलै सन १७९२ रोजी नानांना पत्र लिहिले संशय दूर जाले, हें अति चांगले! अति चांगले! असे म्हणून अत्यंत समाधान व्यक्त केले.*
*तत्कालीन मराठे मराठा राज्यवृध्दीशिवाय दुसरे काहीच चिंतित नव्हते याचे हे पत्र म्हणजे उत्तम उदाहरण आहे. छत्रपती शिवाजी माहाराज यांच्या कैलासवासानंतर तब्बल ११२ नंतरही महाराजांचा "महाराष्ट्रधर्म" पत्रातील अक्षर अन अक्षरात दिसून येतो.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१ जुलै इ.स.१९०९*
*क्रांतिकारी मदनलाल धिंग्रा यांनी कर्नल विल्यम कर्झन वायली यांची इंपिरिअल इन्स्टिट्युटच्या ’जहांगिर हाऊस’मधे इंडियन नॅशनल असोसिएशनच्या सभेच्या वेळी गोळ्या झाडून हत्या केली.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
⛳ *जय गडकोट*⛳
*!! हर हर महादेव !!*
🚩आम्ही_शिवपाईक_बारा_मावळचे🚩
*श्री मंगेश चंद्रकांत वीर*
( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख )
मा श्री महेंद्र तानाजी देवघरे*
( अध्यक्ष पुणे जिल्हा )
मा श्री योगेशजी सुदामराव शेलार
(प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल)
महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🙏 शिवराय स्टेटस #📜इतिहास शिवरायांचा
11 likes
27 shares