महेश शिवाजी धानके
ShareChat
click to see wallet page
@mahesh_dhanke
mahesh_dhanke
महेश शिवाजी धानके
@mahesh_dhanke
माजी उपसभापती : अध्यक्ष: शहापुर तालुका काँग्रेस
*पतीचं दुसरं लग्न! स्टेशनवर 'पती, पत्नी और वो'चा राडा* तुमच्या परिसरातील सर्व बातम्या पाहण्यासाठी आणि *बातम्या शेअर करून कमाई करण्यासाठी सुरू अॅप* (Shuru App) डाउनलोड करा 👇🏻 https://shuru.co.in/dl/UPxJvp #🔎लेटेस्ट आंतरराष्ट्रीय अपडेट्स✌ #shurubreking #news #breaking news
🔎लेटेस्ट आंतरराष्ट्रीय अपडेट्स✌ - ShareChat
पति, पत्नी और वो, फिर तो स्टेशन बन गया युद्ध का अखाड़ा बाढ़ स्टेशन परिसर के बाहर पुराने टिकट काउंटर के पास पति-पत्नी और दूसरी पत्नी का हाई वोल्टेज ड्रामा देखने को मिला। नालंदा के सरमेरा थाना क्षेत्र के सोनू ने 14 साल पहले सकसोहरा थाना क्षेत्र के भागाबीघा गांव में शादी रचाई थी। उसकी 12 साल की एक बेटी भी है। पारिवारिक कलह से तंग आकर उसने परिवार का साथ छोड़ दिया और खुद को कुंवारा बताकर 2 दिन पहले बट सावित्री पूजा के दिन एक लड़की से शादी कर ली। दूसरी लड़की एनटीपीसी थाना क्षेत्र के रैली गांव की रहने वाली है। उसे भी दो साल का बच्चा है। बाढ रेलवे स्टेशन के पास युवक को दूसरी लड़की के साथ घूमते देख किसी ने इसकी जानकारी पहली पत्नी के परिजनों को दे दी। फिर दर्जनों लोग स्टेशन परिसर में पहुंच गए। पहले लोगों ने युवक को पकड़ कर जमकर कुटाई की और फिर उसका कॉलर पकड़ कर सकसोहरा थाना क्षेत्र ई-रिक्शा पर बिठाकर लेकर चले गए। दूसरी पत्नी अचानक हंगामा होता देख मौके से भाग खड़ी हुई। पूरा नजारा देखने के लिए लोगों की भीड़ इकट्ठा हो गई। 1 घंटे तक चले हाई वोल्टेज ड्रामा में न तो लोकल पुलिस नजर आई और न ही रेल पुलिस और रेलवे सुरक्षा बल के जवान ही मौके पर पहुंचे।
Shuru अ‍ॅपवरून बातम्या शेअर करून पैसे कमवा
*ठाण्यात ५६० झाडे कोसळली, विकासकामांवर गंभीर प्रश्नचिन्ह* तुमच्या परिसरातील सर्व बातम्या पाहण्यासाठी आणि *बातम्या शेअर करून कमाई करण्यासाठी सुरू अॅप* (Shuru App) डाउनलोड करा 👇🏻 https://shuru.co.in/dl/QEidKE #breaking news #news #shurubreking #लोक हिंद #लोक हिंद न्युज
breaking news - ShareChat
ठाणे:स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या ठाणे शहरात गेल्या दीड वर्षांत ५६० झाडे उन्मळून पडली तर ३८९ फांद्या कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे, पाऊस किंवा वादळी वारे नसतानाही गेल्या पाच महिन्यांत ५५ मोठी झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे नागरी विकासकामे, अवैज्ञानिक खोदकामे आणि झाडांच्या मुळांवर होणारा परिणाम याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. एकेकाळी हिरवाईने नटलेले ठाणे आज सिमेंट काँक्रीटच्या जंगलात बदलत चालले आहे. मेट्रो, सिमेंट रस्ते, मलनि:सारण वाहिन्या, पदपथ आणि विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू आहे. या कामांदरम्यान झाडांच्या मुळांवर घाला पडत असल्याचे पर्यावरण अभ्यासकांचे म्हणणे आहे. झाडांची मुळे तुटल्याने त्यांची जमिनीवरील पकड कमकुवत होते आणि थोड्याशा वाऱ्यातही मोठी झाडे कोसळण्याच्या घटना वाढत आहेत. महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या आकडेवारीनुसार, या वर्षाच्या (२०२६) जानेवारीत ८, फेब्रुवारीत १४, मार्चमध्ये १५, एप्रिलमध्ये १२ तर मे महिन्यात आतापर्यंत ६ झाडे कोसळली आहेत. याशिवाय ३९ ठिकाणी फांद्या पडल्याच्या घटनांची नोंद झाली आहे. दरम्यान, काही ठिकाणी इमारती किंवा व्यावसायिक आस्थापनांसमोर अडथळा ठरणारी झाडे जाणीवपूर्वक सुकवण्यासाठी त्यांच्या मुळांमध्ये ॲॅसिड किंवा रासायनिक इंजेक्शन टाकले जात असल्याचाही आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. त्यामुळे या सर्व घटनांची सखोल चौकशी करून वृक्षसंवर्धनासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
Shuru अ‍ॅपवरून बातम्या शेअर करून पैसे कमवा
*मोताळा वनजमिनीवर आरसीसीचे अवैध बांधकाम? कुणाच्या आशीर्वादाने सुरु?* तुमच्या परिसरातील सर्व बातम्या पाहण्यासाठी आणि *बातम्या शेअर करून कमाई करण्यासाठी सुरू अॅप* (Shuru App) डाउनलोड करा 👇🏻 https://shuru.co.in/dl/DCYa9U #shurubreking #news #breaking news
*पुण्यात रिक्षाचालकावर जीवघेणा हल्ला, भरदिवसा थरार!* तुमच्या परिसरातील सर्व बातम्या पाहण्यासाठी आणि *बातम्या शेअर करून कमाई करण्यासाठी सुरू अॅप* (Shuru App) डाउनलोड करा 👇🏻 https://shuru.co.in/dl/f4MASK #breaking news #news #shurubreking
*मुंब्र्यात पोलिसांच्या हस्ते ‘आउटलाइन स्टोरीज़’चा दिमाखदार शुभारंभ!* तुमच्या परिसरातील सर्व बातम्या पाहण्यासाठी आणि *बातम्या शेअर करून कमाई करण्यासाठी सुरू अॅप* (Shuru App) डाउनलोड करा 👇🏻 https://shuru.co.in/dl/7t79Al #shurubreking #news #breaking news
उल्हासनगरमध्ये लाखो लीटर पाणी वाया; लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष!** : *उल्हासनगरमध्ये लाखो लीटर पाणी वा… https://shuru.co.in/dl/g1rTZ9 #shurubreking
shurubreking - ShareChat
*उल्हासनगरमध्ये लाखो लीटर पाणी वाया; लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष!** ### **समाजसेवक राधाकृष्ण साठे यांनी व्हिडिओ व्हायरल करून वेधले लक्ष; ठोस कारवाई होणार का? नागरिकांचा सवाल** उल्हासनगर : एकीकडे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना, दुसरीकडे उल्हासनगर महानगरपालिकेच्या पॅनल क्रमांक १७ मध्ये लाखो लीटर स्वच्छ पाणी रस्त्यावर वाहून वाया जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रशासनाचा ढिसाळ कारभार आणि नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींची उदासीनता यामुळेच हा पाण्याचा अपव्यय होत असल्याचा आरोप आता नागरिक करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पॅनल क्रमांक १७ मधील मुख्य जलवाहिनी किंवा जोडणीमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत आहे. दररोज लाखो लीटर पेक्षाही अधिक पाणी रस्त्यावरून वाहून गटारात जात असल्याचे विदारक चित्र येथे पाहायला मिळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, संबंधित पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि नुकत्याच झालेल्या निवडणुकीत निवडून आलेले स्थानिक नगरसेवक, महापौर किंवा उपमहापौर यांचे या गंभीर समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येत आहे. हा सगळा प्रकार स्थानिक समाजसेवक राधाकृष्ण साठे यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन कॅमेऱ्यात कैद केला. तसेच स्वतः रस्त्यावर वाहत असलेले पाणी त्यांनी स्वतःही पाणी पीत असतानाचा व्हिडिओ नागरिकांच्या लक्षात आणून दिला त्यांनी या पाणी गळतीचा एक सविस्तर व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. उल्हासनगर प्रभात गार्डन जवळ असलेल्या राहदारी च्या रस्त्यावर दिनांक 18 मे 2026 रोजी काढलेल्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या संथ कारभाराचे वाभाडे काढत, हे गंभीर प्रकरण नागरिक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. साठे यांनी केलेल्या या धाडसी प्रयत्नामुळे पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. पाणी ही काळाची गरज असताना, केवळ अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे रोज हजारो गॅलन पाणी वाया जात असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. आता या व्हायरल व्हिडिओची दखल घेऊन उल्हासनगर महानगरपालिका प्रशासन आणि नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी ही पाणी गळती रोखण्यासाठी कोणती ठोस पावले उचलणार? याकडे संपूर्ण उल्हासनगरकरांचे लक्ष लागून राहिले आहे.
Shuru अ‍ॅपवरून बातम्या शेअर करून पैसे कमवा
*₹17 कोटींची चांदी घेऊन जाणारी व्हॅन पलटी, मुंबई-गुजरात मार्गावर खळबळ!* तुमच्या परिसरातील सर्व बातम्या पाहण्यासाठी आणि *बातम्या शेअर करून कमाई करण्यासाठी सुरू अॅप* (Shuru App) डाउनलोड करा 👇🏻 https://shuru.co.in/dl/JqP2bc #breaking news #news #shurubreking
*न्यायालयाचा दणका: उदगीरमध्ये अतिक्रमकाला २५ हजारांचा दंड!* तुमच्या परिसरातील सर्व बातम्या पाहण्यासाठी आणि *बातम्या शेअर करून कमाई करण्यासाठी सुरू अॅप* (Shuru App) डाउनलोड करा 👇🏻 https://shuru.co.in/dl/XPBzQ4 #shurubreking #news #breaking news
shurubreking - ShareChat
नागलगाव–सुमठाण पाणंद रस्ता अखेर मोकळा न्यायालयाचा धडक निर्णय : अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांना २५ हजारांचा दंड उदगीर तालुक्यातील नागलगाव ते सुमठाण या गावांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या पाणंद रस्त्यावर करण्यात आलेले अतिक्रमण अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार हटविण्यात आले. या प्रकरणात अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांना न्यायालयाने तब्बल २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला असून, उदगीर तालुक्याच्या इतिहासात अशा प्रकारे दंडात्मक कारवाई होण्याची ही पहिलीच घटना ठरली आहे.गेल्या अनेक महिन्यांपासून नागलगाव सुमठाण मार्गावरील पाणंद रस्ता एका शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून बंद केल्याने परिसरातील शेतकरी,व नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. शेतात जाण्यासाठी पर्यायी मार्ग नसल्याने अनेक वेळा वाद निर्माण झाले होते.याप्रकरणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्यानंतर महसूल प्रशासनाने प्रकरण न्यायालयात दाखल केले होते.सदर प्रकरणाची न्यायालयाने गंभीर दखल घेत संबंधित अतिक्रमणधारक शेतकऱ्यांवर २५ हजार रुपयांचा दंड ठोठावत तातडीने रस्ता खुला करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानंतर महसूल प्रशासन, पंचायत विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटविण्यात आले.प्रशासनाच्या उपस्थितीत जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावरील अडथळे हटवून अखेर पाणंद रस्ता सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला. यावेळी परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.या कारवाईमुळे नागलगाव व सुमठाण परिसरातील शेतकरी आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. भविष्यात पाणंद रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल, असा स्पष्ट संदेश या निर्णयातून गेला असल्याची जोरदार चर्चा उदगीर तालुक्यात सुरू आहे.
Shuru अ‍ॅपवरून बातम्या शेअर करून पैसे कमवा
*उल्हास नदी आजारी? जलपर्णीचे साम्राज्य, एल निनोचा गंभीर इशारा!* तुमच्या परिसरातील सर्व बातम्या पाहण्यासाठी आणि *बातम्या शेअर करून कमाई करण्यासाठी सुरू अॅप* (Shuru App) डाउनलोड करा 👇🏻 https://shuru.co.in/dl/baHGdJ #breaking news #news #shurubreking
breaking news - ShareChat
*एल निनोचा फटका : उल्हास नदीत जलपर्णीचे साम्राज्य; पर्यावरणीय संकट की प्रशासनासाठी इशारा?* नदी वाचवायची असेल तर फक्त जलपर्णी हटवून चालणार नाही, नैसर्गिक प्रवाह मिळणे गरजेचे : उल्हास नदी बचाव कृती समिती उल्हासनगर: राज्यात 'एल निनो'च्या प्रभावामुळे कमी झालेला पाऊस, वाढते तापमान आणि नदीतील घटता प्रवाह यामुळे उल्हास नदीसह अनेक नद्यांमध्ये जलपर्णीची मोठी वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी नदीपात्र हिरव्या थराने झाकले गेले असून, ही परिस्थिती केवळ सौंदर्याचा प्रश्न नसून गंभीर पर्यावरणीय असंतुलनाचे लक्षण असल्याचे मत पर्यावरण अभ्यासक रविंद्र लिंगायत यांनी व्यक्त केले आहे. 'उल्हास नदी बचाव कृती समिती'च्या निरीक्षणानुसार, नदीतील नैसर्गिक प्रवाह कमी होणे, प्रदूषित सांडपाणी, रासायनिक अंश आणि नदीलगत वाढलेला व्यावसायिक पाणी उपसा ही जलपर्णी वाढीमागील प्रमुख कारणे आहेत. समितीने स्पष्ट केले आहे की, जलपर्णी ही स्वतः समस्या नसून नदी आजारी असल्याचा हा गंभीर इशारा आहे. नदीतील पाण्याचा प्रवाह मंदावल्याने आणि पाणी स्थिर राहिल्याने जलपर्णीच्या वाढीस पोषक परिस्थिती निर्माण होते. * नदीतील विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण कमालीचे घटले आहे. * मासेमारी व्यवसाय आणि जलचर जैवविविधतेवर गंभीर परिणाम होत आहे. * डासांचा प्रादुर्भाव वाढून संसर्गजन्य रोगांचे प्रमाण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. * पूरस्थितीत पुलांखाली जलपर्णी अडकून पाण्याचा प्रवाह रोखला जाण्याचा मोठा धोका आहे. * उन्हाळ्यात जलपर्णीमुळे नदीचे पाणी अधिक वेगाने बाष्पीभवन होऊन नष्ट होत आहे. उल्हास नदी बचाव कृती समितीने या परिस्थितीवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. नदीलगत असलेल्या अनेक रिसॉर्ट्स, हॉटेल्स, वॉटर पार्क आणि खाजगी टँकर व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा होत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. विशेषतः उन्हाळ्यात नदीतील पाणी आधीच कमी असताना, होणारा हा अनधिकृत व्यावसायिक पाणी उपसा नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला पूर्णपणे रोखत असल्याचे समितीने नमूद केले आहे. या गंभीर संदर्भात उल्हास नदी बचाव कृती समितीने रायगड, ठाणे आणि मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांसह पाटबंधारे विभागाशी अधिकृत पत्रव्यवहार सुरू केला आहे. नदीपात्रातून होत असलेल्या कथित बेकायदेशीर पाणीउपशाबाबत तातडीने चौकशी करण्याची मागणी समितीने केली आहे. १. नदीतून टँकरद्वारे होणारा अवैध पाणी उपसा तात्काळ थांबवावा. २. नदीलगतच्या रिसॉर्ट, हॉटेल व वॉटर पार्कच्या पाणीवापराची कायदेशीर तपासणी करावी. ३. विनापरवाना पाणी उपसा करणाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाई करावी. ४. उन्हाळ्यात नदी संवर्धनासाठी विशेष नियंत्रण यंत्रणा लागू करावी. ५. नदीतील किमान पर्यावरणीय प्रवाह कायम ठेवण्यात यावा. > *समितीची रोखठोक भूमिका...** > "नदी ही कोणत्याही व्यावसायिक वापरासाठी अमर्याद स्रोत नसून ती लाखो नागरिकांची जीवनवाहिनी आहे. आज नदीतील जलपर्णी ही निसर्गाने दिलेली चेतावणी आहे. जर वेळेत नदीतील पाणी उपसा, प्रदूषण आणि अतिक्रमणावर नियंत्रण आले नाही, तर भविष्यात नदीमध्ये पाण्याऐवजी फक्त जलपर्णीच शिल्लक दिसेल," असा इशारा रविंद्र लिंगायत यांनी समितीच्या वतीने दिला आहे. > * उल्हास नदी क्षेत्र 'संवेदनशील क्षेत्र' म्हणून जाहीर करावे. * नदीलगतच्या व्यावसायिक पाणी वापरावर कडक नियंत्रण आणावे. * सांडपाणी प्रक्रिया अनिवार्य करावी. * जलपर्णी व्यवस्थापनासाठी स्थानिक नागरिकांच्या समित्या स्थापन कराव्यात. * नदी पुनरुज्जीवनासाठी शासनाने दीर्घकालीन कृती आराखडा तयार करावा.
Shuru अ‍ॅपवरून बातम्या शेअर करून पैसे कमवा
*NEET गैरप्रकारात लातूरच्या 'RCC' संस्थापकाला अटक, 'पॅटर्न'वर प्रश्नचिन्ह?* तुमच्या परिसरातील सर्व बातम्या पाहण्यासाठी आणि *बातम्या शेअर करून कमाई करण्यासाठी सुरू अॅप* (Shuru App) डाउनलोड करा 👇🏻 https://shuru.co.in/dl/jwXyTq #shurubreking #news #breaking news
shurubreking - ShareChat
लातूर : देशभर गाजत असलेल्या ‘नीट’ परीक्षा गैरप्रकार प्रकरणात लातूरमधील प्रसिद्ध ‘आरसीसी’ क्लासेसचे संस्थापक शिवराज मोटेगावकर यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केल्याची माहिती समोर आल्यानंतर राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे लातूरच्या बहुचर्चित ‘लातूर पॅटर्न’वर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नीट परीक्षा गैरप्रकार आणि पेपरफुटी प्रकरणाचा तपास सीबीआयकडून सुरू असून, तपासादरम्यान समोर आलेल्या काही धागेदोरांवरून ही कारवाई करण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र तपास यंत्रणेकडून अधिकृतपणे सविस्तर माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. लातूर हे राज्यातील वैद्यकीय प्रवेश परीक्षांसाठीचे मोठे शिक्षण केंद्र म्हणून ओळखले जाते. हजारो विद्यार्थी दरवर्षी येथे कोचिंगसाठी दाखल होतात. अशा परिस्थितीत नामांकित कोचिंग संस्थेच्या संचालकावर झालेल्या कारवाईमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणानंतर शहरातील खासगी कोचिंग संस्थांबाबत विविध चर्चा रंगू लागल्या असून, सोशल मीडियावरही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जण संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी करत आहेत, तर काही जण तपास पूर्ण होईपर्यंत संयम बाळगण्याचे आवाहन करत आहेत. दरम्यान, या घडामोडींमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर परिणाम होऊ नये, अशी भावना शिक्षण क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे. ‘लातूर पॅटर्न’ने अनेक यशस्वी विद्यार्थी घडवले असले तरी अशा घटनांमुळे संपूर्ण शिक्षण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित होत असल्याची चर्चा सुरू आहे. या प्रकरणाचा तपास पुढे कोणत्या दिशेने जातो आणि आणखी कोणती नावे समोर येतात, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.
Shuru अ‍ॅपवरून बातम्या शेअर करून पैसे कमवा